Total Pageviews

1,116,591

Saturday, 15 March 2025

मराठी साहित्य आणि भारताची सुरक्षा, चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड युद्धावर मराठी साहित्य जरुरी- भाग 3



 

मराठी साहित्य आणि भारताची सुरक्षा,

चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड युद्धावर मराठी साहित्य जरुरी- भाग 3

भारता आम्ही तुलाच देव मानतो , हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो | राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा | ह्याच मातीवरी प्राण गेला तरी ,अमुची वीर गाथा उरे Iमर्द आम्ही मराठे खरे |

नवी दिल्ली येथील ९८व्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेकरता लिहिलेल्या. लेखाचा तिसरा आणी शेवटचा भाग खालील प्रमाणे होता.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर

आज चार ते पाच कोटी बांगलादेशीनी भारतामध्ये घुसखोरी केली असावी. ही घुसखोरी अजूनसुद्धा पश्चिम बंगालमधून सुरू आहे. दरवर्षी भारतीय पोलीस 03 ते 04 हजार बांगलादेशी पकडतात, परंतु ही घुसखोरी थांबण्याचे काही लक्षण दिसत नाही.

मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार करायला हवा. ही राष्ट्रीय सुरक्षेची समस्या आहे, हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. 

आताच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक बांगलादेशींनी मतदान केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. घुसखोरी जर चालू राहिली तर २०२९  पूर्वी आसाम व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी बांगलादेशी बसल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येईल.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान?’ या विषयावरती मी लिहिलेली पुस्तके सोडून अजून कुठलीही पुस्तके प्रकाशित झाल्याचे दिसत नाही. जर यावरती पुस्तके प्रकाशित झाली तर जास्त चांगले होईल.

आव्हान चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड वॉर, अनियमित युद्ध किंवा मल्टि डोमेन युद्धाचे

गलवानच्या लढाईमध्ये आपण चीनचे सत्तरहून जास्त सैनिक मारले होते.चीन बरोबर पारंपरिक लढाईची आपल्याला चिंता नको, चिंता आहे ती ३६५ दिवस चालणाऱ्या हायब्रीड वॉरची.

सध्या चीनचे भारताविरुद्ध (आणि जगातील अनेक देशांविरुद्ध) एक नवीन प्रकारचे युद्ध चाललेले आहे. त्याला हायब्रीड वॉर, झोन वॉर फेअर किंवा अनरिस्ट्रीक्टेड वॉर किंवा अनियमित युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध ३६५ दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरावरती लढले जाते. या युद्धाचा उद्देश आहे की भारतात हिंसाचार वाढवून, अराजकता माजवून, भारताची आर्थिक प्रगतीचा वेग कमी करायचा, त्यामुळे भारत चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही आणि कायमचा  चीनच्या आधिपत्याखाली राहील.

 नवीन युद्ध, अनरिस्ट्रीक्टेड वॉर / हायब्रीड वॉर

२०१४ नंतर नवीन युद्ध सुरू झाले ज्याला अनरिस्ट्रीक्टेड वॉर / हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे अनेक पैलू आहेत, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध , प्रोपोगंडा वॉर, सायबर युद्ध, सोशल मीडियात घुसखोरी आणि अनेक पैलू.

हायब्रीड वॉरही एक लष्करी रणनीती आहे, जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअरमुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.

आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध

चीनने भारतात केलेली आर्थिक घुसखोरी, भारताशी चाललेले आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध हा एक महत्वाचा आयाम आहे. आर्थिक युद्ध लढण्याकरता आपण आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये झालेली घुसखोरी कमी करत आहोत. मेक इन इंडियाला महत्त्व देऊन चीन मधून येणाऱ्या गोष्टी भारतात बनवत आहोत, बनवणार आहोत.मात्र ही लढाई अनेक वर्षे चालणार आहे.

मानसिक युद्ध प्रोपोगंडा वॉर

मानसिक युद्ध ,प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्धाकरता चीनने भारतात अनेकांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक भारताच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युद्ध,  सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युद्ध कसे जिंकायचे?

त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देश भक्ती, देश प्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये.

प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनलं पाहिजे. भारताचे शत्रू कुठलाही दुष्प्रचार करत असतील, मानसिक युद्ध करत असतील अशांना शोधून त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे, ज्यामुळे हे युद्ध जिंकण्यात मदत मिळेल.

