Total Pageviews

Monday 30 April 2018

मोदींची चीन भेट!

भारत आणि चीन या दोन देशांच्या अर्थव्यवस्थांकडे दुर्लक्ष करता येईल अशी आजतरी जगाची स्थिती नाही. पूर्वीही ती होती असे नाही. पण, कायम या दोन्ही देशांमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्याहून संघर्ष उभा ठाकत असे आणि त्यामुळे जागतिक वातावरण कलुषित होई. मग कधी डोकलामसारखी स्थिती, तर कधी अरुणाचल प्रदेशवरून सीमा वाद आणि कधी दलाई लामांना दिलेल्या आश्रयाचा मुद्दा, हे मुद्दे सातत्याने उभय देशांमधील तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरत असत. अन्य देशांच्या बाजारपेठांमध्ये चिनी मालाची साठेबाजी करणे, अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड उलथापालथ करणे, लष्करी सामर्थ्याचा उपयोग करून शेजारी राष्ट्रांना वेठीस धरणे, तिबेट गिळंकृत करून तेथील लोकसंख्येचे प्रमाण बदलवणे, भारताशी ज्याचे कायम वैर आहे, त्या पाकिस्तानला पाठीशी घालणे आणि त्याला मदत करण्यावरूनही भारत आणि चीनमध्ये राजी-नाराजी चालत आली आहे. पण, नजीकच्या काही वर्षांत चीनबद्दलचा आकस कमी करण्याचे आणि त्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू, असे म्हणण्याची स्थिती आज राहिलेली नाही. उभय देशांमध्ये या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेच्या फेर्‍या होत आहेत. परराष्ट्र सचिव स्तरावरच नव्हे, तर इतरही आघाड्यांवर वैचारिक देवाणघेवाण या देशांमध्ये वाढली असून, व्यावसायिक आघाड्यांवर उभय देशांमध्ये मोठमोठे करार होत आहेत. नागपुरातच काम सुरू असलेल्या ‘आपली मेट्रो’ प्रकल्पात मेट्रोचे डबे चीनमधून तयार होऊन येणार आहेत. भारतात आजघडीला 500 हून अधिक चिनी कंपन्या निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत, हेच या देशाशी असलेले भारताचे संबंध किती विकसित झाले आहेत, हे सांगण्यास पुरेसे ठरावे.
 
