Total Pageviews

Saturday 22 December 2012


१३ हजार अधिकारी आणि ५५ हजार जवानांची सेनेमध्ये कमतरता
ज्या सेनेमुळं तुम्ही-आम्ही निर्धास्तपणे अंथरुणाला पाठ टेकू शकतो, ते भारतीय संरक्षणदल... १९७१ च्या भारत-पाक युद्धातल्या विजयाची आठवण म्हणून १५ डिसेंबर आणि १६ डिसेंबर रोजी आपण विजय दिवस साजरा करत आहोत. मात्र, त्याच वेळी एक गंभीर वस्तुस्थितीनं सैन्यदलांना घेरलंय. भारतीय लष्करात सुमारे १३ हजार अधिकारी आणि ५५ हजार जवानांची कमतरता आहे. संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही गंभीर परिस्थिती समोर आलीय.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्यामुळं उपलब्ध झालेले नोकरीचे इतर पर्याय, लष्कराची कठोर निवड प्रक्रिया, मोठ्या प्रमाणातील जोखीम आणि लष्करी नोकरीतील बिकट परिस्थिती या कारणामुळं ही पदं रिक्त असल्याचं अँटनी यांनी म्हटलंय. सैन्यदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये रिक्त जागांचं प्रमाण लक्षणीय आहे. लष्करात जुलै अखेर १०१०० अधिकारी आणि ३२,४३१ कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. नौदलात सप्टेंबर अखेर १९९६ अधिकारी आणि १४,३१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर हवाई दलात डिसेंबर अखेर ९६२ अधिकारी आणि ७००० कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही संरक्षण दलांना सक्षम करण्यासाठी संरक्षण दलातल्या नोकरीबाबत तरुणांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची गरज निवृत्त अधिकारी व्यक्त करत आहेत.
सैन्यदलातील नोकरी म्हणजे भविष्याची शाश्वती नाही, असा विचार सध्याचा पालकवर्ग करतो. सैन्यदलातीलअधिकार्यानाही विवाहासाठी कोणी मुली देण्यास सिद्ध होत नाहीत. अशा प्रकारे अत्यंत चुकीची विचारधारा समाजात पसरत असल्याने भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांमध्ये पराकोटीची उदासीनता निर्माण झाली आहे. भविष्यात भारतावर कोणी आक्रमण केले, तर भारत सैन्याच्या कमरतेमुळे युद्ध हरेल का? पत्रकार परिषदेत मेजर जनरल बावा १९७१ मधील युद्धात भारताने पाकला १६ डिसेंबर या दिवशी हरवले. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा दिवस भारतीय सैन्यदलविजय दिवस म्हणून साजरा करते. त्या निमित्ताने नागरिकांशी जवळीक निर्माण व्हावी, याकरिता प्रतीवर्षी विविध ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येते. भारतीय सैन्यदलात ज्यांचे आजोबा, वडील होते, त्याच घरातील युवकांना सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे केवळ अशाच घरांमध्ये सैन्यात भरती होण्याची परंपरा टिकून आहे; परंतु नव्याने कोणी देशाचे रक्षण करण्याचे दायित्व स्वीकारण्यास सिद्ध नाही. सध्या भारतीय सैन्यदलात १२ सहस्र अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. तेव्हा बौद्धिक क्षमता असणार्‍यांची सैन्यदलाला आवश्यकता आहे. बौद्धिक प्रगल्भता असलेले देशभरातील युवक मुंबईत शिकायला येतात; तेव्हा हा मेळावा पाहून ते सैन्यदलाकडे आकर्षित होतील, अशी आशा वाटते. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांतील अनेक घरे सैन्यदलाची बनलेली आहेत. या ठिकाणी वंशपरंपरेनुसार सैन्यदलात नोकरी करणारे मोठ्या संख्येने आहेत असे पत्रकार परिषदेत मेजर जनरल बावानी सान्गितले.
