Total Pageviews

Sunday 14 September 2014

LOVE JIHAD MUST READ-THE VOICE FOR JUSTICE

*****न्या. सुरेंद्र भार्गव**** ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ ही चेन्नईस्थित अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिथेजिथे मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले दृष्टोत्पत्तीस येतं तिथे तिथे ही संस्था पोहोचते. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील तथ्यशोधनासाठी, त्याचे तटस्थपणे विश्लेषण करून मानवाधिकारांची पुन:स्थापना करण्यासाठी ही संस्था काम करते. सर्वोच्च तसेच उच्च न्यायांलयातले निवृत्त न्यायमूर्ती, निष्णात वकील, निवृत्त आय.ए.एस./आय.पी.एस. अधिकारी, संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना एकत्र आणून ही संस्था काम करते. या व्यक्तींनी समोर असलेल्या सामाजिक प्रश्नाचा सखोल अभ्यास करावा, त्यातील तथ्य शोधतानाच समाजऐक्य टिकवण्यासाठी, समाजाचे आरोग्य राखण्यासाठी उपाय सुचवावेत अशी अपेक्षा असते. केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्या. या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे संस्थेने ठरवले. प. बंगाल आणि केरळ ही कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेली आणि म्हणूनच धर्मांध मुस्लिमांसाठी मोकळे रान ठरलेली दोन राज्ये. ‘लव्ह जिहाद’ या चळवळीने जोर धरला तो याच राज्यात. त्यानंतर हळूहळू अन्य राज्यांत तिने हातपाय पसरले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समितीमध्ये सिक्किम उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. या समितीने संस्थेला जो अहवाल सादर केला, त्या अहवालाचे साररूप म्हणजे हा लेख. ‘व्हॉइस ऑफ जस्टिस’ ही चेन्नई येथील एक स्वयंसेवी संस्था आहे. तिचे मुख्य उद्दिष्ट आहे मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे. या संस्थेमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, नामांकित कायदेतज्ज्ञ, निवृत्त आयएएस/आयपीएस अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी तसेच शिक्षणक्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि विशिष्ट विषयातील तज्ज्ञ व्यक्ती निवडल्या आहेत. आणि जेव्हा एखादी सामाजिक, कायदेविषयक समस्या उभी राहते, तेव्हा ही संस्था या तज्ज्ञ मंडळींना या समस्येचा सखोल अभ्यास करण्यास व त्यावरील उपाययोजना सुचविण्याची विनंती करते. भारतात मलबारमध्ये स्त्रियांना समाजात विशेष मानाचे स्थान आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच मलबारमध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला आणि चारित्र्याला धोका उत्पन्न झाला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यापैकी काही विकल्या गेल्या आहेत, परदेशात पाठविल्या गेल्या आहेत, म्हाताऱ्यांना दिल्या गेल्या आहेत किंवा गुन्हेगारांच्या/दहशतवाद्यांच्या सेवेसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आणि हे सर्व त्यांच्या ‘प्रियकरांनी’ केले आहे. अशा हरवलेल्या मुलींची संख्या केरळमध्ये हजारांनी आहे. ‘जागो इंडिया’च्या 2 सप्टेंबर 2009मध्ये इंटरनेटवर बातमी होती की, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये केरळ इस्लामिक ऑर्गनायझेशनने हिंदू असलेल्या मुलींना भुलवून त्यांचे धर्मांतर करण्याची मोहीम राबवली. गेल्या पाच वर्षांमध्ये केरळमध्ये 940 मुली बेपत्ता आहेत.’ अशाच एका प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नाकारताना न्यायमूर्ती शंकरन यांनी काही महत्त्वपूर्ण माहितीची नोंद केली. त्यापैकी काही अशी आहे. …एडीएफ आणि पीएफआय या संघटनांची विद्यार्थ्यांसाठी ‘कॅम्पस फ्रंट’ नावाची शाखा आहे. ती शैक्षणिक संस्थांमध्ये आणि व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणींना धर्मांतरास प्रोत्साहन देते. …सौदी अरेबियातील काही संस्था या धर्मांतराच्या कामास, तरुणांकरिता शिष्यवृत्ती या नावाखाली पैशांचा पुरवठा करते. …उत्तर प्रदेश, पुणे, बंगळुरू येथेही धर्मांतराची अशी प्रकरणे आहेत व बऱ्याच हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर केले गेले आहे. …गेल्या चार वर्षांत केरळमध्ये अशा प्रेमप्रकरणांतून मुलींच्या धर्मांतराच्या 300 ते 400 तरी घटना घडल्या आहेत आणि पोलीस खात्यानुसार असे विवाह हे समाजात तणाव निर्माण करू शकतात. न्यायमूर्ती शंकरन यांनी आणखी काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. …असे स्पष्ट झाले आहे की, एका विशिष्ट धर्मातील मुलीचे दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून केले जात आहेत आणि त्याला काही संघटनांचा आशीर्वाद आहे. सामान्य जनतेने आणि सरकारनेही त्याची दखल घेणे जरुरीचे आहे. नागरिकांचे हक्क व मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असते. घटनेमधील 25वे कलम कोणालाही जबरीने धर्मांतर करण्याचे अधिकार देत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकता, असा तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ होत नाही. …पालकांना त्यांच्या सज्ञान मुलांचेही आयुष्य घडविण्याचा हक्क आहे. ते मुलांना सल्ला देऊ शकतात. कोणीही तिऱ्हाईत त्या पालकांना तसे करण्यापासून अडवू शकत नाही. व्यक्तीचे स्वातंत्र्य राखणे हा कलम 25चा उद्देश आहे. कुटुंबसंस्था व संस्कृती नष्ट करण्याचा नाही. शैक्षणिक संस्था, जेथे तरुण मंडळी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात, या जागा धर्मप्रसारासाठी नाहीत. आपल्याकडील काही राज्यांनी बळजबरीने किंवा प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यावर बंदी घातली आहे. ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार केरळमध्येच चालू आहे असे नाही, तर पश्चिम बंगालमध्येही हा चालू आहे. ही दोन्ही राज्ये – केरळ आणि प. बंगाल ही कम्युनिस्ट विचारसरणीची आहेत आणि तेथे मुस्लीम कट्टरवादी, तसेच SIMI, SIO, JEL, HUJI, हिजबुल मुझाहिद्दीन आणि ISI यासारख्या दहशतवादी संघटनांना रान मोकळे आहे आणि बिनसरकारी संस्थांच्या माध्यमातून समाजावर इस्लामची पकड बसविण्याचा उद्योग करीत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आणि