Total Pageviews

Thursday 12 April 2018

सीमावादावरून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला दुखावणे चीनसाठी धोकादायक ठरू शकते. सध्याच्या काळातील युद्धे ही रणांगणावर नव्हे, तरआर्थिक आघाडीवर लढली जातात आणि


 चीन हा तर जगाचा सर्वात मोठा उत्पादक कारखाना म्हणून ओळखला जातोत्यामुळेच चीनने आता चर्चेच्यामाध्यमातून सामंजस्याने सीमाप्रश्न सोडविण्याची गोष्ट केली आहे.

सीमावाद वाढविण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्यासाठी भारताने मदत करावीअशी अपेक्षा नुकतीच चीनने व्यक्त केलीचीनने व्यक्त केलेली अपेक्षानक्कीच स्वागतार्ह आहेपण सीमावाद सोडविण्याची चीनची खरोखर इच्छा आहे कासीमावाद सोडवायचा म्हणजे चीनला जसा हवा तसा का आणिचीनला आताच हा प्रश्न सोडविण्याची उपरती का झालीहे प्रश्नही त्यामुळे निर्माण होतातकारण१९५० सालापासून दोन्ही देशांतील सीमावादाचाप्रश्न धगधगता ठेवण्यात चीनचा मोठा वाटा आहेदोन्ही देशांत १९१३ साली मान्य करण्यात आलेली ८९० किमीची मॅकमोहन रेषा चीनने पुढे अमान्यकेली आणि त्यानंतर ही सीमावादाची मालिका सुरू झालीतर आताचा वाद हा अरुणाचल प्रदेशावरून सुरू झाला आहेत्याआधी चीनने १९५९  १९६२साली या प्रदेशावर आक्रमण करत तो प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतलामात्रभारताने १९६३ साली चीनकडून हा प्रदेश परत मिळवलात्यानंतर १९७२साली भारताने अरुणाचल प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा आणि १९८७ साली राज्याचा दर्जा दिलाचीनचा आक्षेप इथेच असून अरुणाचल प्रदेश भारताचाघटक नव्हेतर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा तो करतोम्हणजेच १९५९ साली तिबेट तर गिळंकृत केलाचपण तेवढ्यावरही जमिनीची भूकन भागलेल्या चीनला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहेहा विषय एवढ्यापुरताच मर्यादित नाहीतर दोन्ही देशांतील सीमावादात आणखीही एक पक्षआहेतो म्हणजे पाकिस्तानकारण१९६३ साली पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील  हजार १८० वर्ग किमीचा भूप्रदेश चीनला दिलात्यामुळेभारत आणि चीनचा सीमावाद अधिकच गंभीर बनलाशिवाय १९६२च्या युद्धात चीनने भारताच्या लडाख प्रदेशातील ३८ हजार वर्ग किलोमीटरचाप्रदेशही बेकायदेशीरपणे गिळंकृत केलात्यामुळे आता चीनला जो काही सीमावाद सोडवायचा आहेत्याचा विचार चीनने भारताचा अवैधरित्याबळकावलेला सर्व प्रदेश भारताला परत देणार कायाच अनुषंगाने केला पाहिजे.
भारत आणि चीनमधील सीमावादावरून नेहमीच तणावाची स्थिती उद्भवतेगेल्याच वर्षी दोन्ही देशांत डोकलाम क्षेत्रावरून संघर्षाची ठिणगीपडलीयंदा वॉलॉंग आणि अरुणाचलच्या असाफिला भागातील भारतीय सुरक्षा दलांच्या गस्तीवरही चीनने आक्षेप घेतलायासंदर्भात भारत आणिचीनमधील सीमावाद आणि तणावाचे मुख्य कारण दोन्ही देशांतील सीमारेषा अजूनही अधोरेखित  करणे हे असल्याचे म्हटले जातेदोन्ही देशांतसीमा अधोरेखित  केल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे ही सीमारेषा अधोरेखित करणे गरजेचे आहेअसे बर्‍याचदा सांगितले जातेपण,हा वाद केवळ सीमेच्या अधोरेखिकरणापुरताच मर्यादित नाहीजर तो तसा असता तर चीनने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या भारताच्याअविभाज्य भागांवर मालकी हक्क सांगितला नसताचीनचे तर असेही म्हणणे आहे कीअरुणाचल प्रदेश नावाच्या कोणत्याही प्रदेशाला आपणमान्यता दिलेली नाहीयावरून चीनची संपूर्ण अरुणाचल प्रदेशाचा घास घेण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचेच दिसतेचीनने अरुणाचल प्रदेश स्वतःशीजोडण्यासाठीइथल्या नागरिकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्याही लढवल्याअरुणाचलातील नागरिकांना चीनमध्ये प्रवेशकरता यावा म्हणून स्टेपल व्हिसा देणेहा त्यापैकीच एक भागभारताने मात्र