Total Pageviews

Tuesday 13 November 2018

राहुल गांधी हे खरे देशभक्त असतील, तरते नक्षलवादी चळवळीला विरोध का करीत नाही?

राहुल गांधी हे खरे देशभक्त असतील, त्यांना या देशातील आदिवासींचे जीवनमान खर्‍या अर्थाने उंचावले जावे असे प्रामाणिकपणे वाटत असेल,  तर ते नक्षलवादी चळवळीला विरोध का करीत नाही? त्यांना कशाची लाज वाटते, की भीती वाटते? गेल्या 70 वर्षांत याच नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे केवळ छत्तीसगड नव्हे, तर देशाच्या अनेक राज्यांमधील आदिवासींना मूलभूत अधिकार मिळाले नाहीत. कॉंग्रेसच्या हाती सर्वाधिक वर्षे सत्ता असूनही या पक्षानेही नक्षल चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. राहुल गांधी ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाच्याच पंतप्रधानांनी नक्षलवाद हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका असल्याचे सांगूनही, राहुल गांधी नक्षल्यांचे समर्थन का करीत आहेत, असा प्रश्न या देशातील जनता विचारीत आहे.

राहुल गांधी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. कारण, हा प्रश्न एकट्या छत्तीसगडपुरता मर्यादित नाही. अन्य राज्यांत जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातील, तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला जाईल. तूर्त या पक्षाच्या नेत्यांची राहुलसकट विधाने ऐकली की, देशद्रोही नक्षल्यांना आणि दहशतवाद्यांना कॉंग्रेसचा सक्रिय पाठिंबा आहे, हे स्पष्ट दिसते. या देशद्रोह्यांच्या मदतीने जर त्यांना सत्तेत यायचे असेल आणि देशात पुन्हा अराजकतेचे वातावरण निर्माण करायचे असेल, तर मग या देशातील जनतेलाच रस्त्यावर यावे लागेल, याचे भान राहुल गांधी यांनी ठेवावे. राहुल गांधी म्हणतात, ‘‘मी उभा झालो तर मोदी माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत- मुझसे आंख नही मिला सकेंगे...!’’ परवा जगदलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभेत भाषण करताना-‘‘अर्बन नक्षल्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा असून, ते नक्षल्यांना क्रांतिकारी म्हणत आहेत. या नक्षल्यांनी आदिवासींच्या जीवनात कधीही विकासाचा प्रकाश येऊ दिला नाही. अशा देशद्रोही लोकांना समर्थन देणार्‍या कॉंग्रेसला छत्तीसगडमधून हद्दपार करा,’’ असा आरोपच केला आहे. मग, या आरोपाचे उत्तर राहुल का देत नाहीत? त्यांच्याशी नजर भिडवून का बोलत नाहीत? आपल्या घोषणापत्रात नक्षलवाद्यांशी लढण्याचे आश्वासन का देत नाहीत? प्रश्न अजून खूप विचारले जाऊ शकतात. त्या वेळी राहुल गांधी यांच्या वल्गनांचा पर्दाफाश होणारच आहे.
अर्बन नक्षल्यांना अटक केल्यावर याच राहुल गांधींनी त्यांना एनजीओ म्हणजे गैरसरकारी स्वयंसेवी संघटना, असे संबोधले होते व त्यांची पाठराखण केली होती. हे एनजीओ काय करतात, याची माहिती राहुल गांधी यांनी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून घेतली असती, सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र अर्बन नक्षल्यांबाबत सादर केले होते, ते वाचले असते तर अधिक बरे झाले असते. नक्षली हे देशाच्या सुरक्षेला कसे आव्हान ठरत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले असते. याच छत्तीसगडमध्ये विद्याचरण शुक्ल, महेन्द्र कर्मा या कॉंग्रेस नेत्यांना नक्षल्यांनी मारले, याची जाण कॉंग्रेसला आहे का? याचा अर्थ, कॉंग्रेसच्या नेत्यांना नक्षल्यांनी ठार मारले तरी चालेल, मी मात्र नक्षल्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार, हा अट्‌टहास राहुलचा दिसतो.
मागे कॉंग्रेसचा एक नेता- मणिशंकर अय्यर हा पाकिस्तानात गेला आणि तेथे बरळला- ‘‘ये मोदी को पहले हटाना होगा!’’ म्हणजे काय, तर आगामी निवडणूक काळात तुम्ही सीमेपलीकडून दहशतवाद्यांना भारतात पाठवा आणि मग आम्हाला त्याचे खापर मोदींवर फोडता येईल.

राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ज्या अर्बन नक्षल्यांच्या घरून विविध साहित्य जप्त करण्यात आले, त्यात पंतप्रधानांच्या हत्येच्या कटासंदर्भातही उल्लेख आहे. हा विषय कुणा एका पक्षाचा नाही, तर या देशातील कोट्यवधी जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे. मोदींच्या केसालाही धक्का लागला, तर देशातील जनता कशा पद्धतीने पेटून उठेल आणि त्यात कोण कोण भरडले जाईल, याचे भानही राहुल गांधींनी ठेवायला हवे. पाकिस्तानी सरकारच्या मदतीनेच पंजाबात खलिस्तान चळवळ उभारून, शिखांना भडकावून पंजाब कसा पेटवला गेला व नंतर त्याचे पर्यवसान त्यांची आजी- पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी कशी हत्या केली, याचा इतिहास राहुल गांधींनी तपासून पाहावा.

त्याच पाकिस्तानची मदत मोदींना हटविण्यासाठी आज ते का घेत आहेत? याचेही उत्तर राहुल गांधी यांना द्यावेच लागणार आहे. ते दिले नाही, तर जनता त्याचे उत्तर कॉंग्रेसला देण्यासाठी सक्षम आहे. राहुल गांधी यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, नक्षल्यांनी शेकडो दलित-आदिवासींची हत्या केली. तो दिवस दूर नाही, जेव्हा तेच आदिवासी या नक्षल्यांना पकडून त्यांचेही तुकडे तुकडे करून ठार मारतील आणि त्यांना मदत करणार्‍यांनाही धडा शिकवतील! आज छत्तीसगडमध्ये  सरकारने नेत्रदीपक विकासकामे केली आहेत. तेथे आता स्थानिक युवकांना शिक्षणाच्या संधी मिळण्यासाठी मेडिकल, अभियांत्रिकी, व्यावसायिक महाविद्यालये उभारली आहेत

No comments:

Post a Comment