Total Pageviews

Tuesday 25 December 2018

आसामच्या बोगीबील पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन: सर्वांत लांब डबलडेकर ब्रिजचं महत्त्व


पंतप्रधान मोदींच्या हस्ते ब्रह्मपुत्रेवरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन, आणीबाणीच्या स्थितीत लष्कराचे टँकही जाऊ शकणार
दिव्य मराठी वेब टीम जवळपास पाच किलोमीटर लांबी असलेला हा पूल देशातील आजवरचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे.
डिब्रूगड - आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडणाऱ्या डबल डेकर पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या पुलामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा मार्ग खुला झाल्याने या भागातील लोकांचे अनेक वर्षांचे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे.

नाताळाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाचे लोकार्पण केले आहे. रेल्वेमार्ग आणि वाहनांचा मार्ग अशा या डबल डेकर पुलामुळे ईशान्येला तैनात असलेल्या लष्करालाही मोठी मदत होणार आहे. या पुलाच्या कामाची सुरुवात 1997 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्यावेळी झाली होती. जवळपास पाच किलोमीटर लांबी असलेला हा पूल देशातील आजवरचा सर्वात लांब रेल्वे पूल आहे.
>> ब्रह्मपुत्र नदीच्या दोन टोकांना जोडणारा हा पूल तयार करणे हे मोठे आव्हान होते.
>> या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तसेच भूकंपाची शक्यताही जास्त असते. पण हा पूल 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा धक्का सहन करू शकतो.
>> हा देशातील सर्वात मोठा पूल आहे. भारतीय रेल्वेने हा डबल डेकर पूल तयार केला आहे. याच्या खालच्या डेकवर दोन रेल्वे मार्ग आहेत. तर वरच्या डेकवर तीन लेनचा वाहतुकीचा मार्ग आहे.
>> हा पूल उत्तरेला धेमाजी आणि दक्षिणेत डिब्रूगडला जोडणारा आहे.
>> पूर्वी धेमाजीहून डिब्रूगड पर्यंत 500 किमीचे अंतर कापण्यासाठी 34 तास लागायचे. आता हा प्रवास केवळ 10 किमीचा असेल आणि तोही 3 तासांत पू्ण होईल.
>> या पुलावरून लष्कराचे टॅकही नेता येणार आहे. आणीबाणीच्या स्थितीत हा पूल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
>> पूर्वी भारतीय लष्कराला भारत-चीन सीमेवर जाण्यासाठी नदीच्या दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी अनेक तासांचा रस्ता ओलांडून जावे लागत होते.
ह्मपुत्रा नदीवरील देशातील सगळ्यात लांब रेल-रोड पुलाचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज झालं. या पुलामुळं अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे. १९९७मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी पुलाचं भूमिपूजन केलं. मात्र, प्रत्यक्षात या पुलाचं बांधकाम वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालं. तब्बल २१ वर्षांनंतर हा पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
बोगीबील पुलाची लांबी ४.९५ किलोमीटर आहे. आसाममधील दिब्रूगड आणि धीमाजी या दोन शहरांना हा पूल जोडतो. पुलावर तीन पदरी रस्ता आणि दोन पदरी रेल्वे रुळ आहेत. तसंच ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीपासून ३२ मीटर उंचीवर हा पूल आहे. बोगीबील पुलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पुलांसारखी आहे
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरच्या डबलडेकर पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. रस्ते आणि रेल्वे अशी दुहेरी वाहतूक करणारा हा 'बोगीबील ब्रिज' देशातला सर्वांत लांब डबलडेकर पूल आहे.
1. 1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली. पण काही कारणास्तव कामाला सुरुवात होण्यास विलंब झाला.
2 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. आणि अखेर आज तब्बल 16 वर्षांनंतर त्यांच्या 94व्या जन्मदिनी या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे.
3 रेल्वे आणि रस्ता अशी वाहतुकीची व्यवस्था असणारा देशातला सगळ्यांत मोठा पूल आहे, असं नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते प्रणव ज्योती शर्मा यांनी सांगितलं.
4. हा डबलडेकर पूल 4.94 किलोमीटर लांबीचा आहे. भारतातला सगळ्यांत लांब डबलडेकर पूल आहे.
§ 
5. 5,920 कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.
6. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या प्रदेशात प्रचंड पाऊस पडतो तसंच हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे इथे पुलाची उभारणी करणं मोठं आव्हान होतं. हा पूल रिश्टर स्केलवर 7.0 पर्यंतच्या भूकंपाचा सामना करू शकतो, असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं.
तिनसुकिया-नाहरलागून इंटरसिटी एक्स्प्रेस या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर हा पूल औपचारिक वाहतुकीसाठी खुला होईल. ही ट्रेन आठवड्यातून पाचवेळा धावणार आहे.
8. या पुलामुळे आसाममधील तिनसुकिया आणि अरुणाचल प्रदेशमधील नाहरलागून या शहरामधलं अंतर दहा तासांनी कमी होणार आहे.
9. या पुलाच्या खालच्या बाजूला दोन समांतर रेल्वे मार्ग आहेत. वरच्या बाजूला तीन पदरी रस्ता मार्ग आहे. रस्त्यावरची तसंच रेल्वेच्या माध्यमातून सातत्याने चालणारी वाहतूक पेलण्यास हा पूल सक्षम आहे.
10. अरुणाचल प्रदेश, आसामसह पूर्वांचलातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा मानला जात आहे. या पुलामुळे दिब्रूगढच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा
पण एवढंच या पुलाचं वैशिष्ट्य नाहीये. सुरक्षेच्या दृष्टिनंही 'बोगीबील ब्रिज' महत्त्वाचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल भारतीय लष्करासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
अरुणाचलची सीमा चीनला लागून आहे. इथे चीनकडून कोणताही हालचाल झाल्यास भारतीय लष्कर या पुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचू शकते. 'बोगीबील ब्रिज'च्या खाली दोन रेल्वे लाइन टाकण्यात आल्या आहेत आणि त्याच्यावर तीन पदरी रस्ता आहे. या रस्त्यावरून सैन्याच्या अवजड वाहनं, रणगाड्यांची सहज वाहतूक करता येऊ शकते.


No comments:

Post a Comment