Total Pageviews

Friday 19 October 2018

सारंकाही सरकार करेल. -या देशातल्या नागरिकांना सुरुवातीपासूनच ही सवय जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे, सारंकाही सरकार करेल. याच भूमिकेतून तत्कालीन राज्यकर्त्यांनी लोकांची मानसिकता तयार केली. नागरिक सर्वार्थाने जबाबदार झाले, ते जबाबदारीने वागू लागले, तर अर्ध्या समस्या निकाली निघतील इथल्या. -TARUN BHARAT-SUNIL KUHIKAR




लठ्ठपणा कमी करण्यासाठीचे उपाय सांगत सर्वदूर भ्रमंती करणार्या एका डॉक्टरांचे एक विधान फार महत्त्वाचे अन्‌ मोलाचेही आहेते म्हणतातमुळात लठ्ठपणा अस्तित्वात आहेहे एकदा मान्य करून टाकाआपल्या समजुतीनुसार ती समस्या असलीच तर ‘माझी’ आहेइतर कुणीतरी ती सोडवून देईलअसे सोपे उत्तर या समस्येवर नाहीचप्रश्न ‘आपला’ असेलतर त्याचे उत्तरही आपल्यालाच शोधायला हवेेम्हणूनच डायटपासून व्यायामापर्यंतची संपूर्ण जबाबदारीही ‘आपलीच ठरतेएवढी एक बाब ध्यानात ठेवली तरी पुरेसे आहे... लठ्ठपणाच कशालाआयुष्यातल्या प्रत्येकच विवंचनेला हेच सूत्र लागू व्हायला हवे ना!

रेडिओवरच्या कुठल्याशा एका खाजगी वाहिनीवरसध्या चित्रपट दिग्दर्शक करण जोहर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय्‌. आता त्याचा जनसमस्यांशी काय संबंध?पणअक्षरशपाऊस बरसतोय्‌ प्रश्नांचा. ‘‘मी एका मुलीवर प्रेम करतोपण ती भावच देत नाही,’’ इथपासून तर ‘‘ज्याच्याशी माझं लग्न होणार आहेत्या माझ्या मित्राला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट देऊ?’’ इथपर्यंतचे ‘लाखमोलाचे’ प्रश्न देशाच्या कानाकोपर्यातून विचारले जाताहेततोही बेटा उत्तर देतोय्‌ प्रत्येक प्रश्नाला-अगदी सर्वज्ञतज्ज्ञ असल्यासारखाअर्थातएक प्रायोजित कार्यक्रम आहे तो शेवटीकार्यक्रमात विचारण्यासाठी प्रश्न खरोखरीच येतात दूरदुरून की निर्मात्याच्याच कल्पनेचा खेळ असतो साराकोण जाणेपणश्रोते कान देऊन ऐकतात हा खोट्या खोट्या प्रश्नोत्तराचा खराखुरा कार्यक्रमकाठाऊक आहे?कारण आमच्या समस्यांच्या उत्तरांसाठी दुसर्याकडे आस लावून बसण्याची सवय लागली आहे आम्हाला.

कालपरत्वे कधी भाजपाचातर कधी कॉंग्रेसचा असलातरी महागाईच्या मुद्यावर निघणारा प्रत्येक मोर्चा ‘विरोधी पक्षाचा’ असतो या देशातसमस्या ‘आमचीअसली तरी मोर्चा आमचा नसतोचकारण आमची समस्या सोडवण्यासाठी मोर्चे ‘त्यांनी’ काढणेहेच आम्हाला अपेक्षित असतेमी कुठेतरी नोकरी करतोचार पैसे कमावतोमाझ्या घरात सुविधा हवी म्हणून मी गॅस सिलेंडर विकत घेतलेले असतेत्यावर स्वयंपाक माझ्या घरातील सदस्यांसाठी शिजणार असतो.शेजार्यापाजार्यांचा त्याच्याशी कडीचाही संबंध नसतोसरकारचा तर दूरान्वयेही नसतोपणत्याच गॅस सिलेंडरसाठीची सब्सिडी मात्र मला सरकारकडून हवी असतेसब्सिडीची राशी जराशीही कमी-जास्त झाली की माझी ओरड सुरू होतेआदळआपट सुरू होतेमी माझ्या घरीमाझ्या कुटुंबीयांकरिताच्या स्वयंपाकासाठी वापरतो त्या सिलेंडसाठीचे पैसे सरकारने का भरावेहा प्रश्नही माझ्या मनात निर्माण होत नाहीउलटती सरकारची जबाबदारीच असल्याच्या थाटातली माझी भूमिका असतेमाझा थयथयाट त्यातूनच साकारलेला असतोआपले प्रॉब्लेम्स दुसर्यांनीच सोडवायचे आहेतयाच मासिकतेचाही खरंतर तो परिणाम असतो!

