Total Pageviews

Thursday 29 August 2013

YASIN BHATKAL INDIAN MUJAHIDIN MOST WANTED

SAKAL ARTICLE इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा सदस्य यासीन भटकळ ऊर्फ मोहम्मद अहमद मोहम्मद झरार सिद्धिबापा याला आज (गुरूवार) सकाळी भारत-नेपाळ सीमेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केली असून, यासीन भटकळ हा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटांमध्ये सहभागी होता. त्याच्याविषयी आणि स्फोटांविषयी 'सकाळ'ने तेव्हा घेतलेला आढावा... रियाझ, इक्बा्ल हे मुंबई प्रॉडक्ट "रियाज व इक्बाकल भटकळ हे मुंबई प्रॉडक्टस आहेत. दहशतवादाची भटकळमधील ही पहिली पिढी आहे. मंगळूरमध्येही इंडियन मुजाहिदीन सक्रिय असून, त्यांच्या वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यांचा तसेच त्यांच्या काही साथीदारांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती कर्नाटकच्या पश्चिसम परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक गोपालस्वामी हुसूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. "रियाज भटकळ नोव्हेंबर 2008 पर्यंत मंगळूरमध्ये होता. तेथे त्याचे महंमद अली या धर्मगुरूकडे सहा महिने वास्तव्य होते. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर आम्ही छापा घातला. परंतु तत्पूर्वीच तो पळून गेला होता. त्या वेळी त्याचे पाच साथीदार पकडण्यात आम्हाला यश आले,'' असेही त्यांनी नमूद केले. रियाज भटकळ मंगळूरमध्ये असताना मुंबईच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करीत होता. उलाला पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा भूखंड विकसित करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. त्यासाठी तो मंगळूर महापालिकेतही जात असे. भूखंडाच्या सपाटीकरणाचे बहुतेक काम पूर्ण झाले. त्याच दरम्यान मुंबईत स्फोट झाल्यावर तो पळून गेला, असेही त्यांनी नमूद केले. त्याची माहिती काढण्यासाठी इक्बाबलकडे पोलिस चौकशी करण्यासाठी गेले तेव्हा त्यानेही पलायन केल्याचे उघड झाले. भटकळ व मंगळूरमध्ये "सिमी' पूर्वी सक्रिय होती. सध्या या भागात पोलिस यंत्रणांचे खास लक्ष असल्यामुळे त्यांच्या कारवायांना प्रतिबंध बसला आहे. भटकळमध्ये जातीय तेढ आहे. एका बाजूला सधनता व दुसरीकडे गरिबी, अशी भटकळमध्ये परिस्थिती आहे. त्याशिवाय आखातातील देशांत असलेल्या युवकांचा गावात वावर आहे. मुंबईतही ते सक्रिय आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमधील गुंडगिरीही या गावात पसरली असल्याचे निरीक्षण गोपालस्वामी यांनी नोंदविले. मुंबई, पुणे, गुजरात पोलिस सतत संपर्कात असल्याचे त्यांनी नमूद केले. मंगळूरपासून जवळच असलेल्या उडपी या गावात प्रवीण पवार हे महाराष्ट्रीय अधिकारी अधीक्षक म्हणून नियुक्त आहेत. दहशतवादाचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा सहभाग होता. भटकळलाही त्यांनी अनेक वेळा भेट दिली आहे. ""भटकळच्या किनारपट्टीवर पूर्वी तस्करी होत असे. तेथील किनारपट्टीवर कोळी लोकांच्या जमिनी होती. त्यांची नंतर विक्री झाली व तेथे आलिशान बंगले उभारण्यात आले. आखाती देशांतून हे तरुण जेव्हा परततात तेव्हा या बंगल्यांमध्ये ते उतरतात,'' असे पवार यांनी सांगितले. या किनारपट्टी परिसरात कुख्यात गुंड छोटा शकीलचे काही हस्तक सक्रिय असावेत. भटकळमध्ये अमेरिकन बंगलाही प्रसिद्ध आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी अमेरिकन पद्धतीनुसार त्याचे बांधकाम झाल्यामुळे त्याला अमेरिकन बंगला म्हणतात. अगदी समुद्रकिनाऱ्यावर तो असल्यामुळे छोटी बोट बंगल्याच्या तळमजल्यावरही सहज पोचत असे. पुढे हा प्रकार लक्षात आल्यावर "सीबीआय', कर्नाटक पोलिस यांनी बंगला काही काळ सील केला होता. नंतर त्याच्या पुढे भराव उभारण्यात आला. या बंगल्यात रियाझ भटकळ व त्याच्या साथीदारांच्या बैठकी झाल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. (क्रमशः) शाहरुख ऊर्फ यासीन महंमद सैफ व महंमद खालिद हे दोघे मुंबईहून 26 ऑगस्ट 2008 ला मंगला एक्स्प्रे सने उडपी येथे आले. तेथे शाहरुख नावाच्या व्यक्तीने त्यांना एक पिशवी दिली. त्या पिशवीत स्फोटके होती. दिल्लीमधील बॉंबस्फोटासाठी ती वापरली गेली, असे पुढे त्या दोघांना पकडले गेल्यावर उघड झाले. त्याच तपासात शाहरुख म्हणजेच यासीन भटकळ होता, असेही निष्पन्न झाले आहे. याच यासीनने पुण्यातील स्फोटासाठी तसेच देशात अनेक ठिकाणी झालेल्या स्फोटांसाठी स्फोटके पुरविल्याचा संशय असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. यासीन भटकळ कोण? यासीन हा रियाझचा नातेवाईक असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यासीन हाही भटकळ गावचाच आहे. 2007 मध्ये यासीनने केरळमध्ये जाऊन ई. टी. साईनुद्दीन याच्याकडून बॉंब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्लीत 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटासाठी यासीननेच बॉंब पुरविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये यासीन काही काळ राहत होता. तेथे तो बॉंब तयार करीत असे. यासीन हा पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय आहे. ------------------------------------------------------ धागेदोरे पुण्यापासून भटकळपर्यंत... बॉंबस्फोटाच्या गुन्ह्याचा तपास करताना त्यातील स्थानिक साथ (लोकल हॅंड) एका पुणेकराची असल्याचे निष्पन्न झाले आहे. "इंडियन मुजाहिदीन'शी संबंधित असलेला हा पुणेकर म्हणजे मोहसीन चौधरी असून, अहमद सिद्दीबाप्पा झरार ऊर्फ शाहरुख ऊर्फ यासीन भटकळ याच्याशीही त्याचे संगनमत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी पकडला गेलेला अब्दुल समद याचाच यासीन हा सख्खा मोठा भाऊ आहे. हा स्फोट घडवून आणण्यात स्थानिक सहभागही असावा, असा पोलिसांचा सुरवातीपासून कयास होता. मात्र, दीर्घकाळ तो निष्पन्न झाला नव्हता. मोहसीनवर संशय बळावला होता म्हणूनच रत्नाकर बॅंकेच्या नाना पेठ शाखेतील त्याच्याशी संबंधित 14 बॅंक खाती गोठविण्यात आली होती. ऑक्टोकबर 2008 पासून बेपत्ता झालेला मोहसीन जानेवारीमध्ये महाराष्ट्रातच असल्याचेही आता दिसून येत आहे. कारण, या स्फोटाचा कट उदगीरमध्ये रचला गेला. तेथे झालेल्या बैठकीत मोहसीन उपस्थित होता, अशी कबुली अटक केलेल्या हिमायत बेग व बिलाल यांनी पोलिसांकडे दिली आहे. जर्मन बेकरीतील फुटेजमध्ये सापडलेले छायाचित्र हे संशयित दहशतवाद्याचे होते. त्यावरून तपास करताना अब्दुल समदपर्यंत पोलिस पोचले. त्याला पकडल्यावर त्याचा सहभाग नव्हता, असे निष्पन्न झाले; परंतु त्याच्यासारखा दिसणारा त्याचा सख्खा मोठा भाऊ अहमद ऊर्फ यासीन भटकळ हाही या स्फोटाचा कट आखण्यात सहभागी असल्याचे तपासात आढळले आहे. मोहसीनचे कुटुंब मूळचे हैदराबादचे. त्याचे मामा येथील कौन्सिल हॉलमध्ये कामाला होते. उद्योग-व्यवसायासाठी हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे मोहसीनचे बालपण पुण्यात गेले. मोलेदिना हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर अठराव्या वर्षी एका बांधकाम व्यावसायिकाकडे शिपाई म्हणून सुरवातीच्या काळात त्याने काम केले. तेथे काम करताना त्याला मिळालेल्या क्वॉर्टरमध्ये "इंडियन मुजाहिदीन'चा संस्थापक इक्बा ल भटकळ हाही वास्तव्यास असे. नंतर चौधरी कुटुंब कोंढव्यात राहावयास गेले. तेथे "मुजाहिदीन'च्या दक्षिण विभागाचा प्रमुख रियाज भटकळ येत होता. कोंढव्यात अशोका म्यूजमध्ये दोन वर्षांपूर्वी "इंडियन मुजाहिदीन'चा तळ उद्‌ध्वस्त झाल्यावर मोहसीन बेपत्ता झाला होता. अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आदी राज्यांतील स्फोट घडवून आणण्यात त्याचा सहभाग असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. मोहसीनचा धाकटा भाऊ अकबर गुजरातमधील स्फोट प्रकरणी सध्या अहमदाबाद तुरुंगात आहे. अस्खलित मराठी भाषा बोलणाऱ्या मोहसीनचा इक्बारल, रियाज भटकळ यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्यावर दहशतवादी कारवायांकडे तो खेचला गेला व सध्या पाकिस्तानात पोचला आहे. तेथे "अलीसाहब' या नावाने त्याचे वास्तव्य असल्याचे दिल्लीत अटक करण्यात आलेल्या संशयिताने पोलिसांना सांगितले होते. रियाज व इक्बायलच्या माध्यमातूनच मोहसीनची अहमद झरार सिद्दीबाप्पा ऊर्फ यासीनशी ओळख झाली. यासीन हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावातील रहिवासी. तेथील बंदर रस्त्यावर "झरार मंझिल' या बंगल्यावर अजूनही केंद्रीय तपास यंत्रणांचे लक्ष आहे. पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार कोणत्याही प्रकारची स्फोटके हाताळण्यात यासीनचा हातखंडा आहे. धर्मप्रचार व प्रसाराचा अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केला आहे. काही काळ "अल्‌ कायदा'च्या हस्तकांशीही तो संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले आहे. अबुधाबी, दुबईमध्ये त्याने स्फोटकांचे प्रशिक्षण घेतले असून, सुरत, अहमदाबाद, बेंगळूरू व हैदराबादमधील स्फोटांत तो संशयित आहे. या पूर्वी स्फोट घडविताना कधी तो "शाहरुख', तर कधी "यासीन' या नावाने वावरत होता. उदगीरमध्येही मुक्काम... इक्बामल, रियाज भटकळ यांचा बालसवंगडी असलेला यासीन हा त्यांच्यामुळेच मोहसीनच्या संपर्कात आला. ही चौकडी एकत्र आल्यावर सुरवातीच्या काळात त्यांनी विविध प्रकारे जिहादी विचारांचा प्रसार करण्यास सुरवात केली. पुढे "लष्करे तैयबा'च्या संपर्कात आल्यावर दहशतवादी कारवायांत ते सक्रिय झाले. मोहसीनच्या मागावर पुणे पोलिस गेल्या तीन वर्षांपासून होते. गेल्या दोन वर्षांपासून तो भारताबाहेर असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच तो उदगीरला येऊन गेला होता, हे उघड झाल्यावर अन्य पोलिस यंत्रणांनाही धक्का बसला आहे. ------------------------------------------------- शांत भासणारे भटकळ झाले अस्वस्थ भटकळ. उत्तर कन्नड जिल्ह्यात पुणे-मंगळूर रस्त्यावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार गाव. दक्षिण भारतातील संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणाऱ्या गावातील दैनंदिन व्यवहार सध्या नेहमीप्रमाणेच सुरू आहेत. वरवर शांत भासणाऱ्या या गावातील लोकांच्या मनात मात्र अस्वस्थता थैमान घालत आहे. कारण.... इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा जन्म झालेले हे गाव सध्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. "द हब ऑफ टेररीझम' असा या गावाचा होणार उल्लेख येथील रहिवाशांना बोचत आहे. त्यांच्या मुलांना नोकरी, शिक्षण, व्हिसा, पासपोर्ट आदी अनेक कारणांसाठी त्यांचे गाव "भटकळ' याची अडचण होत आहे. या गावातील रहिवाशांशी "सकाळ'ने संवाद साधल्यावर भटकळचे अनेक पैलू उजेडात आले. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या गावात पूर्वीपासून चार वर्षांपर्यंत सोन्याची तस्करी होत असे, अशी पोलिसांकडे नोंद आहे. विस्तीर्ण किनारपट्टी असलेल्या या गावात "नवायत' मुस्लिमांचे प्राबल्य आहे. सातशे वर्षांपूर्वी पाश्चिीमात्य देशांतून व्यापारासाठी आलेल्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केले. त्यातून नवायत उदयाला आले. कोकणी व उर्दू मिश्रित त्यांची भाषा असल्यामुळे मराठी भाषा जाणणारी व्यक्ती त्यांचे संभाषण समजू शकते. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नवायतांमधील घरटी एखादी तरी व्यक्ती आखातातील दुबई, सौदी अरेबिया आदी देशांत नोकरी-व्यवसाय करीत आहे. त्यामुळे त्यांची सधनता दिसून येते. येथील त्यांच्या कुटुंबीयांकडे आलिशान मोटारी, आधुनिक मोटारसायकली असून, त्यांचे बंगलेही टुमदार आहेत. ज्या घरांतील व्यक्ती आखातात नसतील, त्या मुंबईत कार्यरत आहेत. मंगळूरमध्ये दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला आहे. त्यामुळे थेट आखातातून येथे येऊन सुटी घालविणे त्यांना शक्यर झाले आहे. आखातातील देशांतील संस्कृतीही काही प्रमाणात येथे दिसून येते. येथील बाजार पेठेतील "दुबई मार्केट' येथे प्रसिद्ध आहेत. स्प्रे, चॉकलेटपासून आखातात मिळणारी प्रत्येक वस्तू या बाजारपेठेत उपलब्ध आहे. या गावातील मदानी कॉलनी, मगदूम कॉलनी, नवायत कॉलनी, बंदर रोड, आझादनगर, सुलतान स्ट्रीट भागात नवायत मुस्लिमांचे प्राबल्य आहे. तर हनुमाननगर, मंडकोठी, आसरकेली, जाली रोडमध्ये हिंदूंचे प्राबल्य आहे. सुमारे 45 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात 1992 पासून जातीय दंगलीची पार्श्वाभूमी आहे. भाजपचे आमदार डॉ. चित्तरंजन, प्रमुख कार्यकर्ते तिमप्पा नायक, श्रीधर नाईक यांचे गेल्या पंधरा वर्षांत येथे खून झाले आहेत. चित्तरंजन, नायक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. मुस्लिम संघटना "तंजिम'बरोबरच येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वा हिंदू परिषद, श्रीराम सेना या सक्रिय आहेत. उत्तर कर्नाटकमधील एक संवेदनशील गाव, अशी ओळख असलेल्या भटकळचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन वर्षांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या 15 जणांना अटक केली तेव्हा. पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट झाल्यानंतर तो याच संघटनेने केला असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानंतर या गावात आता पुणे पोलिस, महाराष्ट्र एटीएसबरोबरच दिल्ली, गुजरात, "एनआयए' यांचीही वर्दळ वाढली आहे. या संघटनेचा संस्थापक व म्होरक्याय रियाज व इक्बा ल शहाबांदरी ऊर्फ भटकळ हे अद्याप देशाबाहेर आहेत. त्यांना पकडण्यासाठी भारतीय पोलिस यंत्रणांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय भटकळमध्ये पूर्वी राहत असलेले व सध्या फरारी असलेले पाच-सहा जण अद्याप फरारी आहेत. या गावातील एक प्रमुख कार्यकर्ते इनायतुल्ला शहाबांदरी म्हणाले, ""भटकळमधील काही जण संशयित दहशतवादी असतील तर त्यांना पोलिसांनी पकडावे; परंतु गावाची बदनामी का करीत आहेत. येथील सर्व जण दहशतवादी नाहीत. प्रत्येक गावात कमी-जास्त प्रमाणात अनुचित घटना घडत असतातच. भटकळमध्येच सर्व घटना घडतात, असे नाही. रियाज, इक्बा ल यांचा जन्म या गावात झालेला नाही. त्यांची हयात मुंबईत गेली आहे. त्यांचे एक घर येथे आहे, इतकाच त्यांचा या गावाशी संबंध आहे. सरसकट सर्वांकडे संशयाच्या नजरेने पाहणे योग्य नाही.'' ""रियाज, इक्बा्ल यांचे आडनाव शहाबांदरी आहे. यासीनचे सिद्दीबाप्पा आहे. पण, पोलिस त्यांचे आडनाव भटकळ असल्याचे जाहीर करीत आहेत. त्यामुळे येथील युवकांना शिकताना पावलापावलावर अडचण उद्‌भवत आहे. गावातून बाहेर पडलेली व्यक्ती काय करते, त्याचा गावातील लोकांशी काही संबंध कसा काय जोडला जातो, त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत,'' असे सांगत होते रिझवान गंगावली. गावाचे नाव टाळा भटकळ हे गावाचे नाव आहे. संबंधित संशयितांना त्यांच्या नावानेच संबोधिले गेले तर गावाची होणारी बदनामी टळेल. येथे राहणाऱ्या निरपराधांची अडवणूक थांबेल. ती थांबावी अशी अपेक्षा करतानाच संबंधित संशयित गुन्हेगार असतील तर त्यांना जरूर शिक्षा व्हावी; पण त्यांच्यामुळे गावाचे नाव बदनाम होऊ नये, अशी भावनाही अनेकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसह देशभरातील अनेक बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली आहे. भटकळ हा पाकिस्तानातील कराचीत बसून दहशतवादी हल्यांचे कट रचत होता. त्याच्या अटकेने 'इंडियन मुजाहिदीन'वरच बॉम्ब पडला असून या संघटनेची पाळंमुळं उखडून टाकण्यात भारताला यश मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

