Total Pageviews

Showing posts with label आव्हान-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts
Showing posts with label आव्हान-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts

Monday, 21 October 2019

काश्मीरचे वास्तव-Source:तरुण भारत6 Oct 2019-एनयूजे (आय) प्रतिनिधी मंडळ |-MUST READ



काश्मीरहून दिल्लीला पाठविण्यात येणार्‍या बातम्या हमखास एकतर्फी आणि फुटीरतावाद्यांची बाजू घेणार्‍या असल्याचे दिसून येते. कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर अनेक प्रसिद्धिमाध्यमांनी तिथल्या पत्रकारांच्या हवाल्याने तिथे ‘गंभीर परिस्थिती’ असल्याच्या बातम्या देशभरात प्रसारित केल्या. त्यात किती तथ्यांश होता आणि खरेच का सर्वसामान्य काश्मिरी भयाच्या सावलीत जगत आहे, या बाबींची शहानिशा करण्यासाठी एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळाने श्रीनगरचा दौरा केला. त्यातून काश्मीरचे जे वास्तव त्यांना दिसले, ते या लेखात मांडले आहे. या प्रतिनिधी मंडळात- हितेश शंकर, मनोज वर्मा, हर्षवर्धन त्रिपाठी, राकेश आर्य, सचिन बुधौलिया व आलोक गोस्वामी हे पत्रकार सहभागी होते.
कलम ३७० च्या बेडीतून मुक्त झाल्यानंतर काश्मीर कसा दिसतो, हा प्रश्‍न सामान्य भारतीयांप्रमाणेच आमच्याही मनात होता. आंतरराष्ट्रीय मीडिया ते दिल्लीत बसलेले लोक सांगत आहेत की, काश्मीरमध्ये प्रत्येक गोष्टीवर जवळपास बंधन आहे, तेव्हा शंका येणे स्वाभाविकच होते. या अशाच शंकांमुळे नॅशनल जर्नलिस्टस् युनियन (इंडिया) म्हणजे एनयूजे (आय)ने ठरविले की, श्रीनगरला जाऊन तिथली परिस्थिती आपल्या डोळ्यांनी बघणे आवश्यक आहे. तसेही, अफवांवर विश्‍वास ठेवण्याची आम्हाला इतकी वाईट सवय आहे की ‘कावळा कान घेऊन उडाला’सारखी अफवा दुसर्‍याच्या कानात सांगण्याआधी आम्ही स्वत:च्या कानाला हात लावूनही बघत नाही. अशाच अफवांचे हे तंत्र आणि मानसिकता यांना ध्यानात घेऊन आम्ही ठरविले की श्रीनगरला गेले पाहिजे आणि श्रीनगरला जाण्यासाठी आम्ही १० सप्टेंबरचा दिवस निश्‍चित केला. दोन दिवसांच्या या दौर्‍यात आमचा प्रयत्न होता की, कमीतकमी श्रीनगरच्या प्रत्येक सडकेवर जाऊन आम्ही तिथली परिस्थिती बघावी. सोबतच जे लोक भेटू शकतील त्यांना भेटावे.
थोडी भीतीही होती की, कदाचित आम्हाला अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि इतर फुटीरतावाद्यांसारखे श्रीनगरमध्ये नजरकैदेतच राहावे लागेल की काय! दिल्लीत काही पत्रकारांनी तर पत्रकार परिषद घेऊन ठोकून दिले होते की, खोर्‍यात वृत्तपत्रेदेखील निघत नाही आहेत. यावर एक याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली की, खोर्‍यात पत्रकारांना काम करू दिले जात नाही. आमची काळजी याच दोन्ही गोष्टींवरून वाढली होती की, खरेच काश्मिरी घरांमध्ये बंद आहेत? खरेच का संपूर्ण काश्मीरला तुरुंगात परिवर्तित करण्यात आले आहे? आणि खरेच का पत्रकारांना त्यांचे काम करू दिले जात नाही? सरतेशेवटी मोहर्रमच्या दिवशी एनयूजे (आय)चे सहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळ श्रीनगरला जाण्यास निघाले. दिल्ली विमानतळावरील सकाळी ६ वाजताच्या उड्डाणाचे दृश्यच आमच्या सर्व शंकाकुशंकांचे निवारण करणारे होते. या उड्डाणातील जवळपास ७० टक्के जागा भरल्या होत्या. खरेतर, दिल्ली आणि चेन्नईहून प्रकाशित होणार्‍या काही वृत्तपत्रांनी मोहर्रमच्या दिवशी संचारबंदीची बातमी छापली होती. परंतु, विमानातील ७० टक्के जागा भरलेल्या पाहून आम्हाला एवढी तर खात्री झाली की, सामान्य काश्मिरी बंधक नाही आहेत. परंतु, पत्रकार म्हणून लगेच मनात शंका आली की, काश्मिरींना खोर्‍यातून परताना कुठली मोठी समस्या तर नाही ना! कारण आम्ही तर आता दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानात बसलो होतो. असो.
श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे विमान निर्धारित वेळी पोचले. वैमानिकाने हिंदी-इंग्रजीत उद्घोषणा केली की, हा लष्करी विमानतळ असल्याकारणे येथे कुठल्याही प्रकारचे छायाचित्र अथवा चलचित्रण घेण्याची परवानगी नाही. विमानातून बाहेर पडणार्‍या एका सज्जनाने विचारूनच घेतले- ‘‘फिरण्यासाठी आलात का?’’ मी म्हटले- ‘‘हो.’’ उत्तराची वाट न बघता ते म्हणाले- ‘‘आनंदात फिरा. हरताळ असल्यामुळे दुकाने वगैरे बंद सापडतील, परंतु बाकी सर्व व्यवस्थित आहे. काश्मिरी लोक पर्यटकांचे खूप आदरातिथ्य करतात.’’ दिल्लीत उत्पन्न झालेल्या आमच्या शंकांना हा दुसरा झटका होता. जे सज्जन भेटले त्यांचे नाव होते फारुख. एक एनजीओ चालवितात. दिल्ली-श्रीनगर येत-जात असतात. फारुख यांना आम्ही पत्रकार आहोत, हे काही सांगितले नाही. त्यांच्यासोबत आम्ही एक छायाचित्र काढले आणि विमानतळातून बाहेर आलो.
शंकांचे निरसन
विमानतळातून बाहेर येताच आमचे स्वागत करणारा हसर्‍या अमिताभ-रेखा यांचा जुना मोठा फोटो दिसला. बाहेर पडल्यावर लक्षात आले की, दिल्लीहून श्रीनगरचे अंतर विमानाने भलेही दीड तासाचे असले, तरी दिल्लीहून श्रीनगर जसे दिसत होते आणि विमानतळाहून बाहेर निघताच जे श्रीनगर आम्ही पाहिले, त्यात कुठलेच साम्य नव्हते. बाहेर फडकणार्‍या तिरंग्यासमोर शेकडो लोक आपल्या परिचितांना-मित्रांना घेण्यासाठी, दिल्ली किंवा देशातील इतरही विमानतळावर ज्याप्रमाणे हातात फलक घेऊन अथवा न घेता उभे असतात, तसेच इथेही उभे होते. आम्ही जम्मू-काश्मीरच्या एका पोलिस जवानाला विचारले- ‘‘इथे छायाचित्र काढू शकतो का?’’ त्याने हसत उत्तर दिले- ‘‘खुशाल काढा.’’ आम्ही छायाचित्र काढले आणि शहराकडे निघालो. विमानतळावर सुरक्षेची प्रचंड व्यवस्था होती. आम्ही या आधीही श्रीनगरला आलो होतो. अशी सुरक्षा व्यवस्था या विमानतळावर सामान्य बाब आहे. सकाळी ८ वाजता श्रीनगरच्या रस्त्यांवरून, इतर शहरात दिसतात तशा, दूध, ब्रेडच्या गाड्या फिरत होत्या. बर्‍याच फ्लाय ओव्हरच्या खाली आणि चौकात सामान्य काश्मिरी सकाळच्या मखमली उन्हात गप्पा करतानाही दिसत होते. श्रीनगरच्या रस्त्यांवरून फिरताना आमचा शंकारूपी फुगा फुटला होता. वातावरणात अथवा कुठल्याही काश्मिरीच्या चेहर्‍यावर, कुठेही, जराशीही भीती अथवा शंका आम्हाला दिसली नाही. आम्ही मोहर्रमच्या दिवशी श्रीनगरला पोचलो होतो, हे लक्षात ठेवा.
पर्यटक जात आहेत
श्रीनगरच्या दौर्‍यात गेलेल्या एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळात सहभागी आम्हा पत्रकारांचा प्रयत्न होता की, समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधी समूहाशी आमची भेट व्हावी आणि आश्‍चर्य म्हणजे, आमची भेट त्या वर्गाशीही झाली जो काश्मीरचा अभिन्न अंग आहे. मोहर्रमच्या दिवशी त्या वर्गाशी आमची भेट होऊ शकेल याची आम्हाला अजीबात कल्पना नव्हती. श्रीनगर शहरात आम्हाला वाटले की, ज्या शंकराचार्य पहाडावरून संपूर्ण श्रीनगर दिसते, सर्वात आधी तिथल्या शंकराचार्य मंदिरात जावे. मंदिरात आम्हाला कर्नाटकाहून आलेल्या मित्रांचा गट भेटला. या गटात महिला व पुरुष दोन्ही होते आणि सर्व लहानपणीचे मित्र होते, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर भेटले होते. सर्व एकत्र श्रीनगर फिरायला आले होते. कुठल्याही अडथळ्याविना, भीतीशिवाय पृथ्वीवरील या स्वर्गाचा आनंद घेत असलेल्या त्या पर्यटकांना आम्ही विचारले- ‘‘काही कुठे त्रास झाला का?’’ त्यांचे उत्तर होते- ‘‘दुकाने बंद दिसलीत, हीच एक अडचण आहे. बाकी सर्व ठीक आहे. तसेही आम्हाला फिरविणारा इथलाच आमचा एक मित्र आहे.’’
कर्नाटकच्या पर्यटकांना फिरविणार्‍या त्या काश्मिरी मुसलमानाने, दिल्लीत बसून श्रीनगरची स्थिती इतकी खराब का दिसते, ते स्पष्ट केले. आमच्या एका मित्राने श्रीनगरच्या स्थानिक मुसलमानाचे बोलणे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तर तो नाराज होऊन म्हणू लागला- ‘‘दिल्लीच्या सरकारांप्रमाणे तुम्हीदेखील आमचा विश्‍वास तोडत आहात. आम्ही तुम्हाला मित्राप्रमाणे सर्व सांगत आहोत आणि तुम्ही आमचे बोलणे रेकॉर्ड करत आहात?’’ आम्ही लगेच त्याचे रेकॉर्ड केलेले बोलणे तिथल्या तिथे त्याच्या समोरच मिटवून टाकले. म्हणून आम्ही इथे त्याचे नावदेखील लिहिले नाही. परंतु, खोर्‍यातील पहाड आणि रायसीना पहाड (दिल्ली) यांच्यातील हे असे काहीसे नाते गेल्या ७० वर्षांत तयार करण्यात आले होते. कलम ३७०, नात्याच्या त्या कटुतेला अधिक कटु बनविणारे बनले होते आणि याचा वापर फुटीरतावादी, दहशतवादी आणि परिवारवादी नेते मोठ्या खुबीने करत होते. श्रीनगरमध्ये आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी, सरपंच, अल्पसंख्यक तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींशी भेटलो. त्यांची गोष्ट आम्ही नंतर करू, परंतु आधी आमचा काश्मीर प्रेस क्लबचा अनुभव सांगतो.
पत्रकारांची अडचण
प्रतिनिधी मंडळाने खोर्‍यातील पत्रकारांची स्थिती, ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची माहिती घेतली. आम्ही काश्मीर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना भेटलो. रोजच्या बातम्या मिळविण्यासाठी परिस्थिती कशी आहे, ते जाणून घेतले. खोर्‍यातील पत्रकारांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, याचा एक दुसरा पैलू हादेखील आहे की, परिस्थिती कुठलीही असो, वृत्तपत्रे छापली जात आहेत आणि दुसर्‍या माध्यमांच्या मार्फत काम करणारे लोकदेखील आपापल्या बातम्या सतत लोकांपर्यंत पोहोचवीत आहेत. काश्मीर प्रेस क्लबमध्ये काही पत्रकारांनी आमचे आदरातिथ्य केले. परंतु, कुणास ठाऊक कुठल्या शंकेने, आम्ही दिल्लीला पोहोचताच फोन आला- ‘‘आमची छायाचित्रे छापू नका.’’ यावरून, खोर्‍यातून येणार्‍या प्रत्येक बातमीपत्रावर किती दबाव असेल, याचा अंदाज लावता येईल.
तिथल्या पत्रकारांचे म्हणणे होते की, कमीतकमी मान्यताप्राप्त पत्रकारांना तरी संचार साधने उपलब्ध असावीत. परंतु, आम्हाला तिथेच समजले की, सूचना आणि जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत कुठलाही पत्रकार विनाअडथळा आपली बातमी पाठवू शकतो. पत्रकारांना होत असलेल्या त्रासाची सर्व माहिती, प्रतिनिधी मंडळाने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिली आणि त्यांनी आश्‍वासन दिले की, बातम्या गोळा करण्यात काही अडचणी येत असतील तर त्या दूर केल्या जातील.
एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळाने, शेवटी श्रीनगर आणि खोर्‍याच्या अन्य भागांतील परिस्थिती कशी आहे आणि त्यात कशी सुधारणा होत असल्याचे दिसत आहे किंवा मग कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधी मंडळाला एक मोठी समस्या तिथल्या शाळा बंद असल्याची दिसली. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्पष्ट मानणे आहे की, कलम ३७० समाप्त तर झाले आहे आणि आता त्याच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. परंतु, सोबतच हाही प्रश्‍न होताच की, ३७० अंतर्गत त्यांना जे अधिकार मिळाले होते, ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत का? विद्यार्थी-विद्यार्थिनींशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली की, स्थानिक नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी काश्मीरच्या लोकांमध्ये ३७० च्या बाबतीत गैरसमजुती निर्माण करून ठेवल्या आहेत आणि या कारणामुळेच त्यांना वाटते की, ३७० समाप्त झाल्यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा आली आहे. परंतु, आमच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांना सांगितले की, आता तुम्हाला जास्तीचे अधिकार मिळत आहेत, तर ही त्यांच्यासाठी नवीन माहिती होती. सोबतच, विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये केंद्र सरकारपेक्षा अधिक क्रोध मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबावर होता. स्थानिक नेत्यांवरचा त्यांचा विश्‍वास तर केव्हाचाच उडाला आहे.
सरपंचांची भूमिका
एक प्रश्‍न मनात होता की, अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर, खोर्‍यातील राजकीय प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली आहे का? याचे उत्तर जम्मू-काश्मीर पंचायत राज चळवळीच्या सदस्यांकडून मिळाले. चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्टच सांगितले- ‘‘आम्ही तर तेव्हाही फुटीरतावाद्यांशी लढलो, त्यांच्याविरुद्ध आणि हिंदुस्थानसोबत उभे राहिले. परंतु, मुख्य धारेतील राजकीय पक्षांनी (पीडीपी व नॅकाँ) मात्र पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घातला होता.’’ जम्मू-काश्मीरमधील सरपंचांनी तसेच पंचांनीच लोकशाही व राजकीय प्रक्रियेला अधिक मजबूत केले आहे. म्हणून काश्मीरच्या जनतेसोबत संवाद साधण्यासाठी, मुफ्ती व अब्दुल्ला कुटुंबापेक्षा खोर्‍यातील पंच आणि सरपंचच अधिक कामी पडू शकतात. जम्मू-काश्मीर पंचायत राज चळवळीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, आतापर्यंत सर्वाधिक जीव पंचांनी गमविले आहेत. खोर्‍यात १२० हून अधिक पंचांना दहशतवाद्यांनी मारले आहे. राजकीय कार्यकर्ता गुलाम मोहिउद्दीन सोफी यांनी, प्रशासनात पंचांची भूमिका वाढविण्याची मागणी केली आणि म्हटले की, केंद्र सरकारला हिंदुस्थानासोबत उभे राहिलेल्या पंचांना आणि सरपंचांना विश्‍वासात घेऊनच कुठलेही काम करायला हवे. त्यांनी म्हटले की, कोण हिंदुस्थानसोबत आहे आणि कोण राष्ट्रविरोधी याची ओळख सरकारने पटवायला हवी. पंचायत राज चळवळीचे आघाडीचे नेते आणि २० वर्षांपासून सरपंच असलेले बशीर मलिक यांचे म्हणणे होते की, हिंदुस्थानाचे भक्त असलेल्या सरपंचांच्या भूमिकेकडे केंद्र सरकारने कानाडोळा करायला नको.
एक गोष्ट मात्र साफ लक्षात आली की, काश्मीरच्या लोकांना आताही प्रशासनाचा सहयोग मिळत नाहीये आणि काही ठिकाणी तर प्रशासनात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले नोकरशाह, केंद्र सरकारच्या योजनांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करीत आहेत. काश्मिरींना भयभीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून, अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या या अधिकार्‍यांना हटविले पाहिजे आणि त्यांच्या जागी नवे व काम करणार्‍या अधिकार्‍यांना आणले पाहिजे. हे आवश्यक आहे. आम्ही ही बाबदेखील राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या ध्यानात आणून दिली. त्याचा परिणाम असा झाला की, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.
प्रतिनिधी मंडळाला आश्‍चर्यचकित करणार्‍या बर्‍याच गोष्टी समजल्या. जसे, बर्‍याच ठिकाणच्या शाळेतील अध्यापकच, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या मदतीने शाळा बंद करू इच्छितात. कारण, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या ‘युती’ची इच्छाच नाही की शाळा सामान्य रीतीने सुरू राहव्यात. बर्‍याच ठिकाणी तर मुले शाळेत जातानाही दिसले; परंतु अध्यापक वर्ग मात्र, संचारबंदी, हरताळ किंवा फुटीरतावाद्यांच्या खोट्या भीतीचे कारण सांगून शाळेत येण्याचे टाळत आहेत.
शिखांच्या वेदना
प्रतिनिधी मंडळ खोर्‍यातील अल्पसंख्यक शिखांनाही भेटले. शिखांचा कारभार आताही व्यवस्थित सुरू आहे. असे असले तरी, बहुतेकांचा असलेला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आता बराच कमी झालेला आहे. त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, फुटीरतावाद्यांनी शीख ट्रकमालकांना नेहमीच त्रास दिला आहे. आता खोर्‍यातील अल्पसंख्यकांना, नव्या जम्मू-काश्मिरात त्यांची सुरक्षितता हवी आहे. सोबतच त्यांना आशा आहे की, पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरची मूळ संस्कृती परत येईल. सेवानिवृत्त इंजिनीअर कुलदीप सिंग, बारामुलाचे ठेकेदार हरजितसिंग, बडगामचे विक्रम सिंग आणि त्राल येथील दारासिंग, शीख प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी सांगितले की, खोर्‍यात आजही सुमारे ७० हजार शीख आहेत. येथे सत्तेत असलेल्या सरकारांनी अल्पसंख्यकांचे कधीच हित बघितले नाही. याचे एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, फतहकदल गुरुद्वाराची जमीन २००३ च्या आधीच्या सरकारने अधिग्रहित केली आहे. त्यांनी सांगितले की, आतादेखील लष्करासोबत काम करणारे बहुतांश ट्रान्सपोर्टर शीखच आहेत. परंतु, आज त्यांची मुले दुसर्‍या व्यवसायाच्या शोधात आहेत आणि सुमारे पाच हजार मुले पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत. शीख प्रतिनिधी मंडळाचे स्पष्ट म्हणणे होते की, अस्सल काश्मिरी संस्कृती आणण्यावर केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलण्यात आले, त्या वेळी सुमारे १४ हजार शिखांनाही घर सोडून पळावे लागले होते. ते गावांतून पळून श्रीनगरला आले होते.
सध्या काश्मीर खोर्‍यात ज्या काही थोड्या काश्मिरी पंडितांची घरे वाचली आहेत, त्यांच्यातील प्रत्येक वस्तू दहशतवादी घेऊन गेले आहेत. त्या वेळीदेखील शिखांनी फुटीरतवाद आणि दहशतवादाचा सामना केला होता; परंतु आज शिखांची स्थितीदेखील काश्मिरी पंडितांसारखी होत आहे. कारण कुठल्याही प्रकारच्या संधी त्यांना मिळत नसल्याने त्यांची तरुण पिढी खोर्‍यातून बाहेर जात आहे. काश्मीरला मिळणार्‍या पॅकेजमध्ये शीख लोक हिस्सा मागत आहेत. ३७० हटल्यानंतर असे वाटत आहे की, भारत सरकारचे राज्य आले आहे, असे शिखांचे मानणे आहे.
एनयूजे (आय) प्रतिनिधी मंडळाला लक्षात आले की, खोर्‍यातील लोकांना ३७० बाबत खरी माहिती देण्याचे कामच झाले नाही. त्याचा भावनात्मक मुद्दा बनवून ठेवण्यात आला. आता त्यातील बहुतेक लोकांना हे समजून येत आहे, ही चांगली बाब आहे. खोर्‍यातील तरुण, ३७० हटल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याच्या विकासात आणि पुढे जाणार्‍या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित आहेत आणि त्याची इच्छा आहे की, खोर्‍यातील परिस्थिती लवकरात लवकर सुधरावी. येथे नवे उद्योग यावेत, शिक्षण संस्था याव्यात, विद्यापीठे उघडली जावीत आणि खोर्‍यातील वातावरण पुन्हा एकदा चांगले व्हावे. खोर्‍यातील लोकांची इच्छा आहे की, कमीतकमी केंद्र सरकारकडून तरी, जमीन आणि त्यांच्या अधिकारांबाबत एक स्पष्टता यावी.
शियांना आहे तक्रार
मोहर्रमच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला आम्ही श्रीनगरच्या, ज्याला डाऊनटाऊन नावाने ओळखले जाते, त्या वस्तीत गेलो. बातम्यांच्या संदर्भात दिल्ली श्रीनगरपासून किती दूर चालली जाते, याचा अंदाज आम्हाला श्रीनगरच्या शिया मुसलमानांशी झालेल्या चर्चेनंतर आला. १४ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिया मुसलमानांचे राज्य सरकारप्रशासनात कुणी प्रतिनिधीच नाही, याचा आपण विचार करू शकतो का? कारस्थान करून, राज्यातील सर्व सरकारांनी शिया मुसलमानांना प्रत्येक ठिकाणाहून बाहेर काढले, अगदी वक्फ बोर्डातूनही. शियांना त्यांचा स्वतंत्र मुस्लिम औकाफ ट्रस्ट हवा आहे. शिया मुसलमानांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या करीनेदार कलाकारी, नक्काशी, पेपरमैशे उद्योगांना कसे पद्धतशीर उद्ध्वस्त करण्यात आले, याची वेदनामय कहाणी सांगितली. कोट्यवधी रुपयांची निर्यात होणार्‍या शाल बनविण्याच्या कलेलाही उद्ध्वस्त करण्यात आले. डल सरोवरात शिया मुसलमानांची एकही हाऊसबोट नाही. या गोष्टी क्वचितच दिल्लीच्या मुख्य धारेतील मीडियात आल्या असतील. मोहर्रमच्या दुसर्‍या दिवशी आम्ही शहराच्या मध्यवस्तीतून डाऊनटाऊनला गेलो होतो. संपूर्ण रस्त्यात, देशातील दुसर्‍या एखाद्या शहरात असते तशीच साधारणत: रहदारी होती. रैनावाडीत तर आमची गाडी जाममुळे फसलीदेखील होती. आम्ही सर्वांनी याचा व्हिडीओ बनविला आहे.
व्यवहार सुरू आहे
आमचे असे मत झाले की, सध्याची राजधानी श्रीनगरला एक मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करून, सरकारने नवी राजधानी निर्माण करण्यावर विचार केला पाहिजे. चिनाबवरील पुलाने जोडले तर काजीगुंडसारखे स्थानही नव्या राजधानीसाठी उपयुक्त होऊ शकते. आमच्या वाटेवर अनेक दुकाने जवळपास बंद होती, परंतु औषध, जनरल स्टोर्सची उघडी दुकाने आशा जागवीत होती. सर्व एटीएम सुरू होते आणि त्यात पैसेदेखील होते. सडकेच्या बाजूला भरणारे पटरी बाजार, इतर शहरांप्रमाणे व्यवस्थित सुरू होते. प्रत्येक दुसर्‍या चौकात टेलिफोन बूथची सोय होती. बंदच्या काळात काश्मिरींनी व्यवसायाचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. बंद शटरसमोर बसलेले तरुण, मागणी केली तर दुकानाचे शटर उघडून सामान देतात आणि नंतर लगेच शटर बंद करून पुन्हा दुकानासमोर बसून राहतात. अशाच एका शटर बंद असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भोजन घेतले. रेस्टॉरंटमध्ये त्यावेळी सुमारे २५-३० जण कुटुंबासह भोजन घेत होते.
३७० नंतर
खोर्‍यातील अधिकांश लोक मानतात की, केंद्र सरकारच्या घोषणा येथे क्रियान्वित होत नाहीत. म्हणून केंद्र सरकारने पंचायतींची मदत घेतली पाहिजे. काश्मिरी लोक शांतीने राहू इच्छितात आणि फुटीरतावाद्यांनी काश्मिरींच्या या सौम्य प्रवृत्तीचा फायदा घेतला. भावनात्मक मुद्दे समोर करून त्यांचे दोहन केले. सोबतच, स्थानिक सरकारी नोकरशाहीलादेखील परिस्थिती सुधरावी असे वाटत नाही. कलम ३७० तर समाप्त झाले, परंतु ७० वर्षांत लोकांच्या मनात जे भरवले गेले ते समाप्त करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात तळागाळातील लोकांपर्यंत अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावात आणि अंतर्गत भागात फलके लावून वस्तुस्थिती सांगण्याची गरज आहे. ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांपुढे किती संधी मोकळ्या झाल्या आहेत, हे सांगण्याची आवश्यकता आहे. एकूणच, प्रतिनिधी मंडळाच्या स्पष्टपणे लक्षात आले की, खोर्‍यातील जनजीवन सामान्य होत आहे आणि बहुतांश लोक कलम ३७० ला हटविण्याच्या घटनेला मागे टाकून पुढे निघून गेले आहेत.
(नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट (इंडिया) श्रीनगरहून परतल्यावर

