Total Pageviews

Showing posts with label NITIN GADKARI. Show all posts
Showing posts with label NITIN GADKARI. Show all posts

Tuesday, 25 December 2018

आसामच्या बोगीबील पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन: सर्वांत लांब डबलडेकर ब्रिजचं महत्त्व


पंतप्रधान मोदींच्या हस्ते ब्रह्मपुत्रेवरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन, आणीबाणीच्या स्थितीत लष्कराचे टँकही जाऊ शकणार
दिव्य मराठी वेब टीम जवळपास पाच किलोमीटर लांबी असलेला हा पूल देशातील आजवरचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे.
डिब्रूगड - आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडणाऱ्या डबल डेकर पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या पुलामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा मार्ग खुला झाल्याने या भागातील लोकांचे अनेक वर्षांचे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे.

नाताळाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाचे लोकार्पण केले आहे. रेल्वेमार्ग आणि वाहनांचा मार्ग अशा या डबल डेकर पुलामुळे ईशान्येला तैनात असलेल्या लष्करालाही मोठी मदत होणार आहे. या पुलाच्या कामाची सुरुवात 1997 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्यावेळी झाली होती. जवळपास पाच किलोमीटर लांबी असलेला हा पूल देशातील आजवरचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे.
>> ब्रह्मपुत्र नदीच्या दोन टोकांना जोडणारा हा पूल तयार करणे हे मोठे आव्हान होते.
>> या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तसेच भूकंपाची शक्यताही जास्त असते. पण हा पूल 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा धक्का सहन करू शकतो.
>> हा देशातील सर्वात मोठा पूल आहे. भारतीय रेल्वेने हा डबल डेकर पूल तयार केला आहे. याच्या खालच्या डेकवर दोन रेल्वे मार्ग आहेत. तर वरच्या डेकवर तीन लेनचा वाहतुकीचा मार्ग आहे.
>> हा पूल उत्तरेला धेमाजी आणि दक्षिणेत डिब्रूगडला जोडणारा आहे.
>> पूर्वी धेमाजीहून डिब्रूगड पर्यंत 500 किमीचे अंतर कापण्यासाठी 34 तास लागायचे. आता हा प्रवास केवळ 10 किमीचा असेल आणि तोही 3 तासांत पू्ण होईल.
>> या पुलावरून लष्कराचे टॅकही नेता येणार आहे. आणीबाणीच्या स्थितीत हा पूल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
>> पूर्वी भारतीय लष्कराला भारत-चीन सीमेवर जाण्यासाठी नदीच्या दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी अनेक तासांचा रस्ता ओलांडून जावे लागत होते.
ह्मपुत्रा नदीवरील देशातील सगळ्यात लांब रेल-रोड पुलाचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज झालं. या पुलामुळं अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे. १९९७मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी पुलाचं भूमिपूजन केलं. मात्र, प्रत्यक्षात या पुलाचं बांधकाम वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालं. तब्बल २१ वर्षांनंतर हा पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
बोगीबील पुलाची लांबी ४.९५ किलोमीटर आहे. आसाममधील दिब्रूगड आणि धीमाजी या दोन शहरांना हा पूल जोडतो. पुलावर तीन पदरी रस्ता आणि दोन पदरी रेल्वे रुळ आहेत. तसंच ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीपासून ३२ मीटर उंचीवर हा पूल आहे. बोगीबील पुलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पुलांसारखी आहे
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरच्या डबलडेकर पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. रस्ते आणि रेल्वे अशी दुहेरी वाहतूक करणारा हा 'बोगीबील ब्रिज' देशातला सर्वांत लांब डबलडेकर पूल आहे.
1. 1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली. पण काही कारणास्तव कामाला सुरुवात होण्यास विलंब झाला.
2 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. आणि अखेर आज तब्बल 16 वर्षांनंतर त्यांच्या 94व्या जन्मदिनी या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे.
3 रेल्वे आणि रस्ता अशी वाहतुकीची व्यवस्था असणारा देशातला सगळ्यांत मोठा पूल आहे, असं नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते प्रणव ज्योती शर्मा यांनी सांगितलं.
4. हा डबलडेकर पूल 4.94 किलोमीटर लांबीचा आहे. भारतातला सगळ्यांत लांब डबलडेकर पूल आहे.
§ 
5. 5,920 कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.
6. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या प्रदेशात प्रचंड पाऊस पडतो तसंच हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे इथे पुलाची उभारणी करणं मोठं आव्हान होतं. हा पूल रिश्टर स्केलवर 7.0 पर्यंतच्या भूकंपाचा सामना करू शकतो, असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं.
तिनसुकिया-नाहरलागून इंटरसिटी एक्स्प्रेस या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर हा पूल औपचारिक वाहतुकीसाठी खुला होईल. ही ट्रेन आठवड्यातून पाचवेळा धावणार आहे.
8. या पुलामुळे आसाममधील तिनसुकिया आणि अरुणाचल प्रदेशमधील नाहरलागून या शहरामधलं अंतर दहा तासांनी कमी होणार आहे.
9. या पुलाच्या खालच्या बाजूला दोन समांतर रेल्वे मार्ग आहेत. वरच्या बाजूला तीन पदरी रस्ता मार्ग आहे. रस्त्यावरची तसंच रेल्वेच्या माध्यमातून सातत्याने चालणारी वाहतूक पेलण्यास हा पूल सक्षम आहे.
10. अरुणाचल प्रदेश, आसामसह पूर्वांचलातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा मानला जात आहे. या पुलामुळे दिब्रूगढच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा
पण एवढंच या पुलाचं वैशिष्ट्य नाहीये. सुरक्षेच्या दृष्टिनंही 'बोगीबील ब्रिज' महत्त्वाचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल भारतीय लष्करासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
अरुणाचलची सीमा चीनला लागून आहे. इथे चीनकडून कोणताही हालचाल झाल्यास भारतीय लष्कर या पुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचू शकते. 'बोगीबील ब्रिज'च्या खाली दोन रेल्वे लाइन टाकण्यात आल्या आहेत आणि त्याच्यावर तीन पदरी रस्ता आहे. या रस्त्यावरून सैन्याच्या अवजड वाहनं, रणगाड्यांची सहज वाहतूक करता येऊ शकते.