HIGH ALTITUDE WARFARE SCHOOL ARMY-US ARMY OFFICERS TRAIN

Artillery captain top student at Indian army school Posted 8/26/201 8/26/2013 - JOINT BASE ELMENDORF-RICHARDSON, Alaska -- Eleven weeks of rigorous high-elevation training in India culminated with the "Best Student" trophy awarded to U.S. Army artillery officer Capt. Matthew Hickey with the 2nd Battalion, 377th Parachute Field Artillery Regiment, 4th Infantry Brigade Combat Team (Airborne), 25th Infantry Division. Hickey, a 26-year-old officer hailing from St. Paul, Minn., attended two courses while training at the Indian Army's High- Altitude Warfare School in the Himalayan mountain range near Sonamarg in the Indian state of Jammu and Kashmir. Hickey's first course in high-altitude training was the Mountain Warfare Basic Course, which lasted seven weeks. He successfully completed the basic course and spent another four weeks at the Mountain Warfare Advance Course, where he distinguished himself by earning the best student award. Mountain Warfare Basic training began in early May 2013 with a class size of approximately 225 service members. The top 75 students progressed to the Mountain Warfare Advance Course which was completed in late July. Hickey said HAWS, which dates back to India's inception in the 1940's, is a well-known and prestigious school within the Indian Army and around the world. "It's akin to our Airborne school a little bit, like how we pioneered this idea of putting paratroopers behind enemy lines ... HAWS is kind of like that. It has evolved into this very important and advanced mountain warfare school that has a training side and an operation side, and it has a lot of strategic value...It was a neat place to be at because of the history associated with it." High-Altitude Warfare School students are predominately Indian Soldiers, but Hickey was joined by three other American Soldiers: a sergeant first class from the 1st Special Forces Group, a sergeant first class with the 19th Special Forces Group, and a staff sergeant with the 2nd Ranger Battalion. Hickey's class also included soldiers from Tajikistan, Kyrgyzstan, Nepal, Botswana and Bhutan. Main curriculum points at HAWS include mountain warfare and survival skills. "It's just as much of a warfare course as it is a mountaineering course ... Everything is taught with military operations in mind. It's not just, 'How do I climb a mountain?' It's, 'How do I get a lot of Soldiers to a particular place on the mountain to achieve a particular objective?'" According to Hickey, the course is broken down into five rated categories: Rock Craft, Ice Craft, Endurance Testing, Tactical Operations, and Written Exams. Rock craft, the school's core curriculum, measures a Soldier's skills in knot tying, rope fixing, rock climbing, and choosing the best route to employ a group of Soldiers for a cliff assault. Ice craft measures skills in traveling across glaciers and establishing camps in a snowbound environment. An endurance test is performed every week. The test includes running over undulating terrain for distances typically ranging between 10 to 15 km. Soldiers are tested in low-oxygen, high-elevation conditions of around 12,000 feet while carrying loads ranging between 20 to 50 pounds. The tactical exercises, generally 36-hours in length, employ skills learned at the school. Tasks include moving squads and platoons through mountainous terrain in order to set up patrol bases to conduct combat operations. All events were graded, and upon completion of the course, written exams were taken. The daily routine was physically demanding. Rock craft required a hike of anywhere between eight to 15 kilometers from base camp to arrive at the training site, while the ice craft portion required an ascent from 12,000 to 14,000 feet to get to its training area. "It hardens people...It's difficult to live and operate in a mountainous environment," said Hickey. "The course was taught in Hindi ... It was translated to us, but a lot of the language of mountaineering is not necessarily spoken. It's in the actions: tying knots, inspecting knots, inspecting harnesses, knowing the sequences, so it wasn't all that difficult to pick up on things, even when it was in Hindi." Learning mountain warfare was the biggest objective for Hickey, but he also obtained insight into the Indian culture and how the Indian Army operates. He said Indian cultural norms hold economic and social status in high regard, and these fundamental norms reciprocate into their Army and how they operate militarily. "The Indian Army is hard working. Their enlisted Soldiers work extremely hard ... When their Soldiers get into the Army they are excited to get the opportunity to prove to the junior commissioned officers, and the officers that they are capable of accomplishing things." "As much as I learned about mountaineering and military tactics, I learned just as much about the Indian culture and how it affects the way they do their operations." "I developed some relationships with some of their NCOs and their officers, both on the student side and the instructor side, that hopefully I can maintain as we (U.S.) and India continue to develop a relationship." In another cultural and humorous learning opportunity, Hickey's roommate, an officer from Kyrgyzstan, showed up at the training with little guidance and a small amount of gear. "We called him Eddie. He was a lieutenant from Kyrgyzstan. His real name was Elzair Abdykaimov. When he showed up, he said his real name, and he said it kind of funny, so I told him I would call him Eddie if it was alright, which he said it was alright to." "My name for almost the entire time was Michael instead of Matthew," Hickey said. "They couldn't pronounce my last name either, so my name was Capt. Michael Hankey, instead of Matthew Hickey. I knew I was going to butcher a lot of their names, so if Michael Hankey was easy, I was good with it, same thing with Eddie." "Everybody was pretty laid back and low key. Even some of the instructors, if they had difficult names we would just give them a nickname, and they loved it. We would nickname guys after animals. We had Rhino, and Cobra, and Tiger, and all sorts of stuff, and they loved it. It was a lot of fun." Abdykaimov spoke very little English, and did not know Hindi. He relied on another officer from Tajikistan, Lt. Rajabov Umedjon, to translate English and Hindi to his primary language, which was Russian. "The funny thing about Eddie was, not only did he not speak English or Hindi, and he was at this course where they only spoke English and Hindi, he didn't know what course he was going to. His Army just kind of sent him out, telling him he is going to this course in India...So all he brought with him was one suitcase. In it he had his combat uniform, his boots, his beret, he brought a couple of gifts from Kyrgyzstan, and the rest of it was full of Marlboro red cigarettes." "And, that's all he brought with him ... Eddie had never climbed a day in his life. He didn't know anything about mountaineering, and by the end of the course, he was the number one rock climber," Hickey said. "It was pretty remarkable how he just showed up there, not knowing what he was going to do, not even knowing what people were saying, and he just had this incredible natural ability to feel the rock, and understand balance, and rhythm, and the techniques associated with rock climbing. By the end, he was head and shoulders above anyone else." "In between every rock climb, and in between every endurance event, and before PT, he'd be sitting there smoking a Marlboro cigarette ... He was just going with the flow - so long as he had a cigarette nearby, he'd be doing just fine." "Eddie and I got to know each other pretty well. His English improved, and then for some reason it got worse as the course went on, so we goofed around about that. I'll stay in touch with Eddie. He has a bright future. So does Umed (Rajabov Umedjon), from Tajikistan. I probably became closest friends with those guys. Any time you go to a foreign school, and you find some other foreign officers, you kind of latch on, because you have that in common." In addition to the Best Student award, Hickey was given a pin for his uniform, and officially certified in the Indian Army's Basic, and Advanced Mountain Warfare courses. He said he was honored to be one of four American service members selected for the training. "It's important to understand that the High Altitude Warfare School has a long history...Ever since the 1940s they have been doing some remarkable stuff, so High Altitude Warfare School is regarded as one of the top and most prestigious schools in their army

