Total Pageviews

Thursday 15 September 2011

swiss bank & corruption good article & comments by many indians

प्रतिक्रिया
On 31/08/2011 06:03 PM Sudhir Kale said:
राजेश-जी, धन्यवाद
On 31/08/2011 06:02 PM Sudhir Kale said:
नितीन-जी, धन्यवाद. लाल बहादूर शास्त्री यांच्यापर्यंत भारतीय राजकारण संपूर्ण असले तरी नक्कीच बऱ्यापैकी सोवळे होते. इंदिराजीकडे अनेक अलौकिक गुण होते यात शंका नाहीं पण भ्रष्टाकाराचा विषवृक्ष त्यांनीच लावला हेही तितकेच खरे. सोनिया गान्धीवर भ्रस्ताचाराचे आरोप त्यांचा शत्रूही करणार नाही>> जोवर आरोप सिद्ध होत नाहींत तोवर सर्वच निरपराधी मानावेत या(च) संदर्भात सहमत. कॉग्रेस पक्षच देशाला तारून नेइल असे वाटते >> या वटवृक्षाखाली दुसरे कुठले रोप उगवलेच नाहीं. पण भाजपाची पाचं वर्षे वाईट नव्हती.
On 31/08/2011 03:37 PM Sudhir Kale (Author) said:
विश्वा-जी, तुम्ही अगदी बरोबर बोललात!
On 31/08/2011 08:17 AM Sudhir Kale (Author) said:
अदिती-मॅडम, खाली वैशालीताईंच्या प्रतिसादाला उत्तर देतांना मी लिहिले आहे कीं पुढचा नेम Corporate leaders वर धरायला हवा. हे श्रीमंत लोक आपल्या गडगंज संपत्तीचा दुरुपयोग करून या नेत्यांना किंवा बाबू लोकांना पैसा ’चारून’ विकत घेतात तेंव्हाच ही जनावरे तो पैसा ’खातात’! आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपणही कसलीही लांच द्यायला नाहीं म्हटले पाहिजे. त्यासाठी "मी अण्णा आहे" असे छापलेल्या नोटा खिशात ठेवाव्यात व खाजर्‍या तळहातावर त्या ठेवून पहावे काय होते ते. मी हा प्रयोग करणार आहे भारतात! पाहू काय होते ते...!
On 30-08-2011 06:10 PM Aditi Joshi said:
मनाला पटणारा लेख . पण ह्या भ्रष्टाचाराचा उगम आपल्यातूनच झाला आहे हे नाकारून चालेल का? कायद्यातल्या पळवाटा काढून स्वत:चे खिसे भरणे म्हणजे भ्रष्टाचार . अदिती ( ३१४_ विक्षिप्त)
On 30/08/2011 04:13 PM Sudhir Kale (Author) said:
www.misalpav.com You don't have to be member to read the posts there. Just go to "नवे लेखन" and scroll down to what you wish to read.
On 30/08/2011 02:21 PM Vishwa said:
सुधीरभाऊ पहिले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य न्हवते ती फक्त ट्रान्स्फर ऑफ पावर होती. Gorya engrajani इथील भूरया na dileli. Te इथील mulnivasinche स्वातंत्र्य न्हवते.
On 30-08-2011 01:23 PM Sudhir Kale(Author) said:
प्रतिसाद देणार्या सर्व वाचकांचे आभार. हाच लेख मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आहे ह्याची सुज्ञ वाचकांना परत आठवण करून द्यावीशी वाटते. आपला कृतज्ञ सुधीर (जाकार्ता) काळे
On 30/08/2011 12:20 PM Sudhir Kale (Author) said:
भाग-२: नीला-जी, त्यांनी आणखी एक विधेयक परत पाठविले होते (ते मंत्रीमंडळ बनविण्यासाठी चुकीच्या पक्षाला बोलावण्याबद्दल अथवा चुकीच्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट घोषित करण्याच्या बाबतीत होते) त्यात त्यांचा विजय झाला होता. पण त्याचा संदर्भ अद्याप 'गूगल'वर सापडत नाहीय्. सापडला कीं इथे लिहीन. दयेच्या अर्जांबाबत किती त्यांच्यापुढे ठेवले ते माहीत नाहीं. प्रतिभाताईंच्यासमोर अफजल गुरूच्या माफीचा अर्ज रद्द करण्याबाबतची शिफारस १०-१५ दिवसांपूर्वी पोचली आहे अशी बातमी वाचली. बघू ताई किती दिवसात सही करतात. (end)
On 30/08/2011 12:16 PM Sudhir Kale (Author) said:
भाग-१: नील-जी, आपले राष्ट्राध्यक्ष आपल्या घटनेनेच रबर स्टॅम्प बनविले आहेत. मंत्रीमंडळाकडे ते फक्त एकदाच एकादे विधेयक परत पाठवू शकतात. पण ते तसेच परत आले तर त्यावर सही करण्याची त्यांच्यावर सक्तीच असते. मंत्रीमंडळाने वरील विधेयक तसेच्यातसे परत पाठविल्यावर त्यांनी ३० दिवसानंतर सही केली. राष्ट्राध्यक्षांनी किती दिवसात सही केली पाहिजे यावर आपल्या घटनेनुसार बंधन नाहीं. ते पूर्ण पाच वर्षेही सही न करता काढू शकतात. (पुढील भाग पहा)
On 29-08-2011 11:35 PM Nitin Thatte said:
लेख नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम हे वेगळे सांगणे न लागे. नागरीकांनी जास्त डोके गरम करुन घेवू नये अशा मताचा मी आहे. कोंग्रेसने भ्रष्टाचार केला वगैरे ठीक आहे पण ह्या लोकप्रतिनिधीना आपणच नाही का निवडून देत? मनमोहन सिंग आणि सोनिया गान्धीवर भ्रस्ताचाराचे आरोप त्यांचा शत्रूही करणार नाही. कॉग्रेस पक्षच देशाला तारून नेइल असे वाटते
On 29-08-2011 07:16 PM Rajesh Ghaskadvi said:
अतिशय उत्तम आणि मनाला एक वेगळीच उभारी देणारा लेख काळे साहेब. मी आपले लेख तसे आवडीने वाचतोच. विश्वास ठेवा , गेले अनेक वर्षे अमेरिकेत आहे पण हे आंदोलन बघितले ,आपला लेख वाचला आणि देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटते आहे. ताबडतोब मायाभूमीकडे धाव घ्यावी असे वाटते आहे. आपलाच राजेश ( अमेर्केची संयुक्त संस्थाने)
On 29/08/2011 02:36 PM nil said:
No doubt Mr, Kalam was great president but one should refrain to compare or play dirty politics over such highest ranked constitutonal persons.
On 29/08/2011 02:33 PM nil said:
Mr Sudhir, somewhere unnecessarily you have tried to compare ho'ble current president with the formar one. and tried to proove that the current one is not doing her duty (in ur word "raberstamp) and the example you have given that Mr Kalam sent many bills back for correction, so are you intended to say that those bills drafted by NDA was not appropriate? . anyway my question was why for seven yrs Kalam did not complete single mercy petition? whereas Pratibhatai completed six or seven?
On 29/08/2011 01:48 PM Sudhir Kale (Author) said:
नील-जी, देवनागरी टंकनातील त्रुटींमुळे तुमचा प्रतिसाद कळलाच नाहीं. कृपया दोन्ही मुद्दे ctrl+g वापरून इंग्रजीत लिहा म्हणजे समजायला व उत्तर द्यायला सोपे जाईल. हवे तर माझ्या (sbkay@hotmail.com) या ई-मेलवर पाठवा.
On 29/08/2011 09:18 AM nil said:
सुधीरजी कुठे तरी तुम्ही अब्दुल कलम आणि राष्ट्रपती प्रतिभाताई ह्यांचा काम्यारीजन करून दाखवला आहे आणि उदाहरण खातर अब्दुल कलम ह्यांनी कशी विधेयके दुरुस्तीसाठी पाठविली ह्याचा अर्थ एवढाच निघतो कि जी विधेयके त्यांचा समोर आली होती त्यात त्रुटी होत्या, कदाचित संसादियाकामाचा कमी अनुभव म्हणून एन्दिएकडून राहिल्या असतील असो, दुसरा तुम्हीच सांगा सात वर्षात केवळ राष्ट्रपतींना असलेल्या फाशीच्या दयेच्या अर्जावर त्यांनी एकदेखील सुनवाई का नाही केली त्याउलट आता सात निघाल्या मग रबरस्ट्यांप राष्ट्रपती कश्या?
On 28/08/2011 07:27 AM Sudhir Kale (Author) said:
आज जकार्ताला उपलब्ध "समय" या वार्तावाहिनीवर १५ ऑगस्ट १९४७ (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी १९५० (प्रजासत्तक दिन) व २७ ऑगस्ट २०११ (दुसरा स्वातंत्र्यदिन) या तारखा दाखविल्या जात होत्या. पण अण्णांनी जाहीर केले कीं हा अर्धा विजय आहे! शुक्रवारी रात्री किरण बेदींनी रामलीला मैदानावर जे भाषण दिले ते मला फारच आवडले होते व त्या भाषणाचा खासदारांवर थोडाफार तरी परिणाम झाला असावा. त्या भाषणाचा तर्जुमा (transcript) कुणाकडे उपलब्ध असेल तर मला sbkay@hotmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठविण्याची कृपा करावी.
On 27/08/2011 08:11 AM Sudhir Kale (Author) said:
काल किरण बेदींचे भावनाविवश भाषण हृदयाला स्पर्शून गेले. पण स्वत:च्या खुर्चीपलीकडील प्रत्येक बाबतीत उदासीन असणारे आपले नेते-खास करून काँग्रेसचे-कांहीं चांगले करतील यावर विश्वास उरला नाहीं. सारखी शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातील 'बास्तिय्य' (Bastille) तुरुंग, फ्रेंच राज्यक्रांती, झपकन खाली येणारे गिलोटिनचे पाते आणि गडगडत जाणारी मुंडकी यांचेच चित्र डोळ्यासमोर येते! देव करो आणि अण्णा सुखरूप राहोत, दीर्घायुषी होवोत हीच देवाच्या चरणी प्रार्थना! भारत माता की जय, वंदे मातरम्, इन्किलाब झिंदाबाद
On 27/08/2011 12:15 AM vikrant,chicago said:
मिलिंदजी, आपण लिहिलेली प्रार्थना बर्याच वर्षांनी वाचून खूप 'nostalgic' बनलो. संघाला भ्रष्टाचार नष्ट करायची युवशाक्तीत ताकद आहे. त्याकरिता determination' मात्र खूप लागेल. यावरून स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या अग्रभागी छापले जाणारे वचन आठवते. कर्तव्यमेव कर्तव्यं प्राणे: कंठगतैरापि | अ कर्तव्यं न कर्तव्यं प्राणे: कंठगतैरापि ||
On 26/08/2011 06:58 PM Milind Madhukarrao Kulkarni said:
आपल्या आयुष्याच्या मशाली पुन:श्च्य पेटून उठायचं आहे, या महायागात एक समिधा माझ्याही आयुष्याची. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्व्यया हिन्दुभूमे: सुखं वर्धितोहम महन्मंगले पुण्यभूमे त्वदर्थे पत्त्वेश्कायो: नमस्ते नमस्ते.
