पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी (LPG) संदर्भातील अफवा पसरवणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की काही लोक उद्देशपूर्वक एलपीजीची भीती पसरवत आहेत आणि त्यातून स्वतःचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई होईल आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी गुरुवारी, १२ मार्चला, नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित एनएक्सटी शिखर परिषदेत
बोलत होते. त्यांनी सांगितले की जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात अफवा पसरवणे देशासाठी
हानिकारक आहे. संकटाच्या काळात देशाने शांतता आणि संयमाने परिस्थितीचा सामना करणे आवश्यक
असून, यात सरकार, राजकीय पक्ष, मीडिया, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
आहे.
जेव्हा संपूर्ण
देश एकत्र येऊन काम करतो, तेव्हा मोठ्या संकटांवरही सहज मात करता येते. त्यांनी आश्वासन
दिले की आज देशासमोर नवीन आव्हाने आहेत, आणि ती पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न
करणे गरजेचे आहे.
भाषणातील प्रमुख
मुद्दे:
संकट काळात
शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे; सरकार, राजकीय पक्ष, मीडिया, सामाजिक संस्था, गाव-शहरे
सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
भारत ऊर्जा
क्षेत्रातील विविध स्त्रोतांना प्रोत्साहन देत आहे. पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि
ऊर्जा स्वावलंबन वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
२०१४ मध्ये
देशात १४ कोटी LPG कनेक्शन होते; आता ही संख्या ३३ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. गॅस
बॉटलिंग क्षमतेत दुप्पट वाढ झाली आहे.
२०१४ मध्ये
४ LNG टर्मिनल होते; आता संख्या दुप्पट झाली आहे. पाइपलाइन गॅसची पोहोच २५–२६ लाख घरांपासून आता १.२५ कोटी घरांपर्यंत झाली आहे.
रेल्वेचे विद्युतीकरण
पूर्ण झाले; २०१४ मध्ये २०% मार्ग वीजेवर चालत होते, आता जवळपास १००% लाईन्स विद्युतीकृत
आहेत. २०२४–२५ मध्ये रेल्वेने १८० कोटी लीटर इंधनाची
बचत केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी स्पष्ट केले की एलपीजीवरून घबराट पसरवणाऱ्यांचा उद्देश जनतेत भीती निर्माण
करणे आहे आणि त्यामुळे देशासही नुकसान पोहोचत आहे. त्यांनी याबाबत कठोर कारवाई होईल
असे इशारा दिला आणि सर्वांना शांतता आणि संयम राखून परिस्थिती हाताळण्याचे आवाहन केले
No comments:
Post a Comment