.स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास नव्या पिढीला शिकवा. १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धातील प्रसंगांचे वर्णन, भारतीय जवानांची शौर्यगाथा ऐकून त्यांच्याही अंगावर रोमांच उभे होऊ द्या. गेली सहा दशकं या देशाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयत्न झालेत. या देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता जोपासण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या संघार्षाची जाणीव या पिढीला होऊ द्या .केवळ शिवरायांच्या काळातच नाही, तर अगदी अलीकडे, स्वातंत्र्याच्या गेल्या सहा दशकांतही सैन्यातील जवानांनी तोच पुरुषार्थ गाजवला आहे, हे या देशातल्या नव्या पिढीला कळायला हवे .या पिढीला देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या शूरवीरांचीही ओळख झाली पाहिजे.
विदर्भात सैन्यभरतीला कमी प्रतिसादमहाराष्ट्रातील
इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात सैन्य भरतीला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या सहज उपलब्ध संधी सैन्यदलातील नोकरीविषयी असलेले गैरसमज यामुळेच प्रतिसाद कमी असल्याचे मत लष्कराच्या भरती विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर नरिंदरसिंग यांनी व्यक्त केली. राज्य सरकारची इच्छा असेल तर नक्षलवादग्रस्त भागात भरती मोहीम राबविण्याची लष्कराची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय लष्करात दरवर्षी टक्के जागा रिक्त होतात. त्या भरण्यासाठी देशपातळीवर भरती प्रक्रिया राबवण्यात येते. महाराष्ट्राच्या वाटय़ाला दरवर्षी ते हजार जागा येतात. या जागा महाराष्ट्र गोवा या दोन राज्यातून भरण्यात येतात. लष्कराला दरवर्षी गोवा मुंबईतून भरतीसाठी अजिबात प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातून भरतीला भरपूर प्रतिसाद मिळतो. त्या तुलनेत विदर्भात मात्र युवकांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे.
महाराष्ट्राच्या वाटय़ाला येणाऱ्या एकूण जागांपैकी किमान २० टक्के जागा इतर विभागाच्या तुलनेत मागास असलेल्या विदर्भातून भरल्या जाव्यात, अशी लष्कराची अपेक्षा असते. प्रत्यक्षात युवकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने दरवर्षी ते शक्य होत नाही. सध्या राज्यात जळगाव चंद्रपूर येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जळगावला ४० हजार युवकांचा प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत चंद्रपूर येथे मिळणारा प्रतिसाद कमी आहे. येथे या प्रक्रियेत केवळ तीन हजार युवक सहभागी झाले. नागपूर अमरावती येथेही ही प्रक्रिया काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. तेथे पाच ते सहा हजार युवकांचा प्रतिसाद मिळाला. इतर विभागाच्या तुलनेत हा प्रतिसाद अतिशय कमी आहे. विदर्भाचा भाग मागासलेला असला तरी या भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे युवकांचा कल स्थानिक संधी शोधण्याकडे जास्त आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्हे नक्षलवादाने ग्रस्त आहेत. या जिल्हय़ांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथे पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद मिळतो पण लष्कराला नाही. नक्षलवादग्रस्त भागातील तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात दाखल व्हावेत, अशी लष्कराची इच्छा आहे. एनडिए महाराष्ट्रात आहे पण...