Total Pageviews

Saturday 8 December 2018

Does #AFSPA shuld be remove, Truth behind #Humanright Violation by #Arm...



आफ्‌स्पाविषयी गैरसमज आणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

ईतिहासात पहिल्या
वेळा सैनिक सर्वोच्च न्यायालयात
आर्म्ड फोर्सेस
स्पेशल पावर्स ऍक्ट
,
१९५०
(अफस्पा) अंतर्गत दहशतावादी किंवा त्यांच्याशी संबंधित समर्थकांविरुद्ध कारवाई
केल्यास जबाबदार सेनाधिकारी आणि जवानांच्या मागे सीबीआय आणि राज्य पोलिसांचा
एफआयआर आणि न्यायालयीन खटले यांचा ससेमिरा लागत आहे.सामान्य नागरिकांमधून
दहशतवाद्यांना शोधून बाहेर काढणे अतिशय अवघड असते. केंद्र सरकारने
डिस्टर्ब्ड
एरिया
म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात अफस्पा अंतर्गत
कार्यरत असलेले सैनिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्रस्त आहेत.
अफस्पामध्ये जर
कार्यरत सैनिकावर चार्जशीट दाखल करण्यात आली तर ते देशाचे सार्वभौमत्व
, सुरक्षा आणि
अखंडतेवर घाला घालण्यासारखे असेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या
निकालामुळे मानवाधिकार संरक्षणाच्या अनुषंगाने दहशतवादी कृत्यात सामील वा जबाबदार
असलेल्या लोकांचे रक्षण होत आहे. त्यांना दिली जात असलेली विशेष वागणूक सैनिकांवर
खटले दाखल करण्याच्या रुपात बदलत आहे. जो देश सैनिकांचे रक्षण करत नाही त्या
देशाची सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात पडते.
मेजर आदित्यांवर सीपीसी कलम ३०२ (खून) आणि ३०७ (खुनाचा
प्रयत्न) याखाली एफआयआर दाखल
तीनशेहून अधिक
लष्करी अधिकाऱ्यांनी अफ्स्पा कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर
केलेल्या या याचिकेचा उद्देश मणिपूर व जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी
केलेल्या कारवाईसंदर्भात त्यांच्याविरुद्ध सीबीआय व एसआयटी/राज्य पोलिसांकडून होत
असलेल्या फौजदारी कारवाईपासून त्यांना संरक्षण देणे
, आश्वस्त करणे, हा आहे. खरे तर हे
संरक्षण अफ्स्पामध्ये अंतर्भूत आहेच
, पण जानेवारी २०१८मध्ये जम्मू-काश्मिरातील शोपियान
येथील लष्करी कारवाईमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या तीन निदर्शकांचा मृत्यू
झाल्याने राज्य सरकारकडून लष्करी अधिकारी मेजर आदित्यकुमार यांच्यावर फौजदारी
कारवाई सुरू झाल्याने त्यात अधिकच भर पडली.  
२८ जानेवारी २०१८ला शोपियान या गावात '१० गढवाल रायफल्स'च्या कॉन्व्हॉयवर बेधुंद जमावाने तुफान दगडफेक केली आणि
त्यांच्या एका गाडीला आग लावली. हिंसा थांबवण्याची वारंवार ताकीद देऊनही जमाव एका
जेसीओला मारण्याच्या
'(लिंच)' करण्याच्या तयारीत असल्याचे पाहून त्यांचे अधिकारी मेजर
आदित्यसिंग यांनी गोळीबाराचा आदेश दिला. सैन्य कमीतकमी
; परंतु नेम धरून गोळीबार
करते
, कधीही
हेवेत गोळीबार करू नये
, हा
नियम आहे. त्यात जमावाला भडकवणाऱ्या तीन लोकांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरमध्ये
जारी
'आफ्स्पा'च्या सातव्या कलमानुसार
तेथे तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण
दिले गेले असूनही मेजर आदित्यांवर सीपीसी कलम ३०२ (खून) आणि ३०७ (खुनाचा प्रयत्न)
याखाली एफआयआर दाखल करण्यात आला. हा आदेश तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी दिला. सर्वच
प्रसंग दुर्दैवी आणि निराशाजनक होता. या कारवाईविरुद्ध आदित्यांचे कर्नल
करमवीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली.
त्यावर मार्च २०१८ मध्ये
न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई थांबवण्यात आली आहे.
या सर्व संभ्रमाने गोंधळलेल्या सैन्याच्या चिंता, धास्ती आणि निराशाग्रस्त
३५६ सदस्यांनी भारतीय इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात १४ ऑगस्टला याचिका दाखल
केली. त्यांना त्या निःपक्षपाती उच्चासनात न्याय मिळण्याची आशा आहे.
‘‘अशांत परिसरांत
आम्हाला मुळात जीव धोक्यात घालून तैनात केले जाते आणि नंतर त्या काळात केलेल्या
नियमित कृत्यांच्या चौकशीचा घाट घातला जाऊन आमच्यावर कारवाईची शक्यता निर्माण
होते. आम्ही आम्हाला दिलेल्या अधिकारांतर्गत
, पूर्णपणे कर्तव्याच्या भूमिकेतून ही कारवाई केली.
त्याबद्दल आम्हास शिक्षेस तोंड द्यावे लागणे अन्यायकारक आहे
,’’ असे लष्कराचे
म्हणणे. ते चुकीचे नाही.
सैनिकांना भेडसावणारी
असंख्य आव्हांने समजवुन घ्या
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल
इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला (एनआयए) मणिपूरमध्ये
'आफ्स्पा' लागू असूनही कायदाबाह्य
मनुष्यहत्येच्या काही संशयात्मक घटनांबाबत लष्कराच्या सदस्यांविरुद्ध खटले
भरण्याचे आदेश दिले होते.त्यापश्चात याबाबतीत चौकशीत दिरंगाई का होत आहे
, याचा जाबही कोर्टाने
सीबीआयला विचारला होता. त्याचबरोबर राज्याच्या पोलिस खात्याला लष्कराच्या
सदस्यांविरुद्ध खटले भरण्यापूर्वी कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसावी
, अशा आशयाच्या
जम्मू-काश्मीर सरकारने केलेल्या याचिकेवर विचार करण्याचे आश्वासनही राज्य सरकारला
१६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
या कारवाईमुळे सैनिकांना
घटनेने प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे काही
न्यायाधीशांनी मानवधिकार संस्थांच्या दबावाखाली येउन अफस्पामुळे मिळालेले संरक्षण
काढल्यामुळे ३५६ अधिकारी
,
ज्युनियर
कमिशंड ऑफिसर्स आणि जवानांनी भारतीय घटनेच्या कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात
रिट पीटिशन
दाखल केली आहे. स्थलसेनेत कार्यरत सैनिक
, देशाचे
सार्वभौमत्व
,
एकात्मता, ऐक्य, सुरक्षा आणि गरिमा
वाचवण्याची कारवाई करत असताना तोंड द्यावे लागत असलेल्या आणि भेडसावणार्या असंख्य
आव्हांने काय असतात हे समजवुन सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आहेत.