Tuesday, 16 April 2019

फारुख, मेहबूबा मूर्खांच्या नंदनवनात महा एमटीबी- ल. त्र्य. जोशी


जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, त्यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवा, अशी मागणी केली असली तरी, त्या मागणीतून त्यांनी आपण मूर्खांच्या नंदनवनात राहत असल्याचेच मान्य केले आहे.


भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक संकल्पपत्रात घटनेतील ‘कलम ३७०’ आणि ‘कलम-३५ अ’ रद्द करण्याचा इरादा व्यक्त करताच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, त्यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवा, अशी मागणी केली असली तरी, त्या मागणीतून त्यांनी आपण मूर्खांच्या नंदनवनात राहत असल्याचेच मान्य केले आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या मागणीला विरोध असताना व त्यासाठी आपले बलिदान दिले असताना त्यांच्या बलिदानाची अवहेलना ते करीत आहेत, हे वेगळेच. निवडणुकीचा काळ असल्यामुळे लोकांच्या मतांवर डोळा ठेवून आपण कोणतीही मागणी करू शकतो अशी जर या महाभागांची समजूत असेल, तर त्यांच्या मागणीतून वरच्यापेक्षा वेगळा अर्थ निघूच शकत नाही. काँग्रेसचे मित्र असलेले डॉ. फारुख अब्दुल्ला असे विचित्र व कालबाह्य विधान करीत असताना त्या पक्षाने या संदर्भात मौन पाळावे हेही मोठे सूचक आहे. खरे तर जम्मू-काश्मीरचे भारतातील विलीनीकरण भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्याही आता इतके मजबूत झाले आहे की, त्यांचे बापजादेही इतिहासाची चाके उलटी फिरवू शकणार नाहीत.


भाजपने ही कलमे रद्द करण्याचा इरादा व्यक्त करताच ही मंडळी थेट १९४७ सालापर्यंत पोहोचली आणि ती कलमे रद्द झाली, तर जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे होईल. महाराजा हरिसिंग यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी मान्य केलेला विलीनीकरणाचा सामीलनामा रद्द होईल आणि भारत सरकारला त्या संदर्भात नव्याने वाटाघाटी सुरू कराव्या लागतील, असेही म्हणू लागली. विघटनवाद्यांचीच भाषा बोलणार्‍या या फुटीर नेत्यांसाठी तसे म्हणणे सोयीचे असले तरी आता आपल्याला १९४७च काय, पण १९५७च्याही नव्हे, १९९४च्याही मागे जाता येणार नाही, ही वस्तुस्थिती ते साफ विसरले. हे खरे आहे की, पूर्वी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान व राज्यपालांना ‘सदर-इ-रियासत’ म्हटले जात होते. पण, १९५७ नंतर चिनाब, झेलम या नद्यांमधून भरपूर पाणी वाहून गेले हे ते सोयीस्करपणे विसरतात. कारण, २६ ऑक्टोबर,१९४७ रोजी स्वाक्षरीबद्ध झालेल्या सामीलनाम्याला पाकिस्तानच्या आक्रमणाची पार्श्वभूमी तर आहेच शिवाय १० जानेवारी, १९६६ रोजी ‘ताश्कंद करार’ झाला. ३ जुलै, १९७२ रोजी सिमला करार झाला. फेब्रुवारी १९७५ मध्ये शेख अब्दुल्ला व इंदिरा गांधी यांच्यात ‘काश्मीर अ‍ॅकॉर्ड’ झाला. त्या सर्वावर कळस म्हणजे २२ फेब्रुवारी, १९९४ रोजी भारताच्या सार्वभौम संसदेने जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व राहील, असा निसंदिग्ध ठराव एकमताने संमत केला आहे. दरम्यान, भारत व पाकिस्तानच्या नेत्यांच्या अनेक शिखर बैठका पार पडल्या. त्या सर्वांमध्ये फक्त एवढेच म्हटले आहे की, ‘भारत व पाकिस्तान आपल्यातील काश्मीरसह सर्व समस्या आपसात वाटाघाटींनी सोडवतील. त्यात कोणताही तिसरा पक्ष मध्यस्थ म्हणून राहणार नाही.’


इतके सगळे घडल्यानंतरही फारुख, ओमर वा मेहबुबा सामीलनाम्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्यांच्यासाठी दुसरा कोणता शब्द वापरायचा? आता प्रश्न येतो भारताच्या दृष्टीने काश्मीरप्रश्न म्हणजे नेमके काय? भारताची ही भूमिका राहिली आहे की, संपूर्ण जम्मू-काश्मीरचे कथित ‘आझाद काश्मीर’सह भारतात वैधरीतीने विलीनीकरण झाले आहे. कथित ‘आझाद काश्मीर’ जो निर्माण झाला, तो पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाचा परिणाम आहे. म्हणून प्रथम पाकिस्तानने ते आक्रमण मागे घ्यावे. म्हणजेच कथित आझाद काश्मीरमधील आपले ‘ऑक्युपेशन’ हटवावे व काश्मीर अखंड करावा. प्रश्न फक्त एवढाच आहे की, ते कसे हटवायचे? युद्ध करून की, चर्चा करून? दोन्ही देशांनी चर्चेचानिर्णय घेतला आहे. पण, प्रत्येक वेळी कधी लष्करी आक्रमण करून, तर कधी सशस्त्र दहशतवादी भारतात पाठवून, तर कधी नियंत्रण रेषेवर हल्ले करून पाकिस्तान त्या चर्चेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यावेळी भारताचा संयम संपेल, त्यावेळी तो योग्य निर्णय घेईलच. पण, भारताच्या दृष्टीने काश्मीर समस्या एवढी आणि फक्त एवढीच आहे. बाकी सर्व ‘बकवास’ आहे.


