Total Pageviews

Tuesday 27 August 2019

फ्रान्समधील बिअरित्झ येथे २४-२६ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या ४५व्या 'जी ७' शिखर परिषदे TARUN BHARAT-ANAY JOGLEKAR

काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची मोदींची भूमिका आहेदोन्ही देश परस्परांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढतीलअसे ट्रम्प यांना मान्य करावे लागल्याने पाकिस्तानने फुगवलेल्या मध्यस्थीच्या फुग्यातील हवा निघून गेलीत्यानंतर झालेल्या द्विपक्षीय भेटीत ट्रम्प आणि मोदींनी मुख्यतः व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली.

फ्रान्समधील बिअरित्झ येथे २४-२६ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या ४५व्या 'जी ७' शिखर परिषदेकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. जागतिक मंदीचे सावट, अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध, पर्शियन आखातातील तणाव, जगाची फुफ्फसं समजल्या जाणाऱ्या ब्राझीलमधल्या अॅमेझॉन खोऱ्यातील जंगलांमध्ये लागलेल्या आगी या पार्श्वभूमीवर पार पडत असलेल्या या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य जागतिक नेत्यांमधील विसंवादामुळे संयुक्त निवेदन येण्याची शक्यता कमी होतीत्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे परिषदेदरम्यान या मतभेदांचे रूपांतर वादविवादात झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'विशेष निमंत्रित' म्हणून या परिषदेला उपस्थित राहिल्याने भारताच्या दृष्टीने तिचे महत्त्व होतेया परिषदेच्या निमित्ताने मोदींनी फ्रान्ससंयुक्त अरब अमिराती आणि बहारीन या देशांना भेटी देऊन आणि परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान बोरिस जॉन्सन, सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅलसंयुक्त राष्ट्र महासभेचे सचिव अँतोनियो गुतेरस यांच्याशी भेटून मैत्रीचे धागे अधिक घट्ट केले.
 
'जी ७' परिषदेच्या दोन दिवस आधी जगातील प्रमुख राष्ट्रीय बँकांच्या प्रमुखांची बैठक पार पडून त्यात जागतिक आर्थिक संकटावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झालीत्यामुळे शेअर बाजार वधारणारअशी चिन्हं असतानाच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेकडून चीनला निर्यात होणाऱ्या सुमारे ७५ अब्ज डॉलर मूल्याच्या मालावर आयात करात ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केलीअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर केलेल्या करवाढीप्रमाणेच ही करवाढ दोन टप्प्यांत होणार आहेट्रम्प यांनी ३०० अब्ज डॉलरच्या चिनी आयातीवर करवाढ केल्यानंतर ती पुढे ढकलली खरीपण चीनपेक्षा अमेरिकन ग्राहक नाताळपूर्वी नाराज होऊ नये, असा विचार होता. शी जिनपिंग यांच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा पारा चढला.त्यांनी ट्विटरवरच अमेरिकन कंपन्यांना चीन सोडून बाहेर पडण्याची आणि अमेरिका किंवा अन्य मित्र देशांमध्ये आपले प्रकल्प हलवण्याची आज्ञा केलीएका उदारमतवादी आणि मुक्त बाजारपेठवादी लोकशाही देशाचा अध्यक्ष आपल्या कंपन्यांना असे आदेश देऊ शकतो का, असा प्रश्न तुम्हाला, आम्हाला पडू शकतो. पण ट्रम्पना तो पडला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी चीनकडून होणाऱ्या आयातीवरील करात आणखी वाढ करत असल्याचे घोषित केले.
 
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाने एका अरुंद पुलावर समोरासमोर आलेल्या दोन उन्मत्त बैलांसारखी परिस्थिती निर्माण केली आहेकोणताही बैल दोन पावले मागे हटण्यास तयार नाहीत्यांच्या साठमारीत त्यांच्यासोबत सगळा पूलच पाण्यात कोसळण्याची भीती आहेचीनला शिंगावर घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्रदेशांनाही सोडले नाहीयमित्रदेशांनी अमेरिकेतील उत्पादनं आयात करावीत, आयात-निर्यातीतील दरी कमी करावी, ब्रिटनने युरोपीय महासंघाशी काडीमोड घ्यावाफ्रान्सने अमेरिकेच्या इंटरनेट आणि समाजमाध्यम कंपन्यांवर कर लावू नये,युरोपातील देशांनी आपल्या तसेच आपल्या आर्थिक आणि व्यापारी हितसंबंधांच्या संरक्षणाचा खर्च स्वतः उचलावा, अशा अनेक मागण्या ते आपल्या मित्रदेशांकडे करतात. काश्मीर आणि भारत-पाक प्रश्नातही त्यांना मध्यस्थी करायची असते. त्यामुळे चीनच्या अनुपस्थितीत पार पडणाऱ्या या परिषदेतही ट्रम्प काय बोलतील किंवा करतील, याचे सावट होते. या परिषदेसाठी फ्रान्सला पोहोचल्यावरही ट्रम्पनी काही कोलांटउड्या मारल्याचीनसोबत वाद पुढील पातळीवर नेण्याबाबत ते पुनर्विचार करत असल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपण चीनबाबत अधिक कडक भूमिका न घेतल्याची खंत आहे, अशी भूमिका घेतली. परिषदेच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा कोलांटउडी मारलीपरिषदेला निघण्यापूर्वी यांनी शी जिनपिंग यांना अमेरिकेचा मोठा शत्रू म्हटले होतेपरिषदेच्या समारोपाच्या वेळेस त्यांनी जिनपिंग यांना मोठे नेते म्हटले आणि चीनशी चर्चेतून तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केलीट्रम्पच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रक्षोभक वक्तव्ये ही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मानसिक युद्धात नामोहरम करायला रचलेला डाव असतोखासकरून चीनसारख्या एकसुरी आणि एकतंत्री देशाच्या नेतृत्त्वाला गोंधळात टाकण्यासाठी ते अशा क्लृप्त्या वापरतात. पण, त्याचा फटका प्रतिस्पर्ध्यांसोबतच मित्रराष्ट्रांनाही बसतो.
 
