Total Pageviews

Saturday 18 February 2012

काश्मीरमध्ये सौदी अरब राष्ट्राचे आक्रमण
सौदी अरबमधीलअहले हदीस या कट्टर धर्मांध मुसलमान संघटनेने धूर्तनीती आत्मसात करूनकाश्मीर नागरिकांच्या मनातून भारताविषयीची आत्मीयता नष्ट करण्यात यश मिळवले आहे. या राज्यात विकासकामे करणे, जनतेला अमाप पैसा वाटणे, सुख-सुविधा उपलब्ध करून देणे, असे अनेकविध प्रयत्न चीन करत असल्याने सध्या काश्मीरची नागरिक सौदी गोडवे गातांना दिसतात. आता हीच अवस्था बनली आहे. सौदी अरबमधीलअहले हदीस या कट्टर मुसलमान संघटनेने काश्मीरमध्ये स्वतःचा वहाबी संप्रदाय स्थापन केला आहे. ज्या प्रकारे चीनने अरुणाचल प्रदेश अप्रत्यक्षपणे बळकावला आहे, अगदी त्याच मार्गाने सौदी अरबने काश्मिरी जनतेवर अमाप पैशाची उधळपट्टी करून तेथील जनतेचे राष्ट्रांतर करण्यात यश मिळवले आहे. काश्मीरमधील मुसलमानांनाकाश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे सतत वाटत रहावे; म्हणून मागील ६० वर्षे काश्मीरमधील मुसलमानांना फुकट पोसणार्‍या भारतीय राज्यकर्त्यांसमोरआता हे नवे आव्हान उभे राहिले आहे ! काश्मीरमध्ये सौदी अरब राष्ट्राचे आक्रमण !वहाबी संप्रदायाने सध्या काश्मीरमध्ये ७०० मशिदी बांधल्या आहेत. तेथे येणार्‍या मुसलमानांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. श्रीनगरमधील बारामुला जिल्ह्यातील प्रत्येक गावात वहाबी संप्रदायाची एक मशीद बांधण्यात आली आहे. या मशिदीमध्ये येणारे स्थानिक मुसलमानांचे वर्तन सौदी अरबमधील मुसलमानांसारखे असते. त्यांच्यावर तालिबानी विचारांचा प्रभाव अधिक दिसतो. केंद्रीय गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार, सौदी अरब राष्ट्राने दक्षिण आशियात वहाबी संप्रदायाचा प्रसार करण्याकरता मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी २००५ मध्ये ३५ अरब डॉलर ( लक्ष ७५ सहस्र कोटी रुपये) दिले होते. त्यांतील काही भाग जम्मू आणि काश्मीरमधील वहाबी संप्रदायाच्या अनुयायांसाठी देण्यात आला होता. आजही काश्मीरमध्ये अनधिकृतरीत्या परदेशातून पैसा येत असतो. केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि पाक यांच्यामध्ये व्यापारसंबंध शिथील करून या ठिकाणी वस्तूंची ने-आण करण्यास अनुमती दिली आहे; मात्र त्या ठिकाणी वस्तू पडताळण्याकरता एकही प्रभावी यंत्रणा बसवण्यात आली नाही. त्याचा गैरफायदा घेऊन सौदी अरबमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आणला जातो. सध्या वहाबी संप्रदायाचे काश्मीरमध्ये १५ लक्ष अनुयायी बनले आहेत. याचा अर्थ काश्मीरमधील एकूण लोकसंख्येचा १६ प्रतिशत भाग वहाबी संप्रदायाचा बनला आहे. या राज्यात १५० शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे उभारण्यासाठीही पैसा पुरवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त श्रीनगरमध्ये २०० कोटी रुपये खर्च करूनट्रान्सवर्ल्ड मुस्लीम युनिव्हर्सिटी या नावाने विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यावर सौदी अरब देशाचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण असणार आहे. याशिवाय श्रीनगरमध्ये सहस्र मशिदींमधून आता वहाबी संप्रदायाची शिकवण शिकवली जाऊ लागली आहे. वहाबी संप्रदायाचा प्रभाव वाढला या सर्व माहितीवरून काश्मीरमधील मुसलमानांवर वहाबी संप्रदायाचा प्रभाव वाढत चालला असून तेथील मुसलमानांनी सौदी अरब राष्ट्राची संस्कृती स्वीकारल्याचे दिसते. याचा अर्थ काश्मीरमधील मुसलमानांनी मनाने राष्ट्रांतर केले आहे. तसाच धूर्तपणा सौदी अरब या राष्ट्राने चालू केला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग आहे, हे तेथील जनतेच्या मनात कायम रहावे, यासाठी भारतीय राज्यकर्त्यांनी या राज्यावर