Total Pageviews

Showing posts with label COMMUNAL RIOTS. Show all posts
Showing posts with label COMMUNAL RIOTS. Show all posts

Saturday, 19 May 2018

पाक-बांगलादेशी हस्तकांच्या दंगलींची दहशत-प्रभाकर पवार-SAMNA



जोगेश्वरीच्या बेहराम बागमध्ये राहणाऱ्या फारुख देवडीवाला व त्याच्या साथीदारांना महाराष्ट्र एटीएसने नुकतीच अटक केली. याआधीही हिंदू नेत्यांची हिटलिस्टघेऊन फिरणाऱ्या व काठमांडू येथून प्रवासी विमानाचे अपहरण करणाऱया अतिरेक्यांना जोगेश्वरीच्या बेहराम बागमधूनच अटक करण्यात आली होती. जोगेश्वरीचा बेहराम बाग हा परिसर पाकिस्तानी अतिरेक्यांचा व हस्तकांचा अड्डा आहे. याच परिसरातून घातपाती कारवाया व दंगली कशा घडवायच्या याचे प्रशिक्षण देण्यासाठी मुस्लिम तरुणांना पाकिस्तानात पाठविले जाते. हे अनेकदा पोलीस तपासात उघड झाले आहे.
मध्यंतरी बांगलादेशींच्या घुसखोरीला महाराष्ट्र एटीएसने चाप लावला होता. एबीटीया बांगलादेशी अतिरेक्यांच्या हस्तकांना अटक करून त्यांच्या कारवायांना लगाम लावला होता. असे असतानाच गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेसाठी काम करणाऱया जोगेश्वरीच्या बेहराम बागच्या फारूख देवडीवाला, फैजल मिर्झा खान व अल्लारखा अशा तिघांना एटीएसने अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबात मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. फारूख हा पन्नास वर्षीय आरोपी मूळचा दाऊद टोळीतील आहे. मुंबईतील अनेक खून खटल्यात सहभागी असलेला हा गुंड १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर दुबईत पळाला होता. परंतु पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचे नाव नसल्याचे त्याला कळल्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला व आयएसआयसाठी काम करू लागला. अलीकडे इस्लामिक स्टेट (आयएस) लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आदी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या कारवाया थंडावल्यानंतर (किंबहुना एटीएसने त्यांच्या कारवायांना आळा घातल्यानंतर) आयएसआयने आपले डोके वर काढले आहे. नेहमीप्रमाणे आयएसआयने आघाडीच्या हिंदू नेत्यांना टार्गेट केले आहे. त्यांचा हेतू साध्य होण्याची शक्यता कमी असली तरीही मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांच्या संरक्षणात पोलिसांनी नुकतीच वाढ केली आहे.
दाऊद टोळीही सक्रिय
दाऊद हा आयएसआयचा एजंट आहे. त्या दाऊदच्या व मुंबईसह देशभरातील त्याच्या पिलावळीच्या मदतीने हिंदू नेत्यांना टार्गेट करून पुन्हा एकदा मुंबईसह देशभरात हाहाकार माजविण्याचा आयएसआयचा कट आहे. आयएसआयला हिंदुस्थानात Logistic Support आहे. स्थानिक हस्तकांच्या मदतीनेच आयएसआयने आतापर्यंत शंभरच्या वर बॉम्बस्फोट मालिका मुंबईत घडवून आणल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्यांनी तर २६/११रोजी मुंबईत हाहाकार माजवीत ताज, ओबेरॉय, लियोपोल्ड या हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. छत्रपती शिवाजी टर्मिनसलाही टार्गेट करून सुमारे पावणेदोनशे निरपराध व्यक्तींचे प्राण घेतले. तसाच त्यांचा पुन्हा एकदा प्रयत्न असून त्यासाठी आता आयएसआय मुंबईसह देशभरातील दाऊदच्या गुंडांची मदत घेणार आहे. परंतु महाराष्ट्र एटीएस पाकिस्तानी अतिरेक्यांचे मनसुबे उधळून लावील असे एटीएसकडून सांगितले जाते.
मोठा शस्त्र्ासाठा जप्त