SINDHURAKSHAK -LIFE OF SUMMARINER

Life inside a submarine Niranjan Kaggere Even hardcore sailors think ‘they’ are crazy, but they do so with great regard. Any man with the Dolphin pin on his lapel deserves all the respect and some more, for they are submariners; men who volunteer to lock themselves up in a windowless, cramped, steel contraption of a vessel to work tirelessly for one and a half months at a time with 250 ft of sea above them When they enter the submarine and the hatch closes above them they know fully well that there are no exit doors for them in the event of danger.Yet, they step down the ladder bravely with their heads held high. Spending a few hours inside INS Sindhugosh one soon realises that submariners are a special breed indeed! Submarines dock at particular jetties inside ports for replenishment and refueling. INS Sindhugosh was on one such ‘replenishing trip’ to the port when we got a chance to partially experience life inside the submarine. From the jetty, we walked through a launch pad to the top deck of the submarine. We then gingerly made our way along the side of the submarine, towards the conning tower. What welcomed us was a cylindrical staircase dropping 10ft down into darkness; as we climbed down we could feel the air being sucked out of our lungs — call it the psychological effect of entering a submarine. Beyond the stairwell was man’s modern marvels cloaked in jet black-valves, gadgets and machinery all required to help the submariners guard the waters of the country. The heart thumps and the lungs expand, greedy for oxygen. One cannot help but look up at the hatch — the last source of sunlight. Once everybody climbs down, the door at the conning tower is sealed and secured. Now, you feel like you are inside a fully packed tube. If you are claustrophobic it is at this point that you are willing to meet your Creator. If not, you would fill your lungs with as much air as you can (though you can actually breathe normally inside a submarine) and proceed bravely. The submarine is filled to the brim with machinery and a few men. You have to squeeze your way from one deck to the other with your heads bent down; when you pass through the circular passages of each of the seven decks in the submarine you are quite literally making the journey on all fours. You tend to get nauseous as the submarine makes its way down the ocean and when it is nearer the surface of the sea. But it is relatively calmer once it reaches the depth of around 280 ft. IRONY ABOARD Surrounded by water, the most precious commodity inside the submarine is water. “ None of us take a bath till we reach a port for replenishing,” explains a junior officer of the Indian Navy. Since water is precious, it is used only for drinking and cooking. Even though there is provision to convert sea water into potable water, it is only used as a last resort.The crews uses disposable, medicated clothing, which they change once in four-days. CLOSE QUARTERS Space inside the submarine gives the phrase packed-like-sardines-in-a-tin a new meaning. Filled with gadgets, valves, gauges and other instruments there’s hardly any space for the crew. “In some areas you cannot even walk straight as you collide head on with the heavy equipments,” explained a Chief Petty Officer. Even though the entire submarine has air cooling facility, only two decks are airconditioned. The temperature in the rest of the submarine is around 30-35 degrees and the crew works in sweltering heat.The quality of the air is monitored constantly for impurities. Yet, as we expose ourselves to chemical gases at the same temperature for several weeks, our hair acquires a tinted brown colour. Lack of sleep and intense work makes our eyes swollen.” Lack of sunlight for longer periods of time also affects them. Though submariners are provided with berths or racks to sleep, many often sleep where they work. “Once you are inside the submarine, there is nothing which can be defined as private.The berths are nothing but a dormitory of not more than 15-20 sq ft space per sailor to sleep and keep his belongings.” “It so happens that we often stand in a queue waiting for our turn to use one of the two toilets available inside the submarine for ablutions,” explained an officer. Submarines usually carry up to 75 personnel on board during its journey into the sea. Though submarines are equipped with entertainment facilities (satellite channels, DVDs, music) there is not much time left to enjoy those facilities. “The entire unit is run on diesel power and it is important to conserve fuel and energy for offensive and defensive purpose. The electricity is generated through batteries that are charged by switching on the engine,” explained an electrical officer of a submarine. So they are always conscious about the use of ‘power’. Cooking up a storm Preparation of food is yet another challenge. “Space is a constraint inside the 300 ft long and 30 feet wide three story submarine, but still we have a galley spanning 4X6 sq mts equipped with minimum devices to cook decent food for the crew. Cooking begins everyday at about 3:45 am; there are two cooks on board. Though it is hot in other decks, it is hotter inside the kitchen with temperatures going up to 38 degrees. Other than packed food, we do prepare chapathis, rotis, pizzas, bread, rice, dal and other cuisines. Sailors usually take turns to eat because of the limited space at the dining hall,” explained a cook attached with a submarine. Regular work day A submariner goes to work the minute he steps inside one. Every day is a week day, till he reaches port after three months. A normal work day inside a submarine is not the same as the 24-hour regime that we adhere to on land. “For the functioning convenience, the crew is divided into three groups. Our days are made of 18 hours. Each of the three groups will work for six hours at their designated locations and spend the remaining 12 hours keeping a watch. On few occasions we hardly sleep. Otherwise we do sleep for four to six hours,” reveals a submariner. Dolphin family Submariners may have different last names, but inside the submarine they are a family. They might live in silence for months together and speak only when necessary, but they are bonded by the invisible chord of trust. “Everybody is family in here. There is a strong bond that ties us all. There is no privacy or secrets here. We talk to everybody otherwise isolation will eat into our lives,” explains an officer newly commissioned into the submarine wing. The chosen ones It is not that anybody can work in a submarine. It requires a systematic mental and physical conditioning, which helps your body cope with the hardships of submarine life. “You are an astronaut of the deep and with the kind of technology we have on board our submarines, experience is akin to that of any space shuttle. Being part of the submarine fleet will test your limits and endurance,” explained a senior officer of the submarine wing of Indian Navy’s Western Naval Command at Mumbai. According to them the submarine service is a voluntary service for any sailor or officer of the Indian Navy. The only opportunity for the submariners to get a breath of fresh air is when the submarine goes for snorting at periscope depth. “Sometimes to recce the surface water, the submarine comes up to surface level and launches its periscope above the water surface. Through the periscope you will get a 360 degree view of the sea surface and the sky. At the same time, fresh air is also sucked into the submarine through a snorkel,” explained a technical officer. Losing count of their body clock within a few days of joining the service; long periods in closed quarters with no fresh air or sunlight; being away from family and friends; following a work-life routine very different from the regular; loss of appetite...all these are said to make submariners dull, reticent and constipated men. Yet, submariners are an exception; they are sharp as a whip and their reflexes are close to being super-human. These men with a dolphin badge are one of the striking forces of our naval strength with razor sharp senses, ears and eyes. They function and strike at the enemy target at a pace, which is faster than that of a second needle of the clock. Sitting inside a menacing contraption, deep under the sea, fully aware of the dangers lurking in the waters, submariners are the bravest men of our country, safeguarding our nation from seaborne threat.

Monday 26 August 2013

MAKING RS STRONGER

Dear Friends, Please read! In 1970 1$ = Rs. 4 Today 1$ = Rs. 62.50 Estimated 1$ by end of the year = Rs. 70 Dollar is not getting stronger but rupee is getting weaker & nobody else is responsible except us! ... How can we change it? 1. A Cold Drink produced for 70-80 paisa sold at Rs. 9-10! Stop drinking them, go to soda shops & drink lemon juice, lassi etc. instead of coke, pepsi, limca 2. Soaps Use Soaps of cinthol,santoor,medimix, neem instead of lux,lifebuoy,rexona,liril,dove,pears,hamam,lesancy,camay,palmotive! 3. Toothpaste- Use Neem, babool, vicco, dabur, promise instead of colgate,close up,pepsodent,cibaca 4. Toothbrush Use prudent,ajanta,promise instead of colgate, close up, oral-b,pepsodent,forhans 5. Shaving cream- Use godrej ,emami, vjohn Instead of palmotive,old spice,gillete. 6. Blade- Use supermax,topaz,laser,ashoka Instead of seven-o-clock,365,gillete 7. Talcum powder- Use santoor,gokul,cinthol,boroplus Instead of ponds,old spice,johnson,shower to shower. 8. Milk powder Use indiana,amul,amulya' verka Instead of anikspray,milkana, everyday milk, milkmaid 9. Shampoo- Use Nirma, Velvette Instead of halo, all clear,nyle sunsilk,head and shoulders, pantene 10. Mobile connections- Use bsnl,airtel,reliance, Insteaf of vodafone, docomo 11. Food- Eat at jay bhavani, TGB, local restaurants Instead of macdonld, subway, pizza hut, kfc 12. Mobile Use micromax, karbonn,virgin Instead of samsung,apple, htc, sony, nokia 13. Bikes- Use hero, royal enfield Instead of honda, yamaha 14. Footwear- Use bata, chavda Instead of nike, reebok,adidas,converse 15. Jeans and shirts Use spykar, k-lounge Instead of lee,levi's,U.s. Polo, pepe, benetton 16. Watch Use titan, sonata ,fasttrack Instead of tommy, Citizen,zodiac,tissot Don't use items from Hindustan Liver or Uniliver. It is a foreign company. And we blame politicians Now go and check the things you use and ask yourself how much do you contribute to the decreased value of RUPEE None of the indian products are subordinate in quality, they might look a bit less fancy!! Why is china so ahead, because the whole world uses made in china items. We indians could atleast use made in india items! Change comes from within! Start the change by simply changing your mobile network and spread the change by broadcasting this msg to everyone on your contact list! I did my part, You do yours and let's see by the end of this year Does 1$ become Rs. 70 or it becomes Rs. 50. . Plz yaro itna forword karo ki pura india padhe. . Aur jitna ho sake isme se koi iteam pasand kare

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: ABDUL KARIM TUNDA A SMALL CATCH

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: ABDUL KARIM TUNDA A SMALL CATCH: निव्रुत्त दहशतवादी अब्दुल करीम टुण्डाची अटक: दहशतवादाविरुधच्या लढाइमध्ये एक छोटे पाउल आपल्या देशात काय चालले आहे?काश्मीरमधील पूंछ या सीम...