 
भारत व चीन मिळून दोन अब्ज 60 कोटी लोकसंख्या आहे आणि ही प्रगतीची प्रचंड मोठी संधी आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 40 टक्के लोक भारत आणि चीनमध्ये मिळून राहतात. अशा वेळी दोन्ही देशांतील जनतेच्या व एकूणच जगाच्या भल्यासाठी काम करण्यास प्रचंड वाव दोन्ही देशांना आहे. दोन्ही देशांच्या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाकडे बघितले, तर या दोन्ही देशांनी जागतिक अर्थव्यवस्थेला कायम गती दिलेली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अर्थसत्तांनी सुमारे 1600 वर्षे जगावर हुकुमत गाजविली आहे. त्या काळी दोन्ही देश मिळून जगाची 50 टक्के अर्थव्यवस्था व्यापत होते आणि उर्वरित 50 टक्के अर्थव्यवस्था जगातील इतर सर्व देशांची मिळून होती. दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षांत नजीकची भागीदारी प्रस्थापित केली आहे आणि सकारात्मक प्रगतीही केली आहे. दोन्ही देशांचा प्रभाव जगात स्थिरपणे वाढतो आहे. अशी वैशिष्ट्ये जपणार्‍या उभय देशांचे राष्ट्रप्रमुख नरेंद्र मोदी आणि शी जिनिंपग यांच्यात दोन दिवसांची जी वैचारिक देवाणघेवाण सेंट्रल चायनीज सीटीत झाली, त्याचे अतिशय चांगले परिणाम निघाले असून, ही बैठक फलदायी ठरलेली दिसते आहे. सीमेवर शांतता आणि परस्परांबद्दल विश्वास वाढवण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे निर्देश मोदी आणि शी जिनिंपग यांनी आपापल्या देशांच्या लष्करांना दिले आहेत. भविष्यात डोकलामसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, असे आदेशही दिले आहेत. दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमा परिसरात शांतता राखण्यावर भर दिला आहे, याकडे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी लक्ष वेधले आहे. या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धिपत्रकानुसार, सीमा परिसरातील तणाव दूर करण्यासाठी संवाद आणि त्यासाठी असलेल्या यंत्रणा आणखी मजबूत करण्याचे आदेश दोन्ही नेत्यांनी भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींना दिले आहेत. शी जिनिंपग यांनी त्यांच्या लष्कराला शांतता राखण्याचे दिलेले निर्देश, हा एका अर्थाने भारताचा विजय ठरावा. कारण मिलिटरी कमिशनचे चेअरमन या नात्याने त्यांचे चीनच्या लष्करावर एकहाती नियंत्रण आहे. चिनी लष्कराच्या चिथावणीखोर कारवाईमुळेच डोकलाम वाद निर्माण झाला होता, हे सर्वविदित आहे. भारताने त्या वेळी कठोर भूमिका घेऊन आपले लष्कर मागे घेण्यास नकार दिल्यामुळे, चीनला नमावे लागले होते. पण, त्या कटुतेचा सेंट्रल चायनीज सीटीत झालेल्या उभय नेत्यांच्या चर्चेत कुठेही उल्लेख झाला नाही, ही या चर्चेची जमेचीच बाजू म्हणावी लागेल. भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करण्याची आगळीक चीन नेहमीच करीत आला आहे. जिनिंपग यांच्या आदेशामुळे त्या आघाडीवर शांतता नांदली, तर उभय देशांमधील देवाणघेवाणीला जो वेग आला आहे, त्याची गती वाढल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा ड्रॅगनच्या विश्वसनीयतेबाबत कायम उपस्थित होणारी शंका पुढच्या प्रवासासाठीचिंतेची बाब ठरल्याशिवाय राहणार नाही!
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौर्‍याची पार्श्वभूमी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चांगल्या प्रकारे करून ठेवली होती. पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनिंपग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठकीतील चर्चेच्या मुद्यांमुळे कटुता वाढणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात आली होती. वुहान हे चीनमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, चीनचे क्रांतिकारी नेते माओ झेडॉंग यांचे हे आवडते ठिकाण होते. त्यामुळेच भारत-चीन यांच्यातील शिखर बैठकीसाठी हे स्थान निवडले गेले. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला भविष्यात धोका कुणापासून आहे, असा प्रश्न उपस्थित केला तर त्यात दोनच देशांची नावे पुढे येतात. त्यात पहिले नाव आहे चीनचे आणि दुसरे नाव आहे भारताचे! यातील चीनने तर आतापासूनच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धडका देणे प्रारंभ केले आहे. भारतही माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, वस्त्रोद्योग, हॉटेल इंडस्ट्रीज आदी क्षेत्रात अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात करारबद्ध असून, या क्षेत्रात त्याने मोठा दबदबा निर्माण केलेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनेक भारतीयांनी अमेरिकेमध्ये आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले आहेत. अमेरिकेच्या राजकारणावरही भारतीयांचा प्रभाव जाणवू लागण्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीनचे मित्रत्वाचे संबंध वाढत असतील तर ते अमेरिकेसाठीच नव्हे, तर जगातील इतर प्रगत देशांनाही ‘बचके रहो’ असा संदेश देणारे ठरू शकतात! भारतापासून फटकून वागणारे इस्लामी देश आणि चर्चच्या पाठीराख्या देशांनाही बौद्ध तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असणारे हे देश आगळा संदेश देऊ शकतात. ऐतिहासिक वुहान परिषदेत बोलताना मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान अशा अनौपचारिक परिषदा ही परंपरा व्हायला हवी, असे व्यक्त केलेले मत त्यांच्या मनातील सकारात्मकता सांगून गेले. मोदी केवळ बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी 2019 मध्ये भारतात अशी अनौपचारिक परिषद घ्यायला आवडेल, अशी इच्छादेखील जिनिंपग यांच्याजवळ व्यक्त केली. त्यामुळे अशी परिषद भविष्यात भारतात पुन्हा होणार, याची सुनिश्चिती झाली आहे. एका अर्थाने मोदी यांचा हा दौरा एतिहासिक ठरला आहे. चीनच्या दृष्टीने भारत किती महत्त्वाचा आहे, याची प्रचीतीदेखील या दौर्‍याच्या निमित्ताने आली. शी जिनिंपग यांनी (चीनच्या) राजधानीबाहेर दोनदा मोदींचे स्वागत करून, त्यांच्या कृतीतून हे पटवून दिले. शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांमधील अनौपचारिक बैठका महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठराव्या, ही अपेक्षा...

