Total Pageviews

Sunday 20 March 2016

सौ चुहे खाके…त्यांचे नागरिकत्व रद्द करा!-SAMNA EDITORIAL

सौ चुहे खाके… Friday, March 18th, 2016 waris pathanआमदार वारीस पठाणचे निलंबन कसे चुकीचे आहे व लोकशाहीचा हा कसा अपमान आहे असे दु:ख पठाणचा नेता ओवेसी याने व्यक्त केले. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ या उक्तीप्रमाणे देशद्रोहाचे शंभर अपराध पचवून ही मंडळी आम्हीच खरे मुस्लिम समाजाचे तारणहार आहोत, असा आव आणत आहेत. प्रत्यक्षात लांडग्याप्रमाणे राजकीय स्वार्थासाठी इस्लाम धर्माचे लचके तोडण्याचेच त्यांचे उद्योग सुरू आहेत. सौ चुहे खाके… ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमिन म्हणजेच कुख्यात एमआयएमचे आमदार वारीस पठाण यास विधानसभेतून निलंबित केले आहे. हे निलंबन तात्पुरते आहे, पण वारीस पठाण याचा गुन्हा इतका भयंकर आहे की, विधानसभेतून त्याचे कायमचे निलंबन व्हायला हवे व पुन्हा कोणतीही निवडणूक लढविण्यास त्याला अपात्र ठरवले पाहिजे. ओवेसी या आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून पठाण यानेही ‘भारतमाता की जय’ बोलण्यास नकार दिला व हे सर्व महाराष्ट्राच्या विधानसभेत झाले. पठाण यास फक्त निलंबित करून सौम्य शिक्षा दिली गेली आहे. १०० खून केलेल्या गुन्हेगारास सुका दम देऊन सोडून द्यावे त्यातलाच हा प्रकार आहे. असदुद्दीन ओवेसी याने महाराष्ट्रात येऊन लातुरात भारतमातेच्या विरोधात गरळ ओकली व त्याच्या आमदाराने महाराष्ट्राच्या विधानसभेत भारतमातेचा अपमान केला. ज्या महाराष्ट्राने देशाला राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे धडे दिले, देशभक्तीसाठी बलिदाने दिली त्याच महाराष्ट्रातून हे विषारी फूत्कार निघावेत याचे दु:ख आहे. आमदार वारीस पठाण याने असा प्रश्‍न उपस्थित केला आहे की, ‘‘राज्यात महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांवर होणारा खर्च निरर्थक नाही काय?’’ एमआयएम आमदारांना आम्हांस असे विचारायचे आहे की, बाबा रे, हज यात्रेसाठी सरकारी अनुदानाची बरसात होत असते त्यावर आपले काय म्हणणे आहे? या यात्रेमुळे देशाला काय फायदा? हिंदुस्थानातील मुसलमान बांधवांची मक्का, मदिना येथेच म्हणजे स्वदेशातच असायला हवी. त्यांच्या हृदयाची स्पंदने देशातील घटना-घडामोडींसाठीच धडकायला हवीत, पण कॅनडा, पॅरिससारख्या देशात कोणीतरी काहीतरी इस्लामवर वाकडेतिकडे लिहितो व त्यासाठी येथील मुसलमान हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून धुडगूस घालतात. ओवेसी व पठाणसारखे लोक भारतमातेचा अपमान करतात तेव्हा हेच मुसलमान चिडीचूप असतात. आझाद मैदानावर ते छाती पिटताना दिसत नाहीत की ओवेसी, वारीस पठाणचे मुंडके उडविण्याचे फतवे काढले जात नाहीत. एखादा जावेद अख्तर देशाच्या संसदेत ओवेसीच्या देशद्रोहाचा धिक्कार करतो, भारतमातेचा जयजयकार करतो, पण अशा राष्ट्रवादी जावेद अख्तरना पाठिंबा देण्यासाठी किती मुसलमान रस्त्यावर उतरले? मुसलमानांना ओवेसी हवेत की जावेद अख्तर याचा फैसला करण्याची वेळ आली आहे. देशाला खतरा पाकड्या अतिरेक्यांपासून तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त धोका लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या मंदिरात शिरलेल्या भारतमातेच्या ‘खुन्यां’कडून आहे. ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही असे फूत्कार ही मंडळी उघडउघड सोडतात. त्यासाठी हिंदुस्थानच्या घटनेचा हवाला दिला जातोय. ‘भारतमाता की जय’ म्हणा असे घटनेत कुठे लिहिले आहे? असे सांगितले जातेय, पण ‘दाढ्या वाढवा, मुसलमानी टोप्या घाला, चार लग्ने करून पाच-पंचवीस पोरांचे लटांबर वाढवून देशाला भार व्हा’ असे तरी हिंदुस्थानच्या घटनेत कुठे लिहिले आहे? पुन्हा ज्यांनी या देशाची घटना पायदळी तुडविली त्यांनीच घटनेचे हवाले द्यावेत हे भयंकर माथेफिरूपणाचे लक्षण आहे. अशा माथेफिरूंना देशाच्या कायदेमंडळात जाऊन बसण्याचा अधिकार नाही. बाजूच्या पाकिस्तानात काय चालले आहे ते पहा. मागे एका पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी तरुणाने हिंदुस्थानी क्रिकेटपटूच्या प्रेमापोटी आपल्या घरावर तिरंगा फडकविला म्हणून त्या तरुणाची पाक पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली होती. दोन-तीन दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची वाहवा केली तर तो क्रिकेटपटू त्या देशाचा गुन्हेगार ठरला. त्याच्यावर पाकिस्तानातून टीकेचा भडिमार झाला. हिंदुस्थानात सहिष्णुता असल्यानेच गोष्टी इतक्या थराला जात नाहीत, पण भारतमातेशीच प्रतारणा, बेइमानी करणारे इथे खुलेआम वावरत असतील तर त्यांना सहिष्णुता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोकळे सोडता येणार नाही. आमदार वारीस पठाणचे निलंबन कसे चुकीचे आहे व लोकशाहीचा हा कसा अपमान आहे असे दु:ख पठाणचा नेता ओवेसी याने व्यक्त केले. दुसर्‍या देशात पठाणसारख्यांना फासावरच लटकवले असते हे ओवेसी यांना सांगण्याची गरज नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ या उक्तीप्रमाणे देशद्रोहाचे शंभर अपराध पचवून ही मंडळी आम्हीच खरे मुस्लिम समाजाचे तारणहार आहोत, असा आव आणत आहेत. प्रत्यक्षात लांडग्याप्रमाणे राजकीय स्वार्थासाठी इस्लाम धर्माचे लचके तोडण्याचेच त्यांचे उद्योग सुरू आहेत. त्यांच्यामुळेच इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाज बदनाम होत आहे. अशी मंडळी देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरात बसली आहे. हे चित्र भयंकर आहे! त्यांचे नागरिकत्व रद्द करा! Thursday, March 17th, 2016 आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी. ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, बेशक काढून घ्या! भारतमाता की जय! त्यांचे नागरिकत्व रद्द करा! सबसे पहले मर्द बन हिन्दोस्ताँ के वास्ते। हिंद जाग उठे तो फिर सारे जहाँ के वास्ते॥ फर्ज कर लूं कि हिंदू हिंद की रुसवाई है। लेकिन इसको क्या करूं, फिर भी वह मेरा भाई है॥ (तू आधी हिंदुस्थानसाठी मर्द पुरुष बन. एकदा हिंदुस्थान जागा झाला की मग सार्‍या जगाच्या गोष्टी कर. हिंदू हा हिंदुस्थानच्या बदनामीला कारणीभूत होणारा आहे असे जरी मी एकवेळ धरून चाललो तरी तो माझा भाऊ आहे याला मी काय करू?) मुसलमानांना भारतीय राष्ट्रवादाची शिकवण देणार्‍या कवींपैकी एक श्रेष्ठ कवी जोश मलिहाबादी (जन्म १८९६) यांनी हे ज्वलंत विचार मांडले आहेत. अर्थात जोशसाहेबांचा हा उपदेश हिंदूंनाही तितकाच लागू पडतो. जोशसाहेबांचा काळ हा प्रखर राष्ट्रवादाने भारावलेला काळ होता व हिंदूंच्या बरोबरीने मुसलमानही भारतमातेचा जयजयकार करीत हसत हसत फाशीचा दोर मानेभोवती लपेटून घेत होते. कारण सगळेच भारतमातेचे सुपुत्र होते. पण आजच्या काळातील मुस्लिमांचे स्वयंभू पुढारी बनलेल्या ओवेसीसारख्या मुसलमानांना ‘भारतमाता की जय’ म्हणायला यातना होत आहेत. तिरंग्याचा अनवधानानेे अपमान झाला म्हणून गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला व तो आजही तुरुंगात आहे. महाराष्ट्रात येऊन असदुद्दीन ओवेसीने भारतमातेचा अपमान करून देशद्रोहच केला नाही काय? आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य व मुख्यमंत्री आहे तरी लातुरात भारतमातेचा अपमान होऊनही ओवेसी