Total Pageviews

Sunday 29 July 2018

इम्रान खान यांच्या राजवटीत भारत-पाकिस्तान यांचे संबंध कसे राहतील,

पाकिस्तानच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिकी इन्साफ पक्षाने (पीटीआयसर्वाधिक 120 जागा जिंकूनसत्तेचा दावा केला आहेबहुमताला 137 सदस्यांची आवश्यकता आहेत्यामुळे निवडून आलेल्या 20 अपक्षांच्या मदतीने पीटीआय सरकार स्थापन करणारयात कुणाच्याही मनात शंका नाहीअजूनही काही निकाल यायचे आहेतपण स्थिती जवळपास हीच राहीलअसा अंदाज आहेपीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. 1997 साली इम्रान खान यांनी पीटीआय पक्ष स्थापन केला होता व 30 वर्षांनी हा पक्ष सत्तारूढ बनत आहेक्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले इम्रान खान यांनी 1992 साली पाकिस्तानला एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकून दिला होतात्यानंतर पाचच वर्षांनी त्यांनी राजकारणात उडी घेतली.
 
2013 च्या निवडणुकीत पीटीआय पक्षाचे 30 उमेदवार निवडून आले होते आणि पाच वर्षांत हा पक्ष 120 वर पोहोचला आहेया निवडणुकीत माजी पंतप्रधान व सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझपक्षाला दुसरे स्थान मिळाले आहेबेनझीर भुत्तोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला तिसरे स्थान मिळाले आहेपाकिस्तानात कोण पंतप्रधान होणारयाचा निर्णय पडद्यामागून लष्कर घेत असतेहे उघड गुपित आहे.त्यामुळे या विजयात इम्रान खान यांचे योगदान नेमके कितीयावर प्रश्नचिन्हच आहेपाकिस्तानात आतापर्यंत झालेले पंतप्रधान लष्कराची मर्जी असेपर्यंत पदावर राहिले आहेतदेशाच्या महत्त्वाच्या धोरणांवर लष्कराचीच छाप असतेत्यामुळे इतर पंतप्रधानांप्रमाणे इम्रान खानदेखील देशासाठी खूप काही करू शकतीलअसे वाटत नाही.
 
निवडणुकीचे निकाल पुरते लागलेही नसतानाइम्रान खान यांनीआपण पंतप्रधान झालोच आहे या थाटात जे भाषण केलेते त्यांच्या अपरिपक्वतेचा नमुना ठरावाइम्रान खान यांच्या नव्या सरकारसमोर आव्हानांचे पहाड उभे असतीलपाकिस्तानची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्थाअमेरिकेसोबत बिघडलेले संबंध,चीनची जीवघेणी जवळीक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेभारताशी असलेले संबंध इत्यादी आघाड्यांवर इम्रान खान यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.तशातच त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमतही नाहीत्यामुळे इम्रान खान यांची पाच वर्षांची राजवट तारेवरची कसरत करण्यातच संपते की कायअशी शंका आहे.
 
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहेआतापर्यंत अमेरिका त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करीत होतीआता चीन करत आहेपरंतुचीनची मदतमगरमिठीच ठरण्याची शक्यता आहेयाचा अनुभव श्रीलंकेने घेतला आहेत्यालाही लवकरच या मगरमिठीचा अनुभव येईलनवाझ शरीफ सरकारने खूप गाजावाजा करीतचीनच्या मदतीने ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग’ (सीपीइसीसीपेकया अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केलीया प्रकल्पामुळे पाकिस्तानात आर्थिक समृद्धी येईलअशी स्वप्ने दाखविण्यात आलीपरंतुहळूहळू या प्रकल्पाची दाहक वास्तवता बाहेर येत आहेया प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला जे प्रचंड रकमेचे कर्ज दिले आहेत्याची परतफेड करता करता पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
आता नुकतेच या प्रकल्पाच्या कामासाठी 500 कोटी रुपयांचे चेक देण्यात आलेत्यातील 350 कोटी रुपयांचे चेक बँकेतून निधीअभावी परत आले आहेतत्यामुळे कंपन्यांनी प्रकल्पाचे काम थांबविले आहेपरकीय चलनाचे भंडार तर बुडाला लागले आहेजागतिक स्तरावर पाकिस्तानची पतच राहिलेली नाहीआयएमएफकिंवा चीन या दोघांकडूनच पाकिस्तानला आर्थिक मदत होऊ शकतेआयएमएफकडून कर्ज घेतले तर पाकिस्तानला फार मोठ्या आर्थिक सुधारणा कराव्या लागतील आणि चीनकडून घेतले तर या देशाला नैसर्गिक संसाधने चीनच्या ताब्यात द्यावी लागतीलयातून इम्रान खान कसे मार्ग काढतातहे बघावे लागेल.
 