Sunday 29 April 2018

माओवाद्यांचा कैवार घेणाऱ्यांसाठी काही प्रश्‍न- प्रभात वृत्तसेवा



 -
April 29, 2018 |
37 माओवादी नक्‍सली दहशतवादी मारतांना पोलिसांना कशी ईजा झाली नाही?’ असा प्रश्‍न काही तथाकथित बुद्धिवादी?’ संशयात्मा विचारताहेत, त्यांना घट्ट व मठ्ठसामान्यजनांचे प्रतिप्रश्न
या आधी माओवाद्यांच्या हल्ल्यात जे अनेक पोलीस किंवा सुरक्षा दलांचे जवान मारले गेलेत त्यावेळेस, माओवाद्यांना ईजा कशी झाली नाही? हा प्रश्‍न तुम्ही विचारला होता काय? तसेच, माओवाद्यांच्या हल्ल्यात 76 जवान मारले गेल्यावर तुम्ही आनंदोत्सवकरता, मग अशा अतिरेक्‍यांना मारल्यावर देशप्रेमी जनतेने आनंद व्यक्त केला तर तुम्हाला दु:ख का होतेय? माओवादी अतिरेकी हे तांडा, पाडा किंवा गावांमध्ये अचानकपणे जाऊन अनेक निरपराध निःशस्त्र लोकांची सर्वांसमोर हत्या करतात किंवा पोलिसांना बेसावधपणे घेरून अचानक हल्ला करून त्यांना मारतात त्यावेळेस तुमची दातखीळ का बसते?
माओवाद्यांच्या मानवी हक्‍कांविषयी, न्यायाविषयी तुम्ही बोलता,मग तेच मानवी हक्‍क, न्याय हे निरपराध दलित, आदिवासी, वनवासी, गिरीवासी, पोलीस, सुरक्षा दलातील जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना लागू नाहीत का? प्रतिक्रियेमध्ये संरक्षण करतांना आक्रमक शत्रूचे नुकसान झाले तर त्याला दु:ख होते, त्याप्रमाणेच तुमचे वागणे आहे व म्हणूनच तुम्ही या देशाचे शत्रू आहात असे कुणी म्हटले तर?

द ऑल न्यू जीमेल-TARUN BHRAT


जीमेलही सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरली गुगलची ई-मेल सेवा. बदलती वेळ आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे गुगलने गेल्या काही काळात अनेक बदल केले आहेत. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल करून, ते अधिक सुलभ करण्यावर भर देत, आता जीमेलमध्येही काही नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिक युझर फ्रेंडली जीमेलअनुभवायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने युझर्सच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. गुगलमध्ये काय बदल झाले आहेत हे आपण पाहूयात.



सर्वप्रथमजीमेलअकाऊंटच्या सेटिंग्समध्ये जाऊन, ’ट्राय न्यू जीमेलया ऑप्शनवर क्लिक केल्यास, आपल्याला जीमेलचे नवे रूप पाहता येणार आहे. जीमेलमध्ये कोणत्याही ई-मेलवर कर्सर आणल्यास मार्क रेड, आर्काइव्ह, डिलिट आणि सून्झहे ऑप्शन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये सून्झहा नव्याने देण्यात आलेला पर्याय आहे. एखादा विशिष्ट मेल विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी पाहायचा असेल, तर ती वेळ आणि तारीख याद्वारे आपल्याला सेट करून ठेवता येऊ शकते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट वेळेलाच तो मेल आपल्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये दिसणार आहे. यापूर्वी केवळ पाठवण्यात येणार्‍या ई-मेलसाठी उपलब्ध होती. मात्र, यापूर्वी हा ऑप्शन केवळ मेल पाठवण्यासाठी देण्यात आला होता.



तर नव्या जीमेलमधील आणखी एक फीचर म्हणजे जीमेलच्या इनबॉक्समध्ये कीप, टास्क आणि गुगल कॅलेंडरसारखे काही ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या ऑप्शन्सचा वापर करून आलेल्या ई-मेल्सनुसार आपल्याला कामाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. एखादी विशिष्ट नोंद करण्यासाठी कीपचा तर आठवड्याभरातील किंवा दिवसभरातील करायच्या कामांची यादी टास्कया ऑप्शनच्या माध्यमातून करता येणार आहे.



