Total Pageviews

Thursday 5 May 2011

editorial in samana

हिंदुस्थानला सर्वात जास्त धोका हा इस्लाम धर्मातील अतिरेक्यांपासून नाही, तर दिग्विजयसारख्या बाटग्यांपासून आहे.

शोधा शोधा...
‘लादेनजीं’च्या स्मारकासाठी जागा शोधा!

कधी कधी आम्हाला प्रश्‍न पडतो की, कॉंग्रेसवाल्यांचा खरा बाप कोण? की कॉंग्रेसवाले म्हणजे बिनबापाची औलाद आहेत! इतिहासाच्या पानांवर कॉंग्रेसची जी बापजादी मंडळी दाखवली आहेत त्यात मादाम कामा, ऍलन ह्युमनंतर दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, त्यानंतर नाही म्हटले तरी गोखले, गांधी वगैरे मंडळींची नावे आढळतात. अर्थात ती कॉंग्रेस वेगळी होती व आजची बाजारू कॉंग्रेस वेगळी आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे एक चवचाल पुढारी दिग्विजय सिंग यांनी कॉंग्रेसचा नवा बाप दुसरा तिसरा कोणी नसून ओसामा बिन लादेन असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या फौजांनी पाकिस्तानात घुसून क्रूरकर्मा लादेनचा खात्मा केला व त्याला म्हणे समुद्राच्या तळाशी गाडले. हे इस्लाम धर्माला, माणुसकीला धरून नसल्याचा कळवळा त्या दिग्विजय सिंगांना आला आहे. लखनौमधील एका पत्रकार परिषदेत या महाशयांनी डोळ्यांत पाणी आणून भरल्या गळ्याने अमेरिकेच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे व तसे करताना या महाशयांनी लादेनचा उल्लेख अत्यंत सन्मानाने ‘लादेनजी’ असा करून कॉंग्रेस पक्षाला लादेन व त्याची अतिरेकी पिलावळ किती प्रिय तसेच आदरणीय आहे हेच दाखवून दिले. ‘लादेनजी हे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातच वास्तव्याला होते. त्यामुळे लादेनजींच्या बाबतीत अमेरिकेने जे केले ते बरोबर नाही. इस्लामी धर्मानुसार त्याचे दफन सन्मानाने व्हायला हवे होते. त्याला समुद्राच्या तळाशी म्हणजे पाताळात गाडणे बरोबर नाही!’ अशी मळमळ दिग्विजय सिंगांनी व्यक्त करून हिंदुस्थानची मान शरमेने खाली झुकवली आहे, पण लादेनजी असा गुणगौरव केल्यामुळे हिंदुस्थानातील सर्व मुसलमान कॉंग्रेसवर खूश होतील व रिकाम्या मतपेटीत भरभरून मते टाकतील याच बेशरम हेतूने ‘लादेनजी’ यांना कॉंग्रेसने सन्मान दिलेला दिसतो. लादेन हा एक क्रूरकर्मा होता व अशा क्रूरकर्म्याला दफन करण्यासाठी खरे म्हणजे या भूमीवर दोन गजही जागा मिळू नये! अमेरिकेच्या फौजांनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले. लादेनला मारले तेव्हा तो नि:शस्त्र होता व त्याने कोणताही प्रतिकार केला नाही. अशा निश:स्त्र ‘लादेनजीं’वर सशस्त्र अमेरिकन फौजांनी जो भ्याड व निर्घृण हल्ला केला त्यामुळे फक्त पाकिस्तानातील धर्मांध व हिंदुस्थानातील कॉंग्रेसचे त्रस्त समंध यांना जबरदस्त वाईट वाटले व त्यांनी ‘लादेनजी’साठी मातम केले. लादेनजी म्हणून जी निर्घृण विकृती इस्लामच्या झेंड्याखाली वाढली व फोफावली त्यामुळे फक्त अमेरिकेलाच धोका नव्हता तर या लादेनजीने हिंदुस्थानातही त्याचे अल कायदाचे जाळे पसरवून येथील मुस्लिम तरुणांची डोकी स्वदेशाविरुद्ध भडकवली. मराठवाडा, विदर्भ, पुणे, मुंबई अशा ठिकाणी ‘लादेनजी’ यांचे ‘फोटो’ मशिदीत ठेवून