On 26/08/2011 06:51 PM Milind Madhukarrao Kulkarni said:
सामर्थ्याने परतवून लावल्यामुळे जागतिक पातळीवर प्रस्थापित होणारी भारताची निर्विवाद सामरिक श्रेष्ठता आणि इथून खरी सुरु होईल भारताची जागतिक महासत्तेच्या पदाकडील वाटचाल, अण्णांचे हे आंदोलन यशस्वी झाले तर आनंदच आहे पण नाही झाले तरी याच आंदोलनातून पुढच्या अतिविशाल आंदोलनांची बीजे रोवली जातील, तुमची सूचना/कल्पना (अण्णा:राष्ट्रपती;आणि अण्णांचे सहकारी:शासनकर्ते) वास्तवात येईल ही फक्त नांवे/व्यक्ती वेगळ्या असू शकतील पण संस्कार,चारित्र्य,विचार तेच असेल, पण तोपर्यंत (क्रमश:)
On 26/08/2011 06:34 PM Milind Madhukarrao Kulkarni said:
सुधीरजी, सूचना स्तुत्य आहे,ते होणे शक्यपण आहे, वस्तुस्थिती,जागतिक परिस्थिती पाहता मला एक संवेन्दना असे सांगतेय कि जागतिक पटलावर भारताच्या येऊ घातलेल्या सुवर्णयुगाची हि नांदी आहे, पण ते सुवर्णयुग आणि आज या मध्ये एक कठीण काळ वेगवेगळी आव्हाने घेऊन आपल्या समोर आहे,त्या आव्हानांची फलप्राप्ती म्हणजे भारतात घडणाऱ्या या आणि भविष्यातल्या अशा अनेक विशाल आंदोलनांमुळे भारताच्या सामजिक,राजकीय संरचनेमध्ये मुलभूत आणि अमुलाग्र बदल घडणार आहेत तसेच नजीकच्या भविष्यात होणाऱ्या परकीय सामरिक आव्हानांना (क्रमश:)
On 26/08/2011 05:50 PM Milind said:
मला वाटले आपल्याला १९४७ स्वातंत्र मिळाले??
On 26/08/2011 04:27 PM Sudhir Kale said:
Mr Milind Kulkarni, That is why I had suggested that we should elect Mr Anna hazare as our next President. But with the Team Anna as a nucleus, a new political party could be built and it should fight elections in 2014 (or earlier if this governemnt falls prematurely) so that they can have a strong presence in Loksabha.
On 25/08/2011 09:42 PM Milind Madhukarrao Kulkarni said:
खऱ्या इतिहासाचे एकेक पान उघडून पहा जाणीव होईल कसे तेजस्वी,द्रष्टे,कर्तबगार,निस्पृह असणाऱ्या भारतमातेच्या सुपुताना (सावरकर,सुभाषचंद्र बोस ई.) जाणीव पूर्वक वाळीत टाकले होते किंवा त्यांच्या कार्याला विरोध केला होता किंवा त्यांना नष्ट केले (लालबहादूर शास्त्री) गेले. आज नियतीने पुन्हा आपल्याला संधी दिली आहे,तेजस्वी, स्वाभिमानी,नीतिमान भारताच्या निर्माणाची या नियतीच्या हाकेला प्रतिसाद द्या!
On 25/08/2011 09:24 PM Milind Madhukarrao Kulkarni said:
ही खरेच भारतीय स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, आपली पहिली लढाई काही संकुचित वृत्तीच्या तथाकथित थोर पुढाऱ्यांनी ताब्यात घेतली होती ( हे खरच आपणा भारतीयांचे दुर्दैव आहे, की आपल्याला आपला खरा इतिहासही माहित नाही, किंबहुना तो जाणीव पूर्वक आपल्या पासून लपवून ठेवला होता) आणि मग नंतर सुरु झाली ती तुमच्या माझ्या प्रिय देशाची फरफट (त्या तथाकथित थोर पुढाऱ्यांच्या चरित्रहीन शिष्यांनी आणि त्यांच्या चरित्रहीन पिलावळीने केलेली आणि त्याची फलनिष्पत्ती आजचा हतवीर्य,तेजविहीन,अस्मिताहीन आपला भारत (क्रमश:)
On 25/08/2011 08:20 PM BabareDubai . said:
खरतर अण्णांच्या जनालोक्पला मध्ये परदेशी धनाबद्दल काहीच लिहिलेले नाहीये. नुसते सरकारी नोकर करतात तो भ्रष्टाचार किरकोळ आहे. संसदेत लोक निवडून येतात ते कसे येतात त्यांची वंश परंपरागत मालमत्ता काय आहे यावर काही विचार नाही. आत्महत्या हे एक पाप आहे पळपुटेपणा आहे. आपण लोकांना एखादी गोष्ट पटवून देऊ शकत नाही किवा १००० माणसात १० माणसे जेमतेम मोर्चा काढतात त्याला काय म्हणायचे? उपोषण हि एक आत्महत्याच आहे.. इंग्रजांना हाकलणे सोपे होते. आपल्यात आतून लागलेले बांडगुळ काढायला ते हातपायच तोडावे लागतील का ? याचा ?
On 25/08/2011 09:41 AM G R said:
लेख सुंदर आहे. खाली देलेल्या आकडेवारी नुसार प्रत्येकी माणसाचे नुकसान . करप्शन = र ९१०६०३२३४३०३०००००. एकूण आजची लोकसंख्या = १२१०१९३४२२ भारतातील प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे नुकसान ( भिकारी ला पकडून )= र ७,५२,४४,४३७.६०. म्हणजे आता बस फक्त आणि फक्त अन्ना पाठींबा. जय हिंद
On 24/08/2011 02:48 PM Ek Tarun said:
अप्रतिम लेख.. खूप आवडला..!!
On 24/08/2011 09:15 AM Abhijit shah said:
सुधीरजी काळे..............अप्रतिम लेख.. खूप आवडला..!!
On 23/08/2011 09:24 PM Sudhir Kale (Author) said:
बिहारमध्ये भ्रष्टाकाराविरुद्ध कुठला कायदा केलेला आहे त्याबद्दल माझ्या वाचनात कांहींच आलेले नाहीं त्यामुळे त्याबद्दल आपणच मला आधी सांगायला हवे. चांगले केलेले असल्यास कां नाहीं अनुकरण करू?
On 23/08/2011 07:50 PM Rujeet said:
सुधीरजी - जनतेला मतदान सारखे शस्त्र दिले असताना तिचा जनता वापर करत नाही.. केवळ व्यवस्थेला आणि नेत्यांना दोष द्यायचा.. घटना कारांनी अतिशय अभ्यास करून हि व्यवस्था बनवली.. जनतेला सर्वात जास्त अधिकार दिला.. काय उपयोग झाला.. आणि वेळ येईल तेव्हा ठरवू या अपेक्षे वर कायदे बनत नाहीत.. बिहार ने जो कायदा आणला आहे.. भ्रष्टाचार निवारणा साठी पहिले पाउल म्हणून तसा कायदा राष्ट्रीय पातळीवर बनवायला काहीच हरकत नाही.. थेट हुकुमशाहीला आमंत्रण देणे योग्य नाही..
On 23/08/2011 04:19 AM ninad kulkarni said:
काळे काका संतुलित लेख लिहिला आहे .भारतातील व जगातील विविध स्तरातील लोक अण्णा हजार्यांना पाठिंबा देत आहेत .आज नही तो कभी नही अशीच वेळ आली आहे . अगदी आपल्या क्रिकेट संघाने सुद्धा '' जो पर्यत लोकपाल विधेयक पास होत नाही ,तो पर्यत एकही सामना न जिंकण्याचे ठरवले आहे .''
On 22/08/2011 09:30 PM Sudhir Kale (Author) said:
सुभाष-जी, तुम्ही म्हणत आहात तो पैसा कायदेशीर मार्गाने मिळविला गेला असेल तर कशाला शोधायचा? नसेल तर कुठलाही पैसा शोधायला हवाच! रुजीत-जी, तुमचा मुद्दा विचार करायला लावणारा आहे. पण कुठल्याही गोष्टीच्या अतिरेकाने तीचा दुरुपयोगच करायचे ठरवल्यावर कोण काय करणार? पण योग्य शस्त्र हातात मिळाल्यास भारतीय जनता त्याचा दुरुपयोग करणार नाहींत असे वाटते. तसा केला गेल्यास काय करायचे तेही वेळ आल्यावर ठरवावे लागेल.
On 22/08/2011 07:56 PM Rujeet said:
अरे बाबानो, किती लोकांनी जन लोकपाल wachala आहे ते सांगा.. भावने च्या भरात वाहून जाऊन लोकपाल नावाचा हुकुम शाह आपल्याला हवा आहे का ते विचार करा.. उद्या लोकपाल भ्रष्ट झाला तार काय सुपर लोकपाल आणायचा का? सरकार भ्रष्ट असेल तर आपण ते ५ वर्षाने बदलू शकतो.. लोकपाल बदलू शकणार आहोत का? इजिप्त चा उदाहरण देता.. आज तो देश निर्नायकी झाला आहे.. भावने पेक्षा व्यवहारी विचार करा.. तेवढे आपण सुज्ञ नक्कीच आहोत..
On 22/08/2011 07:41 PM pallavi said:
@Shailesh USA : सरकार परकीय वाटते नाही, परकीय आहेच आहे ! जे सरकार इटालियन बाईच्या आणि तिच्या पोराच्या मर्जीने चालते, ते परकीय नाही तर काय ? पंतप्रधान आणि राष्ट्रपती शोभेचे आहेत नुसते !
On 22/08/2011 06:35 PM subhash said:
तुमच्या लेखाबद्दल अभिनंदन! स्विस किंवा इतर बँकांत जेव्हढा पैसा आहे, त्यापेक्षा अधिक देशातील जमिनीत, घरात आणि सोन्या-नाण्यात लपविला आहे. तो शोधायला काही आंतरराष्ट्रीय दबाव लागत नाही. पण कोणाला शोधायचा आहे?