नव्या अपडेटमध्ये हाय प्रोफाईल नोटिफिकेशनचे फीचर देण्यात आले आहे. याचाच वापर करून, नोटिफिकेशनचा फिल्टर सेट करता येणार आहे. या फीचरमुळे आपल्याला येणार्‍या महत्त्वाच्याच मेलचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याला सततचे येणारे नोटिफिकेशन्स ९७ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचा दावा गुगलने केला आहे, तर आणखी एक नवे फीचर म्हटले, तर यात डिफॉल्ट, कॉम्पॅक्ट आणि कम्फर्टेबल असे नवे तीन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याचा वापर करून, आपल्याला आलेल्या मेलमध्ये कोणती अटॅचमेंट आहे किंवा नाही हे आपल्याला मेल न उघडताच पाहता येणार आहे, तर कम्फर्टेबलया ऑप्शनचा वापर केल्यास, पूर्वी वापरत असलेल्या जीमेलनुसारच अटॅचमेंट पाहता येणार आहेत. अनेकदा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते किंवा इंटरनेटचा स्पीड कमी असतो. त्यामुळे जीमेलवापरण्यात अडथळे येत असतात. अगदी ही बाब हेरत जीमेलचे नवे ऑफलाईन व्हर्जनदेखील उपलब्ध होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना, ऑफलाईन पद्धतीने जीमेलच्या सेवेचा वापर करता येणार आहे. यापूर्वीही या सेवेचा लाभ मिळत असला, तरी आता या सेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मेल सिंक करण्यात येणार असून, इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर तो मेल अपलोड होणार आहे. आपण कामात व्यस्त असताना अनेकदा वेळेअभावी रिप्लाय देत नाही. यावरही गुगलने एक नवा पर्याय शोधून काढला आहे. ओके, थँक यू!अशा शब्दांचे पर्याय गुगलने दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक शब्द टाईप करत बसण्याची गरज नाही. कामात व्यस्त असतानाही गुगलने दिलेल्या पर्यायांचा वापर करून रिप्लाय देणे शक्य होणार आहे, तर आपल्या कम्प्युटर, लॅपटॉपवर जीमेलवापरताना आपल्याला नवनव्या थीम्सचा पर्याय देण्यात येणार आहे, तर आपल्या जीमेलच्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्येही काही बदल करण्यात आले आहे. याद्वारे आपल्या जीमेलमध्ये आपण सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्‌स हे आपल्याला एखाद्या व्हिजिटींग कार्डप्रमाणे दिसणार आहेत. काळाप्रमाणे बदल करण्याची गुगलची परंपराच राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही नवे फीचर्स अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे

नक्षल-उच्चाटनासाठी नव्या व्यूहरचना..


महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड या अतिदुर्गम तालुक्यातील कसनसूर जंगल परिसरात नुकत्याच उडालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत 40 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. यात कुख्यात नक्षली साईनाथ आणि श्रीनु उर्फ श्रीकांत याचाही समावेश आहे. या दोघांवरही प्रत्येकी 16 लाखांचे बक्षीस होते. कसनसूर-बोरिया हा भाग नक्षल्यांचा आराम करण्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कारण, या भागाला लागून तीन राज्यांची हद्द आहे. शिवाय भामरागडजवळ तीन नद्यांचा संगमही आहे. म्हणून या भागावर नक्षल्यांची अलीकडे विशेष नजर होती व या भागात सतत गस्तही सुरू होती. आपली स्थानिक गुप्तवार्ता यंत्रणाही त्यांनी सक्षम केली होती. पक्की माहिती मिळताच, सी-60 आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बटालियन-9 ने नक्षल्यांना दोन बाजूने वेढा घातला असता, नक्षल्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही चौफेर मारा करीत नक्षल्यांना टिपले. त्यात अनेक ठार झाले तर मोठ्या संख्येत जखमी झाले. पहिल्या दिवशीच्या शोधमोहिमेत 16 प्रेते हाती लागली. यात साईनाथ आणि श्रीकांत हे दोघेही होते. पण, नंतरच्या दोन-तीन दिवसांत काही प्रेते नदीच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसल्यावरून ती बाहेर काढण्यात आली. लगोलग दुसर्‍या एका चकमकीत आणखी सहा नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही प्रेते सापडत आहेत. पण, या दोन्ही चकमकीत आतापर्यंत 40 नक्षली ठार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याच महिन्यात 3 एप्रिल रोजी तीन नक्षल्यांना ठार मारण्यात आले होते. सोबतच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात इपेंटा गावाजवळ चकमक उडून पोलिसांनी आठ नक्षल्यांना टिपले. हा भाग तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर येतो. दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी ही संयुक्त कारवाई केली. गेल्याच महिन्यात बिजापूर येथेच दहा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. याचा अर्थ, गडचिरोली 43 आणि छत्तीसगड 18 असे मिळून 61 नक्षल्यांना ठार मारण्यात आले. बिजापूरमधील कारवाईत 7 रॉकेट लॉंचर्स, हातबॉम्ब, रायफली जप्त करण्यात आल्या. गडचिरोलीतील कारवाईतही मोठा शस्त्रसाठी जप्त झाला.