सायबर युद्ध

चीन आपल्यासोबत सायबर युद्ध लढत आहे. सायबर युद्ध जिंकण्याकरिता आपल्याला देशाची सायबर यंत्रणा  अधिक मजबूत करावी लागेल आणि हे काम सतत सुरू रहाणार आहे. ज्या प्रमाणे आपण आपल्या काँप्युटरमधील अँटी व्हायरस अपडेट करत असतो त्याच प्रमाणे त्याच प्रमाणे सायबर वॉर पासून वाचण्याकरिता आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.

सोशल मीडियात घुसखोरी

चीनने आपल्या सोशल मीडियात घुसखोरी केली आहे पण आपण मात्र चीनच्या सोशल मीडियात घुसखोरी करू शकत नाही. कारण सोशल मीडिया चीनी कंट्रोल आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्या दुष्प्रचाराला कसे प्रत्युत्तर द्यायचे ?.

 हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर

स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, हायब्रीड ऑपरेशन्सआपणसुद्धा चीन, पाकिस्तानमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या देशामध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग. इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो.

हायब्रीड  युद्धाच्या विविध प्रकारांमध्ये चीन भारताच्या पुष्कळच पुढे आहे. म्हणून हायब्रीड युद्धाच्या प्रत्येक प्रकारच्या लढाईमध्ये प्रत्युत्तर देण्याची क्षमता, भारताला निर्माण करावी लागेल.

हायब्रीड युद्धात प्रत्येक भारतीय फ्रंट लाइन सैनिक आहे. कारण हे युद्ध  बंदुकीने लढले जात नाही. आता प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरिता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

मराठी भाषेत  चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड वॉर, अनियमित युद्ध किंवा मल्टि डोमेन युद्ध, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध , प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्ध सोशल मीडियात घुसखोरी, सायबर युद्ध, मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप, वर काहीच साहित्य प्रकाशित झालेले नाही.

बहुतेक मराठी वाचकांना मल्टी डोमेन युद्धाविषयी कल्पना नाही

अनेक सुशिक्षित असा प्रश्न विचारतात की चीनबरोबर आपले तिसरे महायुद्ध तर होणार नाही? त्यांना ही कल्पना नसते की चीन आपल्याशी गेले अनेक वर्षे ३६५ दिवस, दिवसातून २४ तास मल्टी डोमेन युद्ध लढत आहे आणि देशातील नागरिकांना याविषयी माहिती नाही किंवा फारशी परवा नाही. अनेक, खास तर कॉर्पोरेट वर्ल्ड चीनला आपला शत्रूच मानत नाही आणि त्यांना वाटते की चीन शिवाय ते आपला उद्योग धंदा चालवू शकत नाही. म्हणून हे अत्यंत जरुरी आहे की चीन वेगवेगळ्या प्रकारे भारताची प्रगती कशी थांबवतो आहे हे भारतियांना कळायला पाहिजे आणि सगळ्यानी योध्ये म्ह्णुन चीन विरुद्धच्या या युद्धामध्ये भाग घेतला तरच आपण चीन विरुद्ध मल्टी डोमेन युद्ध हे जिंकू शकतो.

मराठी साहित्यिक मल्टी डोमेन युद्धाविषयी मराठीमध्ये साहित्य निर्माण करून देशभक्त नागरिकांना एक माहिती योद्धा आणि मल्टी डोमेन युद्धात देशाला मदत करणारा देशभक्त नागरिक म्हणून तयार होण्यामध्ये मदत करू शकतात. देशभक्त नागरिकांची चीन, पाकिस्तान आणि देशाच्या शत्रूंनी चालवलेल्या मल्टी डोमेन मध्येसुद्धा काय जबाबदारी असेल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरती  मराठी साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.

मात्र याकरता मराठी साहित्यिकांना मेहनत करून मल्टी डोमेन युद्धाच्या वेगवेगळ्या आयामांवर साहित्य निर्माण करून आम जनतेला शिक्षित करावे लागेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1 comment:

  1. विस्तृत माहिती आणि विश्लेषण. हया करिता आपले मनापासुन आभार. धन्यवाद सर.

    ReplyDelete