On 22/08/2011 03:51 PM Sudhir Kale (Author) said:
नील-जी, ज्या माणसाने नेट लावून RTI चा प्रश्न तडीस लावला त्यावरून त्यांच्याबद्दल माझे मत चांगले झाले. हे त्यांनी केलेले एक अतीशय उच्च प्रतीचे कार्य आहे. आता ते भष्टाचारामागे हात धुवून लागले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. ते यशस्वी व्हावेत अशीही माझी इच्छा आहे (व ते होतीलच). यापुढची लढाई त्यांनी योजली आहे तीही निवडणूक प्रक्रियेबाबत! ही यशस्वी झाली तर तुमच्या-आमच्यासारखे लोकही निवडणुकीला उभे रहातील जे व्हायला हवे! हा दुवा उघडा आणि वाचा त्यांच्याबद्दल! हिरा! http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal
On 22/08/2011 01:49 PM Sudhir Kale (Author) said:
भाग-२: नील-जी, किरण बेदींची कारकीर्द मी अनेक वर्षांपासून पहात आलो आहे. त्यांनी तिहार तुरुंगातही क्रांतिकारक गोष्टी सुरू केल्या होत्या आणि त्या ’स्वच्छ’ असल्यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होत गेल्या. त्यांचे I dare हे पुस्तकही मी वाचले आहे. त्यांच्या मुलीच्या अ‍ॅडमिशनबद्दल मी तरी कांहींही वाचलेले नाहीं. चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करावे. उगीच बारीक-सारीक बाबी उकरून कशाला काढायच्या? नाहीं तर या दोघांच्यावर आपण एक "सनसनीखेज" लेख लिहा! म्हणजे आपले म्हणणे नीट सर्वांना कळेल.
On 22/08/2011 01:47 PM Sudhir Kale (Author) said:
नील-जी, शिवाय केजरीवालना २००६ साली त्यांच्या "उभरत्या नेतृत्वा"साठी (जे मीही लिहिले होते) रामोन मेगॅसेसे हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते हेही विसरू नका! (He was awarded Ramon Magsaysay Award for Emergent Leadership in 2006)
On 22/08/2011 01:44 PM bhagawat jadhav said:
जय हिद जय आण्णा
On 22/08/2011 08:58 AM nil said:
सुधीर काळे तुम्ही इथे म्हणत आहात कि अरविंद केजरीवाल ह्यांच्या रूपाने आपल्याला एका चांगला नेतृत्व मिळाला आहे हे नक्की कश्याचा आधारावर म्हणत आहात? अण्णा आठ महिन्यापूर्वीपर्यंत जानालोक्पाल्शी जुडले गेले नव्हते, त्यांचा इथे केवळ चेहरा वापरून घेण्यात येतोय, त्यांनी काय बोलायचे हे देखील केजरीवाल ठरवतात इतका धूर्त माणूस आहे तो त्याचा एन जी ओ बद्दल माहिती करून घ्या, बेदी मादाम नि मुलीचं अडमिशन कसा केला ते बघा आणि मग त्यांचा मागे आंधळेपणा जाण्यापेक्षा डोळसपाने जा
On 21/08/2011 11:02 AM Sudhir Kale (Author) said:
शैलेश-जी, वा! अगदी कोट्यावधी भारतीयांच्या मनातलं बोललात!
On 21/08/2011 08:43 AM Sudhir Kale (Author) said:
परखड-जी, आता ह्या गडबडीत मनमोहन सिंग पायउतार होऊन राहुल गांधी पंतप्रधान होण्याचा जबरी धोका आहे हे मात्र खरे!
On 21/08/2011 01:06 AM Shailesh, USA said:
आन्ना हे प्रत्येक common भायातीयाचे प्रतिक वाटतात आणि सरकार परकीय वाटते!!
On 20/08/2011 09:43 PM Sudhir Kale said:
भाग-२: जिज्ञेश-जी, पण तरी जेंव्हां टोकाची लढाई होते तेंव्हां भारतीय मतदार नक्कीच डोके वापरून मतदान करतो. त्याला नीर-क्षीर-विवेक आहे म्हणूनच आज तो अण्णांच्या पाठीशी उभा आहे व एरवी भरपूर लोकप्रियता असलेल्या स्वामी रामदेव यांच्या उपोषणाला त्याने साथ दिली नाहीं. त्यामुळे मला तरी तुम्हाला वाटते ती काळजी नाहीं. आज जी "टीम अण्णा" या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे (भूषण पिता-पुत्र, हेगडे, केजरीवाल आणि किरण बेदी) त्याच टीमने एक केंद्रबिंदू (Nucleus) बनून उद्या आपल्या देशाची धुराही सांभाळावी असेही मला वाटते.
On 20/08/2011 09:35 PM Sudhir Kale (Author) said:
जिज्ञेश-जी, माझ्या मते भारतीय मतदार, प्रौढ आणि शहाणा आहे. त्याला भाजपाचा "India Shining" रुचला नाहीं, पटला नाहीं म्हणून त्याने भाजपाच्या सरकारला दरवाजा दाखवला. त्या आधी काँग्रेसचे धोरण आवडले नाहीं म्हणून वाजपेयींना गादीवर आणले. तसेच आज भारतीय मतदारासमोर कुठलाही ठोस विकल्प नाहीं. दुर्दैवाने आपला मतदार मतदान करायलाच जात नाहीं. जे जातात त्यातल्या किती लोकांना चाड असते व किती लोक नोट घेऊन वोट देतात तेही माहीत नाहीं. (भाग-२ पहा)
On 20/08/2011 08:33 PM asmita said:
कालेसाहेब तुमची पद्धत चांगली आहे . तुम्ही लगेच वाचकांच्या प्रतिक्रियांची दाखल घेता अथवा प्रश्नांचे निरसन करता . धन्यवाद .
On 20/08/2011 06:23 PM Jignesh said:
कालेसाहेब, मी काल १ दिवसाचा पाणी पिऊन उपवास केला. आयुष्यात पहिल्यांदा कारण मी धर्म मानत नाही. आपली बातमी कळली नाही. कट्टर कॉन्ग्रेस विरोधक म्हणजे जळकुकडे जनसंघी आज अण्णांची टोपी घालून फिरत आहेत. आम्हाला कॉंग्रेसची म्हातारी मेल्याचे दुक्ख होणार नाही पण भाजपेयी लोकांचा काळ सोकावू नये.
On 20/08/2011 05:21 PM Sudhir Kale (Author) said:
अस्मिताताई, राष्ट्रपती फक्त एकदाच एकादे बिल मंत्रीमंडळाकडे परत पाठवू शकतात. ते मंत्रीमंडळाने परत तसेच जरी पाठविले तरी मग त्यांना सही करावीच लागले (पूर्वी बी. डी. जत्तींच्यावर हा प्रसंग आला होता.) पण राष्ट्रपती केंद्रसरकार बरखास्त करू शकतात. संजीव रेड्डींनी असेच मोरारजीभाईंचे सरकार बरखास्त केले होते व चरणसिंग कांहीं महिने पंतप्रधान होते.
On 20/08/2011 05:17 PM Sudhir Kale (Author) said:
विक्रांत-जी, अरविंद केजरीवाल यांच्या रूपात अण्णांना (आणि आपल्यालाही) एक अतीशय विचारी नेता मिळाला आहे. IIT खडगपूर येथून इंजिनियरिंगची पदवी घेतलेले केजरीवाल आज समाजकारणात/राजकारणात उतरले आहेत. बरोबर किरण बेदी या "I Dare" च्या लेखिकेसारखी वाघीणही "टीम अण्णा"ला मिळाली आहे. काल रामलीला मैदानावरून बोलताना केजरीवाल यांनी जाहीर केले कीं भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जिंकल्यावर "टीम अण्णा" निवडणूकीची प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि तिला पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी रणांगणावर उतरेल. (भाग-२ पहा) Rpt transmittal
On 20/08/2011 11:39 AM asmita said:
आणि तुमच्या म्हणण्या नुसार अस जर झाल तर योग्यच होईल यात शंकाच नाही .घटने बद्दल फारस माहित नाही पण घटनेने राष्ट्रपतींना विशेष अधिकार दिलेले आहेत अस एकलय . अण्णा याचा योग्य वापर करून बदल घडवतील हे नक्कीच .
On 20/08/2011 11:27 AM asmita said:
kalesaheb अण्णाच्या कार्य शमते विषयी मला कि कुणालाही शंका यायचे कारणच नाही. आज जे अण्णांनी करून दाखीवले ते काही दशकात कुणाला जमले नव्हते . खंबीर नेतृत्वाचा आभाव होता . एकाच विचाराखाली इतक्या सर्वाना आणण त्यांनाच जमल . फक्त याच मुद्द्यासाठी नाही तर भविष्यात आणखी चांगल्या गोष्टी अथवा बदल घडून येण्यासाठी त्यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे . त्यांना राष्ट्रपती बनवू नका असे एवढ्याच साठी म्हणाले कि कदाचित त्यामुळे त्यांच्या कार्याशामातेवर मर्यादा येतील , वैयक्तिक आकस पोटी नव्हे.
On 20/08/2011 10:51 AM Sudhir Kale (Author) said:
भाग-२: (विक्रांत-जी) हे पाऊलही असेच क्रांतिकारक ठरेल याबाबत कुणाचेही दुमत असणार नाहीं. माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे कीं अण्णा शतायुषी होवोत आणि त्याच्या उर्वरित जीवनात अशाच अनेक लढाया जिंकण्यासाठी त्यांचे सेनापतीपद "टीम अण्णा"ला सतत लाभो!
On 20/08/2011 09:00 AM Sudhir Kale (Author) said:
काँग्रेसचेही खासदार फुटू लागले आहेत असे दिसते! एक फुटला आहेच. आणखी एक-दोन फुटले कीं काँग्रेसच्या "धरणा"चे "पानशेत" होईल आणि अनेक खासदार धडाधड बाहेर पडल्याने धारण रिकामे होऊन जाईल!
On 20/08/2011 08:54 AM Sudhir Kale (Author) said:
भाऊसाहेब, एकदम बरोबर बोललात! मनमोहनसिंगांनी विदुराचा आदर्श समोर ठेवावा आणि "पायउतार" व्हावे. नाहींतर त्यांचाही "भीष्म पितामह" व्हायचा! पण भारताच्या आर्थिक बदलाचे खरे शिल्पकार होते श्री नरसिंह राव, मनमोहनसिंग नव्हेत. त्यांना याचे श्रेय देणे म्हणजे साहेबाला बाजूला ठेऊन त्याच्या लघुलेखिकेला (stenographerला) श्रेय देण्यासारखे आहे! (आतरराष्ट्रीय नाणेनिधीने-IMF-आपला हात पिरगाळला होता त्या घटनेलाही याचे बरेचसे श्रेय द्यावे लागेल.)