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या एकाही जवानाला साधी इजादेखील झाली नाही. यापूर्वी चकमकी व्हायच्या, नक्षलवादी मरायचे पण त्यात आमचेही काही जवान शहीद व्हायचे. पण, गडचिरोली आणि बिजापूरच्या घटनेत अशी कोणतीही घटना न घडल्याने नक्षल-उच्चाटनाकरिता नव्या व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि हे संकेत चांगले आहेत. देशात पाच वर्षांपूर्वी 126 जिल्हे नक्षलप्रभावित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यातील 44 जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. सोबतच सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 35 वरून 30 वर आली आहे.


मोदी सरकार आल्यानंतर ज्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात त्यात मोठ्या संख्येने भाजपाची सरकारे आली. मोदींच्या काळातच आदिवासी जिल्ह्यांचा विकास आणि नक्षल्यांचे उच्चाटन अशा दुहेरी पातळीवर योजना आखण्यात आल्या आणि आज त्याची चांगली फळे दिसत आहेत. शेकडोंच्या संख्येने नक्षलवादी शरण आले आहेत. त्यात काही नक्षलवादी हे अनेक गुन्ह्यांत सहभागी होते. त्यांचीही चांगली मदत होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात जी माहिती मिळाली, ती याच शरण आलेल्या नक्षल्यांकडून. ही बाब नक्षल्यांच्या नेत्यांनीही मान्य केली आहे. आता या घटनेला अपेक्षेनुसार फाटे फोडले जात आहेत. शहरी नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. पोलिसांचे वाढते मनोबल खच्ची करण्यासाठी ते वेगवेगळ्या कहाण्या रचत आहेत. काही नक्षली कमांडरचे म्हणणे आहे की, नक्षल्यांना गावकर्‍यांकडून विष पाजण्यात आले आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आले, तर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्याने विषप्रयोगाचा मुद्दाच पुढे आणलेला नाही. त्याचे ठासून सांगणे आहे की, शरण आलेल्यांचे संपर्क असल्याने त्यांनीच आमची माहिती पुरविली. मी माझ्या 22 वर्षांच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येत नक्षली मारले जाण्याची घटना पाहिली नाही. तिकडे गटेपल्लीच्या काही गावकर्‍यांना नक्षल्यांनी भडकावले आहे. गावकरी म्हणतात की, आमचे आठसदस्य बेपत्ता आहेत. त्यात पाच मुली आहेत. गावकर्‍यांना सर्व प्रेते दाखविण्यात आली. त्यात त्यांचा कुणीही सगासोयरा नव्हता. तर दुसरीकडे गटेपल्लीच्याच एका ग्रामस्थाने सांगितले की, हा आरोप खोटा आहे. कुणीही नक्षलवाद्यांसोबत गेले नाही. त्यांनीच काही लोकांच्या मदतीने इंद्रावती नदीतून प्रेते बाहेर काढण्यास मदत केली. आतापर्यंत ओळख पटलेल्या 18 प्रेतांना गावकर्‍यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गटेपल्ली हे, मारला गेलेला नक्षली कमांडर साईनाथ याचे मूळ गाव आहे, हे विशेष! त्यामुळे या गावाकडे अधिक लक्ष पुरवावे लागणार आहे. गडचिरोलीतील घटनेमुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही अस्वस्थता आहे. वाचकांना स्मरतच असेल की, ज्या वेळी सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांच्या मोठ्या हल्ल्यात 75 जवान शहीद झाले होते, त्या वेळी जेएनयुच्या देशविरोधी विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला होता. नंतर उमर खालीद, कन्हय्या आणि त्याच्या साथीदारांनी देशविरोधी घोषणा दिल्यानंतर त्यांचे समर्थन करण्यासाठी राहुल गांधी तेथे गेले होते. 

