Total Pageviews

Sunday 12 August 2012

VIOLENCE IN MUMBAI

सीएसटी परिसरातील हिंसाचारात तणाव; दोन ठार
सीएसटी परिसरात काही संघटनांकडून आसाममधील हिंसेविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागून दोन जण ठार झाले.
आसाममध्ये वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांना तसेच म्यानमारमधील मुस्लिमांना भारत सरकारने संरक्षण द्यावे, अशी राष्ट्रद्रोही मागणी करीत, मुंबईतील गजबजलेल्या आझाद मैदानावर एकत्र आलेला मुस्लिम संघटनांच्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले.मोर्चात सहभागी झालेल्या समाजकंटकांनी जाळपोळ आणि दगडफेक करीत बेस्टच्या अनेक बसेस, पोलिसांची वाहने आणि मीडियाच्या वाहनांचीही होळी केली. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून, पोलिसांसह ५० जण जखमी झाले. भाजपा आणि विहिंपने मुस्लिमांच्या या हिंसाचाराचा आणि राज्य सरकारच्या मवाळ भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.
भारतात राहणार्‍या बांगलादेशी मुस्लिमांचे तसेच म्यानमारमधील मुस्लिमांचे रक्षण करण्यात यावे, अशी मागणी करीत या मुस्लिम संघटना रजा अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आल्या. भारतविरोधी घोषणा देत, या मोर्चातील काही समाजकंटकांनी आझाद मैदानाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनांना आगी लावून त्या पेटवून दिल्या. यामुळे सीएसटी परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
आसाम आणि म्यानमारमधील दंगलीच्या निषेधार्थ इस्लाम संस्कृतीचा प्रचार करणार्‍या रजा अकादमीने आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले होते. या संघटनेला जमैतुल उलेमा आणि जमाते रझा--मुस्तफा यासारख्या मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या मोर्चात ३५ ते ४० हजारांहून अधिक मुस्लिम कार्यकर्ते सहभागी झाले होते. आझाद मैदानाजवळ येताच मोर्चात सामील झालेल्या काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांनी येथील वाहनेसुध्दा पेटवून दिली. टीव्ही , पी आणि एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनसह पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
पोलिसांनी संतप्त जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांच्यावरच दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून आग लावण्यात आली. मोठ्या संख्येने असलेल्या जमावापुढे पोलिसांची ताकद कमी पडल्याने अधिक कुमक मागविण्यात आली. तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमावाने धडक देत ते तोडण्याचा प्रयत्न केला. बेस्टच्या बसेसनाही आगी लावण्यात आल्या. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रुधुराच्या सहा नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव हटत नसल्याने हवेत गोळीबार करण्यात आला.
मुंबई- आसाम आणि म्यानमार येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ रझा अकादमीने सीएसटी परिसरात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी प्रसारमाध्यमांच्या वाहनांवर आणि परिसरातील वाहनांवर दगडफेकीस सुरुवात केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला पण त्यानंतरही आंदोलक आटोक्यात येत नसल्याने हवेत गोळीबार करावा लागला. या सर्व हिंसाचाराच्या घटनेमध्ये दोन डण ठार झाले असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश पोलिस कर्मचारी आहेत.
आसाम आणि म्यानमार येथे दंगलीमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात असल्याच्या निषेधार्थ रझा अकादमीने हा शनिवारी मोर्चा काढला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. दुपारी 2.30 च्या सुमाराला चेह-यावर पट्टी लावलेल्या काही जणांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. रझा अकादमीचा मोर्चा आक्रमक होता. परिसरात दगडफेक, जाळपोळ आणि मोडतोड करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या आत या ठिकाणी दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हिंसक जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत गोळीबारही केला. आझाद मैदानापासून जवळच असलेल्या पत्रकार संघातही आंदोलनकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. फाटक तोडून आत शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलनकर्त्यांना रोखणा-या पत्रकार आणि कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. एबीपी माझा, न्यूज 24 आणि पी 7 या वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनचेही नुकसान करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांसोबत दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. सांगली दौरा अर्धवट टाकून गृहमंत्री मुंबईत सीएसटी परिसरात उसळलेल्या दौ-यामुळे गृहमंत्री आर आर पाटील सांगलीचा दौरा अर्धवट टाकून मुंबईतला परत येण्यास निघाले आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून, आवश्यक असेल तर घराबाहेर पडा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच या काळात पसरवण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहनही त्यांना नागरिकांना केले आहे.