Total Pageviews

Showing posts with label INDIAN ARMY. Show all posts
Showing posts with label INDIAN ARMY. Show all posts

Monday, 15 May 2023

Let Parochialism not Afflict the Services-Major General Mrinal Suman

Parochialism is a commonly used term with wide-ranging definitions that are

pejorative in connotation. Essentially, parochialism denotes narrowness of views both

in substance and scope. It implies inability to consider issues in larger and wider

perspective. In other words parochialism is a manifestation of narrow-mindedness

and pettiness. As human beings are products of their environment, their attitude and

disposition get moulded in the formative years, both at home and work place.

Although the underlying reason for all types of parochialism is an attitude of

insularity, they get manifested differently.

Parochialism is a human weakness. According supremacy to local and immediate

interests over larger issues is a common trait and phenomenon. While parochialism

remains harmless within acceptable limits, it becomes cancerous when allowed to

proliferate to unhealthy intensity. It can afflict body politic of any nation, society or

organisation with fatal consequences. History stands testimony that a nation infested

with the virus of parochialism has always been an easy prey for subjugation. No one

knows this bitter truth better than India, whose centuries-long suffering under

foreign rule was the direct fallout of the malaise of parochialism.

Unfortunately, India has learnt nothing from the past and similar trends are raising

their vicious heads again all over the country. In this dismal scenario, the armed

forces stand as the solitary bulwark against fissiparous forces. Being united India’s

only hope, they cannot fail the nation. Therefore, it is vitally important that they be

kept scrupulously free of the virus of parochialism lest it destroys organisational

cohesion and degrades their fighting potential.

Regrettably, due to lack of progressive exposure, many service officers fail to acquire

broader vision even while occupying higher ranks. They grow in career but fail to

outgrow narrow mindsets. They remain weighed down with local issues. Their

excessive deportment towards immediate affiliations is a result of their inability to

grasp and fully appreciate criticality of larger issues.

The armed forces are threatened by three types of parochialism – service,

regimental and communal. These have been discussed below.

Service Parochialism

Service parochialism can be defined as excessive and unhealthy concern for one’s

own service, even at the cost of national interests. It is most relentless at the top

where higher commanders get too encumbered with it. Service parochialism is also a

manifestation of acute inferiority complex and accompanying sense of insecurity.

Ostensibly, many commanders talk of service interests but their primary concern is

to ward off perceived threats to their personal aspirations and safeguard their own

turf. They fear loss of their central stage status and dread becoming fringe players.


2

Therefore, they keep harping about service interests and infect the whole


organisation with a parochial outlook. Blinkers of service parochialism render self-

serving commanders incapable of understanding that their mutual antagonism is


detrimental to national interests.

Inter-service parochialism is the primary impediment to the development of jointness

amongst the three services. The Army buys helicopters without consulting the Air

Force lest the Air Force stalls the whole process. It procures deep sea diving

equipment without drawing benefit from Navy’s expertise. As reported by

Comptroller and Auditor General in his report, the three services have procured the

same equipment (e.g. unmanned aerial vehicles, sniper rifles and underwater diving

equipment) from the same foreign vendor at different rates. Their reluctance to join

hands resulted in losing benefits of economies of scale and commonality of support

infrastructure.

Every step towards jointness is considered anti-service and opposed bitterly. Take

the case of the ongoing debate about the need to have a Chief of Defence Staff

(CDS). Not a soul in his wisdom can oppose the measure. It is apparent that the

opposition is being whipped up purely for envisioned service (in fact personal)

interests. Anyone who opposes CDS on the grounds of national interest is a

downright liar. Worse, he lacks moral courage and nerve to admit that his opposition

is based on parochialism and hides behind the façade of overall national defence

concerns. When a Service Chief opposes CDS, he is worried that he would become a

lesser personage and nothing else. He uses the plank of service interests to hide his

own diffidence. There cannot be a more shameful example of parochialism getting

the better of national interests.

Regimental Parochialism

Prejudiced attitudes based on regimental, corps and branch affiliations have been

collectively referred to herein as regimental parochialism. The services rightly

consider regimental spirit to be a battle winning factor as it knits a group together.


Up to unit level, regimental spirit is a force-multiplier but it becomes counter-

productive at higher levels. As all cohesive groups become inward looking, it gives


rise to intolerance for others, thereby generating ‘we versus they’ or ‘regimental

versus outsider’ syndromes.

Many commanders, even after rising above unit level, fail to shed their regimental

mindset. Non-development of broadmindedness forces them to behave in prejudiced

and partisan manner. Some commanders take pride in flaunting their regimental

preferences by dispensing undue favours to their regimental officers. For example,

when a new Army Chief deploys his parent battalion at the Rashtrapati Bhavan, he

reveals his narrow mindset and proves his unsuitability to head the Army. A Chief

has to be above all predispositions.

Further, when unit turn-over, citations and other awards are decided under the

influence of regimental bias, the environment loses faith in the fairness of the

system, thereby encouraging factionalism and dissensions. There have been

instances when bigoted Army Commanders have struck mutual deals to promote

their regimental protégés on quid pro quo basis. When selection for higher ranks is

influenced by regimental affiliations, many deserving officers lose out as vacancies at

the top are limited. Thus, merit ceases to be of any consequence. Mediocre and

undeserving officers get promoted. The armed forces are deprived of the best talent.


3

The institution of Colonel Commandants has contributed the maximum to the growth

of regimental parochialism. Being an anachronistic institution, it inhibits progressive

thinking and breeds unhealthy predisposition. Earlier a Colonel Commandant used to

be like a father figure who acted as the ‘conscience keeper’ of the regiment and a

guardian of regimental traditions. Now, he functions like the regiment’s

representative in top hierarchy whose task is to wangle maximum advantages for his

regiment, apparently at the cost of others who may be more deserving.

Communal Parochialism

Indian society has always been plagued by divisive forces. As precedence is given to

communal identity (based on region, religion, caste and sub-caste) over nationalism,

most people remain embroiled in petty bickering and internal squabbles.

Earlier, community bias was unheard of in the services. It was considered a

sacrilege. Indian armed forces had inherited a legacy of keeping religion and region

out of its normal functioning. Religion (along with politics and women) was never

allowed to be discussed in the officers’ messes. Unfortunately, the spreading virus of

communalism in the country appears to be affecting some military leaders as well.

In the recent past, a senior commander was derisively called ‘clan chief’. He was

known to surround himself with cronies from his clan and was forever ready to take

up cudgels on their behalf. Through his ‘clan contacts’ at the Ministry, he managed

extra-ordinary dispensations for his clan mates. Similarly, another senior commander

was known to provide unhindered access to soldiers from his state. During his

outstation visits, a discreet message used to be passed around. Both the commander

and his wife used to receive their state-mates and note down their

complaints/requests. Needless to say, both the above mentioned commanders

forfeited respect of the services. By their communal acts, they had betrayed the trust

of their commands and let them down. Their failure to rise above petty parochialism

proved their unfitness to occupy high appointments.

Communal predisposition is the worst and most destructive type of parochialism. It

has the potential to split the services on communal lines – a dreadful scenario

indeed. Thankfully, communal parochialism is a recent phenomenon and is at a

nascent stage at present. It is time cognizance is taken of this threat and suitable

measures initiated to nip it in the bud.

Finally, it is time to act

Parochialism is an anathema. It poses a grave threat to the credibility of the military

leadership. To be trusted by one’s subordinates is the greatest reward and highest

accolade that a leader can earn. Trust is a non-substitutable, priceless, intuitive and

complex force. It flourishes on credibility that a leader enjoys in his command. Trust

is the expectancy that the followers can rely on a leader’s impartial and just

approach. Subordinates feel let down when they witness partisan conduct of their

commanders.

Merit is invariably the first casualty of parochialism. No organisation can flourish

unless there are strong merit-performance ethical linkages in place. Every

dispensation extended on the basis of parochial disposition amounts to depriving a


4

deserving claimant of his lawful rights. As soldiers lose faith in the fairness of the

system, a certain degree of despondency sets in, forcing the aggrieved to approach

courts for getting their due.

Service parochialism has already done incalculable harm to the development of

jointness of the three services. They remain divided and true to character, revel in

their disunity. National security is too serious a matter to be allowed to be held

hostage by misplaced service parochialism of a few egocentric commanders. Such

elements must be identified, shamed and exposed to the public for their failure to

assign supremacy to national interests. They should be considered unworthy of the

high ranks that they come to occupy.

Abolition of the institution of Colonel Commandant will have a decisive

effect in curtailing the growth of regimental parochialism. Another simple

measure will be to restrict regimental entrapments to the rank of Colonel.

All senior officers should wear a common uniform without any badges that

announce their regimental identity.

Militaries swear by norms. Norms are unwritten rules that get evolved due to

precedents and conventions set over a period of time. It is for the current military

leadership to rise above parochial mindsets to set stringent norms for non-partisan

conduct with suitable monitoring mechanism to rectify aberrations. For example, it

should be a proscriptive norm that commanders should not select their personal staff

from their own arm/regiment or community.

Senior commanders must be apprised and constantly reminded of the true meaning

of professional integrity – treating all subordinates impartially without service,

regimental and communal bias. To betray an unquestioning soldier’s trust by playing

favourites is the worst kind of impropriety a commander can be guilty of. In fact,

parochialism is a manifestation of selfish nature, unprofessional character and

unethical disposition. Being an act of the worst kind of blasphemy, parochialism must

be ruthlessly curbed, lest the services lose their much vaunted cohesion.

