Total Pageviews

Tuesday 28 January 2020

DEशविरोधी वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामला अखेर अटक करण्यात आली-सीएए विरोधी आंदोलनाला कट्टर मुस्लीम संघटनांकडून आर्थिक सहाय्य : ईडीची माहिती



    Former JNU student and the main organiser of the Shaheen Bagh protest, Sharjeel Imam has been arrested from Bihar's Jehanabad. Cases have been registered against in five states across the country for urging Muslims to gather at 'Chickens Neck' (Siliguri Corridor) and cut-off North-East from rest of India!
 
A columnist in far-left rag The Wire, Imam was on the run for the last many days since his speech video went viral. Sharjeel Imam's brother was also arrested by the police in connection with anti-national and communal speeches at the anti-CAA protest.
 
Sharjeel Imam is one of the key organisers of the protests at Shaheen Bagh. Delhi Police revealed that he had delivered an inflammatory speech earlier on the Jamia Milia Islamia campus and an FIR had been registered against him.
 
Another case was registered against Imam in Assam under the anti-terror law, taking cognisance of his remark that Assam must be "cut off from rest of India India”. Police in Manipur and Arunachal Pradesh had also lodged FIRs against Imam in connection with the same incident.
 
Meanwhile, his mother told the media that her son was "not a law-breaker and he had been in favour of "calling off" the agitation at Shaheen Bagh. A few hitherto unknown JNUSU representatives came forward to organise a protest march in support of Sharjeel Imam inside JNU on January 27.दिनांक  28-Jan-2020
 अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उत्तर प्रदेशातील नागरिकत्व कायद्याविरूद्ध हिंसक कारवायांसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)ला जबाबदार धरले आहे. ईडीने एका अहवालात दावा केला आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) तब्बल १२० कोटी इतकी रक्कम ७३ बँक खात्यात वर्ग केली. हे १२० कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा ही ईडी करीत आहेत. संघटनेतील सदस्यांच्या अटकेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
ईडीने सीएएच्या निषेधाच्या वेळी ईडीने पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांमधील व्यवहाराचा तपशील गृह मंत्रालयाकडे सोपविला आहे. जे स्पष्टपणे दर्शवते आहे की, विरोधी आंदोलनच्या काळात पीएफआयच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आणि काढली गेली. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने आपला अहवाल गृह मंत्रालयाला दोन भागात सादर केला आहे. पहिला भाग जानेवारी ते डिसेंबरदरम्यान पीएफआय आणि त्यासंबंधित संस्थांच्या खात्यांमधील व्यवहारांबाबतचा आहे, ज्या दिवशी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते. दुसर्यार भागात गेल्या अनेक वर्षांत पीएफआय आणि त्याच्या सहयोगी संस्था आणि व्यक्तींच्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांचा तपशील. ज्या खात्यांत ही रक्कम जमा झाली त्यात कपिल सिब्बल, इंदिरा जयसिंग यांच्यासह देशातील अनेक नामवंत वकीलांची नावे आहेत.
वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना ७७ लाख रुपये, इंदिरा जयसिंग यांना चार लाख रुपये आणि दुष्यंत दवे यांना ११ लाख रुपये दिले गेले आहेत. त्याचबरोबर एनआयएकडून आरोपी घोषित झालेल्या आरोपी अब्दुल समद यांला ३.१० लाख रुपये देण्यात आले आहे. न्यू जोथी ग्रुपला एक कोटी १७ लाख रुपयांची रक्कम दिल्याचा उल्लेख आहे. काश्मीरला एक कोटी ६५ लाख रुपये हस्तांतरित केल्याचा उल्लेख आहे. तथापि, पीएफआय आणि कपिल सिब्बल यांनी हे स्पष्ट केले की, हाडिया हाडिया प्रकरणात फी म्हणून देण्यात आले आणि सीएएविरोधात नुकत्याच झालेल्या निषेधाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याचवेळी इंदिरा जयसिंग यांनी पीएफआयकडून पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मात्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) उत्तर प्रदेशातील नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात हिंसाचार पसरवण्यासाठी १२० कोटी रुपये दिल्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पीएफआयचे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व कामे कायद्याच्या आधारे केली आहेत आणि आरोप करणार्यांनी पुरावे सादर करून हे दावे सिद्ध केले पाहिजेत.