डिस्टर्ब्ड एरिया अॅक्ट' लागू असलेल्या भागात लष्कराला पाचारण
कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राज्य सरकारच्या
नियंत्रणाबाहेर गेलेला भाग
'अशांत' म्हणून घोषित करून लष्कराचे साह्य उपलब्ध करून देण्यासाठी ११
सप्टेंबर १९५८रोजी भारतीय संसदेने
'डिस्टर्ब्ड एरिया अॅक्ट'ला संमती दिली आणि हा कायदा ईशान्येतील राज्यांना लागू
करण्यात आला. नुकताच तो मेघालय राज्य आणि अरुणाचल प्रदेशच्या आठ पोलिस स्टेशनमधून
परत घेण्यात आला आहे. हा कायदा १९८३मध्ये पंजाब आणि चंडीगडला लागू करण्यात आला आणि
परिस्थिती निवळल्यानंतर १९९७मध्ये मागे घेण्यात आला. असाच कायदा १९९०मध्ये
जम्मू-काश्मीरमध्येही लागू केला गेला आणि आजतागायत तो अस्तित्वात आहे. डिस्टर्ब्ड
एरिया अॅक्ट
' लागू असलेल्या भागात लष्कराला पाचारण
केल्यास त्यांना
'आफ्स्पा'खाली वॉरंटशिवाय कोणालाही पकडण्याची, झडती घेण्याची, अटक करण्याची किंवा गोळी
चालवण्याची कायद्याने मुभा देण्यात आली आहे. आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या
कोणत्याही कृतीसाठी त्यांच्याविरुद्ध केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कायदेशीर
कारवाई करता येत नाही.
 