Friday, 14 April 2023

M 777-भारतीय आर्मीची ताकद वाढणार -; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय त...

भारतीय आर्मीची ताकद वाढणार -; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय तोफा 14 APR 23

Friday, 12 February 2021

21 Para (SF) Celebrates Silver Jubilee Of Its Conversion - Lt General VIJAY OBEROI | 11 FEBRUARY, 2021




 21 PARA (SF) or the Waghnakhs’, as they are well known, is a unique Special Forces (SF) battalion, as it is the only SF battalion that has been converted from an existing infantry battalion.

The Infantry battalion was the 21st Battalion of the Maratha Light Infantry Regiment. Although this battalion was raised on February 111985, it was part of one of the senior most regiments of the Indian Army, which has recently completed 250 years of service in the Indian Army in August 2018.

In early 1990s, a major exercise was undertaken by Army Headquarters to convert the then existing three Para Commando battalions into SFs and increase the strength by another battalion. I was the DGMO at that point of time and had implemented this change.

A major change in the roles of the units, making them more akin to Special Operations Forces (SOFs) of other countries, was formalised. I also had the honour of being appointed the first Colonel of the newly formed SF, the only time they moved away from being just super-infantry!

However, the change was short-lived, because the Parachute Regiment, of which the three Para Commando battalions were part of, did not countenance these battalions going out of the Regiment and as soon as I moved out to command a Strike Corps, the then Chief succumbed to the pressure from the Parachute Regiment lobby and the units reverted to again becoming super-infantry! But that is a different story!

This narrative is about the current 21 PARA (SF). 21 Maratha LI had been selected for the conversion, as all other Infantry Colonels of the Regiments had chosen not to part with any of their battalions. Being the Colonel of the Maratha Light Infantry at that time, we had the foresight to offer one of our Maratha battalions for conversion, as we were convinced that it was in the national interest. In addition, we had given many of our battalions to other regiments in the past and all had done extremely well and had brought laurels to both regiments.

21 Maratha LI completed its conversion to Special Forces on 01 Feb 1996, after successfully completing its gruelling probation over two years. The outfit thus holds the unique distinction of being the only infantry battalion to have been directly converted to Special Forces.

However, our overall aim of making the then existing three (1,9 and 10) Para Commando battalions plus the new 21 Para Commando to exclusive Special Forces units lay in ruins, as explained above.

The Blood, Sweat and Grit of all the torchbearers involved in bringing the unit to the present pedestal needs to be applauded and cherished. On this day, 11 Feb 2021, the Waghnakhs are celebrating their Silver Jubilee of Conversion.

A about their nom d’ guerre Waghnakhs. The Wagh Nakh or Tiger’s Claws is a typical Maratha weapon of Shivaji’s time, which is a knuckle duster of steel flanked by two finger holes through which the thumb and small finger are inserted, concealing three to five curved blades in the palm of the hand and turning the wearer's hand into a tiger claw.

For complete concealment, the knuckle duster could be decorated with gems giving the appearance of wearing rings. The blades, like the tiger claws they are named for, are made to slash through an opponent's skin and muscle. In some cases, there is the addition of one or two blades that project from the side of the wagh nakh, an additional weapon that would have been used for jabbing, or thrusting.

 


The wagh nakh is most often associated with the Maratha warrior Shivaji, who fought under Islamic rulers -- the Moghuls in the north and various independent Sultans in the Deccan. In 1659, a meeting was arranged between Shivaji and General Afzal Khan of the Bijapur Sultanate. Shivaji suspected that the General would try something tricky and so wore chainmail under his clothing and a wagh nakh in his hand.

When the two leaders embraced, the traditional greeting, Khan tried to attack Shivaji with his dagger but it failed to pierce Shivajis chainmail. Shivaji then used his hand with the small, concealed wagh nakh and, like a tiger, clawed Khan, inflicting mortal wounds.

Reverting to 21 PARA (SF), the Paltan specialises in Jungle Warfare, although it has taken part in many operations in rural and urban settings too and has left its mark in the entire north eastern part of our country. One may recall that following the terrorist attack on an army convoy in Manipur a few years back, it was 21 PARA that had carried out a surgical operation in the border areas of Myanmar and given the terrorists and insurgents a befitting reply. The operation under command of the then Commanding Officer of 21 PARA (SF), Colonel Saurabh Singh Shekhawat was a complete success where only terrorists were neutralised and there had been no collateral damage or any casualties to our troops.

I am given to understand that both the serving ‘Colonels’ of the Maratha Light Infantry, Lt Gen Asit Mistry and of the Parachute Regiment, Lt Gen Paramjit Singh Sangha would be present for the celebrations of the Paltan. The Army’s SFs units are arguably the best infantry units in our Army, but despite their nomenclature of SFs, they do not fall in the category of Special Operations Forces (SOFs) of countries like USA, Russia or UK, whose top rated units: US Delta Force; Russian Spetsnaz; and British SAS, are SF units in the classical genre.

We do have the potential and professional zeal to become like the above quoted units, as our officers, JCO’s and Jawans are the best, but we are far too mired in regimental issues and non-issues and our hierarchy is far too risk-averse! The other reason is that although our SF Units have won many a battle, they get stymied by our Ministry of Defence (MoD) manned by civilian officials, who neither have the expertise nor the desire to learn about how the army operates and the sense of urgency.

Unless the SF are modernised on a continuous basis in terms of the latest weapons and other warlike equipment, we will not be able to utilise the full potential of these special troops, which have an increasingly important role to play on the future battlefield. In the 25 years of its existence since the conversion from 21 Maratha LI to 21 PARA (SF), the battalion has shown its mettle; won both battles and laurels and has become a most effective and fearless machine for the battles likely to be faced in future. More power to this exuberant SF battalion that at the moment of writing is carrying out a para jump by both serving personnel and veterans of the battalion, commemorating their Silver Jubilee.

Cover Photograph:Bagh nakh (tiger-claw weapon of Indian origin) made of lacquered steel

Lt General Vijay Oberoi is a former Vice Chief of Army Sta

Sunday, 17 January 2021

भारतीय लष्कर दिनानिमित्त...🙏* *--डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी*

 

"...बोलावं की बोलू नये, या संभ्रमात आहे मी . हा संभ्रम आजचा नाही, तो गेल्या कित्येक वर्षांचा आहे, आणि तो माझा एकट्याचा नाही माझ्यासारख्या असंख्य आत्म्यांचा आहे . आज अगदी असह्य झालं म्हणून तुमच्यासमोर तोंड उघडतोय मी. असं काही बोलणं हे आमच्या लष्करी शिस्तीत बसणारं नाही, लष्करी नियमात लिहिलेलं नाही, तरीही मी बोलतोय. धाडस करतोय. कारण हे कुणी तरी बोलायला हवंच आहे, तुम्हाला सांगायलाच हवं आहे , ती वेळ आत्ता आली आहे, कारण तुम्ही सगळे हिंदुस्थानी तुमच्या हातातल्या स्मार्ट फोनवर 'लष्करी दिनाच्या ' शुभेच्छा एकमेकांना देत असाल, चित्रं एकमेकांना पाठवत असाल , तुमचं राष्ट्र प्रेम स्मार्टफोनवर अगदी उफाळून आलं असेल, म्हणून मला वाटलं हीच वेळ आहे सर्व काही सांगण्याची. हीच वेळ आहे मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची.

... मनात संतापाचा ज्वालामुखी केव्हाचा धुमसतो आहे .
जखमा भळभळत आहेत.
मीच एकटा नव्हे, शहीद झालेले आम्ही सगळे जवान, हिंदुस्थानच्या सीमांवर शापग्रस्त असल्यासारखे , आसमंतात भटकत आहोत .
वाळवंटात , बर्फाच्छादित डोंगर, कडेकपाऱ्यात , भयंकर जंगलात जिथे जिथे म्हणून हिंदुस्थानच्या सीमा आहेत, तिथे तिथे आम्ही सगळे अस्वस्थ आत्मे भटकत आहोत...
शोधत आहोत , कुठे आहेत आमच्या हिंदुस्थानातील सुजाण नागरिक ?
कुठे आहेत संवेदनशील , जबाबदार नागरिक ?
कुठे आहेत कळवळा येणारे, उसासे टाकणारे नागरिक ?

प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला , प्रत्येक लष्करी दिनाला आम्ही अस्वस्थ होऊन शोधीत असतो , तुमच्यातील राष्ट्रभक्त , तुमच्यातील विवेकशील , पथदर्शी स्वातंत्र्यप्रेमी ...
शोधीत असतो आम्हाला राख्या पाठवणाऱ्या आमच्या भगिनी...
शोधीत असतो आमच्यासाठी मेणबत्त्या लावून स्मरण करणारे विद्यार्थी ...
शोधीत असतो आठवणीने आमच्यासाठी आसवं सांडणारे आमचे देशबांधव...

शोधत असतो आम्ही...