ही परिषद चालू असताना इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ फ्रान्समध्ये अवतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याअमेरिकेने इराणविरुद्ध कडक निर्बंध लादून इराणचा तेलाचा व्यापार जवळपास थांबवल्यापासून पर्शियन आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहेइराणच्या प्रश्नावरही अमेरिकेला जर्मनीसुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य आणि युरोपीय महासंघाचे मन बदलवण्यात यश आले नसले तरी ट्रम्प यांचे मन बदलावे, यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने जावेद झरीफ यांच्यावरही निर्बंध लादले असल्याने इराणने थेट अमेरिकेशी चर्चा करण्याची शक्यता फेटाळून लावली आणि आपण फक्त फ्रान्सशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केलेट्रम्प मात्र इराणचे अध्यक्ष महमूद रुहानी यांच्याशी भेटून थेट चर्चा करण्याबाबत आशावादी आहेतत्यासाठी आमिष म्हणून इराणला आर्थिक मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहेबराक ओबामांच्या पुढाकाराने इराणसोबत झालेल्या अणुइंधन समृद्धीकरण थांबवण्याबाबत झालेल्या करारातून बाहेर पडल्यावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे हतबल झालेला इराण वाटाघाटी करून अधिक कडक करार करण्यास संमती देईलअशी ट्रम्प प्रशासनाला खात्री होती. पण, आजच्या तारखेला तरी इराण त्यासाठी तयार नाहीअमेरिकेशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान आणि युरोपीय नेत्यांमध्ये 'ब्रेक्झिट'वरून असलेल्या वादाचेही सावट परिषदेवर पडले होते. 'जी ७'परिषदेच्या निमित्ताने आपण पंतप्रधान मोदींशी भेटून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रयत्न करू, असे डोनाल्ड ट्रम्पनी जाहीर केले होते. काश्मीरसह सर्व प्रश्न द्विपक्षीय वाटाघाटींतून सोडवण्याची भारताची ठाम भूमिका असली तरी ट्रम्प यांना उघड विरोध करणे धोक्याचे होते.
 
नरेंद्र मोदींनी मुत्सद्देगिरीचा वापर करून ट्रम्प यांच्यासोबत औपचारिक चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी पत्रकारांसमोर हस्तांदोलन आणि प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मी पंतप्रधान इमरान खान यांचे निवडणुकीतील विजयानंतर अभिनंदन करताना त्यांना सांगितले होते की, आपल्याला दारिद्य्र, निरक्षरता आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची आबाळ इ. शत्रूंसोबत लढायचे आहेसर्व प्रश्नांची सोडवणूक आम्ही द्विपक्षीय चर्चेतून करू शकत असून त्यासाठी अन्य देशांना तसदी द्यायची आमची इच्छा नाही." यामुळे ट्रम्प यांनादेखील आपली तलवार म्यान करावी लागली. काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची मोदींची भूमिका आहे. दोन्ही देश परस्परांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढतील, असे ट्रम्प यांना मान्य करावे लागल्याने पाकिस्तानने फुगवलेल्या मध्यस्थीच्या फुग्यातील हवा निघून गेलीत्यानंतर झालेल्या द्विपक्षीय भेटीत ट्रम्प आणि मोदींनी मुख्यतः व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केलीअमेरिकेच्या भारतासोबत असलेल्या व्यापारी तुटीची भरपाई अमेरिकेकडून तेलाची आयात वाढवून भरपाई करता येऊ शकेल कायाचा भारत गांभीर्याने विचार करत आहेअमेरिका आणि मित्र देशांमध्ये एकवाक्यतेचा अभाव आणि विविध वादांमुळे परिषदेचे मुसळ केरात गेले असले तरी ते भारताच्या पथ्यावर पडले.