Saturday, 24 November 2018

मरिनाचा प्रकल्प मुंबईच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा -जयंत होवाळ, Maharashtra Times |


पूर्वेकडे नवी पहाट !
मुंबईत आता पर्यटनस्थळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. जी काही आहेत, त्यांच्यात काळानुरूप सुधारणा झालेली नाही. राणीच्या बागेची रया गेली आहे. पश्चिम किनारे गलिच्छ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्व किनारपट्टीवर नवी पहाट उगवत आहे. आगामी काळात पूर्व किनारपट्टी मुख्य आकर्षण ठरेल, अशी चिन्हे आहेत.


पूर्वेकडे नवी पहाट !
मुंबईचा समुद्रकिनारा म्हटले की गेट वे ऑफ इंडिया, दादर -गिरगाव चौपाटी, जुहू आणि वर्सोवाहे वर्षानुवर्षीचे समीकरण! गेट वे ऑफ इंडियावर रोज हजारो पर्यटक येतात. जलवाहतुकीच्या माध्यमातून आसपासच्या पर्यटनस्थळी फेरफटका मारतात. मरिन ड्राइव्हला तिथल्या कट्ट्यावर बसून विशाल पसरलेल्या सागराचे रूप न्याहाळतात. समुद्राच्या लाटांशी खेळायचे असेल, तर मग गिरगाव, दादर चौपाटी किंवा जुहू वर्सेावा बीचकडे पावले वळतात. प्रामुख्याने मुंबईचा पश्चिम किनारा हाच आतापर्यंत चर्चेत राहिला आहे. पूर्व किनारा त्या तुलनेत दुर्लक्षितच राहिला. पण येत्या तीन वर्षांत पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व किनाराच जास्त चर्चेत आणि पर्यटकांना आकर्षित करणारा ठरू शकेल. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्थात एमबीपीटीचा व्याप गेल्या काही वर्षात खूपच कमी झाला आहे. मुंबईत बंदरातून होणारी कोळशाची वाहतूक थांबली आहे. काही मोजका मालच आता बंदरात येतो. कामाचा व्याप कमी झाल्याने एमबीपीटीच्या कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामुळे एमबीपीटीची ओळख पुसल्यासारखी झाली होती. मात्र एमबीपीटीच्या शेकडो एकर मोकळ्या जागेचा विकास करण्याची योजना आखण्यात आल्यापासून चित्र एकदम बदलून गेले आहे. केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांची 'व्हीजन' व एमबीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांची कार्यक्षमता या दोन्हींचा मेळ बसल्याने मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर विकासाचा सूर्य उगवणार आहे. पूर्व किनारपट्टीसाठी गडकरी प्रकल्पांचा धडाका लावत विशेष लक्ष घातले आहे. तर, प्रत्येक प्रकल्प झपाट्याने मार्गी लावण्यासाठी भाटिया प्रचंड मेहनत घेत आहेत.

