Total Pageviews

Monday 17 December 2018

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान भारतातील सत्ताधारी पक्षाला मुस्लीमविरोधी ठरवून मोकळे झाले. पण, त्यांच्याच देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी साधा ‘ब्र’ त्यांच्या तोंडून आजवर निघालेला नाही. म्हणूनच मग इमरान यांना नेमके धर्मांध कोण, हा प्रश्न विचारावासा वाटतो.-COL विनायक अभ्यंकर (लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहे.)



धर्माच्या नावावर फाळणी होत असताना कायदे आझम महंमद अली जिना यांनी ‘सर्वधर्म समभावा’ची भलावण केली होती. १४ ऑगस्टच्या अमावस्येला पाकिस्तानातील अल्पसंख्याक ‘काफर’ ठरले आणि प्रेताने भरलेले आगगाडीचे डबे हिंदुस्थानात दाखल झाले. याउलट हिंदुस्तानमधून ज्यांना पाकमध्ये जायचे होते, ते सुखेनैव तिकडे जाऊ शकले. १९४७ साली २२ टक्के असलेले हिंदू व शीख तसेच १२ टक्के असलेल्या ख्रिश्चन समाजाचे हनन होऊन ते २.७ टक्के इतके झाले आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या क्षणी लाखो बंगाली मुस्लीम हिंदुस्थानात आले. बरेचसे इथेच स्थिरावले. आता रोहिंग्यांचे स्वागत नको. सरकार ही भलावण थांबविणार की नाही? कोणीही यावे टपली मारून जावे हे कधी थांबणार? सहनशीलता हा सद्गुण दुर्गुण तर ठरत नाही ना, हे तपासण्याची वेळ आता आली आहेसर्व परकीय समाजास सामावून घेणारी आमची हिंदू संस्कृती, पण ‘आम्हालाच सर्वधर्म समभावाची महती सांगू नये कोणी’ हे सत्य आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे वास्तव फार विदारक आणि क्लेशदायक आहे.
 
धर्मांधता : एक पाशवी शाप
 
दि. १४ ऑगस्ट, १९४७ची अमावस्या ही खरोखरच अंधारी काळरात्रच होतीधर्माधिष्ठीत द्विराष्ट्रवाद धूर्त ब्रिटिशांनी खतपाणी घालून फोफावू दिलातत्कालीन कचखाऊ पुढाऱ्यांनी कट्टरतावादी महंमद अली जिनांसमोर नांगी टाकलीप्राचीन हिंदुस्थानची चिरफाड झालीरक्ताचे पाट वाहून जगाच्या नकाशावर नवीन देश जन्माला आला. प्रेतांच्या ढीगांवर हिरवे निशाण फडकले, त्याचे नाव ‘पाकिस्तान.’ सिंधू नदीच्या काठावर अनादी काळापासून सर्वधर्मसमभावाला प्राधान्य देणारी हिंदू संस्कृती एका क्षणात ‘काफरों की सरजमीं’ झाली आणि मग बिगर इस्लामी समाजाची हेटाळणी, कत्तल सुरू झाली, ती आजतागायत पाकमध्ये सुरुच आहे. लव-कुशाने वसवलेल्या लाहोर व कुसूर या शहरांवर यवनांनी घाला घालून तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. पाकिस्तानच्या निर्मितीच्या पूर्वी ज्या परिसरात लहान-मोठी ४२८ मंदिरे होती, तिथे आत २६ तरी मंदिरे असतील का? या मंदिरांची जागा माथेफिरू धर्मांधांनी बळकावून तेथे कत्तलखाने सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर, उलट हिंदुस्थानातील मशिदी एकही वीट न हलता उभ्या आहेतरामचंद्रांच्या जन्मस्थानावर उभ्या असलेल्या आक्रमकांच्या मशिदीवर बहुसंख्याकांनी हक्क सांगताच ज्यांनी गहजब केलाते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त होताना मात्र मूग गिळून स्वस्थ बसतात. हिच स्थिती चर्चेस,कॅथेड्रल्सची आहे. गुरुद्वारांची आहे. रेव्हरंट थॉमस वॉल्पी फ्रेंच या बिशपने (१८७७) ख्रिश्चन धर्माचा प्रसार व प्रचार करताना ‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ संग्रहित केली. त्याने स्थापन केलेली चर्चेस आज भग्नावस्थेत उभी असून हिंदूशीख व ख्रिश्चन समाजाचे पाकिस्तानमधील जीणे म्हणजे नरकयातनांइतके भयावह झाले आहे. धर्मांधतेने बेफाम झालेले उन्मत्त हे आधुनिक रझाकार, अतिरेकी इस्लाम धर्माच्या बाहेरील इतर धर्मीयांना वासनेची शिकार समजून त्यांच्या लेकी-बाळींचा ‘उपभोग’ घेऊन हत्या करतात.
 
