Total Pageviews

Thursday 21 September 2023

कॅनडाचे नागरिकत्व मिळवण्याकरता खालिस्तानी दहशतवादाचा वापर एक रामबाण उपाय...

हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?

जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली.

 September 22,

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जस्टिन यांच्या या विधानानंतर आता भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हरदीपसिंग निज्जर कोण होता? कॅनडात राहून भारतविरोधी करावाया करणाऱ्या, खलिस्तान चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी पंजाबमधील तरुणांना उद्युक्त करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर भारताने कशी कारवाई केली? अशा संघटना चालवणाऱ्या निज्जर तसेच इतरांवर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या….

 

खलिस्तान टायगर फोर्स दहशतवादी संघटना म्हणून घोषित

जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली. भारत सरकारने या संघटनेचा हर्षदीपसिंग निज्जर याच्यासह अन्य आठ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले. परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करणे, परदेशातून पंजाबमधील शीख तरुणांना अतिरेकी गटात सामील होण्यास प्रवृत्त करणे या आरोपांखाली भारताने ही कारवाई केली. यातील निज्जर याचा चालू वर्षातील जून महिन्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारत सरकारने केटीएफ या संघटनेलादेखील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. यूएपीए कायद्याअंतर्गत सरकारने ही कारवाई केली.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका काय?

हा निर्णय घेताना परराष्ट्र मंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्स ही संघटना दहशतवादी पृवत्तीला प्रोत्साहन देते, असे म्हटले होते. “ही एक दहशतवादी संघटना आहे. पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरूज्जीवन करण्याचा या संघटनेचा उद्देश आहे. ही संघटना भारताची प्रदेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व याला आव्हान देत आहे. तसेच ही संघटना दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत आहे. पंजाबमध्ये ही संघटना लोकांची हत्या करण्यास प्रोत्साहित करते,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

 

वेगवेगळ्या संघटनांकडून खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन

निज्जर याच्यासह अन्य आठ जणांना भारताने दहशतवादी घोषित केलेले आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या संघटनात कार्यरत असून त्यांनी पंजाबमधील असंतोषाला चालना देण्याचे काम केलेले आहे. अमेरिकेत असलेलाशिख्स फॉर जस्टीसया बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य गुरपतवंत सिंग पन्नू, पाकिस्तानमधीलबब्बर खालसा इंटरनॅशनलया दहशतवादी संघटनेचा वधवासिंग बब्बर, ‘इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनही संघटना चालवणारा लखबीरसिंह रोडे, पाकिस्तानमधीलखलिस्तान झिंदाबाद फोर्सया संघटनेचा प्रमुख रणजितसिंग, ‘खलिस्तान कमांडो फोर्ससंघटनेचा प्रमुख परमजितसिंग, जर्मनीतीलखलिस्तान झिंदाबाद फोर्ससंघटनेचा सदस्य भूपंदरसिंग भिंडा, याच संघटनेशी संबंधित असलेला आणि सध्या जर्मनीत असलेला गुरुमितसिंग, बब्बरखालसा इंटरनॅशनल संघटनेचा प्रमुख असलेला परमजितसिंग अशी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांची नावे आहेत.

 

पंजाबमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला गुरपतवंत सिंग पन्नू त्याची संघटना शीख्स फॉर जस्टीसच्या माध्यमातून उघडपणे भारतविरोधी मोहीम राबवत होता. गुरपतवंत सिंह याबाबत परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. “दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेले सर्व नऊ जण हे भारताच्या बाहेर राहून देशविरोधी कृत्य करत होते. भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा ते प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे देशविरोधी कृत्य करण्यासाठी ते सर्वजण एकमेकांना मदतही करत होते,” असे शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

 

निज्जर करायचा द्वेषयुक्त, बंडखोरीला चालना देणारी विधाने

निज्जर हा मूळचा जालंधर येथील भरसिंगपुरा या गावातील रहिवासी आहे. केटीएफ संघटनेला आर्थिक मदत करणे, तरुणांना प्रशिक्षण देणे, या संघटनेचा विस्तार करणे अशा प्रकारच्या कामांत त्याचा समावेश होता. राष्ट्रीय तपास संस्थाने (एनआयए) त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच तपासादरम्यान निज्जर याने सोशल मीडिया, फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून द्वेषयुक्त, बंडखोरीला चालना देणारी विधाने केलेली आहेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

No comments:

Post a Comment