ABDUL KARIM TUNDA A SMALL CATCH

निव्रुत्त दहशतवादी अब्दुल करीम टुण्डाची अटक: दहशतवादाविरुधच्या लढाइमध्ये एक छोटे पाउल आपल्या देशात काय चालले आहे?काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला.१६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला. अरुणाचल प्रदेशात 20 किलोमीटर घुसखोरी केलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळल्याची बाब एका "व्हिडिओ'द्वारे उघड झाली आहे. घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने २२ ऑगस्टला प्रसारित केले.अरुणाचल प्रदेशच्या चागलागाम भागात 13 ऑगस्टला घुसखोरी करून दोन दिवस मुक्काम केलेल्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी मानगूट धरली. हे जवान सैन्याच्या आसाम रायफ़ल युनिटचे होते.सैन्याच्या मेजर हुद्याच्या अधिकार्यानी जे धैर्य दाखवले, ते आपले राजकिय नेते चिन बाबत का दाखवु शकत नाही?त्यांनी चिनी तुकडीतील सैनिकांना पकडले.मग चिनी सैनिकानी "सॉरी' म्हणत माघार घेतली. गेली १० वर्षे ही भारतीय संरक्षण दलांसाठी वाया गेलेले दशक मानले जाते. लष्करासाठी, या काळामध्ये सर्व नवीन प्रस्ताव तयार होते. मात्र त्यावर निर्णय झाले नाहीत. आताही ‘आयएनएस सिंधुरक्षक’मध्ये झालेल्या स्फोटांनंतर तिने सागरतळ गाठला आहे. पाणबुडय़ांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव ८४ सालापासून असून आजही आपण त्यांची नियुक्त संख्या गेल्या २९ वर्षांमध्ये गाठू शकलेलो नाही. कारण नवीन पाणबुडय़ा विकत घेण्याचा वेग अतिशय कमी असून , पाणबुडय़ा निवृत्त होण्याचा वेग अधिक आहे. नव्या पाणबुडय़ा दाखल होण्याचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढवावा लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे हे त्या मागचे एक कारण आहे. बाकी देशपातळीवर मोठे निर्णय घेणे थाबंले आहे. या घटना थेट देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी संबंधित होत्या. १७ ऑगस्टला दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाचा प्रमुख हस्तक आणि लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा म्होरक्या सय्यद अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली.करीम टुंडाच्या अटकेने दिल्ली पोलीस व इतर संस्थांना आनंदाच्या उकाळ्या फुटल्या आहेत. या टुंडाचा एक हात स्वत:च बॉम्ब बनविताना तुटला आहे. त्यामुळे त्याला ‘टुंडा’ असे उपनाम पडले आहे. याने गेल्या वीस वर्षांत मुंबई, दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या शहरात ४० बॉम्बस्फोट घडवून जी दहशत माजवली आहे. या ला पकडण्यासाठी पोलिसांना वीस वर्षे लागली यास काय म्हणावे? त्याचे वय ७० वर्षे आहे, या टुंडाचा मुलगा अब्दुल वारिस हादेखील दहशतवादी कारवायांत गुंतलेला आहे. लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी म्हणून अब्दुल सध्या जम्मू-कश्मीरमध्ये कार्यरत आहे. ही माहिती टुंडानेच दिली आहे. दहशतवादी हल्यातील आरोपीचा म्हातारपणाने म्रुत्यु उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या व आता सत्तरी ओलांडलेल्या बिनकामाच्या अब्दुल करीम टुंडा या निव्रुत्त दहशतवादीला पाकिस्तानने अत्यंत चलाखीने पुन्हा भारतात पाठविले आहे. पाकिस्तानने सतत २० वर्षे करीम टुंडाचा भारतविरोधात वापर करून घेतला आणि त्यास सौदी अरेबियात पाठवून त्याची भारतात रवानगी केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबईवरील हल्ल्यात सहभागी झालेल्या आबू जिंदालचीही तीच गत केली होती. अमेरिकेचा दबाव आल्यानंतर पाकिस्तान आपल्याकडील भारतिय अतिरेक्यांना युनायटेड अरब अमिरात म्हणजेच (यूएई) आखाती देशात पाठविते आणि त्यानंतर त्या अतिरेक्यांची रवानगी भारतात करते. अब्दुल टुंडा यास यूएई सरकारने नेपाळला पाठविले. तेथून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आता टुंडा बरेच काही सागंतो आहे. परंतु त्याच्या वर किती विश्‍वास ठेवावा याचा विचार करावा लागणार आहे.त्यावर आता पुढचे १५-२० वर्षे खटला चालेल.आपल्याला आठवत असेल की १९९३ दहशतवादी हल्यातील आरोपीचा म्हातारपणाने म्रुत्यु झाला. यावेळेस पण शिक्षेपेक्षा म्हातारपणाने म्रुत्यु अपेक्षित आहे. मुंबईमध्ये राहणारा डॉ. जलीस अन्सारी व अब्दुल टुंडा असे दोघे क्रूड बॉम्ब बनवू लागले आणि त्याचे बॉम्बस्फोट घडवू लागले. १९९४ सालच्या जानेवारी महिन्यात डॉ. जलीस अन्सारी पकडला गेला आणि मुंबईसह देशभरातील ५१ बॉम्बस्फोट मालिकांवर प्रकाश पडला. डॉ. जलीस अन्सारी पकडला गेल्यानंतर अब्दुल टुंडाने भारत सोडला. त्याने पाकिस्तानात जाऊन आश्रय घेतला आणि आयएसआयच्या इशार्‍याने तो भारतात पुन्हा घातपाती कारवाया करू लागला. आयएसआयने गेेली २० वर्षे त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आणि म्हातारा झाल्यावर त्याला पाकिस्तानातून हाकलले. असा एक अब्दुल टुंडा किंवा आबू जिंदाल हाती लागल्याने भारताचा काहीही फायदा होणार नाही. उलट त्याला पोसण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. पाकिस्तानात शेकडो अब्दुल टुंडा व दाऊदसारखे माफिया बसले आहेत. तेच आपला देश चालवीत आहेत आणि पोखरतही आहेत. निव्रुत्ती’चा काळ तुरुंगात? खतरनाक म्हणता येईल, अशा अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा या ‘लष्कर ए तय्यबा’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक करून भारतीय पोलिसांनी अतिरेकी कारवायांना आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे काहीच कारण नाही. गेली काही वर्षे हा टुण्डा संघटनेत सक्रिय नाही. या वयात येणाऱ्या आजारांशिवाय त्याला अन्य अनेक विकारांनी घेरले आहे. असा विकलांग टुण्डा हाती लागला, म्हणजे फार मोठे नाही. उत्तर प्रदेशातील पिलखुआ या गावी असलेल्या टुण्डाच्या घरातील सगळय़ा वस्तूंचा लिलाव स्थानिक पोलिसांनी २० वर्षांपूर्वीच केला होता. भारताला हव्या असलेल्या ५० अतिरेक्यांची जी यादी पाकिस्तानला सादर करण्यात आली होती, त्यातही टुण्डाचे नाव होते. दहशतवादी संघटनांसाठी निधी उभा करण्यासाठी त्याने दाऊद इब्राहीमशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे टुण्डाला अटक करून आपल्याला आणखी माहिती मिळू शकेल, असे वाटते आहे. परंतु गुन्हेगार निवृत्त झाल्यानंतर त्याला पकडणे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास करणे, हा काही शहाणपणाचा उद्योग नाही. भारतात घडलेल्या सुमारे ४० बॉम्बस्फोटांशी संबंधित असलेला हा टुण्डा गेली दोन दशके भारतीय पोलिसांना चकवा देत होता. वय वाढल्याने ,सतत पोलिसांचा ससेमिरा चुकवत आपले आजार सांभाळत जगणे हेही खरे म्हणजे जिकिरीचे असते. टुण्डाने निवृत्तीनंतरची सारी वर्षे सरकारी खर्चाने राहण्यासाठी ही अटक मान्य केली आहे. आजारांवर उत्तम उपचारही मिळतील आणि सरकारी खर्चाने जगणेही फारसे त्रासाचे होणार नाही. आता मानवतावादी संघटना त्याला त्याच्या व यामुळे व्हीआयपी वागणुक द्यायला भाग पाडतिल. गेल्या २० वर्षांत भारतीय राजकारण्यांनी निवडणुकीतल्या आश्वासनात दाऊदला मुसक्या बांधून आणण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दहशतवाद मोडून काढण्यासाठी वेगवेगळय़ा पातळीवरील माहिती सतत गोळा करत राहावे लागते, तिचे विश्लेषण करावे लागते आणि अर्थही शोधावा लागतो. टुण्डाच्या अटकेने यातले काहीच आजपर्यंत हवे तसे झाले नाही, हेच स्पष्ट झाले आहे टुंडाने दोन गोष्टी प्रामुख्याने सांगिले. पाकव्याप्त कश्मीरमध्ये बॉम्ब बनविण्याचे कारखाने आहेत व ते बॉम्ब भारतात फोडले जातात. तेथे दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात व ते सर्व जेहादी भारतात घुसवले जातात. टुंडाने ही माहिती दिली . ती जुनीचआहे. दहशतवादी संघटना पाक मदतीने अशा पद्धतीने देशाला बेचिराख करण्यासाठी कारखाने सुरु ठेवत आहेत. अशा जेहादींचा खात्मा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला पोकळ इशारे देण्यात काहीच अर्थ नाही.

Monday 19 August 2013

INS SINDHURAKSHAK

आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी - पाणबुडी निर्मिती क्षमता वाढवण्याची गरज रशियन बनावटीची आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला १६/०८/२०१३ ला जलसमाधी मिळाली.सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी तब्बल अडीच वर्षे रशियातील गोदीत पाठवण्यात आले होते. ४८० कोटी रुपये या आधुनिकीकरणावर खर्ची पडले,जे तिच्या मुळ किमतीपेक्षा दिडपट जास्त आहे. मुंबईच्या डॉकयार्डमध्ये उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीत मंगळवारी मध्यरात्री तीन भयंकर स्फोट होऊन आगीचे तांडव घडले. या भीषण दुर्घटनेत पाणबुडीला समुद्रात जलसमाधी मिळाली. पाणबुडीवर असलेले नौदलाचे तीन अधिकारी व १५ जवानांचा अद्यापि शोध लागला नसून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तीन जवान मात्र सुखरूप बचावले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नौदलाच्या इतिहासात ही भयंकर दुर्घटना घडली. त्यामुळे स्वातंत्र्यदिन काळवंडून गेला आहे. मुम्बइच्या साऊथ ब्रेक वॉटर या गोदीत सिंधुरक्षक व सिंधुघोष पाणबुड्या बाजूबाजूला असताना ' सिंधुरक्षक ' मध्ये मध्यरात्री मोठी आग लागली.पाणबुड्यांमध्ये तळाला बॅटर्‍या आणि वरच्या भागात क्षेपणास्रे असतात. चार्जिंगच्या दरम्यान बॅटर्‍यांतून हायड्रोजन गॅस जमा होतो. हायड्रोजनने आग लागली असावी आणि ती टपावरील दारूगोळ्यांपर्यंत पोहोचल्याने भीषण स्फोट झाला असावा. प्रेशर हलमध्ये आग झपाट्याने पसरू लागली. पाणतीरांचा भाग पाण्याने भरला व नंतर ती पाण्याखाली गेली. आग भडकण्याचे कारण या घडीला माहिती नाही. कोणत्याही नौकेवर इंधन , दारुगोळा , प्राणवायूची नळकांडी , बॅटरीचे भाग अशा अनेक ज्वलनशील गोष्टी असतात व त्यापैकी कोणत्याही भागात बिघाड झाल्यास आग लागू शकते. मात्र आग लागल्यास मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही पद्धतीच्या धोक्याच्या घंटा , निदर्शक असतात. ते का कार्यरत झाले नाहीत , याचा तपास करण्यात येईल. त्यासाठी काही फॉरेन्सिक पुरावे घेण्यात आले आहेत. सुरुवातीस छोटा स्फोट झाला व त्यानंतर मोठा स्फोट झाला. आगीमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ही समिती चार आठवड्यांत आपला अहवाल देईल.स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी ही भीषण दुर्घटना घडल्याने यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. पण प्राथमिक चौकशीत तरी हा अपघातच असल्याचे स्पष्ट होत आहे. सिंधुरक्षकमध्ये मध्यरात्री १२ वा. पहिला स्फोट होताच पाणबुडीच्या वरील भागावर असलेल्या तीन जवानांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्यानंतर काही क्षणातच दोन भीषण स्फोट झाले आणि आग लागली. त्यामुळे मिसाइल असलेल्या पुढील भागाला भोक पडले आणि पाणी आत घुसल्याने सिंधुरक्षक बुडाली. आयएनएस सिंधुरक्षक डिसेंबर १९९७ मध्ये नौदलात दाखल आयएनएस सिंधुरक्षक’ ही रशियन बनावटीची ‘किलो’ वर्गातील पाणबुडी रशियातील गोदीत तयार झाल्यानंतर डिसेंबर १९९७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. ‘किलो’ या गटातील १४ पाणबुडय़ा भारताच्या ताफ्यात आहेत. डिझेलवर चालणाऱ्या या पाणबुडय़ा लढाऊ जहाजे आणि पाणबुडय़ाविरोधी मोहिमेसाठी वापरल्या जातात. त्याचबरोबर पाण्यातून जमिनीवर २०० किलोमीटपर्यंत मारा करतील अशी क्षेपणास्त्रे डागण्याचीही या पाणबुडीची क्षमता होती. या पाणबुडीची लांबी ७३ मीटर होती तर वजन २३०० मेट्रिक टन होते. समुद्रात ३०० मीटर खोल जाण्याची आणि ताशी १८ नॉट्स (सुमारे ३५ किलोमीटर) इतक्या वेगाने प्रवास करण्याची तिची क्षमता होती. एकदा इंधन भरले की ५२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ४५ दिवस ही पाणबुडी समुद्रात फिरायची. एका दमात तब्बल ६४० किलोमीटरचा टप्पा पाण्याखालून गाठण्याची तिची क्षमता होती. यापूर्वी सिंधुरक्षक विशाखापट्टणम येथे असताना २०१० मध्ये तिच्यावर अपघात घडला होता. त्यावेळी बॅटरी विभागातील स्फोटामुळे एक कर्मचारी ठार तर दोघे जखमी झाले होते. यानंतर सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी तब्बल अडीच वर्षे रशियातील गोदीत पाठवण्यात आले. त्याअंतर्गत या पाणबुडीत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक शस्त्रास्त्र प्रक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली. दूरसंचार यंत्रणाही अधिक सक्षम करण्यात आली. सुमारे ४८० कोटी रुपये या आधुनिकीकरणावर खर्ची पडले. त्यानंतर यावर्षी जानेवारी २०१३ मध्ये सिंधुरक्षक पुन्हा एकदा भारतीय नौदलात परतली आणि ३० एप्रिलला मुंबईत दाखल झाली. आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पाणबुडीच्या वेगवेगळ्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या होत्या. जमीनीवरील आणि पाण्यातील लक्ष्यांचा अचूक भेद करण्याची या पाणबुडीची क्षमता या चाचण्यांमधून सिद्ध झाली होती, त्यामुळे पुढील दहा वर्षे ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत कार्यक्षमपणे काम करेल अशी अपेक्षा होती. बचावकार्यात अडथळे २०१० मध्ये या पाणबुडीत सदोष बॅटरीमुळे आग लागली होती. त्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक होते, मात्र आपत्कालीन व्यवस्थापन कुचकामी ठरले.या पाणबुडीमध्ये तीन अधिकारी आणि १५ जवान आहेत.रशियन बनावटीची ही पाणबुडी बॅटरीच्या दुरुस्तीसाठी रशियात पाठवली होती. ती दुरुस्त होऊन आली आणि चार महिन्यांतच ही दुर्घटना घडली. स्फोटानंतरच्या पहिल्या दोन तासांतच पाणबुडीने सागरतळ गाठला तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घटनास्थळीच सुरू होती.चिखलमिश्रित पाणी व काळोख यामुळे रात्री उशिरापर्यंत बचावकार्यात अडथळे येत होते. ही दुर्घटना घडली त्यावेळेस पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी त्यांचे काम संपवून निघून गेले होते. अडकलेल्यांमध्ये तीन अधिकारी असून त्यातील दोन विवाहित आहेत. इतर सहा नौसैनिकही विवाहित असून त्यापैकी अनेकांना दीड- अडीच- तीन वर्षांची लहान मुले आहेत. त्याकील तिघांच्या पत्नी मुंबईत असून बाहेरगावी असलेल्या इतर नौसैनिकांच्या कुटुंबियांना तातडीने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा अशा दुर्घटनेमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या मनस्थितीवर वाईट परिणाम होतो ते टाळण्यासाठी त्यांच्या मदतीला मानसोपचार तज्ज्ञांचे पथकही देण्यात आले आहे. त्या कुटुंबियांच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी नेवल वाइव्हज असोसिएशन (नावा) या अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने घेतली आहे. पाणबुडीच्या चांगल्या स्थितीबाबत शंका घेण्यासारखे काहीच कारण नाही. रशियामध्ये तिचे आताच पूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले व एप्रिलमध्ये ती नौदलात पुन्हा रुजू झाली. गेल्याच महिन्यात तिला पाणबुडी विभागाच्या कमोडोरनी फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. तिने एक हजारांहून अधिक तासांची पाण्याखालची सफर पूर्ण केली होती. तिच्या सामग्रीची स्थितीही मजबूत होती. बॅटरी चार्जिंगसाठी पाणबुड्या बंदरात येतात व त्यानुसार तीन दिवसांपूर्वीच तिच्या बॅटरीचे चार्जिंग झाले होते. त्यामुळे बॅटरी चार्जिंगमुळे स्फोट झाल्याची शक्यता वाटत नाही नौदलाचा अपघातांचा इतिहास भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या पाणबुडीला अपघाती जलसमाधी मिळाल्यानंतर याआधी नौदलातील अपघाती घटनांकडे एक दृष्टिक्षेप टाकला असता ‘आयएनएस सिंधुरक्षक’ याच पाणबुडीचे नाव समोर येते. मंगळवारच्या मध्यरात्री स्फोटांमुळे बुडालेल्या या पाणबुडीवर तीन वर्षांपूर्वीही आग लागल्याची घटना घडली होती.२०१०मध्ये ‘आयएनएस सिंधुरक्षक’ विशाखापट्टणम येथे होती. तेथे ‘आयएनएस सिंधुरक्षक’च्या बॅटरी कक्षात छोटासा स्फोट झाल्याने पाणबुडीवर आग लागली होती. या दुर्घटनेत एक खलाशी ठार झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. ऑगस्ट १९९०मध्ये घडलेला अशीच एक दुर्घटना घडली होती. बंगालच्या उपसागरात आयएनएस अंदमान या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. गळती लागल्याने बुडालेल्या या जहाजातील १५ खलाशांनाही जलसमाधी मिळाली होती.नोव्हेंबर १९९९मध्ये आयएनएस ज्योती हा नौदलाचा टँकर एका व्यापारी जहाजाला धडकला होता. २००४मध्ये झालेल्या या अपघातामुळे आयएनएस आग्रे हे जहाज काही काळ सेवेत नव्हते. डिसेंबर २००५मध्ये मुंबईजवळ आयएनएस त्रिशूल हे जहाज अंबुजा लक्ष्मी या व्यापारी जहाजाला धडकले होते. २००६ मध्येच नौदलाच्या विशाखापट्टणम येथील तळावर असलेल्या आयएनएस मगर या जहाजावर त्याच वर्षी लागलेल्या आगीत पाच खलाशी ठार झाले होते. २००८मध्ये नौदलाच्या कसरतींमध्ये भाग घेतलेली ‘आयएनएस सिंधुघोष’ मुंबईजवळ एका व्यापारी जहाजाला धडकली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी किंवा ठार झाले नाही. मुंबईच्या बंदरातच २०११मध्ये आयएनएस विंध्यगिरी या लढाऊ नौकेची टक्कर एका व्यापारी जहाजाशी झाली होती. या अपघातात आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती.पण भारतीय नौदलाचे अपघाताचे प्रमाण प्रगत देशाप्रमाणेच आहे.पण अश्या अपघातामुळे देशाचे नुकसान तर होतेच पण अश्या जहाज्या जागी नवीन जहाजे आणण्याकरता अनेक वर्षे लागतात.यामुळे आपले सुरषाकवच कमजोर होते. दुर्लक्षित पाणबुडी धोरणाचा नौदलाला फटका गेल्या अनेक वर्षांमध्ये पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज सातत्याने व्यक्त झाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्षच झाल्याने त्याचा मोठाच फटका भारतीय नौदलाला आता सहन करावा लागतो आहे. २० पाणबुड्यांची गरज असताना केवळ १४ पाबणुडय़ा भारतीय नौदलाकडे आहेत. आयएनएस सिंधुरक्षकच्या जलसमाधीने त्यातील एक पाणबुडी आता कमी झाली आहे. दरम्यान पाणबुडीवरून जल, वायू आणि हवेत मारा करणारे ब्राह्मोस हे ब्रह्मास्र भारताने विकसित केलेले असले तरी ब्रह्मास्र आहे पण भाताच नाही, अशी अवस्था पाणबुडय़ांच्या बाबतीत भारतीय नौदलाची झाली आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या देशाच्या तिन्ही बाजूंचे खात्रीशीर रक्षण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत भारतीय नौदलाकडे कमीत कमी २० पाणबुडय़ा असणे सामरिकदृष्टय़ा आवश्यक आहे. आश्वासक परिस्थितीसाठी ३० पाणबुडय़ा आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात बुधवारी जलसमाधी मिळालेल्या आयएनएस सिंधुरक्षकसह तो केवळ १४ होता. दुसरीकडे शेजारील राष्ट्र असलेले पाकिस्तान आणि चीन या दोघांनीही पाणबुडी निर्मितीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान आणि भारताने नव्या पाणबुडय़ांच्या निर्मितीसाठी जवळपास एकाच सुमारास म्हणजे १५ वर्षांपूर्वी प्रयत्नांना सुरुवात केली. त्यानंतर अकुला वर्गातील दोन पाणबुडय़ा पाकिस्तानने तयारही केल्या. पण भारताने करार केल्याला अनेक वर्षे उलटल्यानंतरही स्कॉर्पिअन पाणबुडय़ा नौदलात केव्हा दाखल होणार त्या बाबत भारतीय नौदलात कुणीच ठोस काहीही सांगू शकत नाही. त्या करारावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तर तो विषय अधिकच मागे पडत गेला. दरम्यान, चीननेही स्वतंत्रपणे पाणबुडी निर्मितीचा ध्यास घेतला असून त्या दिशेने यशस्वी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ते तंत्रज्ञान पाकिस्तानला हस्तांतरण करण्याचा करारही मध्यंतरी दोन राष्ट्रांमध्ये झाला. पण भारत आहे तिथेच आहे. एक महत्त्वाची बाब विकसित करण्यात मात्र भारताने अलीकडेच यश मिळवले ते म्हणजे पाणबुडीवरून जल, वायू आणि हवेत मारा करणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची निर्मिती. हा मोठा प्रगतीचा टप्पा आहे. पण ब्राह्मोस डागण्यासाठी आवश्यक ती पाणबुडय़ांची संख्या आपल्याकडे नाही. त्यामुळेच भारतीय नौदलाची अवस्था ब्रह्मास्त्र आहे पण भाताच नाही, अशी झाली आहे. आयएनएस सिंधुरक्षकच्या दुर्घटनेनंतर ही परिस्थिती अधिकच अधोरेखित झाली आहे. ‘