या देशातल्या नागरिकांना सुरुवातीपासूनच ही सवय जाणीवपूर्वक लावण्यात आली आहेविशेषतस्वातंत्र्योत्तर काळात तर ही भावना अगदी जाणीवपूर्वक जपण्यात आलीलोकांनी फक्त एक मत देऊन ‘आम्हाला’ सत्ता सोपवायचीबाकी सगळं आम्ही पाहून घेऊतुमच्या घरासमोरची नाली स्वच्छ करण्यापासूनतर राज्यात मोठमोठी धरणं बांधण्यापर्यंत... सारंकाही सरकार करेलयाच भूमिकेतून तत्कालीन राज्यकर्त्यांनी लोकांची मानसिकता तयार केलीपरिणाम असा की,इथे फक्त ‘मतदार’ तेवढे शिल्लक राहिले. जबाबदार ‘नागरिकांची’ मात्र वानवा झालीदुर्दैव असे कीत्याचे कुणाला शल्यही नाहीनागरिक सर्वार्थाने जबाबदार झालेते जबाबदारीने वागू लागलेतर अर्ध्या समस्या निकाली निघतील इथल्यापण नेमके ‘तेच’ घडू नयेयासाठीची तजवीज वर्षानुवर्षे झालीपरिणाम असा की,छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारदरबारी हात पसरणार्या परावलंबीहतबलदुर्बळ अशा ‘नागरिक’ नावाच्या घटकाची गर्दी जमली सगळीकडेना स्वाभिमानाचे कुठे दर्शनना स्बळावरस्वकर्तृत्वातून काही घडवून आणण्याची धमक कुठे दिसतस्वत:च्या हक्काबाबतही भीक मागण्याचीच सवय जडलीय्‌ लोकांना त्यामुळेकर्तव्याची जाणीव करून द्यायलाही मग कुणाची तरी गरज पडली नसती तरच नवलअहोस्वत:चे घर अन्‌ घरासमोरचा थोडासा परिसर स्वच्छ ठेवाहे सांगायलाही एक ‘मोदी’ लागतो या देशातल्या नागरिकांना!