On 20/08/2011 08:37 AM Sudhir Kale (Author) said:
अस्मिताताई, आपल्या राष्ट्रपतींना 'रबरी शिक्का' असे उपहासाने म्हटले जाते व आपल्या घटनेनुसार त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार आलेल्या कागदावर (मुकाट्याने) सही करावीच लागते. तरीही ज्या व्यक्तीची नीती आणि ज्या व्यक्तीचे चारित्र्य वादातीत असते व जो स्वयंभू असतो त्याच्या शब्दाला एक वजन असते. अब्दुल कलामसाहेबांच्या कारकीर्दीत त्यांनी कांहीं बिलांचे मसूदे "पुनर्विचारार्थ" परत मंत्रीमंडळाकडे पाठविल्यावर त्यांत सरकारला बदल करावे लागले होते. अण्णांच्या शब्दालाही असेच वजन असेल यात शंका नाहीं!
On 20/08/2011 05:50 AM परखड said:
आता ह्या गडबडीत मनमोहन सिंग पायउतार होऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील.
On 20-08-2011 01:36 AM Machhindranath S shinde said:
भारतीय राजकारण,अर्थवेवस्था जवळ जवळ पूर्णपणे भ्रष्टाचारावर अवलंबून आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही.गरज आहे रोजच्या आर्थिक वेव्हारातील प्रत्येकाची पारदर्शकता, कडक कायदे व तत्काळ अमलबजावणी. पारदर्शकतेसाठी तंत्रद्यानाचा चांगला उपयोग होऊ शकतो . कायद्याच्या दहशती शिवाय पर्याय नाही उदा.चोरी करणाराचे हात कापले तर,....सरकारी नोकर नोकरी जाणारच... या कल्पनेने गैरकृतीस आळा बसणारच.
On 20/08/2011 01:02 AM vikrant,chicago said:
१९७५ प्रमाणे ह्यावेळी नवीन रार्वसामावेषक पक्ष उभा राहायला हवा. 'भ्रष्टाचार निर्मुलन पक्ष' असे त्याचे नामकरण सानुक्तिक ठरेल. ह्या पक्षातर्फे निवडणुका लढवल्या तर सर्व युवाशक्ती त्यात योगदान देईलच पण भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या सद्साद्विकेक्बुद्धी जागृत असलेल्या थोरांचीही मदत होईल. असा पक्ष स्थापन करून त्यातर्फे निवडणुका लढवाव्यात. पूर्वी आमदार, खासदार किव्वा मंत्री असणार्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारावे. पूर्णपणे नवीन युवाशक्तीचे सरकारच देशाला तारेल. तिकीट मिळणार नसल्यामुळे संधिसाधू दूर राहतील.
On 19/08/2011 07:22 PM asmita said:
आणि अण्णांना राष्ट्रपती नका बनवू .एका मर्यादित आखलेल्या परिघात राहावे लागेल .त्या पेक्षा एक नेताच राहू द्या एकदिशादर्शक नेता त्याचीच तर समाजाला कमतरता होती ना ?
On 19/08/2011 07:11 PM asmita said:
सुधीरजी नेहमीप्रमाणेच छान लेख.माफ करा पण भ्रष्टाचार संपवणे हि केवळ सरकारची जबाबदारी नाहीये तर आपली सुधा आहे .भ्रष्टाचार हा एकाएकी उपटलेला राक्षस नाहीये .आपणच आधी देण्याची सवय लावली आता घेणारे डोईजड झालेत . जे किरकोळ होत ते आता आवाक्याबाहेर झालंय. फक्त मागणारे मागतात म्हणून नाही तर आपणही आपल्या फायद्यासाठी कधी काम लवकर होण्यासाठी , कधी नियमाबाहे आपले काम होण्यासाठी देत राहिलो .आधी आपल्यातही सुधारणा केली पाहिजे .आणि आता एकजूट झाली आहे तर सर्व शक्तीन्नुसार हे थांबवलं पाहिजे .
On 19/08/2011 03:47 PM madhukar khanwalkar,pune said:
its sure a mass movement.It has brought the youth and elderly together.I strongly feel that its not going to make a significant difference until and unless each one of us decide to change ourselves from the core.There are many laws,but are the laws fully successful in curbing the cheats,thieves,tax evaders etc etc,If hasan ali can get bail.....any thing can happen.It is therefore foremost important that each one of us CHANGE.If we do introspection we are the culprits So lets CHANGE
On 19/08/2011 01:08 PM Mahesh Mhatre said:
खरच हीच वेळ आहे ,कोणीही घरात बसू नका ,या उपट सुब्म्ह्याच्या तावडीतून देशाला वाचवायचं आहे . आसा आण्णा परत भेटन कठीण आहे. वंदे मातरम!!!!!!!!!
On 19/08/2011 06:16 a.m. Rahul , New Zealand said:
टेस्ट
On 19/08/2011 12:28 AM ARUN BANDI said:
The common man is more concerned for his individual work that gets stuck in every office.This is primarily because no inward no,or return receipt with date and time as also completion of reqd documents he submits,is given to him by the concerned deptmnt.Once this started, one can demand the date of final decision on it in writing.The document once is complete in all respect only needs to be checked by the staff deployed at entrance, and acknowledged rct is given,further processing becomes easy
On 19/08/2011 12:16 AM ARUN BANDI said:
Instead of describing in detail the herculean task of elimination of corrupt practices taken up by Anna Hazare,I would invite every individual, posting his comments, must and should give one practical example he is going to practice in everyday life.e.g1).I AM NOT GOING TO GIVE BRIBE TO ANY ONE.2)i WILL COMPLETE ALL THE REQUIREMENTS ASKED FOR MY APPLICATION AND DEMAND THE DATE OF MY FINAL DECISION ON IT.EVERY REPEAT VISIT WILL BE DEMANDED FOR REIMBURSEMENT OF EXPENSES FROM THE PARTICULAR OFFICER
On 18/08/2011 10:55 PM american idiot said:
अरे आज सगळे अण्णांचा उदो उदो करून त्यांना मारे पाठींबा देत आहात पुणेकरांनो, पण तुमच्यापैकी किती लोक सिग्नल ला पिवळा दिवा लागल्यावर गाडी जोरात न दामटता हळू करता? तुमच्यापैकी किती जनांनी पोलिसाला लाच दिलेली नाहीये? तुमच्यापैकी किती जन एजंट मार्फत लायसन्स काढत नाहीत? इथे मी सरकार चा उदो उदो करत नाहीये, पण अश्या छोट्या छोट्या गोष्टींनीच परिवर्तनाला सुरुवात होते...
On 18/08/2011 10:02 PM vrushali said:
अन्ना आम्ही पाठीशी आहोत असा नुसत म्हणून चालणार नाही आहे. मी कोणालाच लाच देणार नाही माझ काम करण्यासाठी असा प्रत्येकाने पण करावा हा खरा अण्णांचा पाठींबा असेल.
On 18/08/2011 09:50 PM Sudhir Kale (Author) said:
विक्रांत-जी, नेहमीप्रमाणेच अतिशय दर्जेदार प्रतिक्रिया. मनापासून धन्यवाद. सुधीर
On 18/08/2011 09:49 PM Sudhir Kale (Author) said:
प्राची मॅडम, अण्णांना देवत्व द्यायचा माझा प्रयत्न नव्हता, पण सध्या "धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" अशी भारताची अक्षरश: परिस्थिती आहे. धर्मावरची ही आपत्ती दूर करायला अशा वेळी केवळ एक व्यक्ती भारतात उभी आहे ती म्हणजे अण्णा. त्यावरून गीतेतला तो श्लोक आठवला व त्यातून देवत्वाचा केवळ एक 'रूपक' म्हणून उल्लेख केलेला आहे. त्याचा अर्थ तामिळनाडूमध्ये जशी जयललिता किंवा रजनीकांत यांची देवळे बांधली जातात तसा उद्देश त्या उल्लेखात नव्हता!
On 18/08/2011 08:50 PM Jignesh said:
आपण परदेशात राहणारे लोक अण्णांच्या सोबत आंदोलन करू शकत नाही पण किमान एक दिवसाचा उपवास (फक्त पाणी पिऊन) ठेवू शकतो नाही का? मग आपण सर्व उद्या अण्णांचा पहिला दिवस आहे उपोषणाचा. एक दिवस तरी त्यांना साथ देऊ या. ज्यांनी उपवास ठेवलं त्यांनी येथे कॉमेंट्स टाकून सांगावे. बघू तरी किती बोलघेवडे लोक आहेत आणि किती सच्चे.
On 18/08/2011 05:52 PM Sudhir Kale (Author) said:
वैशालीताई, म्हणूनच मी माझ्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे कीं एकदा अण्णा जिंकले कीं पुढचा नेम Corporate leaders वर धरायला हवा. हे श्रीमंत लोक आपल्या गडगंज संपत्तीचा दुरुपयोग करून या नेत्यांना किंवा बाबू लोकांना पैसा ’चारतात’ तेंव्हाच ही जनावरे तो पैसा खातात! पण एका वेळी एक पाऊल उचलूया. आधी अण्णांचा विजय होऊ दे. खरे तर त्यांना राष्ट्रपतीच बनवायला हवे म्हणजे येतील सगळे वठणीवर! (Repeated Transmittal)
On 18/08/2011 05:51 PM Sudhir Kale (Author) said:
राजघाटावर जेंव्हां अण्णासाहेब चिंतनाला बसले होते तेंव्हांही अशीच गर्दी लोटली होती. त्यातला एक विशीतला तरुण एका वाहिनीच्या वर्ताहाराला म्हणाला कीं आमच्या पिढीला महात्मा गांधींना पहायचे भाग्य लाभले नाहीं. पण आज अण्णांच्या रूपाने आम्हीं गांधींना पहातोय्! खरंच त्याने हजारों तरुणांच्या मनातलं किती अचूक व योग्य शब्दांत मांडलं, नाहीं कां? (Repeat transmittal)
On 18/08/2011 05:50 PM Sudhir Kale (Author) said:
मूर्तिमंत त्यागमूर्ती असलेल्या अण्णांच्या नेकीपुढे सरकार गुढग्यावर आले आहे. हा "करू किंवा मरू" लढा आपले उद्दिष्ट सफल होईपर्यंत असाच चालू ठेवला पाहिजे. पहिले उद्दिष्ट असावे कीं सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांना व खासदारांना तुरुंगात टाकणे व ठराविक काळात चौकशा पूर्ण करून शिक्षा ठोठावणे. सर्व कलंकित मंत्र्यांची व खासदारांची लोकसभेतून/राज्यसभेतून हकालपट्टी. तिसरे उद्दिष्ट असावे सौ. प्रतिभाताईंना राजीनामा देण्याची विनंती करून श्री अण्णा हजारेंची राष्ट्रपती म्हणून निवड व शपथविधी! वा! क्या बात है!! Repeated
On 18/08/2011 02:28 PM sulabha chhatre said:
अतिशय उत्तम लेख - खूप आवडला !!