KISHTWAR VIOLENCE SEPARATIST TARGET MINORITIES

किश्तवाडमध्ये झालेली दंगल फ़ुटिरवाद्यांचे कारस्थन काश्मीर खोर्‍यात ‘१९९0’ची पुनरावृत्ती ? जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी घोषणा नेहमीच दिल्या जातात असे बिनदिक्कत सांगणार्या ओमर अब्दुल्ला यांच्या निषेध करावा तेवढा कमीच आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेल्या शुक्रवारपासून उसळलेली दंगल आजतागायत शमलेली नाही. ही दंगल आता राज्याच्या आठ जिल्ह्यांत पसरली असून संचारबंदी, मोबाइल बंदी आणि लष्कर दाखल करण्यात आल्यानंतरही दंगल सुरूच राहते हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. किश्तवाड हिंसाचारावरून जम्मू-काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद किचलू यांनी राजीनामा दिला .किचलूंवर दंगल भडकावल्याचा आरोप होता.आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.हिंसाचारात तीनजण ठार, ६८ दुकाने, सात हॉटेल आणि ३५ वाहने जाळली गेली.कश्मीरी पंडीताना खोर्‍यातून हद्दपार करण्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे. पद्धतशीर योजना आखून हजारो कश्मिरी पंडितांना यापूर्वीच राज्याबाहेर पळवून लावले गेले. शेकडो पंडितांची हत्या केली गेली. ‘तुमच्या मुलीबाळी आणि मालमत्ता इथेच सोडून चालते व्हा’, असे फर्मान सोडणारी पोस्टर्स कश्मिरी पंडितांच्या घरांवर चिटकवली गेली. अब्रूच्या भयाने कश्मिरी पंडित आपले सर्वस्व सोडून आज निर्वासितांच्या छावण्यांमध्ये विपन्नावस्थेत लाचारीचे जिणे जगत आहेत. सुमारे दोन लाख पंडितांपैकी केवळ आठशे कश्मिरी पंडितांची कुटुंबे तेथे उरली आहेत. कश्मिरी पंडितांना राज्यातून बेदखल केल्यानंतर आता जम्मू व आसपासच्या जिल्ह्यांतील हिंदूंना ‘टार्गेट’ करण्याचा कट कश्मिरी फ़ुटीरवाद्यानी आखलेला दिसतो. गृहमंत्र्यांचे उत्तर राज्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. १९९0ची पुनरावृत्ती होऊ न देण्याची ग्वाही देशाचे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी संसदेत दिली.आम्ही जबरदस्तीचे पलायन आणि पुनर्वसन घडू देणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले. १९९0मध्ये खोर्‍यातील काश्मिरी पंडितांना तेथून स्थलांतरण करण्यास भाग पाडले होते.पी. चिदंबरम यांनी राष्ट्रविरोधी घोषणांमुळेच दंगल भडकल्याचे मान्य केले. जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाड शहरात हैदोस घालत हिंसाचार घडवणाऱ्या पाकिस्तानवादी-राष्ट्रद्रोहीना केंद्र सरकारने खंबीरपणे पकडायला हवे होते. किश्तवाड शहरात पाकिस्तान झिंदाबादच्या आणि भारताच्या विरोधी घोषणा देत, अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरादारावर जमावाने चढवलेले हल्ले हे पूर्वनियोजित होते, अशी कबुली खुद्द मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीच दिली आहे, या कारस्थानामागे फ़ुटीरवाद्यांचा /पाकिस्तानचाच हात असावा, या संशयाला बळकटी येते. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने, जमावाला अधिकच चेव चढला आणि जम्मू भागातल्या अन्य जिल्ह्यातही दंगलींचा वणवा पेटला. सुरू झालेली दंगल पोलिसांच्याकडून आटोक्यात यायची शक्यता नसल्याची खात्री होताच, राज्य सरकारने तातडीने लष्कराला बोलवायला हवे होते. पण तब्बल आठ तासांनी किश्तवाडसह दंगलग्रस्त भागात लष्करी तुकड्या दाखल झाल्या आणि जवानांनी कडेकोट बंदोबस्त सुरू केल्यावरच दंगली आटोक्यात आल्या . किश्तवाड दंगल पाकिस्तान जिंदाबाद’, ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा देत जम्मू पुन्हा एकदा पेटले . किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जमावाने अख्खे किश्तवाड शहर पेटवले. हिंदू व्यापार्‍यांची दुकाने पेटवण्यात आली. शेकडो घरे आणि हॉटेल्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जमावाला भारतविरोधी घोषणा देत दंगल घडवायची चिथावणी देणारे काश्मीरच्या खोऱ्यात आहेत. जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडी आणि हुर्रियत परिषदेचे नेते काश्मीर खोऱ्यात वारंवार बंद घडवून, सामान्य जनतेला आपल्या दावणीला बांधायला सोकावले आहेत.त्यांचे हे सारे चाळे सरकार खपवून घेते आणि पिपल्स पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती याही दंगलखोरांचीच बाजू घेतात . सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करीत नाही. जम्मू-काश्मीरच्याच पूंछ भागात सध्या पाकिस्तानी सैनिकांचा हैदोस सुरू आहे. शस्त्रसंधी आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत पाक सैन्याने आपल्या जवानांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. हे लक्षात घेता ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत अधिक सावध असायला हवे होते. किश्तवाडची दंगल खरेतर तेथेच निपटून काढायला हवी होती. किश्तवाडमध्ये दंगल उसळली त्या दिवशी किचलू त्याच शहरात होते. तरीही ही दंगल उसळली . या राज्यामध्ये सुरक्षा जवानांच्या विरोधातली निदर्शने, निदर्शकांवर होणारा लाठीमार, गोळीबार आदी प्रकार सुरूच असतात. या वेळी दंगलखोरांनी पोलिसांची शत्रे चोरलेली आहेत. जम्मू भागात लोकांना अतिरेक्यांपासून स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी ग्राम सुरक्षा समिती स्थापलेल्या आहेत आणि या समितीच्या सदस्यांना बंदुका देण्यात आलेल्या आहेत. या बंदुका जुन्या बनावटीच्या म्हणजे पॉइंट ३०३च्या आहेत. परंतु किश्तवाडच्या दंगलीमध्ये जमावाने परस्परांवर गोळीबार केलेला आहे आणि त्यासाठी १२ बोअरच्या बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. याचा अर्थ ग्राम सुरक्षा समितीच्या आणि या चोरलेल्या बंदुकांचा वापर दंगल करणा-या जमावांनी केलेला आहे. दंगल ही पूर्वनियोजित रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला म्हणाले, ''दंगलीच्या आदल्या दिवशी शस्त्रास्त्रांची एक दुकान लुटण्यात आले होते. त्यामुळे शक्यता आहे, की ही दंगल पूर्वनियोजित होते. नियंत्रण रेषेवर घुसखोरी आणि गोळीबार करणार्‍या पाकिस्तानने आज जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथील दंगलीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. किश्तवाड दंगलीतील हिंसा आणि हुर्रियत नेत्यांना झालेल्या अटकेबद्दल पाकिस्तानला चिंता वाटते आहे.किश्तवाडमधील दंगलीनंतर जातीय तणावाच्या अफवा पसरून जम्मू-कश्मीरातील वातावरण अधिक बिघडू नये यासाठी राज्य सरकारने इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.मात्र उमर अब्दुल्ला ट्विटर सोशल मिडीया मधुन आपल्याला सोयिसकर अफ़वा मात्र पसरवत होते. काय करावे किश्तवाडमधील हिंदूंची घरेदारे पेटवून घडवलेल्या भीषण दंगलीचे लोण संपूर्ण जम्मू-ऊधमपुरमध्ये पसरले .दंगलीचा हा भडका संपूर्ण राज्यात पसरू लागल्यामुळे जम्मू, राजौरीसह एकंदर आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दंगलीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई फ़ुटिर वाद्यांकडुन घेतली पाहीजे. किश्तवारचा हिंसाचार हा केवळ एका भागातील हिंसाचार म्हणून पाहिला तर फार चिंतेचा विषय नाही. पण, पाच दिवसांत १६वेळा पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे उल्लंघन होणे, चीनने सातत्याने कुरापती काढणे, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भारतावर हल्ल्याच्या योजना लाहोरच्या मैदानात जाहीरपणे सांगितल्या जाणे, हे विषय एकत्रितपणे अभ्यासले, तर किश्तवार दंगल फार मोठ्या चिंतेचा हा विषय आहे. ही घटनांची मालिका स्थानिक पातळीवर ठरविली गेलेली नाही, याचाही यातून खुलासा व्हावा. किश्तवार हे संपूर्ण भारतावरचे संकट आहे. आपल्या सभोवताली होणार्‍या घडामोडींपासून सुद्धा आता सावध असले पाहिजे. दंगल पीडितांना आवश्यक मदत मिळायला हवी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे काम करून त्वरित काबूत आणावी अन्यथा तेथील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे. पाकिस्तानशी एकवेळ लढताही येईल. पण, आपल्या लोकशाही प्रणालीत शिरलेल्या पाक हस्तकांशी लढेणे सोपे नाही.काश्मीरची प्रगती होणे अथवा हा भूभाग शांत असणे पाकिस्तानला परवडणारे नाही ; म्हणूनच निमित्त मिळताच पाकिस्तानी घुसखोर खोऱ्यातील शांतीच्या दहशतवादाची आग लावून देतात. जम्मूतील हिंसाचार हाही त्याच कटाचा एक भाग आहे . .