राष्ट्रभावनेपेक्षा धर्मभावना व ऐहिक ऐषारामी जीवनास आज जास्त प्राधान्य आहे. राष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान करू त्यातच जीवनाचे सार्थक आहे. ही भावना निर्माण करण्यात आपले राजकीय नेर्तृत्व, शाळा, कॉलेजेस, आई वडील पूर्णपणे अपयशी झाले आहेत.भारतात किती राष्ट्रपती पंतप्रधान मंत्र्यांची आणि राजकारण्याची मुले सैन्यात आहेत?इंग्लंडचा राजकुमार हॅरी आणि विलियम यांनी आताच तालिबान विरुद्ध अफगाणिस्तान मध्ये युद्धात भाग घेतला होता. ही परंपरा युरोप आणि अमेरिकेन मोठ्या प्रमाणात आहे. भारतात हे फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. राजकीय पुढारी, नोकरशाही यांच्या परिवाराबद्दल काय बोलावे. ते देशरक्षण सोडून बाकी सर्व कामे करतात.महाराष्ट्रात तलाठी, जकात नाक्यावरचा कारकून सरकारी ऑफिसमधला माणूस चांगली कमाई करतो. मग सामान्य माणूस कारागील किंवा काश्मीरमध्ये जाऊन हुतात्म बनायची इच्छा का बाळगेल. आज नक्षलवाद, आतंकवाद, बांगलादेशी घुस खोरांविरुद्धची लढाई महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये येऊन पोहचली आहे. केवळ सीमेवरच्या सैनिकांनीच नाहीतर आपले घर आणि परिसराची सुरक्षितताची काळजी प्रत्येकालाच करावी लागेल. सीमेपलीकडून भारतला हजार घाव घालून रक्तबंबाळ करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. प्रत्येक शहरात गावात वॉट मेमोरियल हवे ज्यामुळे त्या गावातील शहीदांची सतत आठवण राहील जसा भारतीय स्वातंत्र्य लढा शाळेत शिकवला जातो. तसाच स्वातंत्र्योत्तर लढाया (१९४७,६२,६५,७१,१९९९) काश्मीर ईशान्य भारतातील आतंकवादाच्या विरुद्ध ऑपरेशन शिकवायला हवे. स्वातंत्र्य रक्षणाकरता सैनिकांनी काय किंमत मोजली याची माहिती प्रसारमाध्यमांनी सर्व सामान्यांना दिली पाहिजे केवळ मार्क-परीक्षा यामध्ये मुलांना न गुंतवता शौर्य, पराक्रम, धाडस, नेर्तृत्व गुण कसे वृद्धिंगत नेतील हे पाहयला हवे. तरुण पिढीसमोर आजचे आदर्श कोण? निरनिराळे रिऍलिटी शो क्रिकेट, सिनेमा याचा अरितेक सुरू आहे. त्या ऐवजी समाजसेवक, शास्त्रज्ञ, लढवय्ये शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, मेजर संदीप उन्नीकृष्णन ऐन पंचविशीमध्ये प्राणाचे बलिदान देणारे लेप्टनंट, कॅप्टन आपले आदर्श बनायला हवे मुलांनी सैन्यदलात जावे म्हणून खास प्रशिक्षण आणि प्रोत्साहन द्यायला हवे. मराठी लेखक-कवी यांनी आपली लेखणी लष्कराचे पराक्रम लिहिण्यासाठी वापरली तर फार समाधान वाटेल. दुर्दैवाने १९६२ चा अपवाद व त्यावेळचा जिंकू किंवा मरूयासारख्या गाण्याचा अपवाद वगळता आमचे महारथी लेखक कवी गाय संगीतकार गप्प का? कडवा राष्ट्रवाद तरुणामध्ये रूजवलासाठि शैक्षणिक धोरणात आमुलाग्र बदल करावा लागेल. भारताच्या भावी राष्ट्रप्रेमी नागरिकांना बनवायची जबाबदारी शाळांची, पालकांची आणि समाजातील प्रत्येक घटकाची आहे.आजकाल लष्करात जा म्हणून फारसे पालक सांगत नाही. ज्यांना जावेसे वाटते त्यांना पुरेशी माहिती नसते. म्हणून ही माहिती आणि परिक्षांकरता तसाही खूप वर्षे आधीच करायला हवी. समाजामध्ये राष्टप्रेमाची लाट पसरायला हवी. अभिमन्यूचे वारस प्रत्येक घरात जन्मले पाहिजे तरच हा देश सुरक्षित होऊ शकेल.  
सैन्यदलातील रिक्त पदे
*लष्कर
जवान - ३२,४३१
अधिकारी - १०१००
* नौदल
खलाशी - १४,३१०
अधिकारी - १९९६
* हवाई दल
वायूसैनिक - ७०००
अधिकारी - ९६२वेळेआधीच निवृत्ती
* लष्कर - १०,०८१
* हवाई दल - ५७१
राजीनामा
* लष्कर - १०,६०३
* नौदल - १५७
* हवाई दल - १०००

No comments:

Post a Comment