काही दिवसांपूर्वी हसन अब्दाल या गावातील कन्हैयालाल या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या झाली. शवविच्छेदनानंतर जमलेल्या हिंदू-शीख समुदायाने हंदुदरिया या भागात कन्हैयालाल यांचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध ठेवून आंदोलन छेडले. हिंदू खा. आरिषकुमार यांच्या नेतृत्वाखाली रावळपिंडी-पेशावर हमरस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झालीकन्हैयालाल हा धार्मिक वृत्तीचा सेवाभावी व्यापारी २००७ साली हसन अब्दालमध्ये स्थलांतरित झाला होतापोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशा अनेक अल्पसंख्याक धनिक, व्यापाऱ्यांची सरेआम कत्तल पाकमध्ये वरचेवर होते. मात्र, पाकी सरकार डोळे बंद करून नुसते पाहत बसत नाही, तर प्रोत्साहनही देते. लुटलेली संपत्ती वाटून घेतली जाते, हे सत्य आहे, वास्तव आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात २२ टक्के हिंदू-शीख समाजाचे व १२ टक्के ख्रिश्चन समाजाचे नागरिक राहत होते. आजघडीला हे प्रमाण १.७ टक्के इतके घसरले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या खानेसुमारीवर नजर टाकल्यास दिसते कीपाकिस्तानमधील दोनच जिल्ह्यांत संपूर्ण लोकसंख्येच्या ४० टक्के हिंदू राहतात. या लोकांचे गार्‍हाणे आहे की, आमच्या अत्याचाराच्या विरोधात अनेक विनंत्या करूनही हिंदुस्थानी शासन पाकिस्तानी प्रशासनास जाब विचारत नाही. मदत तर दूरच. न्यायालयात तक्रार केल्यास तेथेही अपयश, अवहेलना. मुलींना ओढून जबरदस्ती धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. कराचीमध्ये सध्या ६० ते ७० हजार हिंदू उरले आहेत. १९९७-९८ मध्ये ही संख्या ९८ लाख ७६ हजार, ३७८ इतकी होती. यात ९० टक्के मुसलमान व १० टक्के अल्पसंख्याक होते. आता तेथे हिंदू दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. आजच्या घडीला पाकमधील उमरकोट या जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे तीन लाख हिंदू आहेत१३ कोटी इतकी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या आता फक्त ३० लाखच उरली आहेसिंध व बलुचिस्तान प्रांतांमध्ये एकेकाळी हिंदूंचे बहुमत होतेतालिबानींच्या अत्याचारामुळे या प्रांतांतून अल्पसंख्याकांचा सफाया झाला आहेगेल्या पाच वर्षांत क्वेटासारख्या व्यापार प्रभावीत क्षेत्रात हिंदू व्यापाऱ्यांचे शिरकाण करून संपत्ती, मालमत्ता लुटण्यात आली. या भागातील गुरू लखीचंद यांचे अपहरण जानेवारीत झाले. अजून त्यांचा ठावठिकाणा नाही. फाळणीच्या वेळी २२ टक्के हिंदूंची संख्या आता दोन टक्क्यांच्याही खाली आली आहे.
 