Sunday 11 August 2013

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: NAIK KUNDLIK MANE PUNCH

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: NAIK KUNDLIK MANE PUNCH: हे व्यर्थ न हो बलिदान काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत; पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फाय...

NAIK KUNDLIK MANE PUNCH

हे व्यर्थ न हो बलिदान काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत; पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फायदा करून घेण्याचे राजकीय नेत्यांना जमले नाही; उलट विघातक राजकारणाने परिस्थिती चिघळत आहे. संकुचित सत्ताकारण देशकारणावर कुरघोडी करत आहे.दरवर्षी भारतीय लष्करातील दहा ते पंधरा अधिकारी आणि २50 ते ३00 जवानांना काश्‍मीरसाठी वीरमरण येते. जबर जखमींची संख्या याच्या चौपट आहे.सध्या जम्मू आणि काश्‍मीरमधून २५0 ते ३00 दहशतवादी कारवाया करीत आहेत. याशिवाय १000 ते १500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पूछ विभागातल्या सरला चौकीजवळ जवळ गस्त घालणाऱ्या सहा जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला केल्या मुळे आपले पाच जवान शहीद झाले.या मध्ये ४ जवान २१ बिहार बटालियनचे होते आणि नायक कुंडलिक माने हे १४ मराठा लाईट इन्फंट्रीचे होते.या हल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.याच भागात मी माझी बटालियन ७ मराठा लाईट इन्फंट्री बरोबर पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी थाम्बावयाचे काम १९९५-१९९८ सालामध्ये केले होते. बटालियनला केलेल्या कामगिरी बद्दल १७ शुरता पुरस्कार मिळाले.हे करताना आमचे तिन जवान शहिद झाले. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, आहेत काय? या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या,अशाच प्रतिक्रिया संतप्त भारतीयांच्या पण होत्या. लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे नमूद केले . पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचा ,भारतीय जनतेचा आणि लष्कराचा अवमान संरक्षण मंत्री अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला. अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून,अवसानघातकी कृत्य केले. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. काय अर्थ आहे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाचा? सीमांचे संरक्षण करत असताना भारतीय सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कुंडलिक तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यांत अटीतटीची आणि तीव्र होती. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दुःख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. काय हे अर्थ आहे. तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा ? एका लहानशा खेड्यातला तुझा जन्म. तू लष्करात भरती झालास. का निवड केलीस तू लष्कराची ? नोकरी मिळवण्यासाठी, तेवढेच एक उत्तर नक्कीच नाही. कुटुंबातील पार्श्‍वभूमी, देशप्रेम या अनेक कारणांमुळे तू लष्करात दाखल होण्यास प्रेरित झालास? आज मात्र तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या साऱ्या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायामची थंडावलीय. एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. तुझ्यासारख्याच अनेक वीरपुत्रांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडया गेटवर जळते आहे, पण त्याच इंडिया गेटवर तुझे नाव मात्र आम्ही कोरणार नाही. कारण त्यावर ब्रिटिशांसाठी लढलेल्या तत्कालिन जवानांची नावे आहेत. यापेक्षा विरोधाभास ते कोणता. पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. काश्‍मीर खोऱ्यातून तुला निरोप देताना सर्वात ज्येष्ठ अधिका्र्यानी तुला अन्य अधिकाऱ्यांसह मानवंदना दिली. तुझ्या युनिटचे प्रतिनिधीनी तुला घरी पोहचवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलीस त्या छतात लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला गेला.तुझ्या अन्तदर्शनाला ऊसळलेला जनसागर या आधी कधिच बघितला नव्हता. तुझ्या वडील,आई, पत्नी मुलाच्या दुःखभरल्या डोळ्यातून अखंड वाहणारी आसवे आणि तुझ्या अकाली जाण्याने प्रचंड धक्का बसलेले आणि दिग्‌मूढ झालेले तुझे कुटुम्ब यांना पाहून पाषाणालाही पाझर फुटला. तुझ्या युनिटचे अधिकारी तुला शौर्यापदक मिळावे यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील. कालांतराने तुझी पत्नीला ते शौर्य पदक देऊ केले जाईल आणि अत्यंत गर्वाने तुझ्या घरांत ते मिरवले जाईल. तुझ्यासारखेच अनेक जवान कारगिलच्या भूमीवर धारातीर्थी पडले. परंतु आज त्या अत्यंत पराक्रमी जवानांचा साधा स्मृतिदिनदेखील साजरा करणे या देशवासीयांना जमत नाही. त्या अत्यंत वीरश्रीपूर्ण लढाईची आठवणही दरवर्षी योग्य त्या पद्धतीने केली जात नाही. "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव अमर राहील मात्र तुझे युनिट १४ मराठा लाईट इन्फंट्री आणि तुझ्या रेजिमेंटमध्यो तुझे नाव चिरकालासाठी कोरुन ठेवले जाईल. युनिटच्या क्वार्टर गार्डवर देखील तुझे नाव येऊन दरवर्षी तुला आदरांजली वाहिली जाईल. तुझे फॉर्मेशन हेडक्वार्टर आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये तुझे नाव अभिमानाने झळकत राहील. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री रेगिमेन्ट्ल सेन्टर प्रशिक्षण केंद्रावरील "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव राहील. सेवेत दाखल होण्याआधी प्रत्येक जवान तुला या भवना मध्ये येऊन वंदन करेल. काही वर्तमानपत्रांमध्ये तुझ्या सहकाऱ्यांकडून तुझ्या नावे शोकसंदेशही छापला जाईल. अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतील. मात्र लष्करी गणवेश ज्यांनी अनुभवला आहे. ते आणी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक मात्र हा संदेश अत्यांत तपशीलात वाचतील. त्यांना तुझ्याविषयीच्या अभिमानाने भरुन येईल. आयुष्याच्या संध्याकालाकडे झुकताना तुझ्या शौर्याच्या आणि धाडसाच्या आठवणी ही तुझ्या मातापित्यांकडची सर्वात मोठी ठेव असेल. तुझ्या सहवासातील क्षण त्यांच्याकरता सर्वात अनमोल असतील. तुझी प्रिय आई तुझा विचार जेव्हा जेव्हा करेल, तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतील. मात्र तिच्या त्या अश्रूभरल्या डोळ्यात तुझ्या विषयी तुझे वडील कदाचित धीर गंभीरपणे तुझ्याविषयी बोलत राहतील. मात्र त्या धीरोदात्त संवादातही त्यांची अभिमानाने फुलून आलेली छाती कुणाचाच नजरेतून सुटणार नाही. तुझे नातेवाईक, भावंडे, तुझा गाव आणि परिसर यांच्यासाठी तू कायामच एक रिअल हिरो बनून राहशील. तुझ्या नावाची शाळा उघडली जाईल. गावातल्या एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला "शहीद कुंडलिक माने मार्ग" असे नाव दिले जाईल. गावकऱ्यांच्या तोंडी तू एक दंतकथा बनून राहशील अजरामर होशील. तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या साऱ्यांचा विश्‍वास खरा ठरवलास, कुंडलिक आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करुन दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नक्कीच नाही. ईश्‍वर आणि सैन्य सर्वांच्याच आदराचा विषय !! मात्र केवळ संकटकाळीच, एकदा का संकट टळावे मग देवाकडे दुर्लक्ष आणि सैन्याचा तर विसरच. जम्मू-काश्‍मीरमधील काही माध्यमेही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या बातम्या देतात. अशा पत्रकारांविरोधातही कायदेशीर कारवाई करायला हवी. विविध भागांत फुटीरतावादी व दहशतवादी काश्‍मीरमधील जनतेशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विद्वेषाचे जाळे पसरवत आहेत. सध्या काश्‍मीरमध्ये खोट्या बातम्यांचे पेव फुटले आहे. देशविरोधी खोटे आरोप करून काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते, असे दाखवण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन विविध आघाड्यांवर समावेशक धोरण आखायला हवे. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना, सत्तेचा स्वार्थी जुगार, दहशतवाद्यांना अभय, फुटीरवादाला प्रोत्साहन, सत्तेची हाव, घराणेशाहीची घातक परंपरा आणि त्यातून आलेली हुजरेगिरीची वृत्ती, देशहितापेक्षा सत्तेला आणि स्वार्थाला महत्त्व देण्याची परंपरा अशा दुर्गुणांमुळे देशाची अधोगती होते आहे