अश्वत्थाम्यासारखी भळभळती जखम घेऊन वाऱ्यावर हिंडत असतो.
आमच्या जखमेत कसलंही तेल नकोय, आम्हाला तो स्यमंतक मणीसुद्धा नकोय .
कसलाही स्वार्थ नाहीय आमच्या मनात. 
नकोत आम्हाला शौर्य पुरस्कार
नकोत आम्हाला मानमरातब
नकोय आम्हाला एखादा जमिनीचा तुकडा कुणीतरी त्याच्या मोठेपणासाठी दिलेला
नकोय पेन्शन, नकोय कँटीन, नकोत आमचे पुतळे , वा स्मरणार्थ बांधलेले तथाकथित सगळे सोपस्कार
नकोत तिरंग्यात लपेटून मिळणारे मानसन्मान
नकोत त्या बंदुकीच्या फैरींचे कौतुक सोहळे
नकोत आमच्या कुटुंबियांना तुमचे बेगडी सांत्वन आणि पूर्णत्वाला न जाणारं आश्वासन
नकोच ते सर्व काही
नकोच ...

आम्ही सीमेवर तुमच्यासाठी रक्त सांडतो
आम्ही तुमच्यासाठी बलिदान करतो
मिळेल ते खातो, नाही मिळाले एखाद्या दिवशी तर कसली तक्रारच नसते आमची...
पुरेशी झोप मिळो न मिळो
पुरेशी जागा, आराम, विश्रांती मिळो न मिळो
वर्षानुवर्षे कुटुंबियांना , आमच्या तान्हुल्याना भेटायला मिळो न मिळो
सगळे सण समारंभ, वाढदिवस आणि काय काय असणारं सगळं सांस्कृतिक, मिळो न मिळो...

आमची तक्रारच नाही कसली !

देहात , मनात , रक्तात केवळ एकच तीव्र  जाणीव असते...

हिंदुस्थानचं संरक्षण !
तुम्हा सर्व देशवासीयांचं संरक्षण !
हिंदुस्थानातील सर्व मानबिंदूंचं संरक्षण !
प्रथा, परंपरा, संस्कृती , ज्ञानविज्ञान  आणि  आपल्या परमप्रिय हिंदुस्थानच्या नकाशाचं संरक्षण !

यासाठीच तर आम्ही वसा घेतलाय, यासाठीच तर देहत्यागाची तयारी ठेवलीय , यासाठीच तर लौकिक सुखोपभोगावर लाथ मारून अलौकिक असं मातृभूचं संरक्षण करण्याचं व्रत घेतलंय ...
त्यापुढे आम्हाला पडणारे कष्ट, खडतर जीवन हे काहीच नाही...

पण...

तुम्हा पैकी अनेकांच्या वर्तनांनं आम्हाला खेद होतोय,  लाज वाटतेय आणि आतून संतापून जायला होतंय...
आम्ही जवान सीमेवर रक्त सांडतोय आणि तुम्ही ...?
तुम्ही एकमेकांचं रक्त सांडताय , माताभगिनींची अब्रू लुटताय, 
प्राणापलीकडे आम्ही हिंदुस्थानच संरक्षण करतोय आणि तुम्ही क्षुल्लक कारणावरून देशाच्या अमूल्य संपत्तीचं नुकसान करताय, विध्वंस करताय, जाळपोळ, दंगेधोपे करताय...

आम्ही इथे खांद्याला खांदा लावून युद्ध करताना शेजारी कोण आहे त्याची जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, शिक्षण विचारत नाही, तो नेहमीच सैनिक नावाच्या जातीचा, रक्ताचा, धर्माचा असंच आम्ही मानतो आणि तुम्ही...
जातपातधर्म यावरून भांडताय, समाजात दुही पेरताय, महापुरुषांना आपापसात वाटून घेताय, त्यावरून तुमची संवेदनशीलता हळवी होतेय...

या सर्वांची तुम्हाला लाज नाही वाटत ?
पाकिस्तानचे झेंडे फडकवताना , त्यादेशाचा जयजयकार करताना, भारतमातेचे तुकडे व्हावेत अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या नादी लागताना, नंदनवन असणाऱ्या काश्मीर चे संरक्षण करणाऱ्यांवर दगड फेक होताना डोळे मिटून घेताना आणि सच्च्या देशप्रेमीवर चिखलफेक करून त्यांचे नितीधैर्य  खच्ची करणारे निमूट पणे पाहताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ?
सगळे षंढ बनलात की तुमच्या अंगातलं रक्त दूषित बनलं ?
मातृप्रेम संपलं की पैसा हेच सर्वस्व बनलं ?
आपलं स्वत्व विकलं की पारतंत्र्याची हौस आली ?

आम्हा सगळ्या अस्वस्थ आत्म्यांना भयाण अंधकार दिसतोय...
रक्ताचा लाव्हा उकळतोय
आणि तुमचं इतके दिवस संरक्षण केल्याचं दुःखही होतंय...

कशाला *लष्करी दिन* पाळताय ? तुमच्या वर्तनांनं तो 'दीन' झालाय.

आम्ही अस्वस्थ आहोत, आम्हाला, शहीद होऊनही सद्गती मिळाली नाही कारण तुमच्या पैकी अनेकांचं वर्तन..

अजूनही वेळ गेलेली नाही
अजूनही संधी गेलेली नाही
उठा, आणि आमच्या बलिदानाची शपथ घेऊन राष्ट्राचा विचार अगोदर करा ! शपथ आहे आम्हा सर्व जवानांच्या आत्म्याची , आमच्या देशभक्तीची !
तरच आम्हाला मुक्ती मिळेल, अन्यथा पुन्हा एकदा पारतंत्र्य...पुन्हा गुलामी
आणि आमच्या रक्ताचा अपमान !

माझ्या भावाबहीणीनो ,
आमच्या माघारी, खरंच
सांभाळाल ना हा माझा प्राणप्रिय देश ! 

*लष्करी दिनानिमित्त तुम्हाला आमच्या रक्ताची आण घालतोय, सांभाळा देशाला...!*
वंदे मातरम !!!
     
   *-- डॉ.श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.*
९४२३८७५८०६
--------------
मित्रानो, ही पोस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू द्या , नावासह, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरही...वंदे मातरम !

Thursday, 18 April 2019

नेहरूंनी पंतप्रधानपदी आल्यानंतर भारतीय सैन्याची निर्मिती केलेली नाही. नेहरूंना वारसा मिळाला, तो ब्रिटिश सैन्याचा. उलट नेहरूंनी सैन्याच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष करत खच्चीकरणालाच प्राधान्य दिले महा एमटीबी.





सत्तेवर येऊन तीन महिने नाही झाले, तोच आयकर विभागाने धाडी टाकत भ्रष्टाचारलाचखोरीचा माज उतरविल्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सध्या चांगलेच बिथरल्याचे दिसते.

मुळात जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधानपद पटकावल्यानंतर भारतीय सैन्याची निर्मिती केलेली नाहीस्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या नेहरूंना वारसा मिळाला, तो ब्रिटिश सैन्याचा. उलट नेहरूंनी सैन्याच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष करत खच्चीकरणालाच प्राधान्य दिले.सैन्यप्रमुखपदावरील नेमणुकीवेळीही नेहरूंनी भारतीय व्यक्तीवर अविश्वास दाखवत सुरुवातीला लॉकहार्ट आणि नंतर बुचर नामक ब्रिटिशावरच विश्वास टाकला. फील्ड मार्शल करिअप्पा यांची नियुक्ती ही नंतरची. विशेष म्हणजे, अहिंसावादीशांतीवादी देशाला सैन्याची गरज कायम्हणणार्‍या नेहरूंनी सैन्य सशस्त्रीकरणाऐवजी निःशस्त्रीकरणअलिप्ततावाद आणि पंचशीलाचेच तुणतुणे सदासर्वकाळ वाजविण्यात धन्यता मानलीसैनिकी बंड होऊन आपली पंतप्रधानकीची खुर्ची जाण्याची भीती नेहरूंच्या या वागणुकीमागे होतीसैन्याचे अधिकार कमी करून नोकरशाहीचा हस्तक्षेप अधिकाधिक वाढवणेहा नेहरूंच्या या भयगंडाचाच परिपाक होताचिनी आक्रमणावेळीदेखील भोवतालच्यांनी वारंवार इशारा देऊनही नेहरूंनी कधी त्याची दखल घेतली नाहीपरिणामी १९६२च्या युद्धात पहिल्या पंतप्रधानाच्या चुकांमुळेच भारतीय सैन्याला मानहानी पत्करावी लागली. इतकेच नव्हे तर तिथे गवतही उगवत नाही,’ असे विचित्र विधान करत नेहरूंनी अक्साई चीन आणि तिबेटचा घासही चीनला घेऊ दिला अन् अशा व्यक्तीने सैन्यदलांची बांधणी केल्याचे कमलनाथ म्हणत असतील, तर त्याला लाचारीशिवाय दुसरे काय म्हणणार?