स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लोकांना मानसिकदृष्ट्या अपंग बनविण्याची ‘त्या वेळी’ अंमलात आलेली क्लृप्ती पुरेशी यशस्वी ठरलीकालौघात तीच परिपाठी बनलीकाही कळायच्या आत लोक ‘गुलाम’ झालेइतके कीरस्त्याच्या कडेला पोपट घेऊन धंदा मांडून बसलेल्या कथित ज्योतिष्यासमोरही लोक स्वत:चा हात दाखवण्यासाठी ताटकळू लागलेआपल्या भविष्याची  चिंता त्याच्यासमोर मांडू लागलेआपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या हा पोपट अन्‌ तो करण जोहर कसा सोडवू शकेलत्याची उत्तरं हे लोक कसे देऊ शकतीलअसा साधा प्रश्नदेखील कुणाच्याच मनाला सतावीत नाही इथेस्वत:च्या शक्तीवरचा विश्वासही डळमळीत होत चाललाय्‌ लोकांचाम्हणूनच आधार देण्याची भाषा बोलणारा माणूस जरा कुठे गवसला कीत्याला देवत्व बहाल करूनआपला सारा भार त्याच्या स्वाधीन करून स्वतमोकळे होण्याचा सोपा मार्ग निवडताहेत लोक आताशाबहुधा म्हणूनच लोकांची फसगत करणार्या आसारामबापूसारख्या लोकांची पैदास वाढली आहे अलीकडेबरंहे दुर्बळ लोक हुशार एवढे कीत्यांना आसारामबापूने आपल्याला फसविल्याचा राग येतो लागलीच... आपणच त्याला देव बनवून मोठं केलंयाचा मात्र विसर पडतो प्रत्येकालाचएखाद्याअत्यंत जवळच्या नातेवाईकाला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर रुग्णाचे भवितव्य तिथल्या डॉक्टरच्या स्वाधीन करतानाची हतबलता निदान समजण्यासारखी तरी आहेकारण त्या वेळीत्यापलीकडे काही करणे हातात नसते कुणाच्याचपणदर दिवशी आयुष्यातही तसंच वागताहेत ना सारेत्याचं समर्थन कसं करायचं?

आम्ही फक्त गंगा प्रदूषित करणारती स्वच्छ करण्याची जबाबदारी सरकारचीआमच्या घरातले संडास बांधायलाही सरकारनेच पैसे द्यावेत अन्‌ सरकारी पैशातून उभारल्या गेलेल्या सार्वजनिक मुतार्यांच्या स्वच्छतेची जबाबदारीही प्रशासनानेच पार पाडावीत्या घाण कशा होतीलएवढं फक्त आम्ही बघूआम्ही केलेली घाण स्वच्छ केली नाही म्हणून व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडण्यातही पुढाकार आमचाच असेलमतदानाच्या दिवशी मतदान केले की जबाबदारी संपलीआता पुढचं सगळंकाही सरकारनं करावं... या केवळ भोळ्या लोकांच्या भाबड्या अपेक्षा राहिलेल्या नाहीत आताती मानसिकता झाली आहेतुमची-माझी-सर्वांचीविशेषत:व्यवस्था ‘सार्वजनिक’ असेलतर मग तर विचारायलाच नकोरेल्वेगाडी असोएसटी स्टॅण्ड असोकी सार्वजनिक प्रसाधनगृहकुणीच वाली नसतो त्याचाएकच ध्येयसर्वांनी मिळून ती व्यवस्था विसकळीत करायचीबस्ससुरळीत करण्याची जबाबदारी घेईल कुणीतरी दुसराच स्वत:च्या खांद्यावर.

फिरायलामौज करायलाखिशातले पैसे खर्च करून आलेल्या पर्यटकांनी एका प्रसिद्ध जंगलाच्या परिसरात करून ठेवलेला कचरा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मोहीम राबवून स्वच्छ केलाएका संस्थेनेमग कायटाळ्या पिटल्या लोकांनीहोतेवढं मात्र जमते बरं पब्लिकलाकामं दुसरेच करताहेत म्हटल्यावर कुणाच्या बाचं काय जातेतेच तर पाहिजे आहे इथे प्रत्येकालाजबाबदारीचे ओझे ‘आपल्या’ खांद्यावर नकोबस्सआपले असले तरी ते ओझे वाहून नेणारे खांदे इतरांचे असावेतयाची खबरदारी घेतच असतात लोककारणयातले सारेच प्रश्न ‘माझे’ असलेतरी ते सोडविण्याची जबाबदारी कुठे ‘माझी’ आहेती तर दुसर्यांनीच वाहायची आहे नाहोलहानपणापासून हीच तर परिपाठी अंगवळणी पडली आहे समाजाच्यायांच्या प्रश्नावर तलवारी उपसून लढायचे ते इतरांनी अन्‌ हे बघणार तो तमाशा...! माझे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी दुसर्याने का स्वीकारायचीहा प्रश्न गौण ठरतोय्‌ या ओघात...



No comments:

Post a Comment