Saturday 10 August 2013

SEPARATIST TARGET HINDUS IN KASHMIR

Black Friday in Kishtwar Jammu, August 10: Friday’s riots in Kishtwar were part of the new strategy known as “agitational terrorism” being adopted by the Hurriyat Conference and other anti-national forces to accomplish their unfinished nefarious agenda of “ethnic cleansing” of minorities from Muslim dominated areas of Jammu and Kashmir. Friday’s riots- in which one Dalit youth was killed by the rioters and more than 200 shops and business establishments belong to the minority Hindu community were especially targeted looted and torched, were well planned and stage managed under the patronage of Minister of State for Home, Sajjad Ahmed Kitchloo whose supporters executed the plan at ground level. Even as the State Government was trying to project that Friday violence at Kishtwar was clashes between two communities but those who were reporting from ground zero giving different pictures as it was not clash but an attack on the minority community to force their migration. The members of the majority community also entered the houses of minority community and torched shops selectively. The looting and arson continued right from Kuleed Chowk to Bus Stand, covering Main Market towards Shaheedi Chowk, Aman Market, Baniya Market and Purana Bazar. Surprisingly, no top police officers and the officials from the administration could be seen anywhere despite the presence of Minister of State for Home and MLA Kishtwar Sajjad Ahmed Kichloo in the town during the clashes. Even when the police personnel fired in air to disperse the mob, given their inadequate strength they failed to control the situation.”, a local news paper “The Kashmir Times”, which is known for its pro-separatist stand, reported while quoting eye-witnesses. According to eye-witnesses trouble started when a group of youth, who were heading towards Eidgah Maidan, were resorted to shouting anti-India and pro-Pakistan slogans near Char Chinar Chowk. Within no time these youth, who were also carrying Pakistani flags with them, resorted to attacking members of minority community. “As everything was already planned, a number of groups spread in the Kishtwar town and resorted to attacking Hindu, their business establishments and houses”, eye witnesses said and added that some the youth were carrying fire arms with them and they started firing on members of the minority community. Stunned by the attack on majority community, members of Hindu minority community rushed towards safer places because forces deployed in the town were watching entire scene as mute spectators. Fear psychosis prevailed among the minorities, which could be well gauged from the fact that the injured civilians of the community were not admitted in the District Hospital, which was located in the area dominated by majority community and were instead taken to Army camps. Four of them were sent to Military Hospital, Udhampur in critical condition. Army staged a flag march in all disturbed areas including Kishtwar town at 7.40 pm resulting into restoration of normalcy but tension prevailed among the minorities, who were frightened following large scale violence unleashed against them by the majority community in the morning leading to massive damage to their property including shops and vehicles. Surprisingly, the free for all situation in Kishtwar continued even when Minister of State for Home Sajjad Ahmad Kitchloo, who happened to be local MLA of Kishtwar, was present in the town. Locals said the miscreants armed with guns, lathis and patrol bottles moved freely in the town and outskirts torching shops, vehicles and looting property without any check by the police, which acted as mute spectators as they reportedly had been directed not to fire at the mob, sources said. Though the Army had moved in at around 12 noon in the day, they eventually took charge of the situation around 7.40 after Chief Minister Omar Abdullah spoke to Defence Minister A K Antony at about 5 pm. The urchins fired at the houses of minorities or those rushing for safety killing one of them on spot, who has been identified as Arvind Kumar Bhagat, 28, son of Des Raj Bhagat R/o Sangram Bhatta and injuring several others, four of them with deep bullet wounds. The injured with gun shots were identified as Sunil Kumar, 27, Rinku, 18, both residents of Cheerji, Anju Singh, 30 R/o Kuleed and Sandeep Kumar, 15, R/o Dachan. They were airlifted from Kishtwar to Batote and then shifted in Army Hospital, Udhampur as authorities feared that their admission in the Government Medical College, Jammu would flare up communal trouble. Background of the attack Actually for the last couple of months, some Over Ground Workers (OGWs) of terrorists have launched a campaign to terrorize minority to force their migration. Even at the time when terrorism was on its peak, terrorists failed to force migration of minorities due to valiant role played by the Village Defence Committees (VDCs) so these OGWs started vicious campaign to get VDCs disband so to accomplish their evil designs. During the last one month, houses of minority community were especially targeted during nights by unidentified masked men in the entire erstwhile Doda district. Implication of daring police officer Shiv Kumar Sharma alias Sonu in fabricated cases was also part of the conspiracy to terrorize minority because Sonu is symbol of anti-terrorist forces in erstwhile Doda district. During the holy month of Ramzan, some members of the Muslim community intensified the campaign to terrorize Hindus. Posters of Parliament attacker Afzal Guru and other terrorists were repeatedly appearing at vital locations but authorities deliberately ignored all such things due to directions from higher level. Even two days before Eid, a delegation of BJP leader from Kishtwar and Doda called on Inspector General of Police (IGP) Jammu zone Rajesh Kumar and briefed him of situation arising out due to activities of some pro-terrorist elements but IGP failed to take any prevent step. Role of MoS Home Sajjad Ahmed Kitchloo As elections of the Jammu and Kashmir Legislative Assembly are scheduled to be held in the year 2014, Minister of State for Home Sajjad Ahmed Kitchloo wants to communalize the situation, rather terrorize the minority, to reap political benefit because he, through his muscle power, has ability to execute rigging in minority dominated areas, as the same was done in the 2008 assembly elections. For the last three days, Mr Kitchloo was camping at Kishtwar and riots took place in his presence. “Surprisingly, despite large scale violence in Kishtwar for almost the full day leading to two fatal casualties, injuries to several others and huge loss of private property, the State Government, Police Department or even the district administration of Kishtwar didn’t issue even a single line press note on the situation despite the fact that senior officers of civil and police administration apart from the Minister of State for Home were camping there”, a reputed news paper of Jammu and Kashmir “Daily Excelsior” reported. Sources said that Kitchloo had given strict directions to the forces not to use force against rioters. “The complete inaction on part of police administration forced minorities living in majority community dominated areas to flee from their houses and take shelter in some safer areas as rampaging mob moved freely carrying weapons and lathis in their hands and targeting shops and business establishments.”, the news paper reported

Thursday 8 August 2013

FRIENDS OF PAKISTAN

पाकिस्तानचे दलाल? -vasudeo kulkarni पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, दलाल आहेत काय? असा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत केलेला रोखठोक सवाल म्हणजे संतप्त भारतीयांचीच प्रतिक्रिया होय! दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या भागातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून वीस पाकिस्तानी जवानांनी, गस्त घालणाऱ्या सहा भारतीय जवानांवर अचानक केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या, त्या पाकिस्तानी लष्कर वारंवार चिथावणीखोर कारवाया करीत असल्यानेच. पाकिस्तानने केलेला हा हल्ला अत्यंत भ्याड आणि आंतरराष्ट्रीय नियमांनाही चूड लावणारा असल्याची प्रतिक्रिया लष्कराकडून व्यक्त झाली होती. पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे लष्कराने नमूद केले होते. पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचाच नव्हे, तर भारतीय जनतेचा आणि लष्कराचाही अवमान संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला, ही दुर्दैवी बाब होय! पूृँछ विभागातल्या सरल चौकीजवळच्या चकादाबाद जवळ गस्त घालणाऱ्या पाच जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला चढवल्याचे लष्कराचे म्हणणे होते. पण अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून, त्या जवानांच्या हौतात्म्यालाच डांबर फासायचे अवसानघातकी आणि निंद्य कृत्य केल्यानेच विरोधकांनी सरकारच्या या नेभळट-पाकिस्तान धार्जिण्या, बोटचेप्या धोरणाचा दाहक शब्दात निषेध केला, ते योग्यच झाले. अँटोनी हे भारताचे की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत? चौकशी न करताच, त्यांनी हे आगलावे वक्तव्य कसे केले, लष्करावर ते दडपण आणत आहेत, अशा आरोपांची सरबत्ती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी अँटोनी यांच्यावर केली, ती मुळीच वावगी नाही. दिल्लीत बसून, तो हल्ला पाकिस्तानी लष्कराने नव्हे, तर दहशतवाद्यांनी केल्याचे अँटोनी यांना कसे समजले? असा जळजळीत सवालही सिन्हा यांनी विचारला आहे. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या पडखाऊ आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. अँटोनी यांनी केलेल्या वक्तव्यानंतरच लष्कराने या हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले. ते अँटोनी यांना जाणून बुजून मागे घ्यायला लावले असावे, या संशयाला त्यांच्या भंपक वक्तव्याने बळकटी येते. संरक्षण मंत्रीच देशाच्या आणि आपल्या लष्कराच्या हिताला चूड लावून, शत्रुराष्ट्राची तळी उचलत असेल तर, या असल्या नादान-नालायक संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला कसले संरक्षण मिळणार? देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहणार? आपले प्राण तळहातावर घेऊन सीमेवर चोवीस तास गस्त घालणाऱ्या जवानांच्या मनोधैर्यावरच आघात करणारे अँटोनी यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय हिताची होळी करणारेच असल्याने, त्याचा निषेधच करायला हवा. त्यांनी पाकिस्तानला निष्कलंक ठरवून पाच शहिदांच्या बलिदानाचाही घोर अपमान केला आहे. या आगलाव्या वक्तव्याबद्दल त्यांनी संसदेची आणि देशाची-लष्कराचीही माफी मागायला तर हवीच, पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या असल्या पळपुट्या संरक्षण मंत्र्याला घरी पाठवायला हवे. अन्यथा आगामी काळात उत्तर सीमेवर चीनकडून आणि पूर्व सीमेकडून पाकिस्तानकडून घुसखोरीच्या, हल्ल्यांच्या घटनात नक्कीच वाढ होईल, याचाही गंभीर विचार डॉ. सिंग यांनी करायला हवा. लष्कराचाही विश्वासघात गेल्या तीन वर्षात पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 पेक्षा अधिक हल्ले चढवून शस्त्रसंधी मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही अनेक जवानांना पाकिस्तानच्या लष्कराने अचानक केलेल्या गोळीबारात शहीद व्हावे लागले. अशा घटना घडल्यावर अँटोनी हे नेहमीच पाकिस्तानचा निषेध करतात. कधी या निषेधाचे शब्द तीव्र असतात, हे असले हल्ले मोडून काढायला भारतीय लष्कर समर्थ असल्याच्या वल्गना करतात. प्रत्यक्षात मात्र त्यांचे वर्तन हे पडखाऊ आणि लष्कराचाही विश्वासघात करणारेच आहे. लडाखच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनी सैनिकांच्याकडून वारंवार घुसखोरी होत असतानाही, ती थोपवायसाठी अँटोनी लष्कराला मोकळीक देत नाहीत. तीन वर्षांपूर्वी लडाखच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराकडे असताना ती केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्याकडे घेतली. चीनी लष्कराच्या घुसखोरीत वाढ झाली. दौलत बेग ओल्डी भागात चीनी लष्कराने भारतीय हद्दीत वीस किलोमीटर घुसखोरी करून तंबू ठोकले. त्या घटनेचा प्रचंड गाजावाजा झाल्यावर याच अँटोनी यांनी चुमूर भागातले भारतीय लष्कराने बांधलेले बंकर पाडून टाकायच्या अटीवर चीनने माघार घेतली. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भारतीय जवानांच्या गस्ती पथकाला चीनी लष्कराने अडवून मागे जायला भाग पाडल्याची घटना घडली. अँटोनी यांना भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या, देशाच्या हितापेक्षा शांतता महत्त्वाची वाटते. त्या अघोरी शांततेच्या बदल्यात त्यांनी जवानांच्या शौर्यावरही निखारे ठेवायचा अधमपणा केला आहे. प्रेमनाथ सिंह, शंभू सरन राय, विजय कुमार राय, रघुनंदन प्रसाद आणि पुंडलिक माने या पाच जवानांचे पूृँछ सीमेत पाकिस्तानी जवानांनी बळी घेतले. या शहीदांच्या हौतात्म्याचा अवमान करणाऱ्या अँटोनी यांना, विरोधकांच्या, जनतेच्या संतापाचीही पर्वा नाही. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाही अँटोनी मात्र शांततेची जपमाळ ओढत संसदेच्या साक्षीनेच पाकिस्तानची तळी उचलत आहेत, हे महाभयानक होय! लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी पूँछ भागाचा तातडीने दौरा करायची घोषणा केली. जवानांचे मनोधैर्य कायम राखायसाठी ते या भागातल्या जवानांना भेटतील, शहिदांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन करतील, पण हल्ला करणाऱ्या शत्रूवर शस्त्रच उगारायचे नाही, गप्प बसायचे, हे असले देशविघातक धोरण अँटोनी यांनी स्वीकारलेले असल्याने, सिंह आणि लष्कराचे हातही बांधले गेले आहेत. त्यांच्या शौर्याला सरकारच्या लेखी काही किंमत राहिलेली नाही. अँटोनी यांनी पाकिस्तानला या घटनेबद्दल निर्दोष ठरवताच, पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना या हल्ल्याचा तातडीने इन्कार करायची संधी मिळाली. अँटोनी यांच्या लष्करावरच बंधने आणायच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांध दहशतवाद्यांना घुसवायची पाकिस्तानची कट-कारस्थाने यशस्वी होतील, हे नक्की

