Total Pageviews

Sunday 7 July 2013

CHINA THREATENS INDIAN DEFENCE MINISTER

नक्षलवाद दहशतवाद  संपुष्टात आणण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती्ची गरज
भारतीय संरक्षण मंत्री अँटनीना चिनची दमदाटी
भारताने सीमाप्रांतामध्ये सैन्याची कुमक वाढवून नव्या वादांना तोंड फोडू नये असा थेट इशारा चीनचे अतिराष्ट्रवादी विचारांचे आणि जहाल विधानांबद्दल ओळखले जाणारे  जनरल लिऊ युहान यांनी ०४ जुलैला दिला.  सीमाप्रश्नावर चर्चेसाठी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचा चीन दौरा सुरू होत असतानाच त्यांनी हे वाङताडन केले. चिन नेहमीच आपल्या नेत्यान्च्या भेटी आधी अशी दमदाटी करत असतो. प्रधानमंत्री  व तमाम नेतेमंडळी यांनी अंतर्गत वादविवाद स्पर्धा न भरवता या विषयाचा गांभीर्याने विचार करावा .अशा वक्तव्यांना आपल्याकडून कोणी भक्कम उत्तर देणार आहे कि नाही? इथेही मुग गिळून शांत बसणार.?
 आपण काय बोलतो, आणि काय करतो याबद्दल या देशाने सावध राहायला हवे असे लिऊ यांनी ' चीनचा शांतीविकासाचा मार्ग ' या विषयावर बोलताना सांगितले. अरुणाचल प्रदेशच्या ९० हजार चौ. किमी क्षेत्राचा उल्लेखही त्यांनी भारताने ताब्यात घेतलेला प्रदेश असा केला. गतकाळाकडून सोडवायचे राहून गेलेले प्रश्न थंड डोक्याने सोडवायला हवेत . चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या कृतीबाबत बोलताना मात्र, हा विषय माध्यमांनी विनाकारण मोठा केला, असे सांगत त्यांनी हा विषय उडवून लावला.  संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचा चार दिवसीय चीन दौरा ०४जुलै -०८ जुलै शांघाय येथून सुरू झाला.सीमेवरील चीनी तुकड्यांच्या घुसखोरीमुळॆ दोन्ही देशांमध्ये तयार झालेला तणाव कमी करणे हा या दौऱ्याचा  हेतू  आहे. गेल्या सात वर्षांत चीनला भेट देणारे अँटनी हे पहिलेच संरक्षण मंत्री आहेत.
नक्षलवादी राजकीय डावपेचातही  निष्णात
छत्तीसगढमधील नक्षली हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच ०२ जुलैला नक्षलींनी झारखंडमध्ये एका पोलिस अधीक्षकासह सात पोलिस कर्मचारीना शहीद  केले. झारखंडमधील दुमका जिल्ह्यात नक्षलींनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे नेतृत्वच संपवून टाकण्याची नक्षलवाद्यांची खेळी अनेक वादांना जन्म देणारी ठरली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागल्याचे दिसते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची हत्या झाल्यानंतरही केंद्रीय मंत्री जयराम रमेश रायपूरला जाऊन या घटनेमागे राजकीय कट आहे, असे विधान करतात.  अनेक नेते त्यांचीच री ओढतात, कुणीही लोकशाहीसमोर उभे ठाकलेल्या या आव्हानाचा मिळून मुकाबला करू असे का म्हणत नाही ? हिंसक राजकीय खेळीत देशातील नेत्यांपेक्षा नक्षलवादी जास्त चतुर आहेत असे दिसते.०१ जुलैला गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते मल्लेलवार यांनी नक्षलवाद्यांसाठी पाठवलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. मोठय़ा हिंसक कटातूनसुद्धा काँग्रेसचे नेते बोध घ्यायला तयार नाहीत .सध्या फरारी असलेल्या या मल्लेलवारांवर कारवाई तर सोडाच पण साधी प्रतिक्रिया द्यायला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तयार नाहीत. नक्षल्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना शहीदाचा दर्जा देऊन, जवानांच्या शवपेटीवर पुष्पचक्र वाहून, त्यांच्यावर पोलिसी इतमामात अंत्यसंस्कार व कुटुंबीयांचे सांत्वन करून ,काही लाख रुपये नुकसानभरपाई करुन आपली जबाबदारी संपली, असे तर सरकारला वाटते का ?नक्षलवादी चळवळीस जबाबदार कालचे व आजचे सत्ताधारी, नोकरशाही आहेत. विकासाच्या नावावर आतापर्यंत कोटय़ावधी रुपये खर्च झाले. हा पैसा गेला कुठे? आदिवासींचा आणि त्या क्षेत्रातील विभागाचा विकासच त्यामुळे का झाला नाही ? भ्रष्टाचाराच्या पैशावर गब्बर झालेले नेतेच या नक्षलवादयांना पोसतात . नक्षलवाद कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सिमेवरच्या  घुसखोरीला रोखा
काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या कारवाया काहीशा थंडावल्या असतानाच आपण पुन्हा सक्रीय झाल्याचे त्यांनी श्रीनगरमध्ये दाखवून दिले. दहशतवादी पाकीस्तानातुन घुसखोरी करून या भागात येतात.  या घुसखोरीला कसा आळा घालायचा हा खरा प्रश्न आहे. दहशतवाद्यांची सुरूवातीची घुसखोरी सीमारेषेपासून व्हायची. परंतु अलीकडे त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. मात्र त्याच वेळी दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी अन्य मार्गांचा अवलंब केला जात आहे. आता ते वाघा बॉर्डर, नेपाळ तसेच बांगलादेशमधून भारतात येतात. त्यांना अटकाव केला जाणे गरजेचे आहे.ही सिमा सैन्याकडे नाही.ग्रुहमन्त्रालयाच्या हाथाखालची बिएसएफ़ ईथे नियुक्त आहे. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी बांगलादेशमधून काही दहशवादी परिवारासह भारतात आले होते.
देशातले अतिरेकी
दहशतवादी घुसखोरीसाठी समुद्रमार्गाचा अवलंब करत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या घुसखोरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. आजही काश्मीरमध्ये २००-२५० दहशतवादी अस्तित्वात आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरही दहशतवादी तयार होत आहेत.  त्यामुळे सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी नियंत्रणात आली म्हणजे देशातील कारवायाही नियंत्रणात आल्या असे समजणे चुकीचे ठरणार आहे. या दहशतवाद्यांना पैसा आणि सामग्रीचा पुरवठा अन्य देशातून केला जातो.
काश्मीरमध्ये राहून राष्ट्रद्रोहाची भावना उराशी बाळगणारे लोक दहशतवाद्यांना मदत करण्यास, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यास तत्पर असतात. त्यामध्ये मोठमोठ्या लोकांचा समावेश होतो. ओमर फारूख यांच्यासारखे लोक "काश्मीर स्वतंत्र हवा' असे उघडपणे बोलतात. आताचा हल्ला हुरियत कॉन्फरन्सचे नेते गिलानी यांच्या घराजवळ झाला. थोडक्यात, काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवादी निर्माण होत असून, त्यांना त्या त्या संघटनांकडून हल्ल्याचे आदेश दिले जातात.
 दहशतवाद, आणि नक्षलवाद एक कुटिरोद्योग
फ़ुटिरवादी नेते यासिन मलिक उजळ माथ्याने वावरत असतानाही त्याला अटक केली जात नाही. सतत भारताविरूध्द गरळ ओकूनही गिलानींवर कारवाई केली जात नाही. मग दहशतवादी कृत्यांना आळा कसा बसणार? अलीकडे भारतात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.जुल्फिकार भुत्तो यांनी  म्हटले होते  ‘आम्ही भारताशी एक हजार वर्षे लढू. आम्ही गवत खाऊन राहू; पण आम्ही अणुबॉम्ब तयार करू.’ पाकिस्तानातील सैन्य आणि आयएएस संघटना काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे. तिथून त्यांना याबाबतचे सल्ले दिले जातात. काश्मीरमध्ये काही नेते असे आहेत की, ते तेथील अशांततेचा गैरफायदा घेत असतात. जोपर्यंत भारताविरुद्ध आवाज उठवला जात नाही तोपर्यंत भारत सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही, अशी त्यांची रणनीती आहे. पंतप्रधानांकडून काही कोटींचा निधी काश्मीरसाठी मिळवणे, हा तेथील काही देशविरोधी नेत्यांचा उद्देश असतो.बैठकीत मोठय़ा अभिमानाने सांगितले जाते की, ‘आम्ही बंदुकीच्या जोरावर भारतातून पैसा काढला.’ १९४७पासून हेच सुरू आहे. आम्हाला मदत करा अन्यथा आम्ही पाकिस्तानात जातो, अशा प्रकारची धमकी देणारे १० टक्के स्थानिक तेथे आहेत आणि ते दहशतवादाला चिथावणी देत असतात.
या साऱ्या बाबींचा विचार करता दहशतवादाच्या रूपाने होत असलेला अन्याय कोठपर्यंत सहन करायचा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. देशातील दहशतवादाची पाळेमुळे खणून काढली जायला हवीत. त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. . मनात आणले तर आपण कठीणातील कठीण समस्या सोडवू शकतो. पंजाबमधील दहशतवाद आपण संपुष्टात आणला. ईशान्य भारतातील गृहयुध्द संपवले. याचे कारण त्यावेळी तशी दुर्दम्य इच्छाशक्ती होती. दुर्दैवाने आज तिचाच अभाव जाणवत आहे.काश्मीरमधील दहशतवाद, आणि नक्षलवाद यांचा इतिहास बघितला तर एका काळानंतर याचे परिवर्तन जणू कुटिरोद्योगात होते. दहशतवादाच्या नावावर पैसा मिळवणे, हा व्यवसाय बनतो. आता तशीच स्थिती काश्मीरमध्ये झालेली आहे. यावर उपाय म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ठोस निर्णय घेतला पाहिजे .

No comments:

Post a Comment