मुंबईचा पूर्व किनाऱ्यावर अर्थात एमबीपीटीच्या मोकळ्या जागेवर तब्बल २५ प्रकल्प आकारास येत असून त्यासाठी साडेचार हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प फक्त कागदावरच नाहीत, तर त्यापैकी दोन मोठे महत्त्वाचे प्रकल्प पूर्णही झाले असून उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत, तर काही प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. मुंबई बंदरातील क्रूझ व्यवसायाला चालना देण्यासाठी डोमेस्टिक व आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारले जात आहे. त्यापैकी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल कार्यान्वित झाले असून पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टर्मिनलही सुरू होईल. आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे यापुढे महाकाय अशा देशी तसेच परदेशी क्रूझ थेट मुंबईत बंदरातूनच प्रवासाला सुरूवात करतील. क्रूझ सेवा महागडी असल्याने सर्वसामान्यांना त्याचा काय उपयोग असा सवाल केला जातो. मात्र त्या माध्यमातून मुंबईकडे अधिक पर्यटक येऊन महसूल मिळेल, ही बाबही महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय किंवा डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल क्रूझ व्यवसायाला अपेक्षप्रमाणे प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येने क्रूझ येऊ लागल्या, तर आणखी एक टर्मिनल इमारत बांधण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

जलवाहतुकीला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भाऊचा धक्का ते मांडवा व नेरूळ या त्रिकोणात प्रवासी तसेच वाहनांची ने आण करणारी रोरो सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पाची जेट्टी बांधून तयार आहे. फक्त आता या सेवेसाठी ग्रीसमधून जहाज मुंबईत येण्याची प्रतिक्षा आहे. येत्या दोन महिन्यात ही वाहतूक सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ दोन तासाने वाचेल.

मुंबई पोर्ट वॉटर फ्रंट या प्रकल्पात अॅम्फिथिएटर, स्केटिंग रिंग, मुंबईकरांसाठी वॉकर्सवे, जॉगिंग ट्रॅक, साकलिंग ट्रॅकची सुविधा असेल. त्यामुळे समुद्राच्या लगतच विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होईल. १७ हजार चौरस मीटर क्षेत्रात हा वॉटर फ्रंट आकारास येणार आहे. यातील वॉकवे समुद्रालगतच असल्याने मरिन ड्राइव्हच्या धर्तीवर आनंद घेता येईल. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या समुद्रात दोन तरंगती रेस्टॉरन्ट सुरू झाली आहेत. ही रेस्टॉरन्ट महागडी असल्याने सर्वसामान्य माणूस तेथे जाण्यास धजावणार नाही. मात्र वॉटर फ्रंट प्रकल्पात सी-साइड रेस्टॉरन्ट सुरू केले जाणार असल्याने अगदी समुद्रात नाही, पण समुद्रालगतच्या रेस्टॉरन्टमध्ये जाण्याचा आनंद घेता येईल. हे रेस्टॉरन्ट वाजवी दरातील असेल, अशी अपेक्षा आहे.