पाकिस्तान मात्र सतत काश्मीरच्या जनतेच्या स्वयंनिर्णयाचे तुणतुणे वाजवत आहे. पण, त्याला वैधानिक आधार कोणताही नाही. महाराजा हरिसिंग यांनी सामीलनाम्यावर बिनशर्त सही केली असताना पाकिस्तान मात्र तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी अकारण व अवैधरीतीने घातलेल्या खुंटीकडे लक्ष वेधण्याचा उपद्व्याप करीत आहे. तो हे विसरत आहे की, भारताने वेळोवेळी जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायतींपर्यंतच्या निवडणुका अनेक वेळा यशस्वीपणे घेऊन आणि तेथील जनतेने कथित सार्वमताचे बुजगावणे फेकून दिल्यानंतरही फारुख कंपनीने त्यांची दखल घेऊ नये आणि काँग्रेसनेही त्याबाबत मौन पाळावे, ही बाब केवळ देशद्रोहातच बसणारी आहे. खरे तर महाराजा हरिसिंग यांनी सामीलनाम्यावर सही केली नसती, तर अब्दुल्ला वा मुफ्ती परिवार आज कुठे असते याची कल्पनाही फारुख, ओमर वा मेहबूबा करू शकत नाहीत. आज ते भारत सरकारने दिलेल्या सुरक्षेखाली निश्चिंतपणे फिरू तरी शकतात अन्यथा त्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडावे लागले असते.


१९४७ मध्ये टोळीवाल्यांच्या रूपाने पाकिस्तानने आपल्या सैनिकांना घुसवून बळाने जम्मू-काश्मीर गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता, हे ही मंडळी नाकारू शकत नाहीत. त्यावेळी सामीलनाम्यावर सही करा, अशी भीक मागायला भारताचे नेते पं. नेहरु वा सरदार वल्लभभाई पटेल महाराजा हरिसिंग यांच्याकडे गेले नव्हते. श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचलेल्या हल्लेखोरांना रोखण्याइतके लष्करी सामर्थ्य महाराजांजवळ नव्हते. म्हणून त्यांनी भारत सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली. पण, भारत वा पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात सामील न होण्याचा निर्णय त्यांनीच घेतल्याने त्यावेळी तरी जम्मू-काश्मीर हा भारतापासून वेगळा होता. तेथील सरकार जोपर्यंत आपले वेगळे अस्तित्व संपवून भारतात सामील होत नाही, तोपर्यंत आपण तेथे सैन्य पाठवू शकत नाही, अशी भारत सरकारची भूमिका होती. भारताची ती अडचण (अट नव्हे) दूर करण्यासाठी महाराजांनी सामीलनाम्यावर सही केली. त्यानंतर भारतीय सैन्याने तातडीने कारवाई करून हल्लेखोरांना जम्मू-काश्मीरबाहेर जवळजवळ पिटाळले. पण, तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांना संयुक्त राष्ट्रांकडे जाण्याची अवदसा आठवली. त्यामुळे सुरक्षा परिषदेने युद्धबंदी जाहीर केली. परिणामी, पाकिस्तानचे फावले. त्यावेळी त्यांच्याकडे काश्मीरचा काही भाग राहिला जो आजही ‘आझाद काश्मीर’ म्हणून भारताची डोकेदुखी बनला आहे.


‘एक राजमे दो प्रधान, दो विधान, दो निशान नही चलेंगे’ हा नारा देऊन डॉ. मुखर्जी यांनी पठाणकोटचा पूल ओलांडून प्रवेश केला होता. त्या नार्‍यासाठी त्यांनी बलिदानही दिले. त्यामुळेच ‘दो प्रधान’ ही संकल्पना निकालात निघाली. आता जम्मू-काश्मीरमध्ये कोणीही पंतप्रधान नाही आणि कोणी ‘सदर-इ-रियासत’ नाही. कारण, ‘रियासत’च राहिलेली नाही. ‘दो विधान, दो निशान’ही नावापुरतेच आहेत. कारण, त्यांच्यासोबतच भारताचा तिरंगा तेथे मानाने फडकत आहे. भारतीय राज्यघटनाही लागू झाली आहे. अशा स्थितीत जेव्हा फारुख कंपनी जेव्हा १९४७ पूर्वीची भाषा बोलतात तेव्हा त्यांचा घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचाच प्रयत्न उघड होतो.

डॉ. फारुख, ओमर आणि मेहबूबा यांचा भारताच्या राज्यघटनेवर विश्वास नसेल, ज्या संसदेत वा विधिमंडळात लोकांनी त्यांना बसण्याची संधी दिली त्या भारतीय संसदेवर व ती देणार्‍या लोकांवरही त्यांचा विश्वास नसेल, ऐतिहासिक सामीलनाम्यावरही त्यांचा विश्वास नसेल, पण जम्मू-काश्मीरच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही, असे ते म्हणूच शकत नाहीत. मग ज्या जम्मू-काश्मीर संविधानानेच १९५७ मध्ये एका ठरावाद्वारे ‘जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे व पुढेही राहील’ असा निर्वाळा दिला असेल, तर त्या संविधानाशीही त्यांनी गद्दारी करावी का, हा प्रश्न निर्माण होतो व १९४७ पूर्वीची स्थिती निर्माण करण्याच्या मागणीतून त्यांनी आपले रक्त गद्दारांचेच आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष आपल्याला काढावा लागतो.

अर्थात, या निष्कर्षाला ऐतिहासिक आधार आहे. त्यासाठी कुणालाही मुंबई उच्च न्यायालयाचे दिवंगत न्यायमूर्ती एम. एस. रत्नपारखी यांच्या ‘काश्मीर प्रॉब्लेम अ‍ॅण्ड इट्स सोल्युशन’ या इंग्रजी पुस्तकाचा आधार घेता येईल. या पुस्तकाच्या ८५ क्रमांकाच्या पानावर न्या. रत्नपारखी यांनी नमूद केले आहे की, ‘काश्मीरने १९५१ मध्ये आपली घटना समिती तयार केली. पुढे अनेक वर्षेपर्यंत संविधान बनविण्याचे काम सुरू होते. शेवटी १९५७ मध्ये संविधानाला अंतिम रूप देण्यात आले. या संविधानाचे तिसरे कलम स्पष्टपणे नमूद करते की, ‘काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि ही तरतूद अपरिवर्तनीय आहे.’ न्यायमूर्ती पुढे म्हणतात की, “एक प्रकारे या तरतुदीमुळे महाराजांनी स्वाक्षरीबद्ध केलेल्या सामीलनाम्यावर संविधानाचेही शिक्कामोर्तबच झाले आहे.” फारुख, ओमर व मेहबूबा यांनी या वस्तुस्थितीला फाटा देण्याचा प्रयत्न का करावा? अर्थातच फुटीर मानसिकतेतून.






Saturday, 16 March 2019

अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू

अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केलातसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे. तसेही मोदींच्या परराष्ट्रधोरणामुळे आज जग भारताच्याबरोबरच आहेहोऊन जाऊ द्या!
 
पाकिस्तानरूपी सुरक्षित बिळात दडून बसलेल्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून चीनने पुन्हा एकदा वाचवले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामासह देशातल्या कित्येक जिहादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केलेफ्रान्सच्या पुढाकाराने यंदा भारताने केलेला हा चौथा प्रयत्न होताज्यात नकाराधिकारप्राप्त चीनने नेहमीप्रमाणे आडकाठी आणत खोडा घातला. परंतु, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ज्या अधिकाराचा वापर करून चीनने हा खेळ खेळलातो अधिकार मात्र भारतानेच भीक म्हणून दिल्याचे चिनी नेतृत्वाने लक्षात ठेवावेदुसरीकडे आज चीनच्या मसूदप्रियतेमुळे वरवर पाहताभारताचा चार विरुद्ध एक असा पराभव झाल्याचे दिसत असले तरी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय झाल्याचेही काही मुद्द्यांचा सूक्ष्मपणे विचार केल्यास स्पष्ट होईलभारताच्या कृपेने झोळीत पडलेल्या अधिकाराचा वापर भारताविरोधातच करण्यातून चीन आज एका दहशतवाद्याच्या पाठीशी उभा ठाकल्याचे चित्र निर्माण झालेमसूद अझहरचा बचाव करून पाकिस्तानसह चीनने पांघरलेला दहशतवादविरोधी लढवय्याचा बुरखा तर टराटरा फाटलाचपण चीन हा दहशतवाद्यांचा नवा आश्रयदाता असल्याचेही सिद्ध झालेज्याचे दूरगामी परिणाम चीनवर होऊ शकतातपण आपल्या अट्टाहासापायी मसूदला साह्य करण्यातून आपण नेमके काय गमावले व नरेंद्र मोदींनी काय कमावलेहे त्या देशाला तसेच राहुल गांधींसह भारतातल्या तमाम मोदीविरोधकांना व काही प्रमाणात स्वकीयांनादेखील समजण्याची शक्यता कमीचम्हणून ते समजून सांगावेच लागेल.
 
मसूद अझहरचा बचाव करण्याच्या पवित्र्याने जागतिक समुदाय चीनवर मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्याचे व भारताला मोठ्या प्रमाणावर समर्थन देत असल्याचे दिसतेमसूदला अभय देण्याच्या चिनी भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील देशांनी दिलेल्या तीव्र प्रतिक्रियेवरून ते लक्षात येतेचीनला इशारा देताना मसूदविरोधात कारवाई करण्याचे अन्य पर्याय आमच्यासमोर खुले असल्याचे या देशांनी रोखठोक शब्दांत सांगितलेजागतिक पटलावर चीन वगळता अन्य देश भारताच्या बाजूने बोलत असल्याचे पाहायला मिळत असतानाच देशात मात्र राहुल गांधींसारखे बावळट राजकारणी आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी आनंदरंगात बुडाल्याचे पाहायला मिळालेमसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनसोक्त टीका करता येईल, टोमणे मारता येतील, म्हणून राहुल गांधींना हर्षवायु झाला. परिणामी, मोदींवर टीका करण्यासाठी आसुसलेल्या पण कोणताही मुद्दा हाताशी नसलेल्या विदूषकाच्या तोंडातून चित्रविचित्र शब्द वाहू लागले. “नरेंद्र मोदी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात, म्हणूनच ते चीनविरोधात चकार शब्दही काढत नाहीत. मोदींचे चीनबरोबरचे धोरण अपयशी ठरले, साबरमतीकाठी झोपाळ्यावर दोघांनी घेतलेल्या झोक्यांचादिल्लीतल्या गळाभेटीचा आणि चीनमध्ये जाऊन गुडघे टेकण्याचा काहीही उपयोग झाला नाही,” अशी बडबड राहुल गांधींनी केलीशेकडो भारतीयांचे बळी घेणारा क्रूरकर्मा वाचल्याचे समजून न घेणार्या राहुल गांधींच्या बालिश मनाला खरे म्हणजे मुत्सद्देगिरी कशाला म्हणतात, हेही कळत नसावे. म्हणूनच प्रियांका व रॉबर्ट वढेरा यांच्या जमीनघोटाळ्यात नाव आल्याचे पाहून अवसान गळालेला हा इसम मसूदप्रकरणावरून टाळ्या पिटताना दिसतो.राहुल गांधींना हे दिसत नाही की, आज मोदींनी चीनला कोणत्या ठिकाणी आणून उभे केले? आपल्या डावपेच खेळण्याच्या कौशल्याने मोदींनी चीनची अवस्था अगदी पाकिस्तानसारखी केली आहेआज दहशतवाद्यांचा पोशिंदा म्हणून जसे पाकिस्तानचे नाव घेतले जाते, तसेच मसूद अझहरमुळे उद्या चीनचेही घेतले जाईल, जो मोदींच्या परराष्ट्रधोरणाचा मोठा विजय ठरेल.
 