On 18/08/2011 02:20 PM Atul said:
पैसा पैसा करते हे सब पैसे पे हि मरते हे. भ्रष्टाचार संपवायला नेते कसे तयार होणार स्वताच्या पायावर दगड मारायला ते काय वेडे होणार जबाबदार आहोत आपणच या सर्वाला चला अण्णांना साथ करू या भ्रष्टाचार कमी करायला त्यांचे हात मजबूत करू या वंदे मातरम जय हिंद
On 18/08/2011 02:17 PM yogesh kindre said:
आली रे आली आता आमची बरी आली .......... आता आमची सटकली ..............हीच वेळ आहे संधी सोडू नका सर्वांनी या लढ्यात सामील व्हा .आण्णा हजारे झिंदाबाद .......
On 18/08/2011 12:58 PM Prasad Chaini said:
भ्रष्टाचार स आपण हि काही अंशी जबाबदार आहोत , कारण मातदानाच्या दिवशी लागून सुट्टी आली कि आपण पिकनिक ला जातो किंवा घरातच झोपून राहतो. आशयामुळे कोणीतरी लाल्लुपान्जू पैसे वाटून आपला नगरसेवक, आमदार , खासदार होतो. ह्याकडे आपण दुर्लक्ष्य करतो, येणारी पुढील ४ वर्षे ११ महिने आपण त्यांना फुकट शिव्या घालतो. तेंव्हा जेंव्हा जेंव्हा मतदान असेल तेंव्हा राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान कराच ! - जय हिंद
On 18-08-2011 12:36 PM देवदत्त भोसले said:
अप्रतिम लेख
On 18/08/2011 12:17 PM Mahendra Luniya said:
If we are serious about stop corruption from INDIA, We need a simply correction in SAMVIDHAN, That is: Any of indian can not eligible for third time election on any public voted post like member of Gram panchayat / corporator / MLA & MP. Then look after 10year INDIA is free from current politicians & then within 5 year a new generation comes in politics & INDIA becomes a world's super power!!! Thought & spread in Ur friends! Make new revolution to change SAMVIDHAN for corruption free INDIA!!! JA
On 18/08/2011 11:36 AM Sudhir Kale (Author) said:
वैशालीताई, म्हणूनच मी माझ्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे कीं एकदा अण्णा जिंकले कीं पुढचा नेम Corporate leaders वर धरायला हवा. हे श्रीमंत लोक आपल्या गडगंज संपत्तीचा दुरुपयोग करून या नेत्यांना किंवा बाबू लोकांना पैसा ’चारतात’ तेंव्हाच ही जनावरे तो पैसा खातात! पण एका वेळी एक पाऊल उचलूया. आधी अण्णांचा विजय होऊ दे. खरे तर त्यांना राष्ट्रपतीच बनवायला हवे म्हणजे येतील सगळे वठणीवर!
On 18/08/2011 11:22 AM Shashank Salunkhe said:
अप्रतिम लेख आहे. भ्रष्टाचार करणार्यांना इतक्या लवकर अटक होत नाही. कलमाडी, राजा यांना अटक करण्यात किती दिवस लावले सरकार ने. मग आण्णा ना काही न करता अटक का? त्यांच्या उपोषणं ला लावण्यात आलेल्या अटी खूप हास्यापद आहेत. ५० गाड्या ची परवानगी देतात मूर्ख. सरकार च्या चहापाना च्या कार्यक्रमा ला किती गाड्या येतात सांगावे यांनी?
On 18/08/2011 11:10 AM sandip said:
जरी सामान्य जनता अण्णांच्या पाठीशी भक्कम उभी असली तरी, विरोधी पक्ष मात्र बघ्याचीच भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे हा लढा सामान्य नागरिक आणि भ्रष्ट नेते असाच होणार आहे, आणि हीच वेळ आहे ह्या सर्व भ्रष्ट नेत्यांना हाकलून लावायची .....
On 18/08/2011 10:41 AM अतुल जोशी said:
खर तर लिबिया आणि इटलीतील जनतेने केलेल्या क्रांतीपासून आपल्या राज्यकर्त्यांनी काहीच बोध घेतलेला दिसत नाही...तसेही आपले राज्यकर्ते कशाचाच बोध घेत नाहीत म्हणा...हे सामान्य माणसाचे पोटाच्या लढाई साठी चाललेले अहिंसक आंदोलन आहे...वेळीच शहाणे व्हा नाहीतर लोक जाळण्यासाठी लाकडेहि द्यायची नाहीत.....
On 18/08/2011 10:40 AM Ujwala said:
अण्णांना देशातून- परदेशातून मिळणारा पाठींबा पाहून ऐक्याचे आवाहन करणारे एक जुने गाणे आठवले. 'देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे..सप्त सागराला शक्ती, बिंदू बिंदू मिळता पाणी, एकजीवी अनुरेणूची युगे युगे फिरते धरती, प्रेमभाव स्वप्नी वचनी, पाचामुखी ईश्वर बोले.भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकून जाळे, पंख गुंतवूनी पंखी एकरूप पक्षी झाले, गळ्यामध्ये घालून गळा, मृत्युलाच मारून गेले, वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा, गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात घालीत घावा, चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्ष लावून डोळे
On 18/08/2011 10:40 AM Ujwala said:
अण्णांना देशातून- परदेशातून मिळणारा पाठींबा पाहून ऐक्याचे आवाहन करणारे एक जुने गाणे आठवले. 'देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे..सप्त सागराला शक्ती, बिंदू बिंदू मिळता पाणी, एकजीवी अनुरेणूची युगे युगे फिरते धरती, प्रेमभाव स्वप्नी वचनी, पाचामुखी ईश्वर बोले.भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकून जाळे, पंख गुंतवूनी पंखी एकरूप पक्षी झाले, गळ्यामध्ये घालून गळा, मृत्युलाच मारून गेले, वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा, गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात घालीत घावा, चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्ष लावून डोळे
On 18/08/2011 10:40 AM Ujwala said:
अण्णांना देशातून- परदेशातून मिळणारा पाठींबा पाहून ऐक्याचे आवाहन करणारे एक जुने गाणे आठवले. 'देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे..सप्त सागराला शक्ती, बिंदू बिंदू मिळता पाणी, एकजीवी अनुरेणूची युगे युगे फिरते धरती, प्रेमभाव स्वप्नी वचनी, पाचामुखी ईश्वर बोले.भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकून जाळे, पंख गुंतवूनी पंखी एकरूप पक्षी झाले, गळ्यामध्ये घालून गळा, मृत्युलाच मारून गेले, वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा, गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात घालीत घावा, चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्ष लावून डोळे
On 18/08/2011 08:09 AM Mahesh Joglekar said:
खालील संस्थेचा जरूर अभ्यास करावा Independent Commission Against Corruption (ICAC) http://www.icac.nsw.gov.au/about-the-icac/overview
On 18/08/2011 08:02 AM Sudhir Kale (Author) said:
For Mr Sameer, Nagpur: राजघाटावर जेंव्हां अण्णासाहेब चिंतनाला बसले होते तेंव्हांही अशीच गर्दी लोटली होती. त्यातला एक विशीतला तरुण एका वाहिनीच्या वर्ताहाराला म्हणाला, "आमच्या पिढीला महात्मा गांधींना पहायचे भाग्य लाभले नाहीं. पण आज अण्णांच्या रूपाने आम्हीं गांधींना पहातोय्!" खरंच त्याने हजारों तरुणांच्या मनातलं किती अचूक व योग्य शब्दांत मांडलं, नाहीं कां?
On 18/08/2011 07:57 AM Sudhir Kale (Author) said:
मूर्तिमंत त्यागमूर्ती असलेल्या अण्णांच्या नेकीपुढे सरकार गुढग्यावर आले आहे. हा "करू किंवा मरू" लढा आपले उद्दिष्ट सफल होईपर्यंत असाच चालू ठेवला पाहिजे. पहिले उद्दिष्ट असावे कीं सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांना व खासदारांना तुरुंगात टाकणे व ठराविक काळात चौकशा पूर्ण करून शिक्षा ठोठावणे. सर्व कलंकित मंत्र्यांची व खासदारांची लोकसभेतून/राज्यसभेतून हकालपट्टी. तिसरे उद्दिष्ट असावे सौ. प्रतिभाताऊंना राजीनामा देण्याची विनंती करून श्री अण्णा हजारेंची राष्ट्रपती म्हणून निवड व शपथविधी! वा! क्या बात है!!
On 18/08/2011 05:09 AM vaishali said:
टाळी एका हातानी वाजता नाही ". मी लाच देणार नाही' म्हणायला हवे. तसे वागायला हवे. 'आपले काम लवकर हवे लह्क देणे"' tax चुकतो म्हणून पावती न घेणे " ह्या गोष्टी टाळायला हव्यात पाया पासून सुधारणा हवी. तरच कळस टिकेल .
On 18/08/2011 05:08 AM Tillu said:
परदेशात बसून ई-सकाळ वर प्रतिक्रिया देणारे आपण ! - भारतात परत गेल्यावर स्वताचे नुकसान होत असतानाही भ्रष्टाचाराला मूक संमती देणार नाही , याची कोणीतरी खात्री देऊ शकेल काय ? दिल्लीत लढली जाणारी हि राजकीय हक्कांची लढाई खर्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी " पदराला खार लागला तरी चालेल,कामे उशिरा झाली तरी चालतील, पण अगदी छोट्या गोष्टीमाध्येही गैर मार्गाची मी अवलंब करणार नाही" हे एक साधे तत्व अमलात आणू या.
On 18/08/2011 02:27 AM atul said:
कोन्ग्रेस आणि इतर भ्रष्ट आज साफ चेकमेट झाले आहेत!!! लोक रस्त्यावर उतरले तर नेत्यांचा माज उतरवू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण जे आपल्या नालायक नेत्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पिले नसेन...
On 18/08/2011 02:04 AM Aniket said:
खूप छान ......आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अण्णा...!!!!!
On 18/08/2011 01:46 AM reporter shivaji patil said:
अण्णा नही ये आंधी है; इंडिया का दुसरा महात्मा गांधी है! अण्णा हम तुम्हारे sath है!