चीनच्या या धोरणाला नेहमीच विरोध केलागेल्यावर्षी तर चीननेअरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांची भारतीय नावे बदलत त्यांना चिनी भाषेतील नावेही दिलीतिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी गेल्या वर्षीअरुणाचलचा दौरा केलात्यावरही चीनने आक्षेप घेत प्रखर विरोध केलायाचा अर्थ चीनला दोन्ही देशांतील सीमावाद हा त्याला जसा हवा तसाम्हणजेच अरुणाचल प्रदेशावर हक्क प्रस्थापित करूनच सोडविण्याची इच्छा असेलअसाच घ्यावा लागेल आणि ते तसे असेल तर भारताने का म्हणूनचीनच्या सीमावाद सोडविण्यासाठी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा?
अरुणाचल प्रदेशाबाबत आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करावा लागेलतो म्हणजे ऊर्जाक्षमताअरुणाचल प्रदेश हा हिमालयीनपर्वतरांगांत वसल्याने येथे नैसर्गिक साधनसंपत्तीजलसाठेनद्यांची संख्या विपुल प्रमाणात आहेभारतासह जगभरात विजेची मागणी प्रचंडप्रमाणात वाढत असून अरुणाचल प्रदेशात ऊर्जानिर्मितीची मोठी क्षमता आहेहायड्रोपॉवर प्रकल्पांच्या उभारणीतून येथे अधिकाधिक वीजनिर्मितीकरता येऊ शकतेजवळपास ५८ हजार १६० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती येथून करता येऊ शकतेहे ओळखून आपली वाढती उर्जेची गरजभागविण्यासाठी चीनला इथल्या संपत्तीची नक्कीच हाव असणारअरुणाचल प्रदेशाला ओरबाडून चीनच्या अन्य भागाला समृद्ध करण्याचाही त्याचाडाव असेलत्यामुळे भारताने चिनी खेळीला वेळीच ओळखत आपली भूमिका आग्रहीपणे मांडायला हवीचीनची जगभरातील प्रतिमा ही नेहमीचजमिनीसाठी हपापलेला देश अशीच आहेजवळपास १५ देशांशी त्याचा सीमावाद सुरू आहेसोबतच दक्षिण चीन समुद्रावरील मालकीवरूनही चीनचीभूमिका नेहमीच दंडेलशाहीची असतेभारताशी तर त्याचा सीमावाद फार पूर्वीपासूनचा आहेपण आता चीनला हा सीमावाद सोडविण्याची उपरतीहोण्यामागे भारताची मोठी बाजारपेठ हेही एक कारण असू शकतेकारण दोन्ही देशांतील व्यापाराने गेल्यावर्षी ८४.४४ अब्ज डॉलर्सला गवसणी घातली.यात चीनमधून भारतात केल्या जाणार्‍या निर्यातीचा वाटा सर्वाधिक आहेत्यामुळे सीमावादावरून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला दुखावणेचीनसाठी धोकादायक ठरू शकते.
सध्याच्या काळातील युद्धे ही रणांगणावर नव्हेतर आर्थिक आघाडीवर लढली जातात आणि चीन हा तर जगाचा सर्वात मोठा उत्पादक कारखानाम्हणून ओळखला जातोत्या देशातील मालाला परदेशात मागणी असली तर तिथले आर्थिक व्यवहार सुरळीत चालू शकतात  त्यामुळेच तेथीलसमाजजीवन विकासाची उंची गाठू शकतेभारतीय बाजारपेठ यात मोलाचा हातभार लावतेत्यामुळेच चीनने आता चर्चेच्या माध्यमातून सामंजस्यानेदोन्ही देशांतील सीमाप्रश्न सोडविण्याची गोष्ट केलीभारताने मात्र चीनच्या आवाहनाला सावध प्रतिसाद द्यायला हवाकारणचीन सीमेवरचाआपला दावा कधीही सोडत नाहीअनेकदा सीमावादावरून संघर्ष सुरू करून तो प्रश्न तसाच चिघळत ठेवण्याची चीनची नीती असतेज्याच्याशी वादसुरू आहेत्याला गाफील ठेऊन आक्रमण करण्याचे चीनचे नियोजन असतेयाचा उल्लेख अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हेन्री किसींजर यांच्या ‘ऑनचायना’ या पुस्तकात आढळतोत्यांच्या मतेचीनने ‘ऍग्रेसिव्ह डेटरन्स पॉलिसी’ अंगिकारली आहेयाचा अर्थ असा कीभारताने चीनशी कितीहीव्यापारी वा आर्थिक संबंध सुधारले तरीही सीमावादाबाबत चीनचे धोरण आक्रमकच राहीलतिथे भारताला चीन कोणतीही सूट देणार नाहीयावरूनभारत आणि चीन यांच्यादरम्यानच्या सीमावादावरून दोन प्रकारचे चित्र दिसतेएकीकडे भारत-चीन यांच्यातील आर्थिक सहकार्य प्रचंड वाढत आहेआणि दुसरीकडे सीमावादावरून तणावही तितकाच वाढत आहेअशा परिस्थितीत भारतीय नेतृत्व चीनच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतेहे पाहणेऔत्सुक्याचे ठरेल


No comments:

Post a Comment