आता मसूद अझहरवरून मोदींविरोधात जे उड्या मारत बोंबलताना दिसतातत्यांना स्वतःच्या घराण्याचा व पक्षाचाही थोडासा का होईना इतिहास सांगायलाच हवाचीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा वापर करून मसूदचा बचाव केला हे खरेच, पण त्याला ती ताकद, ती शक्ती मिळाली कुठून? राहुल गांधींना ते माहिती नाही का? आज ज्या नकाराधिकाराच्या बळावर चीन शिरजोर झाल्याचे दिसतेतो राहुलच्या पणजोबांनी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंनीच दिलाकाश्मीरप्रश्न युनोत नेऊन जसा नेहरूंनी गुंता वाढवलातसाच चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देऊ केल्याने भारतासमोर आव्हान उभे राहिले. अमेरिका जेव्हा भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देत होती, तेव्हा चीनचे शत्रुत्व नको म्हणत नेहरूंनी ते नाकारले. १९५० मध्ये नेहरूंनी जे केले, त्याचेच तोटे आज भारताला भोगावे लागत आहेत. राहुल गांधींसारख्या सुमार व्यक्तीने, भारताच्या जाऊ द्या, पण स्वतःच्या घराण्याच्या, पक्षाच्या इतिहासाचा जरी अभ्यास केला तरी त्यांना हे नक्कीच कळेल. पण, राहुलकडून तेही झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच आज ते मोदींवर पातळी सोडून बेतालपणे टीका करण्याचा, त्यांना डरपोक म्हणण्याचा हुच्चपणा करताना दिसतात. पण, देशातल्या जनतेला डोकलाम संघर्षावेळी मोदींनी घेतलेली कणखर भूमिका चांगलीच स्मरतेम्हणूनच इथले जनमानस राहुलच्या उचापतींकडे पाहण्याऐवजी घराण्याचा इतिहासच समोर आणेलज्याची उत्तरे देता देता राहुलच्याच नाकी नऊ येईल.
 
चीनचे मसूद अझहरला जपण्याचे वा भारताविरोधात जाण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे दलाई लामातिबेटमधील बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना चीन आपला सर्वात मोठा शत्रू समजतो. कारण, चीनने तिबेट गिळल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध असलेली तिथली जनता दलाई लामांकडे आशेने पाहतेतर चीनला तिबेटचे स्वतंत्र अस्तित्वच मान्य नाही अन् चीनच्या दृष्टीने शत्रू असलेल्या दलाई लामांना आश्रय दिला तो भारतानेभारताच्या याच कृतीचा बदला घेण्याच्या भावनेने चीन आज मसूद अझहरसारख्या कुख्यात दहशतवाद्याची पाठराखण करताना दिसतोमसूद अझहर भारताच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे चीनला माहिती आहे. म्हणूनच चीन ‘तुम्ही आमच्या शत्रूला म्हणजेच दलाई लामांना घरात घेतले तर आम्हीही तुमच्या शत्रूला सुरक्षाकवच पुरवू,’ अशाप्रकारे वागताना दिसतो. पण इथेही भारताने चीनलाच आपल्या जाळ्यात अडकविल्याचे दिसतेकारण भारताने बौद्ध धर्मगुरूंना आश्रय दिला तर चीनने अतिशय उलट्या काळजाच्या धर्मांध दहशतवाद्यालासोबतच मसूदविरोधात मत दिले तर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असलेल्या सीपेक प्रकल्पाला जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लक्ष्य करतील, याचीही चीनला काळजी वाटते. कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या, १० हजार कर्मचारी राबणार्‍या सीपेकवर हल्ला झाल्यास मोठे नुकसान होऊ शकतेआधीच अमेरिकेबरोबर व्यापारयुद्ध व कित्येक देशांनी चिनी प्रकल्पांना दिलेल्या नकारामुळे अर्थव्यवस्थेला बसलेले हादरे व त्यातच अशाप्रकारे दहशतवादी मागे लागले तर काय, हा प्रश्न चीनसमोर असेल. शिवाय चीनमधील उईगर मुस्लिमांचे पाकिस्तानातील जिहाद्यांशी सूत जुळले तर कायहे प्रश्नही चीनसमोर असतीलम्हणूनही त्याने सर्वच देश मसूदविरोधात असताना नकाराधिकाराचा वापर केला असावामसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यात यश न आल्याने आता पुढे कायहा भारतासमोरचा मात्र एक मोठा प्रश्न असल्याचे दिसते. पण, त्याचेही उत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याआधीच दिले आहे. “अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केलातसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे, 
 
 

Saturday, 22 December 2018

आणि हिंदू शांत राहिले.....


This is a compilation of some of the key points that prominent Indian Muslims leaders have spoken about Hindus. IndiaFacts thanks its reader and contributor, D.C. Nath for sending us this list. 

-1-

Hindus shouldn’t make the mistake of considering Indian-Muslims any different from the Pakistan-Muslims. If India may dare to attack Pakistan, then 25 crore Indian Muslims will join Pakistan Forces and fight against India.

Asaduddin Owaisi, Member of Parliament,MIM, Hyderabad.

-2-

Hindus do not have any rights to vote in Arab, Pakistan or any one of the 56 Islamic Nations. I challenge: has even a single Hindu the strength (guts) to impose restrictions on our (Muslims’) voting-rights in India?

Maulana Badarrudin Ajmal, Loksabha Sansad, AIUDF, Assam.

-3-

In Hyderabad, our Muslim population has crossed 50%, and now we are in majority. Therefore I demand the Administration to impose restrictions on celebration of Hindu festivals such as Ram-navami, Hanuman Jayanti etc. In the Bhagya-Lakshmi temple, near Char-Minar, we have already shown our strength by stopping the ringing of the Bell/gong.  We Muslims will ensure that this temple is also destroyed.

Akbaruddin Owaisi, Sansad, Majlis-e-Ittehadul-Musalmeen, (AIMIM), Hyderabad, India.

-4-

I regret the continuing of massacre of Hindus & Buddhists in Bangladesh, but Bangladesh is an Islamic Nation and not Secular. Now, the Muslims are in majority here. Under the circumstances, if Hindus & Buddhists want to live safely, they should either convert to Islam or go to India.

Begum Khalida Zia, President, Bangla National Party.

-5-

Hindu-Leaders may wear a Muslim cap any number of times, but we Muslim-Leaders will never put a Tilak. Let Hindus may give any amount of respect to our Namaz, but we Muslims will surely boycott “Vande Matram”, because in Islam both Secularism & Patriotism are haraam(prohibited/unclean).

Azam Khan, Leader, Samajwadi Party, U.P.

-6-

Muslims have ruled India for 1100 years. Lacs of Hindus were beheaded. Crores of Hindus were converted into Islam. We divided India, and snatched Pak & Bangladesh. Demolished 2000 temples and converted these into mosques. It is out of our fear that Hindus even today chant: “Hindu Muslim Bhai Bhai”.  This is the strength of Islam.

Maulana Jhakir Nayeek, Mumbai.

-7-

Let Hindus consider Cow as a Mother, even then we Muslims will surely cut the Cows, because sacrifice is Muslims’ Religious right. Allah demands Sacrifice. Muslims don’t fight an oral-war, we do everything directly with our might. We are not afraid of any ruler or Government because we the Muslim community have already grown sizably. If any mother’s son intervenes, we will deal with him, but we will certainly cut Cows.

Nuroor Rahman Barkati, Shahi Imam, Tipu Sultan Masjid, Kolkata, India.

 

-8-

In the face of our strength (might), Hindus are not able to build even a single Ram-Temple in their own country. Do Hindus have the spunk to even stall the construction of a Mosque in Saudi-Arabia, Pak or any one of the 56 Islamic countries?

Maulana Sayyad Ahmad Bukhari, Shahi Imam, Jama Masjid, Delhi.

-9-

Hindus don’t have the spunk to stop infiltration (illegal) of our Bangladeshi Muslim brothers into Assam; we will continue to come (infiltrate).

