Total Pageviews

Thursday 23 October 2014

सणांच्या बाजार पेठा्वर चीनी आक्रमण

सणांच्या बाजार पेठा्वर चीनी आक्रमण गेल्या दोन दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादीत नाही तर त्यांनी भारतीय बाजारपेठाही काबीज करायाला सुरूवात केली.सणातील फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके मोठय़ा प्रमाणावर भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत.भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. त्यामुळे हे फटाके आपण टाळावेत.चिनी फटाके भारतीय फटाक्यांपेक्षा स्वस्त आहेत.परिणामी आपल्या फटाका उद्योगाचे १ हजार कोटींचे नुकसान होते. बेकायदेशीररीत्या चिनी फटाक्यांची आयात चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे आहे. फटाक्यांच्या बाजारपेठेतील चिनी घुसखेरीला अटकाव करण्यासाठी शिवकाशीतील फटाका उत्पादकांनी आपले कारखाने बंद ठेऊन निषेध नोंदवला. या संपाची दखल घेऊन केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली.असून कठोर कारवाईसह शिक्षेची तरतूद केली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्यांामुळे फटाका उद्योग धोक्यासत आ्ला आहे.भारतात फटाके कोणत्या मार्गाने आले, याचाही शोध घेतला जाईल,असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. भारतीय फटाक्यांनी जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करावी आपले फटाके गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिनी फटाक्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि पर-क्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो.एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा व हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. परिणामी आपल्या फटाका उद्योगाचे विक्रीचे १ हजार कोटींचे नुकसान होते.चिनी फटाके जास्तकाळ टिकत नाहीत.त्या तुलनेत भारतीय फटाके वर्षभर टिकतात.'एरिअल' प्रकारात हे चिनी फटाके वरचढ ठरतात. भारतात फटाक्यां ची निर्मिती करताना पोटॅशिअम परक्लो्रेटचा वापर करण्यावर बंदी आहे. या कायद्यात काळानुसार बदल होण्याची गरज आहे. जेणेकरून भारतीय फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील तस्करी रोखा परदेशातून येणा-या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. तामिळनाडूमधील तुतिकोरीन बंदरावर येणा-या ५०० पैकी फक्त २० कंटेनरचीच तपासणी केली जाते. मागच्या महिन्यात शिवाकाशीमध्ये चिनी फटाके जप्त करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी नेपाळमधून देशात आलेले ६०० कंटेनर पकडण्यात आले होते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे भारतात येतो . देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने पुर्णपणे कॅप्चर केले आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चीनच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय. चिनी प्रचारसाहित्याला सर्वाधिक पसंती पंतप्रधान 'मेक इन इंडिया'चा नारा देत आहेत, असे असतानाही अनेक राजकिय पक्षांनी चिनी बनावटीच्या प्रचारसाहित्याला सर्वाधिक पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणूककाळात वाढणाऱ्या प्रचार साहित्याच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी चीनने याही क्षेत्रात घुसखोरी करत भारतीय बनावटीच्या प्रचार साहित्याला केव्हाच मागे टाकले आहे. निवडणूक प्रचार साहित्यात चायना टोप्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून अधिक प्रमाणात मागणी आहे.भारतीय टोप्यांच्या तुलनेत चायना टोप्या स्वस्त असल्याने त्यांना जास्त मागणी आहे. आपण या चीनी मालावर बंदी का घालत नाही? सर्व वस्तूंमध्ये चीनी घुसखोरी भारत हा सणांचा देश आहे.या वर्षी रक्षाबंधनाकरता ७५% राख्या चीनी बनावटीच्या होत्या. गणेशमूर्तीच्या बाजारपेठेत चीनने घुसखोरी पूर्वीच केलेली आहे.मोठय़ा प्रमाणात साजर्या केल्या जाणार्या उत्सवांना हेरून, आकाशकंदिल, दिवे, विविध भेटवस्तूंनी भारतीय बाजारपेठ चीनने व्यापली आहे. मागच्या दिवाळीत चिनी विक्रेत्यांनी भारतीय बाजारपेठेत १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला. फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. चिनी आकाश कंदिलांनी बाजारपेठेवर कब्जा केला आहे. हे कंदील भारतीय कंदिलांच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा त्यांच्याकडे असतो. चिनी तोरणांनी घर/बाजार सजतो. प्लॅस्टिकच्या दिव्यांच्या माळांना मोठी मागणी आहे. देशप्रेमी नागरिकांनो यावेळेस तरी देशी वस्तूच विकत घ्या. आपले लहान, मध्यम उद्योग बरबाद चीनच्या `मेड इन चायना’ वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २०-२५ टक्के वाटा पटकावला आहे. किंमती कमी असल्याने भारतीय विक्रेते व ग्राहकांची चिनी वस्तूंना पसंती लाभत आहे. भारतीय बाजारपेठेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून देवांच्या तसबीरी ते पूजेच्या साहित्यापर्यंत चीनची घुसखोरी आहे. आपली बाजारपेठ चिनी वस्तूंनी ओसंडून वाहते आहे. चीन खास भारताकरता वस्तू बनवून आपल्या लहान, मध्यम उद्योगांना पध्दतशीरपणे बरबाद करत आहे हे आपण लक्षात का घेत नाही? चिनी खेळण्यांवर बंदी घाला रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर या सगळ्या आपल्याकडच्या खेळण्यांमध्ये चीनने घुसखोरी करत वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे भारतीय खेळण्यांची मागणी घटली आहे. खेळण्यांचे मार्केट ८० टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. `सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. लहान मुलींच्या ज्वेलरीत शिसे वापरले जाते. त्यामुळे शरीराला धोका असतो. मागच्या वर्षी सांगली जिल्ह्यात एका पाच वर्षांच्या मुलाचा खेळण्यातल्या व्हिडिओ गेमचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. हे खेळणे `मेड इन चायना’ होते. भारतात अशा खेळण्यांवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे नियंत्रण कसे ठेवणार? पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे. बाय स्वदेशी भारताचे याआधीचे `बाय चायनीज’ धोरण त्या देशाच्या पथ्यावरच पडत आहे. भारतातील वीज क्षेत्रातील कंपन्या चिनी उत्पादकानुसार बदल करीत आहेत आणि ते भारतीय उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहेत.चिनी कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनली आहे. स्वदेशीची भाषा नष्टच झाली आहे. लोकहो, स्वदेशी मालच खरेदी करा. चिनी नको.जे आपल्या देशात चांगले पिकते / बनते, ते खरेदी करू या. सरकारने चीनकडून आयात होणार्या राख्या, दिवाळीत येणारे आकाश कंदिल, पणत्या, लाइटच्या शोभीवंत माळा, रंगपंचमीमध्ये येणार्या पिचकार्या पूर्णपणे थांबवल्या पाहिजे. चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात.चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे.आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे.चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगल करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत. आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाण लघुउद्योग निर्माण करावयाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू.मागचे सरकार या बाबत पूर्णपणे निष्क्रिय होते. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे.भारतामध्ये तामिळनाडू मधिल शिवकाशी हे फटाके निर्मितीचे मोठे क्रेंद्र आहे.२०/१०/२०१४ला तेथे झालेल्या स्फ़ोटात १७ कामगार मारले गेले.आपण दिवाळी कमी फ़टाक्याने का साजरी करत नाही?

No comments:

Post a Comment