Sunday 25 August 2019

नारायण मूर्ती यांच्या नजरेतील अर्थव्यवस्था दिनांक :26-Aug-2019- TARUN BHARAT

 

जगात कुठेही जा, मग ते राष्ट्र विकसित असो की विकसनशील, त्याची सगळी भिस्त ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर असते. गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो आहे, हे खरे. भारतही त्यातून सुटलेला नाही. पण, यामुळे भारतात मंदी आली, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. आज जगातील अनेक देश, प्रामुख्याने जपान वगळता सर्वच देशात सध्या मंदीचे काहीसे वातावरण निर्माण झाले आहे. याला स्थानिक स्थिती कमी आणि जागतिक स्थिती प्रामुख्याने जबाबदार आहे. यातील सर्वात मोठा घटक म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला अमेरिका-चीन व्यापार संघर्ष आणि अमेरिका-इराण आण्विक संघर्ष. इराण हा तेल उत्पादक देश आहे आणि अनेक देशांना तो तेल निर्यात करतो. पण, अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे मोठाच तिढा निर्माण झाला आहे. इराणकडून कोणत्याही देशाने तेल घेऊ नये, असे निर्बंध घातले. त्याचा मोठा परिणाम भारतावर झाला. कारण, भारताने इराणमधील चाबहार बंदर विकसित केले आहे. या देशाकडून भारत 11 टक्के तेल आयात करीत असे. शिवाय देणी ही भारताच्या चलनात देण्याची सोयही होती. पण, अमेरिकेने निर्बंध घातल्यामुळे भारताने यंदाच्या मे महिन्यापासून इराणकडून तेल खरेदी बंद केली आहे. मे 2010 पर्यंत आपण जे 11 टक्के तेल इराणकडून खरेदी करीत होतो, त्याचा दर 35,395 रुपये टन होता. तर अमेरिकेचा दर 39,843 रु. होता. म्हणजे दर टनामागे सुमारे साडेतीन हजार जादा मोजावे लागले. ही रक्कम कमी नाही. याचा सरळ अर्थ आपल्या दादागिरीच्या भरवशावर अन्य देशांकडून मलिदा वसूल करून त्यांच्यावर आर्थिक बोजा टाकण्याचा हा अमेरिकेचा डाव आहे.
 
 
दुसरी समस्या म्हणजे, अमेरिकेने चिनी वस्तूंवर आधीच भरमसाठ आयात कर लावला आहे. त्यात आणखी वाढ करण्याची धमकी दिली आहे. तर तिकडे चीननेही आता अमेरिकेतून आयात होणार्‍या कच्च्या तेलावरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा हा अमेरिकेचा डाव आहे. चीन अमेरिकेकडून तेल आयात करतो. आता या दोन देशात वस्तूंवरून निर्माण झालेले युद्ध तेलापर्यंत पोचले आहे. अमेरिकेला आशियाई तेल बाजार काबीज करायचा आहे, हे स्पष्टच दिसत आहे. भारत हा आशियातील चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि त्याची मागणी मोठी आहे. सध्या तेलाचे दर स्थिर असून स्वयंपाकाच्या गॅसचे दर मात्र घसरत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याचा लाभ मिळत आहे.
 
आता भारताचा विचार करू. काही लोकांना आकडे लावण्याची मोठी वाईट सवय आहे. त्यात पी. चिदंबरम्‌ हे आघाडीवर आहेत. सध्या ते सीबीआय कोठडीची ‘थंड’ हवा खात आहेत. देशात एवढी मंदी आली आहे की, देशाची अर्थव्यवस्था आता रसातळालाच जाणार, असे त्यांना भविष्योतेर भूत झोंबले आहे. तर, इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती म्हणतात, गेल्या 300 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था एवढी मजबूत दिसली नाही. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारे अर्थधोरण शिगेला पोचले आहे. विदेशी गंगाजळी 400 बिलीयन डॉलर्सवर गेली आहे. यंदा आमची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्क्यांनी वाढत आहे. भारत हा जगातील सॉफ्टवेअर विकास केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चिदंबरमसारख्यांच्या थोबाडात मूर्ती यांनी हाणलेली ही जबरदस्त चकराक आहे. देशाच्या आर्थिक स्थितीबाबत स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार म्हणतात, देशात मंदीची कोणतीही स्थिती नसून, केवळ काही क्षेत्रातील मागणी तेवढी घटली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घेतलेल्या 32 निर्णयामुळे चांगले परिणाम येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कुमार यांचा रोख हा ऑटोमोबाईल क्षेत्राकडे आहे. हे खरेच आहे की, देशात कार खरेदी धीम्या गतीने सुरू आहे. पण, याला मोदी सरकार जबाबदार नसून कार उद्योगच जबाबदार आहे. गतवर्षी कार खरेदी 13 टक्के वाढली होती. तेव्हा सर्वकाही आलबेल होते. आता 18 टक्क्यांनी कमी झाली म्हणून ओरड कशासाठी? तरीही अर्थमंत्र्यांनी 15 टक्के घसारा आणखी वाढवून दिला आहे. कर्जाचा दर कमी केला आहे. आता हा घसारा 30 टक्के असेल. प्रत्येकवेळी सरकारकडे धावत सुटायचे, नफा झाला की, आनंद साजरा करायचा आणि तोटा झाला की, सरकारच्या धोरणावर टीका करायची, हे समर्थनीय कसे?
 