Maulana Badarrudin Ajmal, Loksabha Sansad, AIUDF, Assam.
➖➖➖➖➖➖➖
मी वैष्णो देवीचे दर्शन घेऊन जम्मूला आलो, तेव्हा एक जवळपास 80 वर्षे असलेला म्हातारा भाजीपाला विकत होता, त्याची परिस्थिती खूप गरबीब होती मी कुतूहलाने त्याला विचारले ह्या वयात आराम करण्यापेक्षा तूम्ही हे काम का करत आह?
े तुमची मुले तुम्हाला सांभाळत नाही का?
         तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला मला या जगात कोणीही नाही, मग मी विचारले असे का? 
  तेव्हा त्याने उत्तर दिले की , मी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एक मोठा जमीनदार होतो पण 1990 ची रात्र मी विसरू शकत नाही, त्या रात्री प्रत्येक मशिदी तुन हिंदुओ, काफिरो यहा से चाले जाओ, आपकी बहू, बेटी यहा छोड जाओ अश्या घोषणा ऐकू येत होत्या आणि रात्री अचानक आमच्या घरावर हल्ला झाला, माझे तीन मुले माझ्या डोळ्या समोर बंदुकीने चाळणी करण्यात आले, मी तरीही काश्मीर सोडले नाही मला आशा होती की सरकार या विरुद्ध काहीतरी action घेईल, पण सतत काही दिवस हजारो हिंदूंची घरात घुसून हत्या केल्या गेल्या, मला आशा होती की भारतातील हिंदू समाज पेटून उठेल, आंदोलने करील, पण असे काहीच घडले नाही, आणि जग शांत राहिले, काँग्रेस सरकार आतंकवाद्यांना बिर्याणी देत होते , हिंदू मुलीवर बलात्कार होत होते,पण हिंदू समाज शांत होता, फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आमची बाजू घेतली, पेन ते एकाकी पडले,
आणि हिंदू शांत राहिले
     मग लाखो हिंदू काश्मीरमधून शरणार्थी बनून श्रीनागरमधील refuji कॅम्प मध्ये राहायला आले ,  जे काश्मिरी हिंदू ज्याचे मोठं मोठी हवेली होती, जमीन जमले होते ते आता तंबू मध्ये राहत होते, आणि भारतातील हिंदू क्रिकेट, फिल्म या मध्ये गुंग होता, आणि हिंदू शांत राहिला।
       रेफुजी कॅम्प मध्ये डिसेंबरच्या थंडीमध्ये हजारो लहान मुलांचा थंडी तापाने मृत्यू झाला, आणि हिंदू शांत राहिला
 आता मी माझे आयुष्य कसे बसे जगत आहे पोट भरत आहे, पण आता कुठे मनात एक आशा निर्माण झाली आहे ती आहे नरेंद्र मोदी जी च्या रूपाने ।
जर 90 च्या दशकात मोदी पंतप्रधान असते तर काश्मिरी हिंदूंना विस्थपित व्हावे लागले नसते असे बोलता बोलता त्याच्या डोळ्यात एक नवी उमेद आणि चमक दिसली तो म्हणाला आज ज्या प्रकारे रोज 3-4 आतंकवादी मारले जात आहे, आतंकवादी ना funding करणारे जेल मध्ये जात आहे, दगडफेक करणारे मारले जात आहे, 370 आणि 35A बंद करण्याची तयारी होत आहे , असे वाटते की मोदीजीना माझी उरलेली उमर मील जाये।
     आता उरलेल्या काश्मिरी हिंदूंना मोदीजींच्या रूपाने एक जगण्याची नवी उमेद मिळाली आहे। असे बोलून तो त्याच्या कामाला लागला।
      एवढ सगळ ऐकून माझे मन सुन्न झाले, मी खिशातून काही पैसे काढून देण्याचा प्रयत्न केला पण त्याने स्वाभिमानाने ते नाकारले, मग माझ्या मनात विचार आला की रोहिग्या मुस्लिम साठी भारतातील सर्व मुसलमान एकत्र झाले आहे, आपण काय केले काश्मिरी हिंदूंसाठी ? किती हिंदू रस्त्यावर उतरले , दुसऱ्या देशातील मुसलमानासाठी भारतातील मुसलमान सर्व मतभेद विसरून एकत्र आले आहे, आपण आपल्याच भारतातील काश्मिरी हिंदूंसाठी एकत्र का येऊ शकत नाही, आपण जात, प्रांत भेद विसरून एकत्र आले पाहिजे। आपण मोदींना मदत केली पाहिजे
आपण थोडे पेट्रोल महाग झाले की मोदींना नावे ठेवतो पण काश्मीर समस्या मिटविण्याकरिता त्याचे प्रयत्न पाहून मी ठरविले की पेट्रोल 100 रुपये झाले तरी, डाळ आणि भाजी महाग झाले तरी मी मोदींना मत देणार कारण माझे एक मत एका काश्मिरी हिंदूंची आपल्या घरी जाण्याची एक शेवटची आशा आहे। म्हणून माझी सर्वाना एक नम्र विनंती आहे की तुमचे मत तुम्ही काश्मिरी हिंदूंना मारणाऱ्या बरोबर आहे की आतंकवाद्यांना मारणाऱ्या बरोबर आहे हे तुम्हीच ठरवा
कारण ही शेवटची संधी आहे 

Friday, 2 November 2018

आझादी’ एक दिवास्वप्न: काश्मिर खोर्यातिल हिंसाचार फ़क्त चार जिल्ह्यामधे सिमीत-BRIG HEMANT MAHAJAN



दगडफेक करणार्यांना पकडा
प्रत्येक दहशतवादविरोधी कारवाईत स्थानिकांकडून होणाऱ्या दगडफेकीचा अडथळा सहन करावा लागत असल्याने शनिवारी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याची तुलना दहशतवादाशीच केली. 'दगडफेकीत एका जवानाचा मृत्यू ओढवला. तरीही काही जण म्हणतात, दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका. दगड भिरकवणारे हे दहशतवादीच आहेत', असे लष्करप्रमुख रावत म्हणाले.काश्मिरी जनतेसाठी रस्ता, पूल बनवण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत गुरुवारी राजेंद्र सिंह या जवानाचा मृत्यू झाला होता. या घटनेवर लष्करप्रमुखांनी तीव्र संताप व्यक्त केला. 'दगडफेकीत जवानाचा मृत्यू झाल्याने आता दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांचे पाठिराखे का समजू नये? त्यांना दहशतवाद्यांसारखीच वागणूक का देऊ नये?
पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिर खोर्यातील काही माथेफिरू तरुण, भारतीय जवानांवर दगड फेकतातत्यांच्या जीवाशी खेळत आहेतसुरक्षा दलाच्या वाहनांना घेरून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करतातअसे असतानाही मानवाधिकाराच्या नावाखाली आमच्या सैनिकांचे हात बांधून ठेवण्यात आले आहेत.आज पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या घटली आहेतिकडून येणाऱ्या शस्त्रास्त्रांचे प्रमाणही कमी झाले आहेमात्र काही स्थानिक तरुण दहशतवादी होत आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या सैन्याला अडविण्यासाठी काही नागरिक एकत्र येऊन ढाल बनत आहेत. अनेक ठिकाणी तर महिलांना पुढे केले जाते. माथेफिरू तरुणांनी आमच्या सैनिकांवर दगड फेकायचेजवानांना घेरून त्यांना मारहाण करायची अन् तरीही सैनिकांनी जवळ असलेले शस्त्र बाहेर न काढता चुपचाप मार सहन करायचा, हे योग्य नाही. 
पाकिस्तानशी निष्ठा बाळगणार्यांच्या मुसक्या बांधा
काश्मिरातील जनतेला पैसा पाठवा, त्यांना मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा पुरवा अन् बदल्यात त्यांचे प्रेम मिळवा,’ हे आधीच्या सरकारांनी चालविलेले धोरण आता थांबविणे गरजेचे आहे. ‘चुलीत गेला मानवाधिकारअसे म्हणत जगाला हे दाखवून देण्याची गरज आहे की, आमच्या सैनिकांवर जे दगड फेकतील,देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याचा जे प्रयत्न करतीलत्यांना आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीआमच्या सैनिकांच्या मानवाधिकाराचे पत्थरबाजांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून जेव्हा उल्लंघन केले जातेतेव्हा कुठे गेलेले असतात हे मानवाधिकारवाले
काश्मिरातील जे फुटीरवादी नेते भारत सरकारच्या सवलतींचा वापर करूनही पाकिस्तानशी निष्ठा बाळगतात, अशा नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना काळकोठड्यांमध्ये नेऊन डांबले पाहिजे. काश्मिरातील फुटीरवादी अन् देशद्रोही नेत्यांना काळकोठडीत डांबण्याची हीच योग्य वेळ आहे.अब्दुल्ला असोत वा मग मुफ्ती मोहम्मद सईद वा त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती, या सगळ्यांनी भारत सरकारला वेळोवेळी ब्लॅकमेल केले आहे. हे थांबवले पाहिजे.
जिहादींना संकटातून सोडवून आणण्यासाठी दगडफेके व ‘हुर्रियत करते. हुर्रियत कुठलेही शस्त्र हाती घेत नाहीततर युवकांची व लोकांची माथी भडकावण्याचे काम करतातत्यातून जो प्रक्षोभ माजवला जातोत्याच्या परिणामी चकमकीत गुंतलेल्या भारतीय सैनिकांवर दगडफेकीच्या रूपाने होत असतोअशा युवकांना प्रवृत्त करण्यापासून आवश्यक ते पैसे वा साहित्य पुरवण्याचेही काम ‘हुर्रियतसारख्या संघटना पार पाडत असतात. साहजिकच अशा कुठल्याही पांढरपेशा हुर्रियतवाल्याचा थेट हिंसाचारात सहभाग आहेअसे पुराव्यानिशी सिद्ध करणे कायदा प्रशासनाला शक्य होत नाही. वरकरणी ही माणसे सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षितच असतात. पणत्यांच्या कामांमधून हिंसाचाराला चालना मिळत असतेत्याला युद्धशास्त्रामध्ये ‘रसद पुरवणारी यंत्रणाम्हटले जाते. शत्रूच्या सैन्याला हैराण करून सोडलेमग त्याला लढणे अशक्य होऊन जाते.त्यांच्या आता मुसक्या बांधा.
व्हॉटस अॅप ग्रुपच्या तरुणांना पकडा
आमच्या सैनिकांना मानवाधिकार नाही का? आमच्या सैनिकांना आत्मसन्मान नाही का? आमचे सैनिक माथेफिरूंचा मुकाबला करू शकत नाहीत काआमचे सैनिक आमची शान नाहीत काआमच्या सैनिकांच्या जीवाची काहीच किंमत नाही काया प्रश्नांची उत्तरं मानवाधिकाराच्या नावानं बेंबीच्या देठापासून बोंबलणाऱ्यांनी दिली पाहिजेत. सैनिकांनी कुणावरही उगाचच हात उगारू नये, गोळी झाडू नये. पण, जवळ शस्त्रास्त्रे आहेत आणि जीवाला धोकाही आहे, अशा स्थितीतही सैनिकांनी गप्प बसावेहा कसला आला मानवाधिकारआमचा हिंसाचारावर  विश्वास नसला, तरी गोळीचे उत्तर गोळीनेच दिले पाहिजे, जशास तसे तरी वागले पाहिजे.
आज काश्मीर खोऱ्यात तीनशेपेक्षा जास्त व्हॉटस अॅप ग्रुप असे आहेत की, ज्यावरून काश्मिरी तरुणांची माथी भडकवली जातात. भारत सरकारविरुद्ध तरुणांना चिथावणी देण्याचे पाप पाकिस्तानकडून केले जात आहे. यामुळेकाश्मिरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो.अश्या व्हॉटस अॅप ग्रुपच्या तरुणांना पण पकडा. मध्यंतरी सैन्याने एक शक्कल लढवली. साध्या वेशातील जवान आधीच दगडफेक्यांमध्ये सामील व्हायचे. सगळे दगडफेके एकत्र आले की त्यांना आदेश कोण देतो, हे हेरायचे आणि नंतर त्यांना अलगद पकडून आणायचे, अशी पद्धत अवलंबण्यात आल्याने आता दगडफेक्यांचेही धाबे दणाणले आहे.
काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या जवानांना चकमकीच्या काळात मागून धोंडे मारणारे दगडफेके आणि इथे शहरी भागातल्या नक्षली व जिहादी विरोधातल्या कायदेशीर कारवाईत अडथळे उभे करणाऱ्यात नेमका काय फरक आहे? कोणी त्या अटकेतील संशयितांना गोळ्या झाडत नव्हता की कोठडीत बंद करून चाबकाचे फटकारे मारत नव्हता. निदान कोर्टात हजर करण्यापर्यंत तरी संयम नको काय? पण आधीच एक फळी कोर्टात पोहोचली आणि दुसरी माध्यमांच्या कॅमेरात घुसून थेट पोलीस व शासनालाच गुन्हेगार ठरवू लागली.
अमरनाथ यात्रा शांततेत पार
काश्मीर खोर्यामधला हिंसाचार कायम वृत्तपत्रांच्या मथळ्यात असतो. परंतु याच काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी संपलेली अमरनाथ यात्रा संपूर्ण शांततेत पार पडली,यावर प्रसार माध्यमांतून चकार शब्द आढळला नाही! एकाही टीव्ही चॅनेलवर सुरक्षा दलाच्या या मोठय़ा यशाबद्दल कोणी बोलले नाही. अमरनाथ यात्रा संपूर्ण शांततेत पार पडली आणि काही लाख भाविक सुखरूपपणे त्यात सामील झाले, ही म्हणूनच बातमीबनली नाही. काश्मीरखोर्याचे ९९ टक्के बातमीदार हे स्थानिक आहेत. त्यांना कायम अतिरेक्यांच्या दबावाखालीच काम करावे लागते. त्यामुळे काश्मीरमधून येणाऱ्या बातम्या या एकांगी असतात, त्यांना नेहमीच अतिरेक्यांच्या अजेंडाचा रंग दिला जातो.
काश्मीर खोऱ्याच्या केवळ चार जिल्ह्यांत संघर्ष
आज काश्मीरच्या अंतर्भागात सैन्य, राष्ट्रीय रायफल्स व केंद्रीय पोलीस दलाच्या ठाण्यांचे जाळे अस्तित्वात आहे. अमेरिकेने पाकिस्तानची पाठराखण सोडली आहे. तसेच आपल्या सैन्याकडेही आता अत्याधुनिक शस्त्रे आहेत. जागतिक स्तरावर काही मुस्लीम देश सोडले तर इतर कोणीही देश काश्मीर फुटीरतावाद्यांच्या समर्थनात आज उभा नाही.फुटीरतावादी आणि त्यांचे समर्थक कितीही वल्गना करीत असले तरी हे विदारक सत्य आहे, की आज काश्मीर खोऱ्याच्या केवळ चार जिल्ह्यांत हा संघर्ष सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जम्मू, कारगिल आणि लडाख भागात शांततापूर्ण व यशस्वीपणे निवडणुका पार पडल्या. काश्मिरी फुटीरतावादी हे केवळ श्रीनगर खोऱ्यापुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण जम्मू-काश्मीरबद्दल बोलण्याचा काय हक्क आहे?
एका चकमकीत मनान वाणी हा अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयात पीएच. डी. करणारा दहशतवादी मारला गेला. मनान वाणीच्या मृत्यूनंतर काही तुरळक घटना वगळता सर्वत्र शांतता होती. आजची परिस्थिती आहे, की आज कोणाही काश्मिरीला आझादीकिंवा पाकिस्तानात विलीनीकरण नजीकच्या काळात होईल असे वाटत नाही. तिथेसुद्धा जनतेच्या हे लक्षात आले, की स्वातंत्र्यहे दिवास्वप्न आहे.  
काही काळाने पाकिस्तान आणि भारताच्या सामर्थ्यांमधील दरी वाढतच जाणार आहे. जागतिक स्तरावरसुद्धा काश्मिरी जनतेला समर्थन मिळेनासे झाले आहे. काही दशकांनंतर हे वास्तव जास्त जास्त दृढ होत जाईल आणि काश्मीरची नवी पिढी या वास्तवाला सामोरे जायला तयार होईल. पण हे होईपर्यंत काश्मीरमध्ये कमीत कमी बलप्रयोग करून शांतता ठेवणे आणि काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना देणे हा एक मार्ग आहे.भारतालाही आपली सामरिक, आर्थिक, राजकीय ताकद वाढवून पाकिस्तानला आपल्या दबावाखाली आणावे लागेल. मग काश्मीरचा प्रश्‍न सोडवणे शक्य होईल.


