Total Pageviews

Tuesday 2 August 2016

पुन्हा ‘एअरलिफ्ट’! असंख्य भारतीय कामगारांच्या पोटात चार घास पडतील SAUDI AIRLIFT


पुन्हा ‘एअरलिफ्ट’! असंख्य भारतीय कामगारांच्या पोटात चार घास पडतील लोकसत्ता टीम | August 1, 2016 3:35 AM 0 SHARES Share to FacebookShare to TwitterShare to Google+Share to Email पुन्हा ‘एअरलिफ्ट’! सौदी अरेबियामध्ये नोकऱ्या गेल्याने उपासमार सहन करावी लागत असलेल्या असंख्य भारतीय कामगारांच्या पोटात चार घास पडतील अशी व्यवस्था परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली. यानंतर कामगिरी फत्ते, असेही त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले. तेथे असे किमान दहा हजार नागरिक आहेत. त्या सर्वाना लवकरच भारतात आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबद्दल आणि उपाशी कामगारांना जेवण देण्याची कामगिरी फत्ते केल्याबद्दल सुषमा स्वराज आणि त्यांच्या परराष्ट्र खात्याचे अभिनंदन करावयास हवे. कुवेत युद्धाच्या धामधुमीत अडकलेल्या असंख्य भारतीयांची एका व्यावसायिकाने जिवावर खेळत केलेली सुटका या विषयावरील ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट मध्यंतरी प्रदíशत झाला. तो पाहून अनेकांच्या राष्ट्रवादी भावना उचंबळून आल्या होत्या. सौदी अरेबियातील घटनेमुळे त्या भावनांना पुन्हा एकदा उजाळा मिळेल. मात्र यातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत असून, ते भावना बाजूला ठेवून समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून एक प्रथा चालत आल्याचे दिसते. ती म्हणजे अधिक पशांच्या आमिषाने परदेशात जायचे. तेथे मिळेल ती नोकरी करायची. तेथील समृद्ध जीवनशैली पाहून गरीब भारतावर, येथील व्यवस्थेवर टीका करायची आणि काही अडचण आली तर मात्र याच दरिद्री, अव्यवस्थित, बकाल देशाच्या सरकारला साद घालायची. या प्रथेचा आíथक भार या बकाल आणि अव्यवस्थित देशातील सामान्य करदात्यांनाच वाहवा लागतो. अनिवासी भारतीयांकडून या देशाला लाभ होत असतो. त्यांच्याकडून देशास परकी चलन लाभते हे खरे असले, तरी तो काही त्यांच्या दानधर्माचा भाग नसतो. हा देश त्यांच्या अडचणीत मदतीला धावतो ते नागरिकांप्रति असलेल्या कर्तव्यभावनेतून. त्याची जाण अनिवासी भारतीयांमध्ये किती असते हे तेच सांगू शकतील. प्रत्यक्षात अनेक घटनांतून अशी जाण नसल्याचेच दिसून आले आहे. मदतीला थोडासा उशीर होताच भारतीय दूतावासातील कर्मचारी कसे नालायक आहेत याचे पाढे हे अनिवासी नागरिक आणि त्यांचे येथील सगेसोयरे वाचताना देशाने अनेकदा पाहिले आहेत. खाउजा म्हणजेच खासगीकरण, आíथक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या काळात सरकारी या शब्दाबद्दलही घृणा असलेल्या या उच्चमध्यमवर्गाने म्हणूनच सरकारबाबतच्या आपल्या अपेक्षा एकदा नीट तपासून घेतल्या पाहिजेत. खाडी देशांत मजुरी करण्यासाठी गेलेल्या कामगारांबद्दल मात्र अधिक सहानुभूती बाळगता येईल. तेही दोन-दोन लाख रुपये येथील एजंटांना देऊन तिकडे गेलेले असले, त्यामागे अधिक वेतनाची हाव असली, तरी ते अखेर फसवणूक आणि पिळवणुकीचे बळी आहेत. सौदी अरेबियात आज सुमारे २७ लाख भारतीय आहेत. त्यातील किमान पाच लाख निरनिराळ्या व्यवसायांत आहेत. इतरांतील अनेक मात्र वेठबिगाराहून वाईट जिणे जगत असतात. तेलाचे दर घटल्याने सौदीच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या अवकळेमुळे त्यांची परिस्थिती अधिक वाईट बनली आहे. सौदी ओगर ही तेथील बडी