लातुरातून सहीसलामत सटकलाच कसा याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यावेच लागेल. सिंधुदुर्गात उपोषणास बसलेल्या आमदारांना पोलीस फोडून काढतात, पण त्याच महाराष्ट्रात देशद्रोहाचा गुन्हा करून ओवेसी सरकारवर थुंकून सहीसलामत बाहेर पडतो. ‘‘मी जरी हिंदुस्थानात राहत असलो तरी ‘भारतमाता की जय’ असे म्हणणार नाही. कारण घटनेत किंवा कुठल्याही कायद्यामध्ये ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा लिहिलेली नाही’’ अशी अकलेची दारू ओवेसीने उडवली आहे. इस्लाममध्ये दारू, नशा वर्ज्य आहे, पण ओवेसीचे ताजे वक्तव्य हे त्याने नशेतच केले असावे. भारतमातेच्या पाठीवर वार करून हे महाशय स्वत:ला हिंदुस्थानचे नागरिक म्हणवून घेत असतील तर त्यांच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे. त्यांना ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही, कारण मातृभूमी ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. त्यांना समान नागरी कायदा नकोच. कारण ‘शरीयत’ कायदा इस्लामचा प्राण आहे व आता भारतमाता की जयही म्हणायचे नसेल तर मग भारतमातेला भार बनून येथे का राहत आहात, हा प्रश्‍न विचारला तर तुमच्या दाढ्या जळू नयेत. ‘भारतमाता की जय’ ही प्रेरणा आहे. राष्ट्रावरची श्रद्धा आहे व जात, धर्म न पाहता या श्रद्धा पाळायला हव्यात. मुसलमान समाजाची आज जी दुर्दशा झाली आहे व ‘इसिस’सारखे सैतान माजले आहेत त्यास ओवेसीसारख्यांची दळभद्री विचारसरणी कारणीभूत ठरत आहे. हिंदुस्थानी मुसलमानांत सर सय्यद अहमद, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखे शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक निर्माण झाले, परंतु इस्लाम समाजाचा सर्वांगीण विचार करून त्याचा विकास घडवून आणणारे समाजसेवक व समाजसुधारक मात्र या समाजात झाले नाहीत. हिंदूंमधील फुले, आगरकरांसारख्या सुधारकांनी आसुडाचे फटकारे मारून निद्रिस्त हिंदू समाजाला जागे करण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न मुसलमानांच्या बाबतीत होऊ शकला नाही व ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना मुसलमानांचे दुश्मनच ठरविण्यात आले. मुसलमानांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचे सोडून त्यांना देशापासून तोडले गेले. किंबहुना आपण भारतमातेचे कुणी लागत नसून हिंदुस्थानच्या पोटात ‘आपले स्वतंत्र राष्ट्र’ हे विष मुसलमानांच्या नसात भिनवण्याचे धर्मांध राजकारण वर्षानुवर्षे सुरू आहे. किमान उच्चशिक्षित ओवेसी तरी मुसलमानांत विकासाचे व सुधारणेचे राजकारण करतील असे वाटले होते, पण तेही लफंगेच निघाले. आता याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर ओवेसीमहाशयांनी ‘जय हिंद’ म्हटल्याचे सांगितले जात असले तरी त्यामुळे त्यांच्या आधीच्या देशद्रोही पापाची भरपाई होत नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ओवेसीच्या ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही अशी गरळ बुधवारी विधानसभेत ओकली. या आमदारमहाशयांना अधिवेशनकाळापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने मंजूर केला ही गोष्ट चांगली झाली. अर्थात, त्यामुळे त्यांच्यासारख्या मुस्लिम धर्मांधांचे फूत्कार थांबतील असे नव्हे. ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, बेशक काढून घ्या! - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/tyanche-nagrikatwa-radda-kara#sthash.a0XWPI6c.dpuf - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/so-chuhe-khake#sthash.bGEDXjSO.dpuf

No comments:

Post a Comment