भारतीय दंड संहिता लादली नाही. तेथील जनतेला करमुक्त ठेवले. सर्वाधिक अनुदान दिले. देशातील इतरत्र कोणत्याही नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. तेथील मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांना राज्याबाहेर हुसकावून त्यांच्या माता-भगिनींवर बलात्कार केले, तरीही राज्यकर्त्यांनी त्यांना खडसावले नाही. याचा अर्थ तेथील काश्मीरजनतेच्या मनातते भारताचे नागरिक आहेत, हे सतत रहावे याकरता राज्यकर्त्यांनीr तेथील जनतेवरआंधळे प्रेम केले. या तकलादू धोरणांमुळे परराष्ट्रांनी सीमावर्ती राज्यांवर अप्रत्यक्षपणे आक्रमण केले. स्वातंत्र्यानंतर देशाला युद्धाशिवाय दोन फाळण्या पहाव्या लागतील, असे वाटावे इतकी ही गंभीर स्थिती काँग्रेसमुळे बनली आहे.बांगलादेशातील कोटी घुसखोर मुसलमान विनाअनुमती या देशात सुखाने आणि शासकीय सोयीसुविधा घेऊन कृपाशिर्वादाने राहू शकतात. काश्मीर पाकला देऊन टाकावा, असे म्हणणारे तथाकथित बुद्धीवादी भारतात सन्मानाने जगतात. अटकेतील जिहादी आतंकवाद्यांना पोसले जाते; मात्र जगाच्या पाठीवरील आणि विशेषतः पाकधील हिंदूंना कायदेशीर अनुमती मागूनही या देशात रहाताही येणार नाही, अशी भूमिका काँग्रेस शासनाने घेतली आहे.मात्र या भूमिकेमुळेअतिथी देवो भवः ही संस्कृती असणार्‍या भारताची प्रतिमा अशामुळे मलीन होणार आहे. शरणागताला आश्रय देणार्‍या भारताची सहस्रो वर्षांची परंपरा असतांना पाकमधील हिंदूंना आश्रय नाकारणार्‍या काँग्रेसींना आता हिंदूंवरील अत्याचारांची भयावहता अनुभवण्यास पाकमध्ये पाठवण्यास पर्याय नाही. पाकमधील हिंदू म्हणजे गुलाम ! पाकमधून भारतात तीर्थस्थानाच्या दर्शनासाठी आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० हिंदूंची प्रवेश अनुज्ञप्ती (व्हीसा) महिन्यांपूर्वीच संपल्यामुळे त्यांना पाकमध्ये परतावेच लागेल, अशी धमकी हिंदुद्रोही काँग्रेसी शासनाने लोकसभेत दिली आहे. गेले दोन महिने ही हिंदु कुटुंबे विविध संस्थांच्या माध्यमातून शासनाकडे भारतात कायमस्वरूपी रहाण्याची अनुमती मागत आहेत. त्यांना भारतात रहाता येणार नाही. त्यांनी आल्या पावली पाकमध्ये चालते व्हावे, असे काल केंद्रीय गृहराज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी लोकसेभत एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात म्हटले. पाकमधील हिंदूंची स्थिती गुलामांसारखी झाली आहे. मुसलमानांकडून हिंदूंच्या मुलींना घरातून पळवून नेले जाते. त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा निकाह मुसलमानाशी लावण्यात येतो. हिंदूंकडून खंडणी वसूल केली जाते. त्यांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. या अत्याचारांमुळे त्रस्त झालेली २७ कुटुंबे सर्वस्वाचा त्याग करून भारतात कायमस्वरूपी आणि सन्मानाने रहाता येईल, या आशेने आली आहेत. त्यांना पुन्हानापाकमध्ये (नरकात) जाण्याची इच्छा नाही. असे असतांना राज्यकर्ते त्यांना भारतातून हाकलून लावत आहेत. पाकमधील हिंदूंना भारतात कसे काय ठेवता येईल, याच विचाराने काँग्रेसने त्यांना भारतात रहाण्याची अनुमती दिलेली नाही. अशा वेळी मानवाधिकारांचे रक्षणकर्ते समजणारे तिस्ता सेटलवाड, शबाना आझमी, महेश भट्ट, इत्यादी तथाकथित बुद्धीवादी या हिंदूंसाठी पुढे आलेले नाहीत. घुसखोर बांगलदेशींना पकडून त्यांच्या देशात पाठवतांना त्यांच्या बाजूने उभे रहाणार्‍या ममता बॅनर्जीही या वेळी गप्प आहेत. भाजपच्या एकाही राष्ट्रीय नेत्याने या विषयी उघडपणे हिंदूंची बाजू घेतल्याचे ऐकिवात नाही. एकाही राजकीय पक्षाने या हिंदूंविषयी सहानुभूती व्यक्त केलेली नाही



काश्मीरमध्ये सौदी अरब राष्ट्राचे आक्रमण !स ना त न ओन लाएन

No comments:

Post a Comment