इतर राज्यांतूनही अशा प्रकरणांची नोंद आलेली आहे. फक्त हिंदू मुलींचे धर्मांतर होते असे नाही, तर ख्रिश्चन मुलीही याला बळी पडत होत्या. त्यांच्याही बाबतीत आधी प्रेम व नंतर धर्मांतर केले जात असे. काही ख्रिश्चन व हिंदू संघटनांनी या प्रकाराबद्दल आवाज उठविला, तर काही राजकारण्यांना या आवाज उठवण्यामागे राजकारण दिसले. प्रेमातून फसवून धर्मांतर याकडे सबंध भारताचे लक्ष वेधले गेले आहे. मानवी हक्कासाठी झटणाऱ्या संघटनांना आणि सामाजिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांस ते एक आव्हान होते. ‘व्हॉइस फॉर जस्टिस’नेही या घटनांची दखल घेतली आणि या प्रकरणांची शहानिशा करण्यासाठी व त्यातील सत्य जनतेपुढे आणण्यासाठी एक सत्यशोधक समिती नियुक्त केली. यामध्ये केरळ राज्य वगळून इतर राज्यातील नि:पक्ष तज्ज्ञमंडळी होती. 1. सुरेंद्र भार्गव – भूतपूर्व न्यायाधीश, सिक्कीमउच्च न्यायालय – जयपूर (राजस्थान) 2. टी.एस. राव – भूतपूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस – हैद्राबाद (आंध्र प्रदेश) 3. गुरुचरणसिंह गिल – भूतपूर्व अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल – जयपूर (राजस्थान) 4. डॉ. आय.बी. विजयालक्ष्मी MD, DM. बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्तंभलेखिका – बंगळुरू (कर्नाटक) 5. डॉ. सुवर्णा रावळ – अध्यक्षा, भटके-विमुक्त जाती विकास स्वयंसेवी संस्था – भिवंडी (महाराष्ट्र) 6. पी. गणपती – उद्योगपती – चेन्नई 7. एस. रवी – वकील – चेन्नई 8. रमेश पी. गर्ग – औषधनिर्मिती सल्लागार या समितीने काय शोधायचे होते? 1. वर्तमानपत्रामध्ये धर्मांतराबद्दलच्या ज्या बातम्या येतात, त्या घटना प्रत्यक्ष केरळमध्ये घडत आहेत का? 2. धर्मांतराच्या अशा घटनांमागे काही उद्देश आहे का? त्या घटनांमध्ये काही साम्य आहे का? का ती निव्वळ प्रेमप्रकरणे आहेत? 3. सूचना-उपाययोजना सुचविणे सत्यशोधक समितीची कार्यपध्दती समितीने केरळमध्ये जाऊन मुलाखती घेतल्या. त्यामध्ये फसवल्या गेलेल्या मुली, त्यांचे पालक यांचा आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. फसवल्या गेलेल्या मुलींनी मुलाखतीला येण्याचे टाळले. पण बरीच पालक मंडळी आली. त्यांच्या दृष्टीने हा वैयक्तिक प्रश्न राहिला नसून तो सबंध समाजापुढील समस्या बनलेला आहे. त्यांनी त्यांच्या मुली गमावल्या, पण दुसऱ्यांची तशी गत होऊ नये यासाठी त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्यास वाहून घेतले आहे आणि मुलींचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांविरुध्द लढा सुरू केला आहे. सामाजिक संस्थांमध्ये ख्रिश्चन असोसिएशन ऑफ सोशल ऍक्शन (सासा), विश्व हिंदू परिषद, मनशक्ती समुपदेशन केंद्र, जन्मभूमीचे संपादक यांनी आणि काही तज्ज्ञ मंडळींनी बरीच माहिती पुढे अाणली. सत्यशोधन समितीपुढे झालेल्या कथनांची झालक (फसवणूक झालेल्या काही व्यक्ती, पालक आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सत्यशोधन समितीसमोर अनेक हकिकती कथन केल्या. त्या कथनांमधील निवडक उतारे - 1. सुदेश हेराला – कासारगोड येथील श्रीशंभू व सुषमा राव यांचा मुलगा – कोट्टायम येथे माझी नाशीरशी ओळख झाली. त्यांनी माझी खादिनाशी ओळख करून दिली. ती पूर्वी हिंदू होती व तेव्हाचे तिचे नाव विनिता होते. मी पोन्नानी येथे दोन महिने होतो. तिथे माझे धर्मांतर झाले व माझा खादिनाशी विवाह झाला. मला दररोज रु. 