मरिनाचा प्रकल्प मुंबईच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. हा प्रकल्प विशेष करून यॉटसाठी आहे. एका वेळी ३१० यॉट पार्क करण्याची सुविधा आहे. यॉटची सफर वाजवी ठेवली तरी सर्वसामान्याना परवडू शकेल. प्रत्येक वेळी बाहेरचे पर्यटक डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली पाहिजे असे नाही. तर मुंबईकरांनाही मुंबईतच आणखी पर्यटन स्थळे उपलब्ध झाली, तर नक्कीच आवडेल. कान्होजी आंग्रे बेट हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक बेटाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, यादृष्टीने हे बेट विकसित केले जात आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्टसची सुविधा असेल. मुंबईपासून हे बेट १३ नॉटिकल मैलावर असल्याने मुंबईकरांना तेथे सहज जाता येईल.

मरिन ड्राइव्ह हा गजबजलेला परिसर. समुद्रालगतचा कट्टा कायम वर्दळीने गजबजलेला असतो. पण थेट समुद्राशी लगट करता येत नाही. या ठिकाणी जेट्टी बांधली जाणार आहे. येथे दहा आसनी सी-प्लेन, पॅसेंजर लॉंचसेवा तसेच वॉटर स्पोर्टसची सुविधा असेल. जेट्टीमुळे या ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल सुरू करता येईल. साहजिकच गेटवेऑफ इंडियाला पर्याय मिळेल.

शिवडी ते एलिफंटा रोप वे पूर्व किनारा विकासातील आणखी एक महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा अवधी आहे. साधारणपणे तीन ते चार वर्षाचा कालावधी गृहित धरण्यात आला आहे. आठ किलोमीटर लांबीचा, तब्ब्ल ८०० कोटी रूपयांचा हा प्रकल्प दळवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात मोलाचा ठरणार आहे. प्रवासी वाहून नेणाऱ्या ३६ ट्रॉल्या एकाचवेळी रोपवेवरून येजा करतील. याशिवाय ससून डॉकचे नूतनीकरण, बीपीटीच्या कर्मचाऱ्यांसह अन्य मुंबईकरांनाही वैद्यकीय सुविधा पुरवणारे अद्ययावत हॉस्पिटल, जहाज दुरूस्ती केंद्र, इंदिरा डॉकचे नूतनीकरण, ऑटोमोबाईल हब टर्मिनल, जहाजातून येणाऱ्या मालाला गोदामापर्यंत पोहचवण्यासाठी कोस्टल रोड, आदी २५ प्रकल्प राबवले जात आहेत.


Wednesday, 14 November 2018

WHY BHARATMALA?-


Prime focus on: Optimizing efficiency of the movement of goods and people across the country
50 New National corridors Connecting 550 Districts in the country through NH linkages
Generating large number of direct and indirect employment opportunities in the construction & infrastructure sector and also
as part of the enhanced economic activity resulting from better road connectivity across the country
Development of 24,800 kms in Phase- I
Phase –I includes development of 10,000 kms of balance
road works under NHDP, taking the total to 34,800 kms at
an estimated cost of Rs.5,35,000 crore
Highlights of Bharatmala Pariyojana
Improvement in Efficiency of existing corridors through development of Multimodal
Logistics Parks and elimination of choke points
Enhanced focus on improving connectivity in North East and leveraging
synergies with Inland Waterways
Emphasis on use of technology & scientific planning for Project
Preparation and Asset Monitoring
Delegation of powers to expedite project delivery-Phase I to complete by 2022
Improving connectivity in the North East
• 24 Integrated check posts (ICPs) identified
• Transit through B’desh to improve North East connectivity
• Integrating Bangladesh – Bhutan – Nepal and  Myanmar – Thailand
corridors will make NorthEast hub of East Asia

Tuesday, 13 November 2018

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राजमार्ग, जहाजबांधणी, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात अतिशय भन्नाट कल्पना-tarun bharat