राष्ट्रविरोधी हिंसेची बांग
देण्याचे प्रकार घडले. मालेगावात तर संतमहात्मे फकीर निहाल अहमद यांनी ‘लादेनजी’चे फोटो गळ्यात अडकवून एक जंगी मिरवणूकही काढली. धर्मांध मुस्लिमांत लादेनजी हा एक महान क्रांतिकारक किंवा योद्धाच मानला गेला व त्याला गुप्त पाठिंबा देणार्‍या भूमिगत संघटना या देशात काम करू लागल्या. लादेनने अमेरिकेवर हल्ला करून त्यांची मस्ती, अहंकार व महासत्तेची गुर्मी उतरवली हे खरेच आहे. अमेरिकेच्या फुगलेल्या छातीस टाचणी लावून त्यातली हवा कमी करण्याचा प्रयत्न लादेनने केला व त्याबद्दल अर्धे जग बेहद खूश होते. पण म्हणून लादेनसारख्या हिरव्या सापाविषयी कुणी सहानुभूती बाळगून मतांचे राजकारण करीत असेल तर अशा ‘लादेनजी’वाल्या कॉंग्रेसवाल्याचे डोके म्हणजे सडक्या बटाट्यांचे मडके झाले आहे असेच म्हणावे लागेल. लादेनने हिंदुस्थानला दुश्मन मानले होते व हिंदुस्थानला नष्ट करून हे इस्लामी राष्ट्र बनविण्याचे त्याचे धोरण होते. कश्मीरच्या प्रश्‍नात त्याने पाकिस्तानला शस्त्रे व अतिरेकी पुरवून हिंदुस्थानविरोधी उघड बांग दिली. हे सर्व उघड होऊनही कॉंग्रेसचे पुढारी दिग्विजय हे त्या ‘लादेनजी’विषयी प्रेम व आदराचे उसासे टाकतात यास काय म्हणावे! हिंदुस्थानला सर्वात जास्त धोका हा इस्लाम धर्मातील अतिरेक्यांपासून नाही, तर दिग्विजयसारख्या बाटग्यांपासून आहे व या कॉंग्रेजी बाटग्यांनी देशाचे जेवढे वाटोळे केले तेवढे पाकिस्तान किंवा त्याआधीच्या मोगली आक्रमकांनीही केलेले नाही. मोगलांना हिंदुस्थानात घुसण्याचे मार्ग दाखविणारे व नंतर त्या मोगलांच्या चाकरीत धन्यता मानणारे हिंदू राजेच होते व त्या बाटग्यांचीच गादी पुढे कॉंग्रेसवाल्यांनी चालवून आपले इस्लामप्रेम पुन: पुन्हा दाखवून दिले. हे जे कोणी दिग्विजय सिंग आहेत, त्यांनी गेल्या वर्षभरात स्वत:च्या अकलेचे दिवाळे वारंवार वाजवले. 26/11 च्या हल्ल्यानंतरही त्यांचे पाकिस्तान प्रेम असेच उसळ्या मारत होते. करकरे यांना म्हणे हिंदुत्ववाद्यांपासून धोका होता व तशी भीती त्यांना वाटत असल्यानेच त्यांनी अस्वस्थ होऊन या दिग्विजय सिंगांना फोन केला होता. थोडक्यात काय तर करकरे व इतर बहाद्दर पोलीस अधिकार्‍यांचे बळी हे पाकड्या कसाब व त्याच्या अतिरेकी टोळीने घेतलेले नसून त्या सगळ्यांना मारणारे हिंदुत्ववादी दहशतवादी होते अशी घोषणाच या महाशयांनी करून खळबळ उडवून दिली होती. आपल्या अशा बेताल वक्तव्याने हिंदुस्थानातील मुसलमान खूश झाला तरी पाकड्यांचे फावले आणि कदाचित त्या नराधम कसाबच्या मानेभोवतीचा फास ढिला पडला तर ते देशासाठी किती घातक ठरेल, असे जराही दिग्विजय सिंग यांच्या मनात आले नाही. ‘मालेगाव’ स्फोटाचे निमित्त करून ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द प्रथम या