50/- देत असत व जर मी आणखी हिंदूंना धर्मांतरासाठी आणले तर जादा पैसे देऊ असे सांगत. दोन महिने मी कुराण शिकलो. धर्मांतर झाल्यावर पहिल्यांदा मला गोमांस खावे लागले. त्याआधी माझी सुंता करण्यात आली. मला दररोज 300 रुपये देत, पण त्यापैकी 250 रुपये खादिनला द्यावे लागत. दोन महिन्यांनंतर तिने माझ्याबरोबर राहणे बंद केले. मला पैसे देणे बंद केले. मग मी तिथून पळालो. त्यांनी माझ्या हातात एक गंडा बांधला होता. तेव्हापासून मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत असे. पोन्नानी हे धर्मांतर करण्याचे केंद्र होते. तिथे देशभरातून माणसे आणली जात. बशीरकडे मोबाइल होता. पण त्याने मला नंबर दिला नाही. घरी परतल्यावर मी पोलिसांकडे गेलो, पण मला मदत करण्याऐवजी त्यांनी मलाच दम दिला. कासारगोड पोलीस ठाण्यात माझ्या प्रकरणाची नोंद आहे. मी यापुढे कोणाही मुस्लिमावर विश्वास ठेवणार नाही. पोन्नानी येथे चौदा पुरुष व तीस स्त्रिया होत्या. सर्वांचे धर्मांतर केले गेले होते. पोन्नाई हे धार्मिक स्थळ नाही, तर धर्मांतराचे केंद्र आहे. 2. फ्रान्सिस डिकसन ऍन्थनी – पावडीकुडी – चर्चेस असोसिएशनचे सेक्रेटरी. यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले - …त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यांना देशामध्ये एकता नको आहे. कुटुंबसंस्था मजबूत करण्यात देशाचे ऐक्य आहे. म्हणून त्यांना कुटुंबे उद्ध्वस्त करायची आहेत. केरळ शिक्षणात अग्रेसर आहे. जर शिक्षणक्षेत्र बिघडवले, तर सर्व देश बिघडेल, म्हणून त्यांनी शिक्षणसंस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोचीनमधील बहुतेक सर्व कॉलेजात – विशेषत: डायोसिस भागात ही कीड पसरली आहे. ऍक्विनॉस कॉलेजात बी.एड. शिकणाऱ्या एका ख्रिश्चन मुलीवर मुस्लीम मुलाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांनी तिला मोबाइल दिला नाही, तो या मुलाने दिला. आईने तो काढून घेतला आणि मुलगी रागावून घर सोडून गेली. अब्रू जाईल म्हणून पालक पुढे आले नाहीत. जेव्हा मुस्लीम मुलगा असला प्रकार करतो, तेव्हा त्याची सगळी जमात त्याला मदत करायला येते. पण आपल्याकडे अशा व्यक्तीला व कुटुंबाला मदत करायला कोणी पुढे येत नाही. … अशा कामांसाठी आइसक्रीम पार्लर्सचा – जेथे त्या मुलींना ड्रग्स देता येतात – वापर केला जातो. हे पार्लर्स मुस्लीम मुलांच्या मालकीचे असतात. तसेच ज्यूस सेंटर, मोबाइल चार्जिंग सेंटर व सायबर कॅफेही या कामांसाठी वापरली जातात. तीही बहुतेक मुस्लिमांच्या मालकीची असतात. परिणामी मुली फसतात, भुलतात. अशा प्रकरणात पालक गुंडांच्या भीतीने व समाजातील बदनामीच्या भीतीने तक्रार नोंदवत नाहीत. CPIपैकी एक गट अशा गुन्हेगारांना मदत करतो आणि यासाठी हवालातून येणारा पैसा वापरला