भारतात एकूण वाहनांची संख्या 30 कोटींच्या वर आहे. त्यात यंदा 3 कोटी नव्या वाहनांचे उत्पादन झाले आहे. हा आकडा भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सोसायटीचा अधिकृत आकडा आहे. भारतात देशी-विदेशी कार, दुचाकी, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक वाहने तयार होतात. या क्षेत्रात मंदी यायला हेच वाहन उद्योग जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच निर्णय दिला होता की, एप्रिल 2020 पासून भारत स्टेज-4 इंजिन असलेल्या वाहनांचे पंजीयनच होणार नाही. कारण, या वाहनांमुळे प्रदूषण अधिक होते. त्याऐवजी फक्त भारत स्टेज-6 दर्जाच्या वाहनांचेच पंजीयन होईल. दोन वर्षांपासून या उद्योगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची दखल घेतली नाही. सध्या ज्या कार विक्रिविना पडून आहेत, त्या सर्व भारत स्टेज-4 इंजिनांच्या आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे कार खरेदी करणारे स्टेज-6 कडे वळत आहेत. अनेक कंपन्यांनी या इंजिनाची वाहने बाजारात आणली आहेत. मारुतीसह काही उद्योगांनी बीएस-4 कारचे प्रकल्प आधीच बंद केले आहेत. मग बाकी उद्योगांना काय झाले होते? 1 एप्रिल 2020 नंतर बीएस-4 इंजिनांच्या कार त्यांना भंगारात विकाव्या लागतील. हे आहे ऑटोमोबाईल उद्योगांचे खरे कारण. मोदी सरकारवर खापर फोडून बोेंबा मारण्यात अर्थ नाही. आधी आपले घर सांभाळले पाहिजे. तरी, अर्थमंत्र्यांनी घसारा 30 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे कार आता स्वस्त झाल्या आहेत. बीएस-4 वाहनांवर 60 ते 95 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. एप्रिल 2020 पर्यंत त्यांचे पंजीयन होणार आहे.
 
केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री यांनी जाहीर केले की, पेट्रोल आणि डिझेल धावणार्‍या वाहनांवर लगेच बंदीचा कोणताही विचार नाही. आधी पेट्रोल िंकवा डिझेलवर चालणार्‍या सर्व तिचाकी 2023 पर्यंत आणि 150 सीसीपेक्षा कमी क्षमतेची लहान वाहने 2015 पर्यंत बंद करण्याची योजना होती. पण, गडकरी यांनी खुलासा केल्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगाला दिलासा मिळाला. आणखी काय दिले पाहिजे मोदी सरकारने. सरकारने प्रदूषणापासून मुक्तता मिळण्यासाठी इलेक्ट्रिक कारवर दोन ते अडीच लाखांची सूट दिली आहे. इथेनॉलवरही चालणार्‍या कार, बसेस बाजारात आल्या आहेत. बसेस सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. ब्रिटनमध्ये तर कितीतरी आधी बायोफ्युएलवर अख्खी रेल्वेगाडीच चालविण्यात आली. तूर्त, अर्थमंत्र्यांनी बँका, ऑटोमोबाईल उद्योग, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक यासाठी बर्‍याच सवलती जाहीर केल्या आहेत. जीएसटीमध्ये आणखी सूट देण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी देणी महिनाभरात चुकती केली जाणार आहेत. स्टार्टअप योजनेसाठीही सूट जाहीर झाली आहे. यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा ताळ्यावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींना जगात भारताची पाचवी अर्थव्यवस्था बनवायचे आहे. याकामी सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे

P.V. Sindhu on Sunday became the first Indian to win a Badminton World Championships gold

P.V. Sindhu on Sunday became the first Indian to win a Badminton World Championships gold by beating familiar rival Nozomi Okuhara of Japan in a lop-sided final here on Sunday.
The Indian won 21-7 21-7 in the summit clash that lasted just 38 minutes.
Two years after being robbed off the gold by Okuhara in an epic 110-minute final at Glasgow that went down as one of the greatest battles in badminton history, Sindhu finally exorcised the ghost of that heart-wrenching loss with a completely dominating win over the same opponent.

सोशल मीडीयाची मयसभा Source:तरुण भारत25 Aug 2019-॥ मानसरंग : मयुरेश डंके |



विविध गोष्टी शेअर करण्यात मला फार रस आहे असं जर एखाद्या महिलेनं चारचौघांत जाहीरच केलं तर त्याचा सात्विकच अर्थ लावला जाईल असं मानणं मुळातच गाढवपणाचं ठरतं. अनेक पोक्त वयाच्या महिलासुद्धा अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करण्यामध्ये व्यस्त असतात. स्वत:चं बोल्ड प्रोफाईल पोस्ट करतात. अनेक माणसं ते प्रोफाईल फोटो चवीनं पाहतात. आता तर एकाहून एक सरस अशी फोटो एडिटींग अ‍ॅप्स आली आहेत. आपले फोटो डाऊनलोड केले जाऊ शकतात, ते ह्या अ‍ॅप्समधून अश्‍लीलरित्या एडिट केले जाऊ शकतात आणि ते विविध पॉर्न साईट्सवर विकले जाऊ शकतात, किंवा आपल्यालाच त्यातून ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. हा धोका केवढा मोठा आहे…! आपलं संपूर्ण आयुष्यच आपण या पोकळ प्रसिद्धीच्या नादात पणाला लावलंय हे आपल्याला कधी कळणार?