भीमा-कोरेगावमधील घटनेतही नक्षल्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. हा उमर खालीद भीमा-कोरेगावच्या कार्यक्रमात उपस्थित होता. म्हणून प्रकाश आंबेडकर वारंवार मागणी करीत आहेत की, अटक केलेल्या सर्वांना सोडून द्या. प्रकाश आंबेडकरांचाही नक्षली चळवळीला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे आणि ही बाब त्यांनीच मान्यही केली आहे. न्या. कोळसे-पाटलांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळेच आता काही नक्षलसमर्थक लोक पोलिसांना लक्ष्य करण्याची खेळी खेळत आहेत. पोलिसांनी सर्व प्रेतांचा व्हिसेरा सुरक्षित ठेवला आहे. सर्वांचे पोस्टमॉर्टमही झाले आहे. काहींची ओळखही पटली आहे. हा सर्व घटनाक्रम पाहिला, तर पोलिसांनी आपले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावल्याचेच लक्षात येते. जंगली नक्षलवादासोबतच शहरी नक्षलवादाचीही पाळेमुळे खणून काढण्याची आज नितान्त गरज आहे. कारण, हेच लोक नक्षल्यांना आश्रय आणि रसद पोचविण्याचेही छुपे काम करीत असतात. अशा लोकांना हुडकून काढण्यासाठी स्थानिक गुप्तवार्ता यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सुकमामधील दोन घटनांनंतर नक्षली चळवळीचा खात्मा करण्यासाठी व्यापक योजना आखण्यात आली होती. आपले कोणतेही नुकसान न होता, उद्देश तर सफल होईल, अशी व्यूहरचना आखण्याच्या सूचना त्या वेळी करण्यात आल्या होत्या. त्याला आता चांगले फळ येत आहे. गडचिरोली आणि बिजापूरमधील घटना यशस्वीपणे हाताळणार्‍या पोलिस दलांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