वस्तुतः स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारताचे स्वतःचे असे बलशाली सैन्य असावेहा विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोसच होतेसावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणावर भर दिलातर सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. सावरकर,नेताजी बोस ज्यावेळी सैन्यशक्तीचे महत्त्व अधोरेखित करून त्या दिशेने प्रत्यक्ष कृती करत होते, तेव्हा जवाहरलाल नेहरू काय करत होते, हा संशोधनाचाच विषय! स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंकडे ब्रिटिश सैन्याबरोबरच आझाद हिंद सेनेतील देशनिष्ठ सैनिकांनाही सेवेत सामावून घेण्याची संधी होती. ते न करता नेहरूंनी आझाद हिंद सेनेतील सैनिकांची अवहेलना करण्यातच शहाणपण मानले, त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जादेखील दिला नाही. सुभाषचंद्र बोस यांच्यासह आझाद हिंद सेनेचे नाव इतिहासाच्या पानावरून कसे विस्मरणात जाईल, याची तजवीजही नेहरूंनी केली. म्हणजेच नेहरू इथे सैन्य उभारणीत नव्हेतर त्याला दुबळे करण्यातच आघाडीवर असल्याचे स्पष्ट होतेनरेंद्र मोदींनी मात्र देशासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या आझाद हिंद सेनेचा गौरव लाल किल्ल्यावरून केलाजो सन्मान आझाद हिंद सेनेतील सैनिकांना पहिल्या स्वातंत्र्यदिनी मिळायला हवा होता, तो मोदींनी सत्तेवर आल्यानंतर दिला. दुसर्‍या बाजूला स्वा. सावरकरांच्या सशस्त्रीकरणाच्या विचारांना हरताळ फासल्याने देशात कोणत्याही हत्यारांचीसंरक्षण साहित्याची निर्मितीच होऊ शकली नाहीआजही भारताला जी शस्त्रास्त्रांची प्रचंड आयात करावी लागतेकोट्यवधी रुपये परकीयांच्या खात्यात भरावे लागतात, ती नेहरूंचीच देण आहे.सैन्यविघातक नेहरुनिती ही एवढ्यावरच थांबते, असे नाही, तर जवाहरलाल नेहरुंनी अजूनही बरेच कारनामे करुन ठेवले आहेत, ज्याची फळे आजही देश भोगतोच आहे. नेहरु-गांधी घराण्यापुढे कुर्निसात करण्याचे सोडले तर नेहरुंच्या देशहिताला बाधा निमाण करणार्‍या कित्येक गोष्टी उजेडात येतील.

जी गोष्ट सैन्याची तीच आरमाराची किंवा नौदलाचीभारतीय नौदलाची उभारणी जवाहरलाल नेहरूंनी नव्हेतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केली. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते, ते त्यांनी दूरदृष्टी दाखवत अथांग सागरात गाजवलेल्या पराक्रमामुळेच! जी गोष्ट नेहरूंची तीच इंदिरा गांधींचीही. इंदिरा गांधींनी १९७१च्या युद्धापूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर पाकिस्तानवर आक्रमण करायचा हुकूम दिला होता. मात्रतेव्हा फील्ड मार्शलपदी असलेल्या सॅम माणेकशॉ यांनी पावसाळ्याचा विचार करून कारवाई करण्यास नकार दिला. पावसाळ्यात युद्धाला तोंड फुटले असतेतर भारताचे नुकसान झाले असते, हा विचार माणेकशॉ करू शकले, पण इंदिरा गांधींना तो विचार करता आला नाही. नंतर योग्यवेळी चढाई करून भारताने युद्ध जिंकलेपण सॅम माणेकशॉ यांनी आपला आदेश न मानल्याचा डूख मनात धरून ठेवलेल्या इंदिरा गांधींनी त्यांना निवृत्तीवेतन काही दिले नाहीशिवाय पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक भारतीय सैन्याने बंदी केलेले असतानात्यांना सोडून देण्याचे काम मात्र इंदिराजींनी बरोब्बर केले. ‘वन रँक वन पेन्शनची सैन्यदलांची कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सत्तेवर आल्यानंतर पूर्ण केलीगेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने सैन्य आधुनिकीकरणावर जोर देत रायफल्स, चिलखते, बंदुका, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुड्याउपग्रहवेधी क्षेपणास्त्रांच्या साह्याने सैन्याला प्रबळ करण्याचेच काम केले. म्हणूनच कमलनाथ यांनी नेहरू-गांधी गुणगानाऐवजी जरा वस्तुस्थितीकडे पाहिले तर बरे होईल.

सैन्याकडे जसे नेहरूंनी दुर्लक्ष केले, तसेच काश्मीरचेही. संयुक्त राष्ट्रांत काश्मीरप्रश्न नेऊन तो चिघळविण्याला कारणीभूत नेहरूच आणि कलम ३७० वा कलम ३५- अ राज्यघटनेत घुसडविण्याचा कारनामाही नेहरूंचाच. म्हणूनच आज जेव्हा मोदी काश्मीरच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कलम ३७० व कलम ३५-अ हटविण्याची रोखठोक भूमिका घेताना दिसतात, तेव्हा मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्ला पिता-पुत्र आगलाव्या कारवाया करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर खमकेपणा धारण केलेला असताना मेहबूबा मुफ्तींनीहा मुस्लिमांना देशातून घालविण्याचा डाव असल्याचे केलेले विधान या लोकांच्या विघातक मानसिकतेचेच दर्शन घडविणारे. खरे म्हणजे काश्मीर हे काही केवळ मुस्लिमांचे राज्य नव्हे, तिथे हिंदू आणि बौद्धांचीही वस्ती आहेतीदेखील मोठ्या भूभागावरत्यामुळे मेहबूबा मुफ्तींनी मुस्लीम मतपेढी टिकवण्यासाठी केलेल्या वक्तव्याला काहीही अर्थ नाहीशिवाय भाजपला देशातून मुस्लिमांना हाकलून लावायचे नसून जे घुसखोर आहेतजे बेकायदेशीरपणे देशात आले, त्यांनाच पिटाळून लावण्याची भाजपची भूमिका आहे. आता मेहबूबांना अवैधपणे भारतात आलेल्यांनाही आपलेच म्हणायचे असेल, तर ते चालणार नाही. उलट मेहबूबा मुफ्तींनी काश्मिरी पंडितांना मायभूमीतून ज्यांनी पळवून लावलेत्यांच्याविरोधात आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाबाबत ठामपणे काही बोलावेआता अशा लोकांना जनताच मतदानातून धडा शिकवेल, इतकेच.


Wednesday, 20 February 2019

GOOD NEWS-Withdrawal of Litigation against Disabled Soldiers -Lt Col Navdeep Singh(



It gives me immense satisfaction in stating that I have been given to understand that the Raksha Mantri Ms Nirmala Sitharaman has directed the withdrawal of appeals filed in the Supreme Court against disabled soldiers by the Ministry of Defence since the past many years. As is well known, multiple appeals till the highest Court of the land were filed against disability benefits granted to disabled veterans on judicial intervention by various Courts and Tribunals despite the issue attaining finality with a series of decisions rendered by the Supreme Court in favour of disabled soldiers. In fact, progressively going a step further, it seems that directions have also been passed by the Minister to concede appeals filed by disabled soldiers in the Supreme Court on a case to case basis in all matters which are found to be covered by judicial dicta.

Though this matter and many other issues related to litigation and redressal of other grievances were considered by a Committee of Experts in 2015 constituted by the then Minister Mr Manohar Parrikar, of which I was a Member, the implementation of the accepted recommendations was moving at a slow pace but we were assured by Ms Sitharaman about concrete action earlier this year.
 This provides closure to a very emotive issue wherein though the financial implications were minimal still the grim reality of a nation fighting its own disabled veterans was heartbreaking since it is well known and universally recognized how stress and strain of military service, a regimented lifestyle away from the family and inability to effectively cater to domestic commitments result in aggravation of existing physical and mental conditions of the women & men in uniform.
I express my thanks to Mr Parrikar and Ms Sitharaman in dealing with the subject sensitively and in a totally apolitical manner devoid of any political inclination.
I also express my gratitude to Mr Rajeev Chandrasekhar, MP, Member of Parliament, for consistently taking this up with the political executive till resolution, without whose support this issue would not have reached national consciousness, and of course my dear friend, the brave Major Maj D P Singh, who remained at the forefront of the cause.
The recommendations of the Committee of Experts can be accessed here: https://mod.gov.in/sites/default/files/Reportcc_0.pdf (Paragraph 2.2.1 specifically deals with disability pensions)

Monday, 14 January 2019

जनरल करिअप्पा आणि ७० वा सेना दिवस सेना दिन महा एमटीबी 14-Jan-2019

भारतात दरवर्षी १५ जानेवारी रोजी लेफ्टनंट जनरल (पुढे फील्ड मार्शल) के. एम. करिअप्पा यांच्या भारतीय लष्कराच्या शीर्षपदाचा कारभार हाती घेण्याच्या निमित्ताने साजरा केला जातोकरिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी इंग्रज काळातील भारतीय लष्कराचे अंतिम ब्रिटीश शीर्ष अधिकारी जनरल रॉय बुचर यांच्याकडून हा पदभार स्वीकारला होतासेना दिनानिमित्त भारतीय लष्कराची माहिती देणारा हा लेख...
 
१५ जानेवारी१९४९ या दिवशी भारताचे शेवटचे इंग्रज सरसेनापती जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय अधिकारी जनरल करिअप्पा यांनी सरसेनापतीपदाची सूत्रे स्वीकारली.
 