Thursday, 23 August 2018

खोर्यातील विषवल्ली ठेचण्याची गरज! महा एमटीबी 24-Aug-2018



 
जम्मू-काश्मीरमधील अशांतता हा भारताच्या राजकारणाला लागलेला शाप आहे. कितीही मलमपट्टी करा, येथील जनमानस हिंसाचाराच्या मार्गापासून स्वतःला परावृत्त करण्यास तयार नाही. केंद्रात मोदी सरकार येऊन चार वर्षे झाली. या सरकारने भारताचे मस्तक म्हणून गणल्या जाणार्या या राज्याच्या विकासासाठी अनेक पावले उचलली. पॅकेजेस, रस्तेबांधणी, पायाभूत सुविधांसाठी पैसा पुरविला. राज्यात नव्या ऊर्जानिर्मिती केंद्रांची स्थापना केली. रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केले. शांतता निर्माण व्हावी म्हणून सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखली. शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली आणि लष्कराला एका गोळीमागे 10 गोळ्या मारण्याचे स्वातंत्र्यही दिले. घुसखोरी रोखण्यात आणि सीमेपलीकडील दहशतवादावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने जबरदस्त प्रयत्न केल्यामुळेच तो आटोक्यात आला असला, तरी पाकिस्तानची आगळीक काही कमी होताना दिसत नाही. भारतात हिंसाचार आणि अशांतता निर्माण करणार्या विघटनवाद्यांच्या पाकिस्तानी आकांचा जोवर बंदोबस्त होत नाही, तोवर या राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण येण्याची शक्यता नाही. नुकत्याच पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल सत्ताधार्यांच्या विरोधात लागले.
माजी क्रिकेटपटू आणि पोस्टरबॉय म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इन्साफला पाकिस्तानी जनतेने कौल दिला आणि त्यांना पंतप्रधानपदी बसविले. या नव्या सरकारचा भारताबद्दलचा दृष्टिकोन कसा राहतो, यावरच उभय देशांमधील शांततेचे अस्तित्व टिकून राहणार आहे. उभय देशांमधील सौहार्दपूर्ण चर्चा दक्षिण आशियातील वातावरणात बदल घडवून आणू शकते. हे सारे माहीत असूनही ईदेपासून पुन्हा एकदा खोर्यात अस्थिरता माजवली जात आहे. ईदेच्या उत्साहाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. अतिरेक्यांनी तर यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनाच लक्ष्य केले. कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यातील तीन पोलिसांचा बळी घेतला गेला.
प्यार-मोहब्बत वाटण्याचा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश देणार्या सणालाच हिंसाचार झाल्याने राज्याची अब्रू गेलेली आहे. फय्याझ अहमद शाह या प्रशिक्षणार्थी पोलिसावर अतिरेक्यांनी गोळी झाडली. या 34 वर्षीय पोलिसाच्या मृत्यूने त्याचे जन्मगाव असलेल्या झाझरीपोरा येथे संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. अगदी जवळून गोळी झाडल्याने हा पोलिस जागीच दगावला. ईदेचा आनंद शोकात परावर्तित झाला. पुलवामामध्ये अतिरेक्यांनी पोलिस निरीक्षक मोहम्मद अशरफ दार यांना लक्ष्य केले. त्याचप्रमाणे शब्बीर अहमद भट या भाजपा कार्यकर्त्याची अतिरेक्यांनी हत्या केली. पोलिसांवरील आणि नागरिकांवरील हल्ले अतिरेक्यांमधील नैराश्य दर्शवीत आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यामुळे आधीच निराश झालेल्या विघटनवाद्यांच्या आणि अतिरेक्यांच्या कारवायांवर निर्बंध आले आहेत. हातात खुळखुळणारा पैसा नसल्याने कुठलेही दृष्कृत्य करण्यासाठी, समाजकंटकांना देण्यासाठी लागणारी रोकड बाजारातून गायब झाली आहे.
समाजकंटक हाताशी नसल्याने हिंसाचार घडविणे दुरापास्त झाले आहे. पण, तरीही आपले अस्तित्व तर दिसले पाहिजे, या भावनेतून पोलिसांना अतिरेक्यांनी लक्ष्य केलेले आहे. खोर्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यपाल राजवटीचा निर्णय घेण्यात आला. भाजपाने देशहितासाठी सरकारची कुर्बानी दिली, असा संदेशही देशात सर्वदूर गेला. दोरी किती ताणायची याचे भान न राहिल्याने, मेहबुबांना राज्याची सत्ता गमवावी लागली. आज हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या पक्षातील काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. भविष्यात त्यांच्याच पाठिंब्याने राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले, तर त्याचे आश्चर्य वाटू नये.
पण, खोर्यात एकाएकी वाढलेल्या हिंसाचारामागे देशातील विरोधी पक्षांचे नैराश्यही कारणीभूत आहे. देशात असुरक्षिततेचे वातावरण असल्याचा बागुलबुवा उभारून पुरस्कार वापसीचा कार्यक्रम जसा राबविला गेला, अगदी त्याच धर्तीवर खोर्यातील देशविरोधी शक्ती पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. त्याला 2019च्या लोकसभा निवडणुकीची किनार आहेच. प्रत्येक राज्यात या-ना त्या कारणाने अस्थिरतेचे वातावरण निर्माण करायचे, कुठे सामूहिक हत्यांचा आधार, तर कुठे कथित गोरक्षकांना मारहाण झाल्याच्या बोंबा ठोकायच्या आणि वातावरण कलुषित करायचे, हा फॉर्म्युलाच विरोधकांना बळ देताना दिसत आहे. सकारात्मक कामे काही नाहीत, मग प्रसिद्धी मिळणार तरी कशी, हा सवालच नाही. नकारात्मक मुद्दे किंना नॉन इश्यूजचा बागुलबुवा करायचा आणि सरकारविरोधी वातावरण तापवायचे, हेच एक कलमी सूत्र देशभरात राबविले जात आहे. दहशतवादाला आणि भारतविरोधी वातावरणाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमेही अहमहमिकेने करीत आहेत. या देशातील अस्थिर राजकारणाकडे दुर्लक्ष करून, पाकिस्तानी मीडिया काय साध्य करीत आहे, हे कळायला मार्ग नाही. कधीकधी काही माध्यमे जागतिक हिताच्या बाताही करतात, त्यातील एक म्हणजे द एक्सप्रेस ट्रिब्युनचे गेल्या काही दिवसातील एक संपादकीय म्हणता येईल. या संपादकीयातून या दैनिकाने पाकिस्तानी राज्यकत्यार्र्ंच्या डोळ्यांत अंजन घालण्याचेच काम केले आहे.
जर कट्टरपंथी आणि आतंकवादी कारवाया करणार्या संघटनांबद्दलचा सहानुभूतीचा दृष्टिकोन बदलला नाही, तर पाकिस्तानात आणखी एका नव्या आतंकवादाचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही, अशी रोखठोक भूमिका पाकिस्तानातील सद्य:स्थिती उघड करणारी आहे. दहशतवादी सघटनांबद्दल लवचीक धोरण स्वीकारल्यामुळे पाकिस्तानात अतिरेकी मुक्तपणे संचार करीत असून, त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाला पाकिस्तानविरुद्ध बोलण्यासाठी हाती शस्त्र मिळत आहे, याकडेही या वर्तमानपत्राने लक्ष वेधले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानातील अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांची जारी केलेली यादी, या देशाने आंतकवादाला खतपाणी घालणे थांबवलेले नाही, हेच दर्शविते. जम्मू-काश्मीरच्या संदर्भात अनेक याचिका कोर्टात पेंडिंग आहेत. तेथील मूळ निवासींबाबत होणारा भेदभाव, महिलांना मिळणारी सापत्न वागणूक, संपत्तीबाबतचे कायदेकानून, राज्याबाबतच्या दोन राज्यघटना, दोन ध्वज, दोन राजमुद्रा तसेच कायम निवासी प्रमाणपत्र आदींबाबत अन्याय झालेल्या अनेकांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्याबाबत वेळोवेळी सुनावण्या होतील. पण, 35(अ) बाबतच्या सुनावणीच्या वेळीही खोर्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते. न्याय्य मागण्यांसाठीच्या लोकशाहीमार्गाचा अवलंब करणेही चुकीचे ठरत असेल, तर राज्यातील ही विषवल्ली कायमची ठेचून काढण्याचीच गरज आहे