हाताबाहेर
गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अशांत भागात अफ्स्पा
अफ्स्पाहा सैन्याला विशेष
अधिकार देणारा कायदा देशातील अशांत क्षेत्रात लागू करण्याचे अधिकार केंद्र सरकारला
आहेत. या कायद्यानुसार तेथे कार्यरत सैनिकांना भारतीय दंड संहितेच्या तरतुदींपासून
संरक्षण असते. सैन्य हे शत्रू राष्ट्राशी लढण्यासाठी असते. अंतर्गत सुरक्षेसाठी
निमलष्करी आणि पोलीस दले आहेत. निमलष्करी दलांची संख्या १३ लाख आहे. अपवादात्मक
परिस्थितीत जर सैनिकांना अंतर्गत सुरक्षा कारवाईसाठी तैनात केले तर त्याचसोबत
सक्षम मुलकी अधिकारी असतो. जर गोळीबार करण्यासारखी स्थिती निर्माण झाली तर त्या
मुलकी अधिकाऱ्याने तसा लेखी आदेश द्यावा लागतो.
जेथे अफ्स्पा लागू
केला आहे तेथे मात्र सैन्याला काही विशेष अधिकार आहेत. सरकार व प्रशासन यांच्या
अपयशाने हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अशांत भागात अफ्स्पा लागू
करणे आणि मागे घेणे हा निर्णय सरकार घेते.
इथे प्रामुख्याने
हे लक्षात घ्यायला हवे
,
की
यात लष्करी अधिकाऱ्यांची अवस्था ही इकडे आड
, नि तिकडे विहीर अशी होते. सशस्त्र सेवा विशेषाधिकार
कायदा
, (अफ्स्पा)
अस्तित्वात येण्याचा मूळ उद्देश
, लष्करी अधिकाऱ्यांना या भयापासून मुक्त ठेवणे, (ज्यायोगे त्यांना
त्यांचे कर्तव्य निर्भयपणे
,
कार्यक्षमतेने, बजावता येईल) हाच
आहे.
शत्रूंशी लढा
देतांना प्राणार्पण करणार्या सैनिकावर कायद्याचा अकारण बडगा
पायदळी पलटणींना जंगल पिंजून,डोंगराळ भागात दहशतवाद्यांचा पाठलाग करत वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या
फैरींना दाद न देता त्यांना पकडावे लागते. जवळात जवळच्या पोलिस चौकीपर्यंत
पोहोचण्यासाठी त्यांना तीन ते चार दिवसांचा अवधी लागु शकतो. नियमानुसार चोवीस
तासांत त्यांच्यावर एफआयआर लादणे अशक्य असते. अशा प्रसंगाला तोंड देऊन
दहशतवाद्यांना पकडणे हे पोलिसांना कधीच शक्य झाले नाही. हे खडतर काम फक्त भारतीय
लष्करच
'आफ्स्पा'खाली करू शकते.
आपल्या कर्तव्याचे
पालन करत दरवर्षी ३५०-४०० सैनिक आणी अधिकारी प्राणांचे बलीदान देत आहेत. मात्र
, ही जबाबदारी पार
पाडतांना सैनिकांना न्यायालय
,सीबीआय आणि राज्य पोलिसांमुळे अडथळे निर्माण होत
आहेत. देशाचे सार्वभौमत्व
, एकात्मता, ऐक्य, सुरक्षा वाचवण्यासाठी बाह्य आणि अंतर्गत शत्रूंशी
लढा देतांना प्राणार्पण करायला देखील न कचरणार्या सैनिकावर जर कायद्याचा अकारण
बडगा उगारण्यात येत असेल तर ते देशाकरता धोकेदायक आहे.


