Total Pageviews

Friday 6 July 2018

त्यांच्या पदव्याही रद्द करा! महा एमटीबी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयूविद्यार्थी उमर खालिदतसेच या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा तत्कालीन अध्यक्षअनिर्बन भट्टाचार्य यांना विद्यापीठाने बडतर्फ (रिस्किटेककेले आहेहा निर्णय तमाम देशभक्तांचे समाधान करणारा असलातरी तोपुरेसा नाहीअसे आमचे मत आहेखरेतर या कथित विद्यार्थ्यांच्या सर्व पदव्या सरकारने रद्द करायला हव्यातदेशाचे तुकडे करण्याचीप्रतिज्ञा करणार्या या लोकांवर थोडीदेखील दयामाया दाखविण्याची गरज नाहीसरकारने कुठलीही भीडमुर्वत  ठेवता हा निर्णय घेतलापाहिजेअशी आमची मागणी आहे.
देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना तसेच शैक्षणिक क्षेत्राला कालिया नागाप्रमाणे विळखा घालून बसलेल्या कम्युनिस्ट लोकांनाहा फार मोठाधक्का आहेआतापर्यंत अशी कारवाई करण्याची हिंमत कुणातच नव्हतीती हिंमत जेएनयूने दाखविलीयाबद्दल त्यांचे अभिनंदनहीकेले पाहिजेकुठून आली असेल ही हिंमतनिश्चितच, 2014 साली केंद्रात आणि त्यानंतर इतरही राज्यांमध्ये भाजपाचे निर्विवादबहुमताने सरकार आले म्हणूनच ही हिंमत झालीहे मान्य करावेच लागेलकेंद्रात राष्ट्रीय विचारांचे भाजपाचे सरकार नसतेतरखालिदसारख्या देशद्रोह्यांना शिक्षा झालीच नसतीउलटत्यांना पाठीशी घालण्याचेच उपद्व्याप झाले असतेकारणया देशद्रोह्यांनापहिल्यांदा जेव्हा अटक करण्यात आलीत्याच्या विरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी जे धरणे आंदोलन केलेत्या धरण्याला काँग्रेसचेअध्यक्ष राहुल गांधीआनंद शर्माअजय माकन यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होतात्यामुळे केंद्रातभाजपासोडून दुसरे कुठलेही सरकार असतेतर या देशद्रोह्यांवर काहीच कारवाई झाली नसतीअसे जे आम्ही म्हणतोते यासाठीच!
फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूच्या आवारातच उमर खालिद  त्याच्या साथीदारांनी हातात फलक घेऊन ‘भारत तेरे टुकडे होंगेइन्शाल्ला,इन्शाल्ला’, ‘अफझल तेरे खून से इन्कलाब आयेगा’, ‘कश्मीर की आजादी तक जंग रहेगीजंग रहेगी’ इत्यादी घोषणाही दिल्या होत्या.जेएनयूतील ही घटना भयानक होतीया विद्यापीठात देशद्रोही शक्ती किती फोफावल्या होत्यात्याचा हा एक मासला होतातरीहीभारतातील सेक्युलर विचारवंतमीडिया यांनी या ‘टुकडे टुकडे’ गँगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाकम्युनिस्ट विचारसरणीनेशैक्षणिक क्षेत्रात घुसखोरी करून हे क्षेत्र किती खराब करून ठेवले आहेहे लक्षात येईलकम्युनिस्ट विचारसरणी देश तोडणारी आहे.समाजात फूट पाडूनया देशात अराजक निर्माण करायचे आणि त्यात आपल्या ‘लाल क्रांतीची पोळी शेकायचीहेच यांचे उद्दिष्ट आहेहेउद्दिष्ट कम्युनिस्टांनी कधीच लपवून ठेवले नाहीसार्या जगात कम्युनिस्टांनी हेच केले आहे आणि आजही करत आहेतत्यामुळे दोषकम्युनिस्टांना देता येणार नाहीया देशघातक विचारसरणीला देशात कुणी प्रतिष्ठित केलेते खरे दोषी आहेतकम्युनिस्ट विचारसरणीलाया देशात प्रतिष्ठित करण्याचे पाप काँग्रेसने केले आहेज्यांना आधुनिक भारताचे निर्मात म्हटले जाते.
इंदिरा गांधींनी कम्युनिस्टांना भारताचे शैक्षणिक क्षेत्रतसेच वैचारिक क्षेत्र खुले करून दिलेतेव्हापासून कम्युनिस्टांचीही विषारी वेल भारतात अनिर्बंधपणे फोफावत राहिली आहेवृत्तीने अत्यंत क्रूरपरंतु लोकशाहीचा मुखवटा घातलेल्या या कम्युनिस्टांशीशैक्षणिक क्षेत्रात लढा देणे म्हणजे जिवावर खेळणेच होतेतरीही या देशातील बहाद्दर देशभक्तांनी कम्युनिस्टांचे हे आव्हान छातीठोकपणेस्वीकारले होते.
कम्युनिस्टांच्या विद्यापीठरूपी किल्ल्यात दुसर्या विचारसरणीच्या कुणाही व्यक्तीला प्रवेश करणे दुरापास्त होतेकालांतराने देशभरातीलइतर विद्यापीठातील कम्युनिस्ट तटबंदीला तडे पडलेतकाही ठिकाणी ती कोसळलीपरंतु जेएनयूचा लाल किल्ला मात्र अभेद्य होतायाविद्यापीठाला देशात फार प्रतिष्ठा होती म्हणतातती किती वरवरची होतीहे आता लक्षात आले आहेया लाल किल्ल्याच्या आड याविद्यापीठात देशद्रोही शक्तींनी आश्रय घेतला होताकम्युनिस्ट तसेच या देशाचे तुकडे करण्याचे ध्येय असलेल्या अनेक विद्यार्थीयाविद्यापीठात वर्षोनुवर्षे बिनदिक्कत राहात होतेउमर खालिदकन्हैयाकुमारअनिर्बन भट्टाचार्यशेहेला रशीदजिग्नेश मेवाणीयांसारखे अनेक नेते सरकारच्या सर्व सुखसुविधांचा लाभ घेतभारताविरुद्ध विषवमन करण्यात पुढे होतेकुठल्या तरी विषयाच्यापदवीसाठी नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि नंतर संपूर्ण वेळ देशविरोधी राजकारण करण्यात घालवायचाहेच त्यांचे कार्य होतेपरंतुत्याचाकुठे बाहेर गवगवा होत नव्हतासर्वत्र दहशतीचे वातावरण होतेशिकण्यास येणारे विद्यार्थी या भानगडीत  पडता अभ्यासात मग्नराहायचे.
परंतु, 2014 साली केंद्रात पूर्ण बहुमताने मोदींचे सरकार आले आणि या देशद्रोह्यांचे दिवस फिरलेआता तर ही मंडळी पूर्णपणे उघडी पडलीआहेतएनजीओज्च्या माध्यमातून येणारा परदेशातील प्रचंड पैसा या लोकांना मिळत होतापैशाचा तो प्रवाहही आता आटला आहेहेअसेच काही काळ सुरू राहिलेतर जगातील इतर देशांप्रमाणे भारतदेखील कम्युनिस्टमुक्त होईलयात शंका नाहीपरंतुत्यासाठीभारतातील देशभक्त नागरिकांनी अतिशय सावध राहण्याची गरज आहेकेंद्रातील मोदी सरकार या लोकांना का नको आहेहेही लक्षातघेण्याची आवश्यकता आहेत्यादृष्टीने 2019 साली येणारी लोकसभेची निवडणूक फार महत्त्वाची आहेदेशातील मध्यमवर्गीयांची तर यातफार मोठी भूमिका असणार आहेकुठल्याही उथळ मागण्यांच्या आणि स्वत:च्या तात्कालिक स्वार्थाच्या प्रवाहात वाहवत  जातासर्वभारतीयांनी देशातील ही कम्युनिस्टांची विषवेल समूळ उपटून फेकण्याची गरज आहेया देशद्रोह्यांना कायद्याच्या चौकटीत जी शिक्षाद्यायची ती सरकारने दिली आहेआता पाळी नागरिकांची आहे..

No comments:

Post a Comment