१९९३ नंतर मुंबई शहरात बॉम्बस्फोट मालिका सुरूच होत्या. २००४ व २००५ साली मात्र अतिरेक्यांना मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे २००६ साली मुंबईसह महाराष्ट्रात काही करून बॉम्बस्फोट व त्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगल घडवून अराजक माजविण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट होता, परंतु २००६ च्या पहिल्या टप्प्यात तो यशस्वी झाला नाही. मुंबई एटीएसने मिळालेल्या माहितीवरून संभाजीनगर, परभणी, मालेगाव, बीड आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात छापे मारत ४२ किलो आरडीएक्स, १६ एके-५६ रायफल्स, ५० हॅण्डग्रेनेड आदी स्फोटकांसह मोठा शस्त्र्ासाठा हस्तगत केला. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील गगनचुंबी हज कमिटीच्या इमारतीत धाड घालून मौलाना गुलाम याह्या या इसमासह दोन डझन अतिरेक्यांना अटक केली व जानेवारी महिन्यात बॉम्बस्फोट घडवून महाराष्ट्रात जातीय दंगल घडविण्याचा कट एटीएसने उधळून लावला. त्यावेळी पाकिस्तानची वळवळ थांबेल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही. जानेवारीत मोठा शस्त्र्ासाठा पकडला गेल्यानंतर अतिरेक्यांनी केवळ सहा महिन्यांत (दाऊदच्या स्थानिक गुंडांची मदत घेऊन) बदला घेतला.
पाकिस्तानी व बांगलादेशींची धरपकड
२००६ च्या ११ जुलैचा तो मंगळवार होता. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. चाकरमानी लगबगीने लोकल पकडून घरी परतत असतानाच विरार व बोरिवली लोकलमध्ये ७ ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. कुकरमध्ये ठेवलेल्या आरडीएक्सचा स्फोट होऊन त्यात १८६ रेल्वे प्रवाशांचा बळी गेला. त्यात १० मुस्लिम बांधवही होते. पाकिस्तानी अतिरेक्यांनी ठरविल्याप्रमाणे मुंबईत हाहाकार माजविला. त्यानंतर दोन वर्षांने ताज, ओबेरॉय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून लष्कर-ए-तोयबाने रेल्वे इतकेच पावणेदोनशे बळी घेतले. २६/११ नंतर मुंबईत २०११ साली झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस व दादर येथे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात २७ जण ठार झाले. त्यानंतर मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात (गेल्या ७ वर्षांत) पाकिस्तानी अतिरेक्यांना एटीएसने केलेल्या धडक कारवाईमुळे यश आलेले नाही. परंतु अलीकडे बांगलादेशी अतिरेकी व दाऊदच्या हस्तकांची धरपकड पहाता मुंबईत पुन्हा एकदा एक जोरदार धमाका करण्याचा पाकिस्तानचा डाव असून सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. बॉम्बस्फोट घडविण्यात आले नाहीत तर जातीय दंगल घडविण्याचा पाकिस्तानचा कट आहे.
दंगली घडविण्याचे प्रशिक्षण
संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडय़ात काय झाले? फारुख देवडीवालासारख्या दाऊदच्या हस्तकांनीच संभाजीनगरात दंगल भडकवली आहे हे कसून चौकशी केल्यास उघड होईल. फारुख देवडीवाला याने मुंबईसह महाराष्ट्रात बऱयाच मुस्लिम तरुणांना घातपात घडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठविले आहे. तेथेही हिंदुस्थानात दंगली कशा भडकावयाच्या याचे धडे दिले जातात. त्यामुळे कोलकातासारख्या ठिकाणी खुलेआम जमाव पोलीस ठाण्यावर पेट्रोल ओतत आहे. पोलीस ठाण्यांना आगी लावत आहे. आक्रमक व्हा, पोलीस व हिंदूंवर चाल करून जा, असेच हिंदुस्थानातून पाकिस्तानात घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम तरुणांना शिकवले जात आहे. त्यात देवडीवालासारखे हॅण्डलर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तेव्हा संभाजीनगरची दंगल भडकविणारे फारुख देवडीवालासारखे पाक हस्तक कोण आहेत याचा संभाजीनगर पोलिसांनी शोध घ्यावा, नाहीतर भविष्यात गल्लीगल्लीमध्ये जातीय दंगलींचा वणवा पेटेल हे लक्षात ठेवा. जे कश्मीरात सुरू आहे ते उद्या साऱया हिंदुस्थानात सुरू होईल