सैनिक
आपल्या जीवाची
,
कुटुंबाची
आणि घरादाराची पर्वा न करता देशाची सीमा आणि देशांतर्गत सुरक्षा करतो.यामुळे देश
,न्यायालय
यांचे स्वातंत्र्य
,
हक्क
आणि वैचारिक मोकळीक अबाधित राहाते.असे असताना जर त्याच्या जबाबदारीबद्दल अकारण वाद
निर्माण होत असेल तर सैनिक कशासाठी व का प्राणार्पण करेल
?.
प्रत्येक कारवाईनंतर राज्य
पोलिसांनी लगेच एफआयआर दाखल केला पाहिजे
, सीबीआयने त्वरित तपास सुरू केला पाहिजे आणि लवकरात
लवकर गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन कारवाइ झाली पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयामुळे सैनिकांनी
,
‘‘
समोर
आलेल्या परिस्थितील आक्रमक कारवाई
, शौर्य गाजवायचे की शांतता काळातील कायदा व
सुव्यवस्था यांचा आधारभूत असलेल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडचे पालन करायचे की जगा
आणी जगुद्या ही पध्दत वापरायची
?.

दहशतवादी
विरोधी अभियानात आवश्यक असलेली सुरक्षा आणि तो आपले कार्य कशाचीही पर्वा न करता
पार पाडू शकेल ही खात्री त्या सैनिकाला मिळावी यासाठी अफस्पा लावण्यात येतो.
न्यायालय
,पोलिस,सीबीआयला अशा परिस्थितीची संपूर्ण जाणीव नसते.
लष्करी
अधिकारी/जवान हेसुद्धा या देशाचे नागरिक
लष्करी अधिकारी/
जवान हेसुद्धा या देशाचे नागरिक आहेतच. त्यामुळे कोणाही नागरिकाला आपल्यावर होत
असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो अधिकार असतो
, तो त्यांनाही
आहेच. जर मोठय़ा संख्येने लष्करी अधिकारी सर्वोच्च न्यायालयांत तशी दाद मागत असतील
, तर त्याची
गंभीरपणे दखल घ्यावीच लागेल.  यावरून
लष्करात या प्रश्नासंदर्भात असलेली व झपाटय़ाने पसरणारी अस्वस्थता
, संवेदनशीलता दिसून
येते.
 
लष्करी
अधिकारी पूर्णपणे निर्भय असणे अपरिहार्य आहे.