१९४३ साली अब्राहम मॅस्लो ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं हायरारकी ऑफ नीड्सहे त्याचं संशोधन प्रसिद्ध केलं. माणसाच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर त्याच्या प्रेरणा आणि जगण्याची उद्दिष्टं कशी बदलत जातात, हे मॅस्लोनं मांडलं. त्यात त्यानं पाच पायर्‍या मांडल्या आहेत.
अ- पहिली पायरी ही अन्न-वस्त्र-निवारा ह्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं
ब- दुसरी पायरी व्यक्तिगत सुरक्षितता, नोकरीची सुरक्षितता, कुटुंबियांची सुरक्षितता, उत्पन्नाचे स्त्रोत आणि स्थावर-जंगम मालमत्तेचं संरक्षण आणि भविष्यकालीन सुरक्षा यांची पूर्तता करणं
क- तिसरी पायरी मित्र-मैत्रिणी, विविध नातेसंबंध, लैंगिक गरजांची पूर्तता करणं
ड- चौथी पायरी समाजात प्रतिष्ठा मिळवणं
आणि
इ- पाचवी पायरी स्वत्वाचा शोध घेण्याची प्रेरणा पूर्ण करणं
सर्वसाधारणपणे व्यक्तींचा प्रवास याच दिशेनं होतो, असं मत मॅस्लोनं मांडलं. पण त्याला अपवादही असू शकतात, असंही त्यानं म्हटलेलं आहे. १९४३ मध्ये त्यानं मांडलेला हा सिद्धांत आजही बहुतांश प्रमाणात लागू होतो. पण त्यानं मांडलेल्या पायर्‍यांचा क्रम मात्र पूर्ण विस्कळीत झाल्याचं स्पष्ट दिसतं.
आधुनिक जगात माणसांचं आत्मकेंद्रीपण वाढत जाणं, त्यांचं विविध यंत्रांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढणं आणि माहिती तंत्रज्ञानाचा माणसाच्या आयुष्यात आलेला महापूर ही काही प्रमुख कारणं सांगता येतील. टोकाच्या व्यक्तीकेंद्रीत सुखसुविधांमुळं माणसांच्या आयुष्यातल्या प्रेरणा तर बदलतातच शिवाय नवनव्या समस्यांचाही जन्म होतो हे मॅस्लोच्या सिद्धांतात नाहीय, पण मॅस्लोच्या जन्माच्याही कितीतरी आधी ज्ञानोबारायांनी,तुकोबारायांनी, समर्थांनी हे धोके सांगून ठेवलेले आहेत.
मॅस्लो ने म्हटल्यानुसार, अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता ह्या चार गोष्टींची पूर्तता झाली की माणूस सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करायला लागतोच.
आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच की, माणसं सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यापोटी काहीही करू शकतात. चौकाचौकांत फ्लेक्सच्या जागा वर्षभर गुंतून पडलेल्या असतात. अनेकदा त्या फ्लेक्सवर अगदी लहान-लहान मुलांचेही फोटो छापलेले असतात. एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक वर्तमानपत्रांची पानं शुभेच्छांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. शुभेच्छा घेणार्‍यापेक्षा शुभेच्छा देणार्‍यांचेच फोटो भलेमोठे असतात. आपल्या देशात साध्या बसस्टॉपलासुद्धा लोक स्वत:चं नाव देतात.
पूर्वी वर्तमानपत्रात नाव किंवा फोटो येणं हे फार प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. पेपरात नाव आलंयया गोष्टीनं माणसाच्या अंगावर मूठभर मांस चढायचं. आणि आपलं नाव छापून यावं म्हणून माणसं धडपडायची.
माध्यमांची रूपं बदलत गेली, तशी प्रसिद्धीची पद्धतही बदलत गेली. स्थानिक वृत्तवाहिन्यांवर जाहिरातींची पट्टी सुरूच असते. कुठल्याशा एका मराठी वाहिनीवर रोज सकाळी लहान मुलांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचा कार्यक्रम चालतो. एका बाळाचा फोटो दाखवतात अन् त्याच्या ढीगभर नातेवाईकांची नावं सांगतात. विविध रिलिटी शोज्मध्ये, आप की अदालत सारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक कुठून येत असतील?
अनेक वाहिन्यांचे बातमीदार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसांमध्ये माईक आणि कॅमेरा घेऊन जातात तेव्हा आपण टीव्हीत दिसणारह्या एकाच सुप्त इच्छेपायी माणसं कॅमेरासमोर एक सेकंदभर तरी दिसण्याची धडपड करताना दिसतात.
होम मिनिस्टरमध्ये महाराष्ट्राचे भावोजी घरी गेल्यावर ओळख करून द्याअसं सांगतात तेव्हा ती माणसं आपण अवश्य बघावीत. घरचं लग्न असल्यासारखी लोकं नटलेली असतात. वहिनी ओळख करून देताना सासरची माणसं, माहेरची माणसं, मैत्रिणी आणि सोसायटीतली माणसं अशी सगळी जंत्री सांगतात आणि कॅमेरा सगळ्यांवर फिरतो. लोकांचे चेहरे काय फुललेले दिसतात.. व्वाऽ! आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनातलं प्रसिद्धीचं मानसशास्त्र कसं असतं हे तुम्हांला दिसेल.
