Total Pageviews

Sunday 22 November 2015

HOW INDIANS ILLTREATED IN SAUDIARABIA

भारतीय मजुरांची आखाती छळछावणी First Published : रवींद्र राऊळ सौदी अरेबियात कामासाठी जाणारे अनेक जण. घरात पडेल ते काम करणा:या अशिक्षित, अल्पशिक्षित महिला मोलकरणींचं त्यातलं प्रमाण लक्षणीय. कस्तुरी मुनिरथिनम ही 58 वर्षीय अशीच एक भारतीय महिला. तिच्या सौदी मालकिणीनं तिचा उजवा हातच कापून टाकला! नुकत्याच घडलेल्या या घटनेने आखाती देशात होणा:या भारतीय कामगारांचा छळ पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. का कापला तिचा हात? गेल्या काही महिन्यांपासून होणा:या असह्य छळापासून सुटका करून घेण्यासाठी आपल्या मालकिणीच्या घरातून पळ काढण्याचा प्रयत्न तिनं केला. तिच्या या ‘अपराधा’ची शिक्षा म्हणून कस्तुरीचा थेट हातच कापून टाकण्यात आला. या घटनेचा निषेध करीत भारत सरकारने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर भारतातून महिला घरेलू कामगार पाठवणं बंद करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र गेली अनेक वर्षे सातत्याने भारतीय मजुरांच्या अनन्वित छळाचे असे अनेक प्रकार आखाती देशांत होऊनही आतार्पयत त्याविरोधात परिणामकारक हालचाल न झाल्याने आता या घटनेनंतरही त्याला आळा बसेल का, याबाबत भारतीय कामगार साशंकच आहेत. भारतात रोजगाराची संधी नसल्याने हतबल झालेले हजारो कामगार ब:यापैकी कमाई होईल या आशेने नशीब आजमावण्यासाठी परदेशात जातात. उच्चशिक्षित अमेरिका, युरोपमध्ये धाव घेतात, तर अशिक्षित, अर्धशिक्षित कामगार आखाती देश गाठतात. त्यात वेल्डर, फिटरसारखं तांत्रिकी काम करणा:यांपासून ड्रायव्हर, वेटर, हेल्पर, घरेलू कामगार, माळी अशा कुशल - अकुशल कामगारांचा भरणा असतो. एकटय़ा सौदीमध्येच दररोज सुमारे एक हजार मजूर कामाच्या शोधात जाऊन थडकतात. काही र्वष परदेशात काम करून ब:यापैकी पैसे गाठीशी बांधावेत, या अपेक्षेने गेलेल्या बहुसंख्य कामगारांचा तेथे जाताच मात्र भलताच भ्रमनिरास होतो. ज्या कामासाठी बोलावलेलं असतं अथवा रिक्रूट एजंटने जे आश्वासन दिलेलं असतं ते काम न देता भलतीच कामं गळ्यात मारली जातात. मग कॅफेटेरिया, सुपर मार्केट, बांधकामांची ठिकाणं, गेस्ट हाऊसमध्ये पडेल ते काम अशा कामगारांना करावं लागतं. आपल्याकडे असेल नसेल ते विकून, कर्ज काढून दुस:या देशांत आलेल्यांना परत फिरण्याचा मार्ग असाही बंदच झालेला असतो. ‘पैसा मिळतोय’ याच कारणानं मग ते तिथे राबत राहतात. बहुतांश वेळा जे ‘आमिष’ दाखवलेलं असतं, तेवढा पैसा मिळत नाहीच, मरेस्तोवर राबावं मात्र लागतं. कामाच्या शोधात आखाती देशांत जाणा:या भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. सुमारे 24 ते 28 लाख भारतीय कामगार एकटय़ा सौदी अरेबियात आहेत. यात महिलांचं प्रमाणही बरंच आहे. जवळपास पाच लाख भारतीय मोलकरणी सौदी, कुवेत, कतार, बाहरीन, युनायटेड अरब अमिरात आणि ओमान येथे