जातो. सौदी अरेबियातून वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फरमार्फत हवाला पैसा येतो. हज यात्रेकरूंमार्फतही पैसा येतो, कारण त्यांची कसून तपासणी होत नाही. या मुस्लीम मुलांना पैसा व वाहने दिली जातात. ही मुले मुलींच्या पालकांना धाकदपटशाही दाखवितात. जेव्हा एखादी मुलगी मोबाइल रिचार्ज करायला येते, तेव्हा तिचा नंबर समजतो. तो दुसऱ्या मुलाला दिला जातो. तो मग तिला सुरुवातीला SMS पाठवतो किंवा फोन करतो व ‘राँग नंबर लागला’ म्हणून नम्रपणे बंद करतो. असे होता होता संभाषण वाढवितो. मैत्री सुरू होते. तेव्हा अगदी आदराने, नम्रपणे व स्तुती करीत असतो व मुलींवर चांगली छाप पाडतो. मग हळूच आइसक्रीम पार्लरवर वा ज्यूस सेंटरवर बोलावतो. तिथे गोडधोड संभाषण, कधीकधी ड्रग दिले जाते आणि मुली नादी लागतात. शेवटी फसतात. अशा पार्लर्सविरुध्द पोलिसात तक्रार केली, पण त्यांच्या विरोधात काही कारवाई करण्यात आली नाही. काही वेळा हिंदू मुलींचे मुस्लीम मुलाबरोबर फोटो काढले जातात व त्यावरून ब्लॅकमेलिंग केले जाते. वैदेही नायरच्या पालकांनी सांगितले - …तो मुलगा फक्त मोटार ड्रायव्हर आहे, तर वैदेही M.Sc.च्या शेवटच्या सत्राची विद्यार्थिनी आहे. तिला 84 टक्के गुण मिळाले आहेत. पण तिचे विचार बदलून, ब्लॅकमेलिंग करून व वशीकरणामुळे ती आता आमच्याकडे परत येत नाही. ही त्याची खूप सेवा करते, पण उद्या ‘तलाक तलाक तलाक’ म्हणून त्याने तिला सोडून दिल्यावर ती कुठे जाईल? …सुप्रसिध्द लेखिका कमला दास यांच्यापासून लव्ह जिहादची सुरुवात झाली. त्या एका मुस्लीम प्रोफेसरसोबत पुस्तक लिहीत होत्या. तो चांगला गातही असे. त्याला आधीच्या दोन बायका होत्या. कमला विधवा होती. तो तिच्याहून बराच लहानही होता. पण त्याने तिला लग्नाला तयार केले. तिने धर्मांतर केले व लग्न केले. तिचे नाव झाले कमला सुरैया. मात्र लग्नानंतर त्या नवऱ्याने तिला सोडून दिले. ती पुन्हा हिंदू धर्मात येऊ शकली नाही. मोबाइल फोन हा एक शापच आहे. एका गरीब घरात तीन मुली होत्या. बारावीत होत्या. त्यांच्या मुस्लीम मित्रांनी त्यांना मोबाइल फोन घेऊन दिले. एक दिवशी त्यांना निर्जन ठिकाणी नेण्यात आले. त्यांच्यावर बलात्कार केला, त्याचे छायाचित्रण केले आणि मग देहविक्रय करावा म्हणून ब्लॅकमेल करू लागले. मुली त्या त्रासाने हैराण झाल्या व त्यांनी आत्महत्या केल्या. सत्यशोधन समितीचे निष्कर्ष समितीने केरळमध्ये घेतलेल्या व्यक्तींच्या, संस्था चालकांच्या मुलाखती, न्यायमूर्ती शंकरन यांची टिप्पणी आणि वेगवेगळे अहवाल यांच्या आधारावर खालील निष्कर्ष काढले. - वर्तमानपत्रांमध्ये जी प्रकरणे प्रसिध्द झाली, ती बनवाबनवी नव्हती. अशी प्रकरणे केरळमध्ये रोज खरोखरच घडून येत आहेत. - बहुतेक प्रकरणांमध्ये एकच कार्यपध्दती आढळते. मोबाइलवर SMSने किंवा मिस्ड कॉलने प्रेमप्रकरणाची सुरुवात केली जाते. सुरुवातीला हे प्रेम खरे वाटते, पण पुढे त्यातून योग्य वेळ पाहून धर्मांतराचे प्रयत्न सुरू होतात. काही प्रकरणात प्रत्यक्ष धर्मांतर केले जाते, तर उरलेल्यांमध्ये धर्मांतर हाच उद्देश असतो. - मोबाइल फोनच्या