Total Pageviews

Saturday 23 September 2023

आय एम इ सी प्रकल्प बनू शकतो भारताकरता एक गेम चेंजर भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणारा मार्ग PART 2

 

या प्रकल्पांतर्गत दोन वेगळे कॉरिडॉर

आयएमईसी मध्ये दोन वेगळे कॉरिडॉर असतील. इस्ट कॉरिडॉरच्या माध्यमातून भारताला मध्य आशियाशी जोडले जाईल. तर नॉर्थ कॉरिडॉरच्या माध्यमातून पश्चिम आशियाला युरोपशी जोडले जाईल.  एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की एका देशातून दुसऱ्या देशात जहाजांच्या तसेच रेल्वेच्या माध्यमातून एक विश्वासार्ह आणि पुरक दळणवळणाचे जाळे निर्माण होईल.

हा प्रकल्प अमेरिका नेतृत्व करत असलेल्या पार्टनरशीप ऑफ ग्लोबल इन्फ्रास्टकर्च इन्हेवस्टमेंट’ (पीजीआयआय) या प्रकल्पाचा एक भाग आहे . २०२३ सालाच्या मे महिन्यात जपानमधील हिरोशिमा येथे जी देशांची एक बैठक झाली होती. या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली होती.

चीनला शह देण्यासाठी कॉरिडॉर

चीन 365 दिवस भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध लढत असतो. यामधील एक महत्त्वाचा आयाम म्हणजे आर्थिक युद्धामध्ये चीनला शह देण्याकरता या प्रकल्पाचा मोठ्या उपयोग होणार आहे. चीनच्या बीआरआयप्रकल्पा ला समर्थ पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. भारताला थेट युरोपपर्यंत जोडणारा प्रकल्प म्हणून आयएमईसीकडे पाहावे लागेल. भारतीय मालाच्या निर्यातीला चालना देणारा , लाखो रोजगाराच्या संधी प्रदान करणारा ; तसेच प्रदेशातील भारताचे महत्त्व वाढवणारा हा प्रकल्प आहे. अमेरिका , ‘युरोपीय महासंघयात भारताचे भागीदार असणार आहेत.

व्यापार, कनेक्टिव्हिटी , ऊर्जा , सुरक्षा ,प्रादेशिक स्थैर्य यासाठी

विशेषतः मध्यपूर्वेमध्ये,जेथे संघर्ष,दहशतवाद आणि लागू असलेले निर्बंध यांच्यामुळे कॉरिडोरच्या क्रिया कलापांना तसेच गुंतवणुकीला धोका दिसून येतो.चीन, रशिया , इराण आणि तुर्की यांचे भौगोलिक राजकारण तसेच प्रदेशावर वर्चस्व ठेवण्यासाठीची स्पर्धा सहभागी देशांच्या हिताला मारक ठरू शकते.ते हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ नये किंवा त्याला नुकसान पोहोचवण्याचा ते प्रयत्न करू शकतात. प्रकल्पासाठीची अवाढव्य गुंतवणूक आणि समन्वय अत्यंत आवश्यक आहे. अनेक देश यात गुंतवणूक करत असल्याने वाहतूक पद्धती,मानके, नियम सारखे असले पाहिजे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारताना नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाईल.

सदैव गजबजलेल्या सुएझ कालव्याला एक समर्थ पर्याय म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. युरोपला माल वाहतूक करण्यासाठी नवा मार्ग, यातून काढण्यात येणार आहे. भारतीय मालाच्या निर्यातीला चालना देणारा , रोजगार निर्माण करणारा , विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणारा ,असे याचे स्वरूप आहे. चीन वरील अवलंबित्व कमी करणारा तसेच व्यापारी भागीदारांमध्ये विविधता आणणारा ,असा हा कॉरिडोर आहे.

पाकिस्तानला वगळून भारत हा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे पाकचे महत्त्व कमी करणारा प्रकल्प, असे या कडे पाहता येते. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे पाकचे मित्रदेश यात सहभागी होत असल्याने, पाक प्रदेशात एकाकी पडणार आहे. अमेरिका आणि जपान हे चीनचे प्रतिस्पर्धी देश यात भारताचे भागीदार आहेत. 

मात्र पाकिस्तान सह चीनलाही व्यापाराच्या संधी हा प्रकल्प देउ शकतो. व्यापार, कनेक्टिव्हिटी , ऊर्जा , सुरक्षा ,प्रादेशिक स्थैर्य यासाठी हे दोन्ही देश भारतासोबत येऊ शकतात. भारताकरता हा आर्थिक महाप्रकल्प एक मोठा गेम चेंजर बनू शकतो.

 

 

 

No comments:

Post a Comment