भारताच्या संदर्भात बोलायचे झालेतर इम्रान खान यांच्या राजवटीत भारत-पाकिस्तान यांचे संबंध कसे राहतीलहा कळीचा मुद्दा आहेबहुतेक विश्लेषकांचे मत आहे कीयात फार काही फरक पडणार नाहीकारण जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर ठरवणार नाहीतोपर्यंत पाकिस्तानची भारताच्या संदर्भातील धोरणे बदलणार नाहीतइम्रान खान यांना या संदर्भात काही करता येईलअसे वाटत नाहीतसेही इम्रान खान यांची आतापर्यंतची भूमिका बघताते पाकिस्तानातील दहशतवादी गटांना हात लावतील असे वाटत नाहीअफगाणिस्तानातील तालिबान्यांचे त्यांनी नेहमीच समर्थन केले आहेत्यावरून त्यांना ‘तालिबान खान’ असे बिरूदही चिकटले आहेअफगाणिस्तानात अमेरिकेची उपस्थिती इम्रान खान यांना पसंत नाहीअमेरिकेची नाही म्हणून तिथे भारताची उपस्थितीही त्यांना रुचणार नाही.
 
इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या भाषणात भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहेमैत्रीसाठी भारत एक पाऊल पुढे येत असेल तर पाकिस्तान दोन पावले पुढे येईलअसे ते म्हणालेपाकिस्तानशी मैत्रीसाठी मागे अटलबिहारी वाजपेयी यांनी एक पाऊल पुढे टाकले होतेत्या बदल्यात पाकिस्तानने दोन पावले कारगिल भागात पुढे टाकली होती आणि परिणामी भारताला पाचशेच्या वर जवानांचे बलिदान देऊन हा भूप्रदेश पाकमुक्त करावा लागला होताही आठवण विसरता येणार नाहीत्यामुळे भाषणातून गर्जना करणे सोपे असतेपरंतुतदनुसार आचरण करणे सोपे नसतेयाची प्रचीती इम्रान खान यांना लवकरच येईल.
 
भारताशी संबंध म्हटले म्हणजे काश्मीर प्रश्न आलाचतो कसा सोडविणारयाचा काही आराखडा इम्रान खान यांच्याकडे असेलअसे वाटत नाहीतो तसा असूनही काही फायदा नाहीकारण पुन्हा लष्करचते म्हणेल तसेच होणारकाश्मीरबाबत सौम्य भूमिका घेणे पाकिस्तानातल्या कुठल्याही राजकारण्याला सोयीचे नाही.त्यातून सत्ता जाण्याची भीती असतेथोडक्यात काय कीपाकिस्तानात इम्रान खान यांची नवी कोरी राजवट आली तरीही त्यातून भारताला काही दिलासा मिळेल याची सुतराम शक्यता नाहीया सर्व पृष्ठभूमीचा विचार केलातर पाकिस्तानात होणारे सत्तापरिवर्तन भारतासाठी ‘नागनाथ जाऊन सापनाथ आला’ असेच असतेआज जगात पाकिस्तानला एकटे पाडण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेतहळूहळू त्याची कोंडी करत व त्यासोबतच भारताने आपली आर्थिक व सामरिक शक्ती वाढवत ठेवलीतरच कालांतराने पाकिस्तान दाती तृण धरून भारताशी चांगल्या शेजार्यासारखा वागण्यास तयार होईलदुसरा मार्ग नाहीआणि त्यासाठी भारतीय जनतेला आपला विवेक शाबूत ठेवावा लागणार आहेकारण 2019 ची निवडणूक जवळ येत आहेएवढाच पाकिस्तानातील सत्तापरिवर्तनाचा भारतासाठी तरी संदेश आहे

No comments:

Post a Comment