ख्रिश्चन समुदायाची स्थितीसुद्धा अशीच आहेपाकिस्तानात दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी युरोपीयन लष्करी अधिकाऱ्यांनी रुग्णालये, कॅथेड्रल्स,चर्चेस स्थापून स्थानिकांना ख्रिश्चन होण्यास प्रवृत्त केलेकराची जिल्हा विकास योजना मांडून गोवेकर ख्रिश्चनांची वर्णी या बंदरात लावण्यात आलीया मंडळींनी पाकिस्तानात कॅथोलिक कम्युनिटी स्थापन करून ब्रिटिश सरकारच्या जोरावर ख्रिश्चन समुदायाने महंमद अली जिना यांची धूर्तपणे तळी उचलून धरलीपठाण जोसेफ या तत्कालीन पाद्री पत्रकाराने मुस्लीम लीगचा १९४५ सालातच प्रचार सुरू केला१९४७ मध्ये पाकिस्तान पूर्णत: ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून जाहीर झाला. तत्पूर्वी जिना मात्र ‘सेक्युलर स्टेट’चा पुकारा देत होते. फाळणीच्या वेळी हिंदू व संपूर्ण शीख समाज हिंदुस्थानात आला. याउलट उत्तर भागातील अनेक ख्रिश्चन परिवार पाकिस्तानकडे वळले. पाकिस्तानमधील सिंध जेथे हिंदूंचे प्राबल्य होते, ते नामशेष झाले असून ख्रिश्चन हे पंजाब प्रांतात बहुसंख्येने तरी उरले आहेत. याचे कारण शीख व हिंदू यांना पाकिस्तानी समाज ‘काफर’ म्हणून हेटाळतात, तर अमेरिका-ब्रिटनला चुचकारत ख्रिश्चनांना जवळ करतात. ख्रिश्चनांची पाकिस्तानमधील राजकीय संघटना कार्यरत आहेपाकिस्तान ख्रिश्चन काँग्रेस असे त्याचे नाव. परंतु, झुल्फीकार अली भुत्तो व जनरल झिया उल हक यांनी शरियतचे राजकीय पुनरुज्जीवन करताच १९७२ सालात कट्टरपंथीय गटांना प्रोत्साहन मिळून पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना ग्रहण लागले. अत्याचारांतही वाढ झाली. १९०२ मध्ये अखंड हिंदुस्थान असताना फादर फेलिक्स या धर्मप्रचारकाने एका गावाची स्थापना केली. या गावाचे नाव ‘खुशीपूर’ फेलिक्स, म्हणजे खुशी म्हणून ‘खुशीपूर’. या गावात शत-प्रतिशत आबादी आहे ती ख्रिश्चनांची. येथे सकाळ-संध्याकाळ ऐकू येते ती फक्त चर्चची घंटा. १९०२ सालापासून आजतागायत या गावात ना बांग ऐकू आली, ना नमाजची इबादत अदा झाली. १९४७ साली या गावाची लोकसंख्या होती १५ हजार. आज आहे फक्त ७ हजार, ३०० च्या आसपासयाच गावाचे फादर जॉन जोसेफ यांना ईशनिंदेच्या कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी आत्महत्या केली. दहशतवाद्यांनी हत्या केलेले पाकिस्तानचे अल्पसंख्याकमंत्री शहाबाज भट्टी हे पण या खुशीपूरचेया उभयंतांची कबर गावात असून सर्व नागरिक या थडग्यावर फुले अर्पण करतात.
 
