Total Pageviews

Wednesday 31 August 2011

VOTE BANK POLITICS ON DEATH PENALTY BY OMAR TAMILNADU ASSEMBLY ,PUNJAB POLITICIANS

नवी दिल्ली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने केलेल्या ठरावावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जोरदार शरसंधान केले आहे. जम्मू काश्मीर विधानसभेने अफझल गुरूच्या संदर्भात असा ठराव पास केला असता तर केवढा गहजब उडाला असता अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी ट्विटरवर दिली आहे.

राजीव गांधी यांच्या तीन मारेक-यांना आठ आठवड्यात फाशी देण्याच्या आदेशाला तामिळनाडू हायकोर्टाने मंगळवारी स्थगिती दिली. याचीच री ओढत राष्ट्रपतींनी या तिघांचा दयेचा अर्ज मंजूर करावा अशी विनंती करणारा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर केला आहे.

राज्या- राज्यांमधून होणाऱ्या अशा दुट्टपी घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ओमर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अफझल गुरूच्या वकील कामिनी जैस्वाल यांनी आपल्या देशातील समाज विभागला गेला असल्याचे म्हटले आहे. सर्वच घटनांना राजकीय आणि धामिर्क रंग दिला जातो आणि याला आपले राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.

ओमर यांचे वक्तव्य दुदैर्वी

ओमर यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. हुरियत नेत्यांनी असे वक्तव्य केले असते तर समजू शकते पण एका जबाबदार मुख्यमंत्र्यांनी हे बोलायला नको होते.

शहनवाझ हुसेन, भाजप प्रवक्ते

हे त्यांचे मत...

ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपली मते वैयक्तिकरित्या अथवा सामुहिकरित्या व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ओमर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचे कारण नाही.

रेणुका चौधरी, काँग्रेस प्रवक्त्या

No comments:

Post a Comment