Total Pageviews

Saturday 6 July 2019

मुंबई महापालिकेवर टिका करणाऱ्या समर्पीत ! बृहमुंबई महानगर पालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती. बेजबाबदार नागरिक भावना


मुंबई महापालिकेवर टिका करणाऱ्या  समर्पीत !

बृहमुंबई महानगर पालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती. बेजबाबदार नागरिक भावना

आपण टीव्हीवर बातम्या मध्ये पाहतोय की मीडियाने महापालिकेच्या अपयश मिळाल्याबद्दल बाऊ केला आहे. *कबूल आहे की अनेक शहरामध्ये पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्व नियोजनाचा अभाव होता यात अनेक महापालिका अपयशी ठरल्यात* . पण, एक सुजाण नागरिकाच्या भावनेतून वैयक्तिक स्तरावर *तुम्ही* नाही का अपयशी ठरलात ?

*तुम्ही* खाद्य पदार्थांचे वेष्टन्न, प्लास्टिक प्लेट्स आणि चमचे *ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेकून देता* जे नष्ट होत नाही व रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेज मध्ये अडकून राहते ज्यामुळे ट्रॅकवर पाणी साठते व  ट्रेन बंद होतात.
दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*

*तुम्ही* तुमचे वापरलेले सॅनिटरी पॅड व प्लास्टिक वस्तू कचरा कुंडीत न टाकता थेट टॉयलेटच्या ड्रेन मधून फ्लश करून देता ज्यामुळे सिवेज पाईपलाईन ब्लॉक होते.
दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*

*तुम्ही* तुमच्या गाड्या रस्त्यावर अशा ठिकाणी पार्क करता की जिथून पालिकांच्या ट्रकला ड्रेनेज सफाई करता येता येत नाही. दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*

*तुम्ही* तुमच्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा या मध्ये वर्गीकरण करत नाही व तुम्ही अथवा तुमचा सफाई कामगार तो कचरा एकत्रितरित्या बेजबाबदारपणे रस्त्यावर टाकतो व तो कचरा पावसात विखुरला जातो. दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*

*तुम्ही* खरेदीसाठी मार्केटमध्ये जाताना पुनर्वापर करण्यायोग्य कापडी पिशवी नेत नाही जेणेकरून प्लास्टिक मुक्त समाज निर्माण होईल, आणि भाजीवाल्यासोबत आणखी एका कॅरीबॅग साठी वाद घालता.
दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*

 घरातून बाहेर पडताना पुनर्वापर करण्यायोग्य पाण्याची बाटली सोबत न नेता प्रत्येक वेळी जेव्हा मिनरल वॉटरची बाटली खरेदी करता तेव्हा प्लास्टिक कचरा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावता.
दोषी कोण ?
*महापालिका का तुम्ही ?*
महापालिका *घनकचरा ( आरोग्य ) विभागाचे कामगार सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतो, तोच नाल्यात ,गटारात उतरतो आणि स्वच्छ करतो.सार्वजनिक संडास , मलनिःसारण नळीका  , मोठे हॉस्पिटल मध्ये आजारी रूग्णांची घाण साफ करणे,पालिकांचे कामगार हे सतत मोठमोठ्या रोगराईचा सामना करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य संभाळत असतो, ह्या कामगाराचे आयुष्य फक्त ४०ते ५०वर्षे असते,* त्याला घाणीचे काम करताना दारूचा आधार घ्यावा लागतो.त्याशिवाय घाणीत काम करु शकणार नाही.

            सर्वच सुशिक्षित नागरिकांना विचारतो की, जर साधं कचर्याची  गाडी बाजूंनी गेली तरी नाकाचे केस जळतात, *ज्याप्रकारे सीमेवर असलेल्या सैनिक शत्रूचा शिरकाव आपल्या सीमेत येऊ देत नाही आणि नागरिकांचे रक्षण करतो त्याच प्रमाणे पालिकेचे कामगार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतो.
*घाणीत रोज मरणारा कामगार दिसत नाही.... त्याला मरताना सर्टिफिकेट मिळते "बेवडा मेला " हेच त्यांचे "परमवीर चक्र"असते.*
आपणही आत्मपरिक्षण करावे...... उठसुट महापालिकेवर बोटे दाखवू नये , *आपणं सुध्दा या सुंदर शहराची काळजी घ्यावी... कारण कचरा निर्माण करून यास जबाबदार आपणच आहोत....*
ही नम्र विनंती.........                     
                  

बदलाची सुरुवात होते ती
*तुमच्यापासून सुरवात करा*

*आधी एक जबाबदार नागरिक बना.*

No comments:

Post a Comment