सेना दिवसाच्या परंपरेचा इतिहास
स्थलसेना म्हणजेच भूदल किंवा लष्कर हे कोणत्याही सैन्याचे सगळ्यात महत्त्वाचे अंग असतेआधुनिक काळात नौदल आणि हवार्ईदल हीसुद्धा महत्त्वाचीच आहेतपण भूदलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण, आपल्या देशाची भूमी प्रत्यक्षात ताब्यात ठेवणे, संरक्षण करणे हे काम भूदलच करीत असते. हवाईदल शत्रूची भूमी बॉम्बवर्षावाने भाजून काढेल, शत्रूची ठाणी उद्ध्वस्त करेल, नौदल शत्रूच्या व्यापाराची नाकेबंदी करून त्याला गलितगात्र करेलपण यानंतरचा टप्पा म्हणजे शत्रूची भूमी ताब्यात घेणे. ते काम भूदलच करते.
 
प्राचीन परंपरा
भारताची लष्करी परंपरा फार प्राचीन आहे. आमचे सगळे देव हे शस्त्रधारी आहेत. भगवान विष्णू हा शारंग धनुष्याने किंवा सुदर्शन चक्राने,भगवान शिव हा पिनाक धनुष्याने किंवा त्रिशूलानेमाता जगदंबा ही खड्गाने किंवा भाल्याने युद्ध करतात. रामायण-महाभारत काळातले रथी, अतिरथी, महारथी हे महान योद्धे चतुरंग दळासमवेत युद्ध करीत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, सम्राट शालिवाहन या दिग्विजयी राजांनी ग्रीक-शक-हूण-कुशाण आदी परकीय आक्रमक पराभूत करून पचवून टाकले. छत्रपती शिवरायांनी आपल्या भवानी तलवारीच्या तेजाने पाचही पातशाह्या थरथरा कापविल्यातर बाजीराव पेशव्याने आपल्या तुफानी घोडदौडीने मुघल पातशाही खिळखिळी करून टाकली.
 
आधुनिक लष्कर
स्वतंत्र भारताच्या आजच्या अत्याधुनिक लष्कराचा पाया मात्र इंग्रजी राजवटीत घातला गेलाइंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने पगारी सैनिक म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक आपल्या सैन्यात भरती केलेइंग्रजी सेनापतींच्या तालमीत या जवानांनी युरोपातले अत्याधुनिक युद्धतंत्र आत्मसात केले. मूळचाच शूर असलेला भारतीय सैनिक आधुनिक युद्धतंत्रात पारंगत झाल्यावर युरोपीयनांनाही भारी ठरतो, याचा प्रत्यय १९१४ ते १८ च्या पहिल्या महायुद्धात आला. इंग्रजी पलटणीने मार खाल्लेल्या रणक्षेत्रात भारतीय पलटण उतरविण्यात आली. या पलटणीने संयम, चिकाटी आणि योग्यवेळी जबरदस्त आक्रमण यांचा मिलाफ करून समारेच्या कडव्या जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावली. ही घटना फ्रान्समध्ये घडली. फ्रेंच जनता भारतीय सैनिकांच्या या पराक्रमावर एवढी खुश झाली कीयानंतर कुठेही भारतीय सैनिक दिसले की, ‘हिंदू आले, हिंदू आले,’ या शब्दांनी त्यांचे स्वागत केले जात असे.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जाणते नेतृत्व इंग्रजांची नोकरी करणार्‍या भारतीय सैनिकांकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते, त्याचा एक फार सुंदर किस्सा लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात यांनी आपल्या आत्मचरित्रात दिला आहे. इंग्लंडच्या सँडहर्स्ट मिलिटरी अ‍ॅकेडमीतून आपले प्रशिक्षण पूर्ण करून थोरात भारतात परत येत होते. त्यांच्याच जहाजात योगायोगाने लाला लजपतरायही होते. दोघांची खूप मैत्री झाली. लालाजींच्या व्यक्तिमत्त्वानेे तरुण थोरात अगदी भारावून गेले. ते लालाजींना म्हणाले, “भारतात पोहोचल्यावर मी ही इंग्रजांची नोकरी सोडून देतो आणि तुमच्यासोबत स्वातंत्र्य आंदोलनात येतो.” त्यावर लालाजी उत्तरले, “छे, छे! अहो, हा इंग्रज आज ना उद्या भारतातून जाणारच आहे. त्यानंतर स्वतंत्र भारताला तुमच्यासारख्या कुशलतरबेज सेनानायकांची अत्यंत गरज आहेतेव्हा त्या क्षणावर दृष्टी ठेऊन तुमची गुणवत्ता सतत वाढवित राहा.”
 
१९४७ ची कसोटी
गुणवत्ता वाढवित राहण्याचा लालाजींचा हा आदेश थोरातांसकट सगळ्याच भारतीय सेनापतींनी पाळलायाचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेचच आलाकारण काश्मीर हिसकावून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केलेदुसर्‍या महायुद्धात गाजलेले ब्रिटिश सेनानी जनरल क्लॉड ऑकिनलेक हे यावेळी भारताचे सरसेनापती होते. पण ते निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे अतिशय त्वरेने लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांना लष्कराच्या पश्चिम विभागात प्रमुखपदावर आणण्यात आले. करिअप्पा वेगाने कामाला लागले. परिस्थिती कमालीची प्रतिकूल होती. फाळणीमुळे सैन्याची रचना विस्कळीत झाली होती. साधनसामुग्री अपुरी होती. निसर्ग प्रतिकूल होता.
 
सगळ्यात मुख्य म्हणजे राजकीय नेतृत्त्वाला सैनिकी पराक्रम म्हणजे ‘युद्धखोरपणा’ असे वाटत होते. पण अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतून पुढे सरसावतो, तोच खरा सैनिक, हे जनरल करिअप्पा आणि त्यांच्या सहायक अधिकार्‍यांनी दाखवून दिले. पाकिस्तानी मगराने जवळजवळ पूर्ण गिळलेले काश्मीरचे माणिक यांनी पराक्रमाची शर्थ करून खेचून आणलेकरिअप्पांचे सहायक सेनानी मेजर जनरल थिमय्या यांनी तर जगातल्या सर्वोच्च उंचीवरच्या (११ हजार ५७५ फूट) झोजिला खिंडीत ‘७ वी लाईट कॅव्हेलरी’ ही रणगाडा तुकडी नेऊन उभी केली. जगभरचे सर्व सेनापती आश्चर्याने थक्क झाले, कारण कोणत्याही सेनापतीने इतक्या उंचीवरच्या ठिकाणी रणगाडा नेण्याचे धाडस केलेले नव्हते आणि हे रणगाडे तरी कोणते तर दुसर्‍या महायुद्धाअखेर ब्रिटनने जुनाट म्हणून काढून टाकलेले.
 
लष्कराचे मुख्य विभाग
भूदलाचे मुख्यतः दोन विभाग असतात. पहिला झुंजी विभाग म्हणजे ‘कॉम्बॅट आर्म्स’. यात इन्फन्ट्री, एअरबोर्न इन्फन्ट्री, मॅकेनाईज्ड इन्फन्ट्री, पॅराशुट रेजिमेंट, आर्मर्ड कोअर, एव्हिएशन कोअर, आर्टिलरी, एअर डिफेन्स आर्टिलरी, इंजिनिअर्स कोअर, सिग्नल कोअर असे उपविभाग असतात. दुसरा विभाग म्हणजे मदतगार विभाग किंवा ’सपोर्टिंग सर्व्हिसेस’. यात आर्मी सर्व्हिस कोअर, मेडिकल कोअर, ऑर्डनन्स कोअर, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मेकॅनिकल कोअर, मिलिटरी पोलीस हे उपविभाग असतात. झुंजी विभागाइतकाच मदतगार विभागही महत्त्वाचा असतो. १९४७-१९४८ च्या युद्धात हे दोन्ही विभाग समन्वयाने उभे ठाकले किंवा जनरल करिअप्पांच्या उत्कृष्ट नेतृत्वाने त्यांचा उत्तम समन्वय घडवून आणलाम्हणून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला खडे चारले. राजकीय नेतृत्वाने कचखाऊपणा केला नसता तर, भारतीय सैन्य काश्मीर पूर्ण मुक्त करूनच थांबले असते.
 
१९६२ च्या भारत-चीन युद्धात मदतगार विभागाला आपले काम नीटपणे करता आले नाहीत्याचा दोष राजकीय नेतृत्त्वाकडेच जातो, पण त्याचा परिणाम असा की, नेफा सरहद्दीवरच्या आपल्या सैनिकांना गरम कपडे, अन्नधान्य, दारूगोळा याचा नीट पुरवठाच झाला नाही. असो. १९४७-४८ च्या या भारत-पाक युद्धादरम्यान भारताच्या सरसेनापतीपदी तीन इंग्रज सेनापती येऊन गेलेजनरल क्लॉड ऑकिनलेक जाऊन त्यांच्या जागी जनरल रॉब लॉकहार्ट आणि मग जनरल रॉय बुचर हे आले. खरे म्हणजे हे तिघेही उत्तम सेनापती होते. दुसर्‍या महायुद्धात पराक्रम गाजवलेले होते. पण अखेर ते इंग्रज होतेते भारत सरकारच्या हुकूमाप्रमाणे नव्हे तर लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांच्या हुकूमाप्रमाणे वागत होते आणि माऊंटबॅटन यांचे धोरण उघडउघड भारतविरोधी व पाकिस्तानी पक्षपाती होतेअखेर तो पक्षपात सहन करणे सर्वोच्च राजकीय नेतृत्त्वालाही अशक्य झालेजनरल रॉय बुचर यांना नारळ देण्यात आला आणि जनरल कोदंडेरा मदाप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती बनले. तो दिवस होता १५ जानेवारी १९४९

Monday, 7 January 2019

भारतीय लष्करी जवानांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी ‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’ची निर्मिती-MAHESH PURANIK -MAHA MTB

डॉ. पुनीत गुप्ता यांनी दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी जवानांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी ‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’ची निर्मिती केली आहे. त्याविषयी...
 