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राजमार्ग, जहाजबांधणी, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात अतिशय भन्नाट कल्पना येत असतात आणि त्या कल्पनांना ते मूर्त रूपही देतात, हे आधी महाराष्ट्राने अनुभवले होते, आता संपूर्ण देश अनुभवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीत (ज्याला आपण काशी आणि बनारस म्हणूनही ओळखतो) गंगा नदीच्या काठावर, देशातल्या पहिल्या मल्टीमोडल टर्मिनलचे उद्घाटन परवा, सोमवारी पंतप्रधानांच्याच हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी जेव्हा नद्यांमधून वाहतुकीची कल्पना सर्वप्रथम मांडली होती, तेव्हा अनेक लोक त्यावर हसले होते. भारतातल्या नद्यांमध्ये पाणीच नाही, तर जलवाहतूक कशी करणार, असे सांगत अनेकांनी गडकरींच्या या कल्पनेची हेटाळणी केली होती. पण, या हेटाळणीकडे लक्ष देत आपला इरादा सोडून देतील ते गडकरी कसले? एकदा गडकरी यांनी एखादी बाब मनात आणली, तर ते त्यास पूर्णत्व दिल्यानंतरच मोकळा श्वास घेतात, हे त्यांना जवळून ओळखणार्या सगळ्यांनाच माहीत आहे. गडकरी हे दिवास्वप्ने पाहतात, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. पण, गडकरींनी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही आणि ते देत नाहीत. ते आपल्या पद्धतीने मार्गक्रमण करीत असतात.
गंगेतून वाहतुकीच्या बाबतीतही त्यांनी निर्धार केला होता आणि त्यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदरातून कंटेनर्स घेऊन निघालेले जहाज गंगा नदीतून प्रवास करीत वाराणसीत पोहोचले आणि आलेल्या कंटेनर्समधील पहिला कंटेनर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उतरवण्यात आला. एका जहाजामध्ये दीडशेपेक्षा जास्त कंटेनर्स बसतात ही बाब लक्षात घेतली, तर जलवाहतुकीचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. एक कंटेनर वाहून न्यायला एक ट्रक लागतो. याचाच अर्थ, एका जहाजात जेवढे कंटेनर्स बसतात, तेवढे जर रस्तेवाहतुकीच्या मार्गाने आणायचे असतील तर दीडशे ट्रक लागतील. हे ट्रक रस्त्यांवरून धावतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागेल. या इंधनावर मोठ्या प्रमाणात खर्च होईल. शिवाय, डिझेलच्या वापरामुळे जे प्रदूषण होईल, ते वेगळेच. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर जलवाहतूक किती महत्त्वपूर्ण आणि सर्व दृष्टींनी फायद्याची आहे, हे विचारात घेतले पाहिजे. नितीन गडकरी यांच्याकडे गंगा नदी स्वच्छ करण्याची फार मोठी जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे गंगेकडे झालेले दुर्लक्ष गंगेला कुठे घेऊन आले आहे, हे जेव्हा मोदी सरकारने पाहिले तेव्हाच गंगा नदी स्वच्छ झाली पाहिजे, याचा निर्धार करण्यात आला होता. त्याची जबाबदारी सुरुवातीला नितीन गडकरी यांच्याकडे नव्हती.
पण, गडकरींचा रस्तेवाहतूक क्षेत्रातील झपाटा पाहता, गंगा नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण गडकरींवर दिली तर निश्चितपणे गंगामय्या शुद्ध होईल, याची खात्री पंतप्रधान मोदी यांना मनातून होती आणि त्यातूनच त्यांनी गडकरींना गंगा स्वच्छतेची जबाबदारी सोपविली. गडकरींकडे या खात्याचा कार्यभार येऊन वर्ष-दीड वर्षच झाले आहे. पण, वाराणसीला गंगा नदीची जी स्थिती आधी होती, त्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वाराणसीत गंगा नदीचा जो किनारा आहे, तो अतिशय स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. नदीच्या पात्रात आणि पाण्यात जी प्रचंड घाण होती, ती किमान 80 टक्के साफ करण्यात गडकरींच्या मंत्रालयाला यश आले आहे. मार्चपर्यंत गंगा नदी संपूर्ण