Total Pageviews

Wednesday 31 August 2011

ARUNDHATI ROY TIRADE AGAINST ANNA

राष्ट्रगीत, तिरंगा, वंदे मातरम्ला जातीयवादाची दुर्गंधी
अरुंधती रॉय यांची मुक्ताफळे
नवी दिल्ली, दि. ३१ (वृत्तसंस्था) - जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचा कधीही भूभाग नव्हता, असे अकलेचे तारे तोडणार्‍या वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय यांनी आज राष्ट्रगीत, तिरंगा आणि वंदे मातरम्ला जातीयवादाची दुर्गंधी येते, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
अरुंधती रॉय यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून त्यात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. जन गण मन हे राष्ट्रगीत, तिरंगा झेंडा तसेच वंदे मातरम् हे राष्ट्रगान जातीयवाद पसरवतात. वंदे मातरम्चा जातीय इतिहास फार मोठा आहे, अशी गरळही त्यांनी ओकली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पोलीसच घाबरले त्यामुळे ते अहिंसक झाले, असा जावईशोधही रॉय यांनी लावला. अण्णांच्या आंदोलनात अगोदर व्यासपीठावर भारतमातेचे छायाचित्र लावण्यात आले होते ते काढून नंतर तेथे महात्मा गांधींचे छायाचित्र लावण्यात आले, असा आरोपही रॉय यांनी केला.
अण्णा म्हणजे रिकामी घागरअण्णा हजारे म्हणजे रिकामी घागर. त्याच्यात मर्जीप्रमाणे कोणीही पाणी भरू शकतो. अण्णा कोण आहेत, त्यांचा संबंध कोणत्या लोकांशी आलेला आहे. त्यांचे समाजासाठी योगदान काय आहे हे सर्वजण जाणतात

No comments:

Post a Comment