Wednesday, 10 September 2014

ROOTS COMMUNAL POLERIZATION

http://blogs.timesofindia.indiatimes.com/headon/the-roots-of-communal-polarization/ September 10, 2014, 4:21 PM IST Minhaz Merchant With assembly byelections in Uttar Pradesh due on Saturday, September 13, communal polarization is already a reality. But what are the roots of polarization and how can we pull them out of their fertile communal soil? As I’ve written before, the two real enemies of ordinary Muslims are communal politicians masquerading as secular leaders to win votes and Mullahs deliberately misinterpreting the holy book to retain power over their followers by imprisoning them in a medieval mindset. The two form a natural alliance. Together they have enriched themselves but impoverished India’s Muslims, materially and intellectually, in the name of secularism. That brings us to the third angle in this infamous triangle: the liberal, secular Hindu. Where does he stand in all of this? He is swayed by the plight of fellow-Indians who happen to be Muslims: impoverished, illiterate, ghettoized, discriminated against. For every Azim Premji and Aamir Khan there are lakhs of weavers in UP and spot boys in Mumbai who have no place in India’s organized labour force. Liberal, well-meaning Hindus ask: why? Yet the liberal Hindu doesn’t dig deeper. The more politicians sequester Muslims into vote silos, the more the middle-class Hindu (not the liberal, privileged Hindu) resents them. Discrimination, petty or large, mounts. The real culprits – communal politicians dressed up as secular leaders – get away scot-free in this narrative. The liberal, secular Hindu’s anger against anti-Muslim communalism is therefore misdirected – far away from these real culprits. Influential sections of the media, suffused with hearts bleeding from the wrong ventricle, are part of this great fraud played on India’s poor Muslims: communalism behind a secular veil. The token Muslim is lionized – from business to literature – but the common Muslim languishes in his 67-year-old ghetto. It is from such ghettos that raw recruits to the Islamic State (IS) are most easily found. As ordinary Muslims get pushed further into silos, they become fodder for polarization. The pull of the Islamic State and its make-believe Caliphate has already attracted an estimated 100 radicalised Muslims from India to Syria and Iraq. Leading clerics have denounced IS but after decades of misleading their flock, the resentful Muslim hears what he wants to hear, and less and less of what the Mullahs tell him. Muslim intellectuals in India rarely speak up in favour of modernity. Creative, influential Muslims – in business, film and the arts – are among the worst offenders. Their silence can be mistaken for complicity – or at best callowness. Poor Muslims are meanwhile more sinned against than sinners. Their insularity is a defensive reflex. Bereft of education, of direction and of icons, they are vulnerable to the politicians and clerics who prey on them. The ghettos they are confined to are breeding grounds for criminality. Terror modules thrive here. Indian jails have a disproportionately high percentage of Muslim prisoners and undertrials. Unemployment is rife. Madrassas do not prepare young Muslims for jobs. Some drift towards extremism. Jihadis, rather than B-schools, recruit from this teeming, seething mass. Indian politicians have misused religion to do grievous, long-term harm to the cause of Muslims by treating them as votes rather than a minority in need of education and empowerment to help build a plural, peaceful and prosperous India. In Western UP, this Saturday, some of the most communally sensitive constituencies go to the polls. Their outcome will be a pointer to how India’s 177 million Muslims, many of them talented and patriotic, can become an asset to India’s growth story rather than surly bystanders misled by clerics, politicians and faux secularists