Saturday 28 April 2018

स्त्री अत्याचाराची कारणे आणि उपाय!-PRAHAR-WOMENS SECURITY


सेन्सॉर बोर्ड ज्या प्रकारच्या उत्तान सिनेमांना मंजुरी देत आहे ते लक्षात घेता, भविष्यात समाजातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा अधिकच दूषित होत जाणार यात दुमत नाही. ईलतेची विषवल्ली भारतासारख्या आध्यात्मिक देशातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा कलुषित करत सुटली आहे.
अल्पवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत समाजातील या सर्वच थरातील स्त्री तिच्यावरील अत्याचाराने पिचली जात आहे. या सर्व गोष्टींचा अंत कधी होणार? असा प्रश्न पडतो. सरकारी यंत्रणा त्यांच्यापद्धतीने या जटील समस्येवर उपाययोजना शोधून काढेपर्यंत वाट पाहात बसण्याचे आजचे दिवस नाहीत. स्त्रियांचे शोषण करणा-या नराधमांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडवून आपली दहशतच समाजात निर्माण केली आहे. त्यांना कसलाच धाक नसल्याचाच हा परिपाक आहे. समाजात ईलता पसरवणा-या गोष्टींचा बिमोड करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण, त्या ईलतेचा त्रास समाजातील असंख्य स्त्रियांना सोसावा लागत आहे. बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण या महिलांविषयीच्या अपप्रकारांत देशात प्रतिदिन वेगाने वाढ होत आहे. या अपप्रकारांचे कुळ आणि मूळ हे ‘तीव्र कामवासने’त आहे. या सूत्राच्या मुळाशी आपण गेलो असता लक्षात येईल की, वासना भडकवणारे चित्रपट, विज्ञापन आणि समाजमाध्यमे यांतून मोठय़ा प्रमाणावर ईल गोष्टींना उत्तेजन दिले जात आहे. सेन्सॉर बोर्ड ज्या प्रकारच्या उत्तान सिनेमांना मंजुरी देत आहे ते लक्षात घेता, भविष्यात समाजातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा अधिकच दूषित होत जाणार यात दुमत नाही. ईलतेची विषवल्ली भारतासारख्या आध्यात्मिक देशातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा कलुषित करत सुटली आहे. जेव्हापासून इंटरनेटचा पसारा वाढला आहे, तेव्हापासून तर सामाजिक वातावरण वेगाने दूषित झाले आहे. जेथे चित्रपटात उत्तान भूमिका करणा-या अभिनेत्रीस समाज डोक्यावर घेतो, तेथेच लक्षात येते की, समाजात ईलतेने आपली पाळेमुळे किती घट्ट रुजवली आहेत.
मुलींना कपडे कसे घालावे, हे सांगण्यापेक्षा पुरुषांनी आपले विचार बदलावे असे नेहमी सांगितले जाते. वारंवार चर्चिल्या जात असलेल्या या सूत्राच्या आनुषंगाने सांगावेसे वाटते की, स्त्रियांसाठी समाजातील प्रतिदिन दूषित होत चाललेले वातावरण पाहता विषाची परीक्षा घेऊन स्त्रीने संकटाच्या जबडय़ात स्वत:हून चालून जाऊ नये. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे म्हटले जाते. ते शहाणपण आपल्यात आल्यास आपलेच शील रक्षण होणार आहे. या सूत्रावरून निर्थक वाद घालण्याचा काळ आता राहिलेला नाही. स्त्रीकडे वाकडय़ा नजरेने पाहणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्याकडून त्यासाठी खतपाणी घातले जात नाही ना. याचाच विचार महत्त्वाचा आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या पेहरावाबाबत विचारले असता त्यांचे सांगणे असते की, तिच्या अन्य मैत्रिणीही असेच कपडे घालतात. मग तिलाही ‘मॉडर्न’ राहावेसे वाटते. नाहीतर ते तिला ‘काकूबाई’ म्हणून चिडवतात. अंगभर कपडे घातले म्हणून कोणी काकूबाई होत नाही आणि मॉडर्न कपडे परिधान केले म्हणून कोणी ‘स्मार्ट’ होत नाही. समाजातील बिघडलेले वातावरण लक्षात घेऊन आपल्या पेहरावात सुधारणा करण्याविना आता तरी पर्याय उरलेला नाही. हे सत्य जाणा. घातक वायू प्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी तोंडाला ‘मास्क’ बांधले जाते. मास्क बांधल्यावर लोक काय म्हणतील, याचा विचार करून प्राथमिक सुरक्षेचा उपाय जे टाळतात, त्याचा फटका मास्क न वापरणा-यांना जटील शारीरिक त्रासांच्या माध्यमातून बसतोच बसतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील नागरिकांना याचा उत्तम अनुभव आहे.
याच सूत्राचा पेहरावाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचे गांभीर्य लक्षात येईल. शाळा, महाविद्यालये ते विविध कार्यालयांतील मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणांच्या भानगडी लक्षात घेता समाजातील व्यक्ती यातील मुलींवरील कठीण प्रसंगी साहाय्यास जाण्यास इच्छुक नसतात; कारण प्रेमाच्या नावाखाली काय चालू असते हे समाजाला ज्ञात आहे. त्यामुळे पालकांनीच आपल्या पाल्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यांना अवास्तव स्वातंत्र्य देणे म्हणजे धोका पत्करणे होय. शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हटले जाणे यासारखा शुद्ध अडाणीपणा तो कोणता? आपला विवाह योग्य जोडीदाराबरोबर व्हावा, हे आपल्यापेक्षा आपल्या पालकांना नेहमी वाटत असते. त्यासाठी ते आपणास बालपणापासूनच तळहातावरील फोडाप्रमाणे जपत असतात. प्रसंगी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देत आपणास काही कमी पडू देत नाही; पण जेव्हा एवढे करूनही आपले पाल्य भरकटल्याचे इतरांकडून कळते तेव्हा सर्व केलेल्यावर पाल्याने पाणी फेरल्याचा धक्का त्यांना बसतो. शिक्षणाच्या वयात शिक्षणच घेतले, तर त्याचा अखंड आयुष्यभर फायदा होत राहतो.