On 18/08/2011 01:15 AM bhau said:
Irrespective of Bhishma’s lifelong work, due to his stand, history considers him as He did fight against Dharma at kurukshetra While Vidur was smart to resign quickly before the war & always known to making right decisions. We respect ManmohanSigh as sole architect of India’s economic U-turn from 1991 bankruptcy into 2011 prosperity. He is like economic Bhishma Pitamah to India but been caught in congress kaurav. ManmohanSigh has choice to make, to remain as Bhishma Pitamah or to act like Vidur.
On 18/08/2011 01:02 AM pallavi said:
उत्तम लेख आहे.. ! खोचकपणा व कळकळ योग्य प्रमाणात वापरून केलेले सद्यपरिस्थितीचे वर्णन !
On 18/08/2011 12:47 AM RahulT said:
Like !!!!! Supper Like !!!!! Count Down has Started for Congress Govt !!!!!! Team MMS and its Owners Go Home for Forever ....
On 18/08/2011 12:46 AM Prachi said:
छानच जमालाये लेख...बराचसा पटलाही...पण एक नक्की सांगावस वाटतये, की आण्णांना देव म्हणू नका, महामानव म्हणा हव तर...कारण: १. महामानवाच्या कार्याचा वेध घेता येतो, देवाचे कार्य कार्य नसून "दैवी चमत्कार" असतो (जो मानवाला करणे अशक्य असते). २. आज देशाला अण्णांच्या भक्तांची नव्हे तर अनुयायांची तसेच सक्षम नेत्यांचीही गरज आहे. सरकार एक अण्णांना गप्प करेल पण १२० कोटी अण्णांना गप्प करणे शक्य नाही.
On 18/08/2011 12:22 AM sanjay waykar @ Doha, .Qatar said:
या सरकारला भ्रष्टाचार विरोधी सशक्त कायदा आणायची इच्छा नाही म्हणून काहीतरी सबबी पुढे करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे विरोधी पक्ष देखील मुग गिळून गपं आहेत.ते फक्त आंदोलन करण्याच्या अधिकाराविषयी बोलतात सक्षम लोकपालाला पाठींबा देत नाहीत जय हो !! सशक्त लोकपाल कायदा आला तर त्यांची पण खावूगिरी बंद नाही का होणार ? लोकानो जागे व्हा अण्णा ना साथ द्या या चोरांना निवडणुकीत चांगला धडा शिकावा ... जय हिंद !!!!!!!!!
On 18/08/2011 12:22 AM Kau Shenghare said:
MMS is a PIMP
On 18/08/2011 12:12 AM vikrant,chicago said:
,,२,, तसेच मनमोहन सिंग यांनी पायउतार होऊन आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्यास ते खरच भारतातील सर्वांची मने जिंकतील. भ्रष्टाचाराची 'कोटीच्या कोटी उड्डाणे' बंद झालीच पाहिजेत. भारतात अचाट तरुणाईची ताकद तयार होत आहे. वेळीच जागे झाले नाही तर ही ताकद अराजक निर्माण करू शकेल. सद्सद्विवेकबुद्धी आणि देशप्रेम याची वानवा आहे पण आण्णांच्या किमयेने देशात भ्रष्टाचार द्वेषाची लाट पसरणार आणि भल्या भल्याचे त्यात भस्म होणार हे नक्की! आल्पल्या सगळ्या लेखांपेक्षा हा सरस लेख आहे आणि आपले आभार मानावे तितके थोडेच आहे.
On 18/08/2011 12:09 AM GIRISH said:
Govt takes 8 months to arrest Kalmadi,1 year to arrest Raja.3 years to conviction Ajmal Kasab who has killed 200 people. The Maharastra Govt can shoot fleeing farmers from behind.. and now a super efficient system has realised that a 74 year old Anna Hazare can be a threat to the Nation and peace if he starts fasting so put him to Tihar Jail... This is really a CRUEL JOKE...
On 18/08/2011 12:04 AM vikrant,chicago said:
..१..सुधीरजी, इतका उत्तम लेख बर्याच दिवसात वाचायला मिळाला नव्हता. आणीबाणीमध्ये भीतीच्या वातावरणात सर्व देश जसा वावरत होता आणि सरकारी भ्रष्टाचार्य जसे माजलेले होते तसेच आता झाले आहे. कॉंग्रेसच्या विरोधात एकत्र येण्याचे मात्र कोणताही पक्ष बोलत नाही. जयप्रकाश नारायण यांच्या इतकीच आण्णा हजारे यांच्या आंदोलनात ताकद आहे. भ्रष्टाचाराने ग्लानी आलेल्या देशात अधर्म नष्ट करण्यासाठी आण्णा हजारे यांच्या रुपात परमेश्वर आला आहे हे आपण माझ्या मनातलेच विचार उद्धृत केलेत! पोलिसांना राखी बांधणे हि उत्तम कल्पना!
On 18-08-2011 12:01 AM Datta said:
उद्या कुणी महाराष्ट्र वेगळा हवा, विदर्भ हवा म्हणून आमरण उपोषणाला बसले तर? काश्मीर, अरुणाचलाला स्वताम्र्त्य हवे म्हणून उपोषण केले तर ? संसद बरखास्त करून टाका. ज्याला जे हवे ते उपोषण केल्याबरोबर देऊन टाकावे. कशाला त्या निवडणुका? निवडून देणारेच असं म्हणता असतील कि आम्ही निवडून दिलेल्याम्पासुना आजादी हवी तर बंद करा हे सगळं. लोकशाही आहे. कुणीही उठावे आणि देश चालवावा. प्रधान म्मत्र्याम्ना चोर म्हणावे, न्यायमुर्तीना खडसावे.
On 17-08-2011 11:55 PM Nitin Nagpure said:
Please put one "like' button here......too good info
On 17/08/2011 11:41 PM Vasant said:
एक नंबर लेख आहे ...वाह वाह .... एकदम kharya aahet या लेखातल्या gosti. dewachya krupene ha diwas lawkar yewo
On 17/08/2011 11:38 PM Balaji Birajdar said:
वाह ....असा तडफदार लेख सकाळ मध्ये खूप दिवसांनी वाचला .. असे वाटले कि आमच्या मनार्ल्या भावनाच शब्दरुपाने अवतरल्या आहेत .. शब्द अन शब्द पटला. खरोखर ही एक स्वातंत्र्य चळवळ च आहे. सर्व सामान्य भारतीयाचे मेहनतीचे पैसे गिळंकृत करणाऱ्या नेता रुपी राक्षसाकडून स्वातंत्र्य पाहिजे...
On 17/08/2011 11:33 PM Vijay said:
मित्रांनो.. अरे आपल्या सर्वच आमदार खासदारांचे हात पाय भ्रस्थाचाराने कमी अधिक प्रमाणात बरबटले आहेत.. मग तुम्हाला वाटते काय कि ते लोकपाल ला पाठींबा देतील?? मला तर शक्यच नाही वाटत. ह्या लढाईमध्ये सामान्य जनता, आण्णा एका बाजूला तर राजकीय नेते, भ्रष्ठ सरकारी नोकर आणि व्यावसायिक आहेत. त्यामुळे हि लढाई प्रत्येकाने रस्त्यावर येऊन लढावी लागेल.. नाही ऐकले तर आणांना नवीन पक्ष कढीला लावू कि जो हे विधेयक संमत करेल.. तुमची प्रतिक्रिया काय?
On 17-08-2011 11:33 PM Mahesh Kadam said:
अप्रतिम लेख.. खूप आवडला..!!
On 17/08/2011 11:22 PM SADGIR POPATRAO said:
फारच छानन खूपच सुंदर ....असेच मार्मीक लेखन हवे ... धन्यवाद !!!!!!
On 17/08/2011 11:17 PM vijay said:
गांधी घराण्याला देशाच्या बाहेर काढायची हीच योग्य वेळ आहे.स्वतान्त्र्यंतर देखील गेली ६० वर्षे गांधी घराणेच देशावर राज्य करत आहे.
On 17/08/2011 11:17 PM Soniya tawade said:
आगे बढो आगे बढो, समय कि पुकार है...आगे बढो आगे बढो भ्रष्टाचार मिटाना है, अन्ना को जीताना है एंक साथ जुडके विचारो की नयी नीव बनानी है..भविष्य के लिये अपनी एंक पेहचान बनानी है..समय कि पुकार है...आगे बढो आगे बढो
On 17/08/2011 11:12 PM niraj said:
आमेन!!
On 17/08/2011 11:11 PM Suhas Kulkarni said:
Congress is not mad. Their think tanks have taken a calculated risk by arresting Mr. Anna Hazare. What would have happened, if he would not have been arrested. Opposition parties would have made a hue and cry for Ms. Sheela Dixit’s resignation. Now the entire agenda of opposition parties has been re-directed towards Anna. Timing is much important in politics (remember Monsoon Session of parliament is in process), Sheela’s resignation was inevitable. In short CONGRESS HAS MANAGED TO SAVE SHEELA
On 17/08/2011 11:10 PM tomindie said:
Time has come to kick out UPA Govt and mainly Sonia Rahul Manmohan Sibbal Chidambaram ManishTiwari ManuSinghvi sanjaynirupam pawar kalmadi raja kanunanidhi and Digvijay out of Politics
On 17/08/2011 11:10 PM Rohit said:
अतिशय सुंदर लेख आहे. आण्णाना पूर्ण भारत देशाचा पाठींबा आहे... भारत माता कि जय !!!
On 17/08/2011 10:54 PM Amit said:
एकदम मनातला बोललात... संसदेच काम कायदे बनवण आहे. मान्य... पण तुम्ही वाट्टेल ते कायदे बनवाल तर आम्ही गप्प बसू का.. चानल वाले म्हणतात लोक उगाच जमलेत.. त्यांना लोकपाल आणि जन-लोकपाल यातला फरक माहित नाही.. साफ खोटं... आता पर्यत प्रत्येत सामान्य माणसाने बरोबर फरक सांगितलाय..
On 17/08/2011 10:53 PM Atul Jadhav said:
अरे आवाज..........कुणाचा!!!!!!!!! अण्णासाहेबांचा!!!!!!!!!!!!!!!
On 17/08/2011 10:47 PM rahul said:
कॉंग्रेस चे नेते आता बघा किती defensive होत आहेत ......मौन मोहन सिंग जी ...आता तरी जागा ....का अजून remote control made in Italy आहे ? remote control फेकून देता येत नसेल तर battery कडून फेकून द्या ...२ दिवस तरी जरा तुम्ही पंतप्रधान आहात हे दाखवून द्या ...नाहीतर फार भयानक होणार
On 17/08/2011 10:30 PM jackie said:
अण्णा हे गांधीपेक्षा पण सरस आहेत. कॉंग्रेसला गांधी सरळ नाही करू शकले. आणि त्यांनी परकीयांविरुद्ध लढा दिला. अण्णांना तर स्वकियांविरुद्धच लढा भ्रष्टाचार मिटवण्यास द्यावा लागत आहे. तेही पूर्णपणे अहिंसक मार्गाने. म. गांधीचा फोटो चलनावर छापणारे कॉंग्रेसवाले यांची किती दारूची दुकाने आहेत ते बघितले तर बापूंना खूप शरम वाटेल. जय हो अण्णागिरी !!