Monday, 28 October 2013

ISI, RAHUL GANDHI COMMUNAL RIOTS

मुंबईतील दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही. आयएसआय आणि युवराज सत्य झाकू नका! कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या वादळ निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी एखादे विधान करावे व त्यावरून मोदी यांनी खिल्ली उडवावी अशा प्रकारचा प्रचारी धुरळा गेल्या काही दिवसांपासून उडत आहे, पण या धुरळ्यात यावेळी सत्य हरवताना दिसत आहे. राहुल गांधी हे कोणी तत्त्वचिंतक किंवा झुंजार नेते नाहीत. त्यांची भाषणे व मुक्ताफळे नेहमीच हास्यास्पद ठरत असतात, पण इंदूरच्या सभेत त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीवरून केलेल्या विधानांवर इतका गदारोळ माजविण्याचे कारण काय? कॉंग्रेसचे युवराज अजाणतेपणे सत्य बोलून गेले आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले, ‘‘मुझफ्फरनगरच्या दंगलीत आयएसआयचा हात आहे आणि दंगलीच्या झळा बसलेले मुसलमान युवक आयएसआयच्या संपर्कात आहेत.’’ युवराजांनी या देशातील धर्मांध मुसलमानांच्या बाबतीत जे सत्य सांगितले आहे त्यात धक्का बसावे असे काही नाही. आयएसआय व धर्मांध मुसलमानांविषयी युवराजांनी मांडलेले विचार नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा अनेक हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी नेत्यांनी ‘आयएसआय’च्या येथील कारवायांवर आग ओकली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुखांनी सरसकट नव्हे तर पाकधार्जिण्या मुसलमानांवर बेधडक हल्ले करून देशात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानातील प्रत्येक दंगा व दहशतवादी कारवाईमागे पाकड्या आयएसआयचा हात हा असतोच व त्यामुळे मुझफ्फरनगरच्या दंगलीतही तो हात अदृश्यपणे किंवा उघडपणे फिरत होता. मुसलमान तरुणांची ‘डोकी’ भडकवून त्यांना माथेफिरू बनवून ‘देशद्रोही, दहशतवादी’ कारवायांत गुंतवण्याचे काम आयएसआय करीत आली आहे. ‘जिहाद’साठी तरुणांना तयार करून त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात दहशतवादी प्रशिक्षणासाठी नेले जाते व नंतर परत येथे पाठवून देशविरोधी कारवायांसाठी त्यांचा वापर केला जातो. आयएसआयच्या या कारवायांत गोपनीय असे काही नाही. मुंबईतील १९९२ च्या दंग्यात व नंतरच्या प्रत्येक बॉम्बस्फोट मालिकेमागे फक्त ‘आयएसआय’ होती. माहीमच्या दर्ग्याजवळ राहणारे ‘मेमन बंधू’ हे आयएसआयचे हस्तक म्हणूनच वापरले गेले व शेवटी आयएसआयच्या छत्रछायेखालीच पाकिस्तानात राहू लागले. ‘टुंडा’ व ‘भटकळ’ या खतरनाक दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. देशातील किमान ५० दहशतवादी कारवाया व स्फोटांत या दोघांचा हात होता. टुंडा व भटकळ हे आयएसआयचेच सुभेदार होते ना! हैदराबादचा ओवेसी खुलेआम हिंदूंच्या कत्तली घडविण्याचे फर्मान सोडतो. ती