Wednesday 7 August 2013

Tuesday 6 August 2013

Saturday 3 August 2013

MYANMAR MUSLIMS

<म्यानमारमधील मुस्लिम समाजावर विविध बंधनं-प्रा. अविनाश कोल्हे-नवशक्ती-०३/०८/२०१३ म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे.आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या हा एक ज्वलंत विषय असतो. हिंदुत्ववादी अभ्यासक मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा नेहमी उपस्थित करत असतात. भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे व लवकरच या देशात दुसरा पाकिस्तान निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात असते. या प्रचाराला मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती खतपाणी घालत असतात. `उनके पाच तो हमारे पच्चीस’ वगैरे घोषणा मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती सतत करत असतात. यामुळे हिंदुत्ववादी शक्तींच्या प्रचाराला धार चढते. अशा विषारी प्रचारामुळे आपल्या देशातील सामाजिक शांतता धोक्यात येत असते याचा कोणी विचार होत नाही. यामुळे इतर देशांत अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येची समस्या कशी हाताळतात हे जाणून घेणे उद्बोधक ठरू शकते. म्हणून आपला शेजारी देश म्यानमार हे कसे करतो हे समजून घेणे गरजेचे ठरते. म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे. मे 2013 मध्ये पश्चिम राखिन प्रांतातील सरकारी अधिकारी वर्गाने असा नियम काढला की यापुढे त्या भागातील मुस्लिम समाजाने प्रत्येक कुटूंबात दोनपेक्षा जास्त मुलं होऊ द्यायची नाहीत. याद्वारे तेथील अधिकारी वर्गाची अशी अपेक्षा आहे की ते मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येला पायबंद घालू शकतील. अशाच प्रकारचा नियम मुस्लिम समाजातील बहुपत्नी प्रथेला आळा घालण्यासाठीही करण्याचा सरकार विचार करत आहे. सध्या दर कुटुंबामागे फक्त दोनच मुलं हा नियम पश्चिम राखिन प्रातांतील काही गावांनाच लागू करण्यात येत आहेत. जी गावं बांगलादेशच्या सीमेच्या जवळ आहेत त्या गावांना हा नियम लागू होईल. उदाहरणार्थ, बुथिडांग व मौंडाव या गावांत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 95 टक्के आहे. जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. म्यानमार सरकारला असे नियम करावे लागत आहेत यामागे काही गंभीर कारणं आहेत. गेले काही महिने तेथे मुस्लिम व बुद्धिस्ट यांच्यात दंगली सुरू आहेत. काही ठिकाणी खास करून जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे तेथे तर दंग्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे दंगे का वाढले आहेत याची चौकशी करण्यासाठी म्यानमार सरकारने एक आयोग नेमला होता. या आयोगाने दिलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, ज्या भागात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे तेथे दंगे होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडेही ढोबळ मानाने हीच स्थिती आहे. भिवंडी, मालेगाव वगैरे महाराष्ट्रातील शहरांत मुसलमान समाज मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील या गावांत हमखास दंगली होत असतात. आता म्यानमारमध्ये हाच अनुभव येत आहे. परिणामी चौकशी आयोगाने शिफारस केली की जर मुस्लिम समाजाची लोकसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर प्रत्येक कुटुंबात फक्त दोन मुलं असा नियम केला पाहिजे. त्यानुसार आता तेथे सरकारने नियम केला आहे. आयोगाच्या असेही लक्षात आले की काही भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या दहा पट वाढलेली आहे. याला लगाम घालण्यासाठी दुसरा संभाव्य उपाय म्हणजे मुस्लिम समाजात असलेली बहुपत्नीची रूढी. याला आळा घालण्यासाठीसुद्धा नियम करावा अशी आयोगाची शिफारस होती. येथे आपल्याला मुस्लिम समाजातील दुटप्पी वागण्याची चर्चा करावी लागते. बहुपत्नीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा जास्त पत्नी करता येतात पण अपवादात्मक स्थितीत. हा प्रत्येक मुस्लिम पुरूषाचा अधिकार नाही. शिवाय ज्या स्थितीत ही चाल इस्लाममध्ये आली त्याचे संदर्भसुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. महंमद पैगंबर यांना इस्लामची स्थापना करतांना अनेक प्रसंगी लढाया कराव्या लागल्या. यात त्यांचे अनुयायी मारले जात. त्यांच्या विधवा बायकांना आधार मिळावा या हेतूने पैगंबरसाहेबांनी बहुपत्नी हा चाल सुरू केली. पण यासाठी अनेक कडक अटी घातल्या होत्या. जो पुरूष एकापेक्षा जास्त लग्न करेल त्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असली पाहिजे. त्याला एकापेक्षा जास्त बायका पोसता आल्या पाहिजेत. पुरूषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असलेल्या इस्लाममध्ये यथावकाश गैरप्रवृत्ती शिरल्या व प्रत्येक मुस्लिम पुरूष चार पत्नी करण्याचा आपला हक्क आहे, असे समजायला लागला. दुसरे म्हणजे अनेक मुस्लिम देशांनी या प्रथेला बंदी घातली आहे. जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक असतो तेथे हा समाज कोणत्याही प्रकारच्या धार्मिक सुधारणा मान्य करत नाही. जर एखाद्या देशाने असा प्रयत्न केला तर लगेच `इस्लाम खतरेमें है’ अशी हाक देतात व त्या सरकारवर दबाव आणतात. भारतात स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली पण अजूनही समान नागरी कायद्याच्या दिशेने एकही पाऊल पडलेले नाही. म्यानमारमध्ये लष्करशाही असल्यामुळे तेथे दोन मुलं किंवा बहुपत्नीची चाल बंद करणे असे नियम सहज होऊ शकतात. भारतात लोकशाही असल्यामुळे येथे असे निर्णय सहसा होत नाहीत. यालाच काही अभ्यासक लोकशाहीच्या मर्यादा मानतात. या संदर्भातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजाची मानसिकता. जगात दोन प्रकारचे मुस्लिम देश आहेत. एक म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या दणदणीत असते असे देश. या वर्गात सौदी अरेबिया, इराक, इराण वगैरे देश मोडतात. अशा देशांची अधिकृत ओळख म्हणजे ते इस्लामिक देश असतात. उदाहरणार्थ पाकिस्तानचे कायदेशीर नाव आहे `इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’. अशा देशांचा बराचसा कारभार कुराणप्रमाणे चालतो. दुसरा प्रकार म्हणजे जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहेत. श्रीलंका, भारत वगैरे देश या प्रकारात मोडतात. याखेरीज तिसरा प्रकार आहे ज्यात फक्त एकच देश आहे. हा प्रकार म्हणजे असा देश जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे पण इतर धार्मिक गटही लक्षणीय संख्येने आहेत. याचे एकमेव उदाहरण म्हणजे मलेशिया. तेथे मुस्लिम समाज सुमारे 55 टक्के आहेत तर चीनी समाज 30 टक्के आहे व इतर भारतीय आहेत. यामुळे सत्तेच्या जागी जरी मुस्लिम व्यक्ती दिसत असली तरी इतरांना सामावून घ्यावे लागते. असा प्रकार म्यानमारमध्ये नाही. तेथिल मुसलमान समाज अल्पसंख्याक आहे. पण जेथे या समाजाची लोकसंख्या एकवटली आहे तेथे दंगे व्हायला लागले आहेत. यावर उपाय म्हणून म्यानमारने आपल्या परीने उपाय सुरू केले आहेत. सध्या समोर आलेले उपाय याच प्रकारातील आहेत. याचा परिणाम काय होतो हे लवकरच कळेल

Friday 2 August 2013

BRIG HEMANT IN MEDIA

DURGASHKTI HONEST IAS OFFICER

प्रामाणिकपणाची शिक्षा vasudeo kulkarni Tuesday, July 30, वाळू माफियांना लगाम लावणाऱ्या लोकप्रिय आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना अखेर उत्तर प्रदेश सरकारने तडकाफडकी निलंबित करून, लोकहितदक्ष, प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. नागपाल यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. भ्रष्टाचार, लाचलुचपत असाही आरोप करायचे धाडस कुणीही केलेले नाही. जनतेची निष्ठेने सेवा करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला सरकारनेच अशी शिक्षा केल्यामुळे, गुंड, मवाली आणि माफिया टोळ्या आणखी मोकाट सुटतील, याचे भान अखिलेश यादव यांना नाही. अवघ्या दीडच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सेवेत आलेल्या नागपाल या 2009 मधल्या आयएएस तुकडीच्या अधिकारी आहेत. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच गौतमबुध्द नगर-ग्रेटर नोएडाच्या त्या विभागीय दंडाधिकारी झाल्या. राजधानी दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा शहर आणि परिसरात वाळू माफिया, बिल्डर लॉबीचे निर्माण झालेले बेकायदेशीर कारवायांचे जाळे त्यांनी धाडसीपणाने उद्‌ध्वस्त करायचा चंग बांधला. यमुना आणि हिंडन नदीच्या पात्रातून हजारो ट्रक वाळूचा बेकायदेशीर उपसा करून आपले उखळ पांढरे करायला सोकावलेल्या वाळू माफियांच्या टोळ्यांवर त्यांनी कडक कारवाई सुरू केली. वाळू माफियांच्या धमक्यांना भीक न घालता, न घाबरता त्यांनी धडाक्याने ही कारवाई व्यापक केली. यमुना नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करायला सोकावलेल्या वाळू माफियांच्या 300 ट्रॉलीस आणि यांत्रिक नौका त्यांनी जप्त केल्या. 18 वाळू माफियांवर गुन्हे नोंदवून 15 जणांना तुरुंगाची हवा खायला पाठवले. 22 जणांवर अटक वॉरंट बजावले. वाळूचे बेकायदा साठे जप्त करून, वाळू माफियांच्याकडून 84 लाख रुपयांचा दंडही वसूल केला. या जिल्ह्यातल्या आणि ग्रेटर नोएडातल्या वाळू माफियांवर त्यांनी आपल्या कडक कारवाईने दरारा निर्माण केला होता. या जिल्ह्यातला बेकायदेशीर वाळूचा उपसा बंद पाडायसाठी यापूर्वी अनेकदा झालेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण नागपाल यांनी मात्र बेकायदेशीर वाळूचा उपसा पूर्णपणे बंद तर पाडलाच, पण पुन्हा जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात वाळूचा बेकायदशीर उपसा होऊ नये यासाठी, सरकारी अधिक़ारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथकेही नेमली. परिणामी त्यांच्या विरोधात बेकायदा वाळूच्या विक्रीतून शेकडो कोटी रुपये कमावून श्रीमंत झालेल्या वाळू माफियांच्या टोळीने सरकारवर दबावही आणला होता. नागपाल यांनी ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि सरकारचाही दबाव जुमानला नाही. त्यांच्या या कारवाईनेच ग्रेटर नोएडातली बेकायदेशीर बांधकामेही रोखली गेली. सर्व सामान्यांना या जिल्ह्यातल्या प्रशासनाचा चांगला अनुभव यायला लागला. सामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक नागपाल यांच्यामुळे जलद गतीने व्हायला लागली. प्रशासनातल्या लाचखोरांवरही त्यांचा वचक निर्माण झाला. त्यांची लोकप्रियता आणि वाळू माफिया विरुध्दची मोहीम सरकारलाही डोकेदुखी झाली होती. त्यांचा काटा काढायसाठी टपलेल्या सरकारला चार दिवसांपूर्वी ती संधी मिळाली आणि सरकारच्या आदेशावरून उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजीव कुमार यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केल्याचा आदेशही काढल्यामुळे, ग्रेटर नोएडासह पश्चिम उत्तर प्रदेशात सामान्य जनतेत असंतोषाची उसळलेली लाट म्हणजे, माफियांच्या तालावर नाचणाऱ्या सरकारला चपराकच होय! सरकार कुणाचे? ग्रेटर नोएडातल्या सरकारी मालकीच्या जमिनीवर काही उचापतखोरांनी सुरू केलेल्या बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामांची भिंत पाडून टाकायचे आदेश नागपाल यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशामुळे, मुस्लिम धर्मियांच्या पवित्र "रमझान' महिन्यात समस्या निर्माण करणारा आदेश दिल्यामुळे, धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. तो रोखायसाठी सरकारला नागपाल यांच्या निलंबनाचा निर्णय घ्यावा लागला, असे मुख्यमंत्री यादव यांनी या एकतर्फी कारवाईचे केलेले समर्थन मुळीच पटणारे नाही. हा आदेश तूर्त स्थगित करावा, असा आदेश प्रशासनातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना देता आला असता किंवा नागपाल यांच्या आदेशाला स्थगितीही देता आली असती. पण तसे काहीही न करता, नागपाल यांच्याकडून कोणताही खुलासा न मागवताच, सरकारने त्यांना धडा शिकवायसाठीच ही कारवाई वाळू माफियांच्या टोळ्यांच्या दबावानेच केल्याची लोकभावना आहे. भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष या विरोधी पक्षानेही सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करीत, या आदेशामुळे उत्तर प्रदेशातल्या वाळू माफिया आणि गुंडांच्या टोळ्यांना बेकायदेशीर कारवाया करायसाठी अधिकच बळ मिळेल आणि त्यांच्यावर सरकारचा वचक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेनेही सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करून, याबाबत मुख्य सचिवांना लेखी पत्र द्यायचे ठरवले आहे. नागपाल या जिल्हा दंडाधिकारी आणि प्रशासनातल्या वरिष्ठांना विश्वासात घेत नव्हत्या, बेकायदेशीर वाळू उपशाच्या विरुध्द कारवाई करताना वरिष्ठांना आधी माहिती देत नव्हत्या. मशिदीची भिंत पाडायची नोटीस देतानाही त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती, हे मुख्य सचिव राजीव कुमार यांनी नागपाल यांच्या निलंबनासाठी दिलेले कारणही कायदेशीर ठरत नाही. "आधी फाशी आणि मग चौकशी', या खाक्याने सरकारने नागपाल यांच्यावर केलेल्या कारवाईचे दूरगामी परिणाम प्रशासन आणि सरकारवरही होणार आहेत. पण त्याची पर्वा गुंडांच्या टोळ्यांना संरक्षण देणाऱ्या यादव सरकारला नाही. नागपाल यांच्या निलंबनामुळे ग्रेटर नोएडासह राज्यातल्या बिल्डर आणि वाळू माफियांच्या टोळ्यांवर कडक कारवाईचे धाडस प्रशासनातले ज्येष्ठ अधिकारी करणार नाहीत. पोलीसही सावधतेनेच गुंडांच्या विरोधात कारवाई करतील. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी मेरठ जिल्ह्यातल्या शामली भागात वाळू माफियांच्या टोळ्यांनी ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवून दंगली घडवल्या होत्या. सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या पथकावर हल्लाही केला होता. आमच्या विरोधात कोणतीही कारवाई केल्यास आम्ही ती मोडून काढू, अशा धमक्या तेव्हा वाळू माफियांच्या गुंडांनी दिल्या होत्या. गोंडा जिल्ह्यातली पशूंची तस्करी रोखणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही याच सरकारने तडकाफडकी बदली करून, या तस्करीचे आरोप असलेल्या नेत्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. हे सरकार नेमके कुणाचे आहे? गुंड आणि माफियांच्या टोळ्यांचे कर्दनकाळ ठरणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी शिक्षेची कारवाई सरकार करायला लागल्यावर, जनतेला न्याय मिळणार तरी कसा? तो कोण देणार? या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री यादव द्यायला तयार नाहीत