On 17/08/2011 09:26 PM kantilal said:
अप्रतिम लेख जागो मोहन सिंगजी --पद सोडून जनतेत सामील व्हा तरुणान मधून शहीद भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव , निर्माण झाले तर काय होईल तुमचे याचा विचार करा
On 17-08-2011 07:54 PM kishor said:
party, so called
On 17-08-2011 07:53 PM kishor said:
The principles and policy of the Democratic party, so called. new DEFINATION OF DEMOCRACY Government by the LEADERS; a form of government in which the supreme FAMILIES are retained and directly exercised on the people Government by popular CORRUPTORS; a form of government in which the supreme FAMILIES are retained by the LEADERS, but is directly exercised through a system of representation and delegated authority periodically(?) renewed; a constitutional CORRUPT government; a AUTOCRATIC
On 17-08-2011 07:52 PM kishor said:
DEFINATION OF DEMOCRACY Government by the people; a form of government in which the supreme power is retained and directly exercised by the people. Government by popular representation; a form of government in which the supreme power is retained by the people, but is indirectly exercised through a system of representation and delegated authority periodically renewed; a constitutional representative government; a republic Collectively, the people, regarded as the source of government.
On 17/08/2011 07:44 PM piyush said:
फेसबुक चा वापर करणार्यान साठी like चे बटन पाहिजे होते ..
On 17/08/2011 07:42 PM piyush said:
खरच प्रोसहान देणारा लेख आहे ..अतिशय छान !
On 17/08/2011 06:44 PM DRKAMLAKaRBDESHPANDE said:
महात्मा गांधी -राष्ट्र पिता - अन्न हजारे -राष्ट्र ताता - कॉंग्रेस -- राष्ट्र कर्ता तेवे सर्वांनी राष्ट्र चे रक्षण करावे -आंदोलने करून समस्या वाढतात -सुटत नाहीत नुकसान राष्ट्र चे होते .माणसे दुरावतात तेवा सर्वांनी बंधू भाव जपावा
On 17/08/2011 05:53 PM ganesh said:
खूपच छान विश्लेषण .. शब्दातून सुधा चीड दिसत आहे .. चेहरा बघण्याची गरज नाही. आताच पंतप्रधान (बोलका बहुला) संसदेमध्ये वक्तव्य करून गेले कि संसदेपेक्षा देशात काही मोठे नाही .. अरे संसद दगडी इमारत आहे त्यात बसलेल्याला लोकांना या चिडलेल्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेने निवडले आहे मग संसद श्रेष्ठ कशी ? आणि मनमोहन स्वतः निवडून आले नाहीत ते आशीर्वादाने आले आहेत त्यांना म्हण्याचे असेल १० जनपथ जगात सर्व श्रेष्ठ आहे .. चुकीने दुसरे काही तरी बोलले ---nice and the artical also very very good!!! we support anna!
On 17/08/2011 05:16 PM Vande matram said:
पडून taka हे भ्रष्ट सरकार नको आम्हाला अस्लीये नेते
On 17/08/2011 04:47 PM jayraj said:
खतरनाक लिखाण आहे !!! उदेश हि चांगला आहे. संपूर्ण भारत वर्ष आण्णाच्या पाठीशी उभे आहे. खरे पाहता विनाशकाली विपरीत बुद्धी आशी गत मनमोहन सरकारची झाली आहे. तो सिब्बल तर डोक्यावर पडला आहे, म्हणून असे बेजबाबदार वक्तव्य करत आहे. खरे पाहता आजकालच्या नेत्यांनी स्वातंत्र्य लढा पहिला नाही, आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले ह्याची जाणीव त्यांना नाही, गांधींच्या विचारांवर चालणारा कॉंग्रसे पक्ष त्यांच्याच विचारणा लाथाडत आहे. मनमोहन सरकारच्या चड्डीची नाडी आता जनतेनी खेचली आहे; म्हणून त्यांची पळताभुई झाली आहे.
On 17/08/2011 04:26 PM Trupti Raulkar said:
खूप छान आहे. सरकारला अद्दल घडलीच पाहिजेत...
On 17/08/2011 04:17 PM Ajit said:
Hats off to Anna Hazare who started new Anti-Corruption movement. Wish Whole republic will join him for the cause
On 17.08.2011 04:04 Gokul said:
अप्रतिम लेख .......
On 17/08/2011 03:54 PM Mangesh Thube said:
हीच खरी वेळ आहे दुसऱ्या स्वातंत्र लढ्याची. चला लोकहो सर्व जागे व्हा आणि पेटून उठ या सरकारच्या विरोधात. थेंबे थेंबे तले साचे तसे आपण एक एक जन जमा होऊन ह्या आंदोलनात सहभागी होऊया आणि ही लढाई लढूया आणि आपण जिंकानाराच !!!!!!!!!1
On 17/08/2011 03:53 PM सतीश सोनवणे said:
सकाळचे मनापासून अभिनंदन........ लेख छापल्याबद्दल! सकाळ ने समाजजागृतीला हातभार लावावा.....[ बरेच पुणेकर फक्त सकाळ वाचतात....त्यामुळे भ्रष्टाचार विरोधात पुणेकर त्यामानाने कमी जागृत आहेत असे वाटते.] श्री गणेश महाडिकांची प्रतिक्रिया एकदम भावली...PG...नुसते पंतप्रधानांनी नाही तर समस्त पोलीसदल / सैन्यदल यांनी लेख वाचवा असे वाटते......"मतपरिवर्तन काय कधीही / कुठल्याही वयात होऊ शकते... जर वाल्याचा श्री वाल्मिकी होतात तर...भ्रष्टाचार्यांना देखील उपरती शकते..संपत्ती सरकारजमा होऊ शकते..चला आशा करू यात!
On 17/08/2011 03:43 PM Bj said:
आपण नुसते लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष लढ्यामध्ये सामील व्हायला पाहिजे तरच तो लढा यशस्वी होईल आपण सगळ्यांनीच सामील व्हायला हव लेख खूपच चं आहे पण या राजकारणी लोकांच्या डोक्यावरून जाईल.
On 17/08/2011 03:35 PM pyarelal chaudhary said:
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारी तिजोरीला गंडा घालून बुडवले गेलेले एक लाख श्याहात्तर हजार कोटी म्हणजे किती शून्ये रे भाऊ ?
On 17/08/2011 03:17 PM VISHAL said:
वेरी NICE
On 17-08-2011 03:10 PM Somnath Sake said:
आपण दुसरया स्वातंत्र्यासाठी लढत आहोत पण हा लढा फार कठीण आहे.इंग्रजांनी जे काही कमावले ते त्यांच्या देशासाठी त्यामुळे तो लढा इंग्रज विरुद्ध हिंदुस्तानी असा होता.आता लढा हा स्वार्थी स्वकीयान विरुद्ध आहे.त्यामुळे हिंदुस्तानींची एकजूट असणे महत्वाचे आहे.हे राजकारणी काही न काही तरी करून त्यांचा कार्यभाग पूर्ण करतील असे वाटते.महाभारताप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता लढावे लागेल.तरच या भ्रष्टाचारी राक्षसांवर विजय मिळवता येईल.
On 17/08/2011 03:09 PM manoj mule said:
जय ho
On 17/08/2011 03:04 PM ashadeep said:
अतिशय "समर्पक अप्रतिम आणि अतिशय विचारपूर्वक" लेख लिहिलेला आहे हा. हा लेख कॉंग्रेस चे बगळे वाचणार नाहीतच आणि चुकून वाचलाच तर त्यांना" उलट्या .मळमळ, जुलाब "ला सुरवात झाली असेल . हॉस्पिटल बुक करून ठेवा .......................
On 17/08/2011 02:56 PM सुहास कुलकर्णी said:
खूप छान लेख. गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आता घाबरले आहेत. झाल्या प्रकाराबद्दल एकही नेता चकार शब्द काढावयास तयार नाही. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे लोकपाल बिल पास झालेच पाहिजे. जे आतापर्यंत झाले ते पुरे झाले. या लढ्यात आम्ही सर्व अण्णांच्या पाठी उभे आहोत.सध्याचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग "भारतहृदयसम्राट" ही जनतेच्या प्रेमाची उपाधी स्वीकारण्यास तयार आहेत का?
On 17/08/2011 02:54 PM Ashok said:
चला सर्वजण अण्णांना सपोर्ट करू .......................... अण्णा झिंदाबाद.........
On 17/08/2011 02:35 PM mahesh said:
very intresting chapter
On 17/08/2011 02:31 PM Nitin Gulhane said:
India is a country of corrupt people. Of greedy people. No laws and bills can make Indians honest. There are ways to honesty but it will be a very painful path. I don't think we have enough people who can walk the difficult path of corruption free India. At least not yet.
On 17/08/2011 02:17 PM jayant kulkarni said:
अभिनंदन ..छान लेख आहे. धन्यवाद सकाळ.
On 17/08/2011 02:13 PM GANESH MAHADIK said:
आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी." --रामबाण वाक्य .... पण जर राखी बांधून घ्यायला नकार दिला तर बांगड्या भरायला पण विसरू नका .........
On 17/08/2011 02:11 PM saurabh said:
एकच नंबर लेख आहे!! जय हिंद!!
On 17/08/2011 01:46 PM Avinash K thoray said:
khup chan
On 17/08/2011 01:43 PM PG said:
खूपच छान !! मला वाटते आशेच लेखाचे पंतप्रधानांना व्यक्तीक लेख द्यावा. तसेच लोकांच्या प्रतिक्रिया पण वाचायला द्यावा.
On 17/08/2011 01:39 PM nitin said:
खूपच छान लेख आहे. आण्णा तरुण पिढी तुमच्या बरोबर आहे. खरच सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीं.