आंघोळीच्या गोळीचे कितीतरी किस्से आपण सर्वांनी ऐकले, वाचले असतील. मराठी साहित्यात, कथा-कादंबऱ्यांत, विनोदी लेखनातही ‘आंघोळीच्या गोळी’चा उल्लेख बऱ्याचदा आला. आता मात्र ‘आंघोळीची गोळी’ नाही म्हटले तरी ‘बिनपाण्याचा आंघोळीचा शॅम्पू’ उपलब्ध होत आहे. ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ हा स्टार्टअप सुरू करणाऱ्या डॉपुनीत गुप्ता यांनी दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी जवानांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी या बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पूची आणि वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित अन्य उत्पादनांची निर्मिती केली आहेयासाठी त्यांच्या कंपनीला पाच लाख डॉलर्सची आर्थिक मदतही मिळाली असून ‘मेक इन इंडिया’ अभियानापासून प्रेरणा घेत ते अशी उत्पादने तयार करत आहेत.
 
दिल्लीत जन्मलेल्या पुनीत गुप्ता यांनी कोलकाता आयआयएममध्ये २०११ साली एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी चार वर्षांपर्यंत युनायटेड किंग्डममध्ये शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी ‘डीआरडीओ’ आणि ‘हनीवेल’ कंपनीमध्येही काम केले. पुढे शिक्षण झाल्यावर २०१६ साली त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला दिल्ली आयआयटीत ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ने आपली पाणी बचत करणारी उत्पादने उपलब्ध करून दिली आणि आता तर त्यांनी ही उत्पादने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (नासा) पोहोचवण्याचेही ठरवले आहेक्लेन्स्टा इंटरनॅशनलचे संस्थापक पुनीत गुप्ता यांची कंपनी एक अभिनव कल्पना पुढे घेऊन जाणारी बायोटेक स्टार्ट-अप आहे. कंपनीची उत्पादने ‘बिनापाण्याची आंघोळ’ या अद्भुत संकल्पनेवर आधारित आहे. विशेषत्वाने सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या वैयक्तिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी ते ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत.शिवाय ही उत्पादने वापरण्याची पद्धतही सोपी आहेत्वचेशी संबंधित आजारांपासूनही ही उत्पादने संरक्षण करतात. पण याची सुरुवात कशी झाली? तर एका बाजूला पाणी बचत करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती सुरू असतानाच पुनीत गुप्ता यांना लष्करातील जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झालीजवानांच्या वैयक्तिक अडीअडचणींशी निकटचा परिचय झाल्यानंतर त्यांना आपल्या कंपनीच्या माध्यमातून जवानांच्या अडचणींवर मात करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी तशी उत्पादने तयारही केली.
 
‘क्लेन्स्टा’ने एका वर्षापूर्वी भारत सरकार आणि कारगील, सियाचीन, द्रास यासारख्या दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांसाठी आपल्या उत्पादनांचा पुरवठा सुरू केला. आता ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ ही कंपनी ‘बिनपाण्याचा शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ तयार करत आहे. ‘क्लेन्स्टा’चा ‘शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ लावल्यानंतर स्वच्छ टॉवलने अंग पुसावे लागेलज्यात पाणी वापरण्याची गरजच राहणार नाही. ‘क्लेन्स्टा’ने तयार केलेल्या १० मि.ली शॅम्पूच्या बाटलीमुळे ३०० लीटर पाण्याची बचत होते, हीदेखील उल्लेखनीय गोष्ट. पुनीत गुप्ता यांनी अशाप्रकारची उत्पादने तयार करण्याबाबत सांगितले कीआमची उत्पादने जिथे क्वचितच पाणी उपलब्ध होते अथवा होतच नाहीअशा परिस्थितीत आयुष्य जगावे लागणाऱ्या लोकांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार केलेली आहेत. क्लेन्स्टाच्या उत्पादनांचा वापर करून बिनपाण्याची आंघोळ करणाऱ्या, दुर्गम भागात राहणाऱ्या जवान आणि रुग्णालयात दाखल केलेल्या आजारी व्यक्तींना, त्यांची काळजी घेणाऱ्यांना आणि व्यस्त जीवन जगणाऱ्या लोकांना प्रसन्नतेची अनुभूती तर देत आहेतच पण त्यांच्यासाठी वरदानही ठरत आहेतक्लेन्स्टाच्या उत्पादनांचे महत्त्व जे जवान कारगील, सियाचीनसारख्या हिमनगांनी वेढलेल्या भागात उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानात आयुष्य जगतात ते नक्कीच समजू शकतील. पुनीत यांचे याबाबत म्हणणे आहे की, आपल्या संरक्षण-सुरक्षा तयारीची गोष्ट येते, तेव्हा लष्कराच्या आरोग्याशी संबंधित बाबींना प्राधान्य असले पाहिजे.
 
दरम्यान, फक्त ‘बिनपाण्याचा आंघोळीचा शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ एवढ्यावरच आपली उत्पादने सीमित करण्याची पुनीत यांची इच्छा नाही. आता ते ‘बिनपाण्याची टूथपेस्ट’ आणि ‘बिनपाण्याचा फेसवॉश’ तयार करण्याचादेखील विचार आणि संशोधन करत आहेत. सध्यातरी संबंधित भागात त्वचेची मृदुता राखण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी त्यांच्या उत्पादनांचे नाव सर्वत्र घेतले जात आहे. सध्यातरी ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ आपल्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसारासाठी गोळ्या-औषधांचे वितरण करणाऱ्यांच्या संपर्कात असून त्याद्वारेच लोकांपर्यत पोहोचत आहे. ‘क्लेन्स्टा’ची उत्पादने तयार करण्याकामी भारत आणि अमेरिकन अन्न-औषध व्यवस्थापनाच्या दिशानिर्देशांचे पालन केले जातेत्याचबरोबर उत्पादनांच्या संशोधनाकामी दिल्ली आयआयटीचेही सहकार्य घेतले जाते. आयआयटी आणि आयआयएमचे माजी विद्यार्थी कंपनीच्या सल्लागार मंडळात आहेत. डॉ. पुनीत गुप्ता यांच्या कोअर टीममध्ये भारतातील प्रतिष्ठित संस्था जसे की, कोलकाता आयआयएम, एफसीएस, दिल्ली आयआयटी आदींत शिकलेले पात्र माजी विद्यार्थी आहेत. ‘क्लेन्स्टा’च्या उत्पादनांवरुन आणि डॉ. पुनीत गुप्ता यांच्या कल्पकतेतून नेहमी नेहमी ‘आंघोळीच्या गोळी’चा ऐकलेला उल्लेख तर आठवतोच आणि तो ‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरल्याचेही पाहायला मिळते