जिहादी भाषा पाकड्या ‘आयएसआय’ची आहे. मुंबई, दिल्ली, गुजरात, आसाम आणि हैदराबादसह कश्मीर खोर्‍यातील मुसलमानांच्या मनात विद्वेषाचे जहर पसरवून त्यांना हिंदुस्थानविरोधात उभे करण्याचे जोरदार कारस्थान रटारटा शिजत आहे. मुसलमानांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ नये यासाठी जितके प्रयत्न कॉंग्रेस, सपासारखे बेगडी ‘निधर्मी’ पक्ष करीत असतात त्यापेक्षा जास्त कारस्थाने ‘आयएसआय’चे येथील हस्तक करीत असतात. पुन्हा हिंदू-मुसलमानांची जातीय फाळणी व्हावी व त्या फाळणीतून आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावे हेच ‘आयएसआय’चे भयंकर कारस्थान आहे, पण या कारस्थानाच्या चिंधड्या उडविण्याऐवजी आपण सगळेच याप्रश्‍नी मतांचे व धर्माचे राजकारण करण्यात धन्य धन्य मानीत असू तर या देशाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही. हिंदुस्थानात लश्कर-ए-तोयबा, अल कायदा, सिमी, बांगलादेशी हुजी, इंडियन मुजाहिद्दीन, हिजबुलसारख्या धर्मांध संघटना मुसलमान तरुणांची माथी भडकवीत आहेत व या सर्व सैतानी संघटनांचा बाप ‘आयएसआय’ आहे. या सैतानांपासून देशातील मुसलमानांनी दूर राहावे व स्वत:स कलंकित होण्यापासून वाचवावे, पण मुसलमानी समाजास सन्मार्गी लावणारा नेता आज तरी दिसत नाही. उलट मुसलमान आज आहे त्यापेक्षा अधिक धर्मांध कसा बनेल व तो स्वत:ला जास्तीत जास्त असुरक्षित कसा मानेल यासाठी राजकीय डावपेच आखले जात असतात. याचाच फायदा पाकिस्तान व त्यांचे आयएसआय घेत असते. अनेकदा ‘आयएसआय’ला हवे असलेले प्रताप कॉंग्रेस व सपावाले करतात. भडकत्या आगीवर पाणी ओतण्याऐवजी तेल टाकणारे असल्यावर मुसलमान समाज हा सदैव खदखदतच राहील. तेच देशाच्या मुळावर आले आहे. मुसलमानी मतांसाठी राजकारणी कोणत्याही थरास जाऊ शकतात व सत्तेसाठी देशाची द्रौपदी करून स्वातंत्र्य आणि अखंडता पणास लावू शकतात. राहुल गांधी यांनी धर्मांध मुसलमान व आयएसआयचा संबंध दाखवून अजाणतेपणे ‘सत्य’ समोर आणले. मुसलमानांतील धुरिणांनी हे सत्य स्वीकारून या कलंकापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्यांचेच हित आहे. भारतीय जनता पक्ष व मोदी यांनी ‘राहुल गांधी’ यांना ‘आयएसआय’प्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले हे त्यांच्या धोरणास धरूनच आहे, पण दंगली व दहशतवादामागे आयएसआयचा हात आहे हे जसे गुजरातच्या दंगलीत सिद्ध झाले तसेच इशरत जहां, सोहराबुद्दीन यांना गुजरात पोलिसांनी ठार केले तेदेखील त्यांचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध उघड झाल्यामुळेच. राहुल गांधी यांचे वक्तव्य नीट तपासून पाहिले तर इतकेच दिसते की, त्यांनी ‘दंगापीडित’ मुसलमान तरुणांशी आयएसआय संपर्कात असल्याचे म्हटले. मुंबईतील दंग्याच्या वेळी आयएसआयने हेच केले होते व दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही

Wednesday, 11 September 2013

MUZZFAR NAGAR RIOTS MAHATIMES EDDITORIAL

केवळ दोन बेकायदा भिंती पाडल्याने ' जातीय तणाव वाढविल्याचा ' ठपका येऊन दुर्गाशक्ती नागपाल ही तरुण आयएएस अधिकारी काही दिवसांपूर्वी सेवेतून निलंबित झाली. त्याच उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर व इतर जिल्ह्यांमध्ये धार्मिक हिंसाचारात किमान ३८जण मारले गेले आहेत. जखमी तर शेकडो झाले. अखिलेश यादव यांच्या सरकारला हा हिंसाचार थांबविण्यात यश आलेले नाही. उलट, मेरठ, हापूर, बागपत, सहारपूर, शामली अशा इतर भागांमध्ये तणाव वाढतो आहे. तिथे हिंसाचारात अनेक जखमी होत आहेत. आता काँग्रेस पक्ष अखिलेश यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी करत आहे. हीच मागणी काँग्रेसने स्वतःच्या सरकारकडे करून अखिलेश सरकार बडतर्फ करून दाखवावे. मात्र, ही राजकीय हिंमत काँग्रेस ​किंवा केंद्र सरकार दाखवू शकणार नाही. तसे झाले तर राजधानीतील सत्तेचे ग​णित डळमळू लागेल. मग या राजीनाम्याच्या मागणीला काय अर्थ आहे? समाजवादी पक्षाचे सरकार आल्यापासून हिंसाचार, विशेषतः जातीय हिंसाचार, उत्तर प्रदेशात कमालीचा वाढला आहे, हे खरेच आहे. ' यापेक्षा मायावती परवडल्या, ' असे दिग्विजयसिंह यांनी म्हणावे, यातच सारे आले. मात्र, पुढच्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवून सगळे राजकीय पक्ष मिळून वातावरण तापवत असतील, तर याइतका दुर्दैवी व अघोरी अपराध दुसरा नाही. पाकिस्तानात दोन वर्षांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ ' फेसबुक ' वर तपशील लपवून टाकण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने ' मुझफ्फरनगरमध्ये हे काय होत आहे, ' असा शेरा लिहून तो शेअर केला, असा आरोप आहे. तो खरा असेल तर कारस्थान रचून या दंगलीची होळी पेटविण्यात आली, अशी शंका घेण्यास जागा आहे. दुसरीकडे, आपल्या बहिणीची छेडछाड केल्याचा ठपका ठेवून दोन भावांनी एका तरुणाला मारले. मग या भावांचीही हत्या करण्यात आली. ही हत्या झाल्यावर शक्तिशाली जाट पंचायतींनी लगेच तलवारी उपसल्या. महापंचायत घेतली. त्यानंतर आता भीतीने गाव सोडून जगण्यासाठी परागंदा होणाऱ्या कुटुंबांना ठेचून काढले जात आहे. त्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. हा पाकिस्तानी व्हिडिओ किंवा