On 17-08-2011 01:31 PM amar said:
WE support अन्नाहाजरे
On 17/08/2011 01:27 PM Chinmay said:
फारच छान लेख आहे !! But what I think is - instead of shitting on social networking sites, etc, let us participate in the rally to support Annaji. The impact of physical presence is far more effective than this one. Look at the other countries like Lybia, Egypt, etc - after all it is Jana Shakti
On 17/08/2011 01:21 PM shrinivas said:
anna tum aage badho hum tumahare saath hai
On 17/08/2011 01:14 PM sameer said:
जनता कुठपर्यंत सहन करणार ...आता बस
On 17/08/2011 01:09 PM sawan said:
लई भारी ! छान विचार मांडलेत. प्रत्येकाने असे जसे शक्य आहे तसे जागरण/आंदोलन केले पाहिजे. कारण आजपर्यंत या राज्यकर्त्यांना लोकांचे ऐकायची सवय नव्हती. आता त्यांना ते शिकवले पाहिजे. हे राज्य लोकांचे आहे आणि लोकांसाठी आहे. ना कि राज्यकर्त्यांचे--राज्यकर्त्यासाठींचे, ज्याचा या लोकांना विसर पडला आहे. लोकशाहीत जर राज्यकर्ते लोकांचे ऐकत नाहीत तर .... सगळ्यांनी या लढ्यात सामील झाले पाहिजे.
On 17/08/2011 01:03 PM Vinayak Potghan said:
खूपच छान लेख आहे...
On 17/08/2011 12:57 PM Rohit Sonawale said:
एकदम बरोबर आणि स्पष्ट. अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या नव्या भारताचे नवे रूप पाहण्यास उत्सुक आहोत. जय हिंद ! जय भारत ! रोहित सोनावले - भारतीय नागरिक
On 17/08/2011 12:55 PM अजित काजळे, सिडनी, ऑस्ट्रेलिया said:
सकाळने हा (असला वास्तव्य दाखवणारा) लेख छापायचे धैर्य केले घरच्या लोकांचा विचार न करता ह्या बद्दल सकाळचे अभिनंदन
On 17/08/2011 12:54 PM lal said:
ho shevatache naav कोणाचे te कळले; pan te ase aspasht ka chapale asave????
On 17/08/2011 12:51 PM Raje said:
ब्रिटिश काळातही असे नियम नव्हते. तर अण्णांवर असे कडक नियम लावून लोकांच्या आंदोलन करण्याच्या अधिकारावर सरकार गदा आणत आहे. मुळात एवढी लोक अण्णांच्या पाठिशी का आहेत. त्या लोकभावनेचा विचार सरकार करत नसून, मुठभर वकिलांच्या सल्ल्यावर ते अशी समाजविरोधी कृती करत आहेत
On 17/08/2011 12:49 PM pradip said:
खूप छान लेख मला आवडला! लेखकाचे छान लिहिल्या बद्दल आणि सकाळ चे त्याला प्रसिद्धी दिल्या बद्दल आभार आणि कौतुक ...
On 17/08/2011 12:41 PM प्रतिभा said:
आज देशात जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कॉंग्रेस वाले करत आहेत पण जनता आण्णा हजारे बरोबर आहे आणि हे कॉंग्रेस वाले पचवू शकत नाहीत म्हणून दंडुकेशाही वापरली जात आहे, इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले पण या दुसर्या स्वातंत्र्य पासून देशाला सुटका मिळेल ती पण खूप महत्वाची वाटते आज आपण जगात याच कारणाने मागे पडत आहोत म्हणून.
On 17/08/2011 12:41 PM Sameer,Nagpur said:
आम्ही गांधीजी पुस्तकात वाचले पण आण्णांच्या रूपाने त्यांना अनुभवत आहोत. जय हो ! वंदे मातरम !! ह्या नालायक साकारला खाली खेचा ह्यांचे आता अति झाले आहे .....
On 17/08/2011 12:37 PM sai said:
अतिशय सुंदर लेख आहे , आज खरच आपली लोकं जागी झालेली आहेत. जाग उठा है आज देश का वाह सोया अभिमान प्राची कि चंचल किरणो पर आया स्वर्ण विहान .. स्वर्ण प्रभात खिला घर घर मे जागे सोये वीर युद्ध स्थल मे सज्जीत होकार बढे आज रणधीर आज पुनः स्वीकार किया है असुरोंका आव्हान जाग उठा है आज देश का वाह सोया अभिमान भारतमाता कि जय.
On 17/08/2011 12:34 PM r v mangrulkar said:
आपण दुसरया स्वातंत्र्यासाठी लढत आहोत पण हा लढा फार कठीण आहे.इंग्रजांनी जे काही कमावले ते त्यांच्या देशासाठी त्यामुळे तो लढा इंग्रज विरुद्ध हिंदुस्तानी असा होता.आता लढा हा स्वार्थी स्वकीयान विरुद्ध आहे.त्यामुळे हिंदुस्तानींची एकजूट असणे महत्वाचे आहे.हे राजकारणी काही न काही तरी करून त्यांचा कार्यभाग पूर्ण करतील असे वाटते.महाभारताप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता लढावे लागेल.तरच या भ्रष्टाचारी राक्षसांवर विजय मिळवता येईल.
On 17/08/2011 12:33 PM Pralhad Patil said:
माझ्या मनातल लिहिलात राव पण सत्तेला चटावलेले हे लोक तशी खुर्ची सोडणार नाहीत . श्री कृष्णाने जसे कंसाला झिपर्या धरून सिंहासनावरून खाली ओढले आणि छातीवर बसून बुकलून ठार केले त्याच लायकीचे हे सुद्धा आहेत . आता वेळ आली आहे ह्यंना बुकलून ठार करण्याची . ज्याप्रमाणे रक्ताला चटावलेल्या वाघाला गोळीच घालावी लागते तसलेच हे सरकार आणि सर्वच राजकीय लोक आहेत .
On 17/08/2011 12:30 PM sameer inamdar said:
मला असे वाटते कि अन्ना विरुद्ध सरकार असे मतदान झाले पाहिजे. म्हणजे या भ्रष्ट सरकार ला समजेल कि जनतेला काय हव आहे. जर हे विधेयक पास झाले.(अन्ना ना हवे त्या अटी वर) तर आपण सर्वजन १ का वर्षात दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा करू.... जयहिंद!
On 17/08/2011 12:28 PM Sunil Pune said:
Best critisized artical.. Anna alone fighting againt these corrupted politician (they are missusing common men's money) for us and our future generatton. Govt now confused and afrading to face situation. They know they are correpted and fraud. सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" They are loosing their confidence to face all common indian's protest. Common India... Its time to make Big noise.. for Tranperent india
On 17/08/2011 12:28 PM Jai Ganesh said:
'sarakarache doke thikanavar aahe kay',Jantar-mantarachi chaval,JP Parkche uposhan,lathimar,morcha kharach hi tar navin swatantrachalavalichi nandi nahina. Nakkich bharat sarakar britishanchya ammala khali kam karate ahe.far motha swatyantra sangra honar ahe ha. congressla desh sodun bretain la paalun jawe lagnar.
On 17/08/2011 12:24 PM dk said:
अतिशय उत्तम विचार आण्णा हजेंचा विजय असो !!! जय हिंद !!!
On 17/08/2011 12:23 PM shantaram said:
तो सगळे पैसे परत भारतात परत आले तर खरोखर आपण खूप जोरदार विकास करू शकतो. अनांनी सुरु केलेल्या या लढ्यामुळे सगळे भ्रष्टाचारी घरात लपून बसले आहेत. पैसे खाता आणि परत मताची भिक पण मागतात. जय हो लोकपाल !
On 17/08/2011 12:21 PM poonam said:
खूप सुंदर लेख! माझ्या मते हा लेख माननीय पंत प्रधान आणि त्यांच्या सहकार्यांनी जरूर vachava......
On 17/08/2011 12:17 PM sarang said:
खूपच छान विश्लेषण .. शब्दातून सुधा चीड दिसत आहे .. चेहरा बघण्याची गरज नाही. आताच पंतप्रधान (बोलका बहुला) संसदेमध्ये वक्तव्य करून गेले कि संसदेपेक्षा देशात काही मोठे नाही .. अरे संसद दगडी इमारत आहे त्यात बसलेल्याला लोकांना या चिडलेल्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेने निवडले आहे मग संसद श्रेष्ठ कशी ? आणि मनमोहन स्वतः निवडून आले नाहीत ते आशीर्वादाने आले आहेत त्यांना म्हण्याचे असेल १० जनपथ जगात सर्व श्रेष्ठ आहे .. चुकीने दुसरे काही तरी बोलले
On 17/08/2011 12:16 PM hari said:
अप्रतिम लेख आहे. तुमचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे....
On 17/08/2011 12:15 PM Ashok said:
भ्रष्टाचार हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे व त्याला कॉंग्रेसचे सरकार जबाबदार आहे. या देशातील बरेचसे राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे या देशात महागाई वाढली असून सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुले या परिस्थितीत अण्णा हजारेना पाठींबा देऊन त्यांनी सुरु केलेल्या क्रांतीला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे.
On 17/08/2011 12:15 PM Anoop said:
कॉंग्रेस संपायची आता वेळ आली आहे आणि सर्वच पोलीतीकाल मेक ओवेरची भारताला आज नितांत गरज आहे.
On 17/08/2011 12:12 PM Shrihari Kulkarni said:
Criticism of Anna Hazare's movement must get backfired on the government when Cabinet ministers were asked at a briefing if there was one set of standards for Congress scion Rahul Gandhi and another for the Gandhian. Rahul had violated Section 144 of CrPC in Uttar Pradesh when he visited the villages of Bhatta-Parsaul earlier this year. The move was not just supported by the Congress but was positioned as the party lending its voice to the 'aam aadmi'.
On 17/08/2011 12:05 PM sadashiv Pethi said:
एक सूर, एक ताल... जनलोकपाल
On 17/08/2011 12:05 PM Vijay Raichurkar said:
महात्मा अण्णा हजारे कि जय !!! , अण्णा या लढया मध्ये तुम्ही एकटे नाहीत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत . करो या मरो. भारत मत कि जय ,वंदे मातरम. काले इंग्रज गादी/संसद छोडो .
On 17/08/2011 12:02 PM sameer punekar said:
पेटी आणि खोका याच्या बरोबर आता "टाकी'" हा शब्द प्रचलीत आहे , आणि लेखक महाशयांनी अण्णांना देव वगैरे बनवण्याच्या फालतू लफड्यात पडू नये असे मला प्रामाणिक पणे वाटते कारण महापुरुष हे महापुरुषाच असावेत त्यांना देव बनवल्याने त्यांचे अनुकरण करता येत नाही! आणि स्वतः अण्णा सुद्धा अश्या खुळचट गोष्टींवर विश्वास ठेवत नाही .
On 17/08/2011 12:00 PM Guru said:
khup chan aani mojakya shabdat sarvsamanyachya bhvana mandlya ahet. sarv bhartiy (samanya) swamanane rastyavar ale ahet, ya sarkarla thada shikvayala.
On 17/08/2011 12:00 PM Sharad said:
अप्रतिम लेख.. खूप आवडला..!!
On 17/08/2011 11:56 AM ajay said:
एक नंबर लेख आहे ...वाह वाह .... "आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला

No comments:

Post a Comment