पीएफआयशिवाय सिमी ही संघटना ही सक्रीय

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही कबूल केले की, सीएएच्या नावाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये पीएफआयशिवाय स्टूडेंट इस्लामिक मुमेंट ऑफ इंडिया’(सिमी) ही संघटना ही सक्रीय होती. आसामच्या अर्थमंत्र्यांनी हिंसक निदर्शनांमध्ये अशा बंदी घातलेल्या संघटनांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. या संघटनेशी संबंधित साहित्य, झेंडे, पत्रके, बॅनरसुद्धा अटकेच्या वेळी जप्त करण्यात आल्या आहेत.
पटना : भारतापासून आसाम स्वतंत्र करा असे म्हणत देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामला अखेर अटक करण्यात आली आहे. बिहारमधील जहानाबाद या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी जहानाबाद या ठिकाणी शरजीलच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केले. दिल्ली येथील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा तो माजी विद्यार्थी होता. त्याने चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच देशद्रोहाचा आरोपही त्याच्यावर आहे. दरम्यान, पोलिसांनी शरजीलला अटक करण्यासाठी सोमवारी रात्री बिहारमधील त्याच्या वडिलोपार्जित निवासस्थानावरही छापा टाकला. छाप्यादरम्यान शरजील सापडला नाही तर पोलिसांनी त्याचा भाऊ मुझम्मिल आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांकडून चौकशी केली जात आहे.


शरजील इमामच्या शोधात सहा राज्यांचे पोलीस

शरजील इमामच्या शोधात सहा राज्यांच्या गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्याच्याविरूद्ध सहा राज्यात देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केले आहेत. शरजीलच्या अटकेसाठी पोलिस बिहारसह मुंबई आणि दिल्ली येथेही छापे टाकत आहेत. त्याचे नेपाळमध्ये पलायन होण्याच्या धर्तीवर बिहार-नेपाळ सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला होता



जेएनयू प्रशासनाने मागितले स्पष्टीकरण

दरम्यान, शरजीलच्या बाबतीत जेएनयू प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जेएनयू प्रॉक्टरने शरजीला समन्स बजावून देशद्रोहाच्या आरोपावरून ३ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे
आता शरजीलइमामाकडे वळू!


दिल्लीतील शाहीन बाग सध्या गाजत आहे. त्या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करण्यासाठी जी निदर्शने होत आहेत, त्यामध्ये जिना की आझादीअशा घोषणा दिल्या जात होत्याच. त्यामध्ये आता त्या निदर्शनाचा सूत्रधार असलेल्या शरजील इमाम याने आणखी तेल ओतले आहे. जेएनयुमध्ये शिकत असणार्या् या तरुणाने, देशाचा आसामशी असलेला संबंध कसा तोडून टाकणे शक्य आहे, त्याची योजनाच जाहीर केली! ईशान्य भारतास जोडणारा सिलीगुडी कॉरिडॉरनावाचा जो २२ किमीचा चिंचोळा भूप्रदेश आहे, त्यावर ताबा मिळविला की आसाम देशापासून तोडणे सहज शक्य आहे, असे या महाभागाने म्हटले आहे. चिकन नेकया नावाने ओळखला जाणारा हा भूप्रदेश नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान असून तो देशाच्या संरक्षणाचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा आहे. चार-पाच लाख मुस्लिमांनी त्या भागावर कब्जा घेतला की, आसाम आणि ईशान्य भारतात आपण हवे ते घडवू शकू, असे तारे या देशद्रोही इमामाने तोडले आहेत. आता या शरजील इमाम याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपांखाली गुन्हे नोंदविण्यात आल्याने आपले काळे तोंड लपविण्यासाठी तो एका राज्यातून दुसरीकडे पळापळ करीत आहे.



या देशात राहणारे काही नतद्रष्ट देशाशी इमान न राखता फुटीरतेची भाषा कशी बोलत आहेत, ते यावरून लक्षात येते. सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आणल्यानंतर असे अनेक ढोंगी मुखवटे गळून पडू लागले असून त्यांचे भीषण चेहरे पुढे येऊ लागले आहेत. अशा व्यक्ती मोजुनी माराव्या पैजारायापेक्षा भयंकर गुन्हे करीत आहेत. देशाचे ऐक्य बाधित कसे होईल, असा जो प्रयत्न देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालल्याचे दिसत आहे, त्या व्यापक मोहिमेचा हा भाग असल्याचे दिसते. अशा राष्ट्रविरोधी शक्तींचे मनसुबे उधळून लावायला हवेत. अशा देशद्रोही शक्तींना खड्यांसारखे बाजूला टाकायलाच हवे!


No comments:

Post a Comment