बांधकाम कंपनी. तिला तोटा झाला. त्यामुळे तिने कामे बंद केली आणि भारतीय कामगारांना मजूर शिबिरांत सोडून दिले, तेही सात महिन्यांचा पगार बुडवून. तशात त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या मदतीला सुषमा स्वराज धावून गेल्या. या घटनेतून एक बाब स्पष्ट झाली. ती म्हणजे परदेशी नोकरी वा शिक्षण यांसाठी जाण्याबाबतचे कायदे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वारंवार आपणास ‘एअरलिफ्ट’चे खेळ आपल्याच पशाने पाहावे लागतील. येथील ११ कोटी बेरोजगार आणि अर्धपोटी काम करणारे कामगार यांना असे खेळ वारंवार दाखविणे हे काही बरे दिसणार नाही जास्त पैशाच्या लोभाने लोक आखातातील नोकरी साठी जातात. लोक, तंत्रीक कामगार जातात ते कर्ज काढतात , दलालाला अवाच्यासवा पैसे देउन जातात. आखातातील नोकरीत भरपुर पिळवणुक, फसवणुक होते ती वेगळी. अमेरीका व आखातातील नोकरीत जमीन अस्मानाचा फरक आहे. अरब देशात नागरिकत्व हि मिळत नाही ,तिथे तेथील मुलीशी लग्न्न हि करतायेत नाही .आणि कोणतीही संपत्ती मालमत्ता विकत घेता येत नाही . त्यामुळे गल्फ देशातून लोक फक्त पैसे पाठवू शकतात अश्या लोकांसाठी ते बाहेर जाण्या आधी आपत्ती व्यवस्थपणाने काही रकम अमानत म्हणून सरकार कडे जमा करावी जी अशा प्रसंगी कामाला येईल .म्हणजे प्रत्येक वेळेस सरकारला एअर लिफ्ट चा खर्च करावा लागणार नाही .आणि अनधिकृत जाणारे लोकही कमी होतील आपल्या देशातील शिक्षणाचा लाभ उठवून उच्य शिक्षणाच्या मिषाने परदेशात जायचे आणि तेथील सर्व सुविधांना भुलून तेथेच स्थायिक होणाऱ्या भारतीयांना आपल्या देशाची त्याच्यावर एखादे संकट आल्यावरच आठवण होते हि खरी गोष्ट आहे.एरवी त्यांना आपल्या देशाशी काही देणेघेणे नसते हि चिंताजनक बाब आहे.पण तरीही सरकार त्यांना वाऱ्यावर सोडत नाही याची जाणीव त्यांनी ठेवणे आवश्यक आहे.अनेक उच्य शिक्षित डॉक्टर,इंजिनियर परदेशात जातात ते फक्त पैशांसाठी नाही तर त्यांना त्यांच्या योग्यते प्रमाणे नोकऱ्या व वेतन मिळत नाही म्हणू सौदीत अडकलेले हिंदुस्थानी मायदेशी परतणार नवी दिल्ली, दि.१(वृत्तसंस्था)- सौदी अरेबियामध्ये नोकरी गमावलेल्या १० हजार हिंदुस्थानी कामगारांची उपासमार होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासाठी अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले असून, लवकरच मायदेशी परतण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवेदन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत केले. सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या १० हजार हिंदुस्थानी नागरिकांविषयी संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन केले. हिंदुस्थानच्या दूतावासाने अचानक नोकर्यां गेलेल्या सौदी अरेबियातील हिंदुस्थानी कामगारांना मदत करण्यासाठी पाच कॅम्प उभारले आहेत. प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे सांगितले. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सौदी अरेबियाला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. तसेच हिंदुस्थानचे सरकार सौदीच्या परराष्ट्र आणि कामगार मंत्रालयाच्या संपर्कात आहे. बेरोजगारांना अन्य मदतीसह अन्न-पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एकही कामगार उपाशी राहणार नसल्याची काळजी घेण्यात येत आहे. या कामगारांना लवकरच मायदेशी आणण्यासाठी कार्यवाही होणार असल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment