Total Pageviews

Thursday 5 May 2011

DONT THROW STONNES AT TRAINS

गाडीवर दगड फेकण्यात आला प्रवाशाला आपला उजवा डोळा गमावावा लागला. उपनगरी गाडीवर दगड फेकण्याचे सहा प्रकार  मुंबईतील उपनगरी गाड्यांवर दगड फेकण्याचे प्रकार पुन्हा होऊ लागले असून प्रवाशांच्या आणि गाडी चालकाच्या जीवाशी खेळले जाणारे हे क्रूर खेळ तातडीने थांबविले जाण्याची गरज आहे. परवाच्या रात्री भायखळा स्थानकाच्या अलीकडेच उपनगरी गाडीवर दगड फेकण्यात आला. त्यामध्ये दाराजवळच उभे असलेले एक गृहस्थ जखमी झाले. ज्यांनी दगड मारले ती मुले प्रवाशांनी पाहिलीसुद्धा; परंतु चालत्या गाडीतून काहीच करता येणे शक्य नव्हते. हे गृहस्थ जखमी झाल्यानंतरच्या तासाभरातच वडाळा स्थानकाजवळ उपनगरी गाडीवर दगड फेकण्यात आला आणि त्यामध्ये एका प्रवाशाला आपला उजवा डोळा गमावावा लागला. त्या प्रवाशाचे जन्माचे नुकसान झाले. कोणाही व्यक्तीला आपला डोळा हे ज्ञानेंदिय गमावावे लागणे ही दु:खाचीच बाब असते. त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशासुद्धा त्यामुळे बदलू शकते.परंतु चालत्या गाडीवर दगड फेकण्याचा अविचार करणाऱ्यांच्या मनात असा विचार येत नाही. गेल्या तीन महिन्यांत चालत्या उपनगरी गाडीवर दगड फेकण्याचे सहा प्रकार झाले. हे सर्व प्रकार एकाच ठराविक टप्प्यात झाले आहेत. पैकी गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी टमिर्नसहून पुण्याकडे निघालेल्या प्रगती एक्सप्रेसच्या इंजिनवरच विक्रोळी ते घाटकोपरच्या दरम्यान दगड फेकण्यात आला. त्यामध्ये चालक प्रदीप कुमार जखमी झाले. परंतु त्यांनी धीराने गाडी कल्याणपर्यंत नेली. त्यांच्या या प्रसंगावधानाचे, धैर्याचे कौतुकच करायला हवे. परंतु त्यांच्या जिव्हारी हा दगड लागला असता आणि त्यांची शुद्धच हरपली असती, तर किती भीषण अपघात झाला असता, याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. एप्रिल महिन्यातच मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या इंजिनावर दगड फेकण्याचे आणखी दोन प्रकार घडले आणि ते विक्रोळी स्थानकाच्या आसपासच घडले. असेच प्रकार किंग्ज सर्कल ते अंधेरी, मसजिद बंदर ते दादर आणि कळवा ते दिवा यादरम्यान होत आहेत. या पट्ट्यामध्ये रेल्वेमार्गालगत झोपडपट्ट्या आहेत. तेथील मुले 'मजे'खातर गाड्यांवर दगड फेकतात. परंतु त्यांची मजा ही जीवघेणी ठरणारी असू शकते. त्यामुळेच किमान उपरोल्लेखित पट्ट्यांमध्ये तरी रेल्वेमार्गालगत उंच भिंत बांधणे आवश्यक आहे. दुसरे असे की समाजसेवी संघटनांनी या वस्त्यांमध्ये जाऊन तेथील मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणे, त्यांना समजावणे आवश्यक आहे. हतबल करून टाकणाऱ्या परिस्थितीत होणारी घुसमट व्यक्त करण्याचा दगडफेक हा मार्ग असूही शकतो; परंतु तो समंजसपणाचा नाही, हे नक्की

No comments:

Post a Comment