Total Pageviews

Friday 2 May 2014

BOMB BLASTS CHENNAI

हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना धर्मांध आणि माथेफिरू बनवून त्यांचा वापर आपल्याविरुद्ध केला जात आहे व त्याच धर्मांधांवर दिल्लीतील सरकारे सवलतीची खिरापत उधळीत आहेत. हे असेच चालणार असेल तर पोलिसांच्या हातातील बंदुका धर्मांध माथेफिरू रस्त्यारस्त्यांवर खेचून घेतील व त्याच बंदुका देशाच्या छाताडावर रोखून या देशाचा पाकिस्तान बनवतील. देश त्याच दिशेने चालला आहे. चेन्नई स्फोटांचा तोच संदेश आहे. चेन्नईतला स्फोट! लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत चेन्नई रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे चेन्नई हादरले आहे. अर्थात, चेन्नई हादरले असले तरी राजकीय नेत्यांना हादरे बसले आहेत काय? चेन्नईतील स्फोटाने सुरक्षा व्यवस्थेचे धिंधवडे वगैरे नेहमीप्रमाणे निघालेच आहेत. लोकसभा निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची तोंडे सैल सुटली आहेत व त्यांच्या तोंडातून विषारी फटाके फुटत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांनी जनतेचे कान बधिर झाले असतानाच चेन्नई रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले. मात्र या स्फोटांनी निवडणूकबाज नेतेमंडळींच्या कानाचे पडदे फाटण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. कारण यापूर्वीही देशात विविध ठिकाणी अनेक भीषण बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यात शेकडो निरपराधांचे जीव गेले आहेत. हजारोंच्या नशिबी आयुष्यभराचे अपंगत्व आले. शेकडो कुटुंबांना या स्फोटांनी उद्ध्वस्त केले आहे, पण म्हणून देशातील दहशतवादी कारवायांविरुद्ध राज्यकर्त्यांनी कणखर भूमिका घेऊन कठोर उपाय योजले असे झाले नाही म्हणूनच देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात बॉम्बचे धमाके होतच असतात आणि निरपराधांचे जीव जातच असतात. अर्थात त्यामानाने चेन्नई स्थानकावरील स्फोटात एकाच महिलेचा मृत्यू झाला आहे आणि आठ-दहा प्रवासी जखमी झाले असल्याने कदाचित आमच्या राजकारण्यांना या स्फोटाची तीव्रता कळणार नाही, पण ज्या निरपराध महिलेने चन्नई स्थानकावर प्राण गमावला आहे तिचा गुन्हा काय होता? सरकार व राजकारण्यांच्या ढिलाईमुळे तिने प्राण गमावला आहे. लोकसभा निवडणुका शांततेत पार पडत असताना हे घडले. आतापर्यंत शांततेत झालेल्या निवडणूक प्रक्रियेलाच चेन्नईतल्या स्फोटांनी गालबोट लागले आहे व त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. छत्तीसगडमध्ये ऐन निवडणुकीत नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यात नऊ पोलीस मारले गेले. कश्मीर खोर्‍यात अतिरेकी घुसले. त्या चकमकीत एका बहादूर मेजरसह दोन जवान शहीद झाले व आता चेन्नई स्थानकावर स्फोट घडवून अतिरेक्यांनी त्यांचे वळवळणारे शेपूट जोरात आपटले आहे. हिंदुस्थानातील सामान्य जनता रेल्वेतून प्रवास करते व त्यांना इतर नेत्यांप्रमाणे सुरक्षेचे कवच नसते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सहज घुसून दहशतवाद्यांना स्फोट घडविता येतात. मुंबई, दिल्ली, बंगळुरू येथे असे हल्ले वारंवार झाले आहेत व निरपराध्यांच्या रक्ताचे सडे पडले आहेत. चेन्नईतील स्फोटांचे खापर नेहमीप्रमाणे पाकिस्तानवर फोडून राज्यकर्ते मोकळे होतील, पण पाकड्यांनी बॉम्ब ठेवण्यासाठी ज्या हातांचा वापर केला ते हात तर याच देशातील असतील ना? मग ते इंडियन मुजाहिद्दीन किंवा तोयबा वगैरेंपैकी कुणीही असतील, पण या सगळ्यांनी देश फाडून आणि पोखरून ठेवला आहे. पाकिस्तानला सुकी दमबाजी करण्यापेक्षा हिंदुस्थानातील या गद्दारांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत तुमच्यात आहे काय? पाकिस्तानने आपल्याशी थेट युद्ध पुकारलेले नाही. हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना धर्मांध आणि माथेफिरू बनवून त्यांचा वापर आपल्याविरुद्ध केला जात आहे व त्याच धर्मांधांवर दिल्लीतील सरकारे सवलतीची खिरापत उधळीत आहेत. मुंब्रा-कौसा हा भाग महाराष्ट्रात आहे, पण तिथे पोलीस आत जाऊन धर्मांध गुन्हेगारांचा शोध घेऊ शकत नाहीत. अमेरिकेचे सैन्य थेट पाकिस्तानात घुसले व ‘अल कायदा’चा म्होरक्या लादेनला खतम करून परत आले, पण आमचे पोलीस मुंब्रा-कौसा भागात जाऊन अतिरेक्यांना शोधू शकत नाहीत. एखादी धाडसी पोलीस कारवाई झालीच तर राजकीय दबावापोटी ती मध्येच रोखली जाते आणि संबंधित पोलीस अधिकार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडण्याऐवजी कारवाईचा दंडुका बसतो. कारण राज्यकर्त्यांना कायदा-सुव्यवस्थेची व देशाच्या हिताची नाही, तर मुस्लिम मतांची काळजी असते. हे असेच चालणार असेल तर पाकिस्तानला युद्ध करण्याचीही गरज नाही. पोलिसांच्या हातातील बंदुका धर्मांध माथेफिरू रस्त्यारस्त्यांवर खेचून घेतील व त्याच बंदुका देशाच्या छाताडावर रोखून या देशाचा पाकिस्तान बनवतील. देश त्याच दिशेने चालला आहे. चेन्नई स्फोटांचा तोच संदेश आहे

No comments:

Post a Comment