लग्नपत्रिका हे सुद्धा एक प्रसिद्धीचं माध्यमच झालेलं आहे. कारण त्यात आता आपले विनित बरोबरच शुभेच्छुक, कार्यवाहक आणि प्रमुख उपस्थिती असेही मथळे असतात. अनेक ठिकाणी मंगलप्रसंगी आहेर केल्यावर तो नावानिशी माईकवरून जाहीर सांगण्याची पद्धत अजूनही आहे.
दिवंगत व्यक्तींच्या विषयीची प्रसिद्धी हा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. व्यक्ती निवर्तल्यावर वर्तमानपत्रात फोटो देतात आणि खाली शोकाकुल म्हणून नावं घालतात. चौकात फ्लेक्स लावतात. अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पुण्यस्मरणाच्या सुद्धा बातम्या दिसतात. त्यातही खाली नावं घातलेली असतात.
आता हे प्रसिद्धीचं भाग्य काही प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. पण काळ बदलला अन् आपल्या आयुष्यात इंटरनेटनं प्रवेश केला. मग सोशल मीडीया अन् त्याची असंख्य अ‍ॅप्स आली. ही अ‍ॅप्स उगाच आली नाहीत आणि ती फुकटही नाहीत.
आपण चारचौघांत उठून दिसावं, सतत चर्चेत रहावं, लोकांनी आपल्याला पहावं, आपल्याविषयी चर्चा रंगवाव्यात, ही सुप्त इच्छा माणसांमध्ये असतेच ह्या एकाच छोट्याशा मानसशास्त्रीय संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवूनच ही सोशल मीडीया अ‍ॅप्सची मयसभा बांधण्यात आली.
प्रत्येकालाच हक्काची स्वतंत्र जागा अकाऊंटच्या रूपानं मिळाली. आपण कुठं जातो, काय करतो, काय खातो, काय पितो, कुणाबरोबर आहोत, आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, कुठला सिनेमा पाहतो, कुठलं गाणं ऐकतो, आत्ता आपल्या मनात कोणत्या भावना आहेत हे सगळं सगळं जाहीर करण्यासाठी एक माध्यमच मिळालं. लोक इथं काहीही लिहू शकतात, बोलू शकतात, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकतात, वाट्टेल त्या शब्दांत टीका करू शकतात, अगदी ऐकवणार नाहीत किंवा वाचूही नयेत अशा घाणेरड्या शिव्याही पोस्ट करू शकतात.
आमच्या बागेत कळी उमलून फूल आलं, आज दूध नासलं म्हणून त्याचा चक्का कसा लावला आहे, शेजारच्यांच्या कुत्र्यानं आमच्या दारात कशी घाण करून ठेवली आहे, इथपासून ते हा पहा माझा मेकओव्हर’, ‘हा पहा माझा नवा हेअरकट’, ‘हे पहा माझं नवं स्टाईल स्टेटमेंट’, ‘हा पहा माझा नवा चष्मा’, ‘हा पहा माझ्या डोक्यावर उगवलेला पहिला पांढरा केसअसं काहीही आपण जगाला दाखवू शकतो. मी पाच वर्षांपूर्वी कसा दिसत होतो’, ‘मी दहा वर्षांपूर्वी कशी दिसत होतेअसलेही फोटो लोक पोस्ट करतात.
मला कोणती अभिनेत्री आवडते, कोणता अभिनेता आवडतो ते जाहीर सांगणं एकवेळ समजू शकतो. पण इथं तर रिलेशनशिप स्टेटस सुद्धा लिहीता येतं.
तुम्ही लोकांना शोधू शकता आणि त्यांचं प्रोफाईल तुम्हांला आवडलं तर मैत्रीही करू शकता. तुम्ही जशी लोकांची प्रोफाईल्स पाहता, तसे लोकही तुमचं प्रोफाईल पाहतच असतात. कुणाला कशात इंटरेस्ट असेल अन् कोण आपले फोटो, आपली माहिती पाहून तिचा काय अर्थ लावत असेल यावर आपला कसलाही ताबा असू शकत नाही. लोकांची विचारसरणी आपण कशी ठरवणार? आणि माझे फोटो पाहून, माहिती वाचून कुणालाही माझा मोह होऊ नये असं तरी कसं म्हणता येईल?
जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात. काही केवळ प्रसिद्धीचे भुकेले असतात तर काहींचे हेतू निराळेच असतात. आपणच जरासं आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या सोशल मीडीयावरच्या मैत्रयादीतल्या प्रत्येकालाच आपण पूर्ण ओळखतो असं नाही. अनेक अनोळखी व्यक्ती आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी मैत्री का केली याचं नेमकं आणि शंभर टक्के खरं कारण आपल्यापैकी कितीजणांना सांगता येईल?
मला अमक्याचं प्रोफाईल जाम इंटरेस्टिंग वाटलं, काय कमाल दिसते ही बाई या वयातसुद्धा, वाटत नाही हिला दोन दोन मुलं असतील असं, काय जबरदस्त पर्सनॅलिटी आहे ना, गर्लफ्रेंड कसली लकी असेल ना याची, ह्याच्या सोबत एकदा जरी डेटवर जायला मिळालं तरी काय बहार येईल असा विचार मनात येत असणारच…! लोकांना दोष देणार तरी कसा?