दुकानात अशा प्रेमप्रकरणांची सुरुवात होते. रिजार्च घेण्यासाठी आलेल्या मुलींचे फोन नंबर व इतर माहिती गुन्हेगारांना दिली जाते. ज्यूस व आइसक्रीम पार्लरमध्ये भेटीगाठींची सुरुवात होते. - धर्मांतरासाठी परदेशातून पैसा येतो, तसेच फसलेल्या मुलींना देहविक्रयकरण्यास भाग पाडणे, दहशतवादी कृत्यांमध्ये वापरणे वा दहशतवाद्यांना पुरविणे याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारांची सखोल चौकशी होणे जरुरी आहे. गरीब तरुण प्रियकर मैत्रिणींना मोबाइल भेट देतात, टू-व्हीलर नवीन घेऊन देतात यावरून त्यांना बाहेरून पैसा पुरवला जातो, हे स्पष्ट होते. अशा दोषी तरुणांचे पालक त्यांना प्रत्यक्ष मदत करत नसले, तरी त्यांची समवयस्क मित्रमंडळी व जमातीतील लोक त्यांना पूर्ण प्रोत्साहन देतात व दहशतही उत्पन्न करतात. - काही प्रकरणांमध्ये संमोहन, मंत्रतंत्र, वशीकरण अशाचा वापर होतो. सरतेशेवटी त्या मुलींचे आयुष्य नासविले जाते. त्या स्थितीत तिचे पालकही तिला साहाय्य करीत नाहीत. त्या मुलींना नरकयातना सोसाव्या लागतात व त्या आत्महत्या करतात. - अशा प्रकरणांच्या विरोधी कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचीच सर्वच पोलिसांची प्रवृत्ती असते. अशा प्रकरणांमध्ये मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने राजकारणीही दुर्लक्ष करतात. - सामाजिक संघटना, समाजसेवक, प्रसारमाध्यमे या बाबतीत फार चांगली भूमिका पार पाडत आहेत. परंतु सरकारने इतक्या दाहक वस्तुस्थितीची पुरेशी दखल घेतलेली नाही. इतर राज्यांतही अशी प्रकरणे घडण्याची शक्यता आहे. याची पुरती चौकशी व बंदोबस्त व्हायला हवा. - समितीपुढे आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये प्रियकर मुलगे मुस्लीम होते आणि फसलेल्या मुली हिंदू अथवा ख्रिश्चन होत्या. केरळमध्ये हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अशा प्रकरणांमुळे या समाजामध्ये वैमनस्य पसरण्याची व राज्यात मोठया प्रमाणात अशांतता माजण्याची शक्यता आहे. समितीने केलेल्या शिफारशी - अशा प्रकरणांबाबत जागृती व्हावी, यासाठी शाळा, महाविद्यालयात त्यांच्या संचालकांनी आणि सरकारने समाजसेवकांची, तज्ज्ञांची भाषणे, परिसंवाद आयोजित करावे. त्यामुळे निष्पाप मुली अशा प्रकारांना बळी पडणार नाहीत. - अशा प्रकरणांवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी पोलीस खात्यामध्ये, राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर विशेष दक्षता पथके स्थापन करावीत. त्यांना मदत करण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन सदस्य असलेली समुपदेशक समिती प्रत्येक जिल्ह्यात नेमावी. - अशा प्रकरणांसाठी होणारी परदेशी आर्थिक मदत, मुलींना वाममार्गास लावणे, दहशतवादी कृत्यांसाठी मुलींचा उपयोग करणे याचा उच्च पातळीवर तपास केला जावा. त्यामुळे राज्यात सर्वसामान्यांच्या हक्कांचे रक्षण होईल व खरे प्रजासत्ताक अंमलात येईल. - मुलांच्या वर्तणुकीबाबत मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पालकांमध्ये जागृती आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनासाठी कार्यशाळांचे/चर्चासत्राचे आयोजन करावे. - अशा बेकायदा धर्मांतरास आळा बसावा म्हणून केरळचे सरन्यायाधीश टी. शंकरन यांनी आणि केंद्र सरकारने सुचविल्याप्रमाणे ‘धर्मांतर बंदी कायदा’ लागू करावा. इतर राज्यांमध्येही अशा प्रकरणांबद्दल चौकशी केली जावी. अशा प्रकरणांचा मागोवा घेणे, तपास करणे व त्यांना आळा घालणे यासाठी राज्यस्तरावर एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. - अशी प्रकरणे होऊ नयेत अशी खबरदारी घेण्यामध्ये मानव हक्क संरक्षण संघटनांनीही महत्त्वाची जबाबदारी उचलावी. समितीला या सत्यशोधनाच्या कामात फसवणूक झालेल्या मुलींचे पालक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले. या सगळयांच्या सहकार्यामुळेच अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर समिती एका निष्कर्षाप्रत येऊ शकली. श्रीमती लीला मेनन (संपादिका, जन्मभूमी) …मध्य केरळातील दोन मुली मुस्लीम मुलांबरोबर पळून गेल्या. या मुली MBA करीत होत्या आणि ती मुले बस कंडक्टर होती. त्यांनी येनकेन प्रकारे मैत्री जमविली आणि मग त्यांना मुस्लीम धर्माचे ग्रंथ (कुराण) दिले व इतर रीतिरिवाज शिकवले. शेवटी त्या पळून गेल्या व त्यांनी लग्न केले. या सगळया लव्ह जिहाद प्रकरणात मुलींना मदरशात नेले जाते. तिथे कुराण शिकविले जाते आणि त्यांचे धर्मांतर केले जाते. …सुप्रसिध्द लेखिका कमला दास यांच्यापासून लव्ह जिहादची सुरुवात झाली. त्या एका मुस्लीम प्रोफेसरबरोबर पुस्तक लिहीत होत्या. तो चांगला गातही असे. त्याला आधीच्या दोन बायका होत्या. कमला विधवा होत्या. तो त्यांच्याहून बराच होता. पण त्याने कमला यांना लग्नाला तयार केले. कमला यांनी धर्मांतर केले आणि लग्न केले. त्यांचे नाव झाले ‘कमला सुरैया’. मग लग्नानंतर त्याने कमला यांना सोडून दिले. त्या पुन्हा हिंदू धर्मात येऊ शकल्या नाहीत. … असे ऐकले की त्या प्रोफेसरला, कमलाचे धर्मांतर करण्यासाठी आखाती देशातून एक कोटी रुपये दिले गेले होते. कारण ती एक सुप्रसिध्द व्यक्ती होती. …त्याला पैसा मिळाल्यावर त्याने तिला सोडले. त्याचा इतर बायकांशीही संबंध होता. त्याला कमलापाशी राहायचे नव्हते. शिकलेल्या मुली अशा नालायक मुलांवर भाळतात कशा? याचे कारण बहुतेक मुस्लीम मुले इतरांपेक्षा दिसायला चांगली असतात. त्यामुळे मुलींवर छाप चांगली पाडू शकतात. माझे असे म्हणणे आहे की, आया मुलींकडे दुर्लक्ष करतात म्हणून मुली बिघडतात. आई आणि मुलगी यांच्यात मोकळे बोलणे होतच नाही. बऱ्याच मुली सांगतात की त्यांच्या आईला त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो. केरळमधील मुली बेपत्ता होण्याच्या घटना जिल्हा घटनांची तक्रारी सोडवलेल्या संख्या नोंदवल्या मुली त्रिवेंद्रम 216 26 6 कोळम 98 34 7 आलाप्पुझा 78 22 5 पथनमथित्तं 87 36 11 इडुक्की 156 18 9 कोट्टायम 116 46 13 एर्नाकुलम 228 52 26 त्रिसूर 102 41 19 पलाक्कड 111 19 9 मल्लापुरम 412 88 31 कोझीकोडे 364 92 29 कन्नूर 312 106 27 कासारगोड 585 123 68 (संदर्भ : ‘जन्मभूमी’ मल्याळी मासिक

No comments:

Post a Comment