लादेनजी भक्तानेच
वापरला. हिंदूंना जितके बदनाम करता येईल तेवढे करावे, हिंदूंना मारावे, त्यांचे मनोधैर्य नष्ट करावे. हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात खिजविण्याची एकही संधी हे दिग्विजय महाशय सोडत नसले तरी ज्या मध्य प्रदेशातून ते आले आहेत त्या मध्य प्रदेशातून कॉंग्रेसचे नामोनिशाण नष्ट झाले व तिथे भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले. याचा अर्थ असा की, या ‘लादेनजी’ भक्तास त्यांच्या राज्यातही कोणी विचारत नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे महाशय हिंदूंच्या बाबतीत तोंडास येईल ते बरळत आहेत व हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. त्यावर वादळ उठले की, कॉंग्रेसवाले हात झटकून ती त्यांची वैयक्तिक मते असल्याचे सांगतात. अर्थात, या देशात अशी वैचारिक गल्लत नेहमीच केली जाते. दिग्विजय सिंग हे कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यामुळे त्यांची मते वैयक्तिक असू शकत नाहीत. ही वैयक्तिक मते कॉंग्रेसला मान्य नसतील तर दिग्विजय सिंगांना सरचिटणीसपदावरून हटवले पाहिजे. लादेनची भक्ती हा इस्लामी दहशतवादास सरळ सरळ पाठिंबाच आहे. लादेनला इस्लामी धर्मानुसार सन्मानाने दफन करायला हवे होते असे ज्यांना वाटते त्यांना लादेनने केलेला हिंसाचार म्हणजे पारिजातकाचा सडा वाटला काय? कदाचित कॉंग्रेसला तसे वाटत असेल व म्हणूनच दिग्विजय सिंगांच्या थोबाडातून ते ‘लादेनजी’चा गौरव करीत आहेत. नशीब इतकेच, यावेळीही दिग्विजय सिंगांनी असा गौप्यस्फोट केला नाही की, ‘लादेनजी बर्‍याच काळापासून पाकिस्तानात वास्तव्यास असताना माझ्या संपर्कात होते व त्यांना हिंदुत्ववाद्यांपासून धोका असल्याची भीती वाटत होती. मरणापूर्वी दोन दिवस आधीच लादेनजीने मला फोन करून हे सर्व सांगितले होते!’ कॉंग्रेसवाले त्यांच्या मतलबी राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते लादेनला संत ठरवतील व पाताळात गाडलेल्या लादेनचा मुडदा उकरून त्याच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याची टूम काढतील. इंडिया गेटसमोर लादेनजींचा पुतळा उभारून त्यांच्यासमोर एखादी अखंड तेवणारी ज्योतही पेटवतील. या भूमीत औरंगजेब, अफझलखानाचे मुडदे गाडून त्यांच्यासमोर श्रद्धेने गुडघे टेकणारे कॉंग्रेसवाले आहेतच. अशाच ‘श्रद्धास्थाना’त आता ‘लादेनजी’ यांची भर पडली. अरबी सागरात शिवरायांचे स्मारक व्हायचे तेव्हा होईल, पण त्याआधी लादेनजी यांच्या स्मारकासाठी जागा शोधा. कॉंग्रेसच्या बापासाठी हे एवढे करावेच लागेल. काय हो दिग्विजय, बरोबर आहे नाe

No comments:

Post a Comment