दिवसरात्र राबून आपला मेहनताना भारतातील कुटुंबीयांना पाठवतात. तेथे जणू त्यांच्याकडून वेठबिगारीच करून घेतली जाते. बेबी सिटरपासून हाऊसकिपिंगर्पयत सारी कामं सोपवली जातात. नशिबी असं गुलामीचं जिणं आलं की त्या महिला वा पुरुष तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातून छळचक्र सुरू होतं आणि कस्तुरीवर प्रसंग गुदरला तशा संकटाला तोंड द्यावं लागतं. आज असे हजारो भारतीय महिला आणि पुरुष कामगार प्राण कंठाशी आणून मायदेशी परतण्यासाठी धडपडत असल्याचं दिसून येतं. कामावर रुजू होताच मालक त्या कामगाराचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतो. परतीचे दोर तेथेच कापले जातात. जेव्हा मालकाची मर्जी असेल तेव्हाच आपल्या देशात परतण्यासाठी कामगाराला तो परत केला जातो. या पद्धतीचा फायदा घेऊन कामगारांना राब राब राबवलं जातं. काम पसंत पडलं नाही तरी हाती पासपोर्ट नसल्याने आपल्या देशात परतणार तरी कसं? कारण मालकाने पासपोर्ट आपल्या ताब्यात ठेवलेला असतो. मालकाकडून ‘एक्ङिाट परमिट’ घेतल्याशिवाय मजुरांना तो देश सोडता येत नाही. यातून मालकाला शोषणाचा मार्ग सापडतो. आधीच प्रवासखर्च, रिक्रूट एजंटला पैसे देण्यासाठी कर्ज काढलेलं असतं. ते फिटण्यापुरतं तरी काम करावं म्हणून नाइलाजाने काम स्वीकारलं जातं. त्या मजबुरीचा फायदा घेत मुख्य कामासोबत इतरही कामं करून घेतली जातात. ड्रायव्हर म्हणून कामाला लागलेल्याकडून माळीकामही करून घेतलं जातं. पुरुष कामगारांना तर खुराडय़ासारख्या घरात कोंडून केवळ कामापुरतं बाहेर काढलं जातं. कामगारांच्या शोषणाचा एकही मार्ग सोडला जात नाही. वेतन, कामाचं स्वरूप, कामाचे तास यातून जमेल तेवढी पिळवणूक होते. अगदी एम्प्लॉयमेंट व्हिसासाठीही भरमसाठ फी आकारली जाते. आजारी असतानाही रजा नाकारून काम करून घेतलं जातं. वैद्यकीय उपचार वगैरे तर दूरच. त्यात महिला वा पुरुष कामगारांमध्ये कुठलाच भेदभाव नाही. मानवी हक्क वगैरे सगळं धाब्यावर. आखाती देशात असे पिळवटून टाकणारे अनुभव घेऊन भारतात परतलेल्यांच्या कहाण्या हलवून टाकणा:या आहेत. ‘सौदीत माङयाकडून अन्नपाण्यावाचून दिवसातील 18 तास काम करून घेतलं जाई. पाणी पिण्यासाठी काम थांबवलं तरी घरमालक अथवा त्याचे कुटुंबीय मारहाण करीत. अनेकदा महिलांचं लैंगिक शोषणही केलं जातं. मात्र जिवाच्या भीतीने कुणीही तेथे साधी तक्रार करण्याचा विचारही करीत नाही.’ - भारतात परतलेल्या एका मोलकरणीने सांगितलेली ही कहाणी तेथील घरेलू कामगारांची वस्तुस्थिती दर्शविणारी आहे. रियाधमधील एका हॉस्पिटलमध्ये सलग नऊ महिने साफसफाईचं काम करूनही पगार न मिळालेल्या अकरा महिलांनाही मदतीसाठी भारतीय दूतावासाकडे तक्रार करावी लागली. केरळमधील या महिला एका कंत्रटी कंपनीमार्फत या हॉस्पिटलमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कामाला होत्या. मात्र काम करूनही महिनाअखेरीस त्यांच्या हाती पगार पडत नसे. त्याचवेळी