यामुळं होतं काय? आपलं खाजगी आयुष्यच संपून जातं. आपण आपल्या सगळ्याच गोष्टी जगापुढं मांडायला लागलो. लोक आपले फोटो लाईक करतात, कमेंट्स करतात याचा आपल्याला फार आनंद होतो. माझ्या माहितीतल्याच अनेक महिला अशा आहेत की ज्या दर दिवसाला दहा-दहा सेल्फी पोस्ट करतात. असे सेल्फी किंवा क्लोजअप फोटोज् पोस्ट करण्यामागचा त्यांचा हेतू तरी काय असेल?
घरातला, माणसांमधला संवाद संपला की माणूस तो संवाद बाहेर शोधतोच. शेवटी कितीही झालं तरी आपण समाजशील प्राणी.. प्रायव्हसी हवी, स्पेस हवी असं कितीही ओरडलो तरी माणसं लागतातच आपल्याला..
कौटुंबिक समुपदेशनाच्या अनेक केसेसमध्ये मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मीडीया, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम यांचा बेसुमार वापर हे एक प्रमुख कारण असल्याचं मला आढळून आलं. आपलं अत्यंत खाजगी आयुष्यसुद्धा जगाला दाखवण्याचा जो छंद माणसांना लागला त्यामुळं फार मोठा धक्का आपल्या नात्यांना बसला, हे आपल्या लक्षातच येत नाही. जे क्षण फक्त आणि फक्त आपल्या जोडीदाराबरोबरच घालवायचे असतात, त्यांचा आनंद घ्यायचा असतो, त्यांचे फोटो काढावेत का? हा माझ्या मनात कायम येणारा एक प्रश्‍न आहे. आणि ते फोटो सोशल मीडीयावर प्रसिद्ध करावेत का? हा दुसरा प्रश्‍न…! दोन्ही प्रश्‍नांची समाधानकारक आणि संतुलित उत्तरं मिळतच नाहीत.
आपण एकमेकांचं कौतुक करणं, आनंदानं पाहून हसणं, एकमेकांसोबत मस्त मनमोकळ्या गप्पा मारणं, निवांत वेळ घालवणं हे सगळं आपल्या आधुनिक आयुष्यातून चंबूगबाळं उचलून कधीच निघून गेलंय. आपला दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो याचा आपल्याकडे काही हिशोबच राहिला नाही. मी फार बिझी असतोहे वाक्य प्रतिष्ठेचं लक्षण झालंय. या सगळ्या धबगड्यात आपली इतरांकडून कौतुकाचे, आपुलकीचे, आस्थेचे दोन शब्द ऐकायला मिळण्याची सुप्त नैसर्गिक प्रेरणा पूर्ण होण्याचा एकच मार्ग उरला- तो म्हणजे सोशल मीडीया…!
दहा-पंधरा वर्षांपूर्वीची आपली आयुष्यं इतकी सार्वजनिक नव्हती. पण त्यामुळेच केवळ इतरांच्या नजरेत यावं याचा अट्टाहास किती असावा याला आपसूकच फार मर्यादा होत्या. पण आता लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या नादात आपण मानसिकदृष्ट्या प्रचंड अस्वस्थ होत चाललो आहोत. कित्येकांना त्यांचे फोटो पोस्ट केले अन् त्याला लाईक्स मिळाले नाहीत की प्रचंड अस्वस्थ वाटतं, त्यांची चिडचिड सुरू होते, कशातच लक्ष लागत नाही. ही फार मोठी समस्या आहे.
लोकांनी आपली वाहवा केलीच पाहिजे, आपल्याला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत, आपले फोटो त्यांना आवडलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण तरीही आपल्या अपेक्षांचं भूत ही गोष्ट समजूनच घेत नाही. आपल्या जवळच्या माणसांना आपल्यासाठी वेळच नसतो हा समज इतका पक्का झालेला असतो की कृत्रिम कौतुक मिळवण्याची लालसा आपल्याला सोशल मीडीयावरून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करायला भाग पाडते. आपण ज्यांना कधी पाहिलंही नाही, ज्यांचा आणि आपला लांबून लांबून संबंध नाही अशा माणसांशी रात्र-रात्र चॅटिंग करायला लागतो. त्यांच्याशी आपल्या भावना शेअर करायला लागतो. खरं सांगायचं झालं तर, आपल्याला अनेकदा केवळ एक भावनिक आधार हवा असतो. पण समोरच्या व्यक्तीनं आपल्यात नेमकं काय काय पाहिलंय आणि त्याचा हेतू काय आहे, हे कसं समजणार?
नव्या नव्या जागी जाण्यात, नव्या नव्या लोकांना भेटण्यात, त्यांच्याशी मैत्री करण्यात, त्यांच्याशी गप्पा मारण्यात, विविध गोष्टी शेअर करण्यात मला फार रस आहे असं जर एखाद्या महिलेनं चारचौघांत जाहीरच केलं तर त्याचा सात्विकच अर्थ लावला जाईल असं मानणं मुळातच गाढवपणाचं ठरतं.