समाजावर  बॉलिवूड चित्रपट जगताचा प्रचंड पगडा आहे. नायक- नायिका म्हणजे आपले जीवन घडवणारे ‘गुरू’च या आविर्भावात त्यांचे गोडवे गायले जातात. बहुतांश चित्रपटांमधून जे चुकीचे पेरले गेले, तेच आज समाजात भरघोसरीत्या ईलतेच्या रूपाने उगवले आहे. चांगल्या गोष्टींचे आकलन होण्यास नेहमीच विलंब लागतो; पण वाईट कृत्य मात्र चटकन अंगीकारली जातात. चित्रपटांमध्ये नायक-नायिका यांच्यात प्रेम प्रकरण दाखवल्याविना तो चित्रपट पूर्ण होत नाही. नायक आपल्या नायिकेसाठी काय काय करतो हे सध्याच्या युवकांच्या मनावर कोरले गेले आहे. चित्रपटात जे जे दाखवले जाते ते कोणताही विचार न करता आत्मसात केले जाऊन त्याप्रमाणे नक्कल करण्याचा आटापिटा केला जातो. शाळा-महाविद्यालय सुटल्यावर बस, रेल्वे स्थानकावर बहुतांश मुलं-मुली तासन्तास रेंगाळत बसलेली दिसतात. चित्रपट दाखवतात त्याप्रमाणे एखाद्या मुलीला प्रपोज करण्याचे नाटक करणे, तिच्या सोबत बोलून दाखव, धक्का मार, फिरायला येण्याबाबत विचारणे आदी गोष्टी करण्यासाठी मुले पैज लावतात आणि तोच कित्ता गिरवण्याचा सपाटा लावतात. हे करत असताना योग्य-अयोग्य याचे भान नसते आणि चुकीच्या ध्येयाचे शिखर गाठण्यासाठी एखाद्याच्या जीवावरही तुटून पडण्यास कचरले जात नाही. स्त्री म्हणजे केवळ भोगवादी, शोभेची वस्तू अशा अत्यंत घातक विचारांनी झपाटलेली अशी मुले समाजासाठी घातकच! कोणत्या तरी नायकाप्रमाणे नक्कल करणारे महाभाग हा विचार कधीच करत नाहीत की, डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे भूमिका करण्याचे त्या नायकाला पैसे मिळतात आणि त्या भूमिकेशी संबंधित कृती फक्त ३ तासांच्या चित्रपटात शक्य आहे. काही तासांचा चित्रपट आणि प्रत्यक्ष जीवन यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण, चित्रपट हा ठरवलेल्या संवादाप्रमाणे असतो तर आपले जीवन हे आपल्याला घडवायचे असते. टाळी दोन हातांनीच वाजते.
त्याप्रमाणे या सूत्राविषयी मुलींच्या सहभागाचा विचार केला असता त्यांनी या गोष्टींपासून लांबच राहात आपले शील रक्षण केले पाहिजे. बहुतांशपणे  प्रेम म्हणून नव्हे, तर शरीर सुख प्राप्त करण्यासाठी मुलींशी मैत्री केली जात असते. हे फसवणूक झाल्यावर लक्षात येते. त्यामुळे सावध असा. यालाच अनुसरून सूत्र असे की, सामाजिक वातावरण बिघडवणा-या अनेक घटना मोकाटपणे तरुणाईकडून सार्वजनिक ठिकाणी चालू असतात. त्यांना चाप लावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेऊन त्याविषयी पोलिसांत तक्रार देऊन ते अपप्रकार थांबेपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा ठेवला पाहिजे. यासाठी जे शक्य आहे, ते केलेच पाहिजे. रस्त्यावरचा कचरा उचलण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे सामाजिक वातावरण खराब करणा-यांना धडा शिकवण्यासाठी लोकशाहीने घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. तर हाही कचरा राहणार नाही. आजमितीस अशा गोष्टींकडे पाहून कानाडोळा होत असल्याने, अशा गोष्टींशी संबंध नसणा-यांना त्याचा नाहक त्रास वाईट नजरांच्या माध्यमातून सोसावा लागत आहे. सायंकाळच्या वेळी घराघरांतून श्लोक, प्रार्थना ऐकू येणे बंदच झाले आहे. आता येतो तो फक्त मालिकांचा आवाज. नको त्या विचारांतून बाहेर येण्यासाठी प्रार्थना, श्लोक आवश्यक आहेत. यातून व्यक्तीला जे मानसिक समाधान मिळते ते कशातही मिळत नाही; पण त्यासाठी श्लोक, प्रार्थना म्हटले गेले पाहिजे ते आपल्यासाठी पालकांनी म्हणून उपयोगी नाही.
रात्री उशिरापर्यंत विनाकारण घराबाहेर राहणे, अनोळखी व्यक्तीकडे लिप्ट मागणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. स्त्रीने स्वत:तील सुप्त शक्तीला जागृत करण्यासाठी आतातरी कार्यरत झाले पाहिजे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याकडे लक्ष केंद्रित करून आपल्याकडे वाईट नजरेने पाहणा-यांना तत्काळ तडाखे देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आताचे दिवस गाफील राहण्याचे नसून सावध राहण्यातच शहाणपण आहे. कुटुंबामध्ये एक मुलगी जरी शिकली तरी अखंड कुटुंबाची सर्वागीण प्रगती होते. म्हणूनच आपण म्हणतो की, ‘मुलगी शिकली प्रगती झाली.’ स्त्री जन्माचे महत्त्व खूप मोठे आहे. आपल्याला अनेक शूर-वीर स्त्रियांचा इतिहास लाभला आहे, त्याप्रमाणे मार्गक्रमण करून आपणही त्यांच्याप्रमाणे गुण अंगीकारणे ही काळाची गरज आहे. दुसरे सूत्र असे की, शांत राहून न्याय मिळत नाही. मग करायचे तरी काय? सामाजिक हितासाठी काय हवे, काय नको? हे आता जागृत जनतेनेच पुढाकार घेऊन ठरवावे. समाजामध्ये ईलता पसरवण्यास कारणीभूत असणा-या घटकांना आता जागृत नागरिकांनीच वैधपणे कडाडून विरोध करत ईलतेला समाजातून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली पाहिजे