Friday, 23 November 2018

‘पुलगावची’ पुनरावृत्ती टाळायची तर... - ब्रिगेडियर हेमंत महाजन



वर्ध्यातील पुलगाव दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटाने काही मुद्दे नव्याने उपस्थित झाले आहेत. या स्फोटाची सखोल चौकशी करून अशा प्रकारचे अपघात कसे टाळता येतील याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच या घटनेनंतर आता देशातील सर्वच दारूगोळा कारखाने, दारूगोळा भांडारे तसेच सीमेवर जिथे दारूगोळा साठवला जातो तिथे या अभ्यासातील उपाययोजना लागू करणे गरजेचे आहे. तरच अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल.
---------------------------------------------
वर्ध्यातील पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारामध्ये निकामी २३ एम एमचा खराब दारुगोळा नष्ट कऱण्याच्या फायरिंग रेंजमध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा नाहक बळी गेला. त्यातील पाच जण गावकरी होते. दारूगोळा घेऊन जाणार्या एका मजुराच्या हातातून भरलेला खोका खाली पडल्याने स्फोट झाला आणि ही जीवितहानी झाली. यासंदर्भात अनेक उलटसुलट आणि चुकीची माहिती प्रसारित झाली. यामध्ये सदर अपघाताला भारतीय लष्कर जबाबदार होते असे म्हटले होते. लष्कराने खराब दारूगोळा नष्ट करण्यासाठी खासगी कंत्राटदार आणि अप्रशिक्षित मजुरांकडून करून घेतले असल्यामुळे हा अपघात झाला, असेही यामध्ये म्हटले होते. थोडक्यात, युद्ध तरबेज लष्करच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे म्हटले गेले. मात्र ही सर्व माहिती साफ चुकीची आहे.
या अपघाताशी भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही. खराब दारूगोळा नष्ट कऱण्याचे काम हे जबलपूर येथील खमरिया आ़युध निर्माण कारखान्याचे() अधिकारी करत होते. दारूगोळा बनवणार्या कारखान्याकडे दारूगोळा नष्ट करण्यासाठी रेंज किंवा रिकामी जागा असते. मात्र एका ठराविक मर्यादेबाहेर दारूगोळा नष्ट करावा लागतो तेव्हा मोठ्या आणि अत्याधुनिक रेंजची गरज असते. अशी रेंज फक्त पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडारातच उपलब्ध आहे. म्हणूनच खमरिया आयुध निर्माण कारखान्यातील खराब 23 मिलीमीटर बॉम्ब निकामी करण्याचे कार्य पुलगावच्या रेंजमध्ये केले जात होते.
दुसरे, दारूगोळा निर्माण कारखाना हा लष्कराच्या अंतर्गत येत नाही; ते संरक्षण उत्पादन मंत्रालयाअंतर्गत येते. त्याचा सैन्याशी थेट संबंध काहीही नाही. जबलपूरच्या आयुध निर्माण कारखान्याने त्यांचे काही अधिकारी आणले होते हे खरे आहे; पण गाडीतून दारूगोळा उतरवण्याचे आणि फायरिंग रेंजपर्यंत नेण्याचे काम मात्र मजूरच करतात. हीच पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. इथे मजुरांद्वारे दारुगोळा गाडीत भरणे, उतरवणे आणि निकामी करण्यासाठी रेंजवर नेणे अशी कामे केली जातात. मात्र दारूगोळा प्रत्यक्ष निकामी(डिमोलीशन करण्याचे) करण्याचे काम प्रशिक्षित कर्मचारी किंवा अधिकार्यांकडूनच केले जाते. अनेक वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात पायोनिर कोअरनावाचा एक विभाग होता. या विभागामार्फत दारूगोळा गाडीत भरणे आणि खाली करणे ही कामे करण्यात येत असत. सैन्यकपातीमध्ये पायोनिअर कंपन्या सैन्यातून कमी करण्यात आल्या. कारण ते काम मर्यादित काळात म्हणजे लढाईच्या प्रसंगीच असायचे. कारगीलच्या लढाईत सुद्धा सैन्याला उच्च शिखरावर दारूगोळा नेण्यासाठी पायोनियर कंपन्या उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी तात्पुरत्या पोर्टर कंपन्यांचा(काश्मिर मधले दारुगोळा नेणारे मजुर) आधार घेण्यात आला. काश्मिरी युवकांचा वापर दारुगोळा पोहोचवण्याचे काम करण्यासाठी झाला होता.
ताज्या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अशा प्रकारे दारूगोळा निकामी करताना होणारी जीवितहानी टाळण्यासाठी काय उपाय योजता येतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे दारूगोळा धोकादायक कधी ठरतो आणि ते कसे निकामी करता येईल हे पहावे लागेल. प्रत्येक दारूगोळ्याचे एक आयुष्यमान असते. त्या काळात जर तो दारूगोळा वापरला गेला नाही किंवा मुदत संपून गेल्यानंतर तो निकामी करावा लागतो. एखाद्या दारूगोळ्याची चाचणी करताना अपघात झाला तर त्या बॅचमधील सर्व दारूगोळा बाहेर काढून त्याचे पुनर्परिक्षण केले जाते आणि पूर्ण बॅच धोकादायक वाटली तर पूर्ण बॅच एकदमच नष्ट केली जाते. अशा प्रकारे धोकादायक दारूगोळा ज्या युनिटमध्ये असेल तिथुन कारखान्यात किंवा दारूगोळा भांडारात परत आणला जातो. अनेक महिने तो तसाच ठेवला जातो. संरक्षण मंत्रालयाच्या परवानगी नंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. म्हणूनच धोकादायक दारूगोळा कमीत कमी वेळ भांडारामध्ये किंवा कारखान्यात ठेवला पाहिजे. अन्यथा अपघाताची शक्यता अधिक वाढते. लौकर परवानगी देण्याचे काम संरक्षण मंत्रालयाचे आहे.
दोन वर्षापुर्वी पुलगावच्या कारखान्यात अशाच धोकादायक दारूगोळ्यामुळे अपघात झाला होता. हा दारूगोळा वर्षभर भांडारात पडून होता आणि तिथे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात झाला. म्हणूनच धोकादायक दारूगोळा निकामी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने  वेळ न घालवता लवकर घेतला पाहिजे. जेणेकरून धोका कमी होऊ शकतो. दारूगोळा भांडारातून गाडीत भरून रेंजवर घेऊन जाताना तो वाटेत पडल्यामुळेही काही वेळा पडल्याने अपघात होऊ शकतात. हे लक्षात घेता शक्य असल्यास यंत्रमानवाचा वापर करणे गरजेचे आहे. काही देशांत या कामासाठी रोबोटचा वापर केला जातो. मजुरांची गरज टाळता येणार नाही तिथे संभाव्य स्फोटांपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक प्रोटेक्टिव सूट देणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघात झाला तरी जीवितहानी टाळण्यास मदत होईल.
प्रगत देशांमध्ये दारूगोळा नष्ट करताना तो जमिनीच्या खोलवर आत गाडून केला जातो. म्ह्णुन खड्डे खोल खणले पाहिजे. जिथे दारूगोळा नष्ट केला जातो तिथे एक रूग्णवाहिका ठेवणे सक्तीचे असते पण पुलगावच्या अपघातस्थळी रूग्णवाहिका नसावी. त्यामुळे जखमी मजुरांना रूग्णालयात पोहोचवण्यासही उशिर झाला असावा. त्यामुळे रेंजजवळ डॉक्टर, प्रथमोपचार, रूग्णवाहिका असणे गरजेचे आहे.
एकंदरीत पाहता, ह्या निष्काळजीपणाची जबाबदारी खमरियाच्या दारूगोळा भांडाराची आहे.  त्यामुळे ज्या गावकर्यांचे प्राण गेले त्यांना भरपाई देण्याची जबाबदारी दारूगोळा भांडार आणि पर्यायाने संरक्षण मंत्रालयावर आहे.
दारूगोळा भांडाराच्या आसपास अनेक धोकादायक गोष्टी घडताना दिसतात. उदाहरणार्थ,. महाराष्ट्रातील देहूरोड जवळच्या दारूगोळा भांडार कारखान्यात कितीतरी स्फोटक पदार्थ साठवून ठेवले आहेत.या परिसरात एक ते दीड किलोमीटर परिसरात कोणतेही बांधकाम करायला परवानगी नाही. कारण अपघात झाल्यास आजूबाजूच्या परिसरातल्या घरांना, लोकांना धोका पोहोचू शकतो. सुरक्षा परिसर हा स्फोटकांच्या क्षमतेवर ठरवला जातो. या परिसरात बांधकाम होऊ शकत नाही. पण राजकीय दबाव किंवा बांधकाम क्षेत्राचा दबाव यांमुळे सुरक्षा परिसरातही बांधकाम झाल्याचे पहायला मिळते. हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक आहे. भविष्यात एखाद्या मोठ्या धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे पुलगाव मधील स्फोटाची सखोल चौकशी करून अशा प्रकारचे अपघात कसे टाळता येतील याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर देशातील सर्वच दारूगोळा कारखाने, दारूगोळा भांडारे तसेच सीमेवर जिथे दारूगोळा साठवला जातो तिथे या अभ्यासातील उपाययोजना लागू करणे गरजेचे आहे. हाच पुलगावच्या अपघाताचा धडा आहे.