अडीच वर्षाचा करार संपेर्पयत सुटी अथवा रजा घेता येणार नाही, अशी सक्तीही त्यांना करण्यात आली. याबाबत भारतीय दूतावासाकडे तक्रार करूनही काहीच परिणाम झाला नसल्याची तक्रार मणियम्मा विलासिनी या महिलेने केली. त्याचवेळी आपण कामगार, कंपनी आणि सौदी प्रशासनातील अधिका:यांच्या संपर्कात असून, महिलांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा भारतीय दूतावासातील अधिकारी करीत होते. सौदी अरेबियात अन्य देशातील कामगारांना वेळेवर पगार दिला जातो, तर भारतीय कामगारांसोबतच अधिक अन्याय केला जातो, अशीही तक्रार विलासिनीने केली. नोकरी मिळवण्याच्या नियमांमुळे नोकरी मिळत नसेल तर महिलांच्या असहाय्यतेचा, गरिबीचा मॅनपॉवर एजंटकडून अधिकच गैरफायदा घेतला जातो. घरमालक दिवसरात्र काम करून घेत असल्याने बाहरीन येथेही जुलै 2013 मध्ये एका भारतीय आणि दोन इंडोनेशियन महिलांनी बाल्कनीतून उडय़ा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिघीही जखमी झाल्या. कागदोपत्री भारतीय महिलेचं नाव अनुषा आणि वय 35 असल्याचा उल्लेख होता. प्रत्यक्षात ती 19 वर्षाची असल्याचं चौकशीत उघडकीस आलं. तिचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला होता. घरच्या गरिबीमुळे बाहरीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडणा:या आंध्र प्रदेशातील अनुषाला मॅनपॉवर एजंटने बनावट व्हिसावर बेकायदेशीररीत्या तेथे पाठवलं होतं. तेथील मायग्रंट वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीने केलेल्या मदतीने ती कशीबशी भारतात परतली. कामाच्या ठिकाणी छळ असह्य होतो तेव्हा घरेलू काम करणा:या महिला भारतीय दूतावासाने तयार केलेल्या सेफ्टी होमचा आश्रय घेतात. पण अशा सेफ्टी होमर्पयत पोहोचणंही सौदी अरेबियासारख्या देशात पीडित महिलांसाठी सोपं नसतं. कारण भारतीय दूतावासाने केवळ रियाध आणि जेद्दाह येथे सेफ्टी होम सुरू केलेत. मालकाने केलेल्या खोटय़ा तक्रारीवरून पोलीस पकडण्याची शक्यता असताना, दूरचा प्रवास करून देशाच्या एका भागातून दुस:या भागात पोहोचणंही या महिलांसाठी कठीण असतं. ‘ते माङया आयुष्यातील फार कठीण दिवस होते. माझा सतत अपमान आणि छळ होत होता. त्यातून माझं मानसिक संतुलन ढासळेल असं माङया लक्षात येताच मी तेथून पळ काढला. मी जिवंतपणो माङया घरी पोहोचले हेच माझं नशीब’ - दोन वर्षे कुवेत येथे मोलकरणीचं काम करून परतलेल्या आंध्र प्रदेशातील महिलेचा हा अनुभव तिला आयुष्यभर अस्वस्थ करणारा होता. क्लेशकारक अनुभव टाळण्यासाठी नोकरीची पूर्ण माहिती, हमी आणि मान्यताप्राप्त मॅनपॉवर एजंटमार्फत आलेलीच नोकरी स्वीकारा, असं आवाहन भारत सरकार करतं. पण विपन्नावस्थेतून येणा:या अगतिकतेमुळे भल्याबु:या मार्गाने कामगारांचे लोंढे आखाती देशांत जातच आहेत. या सा:याला जबाबदार नेमकं कोण, हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो.

No comments:

Post a Comment