Total Pageviews

Tuesday 21 March 2017

मणिपूरमधील गेल्या १३९ दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक नाकाबंदी उठविण्यात यश मिळवून तेथील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता केली आहे.


इम्फाळची कोंडी फुटली Maharashtra Times | Updated: Mar 20, 2017, 11:32PM IST 1 मणिपूरमधील गेल्या १३९ दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक नाकाबंदी उठविण्यात यश मिळवून तेथील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता केली आहे. नागाबहुल भागांमध्ये सात नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता. तो विभाजनकारी असल्याचा आरोप युनायटेड नागा कौन्सिलने (यूएनसी) केला होता. नागांच्या सांस्कृतिक एकात्मतेला असलेल्या घटनात्मक संरक्षणालाही या निर्णयामुळे धक्का बसत असल्याचे जाहीर करून यूएनसीने गेल्या एक नोव्हेंबरपासून इम्फाळ खोऱ्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची मालवाहतूक अडविण्यास सुरुवात केली. दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील (क्रमांक २ आणि ३७) मालवाहतूक रोखल्याने राजधानी इम्फाळची कोंडी केली गेली. त्यामुळे एलपीजी सिलिंडरपासून अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा इम्फाळमध्ये निर्माण झाला. परिणामी या वस्तूंचा काळाबाजार होत गेला. यूएनसीच्या या नाकाबंदीने त्रस्त झालेल्या इम्फाळवासीयांनी आपल्याकडून जाणारी मालवाहतूक अडवून प्रतिनाकाबंदी केली. या दोन्हीमुळे मणिपूरवासी त्रस्त झाले. सत्तेवर येताच ही नाकाबंदी उठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजपने प्रचारात दिले होते. पंतप्रधानांनीही याच मुद्द्यावरून तेथील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला होता. विधानसभा निवडणुकीत मणिपुरी जनतेने सुस्पष्ट कौल दिला नाही. सत्ताधारी काँग्रेसला सर्वाधिक जागा (२८) मिळाल्या असल्या, तरी तेथे पूर्वी एकही जागा न मिळविलेल्या भाजपने २१ जागांपर्यंत मजल मारली. गोव्याप्रमाणे मणिपूरमध्येही सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आले. अन्य पक्षांच्या मदतीने भाजपने सरकार बनविण्याचा दावा केला आणि राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी तो मान्यही केला. अशा रीतीने भाजपचे नेते बीरेनसिंह मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी तातडीने इम्फाळची कोंडी फोडण्यासाठी यूएनसीशी बोलणी केली. केंद्र आणि राज्याकडून आश्वासन मिळाल्याने नाकाबंदी उठविण्यात येत असल्याचे यूएनसीने रविवारी जाहीर केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी बीरेनसिंह यांनी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. ईशान्येकडील या छोट्या राज्यात भाजपने सुरुवात चांगली केली. नाकाबंदीच्या मुळात जाऊन सर्व संबंधित घटकांशी राज्य सरकार चर्चा करणार असल्याचे, तसेच केंद्र सरकारने याबाबत घेतलेली भूमिका सकारात्मक असल्याचे यूएनसीने म्हटले आहे. नागा जनतेच्या संघटनेबरोबर पहिली फेरी बीरेनसिंह यांनी जिंकल. मात्र, पुढील आव्हान आहेच

No comments:

Post a Comment