Total Pageviews

Tuesday 30 May 2017

वैचारिक दहशतवाद फोफावतोय-माजी सैन्याधिकारी हेमंत महाजन यांची टीका-http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/inteleectual-terrorism-spread-in-country/articleshow/58917787.cms


Maharashtra Times | Updated: May 31, 2017, 12:21AM IST 11 म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘सध्या प्रसारमाध्यमांमध्ये देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको ती चर्चा केली जाते. या चर्चांमध्ये काही तथाकथित विचारवंत सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अनेकदा सैन्याच्या विरोधातही बोलले जाते. एकप्रकारे हा वैचारिक दहशतवाद असून, तो फोफावत चालला आहे,’ अशी टीका ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केली. शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवनेरी ते रायगड या पायी पालखी सोहळ्यानिमित्त लालमहाल येथे महाजन यांच्या हस्ते शिवधनुष्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी महाजन यांनी सैन्यावर टीका करणाऱ्या विचारवंतांना खडे बोल सुनावले. देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही फक्त सैन्याची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक प्र. के. घाणेकर, छायाचित्रकार सुरेश तरलगट्टी, संदीप भोंडवे यांना क्रीडा पुरस्कार, शीतल कापशीकर यांना शाहिरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, सरदार कृष्णाजी नाईक बांदल यांचे वंशज करणराजे बांदल, पिलाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, शिवशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे आणि शाहीर हिंगे कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे व ऐतिहासिक गीते सादर करून कार्यक्रमात रंग भरले. ताजी प्रतिक्रियामाजी सैन्याधिकारी हेमंत महाजन यांची टीका जे कोणी अतिशहाने आहेत त्यांना एकतर पाकिस्तानात नाहीतर कश्मिर मध्ये पाठवले पाहिजे मग त्यांना समजेल देशाला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांकडून धोका आहे. एकाबाजूला चीनने आपल्या देशात विविध वस्तूंच्या विक्रीच्या माध्यमातून अर्थिक घुसखोरी केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या आधारे भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी या दोन्ही शत्रूंचे मनसुबे हाणून पाडणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना आळा घालायला हवा, असे आवाहन महाजन यांनी केले. मुक्ता टिळक आणि पांडुरंग बलकवडे यांनीही आपले विचार मांडले. गोगोईंच्या कारवाईचे समर्थन काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी केलेल्या कारवाईचे महाजन यांनी समर्थन केले. ‘लढाईला कोणतेही नियम नसतात. काश्मीरमध्ये जे युद्ध लढले जात आहे ते अपारंपरिक आहे. भारतीय सैन्याला अपारंपरिक मार्गच स्वीकारावा लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी हेच केले होते. आपली ताकद शत्रूपेक्षा कमी असते, तेव्हा शत्रूला बेसावध पकडून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. आज सैन्याच्या विरोधात बोलणारे तथाकथित विचारवंत शिवकाळात असते, तर त्यांनी शाहिस्तेखान विरोधी मोहिमेबद्दल छत्रपतींनाही प्रश्न विचारले असते. जे राजकीय पक्ष सैनिकांच्या विरोधात बोलतील, त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे लोकांनी निक्षून सांगायला हवे. हेमंत महाजन

No comments:

Post a Comment