तरुणांची ही हत्या या दोन्ही घटना कायद्याचे राज्य चालविणाऱ्यांनी रोखायला हव्या होत्या. मात्र, अखिलेश सरकार कमालीच्या ढिलाईने वागत राहिले. आता मुझफ्फरनगरमध्ये बेमुदत संचारबंदी असली तरी हिंसाचाराचे लोण आसपास पसरते आहे. लष्कराला ध्वजसंचलन करावे लागते आहे. दिल्लीतून साऱ्या देशाला शहाणपणाचे डोस देणारे मुलायमसिंह यांनी स्वतःच्या मुलाला प्रशासनाचे चार धडे दिले असते, तर ही वेळ आली नसती. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते ' सगळे आयएएस अधिकारी काढून घ्या. आम्ही आमचे राज्य चालवून दाखवू, ' अशा निरर्गल गर्जना करीत होते. ते आज कुठे आहेत? यातून, प्रशासनाचे नीतिधैर्य खचते, एवढेतरी यांना समजते का? उत्तर प्रदेश हा देशातील ज्वालामुखीवर बसलेला ज्वलनशील प्रांत आहे. दुसरीकडे, दिल्लीतील सत्तेचे गणित निर्णायकपणे ठरविणारे ८१ खासदार याच राज्यातून लोकसभेवर जातात. या दोन्हींचा ताळा मनोमन जुळवून उत्तर प्रदेशाला दंगलींच्या खाईत लोटण्याचे प्रयोग आजवर अनेकदा झाले आहेत. एरवी, परस्परांवर तोंडसुख घेऊन समाजात शत्रूसारखे वागणारे पक्ष अशी हवा तापवून एकमेकांना मदतच करीत असतात. तोच हातखंडा खेळ सध्या चाललेला दिसतो. तसे नसते तर निमलष्करी दलांना आणि लष्कराला पाचारण करण्यात एवढा वेळ लागण्याचे कारण नव्हते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलले. पण त्यानंतरही हिंसाचार पूर्ण थांबला नाही. भारतीय संघराज्यातील केंद्र सरकारचे स्थान व अधिकार लक्षात घेता पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय हस्तक्षेप करायला हवा होता. सरकार बरखास्त न करताही त्यांना हे करता आले असते. मात्र, उत्तर प्रदेशातील हिंसाचाराची परिणामकारक व त्वरित दखल घेण्यात केंद्र सरकारही कमी पडले. मुझफ्फरनगर ही आशियातील गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. ती आठवडाभर बंद आहे. हा गूळ धर्मांध शक्तींनी व त्यांना पाठिशी घालणाऱ्या राजकीय पक्षांनी नासविला आहे. गुळाची निर्यात थांबली. तो साठून राहिला. ढेपा वाहणारे मजूरही उपाशी राहिले. शिवाय, परदेशांत हमी न पाळल्याची नाचक्की. हे सगळे पाप ज्यांनी दंगली पेटवल्या त्या दोन्हीकडच्या आसुरी शक्तींचे आहे. त्यांना लोकांनीच निष्प्रभ केल्याविना एकविसाव्या शतकातील हे मध्ययुगीन अंधारपर्व संपणार नाही

