Total Pageviews

Sunday 24 July 2011

REACTION COMMON PEOPLE MUMBAI BLASTS

उभ्या जगाला हादरून सोडणार्‍या मुंबईतल्या ‘13/7’च्या बॉम्बस्फोट मालिकेवर ‘सामना’चे वाचक शांत बसू शकले नाहीत. त्यांनी पत्र, ई-मेल, दूरध्वनीवरून आपल्या संतप्त प्रतिक्रिया ‘उत्सव’ पुरवणीसाठी प्रकट केल्या त्याचे हे संकलन.- सोलापूर येथील वृत्तपत्रविक्रेते विजय भोळे एका पत्रात म्हणतात, ‘दिग्विजय सिंग या माणसाचे डोके तपासायची आवश्यकता आहे. गेली अनेक वर्षे मी बारकाईने वर्तमानपत्रे वाचतो. पण हल्ली ज्या पद्धतीने राजकारणी बोलतात त्यामुळे राजकारण्यांचा दर्जा घसरत चालला आहे. मुंबई हल्ल्याचा निषेध! त्रिवार निषेध!!!’
- बोरिवली मुंबई येथून गजानन मराठे लिहितात- मुंबईकरांनी आता अधिक सावध राहण्याची वेळ आली आहे. प्रवास करताना संशयास्पद वाटणार्‍यांची माहिती पोलिसांना देणे जरुरीचे आहे. नागरिकांनी सावधपणे वागावे, ही काळाची गरज आहे.
- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शेतकरी गौतम पाटील म्हणतात, ‘हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कायदा- सुव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. सरकार तसेच पोलीस ही यंत्रणा शिल्लक उरलेली नाही हेच खरे.’
- संभाजीनगरातील किराणामालाचे व्यापारी सुरेश गायकवाड लिहितात- ‘ओसामा बिन लादेनला ज्याप्रमाणे अमेरिकेने ठार मारले त्याचप्रकारे पाकिस्तानला धडा शिकविण्याची आवश्यकता आहे. राजकारण्यांची इच्छाशक्ती हवी. त्याखेरीज काही खरे नाही. राजकारण्यांना डोके आहे की नाही?’
- ठाणे जिल्ह्यातील सफाळे येथील शिक्षिका सुनंदा खुळे म्हणाल्या, ‘जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करावा लागतो. आता तर या बॉम्बस्फोटांमुळे पालक घाबरले आहेत. विद्यार्थीही मनातून दचकलेत. त्याचा परिणाम हा शालेय शिक्षणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पडणारच.’
- दादर येथील शिवसैनिक अतुल दिंडे लिहितात, ‘मुंबईकर असलेले आपण अशा घटनेमुळे संतप्त होणे स्वाभाविक आहे. आपला संताप हा आगामी निवडणुकीत मतपेट्यांतून बाहेर पडू द्या. कॉंग्रेसचे सरकार हटलेच पाहिजे. नाहीतर हाकलले पाहिजे.’
- एका निनावी पत्रलेखकाने संतप्त विचार प्रकट करताना म्हटले की, हलकट, नालायक कसाब, ÷÷÷÷÷ अफझल गुरू यांना भरचौकात नागडे करून त्यांचा लिंगछेद करावा. एकेक अवयव छाटावा. जनतेच्या संतापाचे पडसाद त्यातून दिसावेत. त्याखेरीज जाग येणार नाही.’
- जोगेश्‍वरी येथील ऍड. चंद्रप्रकाश नकाशे लिहितात, ‘दहशतवाद्यांचे फालतू लाड न करता त्यांना फाशी द्या. दहशत बसल्याखेरीज असे हल्ले कमी होणार नाहीत. कसाबला ठार मारावे. त्याला मटण-चिकन बिर्याणी खिलविणार्‍यांचा जाहीर निषेध.’
- सुधीर शेलार या नवी मुंबईतील वाचकाने म्हटले की, ‘मुंबईतल्या पोलिसांचे लाड आता पुरे झाले. सुरक्षा यंत्रणेकडे कुठलीही ‘खबर’ नव्हती, हे आश्‍चर्यच आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी.’
- गृहिणी असलेल्या भारती संजय सोनार-नवरे या अंबरनाथहून लिहितात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी अवस्था आपली झाली आहे. सकाळी घरातून निघालेला माणूस रात्री घरी परतेल याची खात्री वाटत नाही. कसाबसारख्याला फाशी तत्काळ दिली असती तर जरा दहशत वाटली असती. पण तसे न झाल्यानेच दहशतवाद वाढला.’
- चिंचवड, पुणे येथून ज्येष्ठ नागरिक नारायण पिंगळे म्हणतात, ‘सरकारची कातडी गेंड्याची झाली आहे. भ्रष्टाचार खुलेआम सुरू आहे. आता सुरक्षेचीही फजिती उडाली. मुंबईची घटना चॅनेलवर बघितल्यापासून अन्न गोड लागत नाही. विचारांनी मन सुन्न होते. हल्लेखोरांचा खात्मा करा!’
- संभाजीनगर येथील पत्रलेखक सुखलाल द. सोनी लिहितात, ‘मुंबई शहर हे दहशतवाद्यांना हक्काचे घर वाटू लागले आहे. मुंबईत मंत्रालय आहे पण सरकार निद्रिस्त आहे. मुंबईत पोलीस मुख्यालय आहे पण पोलिसांची जरब नाही हे आपले दुर्दैव व दुर्भाग्य!’
- सुरेखा किर्वे या कॉलेज तरुणीने नवी मुंबई येथून मेसेज पाठविला आहे. त्यात ती म्हणते, ‘बॉम्बस्फोट झाल्यानंतर बॉलीवूड ‘स्टार’ ‘स्टारकांनी’ जो नंगानाच केला त्याचा निषेध करावा तेवढा कमीच. या शाहरुख खानने बिग बीचा आदर्श घ्यावा. बिग बी आणि ऐश्‍वर्या राय यांनी अनेक कार्यक्रम रद्द करून माणुसकी दाखविली. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि श्री. उद्धव ठाकरे यांनीही गुरुपौर्णिमा आणि वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले. याला म्हणतात देशप्रेम! माणुसकी!’
- गणेश मंडळाचे कार्यकर्ते असलेले श्रीकांत सुळे म्हणतात, ‘आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात काही बंधने पाळावी लागणार आहेत. गणेश सेवकांनी दक्ष राहावे. डोळ्यात तेल घालून पाकड्या अतिरेक्यांना रंगेहाथ पकडून त्यांना नरकाचा दरवाजा दाखवावा. श्रींचे आशीर्वाद मुंबईवर व महाराष्ट्रावर आहेत. श्रीसमर्थ आहे!’
- सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर बनकर यांनी ‘कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर मानसिक उपचार करण्याची वेळ आलीय असे सांगून स्वत:च्या ²²खाली काय जळतंय हे आधी बघा मगच मुक्ताफळे ओका!’ अशी सूचना केलीय

No comments:

Post a Comment