Wednesday, 4 July 2018

MUST READ-काश्मीर प्रश्नाचे ‘मूळ’ आर्थिक नाही -TARUNBHARAT BELGAUM-डॉ. अनिल पडोशी


जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आल्यापासून काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने चर्चेमध्ये आला आहे. या क्षेत्रातील मान्यवर विचारवंत आपापली मते वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे व्यक्त करीत आहेत. प्रश्न सामोपचाराने सुटावा असे सर्वांनाच वाटते आहे. या संदर्भात असा एक मत प्रवाह आहे की भारत सरकारकडून काश्मीरवर सातत्याने आर्थिक अन्याय होत आला आहे. तेथील विकास रखडलेला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे काश्मिरी तरुणांमध्ये वैफल्याची, नैराश्याची भावना वाढत आहे. परिणामी तेथील तरुणांमध्ये भारत देशाबद्दल ‘परकेपणाची’ भावना वाढत असून भारत देश ‘आपला’ आहे असे त्यांना वाटत नाही. आपल्या देशातील राजकीय/सामाजिक, क्षेत्रामध्ये अत्यंत वजनदार, प्रभावशाली आणि सन्माननीय व्यक्तीनी काश्मीरचा आठवडाभर दौरा करून हाच निष्कर्ष काढला आहे. या मान्यवरांच्या मते काश्मीरमधील वाढत्या बेरोजगारीमुळे तेथील तरुण (एक प्रकारे भारत सरकारच्या नाकर्तेपणामुळे) भारताला ‘परका देश’ मानू लागला असून दहशतवादाकडे ढकलला जात आहे. असे घडणे नको असेल तर काश्मीरचा विकास आणि बेरोजगारी हे प्रश्न सुटले पाहिजेत. म्हणजेच काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी ‘विकास व रोजगार’ हाच प्रमुख मार्ग आहे (संदर्भ… इ.कॉ. टाइम्स 2 जुलै 18). या मतप्रवाहाचे सविस्तर परीक्षण करू! भारताने काश्मीरवर आर्थिक अन्याय खरोखरच केला आहे काय याचाही विचार करू.
काश्मीर सरकारची आर्थिक परिस्थिती
जम्मू काश्मीरची लोकसंख्या 2011 च्या खानेसुमारीप्रमाणे एकूण एक कोटी, पंचवीस लाख होती. 2018 साली (म्हणजे सात वर्षानंतर) ती वाढून दोन कोटी आहे, असे समजू! या लोकसंख्येच्या ‘आर्थिक विकास आणि विकासेतर’ कामासाठी, 2018-19 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य सरकार महसुली आणि भांडवली खर्च मिळून एकूण 80,313 कोटी रुपये खर्च करणार आहे. तेवढी राज्य सरकारची ऐपत आहे. हा खर्च दरडोई साधारण 64,250 रु. होईल. 2018-19 मध्ये इतर काही राज्यांचा दरडोई खर्च असा भारत 20,350 रुपये, महाराष्ट्र 28,250 रुपये, तर बिचारे बिहार अवघे 14,750 रु.! काश्मीरची स्थिती उत्तम नाही काय? तशातच काश्मीर सरकारची ही उत्तम परिस्थिती त्याच्या स्वतःच्या प्रयत्नाने आली नसून भारत सरकारने उदार हस्ते दिलेल्या अनुदानामुळे आली आहे. 2018-19 सालच्या एकूण महसुलापैकी 75 टक्के भारत सरकार देणार आहे. इतर कोणत्याही राज्याबाबत भारत सरकार इतके उदार नाही. तेव्हा भारत सरकारने अन्याय तर केला नाहीच उलट ‘झुकते माप’ दिले आहे. हे लक्षात घ्यावे. (संदर्भ.. गुगल सर्च, राज्यांचे अर्थसंकल्प).
दारिद्रय़ाचे प्रमाण
‘दारिद्रय़ निवारण करणे’ हे आपल्या देशामध्ये तरी विकासाचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 2018 साल उजाडले तरी दारिद्रय़ अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. साधारण 2013 मध्ये अखिल भारतीय दारिद्रय़ सुमारे 22 टक्के होते. तेव्हा बिहार  34 टक्के, ओडिसा 33 टक्के तर मणिपूर 37 टक्के इतके दारिद्रय़ होते. तेव्हाही काश्मीर मात्र नशीबवान होते. अवघे 10 टक्के दारिद्रय़! भारतातील राज्यांमध्ये याही पेक्षा कमी दारिद्रय़, गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, पंजाब आणि आंध्र प्रदेश येथेच होते. काश्मीरमध्ये गेली कित्येक वर्षे अशांतता असूनसुद्धा दारिद्रय़ कमी झाले आहे, हे विशेष होय. भारत सरकारने काश्मीरला केलेल्या भरघोस आर्थिक मदतीमुळेच हे शक्मय झाले आहे ही गोष्ट नाकारणे शक्मय नाही. याला अन्याय म्हणायचे काय? मुळीच नाही. (संदर्भ… जम्मू काश्मीर आर्थिक सर्व्हे. 17-18).
दरडोई उत्पन्न
याबाबतीत सुद्धा काश्मीर राज्य भाग्यवान आहे. 2015 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न दरवषी 72,958 रु. होते. याहीपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेली महाराष्ट्र, कर्नाटक, केरळसारखी राज्ये होती. परंतु उत्तर प्रदेश (48,520), बिहार (34,168), मध्य प्रदेश (72,599) यांच्याशी तुलना करता काश्मीरची परिस्थिती अधिक समाधानकारक नाही काय? राज्यातील साठ टक्क्यापेक्षा जास्त जनता पोटासाठी शेतीवर अवलंबून आहे. अशावेळी दरडोई उत्पन्न कमी असते आणि दारिद्रय़ जास्त असते. परंतु काश्मीरमध्ये तसे नाही. तेथे उत्पन्नही जास्त आहे आणि दारिद्रय़ कमी आहे. भारत सरकारच्या सढळ मदतीशिवाय हे घडून आले नसते हे निश्चित! (संदर्भ : गुगल सर्च)
मानवी विकास निर्देशांक
आर्थिक विकासाचे यशापयश मोजण्यासाठी गेली कित्येक वर्षे जगभर ‘मानवी विकास निर्देशांक’ वापरला जातो. यामध्ये दरडोई उत्पन्नासारख्या आर्थिक घटकाबरोबरच शिक्षण, आरोग्य इ. आर्थिकेतर घटकांचा सुद्धा विचार करून एकूण शंभरपैकी गुण दिले जातात. येथे सुद्धा काश्मीरची कामगिरी उत्तम आहे. 2015 मध्ये राज्याला 65 टक्के गुण मिळून देशामध्ये तेवीस पैकी दहावा क्रमांक आहे.  (केरळ 79 टक्के, प्रथम क्रमांक, महाराष्ट्र 66 टक्के, सातवा क्रमांक, गुजरात 62 टक्के अकरावा क्रमांक, कर्नाटक 61 टक्के बारावा क्रमांक तर गरीब बिहार 52 टक्के 21 वा क्रमांक) (संदर्भ… वीकिपीडीया).
शेवटी बेरोजगारी
काश्मीरमधील तरुणांमध्ये बेरोजगारी आहे की नाही? तर आहे. निश्चितच आहे. परंतु तरुणांमधील बेरोजगारी देशामध्ये सर्वत्र आहे. कोणतेही राज्य अपवाद नाही. बेरोजगारी हा एकटय़ा काश्मीरचा प्रश्न आहे असे मुळीच नाही. तथापि, बिहार, मणिपूर, उत्तर प्रदेश, केरळ इ. राज्यातील तरुण बंदूक घेऊन दहशतवादी होत नाही. तर तो प्रामाणिकपणे नोकरीच्या शोधात मुंबई, बेंगलोर येथे जातो. कष्ट करतो. केरळीय बांधवांचे स्थलांतर तर प्रसिद्धच आहे. काश्मीरचा तरुण मात्र नोकरी नाही म्हणून दहशतवादी होतो हा तर्क पटण्यासारखा नाही.
आर्थिक विकासाचा कोणताही निकष लावला तरी भारतात राहिल्यामुळे काश्मीरची परिस्थिती समाधानकारक आहे. भारताकडून अन्याय झालेला नाही हाच मुद्दा पुनः पुन्हा सिद्ध होतो तेव्हा काश्मीरमधील असंतोष किंवा ‘परकेपणा’ याचे स्पष्टीकरण आर्थिक कारणामध्ये शोधू नये असे मला वाटते.
अर्थशास्त्र हे प्रवाही ‘डायनॅमिक’ शास्त्र आहे. तसेच ते ‘समाजशास्त्र’ असल्यामुळे त्याचे सिद्धांत अपरिवर्तनीय, त्रिकालाबाधित नसतात. बाहय़ सामाजिक/आर्थिक परिस्थिती जर बदलली तर अर्थशास्त्रज्ञाने आपले सिद्धांत, आपली मते बदलणे इष्ट आहे असे विख्यात अर्थतज्ञ केन्स यांनी सूचित केले आहे. परंतु बहुतेक विचारवंतांनी एक विशिष्ट मतप्रणाली स्वीकारलेली असते. आपली मते सोडण्यास/बदलण्यास ते सहसा तयार नसतात. त्यामुळे त्यांचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा मेळ बसत नाही. काश्मीर प्रश्नाच्या विश्लेषणासंबंधी तसेच झाले असावे असे म्हणणे चूक होणार नाही.