Sunday, 8 September 2013

2013 Muzaffarnagar riots

2013 Muzaffarnagar riots From Wikipedia, the free encyclopedia Jump to: navigation, search 2013 Muzaffarnagar Riots Date 27 August - Ongoing Location Muzaffarnagar, Uttar Pradesh, India Causes Brawl between Hindu and Muslim youth at Kawal village on August 27[1] Violence Death(s) 26[2] Injuries 40[2] Arrested 35[2] The 2013 Muzaffarnagar Riots that claimed 26 lives and injured 40 started on 27 August 2013 between Hindu and Muslim communities in Muzaffarnagar district, Uttar Pradesh, India.[3][4][5][2] Contents • 1 Timeline o 1.1 August 27 o 1.2 August 28 o 1.3 August 29 o 1.4 August 30 o 1.5 August 31 o 1.6 September 1 o 1.7 September 2 o 1.8 September 3 o 1.9 September 4 o 1.10 September 5 o 1.11 September 6 o 1.12 September 7 o 1.13 September 8 • 2 Response • 3 Reactions • 4 See also • 5 References Timeline August 27 • An alleged eve teasing incident at Kawal village led to the murder of Muslim youth, which soon was followed by murder of two Hindu youth.[6] August 28 • A mob returning from cremation involves in arson.[6] August 29 • Incidents of stone pelting takes place between two communities.[6] • A women molested near religious place.[6] August 30 • Huge crowd gathers after Friday prayers in Shaheed Chowk.[6] August 31 • Around 40000 people assemble at Nangla Mandoud.[6] • Mob sets car on fire and attacks its occupants.[6] September 1 • Police files FIRs against people who gave speeches at Shaheed Chowk and Nangla Mandoud.[6] September 2 • Mobs breaks walls of worship places in Sanjhak and Titavi.[6] • BJP calls for bandh.[6] September 3 • Case lodged against MLA Sangeet Som for circulating fake video of Kawal incident.[6] • Violence in Shamli.[6] September 4 • Sporadic violence reported in Muzaffarnagar.[6] September 5 • Call for Mahabandh across Muzaffarnagar district.[6] September 6 • Bharatiya Kisan Union stages a sit-in outside Nangla Mandoud jail.[6] September 7 • Police attacked and firing reported from both sides of community alongside arson.[6] • IBN7 channel’s correspondent Rajesh Verma was killed while trying to film the area. A photographer hired by the police was also killed. Nine others were killed[7] • Army called in and town put under indefinite curfew.[6] • Atleast 30 people were arrested in connection with the riots.[8][2] • Death toll recorded 13.[2] September 8 • Police has imposed curfew in three area, Civil lines, Kotwali and Nai Mandi of Muzaffarnagar.[2] • Army Personnels and battalions of CRPF were deployed to control the situation.[2] • Incidents of violence were reported from Sisauli, Shahpur, Fugna, Kalapar and Dhaurakala areas of Muzaffarnagar.[2] • Death toll rises to 26.[2] Response Approximately 1000 army troops were deployed and curfew was imposed in the violence-hit areas. 10000 Provincial Armed Constabulary (PAC) personnel, 1,300 Central Reserve Police Force (CRPF) troopers and 1,200 Rapid Action Force (RAF) personnel were deployed to control the situation.[2] Reactions • From Muzaffarnagar violence, administrative failure of SP government has once again come to fore. It has proved that Akhilesh government has bowed in front of criminals and it should immediately resign —Swami Prasad Maurya[9] • The violence in Muzaffarnagar is on and government is a mute spectator to it...The government is doing politics of communalism —Naseemuddin Siddiqui[10] • SP Govt's track record in this tenure is bad. Haven't been able to control Communal Forces in UP. Even BSP's was better. —Digvijaya Singh, on Twitter See also • Religious violence in India • Religious harmony in India References 1. ^ "Journalist and a photographer killed in fresh communal violence in Muzaffarnagar, army deployed as curfew imposed". India Today. Retrieved 7 September 2013. 2. ^ a b c d e f g h i j k "Fresh clashes in UPs Muzaffarnagar leave 26 dead, Army deployed in affected areas". The Hindustan Times. 2013-09-07. Retrieved 2013-09-08. 3. ^ "Troops deployed to quell deadly communal clashes between Hindus, Muslims in north India". Associated Press. Retrieved 8 September 2013. 4. ^ Adrija Bose (2013-09-08). "Firstpost India IBN7 journalist killed in UP communal riots, Army clamps curfewIBN7 journalist killed in UP communal riots, Army clamps curfew". Firstpost. Retrieved 2013-09-08. 5. ^ Ahmed Ali Fayyaz (2013-09-08). "9 killed in communal riots in Muzaffarnagar, curfew clamped, army deployed". The Indian Express. Retrieved 2013-09-08. 6. ^ a b c d e f g h i j k l m n o p q "Timeline of Muzaffarnagar riots: eve-teasing incident led to murders, then riots". India TV News. 2013-09-08. Retrieved 2013-09-08. 7. ^ "10 killed in communal clashes in UP's Muzaffarnagar, violence spreads to Meerut villages". Retrieved 8 September 2013. 8. ^ . The Hindu http://www.thehindubusinessline.com/news/12-killed-40-injured-in-communal-riots-in-muzaffarnagar/article5106970.ece. Retrieved 8 September 2013. Missing or empty |title= (help) 9. ^ "Muzaffarnagar violence: BSP demands UP Chief Minister Akhilesh Yadav's resignation". 8 September 2013. Retrieved 8 September 2013. 10. ^ "Politics over Muzaffarnagar Communal riots goes Wild". 8 September 2013. Retrieved 8 September 2013.