अनेक पोक्त वयाच्या विवाहित महिलासुद्धा अक्षरश: रात्र-रात्र अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करण्यामध्ये व्यस्त असतात. डेटिंगसाठीच्या अ‍ॅप्समध्ये त्या स्वत:ची नावं नोंदवतात. स्वत:चं बोल्ड प्रोफाईल पोस्ट करतात. अनेक माणसं ते प्रोफाईल फोटो चवीनं पाहतात. आता तर एकाहून एक सरस अशी फोटो एडिटींग अ‍ॅप्स आली आहेत. आपले फोटो डाऊनलोड केले जाऊ शकतात, ते ह्या अ‍ॅप्समधून अश्‍लीलरित्या एडिट केले जाऊ शकतात आणि ते विविध पॉर्न साईट्सवर विकले जाऊ शकतात, किंवा आपल्यालाच त्यातून ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. हा धोका केवढा मोठा आहे…! आपलं संपूर्ण आयुष्यच आपण या पोकळ प्रसिद्धीच्या नादात पणाला लावलंय हे आपल्याला कधी कळणार?
विवाहीत स्त्रियांनी आपले चित्रविचित्र फोटो सोशल मीडीयावर का प्रसिद्ध करावेत? आपलं पोशाखाविषयीचं किंवा एकूण आचारस्वातंत्र्य आपण उपभोगतो, ते जगाला दाखवण्याची खरोखर आवश्यकता आहे का? ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत?
महिला किंवा युवतींना असं वाटतं की केवळ आमचेच फोटो पाहिले जातात, पण असं नाही. पुरूषांचेही फोटो मोठ्या चवीनं पाहिले जातात, डाऊनलोड केले जातात. त्यांच्यावरही कमेंट्स पास होतातच. खास महिलांसाठीसुद्धा अशी चॅटिंग किंवा मेसेंजर अ‍ॅप्स आहेतच आणि त्यांच्यावर मेंबरशिपचे पैसे भरून महिला जॉईन होताना दिसतात. ह्या प्रकारच्या अ‍ॅप्सच्या भरपूर जाहिराती यूट्यूबवर दिसतील. चांगली सुसंस्कारित, सुशिक्षित कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेली माणसं अशा अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकलेलीही दिसतील.
अगदी तपशीलात विचार करून पाहिलं तर आपण चुकीच्या पद्धतीनं आणि अत्यंत भोळसटपणानं सोशल मीडीया वापरतो आहोत, हे आपल्याला जाणवेल. आपलं व्यक्तहोणं किंवा अभिव्यक्तहोणं कधीच खाजगी राहत नाही. त्याला सेन्सॉरशिपही नाही आणि कुणी संपादकही नाही. सारासारविवेकाच्या सगळ्या नाड्या सर्वस्वी ज्याच्या-त्याच्या हातात. आणि स्वैराचाराच्या जमान्यात कोण कुणाला विचारतंय? अशी एकूण सामाजिक परिस्थिती.
आपण आपलं संपूर्ण आयुष्यच जगापुढं अशा पद्धतीनं उलगडून ठेवतो की, नेमकं कोण कोण आपल्याकडे कोणत्या हेतूनं पाहतंय ह्याचा आपल्याला शेवटपर्यंत पत्ता लागू शकत नाही. आपल्या खाजगी माहितीचा महाप्रचंड डेटा काही कंपन्या त्यांच्या स्वार्थासाठी वापरतात, हे तर आपल्या गावीही नसतं.
मग अचानकच एखाद्या दिवशी कुणीतरी अनोळखी व्यक्ती (जिची आपल्याशी केवळ चॅटिंग पुरतीच ओळख असते) आपल्याशी काहीतरी निराळंच बोलायला लागते, तेव्हा आपल्याला धोक्याची जाणीव होते. समोरची व्यक्ती आपल्याला सरळ सरळ ऑफर द्यायला लागते, जरा जास्तच स्पष्ट बोलायला लागते, तेव्हा आपल्याला नैतिकतेची जाणीव व्हायला लागते. (अनेकांना तर ह्या पातळीपर्यंत गोष्टी येऊनही ती जाणीव होत नाही.) ती व्यक्ती आपल्या स्माईलीज् पाठवते, ‘सुंदर, ब्युटिफूलवगैरे मेसेजेस पाठवते तोपर्यंत सगळं गोड वाटतं. पण अशा मेसेजेसची देवाणघेवाण काही महिने चालल्यानंतर एकदम तू खूप सेक्सी दिसतेस/दिसतोस’, ‘आपण भेटूया का?’, ‘मला तुला भेटायचं आहेवगैरे मेसेजेस सुरू होतात. तेव्हा त्रास व्हायचं काय कारण? कारण अशा कमेंट्स करण्याची मुभा आपणच त्या व्यक्तीला दिलेली असते.
टाळी दोन हातांनीच वाजते, हा साधा नियम आहे. त्यामुळे, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडून अशी विचित्र अपेक्षा करावी, असं मी नेमकं काय वागलो/वागले, बोललो/बोलले हे शोधलं पाहिजे. आपले हौसेनं पोस्ट केलेले फोटो नेमकं काय काय ध्वनित करतायत, पाहणार्‍यांना नेमका काय मेसेज देतायत हे तपासलं पाहिजे.
आपण आपल्याला मिळालेल्या माध्यमस्वातंत्र्याचा उपयोग अवश्य करावा. पण त्याला निराळीच टोकाची आणि आयुष्य उध्वस्त करणारी वळणं लागू नयेत ही जबाबदारीही सर्वस्वी आपली स्वत:चीच आहे, हे अजिबात विसरू नये…!
जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे्॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी्॥
ह्या समर्थवचनाचा विसर न पडावा…!
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पु