शुद्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले आणि ते थोडे कठीण असले, तरी नितीन गडकरींच्या वज्रनिर्धारामुळे हे कठीण लक्ष्यही पार केले जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनाही आहे आणि वाराणसीच्या जनतेलाही आहे. आता गंगा नदी फक्त वाराणसीतच आहे काय? नाही. ती अनेक शहरांमधून वाहते. त्यामुळे गंगा नदी स्वच्छ करताना फक्त वाराणसीचीच निवड गडकरी यांनी केलेली नसून, सर्वदूर गंगा नदीची साफसफाई सुरू आहे. उत्तरप्रदेशात गंगा नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा निघताच, लोक गडकरींचे नाव अगदी सहजपणे घेतात.
सोमवारी जेव्हा मल्टीमोडल टर्मिनलच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये येणार होते, तेव्हा शहर या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी नव्या नवरीसारखे सजले होते. ठिकठिकाणी नितीन गडकरी यांच्या स्वागताचे लागलेले फलक गडकरींच्या कार्यकर्तृत्वाचीच पावती देत होते. कारण, मल्टीमोडल हबसोबतच वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी फोडणारे दोन मोठे फ्लायओव्हर्सही गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग खात्याने बांधले होते आणि त्यांच्याही लोकार्पणाचा कार्यक्रम सोमवारीच आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने नागपूरकर आणि वैदर्भीय नितीन गडकरींची लोकप्रियता महाराष्ट्राबाहेरही किती आहे, हे अनुभवास आले. नद्यांमधून जलवाहतूक करण्याच्या गडकरींच्या प्रस्तावावर जे लोक आधी हसले होते, त्यांना गडकरींनी तोंडाने उत्तर न देता प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले आहे! मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेकदा अपेक्षित कामगिरी करायचा नाही, तेव्हा टीकाकार त्याच्यावर तुटून पडत असत. पण, नंतरच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी करीत सचिन त्याच्या टीकाकारांना बॅटने उत्तर देत असे, तसे गडकरींचे झाले आहे. आपल्याला काय करायचे आहे, हे गडकरी यांना ठाऊक आहे. त्यामुळे टीकाकारांकडे लक्ष न देता ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहेत. गंगा ही अतिशय पवित्र नदी मानली जाते. घरातल्या कुणाचाही मृत्यू झाल्यास त्याच्या तोंडात गंगाजल टाकले जाते, एवढे गंगेच्या पाण्याला आपल्याकडे महत्त्व आहे.
त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण आणि समस्त भारतीयांना पूजनीय असलेल्या गंगा नदीचे शुद्धीकरण करण्यास गडकरी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले नसते तरच नवल! ज्या ठिकाणी पाण्याची पातळी दोन-अडीच मीटर आहे, अशा सर्व ठिकाणांहून जहाजाद्वारे वाहतूक होऊ शकते. त्यामुळे नद्यांमध्ये ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी आहे, तिथे खोदकाम करून पाण्याची पातळी वाढविता येऊ शकते. तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून भारतातील शंभरावर नद्यांमधून वाहतूक झाली पाहिजे आणि त्याद्वारे वाहतुकीचा खर्च कमी होऊन ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत, वायुप्रदूषण कमी झाले पाहिजे, इंधनासाठी लागणारे भारतीय चलन वाचले पाहिजे, रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फुटली पाहिजे, यादृष्टीने कुणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते. तो पुढाकार नितीन गडकरी यांनी घेतला, याबद्दल त्यांचे समस्त भारतीयांनी अभिनंदनच केले पाहिजे! वाराणसी येथे उभारण्यात आलेल्या मल्टीमोडल टर्मिनलवर जो खर्च झाला आहे, म्हणजेच गंगेवर जो खर्च झाला आहे, तो पैसा पाण्यात जाऊ देणार नाही, हा गडकरींचा निर्धारही प्रशंसनीय आहे