पाकिस्तानमध्ये धर्म विटंबनाविरोधी कायद्याचे ६९७ लोक गुन्हेगार म्हणून जेरबंद असून यात १३ टक्के ख्रिश्चन आणि उरलेले इतर अल्पसंख्याक म्हणजे हिंदूच. यात २३ जण फाशीची वाट पाहत एक-एक दिवस ढकलत आहेत. या गावातील एक अध्यापक नाबर पीटर यांच्या पुढाकाराने तरुणांचे गस्ती दल कार्यरत असून ते रात्री जागे राहून पहारा देतातयाच गावातील २२ तरुणांना कोर्टातील चौकशीअंती परत तुरुंगात नेताना दहशतवाद्यांनी गोळीबारांत ठार केलेचार ख्रिश्चन महिलांना विवस्त्र करून शहरभर फिरवून मारून टाकण्यात आले. आम्ही १९७१च्या युद्धात चितगावमधील पी. एन. एस. बख्तीयार या नौसेना तळावर तीन हजारांपेक्षा जास्त युद्धकैदी ताब्यात घेतले.त्यात १०२ कैदी हे ‘मसीह’ या नावाने म्हणजे ख्रिश्चन होते. पाकिस्तान नेव्हीमध्ये ते (मेहतर) टोपस म्हणून कार्यरत होते. त्यातील गौहर मसीह याने एकदा एकांतात सांगितले, “आम्ही सर्वजण मूळचे हिंदू भंगी. फाळणीनंतर सीमापार करताना आम्हाला अडवण्यात आले. हिंदुस्थानात जाण्यास मज्जाव का तर, आमचा मैला तुम्हीच वाहायचा, हा जबरदस्तीचा आदेश. मग धर्म बदलून झालो ख्रिश्चन. आम्ही १९४७ पासून जीवंत प्रेते आहोत.” त्याच्या या स्पष्टीकरणाने फाळणीच्या वेळेचे भयानक सत्य तेव्हा उघडे पडलेदलित हिंदूंची झालेली ही अवस्था म्हणजे एक शोकांतिकाच नाही का? पाकिस्तान सरकारने ‘धार्मिक विटंबना विरोधी कायदा’ जाहीर करून कट्टरतावादी धर्मगुरू व दहशतवाद्यांच्या हातात अल्पसंख्याक विरोधी जणू हत्यारच दिले आहेया कायद्याचा आधार घेऊन गरीब व निरूपद्रवी हिंदूख्रिश्चन नागरिकांना फाशी देण्यात येत आहे. कुराणाचा अनादर केला, या तथाकथित व खोट्या आरोपावरून फैसलाबादमधील पाच चर्चेस, २७ ख्रिश्चन कुटुंबे, तीन शाळा (Convents), रुग्णालयांना मुस्लीम गुंडांनी आग लावून नेस्तनाबूत केले. तेव्हा, फैसलाबादमधील जीवाच्या आकांताने परागंदा झाले. खंडणीकरिता हिंदूंचे अपहरण करणे व खंडणीची अपेक्षित रक्कम न मिळाल्यास त्या अपहृत व्यक्तीची हत्या ही पाकिस्तानात नित्याची बाब ठरली आहे. बांगलादेशमध्ये शरणागतीच्या सोहळ्यानंतर स्थानिक जनता ओरडू लागली, ‘हिंदी सैन्य चालते व्हा!’ चटगाव बंदरामध्ये युद्ध समाप्तीनंतर बडा बझार या भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी आम्हा सैनिकांना बोलावून आदर सत्कार करताना तेथील गृहिणींनी डोळ्यात अश्रूंसह पाकिस्तानी सैन्याने व बंगाली कट्टर पंथीयांनी केलेले हाल सांगितले. तेथील हिंदू सांगत होते, “भारतीय सैन्य माघारी गेले की, पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे आमचे हाल, छळ सुरू होणार.” ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.भारतात घुसणाऱ्या दहशतवादी व समाजात फुटीचे विष पेरणाऱ्या अभारतीय नराधमास ओळखून पोलिसांच्या ताब्यात देणेहिंदूंनी फुकाची धार्मिक आक्रमता सोडून देतानाच भारतीय मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य धारेत मनोमिलनासह सहभागी होणे महत्त्वाचे आहे. धार्मिक समज,आचरण ही वैयक्तिक बाब समजून सर्वच भारतीय समाजाने राष्ट्रीय कायदे कानून पाळून राष्ट्रीय योजनांमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. ‘सहिष्णूता’ ही भारतीय सर्वच समुदायांनी पारंपरिक संस्कार मानून एखाद्या व्रताप्रमाणे अंगीकारावीस्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू इतरेतर धार्मिक समाज हा फक्त चार टक्क्यांपर्यंत सीमित होता, तो आता १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ‘हा देश माझा आहे. मी या देशाशी प्रामाणिक राहीन,’ ही प्रतिज्ञा करणे अगत्याचे असून प्रत्येकाने स्वत:ला राष्ट्रीय प्रवाहात झोकून देणे अपेक्षित आहे.
 
-

No comments:

Post a Comment