निर्जन जंगलातील जीवन-मरणादरम्यान
लोंबकळणाऱ्या अशा द्वंद्वाचे पोस्टमॉर्टम आज वातानुकूलित अभ्यासिकांमध्ये आणि
दिवाणखान्यात करून सैन्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या फुरसतीच्या
छंदात मानवाधिकार कार्यकर्ते मग्न आहेत. त्या घनदाट जंगलातील गोळीबारादरम्यान
एखादा दहशतवादी ठार झाला  तर लष्कराच्या
जवानांना त्याचा जाब विचारणे हा जितका घनघोर अन्याय आहे
, तितकेच एखादी गोळी
रात्रीच्या अंधारात दहशतवाद्यांला लागली
, तर आपण जबाबदार ठरू शकू, असा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांच्या क्षमतेवर
घाव घालणे हे राष्ट्रहिताला मारक आहे. त्याबरोबर 
निरपराध लोकांची हत्या करून पळणाऱ्या दहशतवाद्यांच्या
'मानवी हक्कांचे' संरक्षण करण्यासाठी
कटिबद्ध झालेल्या या सत्यशोधकांना त्या जखमी आणि मरणासन्न जवानाच्या
'मानवी हक्का'ची मात्र तसूभरही तमा
नसावी हा दैवदुर्विलास आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या त्या
दहशतवाद्यांनी भारतीय घटनेचा भंग केला आहे.
एखादा दहशतवादी मारला गेला तर सार्वभौमत्वाचे संरक्षण
करण्यासाठी शासनानेच धाडलेल्या जवानांची ती राज्यघटनेविरोधी कारवाई ठरली असती का
?. या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराच्या
शोधात आज केंद्र सरकार वा संरक्षण मंत्रालय वा सैन्य मुख्यालय नव्हे
, तर लष्कराचे ३५६ लष्करी अधिकारी/
जवान
 सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत.
अनेक प्रश्नाची उत्तरे न्यायालयाने देणे आवश्यक आहे
हा कायदा लागू करण्यात येतो;
कारण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि
तेथील हिंसेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे
, त्याची सैन्याने तर कधीच
मागणी केली नव्हती. युद्धसम परिस्थिती असलेल्या काश्मीरसारख्या प्रदेशात डोळ्यात
तेल घालून गस्त घालणाऱ्या जवानासमोर अचानक संशयास्पद हालचाली करणारा बंदूकधारी
अवतरला
, तर
त्याने आपल्यावर गोळी मारेस्तोवर जवानाने थांबायचे का
, आपण गोळीबार केला, तर तो बळी पडू शकतो आणि
आपल्याला तुरुंगात डांबले जाऊ शकते व आपली पोरेबाळे उघड्यावर पडू शकतात या
संभ्रमात जवानाने पडायचे का
, त्या जवानाने काहीच कारवाई केली नाही आणि तो बंदूकधारी
खरोखरच दहशतवादी असला आणि पुढे जाऊन त्याने धुमाकूळ घातला
, तर त्या जवानाला
कर्तव्यच्युतीसाठी शिक्षा होणार नाही का
; त्या जवानाबरोबरच तैनात असलेल्या कॅप्टन वा मेजर
हुद्द्यावरील निकट अधिकाऱ्यांनी त्याचे प्रशिक्षण कसे करायचे
; या आणि अनेक प्रश्नाची
उत्तरे राज्यकर्त्यांनी
,  न्यायालयाने आणि देणे आवश्यक आहे.
सैन्यदलाच्या
मनोबलावर विपरीत परिणाम
अफ्स्पा कायदा ही
लष्कराची गरज नाही. ती प्राधान्याने स्थानिक प्रशासनाची आहे. लष्कर या
कायद्याशिवाय देखील स्वत:चे संरक्षण करू शकते आणि परिस्थितीवर नियंत्रणही ठेवू
शकते. त्यासाठीच तर ते प्रशिक्षित असतात. 
अफ्स्पा कायदा हवा असतो मुलकी प्रशासनास. नियमित कायद्याच्या अधीन राहून
शांतता प्रस्थापित करण्यात यश न आल्याची कबुली म्हणजे या अफ्स्पा कायद्याचा अंमल.
म्हणजे तो एका अर्थी राजकीय अपयशाचे प्रतीक आहे.मणिपूर असो वा जम्मू-काश्मीर. त्या
त्या प्रांतात राजकीय मार्गाने कायदा व सुव्यवस्था राखणे जमले नाही म्हणून या
परिसरांत हा कायदा लागू करावा लागला. त्यामुळे तो प्रदेश संपूर्णपणे लष्कराच्या
अखत्यारीत येतो.
सैनिकांना संघटना
बांधण्याचा अधिकार नाही. या सर्व प्रकाराने सैन्यदलाच्या मनोबलावर विपरीत परिणाम
होईल. शत्रूंशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेले अफस्पाचे कवच काढून सैनिकांवर
रोजच्या कायदा व सुव्यवस्थेंतर्गत कारवाई करा या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या
निर्णयानंतर देश सुरक्षित राहिल का
?कोणत्या
दिशेने जात आहोत आपण
? मेजर
आदित्य सैन्याच्या रिवाजानुसार राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करीत होते आणि तेही
'आफ्स्पा'च्या अंमलाखालील
प्रदेशात. तीन दशके इमाने इतबारे भारतीय सैन्यात नोकरी केल्यावर आपल्या सुपुत्राला
कुटुंबाची देशसेवेची परंपरा जतन करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या मेजर आदित्यच्या
पित्याला हा कोणता न्याय
? देशाने ३५६ सैनिकांची कैफियत विचारात घेऊन
कौशल्याने न्यायालयाबाहेर तोडगा काढला तर अधिक योग्य. हे सर्वच प्रकरण लवकरात लवकर
मिटवायला हवे. त्यासाठी सरकारातील कोणी वडीलकीच्या नात्याने पुढाकार घ्यावा.
लष्करात अशी अस्वस्थता राहू देणे अंतिमत: देशासाठी योग्य नाही.







No comments:

Post a Comment