26/11-एनएसजी कमांडोंची थरारक कारवाई-BRIG HEMANT MAHAJAN


२६ नोव्हेंबर २००८: मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम
नॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो
२६ नोव्हेंबर २००८ ला  मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणी ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो करता नॅशनल सिक्युरिटी गार्डला (एनएसजी)  बोलवण्यात आले. एनएसजी दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजतामुंबईत पोहचले.कृतीदल; ५१ व ५२ विशेष कृती गटांतून(५१,५२ Special Action Group)आलेल्या, भारतिय सैन्याच्या १९५ सैनिकांचे बनलेले होते.
सुरुवातीला दक्षिणमुंबईतील ताज पॅलेस आणि ओबेरॉय-त्रीडेंट यांना लक्ष् बनविण्यात आल्याचे लक्षात आले. मुंबई पोलिसांनी घटनेच्या सुरुवातीची दिलेलीमाहिती ही असमाधानकारक होती. नंतर नरिमन हाऊस या तिस-या ठिकाणीही दहशतवादी असल्याची खात्री झाली. त्यामुळे कार्यदलाला तीन गटात विभागण्यात आले.
नरीमन हाऊसच्या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांना पकडणसाठी ताज येथील दोन निशाणबाज तुकड्यांना नरीमन हाऊसला पाठविणत आले.व्यूहरचना धक्कादायककृतीद्वारे दहशतवाद्यांना निरस्त करण्याची होती.याकरता शिरकावाच्या आणि डावपेचात्मक हाताळणीच्या निरनिराळ्या पद्धतींचा वापर करण्यात आला.शॉकऍक्शनद्वारा विविध पद्धतींचा व व्यूहरचनांचा वापर दहशतवाद्यांना निष्फळ करण्यासाठी वापरणत आला. वरच्या मजल्यावरुन खाली उतरण्याचा अभिनव मार्ग अवलंबण्यात आला.छोट्या शस्त्रांनिशी जबरदस्त फ़ायर करुन दहशतवाद्यांना जागीच खिळवून टाकण्यात आले.प्रत्येकी पाच कमांडोच्या हीटटीम्स् होत्या.
ताज टॉवर्स आणि ताज पॅलेस हॉटेल येथील कारवाई
ताज पॅलेस हॉटेलच्या  प्रत्येक मजल्यावरील कॉरीडोअरची लांबी ही सरासरी ८४० फुट आहे, हॉटेलची एकूण लांबी सरासरी १.८० किलोमीटर आहे. एकूण परिसर ४९,१४०० चौरस फुट होता. ३३० स्युट, प्रत्येक  मध्ये २-३ खोल्या जनरेटर संयंत्रासिंहत, १४० अतिरिक्त खोल्या, इत्यादी. याप्रमाणे १७ मजले होते. ताज टॉवर्स मध्ये  २१ मजल्यांवर एकूण  ३२३खोल्या होत्या.
कारवाईतील अडचणी
एका खोलीत जाणे आणि शोध घेणे याला कमीत कमी ४ ते ५ मिनीट लागतात. ५०० खोल्यांसाठी ३३-४० तास म्हणजे एकट्या ताज टॉवर्ससाठी ५०-६३ तास लागले. इमारतीमध्ये फक्त १९२ एसएजी कमांडो कारवाई करत होते. कारवाईचा मोठा परिसर असल्याने पाहुणे आणि नागरिकांची सुरक्षा करणे अवघड होती. ताजच्या ग्रॅनाईट भींतीमुळे रॉकेट फायर निष्प्रभ होते त्यामुळे ते वापरण्यात आले नाही.  एकच मार्ग होता, स्फ़ोटके वापरुन दारे तोडणे. मर्यादित हॉटेल कर्मचाऱ्यांची उपलब्धता, कॉरिडोअरमधील छोट्या खोल्यांचा वापर लपण्यासाठी करण्यात आला आहे का याची माहिती नव्हती. खोल्यांमधील प्रकाशाचा अभाव आणि आतील बाजूने पडदे टाकण्यात आले होते. हॉटेल निवासी घाबरले होते आणि दरवाजा वाजविल्यावर अथवा आवाज दिल्यावरही ते त्यांची ओळख सांगत नव्हते. काही निवासींनी खोलीच्या बाहेर येणे सुरू केल्यानंतर त्यांना दहशतवाद्यांनी गोळी झाडली होती. ही घटना वाऱ्यासारखी त्वरीत पसरली आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांना खोल्यांमध्येच राहण्याचा सल्ला दिला.
२७ नोव्हेंबरला ९.२० वाजता एनएसजीने मारकोसकडून (एमएआरसीओएस) कार्य हाती घेतले आणि हॉटेलच्या मांडणीची योजना मिळवली. पहिल्यांदी ताज चेंबर्स व रेस्टॉरंट सुरक्षित करण्यात आले. ताज पॅलेसमध्ये तळमजला सुरक्षित करण्यात आला आणि कारवाईचा पाया तेथे स्थापन करण्यात आला. जिन्याने छतावर जाऊन वरून-खाली कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी ताज मध्ये असल्याचे निदर्शनास आले होते. मजले सुरक्षित करित असतांना पहिल्या मजल्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता. कॉरिडोअरच्या डाव्या कोपऱ्यातून दोन दहशतवादी गोळ्या झाडत होते. पहिल्या मजल्यावर जात असतांना एक एसएजी कमांडो जखमी झाला होता. त्याला मेजर संदीप उन्निकृष्णन यांनी तळमजल्यावर ओढत आणले आणि त्याच्या गटाला तेथेच थांबण्यास सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार करत स्वत: तेथील जबाबदारी घेतली होती. त्याक्षणी अनपेक्षितपणे पहिल्या मजल्याच्या कॉरीडोअरच्या उजव्या कोपऱ्यातून दोन दहशतवाद्यांनी गोळीबार करित मेंजर उन्निकृष्णनला जखमी केले होते. दहशतवाद्यांना मारतांना मेजर उन्नीकृष्णन जखमी झाले. ते पुढे या जखमांमुळेच मृत्यूमुखी पडले.
पहिल्या मजल्यावरील वसबी रेस्टॉरंटजवळ तीन दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. लाकडी गोलाकार पायऱ्या आणि ग्रॅनाईटच्या भींतीमुळे एनएसजीच्या गोळीपासून ते सेफ़ होते. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आयडीज् स्फोट घडवून आणला आणि त्याचा परिणाम म्हणून शॉक वेवज्निर्माण झाल्या. त्यामुळे एका दहशतवाद्याने खिडकीतून उडी घेतली आणि त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. उर्वरित दहशतवादी रेस्टॉरंटमध्ये मरण पावले.
ओबेरॉय-त्रीडेंट येथील ऑपरेशन
येथे ११ मजले, प्रत्येक मजल्यावर ३३ खोल्या, तीन पातळ्यावर एकमेकांना जोडलेले तीन कॉरीडोअर होते.
ताज हॉटेलप्रमाणे दहशतवादी संख्या कोणालाच माहिती नव्हती. २६ नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांनी पाहुण्यांवर गोळीबार केल्यानंतर ते खोलीमध्ये लपून बसले होते. ते आपली जागा बदलतांना आणि एखाद्या ठिकाणी गोळीबार झाल्यास ते गोळीबार करत होते. ते १८५६ क्रमांकाच्या खोलीत लपून बसले होते. ती खोली मास्टर की वापरून उघडताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. एक दहशतवादी बाहेर पडून लिफ्टकडे जात असतांना कॉरिडोअरमध्ये मारण्यात आला आणि दुसरा बाथरुममध्ये लपून बसला. ओबेरॉय हॉटेल २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दहशतवाद्यांपासून सोडविण्यात यश मिळाले. सुरक्षिततेची प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेल २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हस्तांतरीत करण्यात आले.
नरिमन हाऊस येथील ऑपरेशन
नरिमन हाऊस हे दाट लोकवस्तीच्या शेजारी दक्षिण मुंबईत स्थित आहे. यहूदींचा निवास असणाऱ्या क्षेत्रात रहाणार्‍यांना तसेच कोणालाही आतील मांडणी बाबत माहिती नव्हती. निशाणा धरलेली तुकडी(Snipers) नरिमन हाऊसच्या आसपास तैनात करण्यात आली आणि बांधकाम सुरू असणार्‍या एका इमारतीत कमांड बेस स्थापित करण्यात आला. ती जागा नरिमन हाऊसमधून होणार्‍या गोळीबाराचे निरीक्षण करण्यास योग्य होती. इमारतीतील दहशतवाद्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या व त्याचे तुकडे जमीनीवर विखुरले होते. त्यामुळे कमांडोज् त्यावरून जातांना काचेच्या तुकड्यांचा आवाज होत असल्याने त्या आवाजाने दहशतवादी सतर्क होऊन कमांडोजला लक्ष करत होते.
इमारतीला सर्व बाजूंनी लोखंडी ग्रील होते आणि आतून पडदे टाकण्यात आले होते. मजल्यांना जोडणार्‍या पायर्‍या दहशतवाद्यांनी स्फोट करून उडवून दिल्या होत्या. लहान बाळाला घेऊन निसटलेल्या एका नोकराणीने सांगितले की, शेजारच्या व्यापार्‍याच्या घरात दहशतवादी स्थलांतरीत झाले आहेत. एका महिलेसहित सहा दहशतवादी आत असल्याचा अंदाज बांधला होता. अशा मिश्र माहितीच्या आधारे, शेजारील इमारतींची परवानगी घेऊन २७/२८ नोव्हेंबर मधील रात्रीत कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
हमला करणारा गट २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता हेलिकॉप्टरने इमारतीवर उतरला व सहकार्य करणारा दुसरा गट इमारतीवरून होणार्‍या गोळीबाराचे निरीक्षण करत होता. तालीम करण्यास अजिबात वेळ नव्हता. पहिल्यांदी सहावा आणि पाचवा मजला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आला आणि आठ वाजता चौथ्या मजल्यावर दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्यात आला होता.
हा तोच क्षण होता, जेव्हा हवालदार गजेंद्र सिंगने खोलीचे समोरील दार तोडून खोलीत प्रवेश केल्यावर आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर आयइडीच्या सहाय्याने दुसरा प्रवेश मार्ग तयार करण्यात आला. समोरील दरवाज्याने आणि फोडलेल्या भींतींतून समन्वयाने गोळीबार करण्यात येत होता आणि कमांडोज्‌नी आतमध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांना निष्फळ केले. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून २५ मिनीटांनी उद्देश सफल झाला.
आपण विसरता कामा नये
एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले आणि तीन ठिकाणांवरील मिळून एकूण ६१० बंधक/पाहुणे मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जखमी झाले.
मेजर संदीप उन्निकृष्णन्, ७ बिहार, ५१ एसएजी (मरणोत्तर) आणि हवालदार गजेंद्र सिंह, १० पॅरा (एसफ), ५१ एसएजी (मरणोत्तर) यांना देशांतील सर्वांत मोठे अशोक चकप्रदान करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडोसाठी ५१ आणि ५२ एनएसजीच्या विशेष कृती गटाला एक किर्तीचक्र, एक शौर्यचक्र, सहा सेना मेडल्स (वीरता), एक सेना मेडल्स (विशिष्ट्य) आणि एक सीओएएस स्थलसेनाध्यक्ष प्रशस्तिकार्डने गौरविण्यात आले.