आंदोलनाचा परिणाम रेल्वेसेवेवरहीसीएसटी परिसरात उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम रेल्वेसेवेवरही झाला. दुपारी साडेतीनच्या सुमाराला सुरक्षेच्या कारणास्तव हार्बर लोकलसेवा अर्धा तासासाठी थांबवण्यात आली होती. चारच्या सुमाराला ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. शनिवार असल्याने, अर्धा दिवसांचे काम आटोपून घरी परतणा-या चाकरमान्यांना या आंदोलनचा फटका बसला. सीएसटीहून चारच्या सुमाराला सुटणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने सुटल्या. संध्याकाळी सहानंतर ही सेवा सुरळीत झाली.सीएसटी परिसरात अघोषित संचारबंदीआझाद मैदान परिसरात उसळलेल्या आंदोलनानंतर डी एन रोड ते जेजे उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच महापालिका मार्ग ते मेट्रो जंक्शनपर्यंत चपलांचा खच पडलेला दिसत होता. पोलिस गणवेशाच्या टोप्या आणि सुरक्षा पॅडचे तुकडेही या रस्त्यावर उशिरापर्यंत दिसत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेच्या सीएसटी रेल्वेस्थानकावरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसरात ये-जा करण्यास पोलिसांनी काही काळ मज्जाव केला होता. संध्याकाळी पाचनंतर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली. त्यानंतर परिसरात पुन्हा वावर सुरू झाला. अफवांचे पीकआझाद मैदानात उसळलेल्या हिंसाचारानंतर या परिसरात शहरात अफवांना ऊत आला होता. सीएसटी रेल्वे स्थानकात लोकलसाठी निघालेल्या कर्मचारी एकमेकांना फोनाफोनी करत वाटेल त्या बातम्या देत होते. तोडफोडीत झालेले नुकसानपोलिस व्हॅनसह 11 वाहने जाळली. एबीपी माझा, न्यूज 24 आणि पी 7 या वाहिन्यांच्या ओबी व्हॅनची तोडफोड 25 बेस्ट बसेसची तोडफोड बीएमसीच्या पार्किंगमधल्या 5 मोटारसायकलींचे नुकसानशांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन आझाद मैदान येथे झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये, असे त्यांनी सांगितले. आझाद मैदानावर झालेल्या घटनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्याबाबतची माहिती घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.मुख्यमंत्र्यांची इफ्तार पार्टी रद्दआझाद मैदान येथे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात झालेल्या हिंसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केलेली इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमझान महिन्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता हज हाऊस येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी मुस्लिम समाजातील मान्यवर, मंत्रीमंडळातील सहकारी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली आहे.अफवांवर विश्वास ठेऊन नका-गृहमंत्र्यांचे आवाहनआझाद मैदान येथे घडलेल्या हिंसाचाराची माहिती मिळताच सांगली जिल्ह्यात असलेले गृहमंत्री आर. आर. पाटील तातडीने मुंबईकडे निघाले असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाज कंटकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेऊन नये. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून राज्यात सर्व पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.भाजपकडून निषेधआझाद मैदानांवरील झालेल्या हिंसाचाराचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आसाममधील दंग्यांचा निषेध करण्यासाठी मुंबईत दंगे करणे हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असून प्रसार माध्यमांना तसेच पोलिसांना लक्ष्य बनवणे घातक आहे, असे त्यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करीत असतानाच महाराष्ट्रातील जनतेने संशयम पाळावा असे आवाहन त्यांनी केले आहेजमावाचं रौद्र रुप अन् पोलिसांची हतबलताएकीकडे आझाद मैदानात रझा अकादमीची प्रचंड सभा सुरु असतांनाच प्रसारमाध्यमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे केली जात होती आणि त्यामुळेच जमावाने अचानक रौद्र रुप धारण केले, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनीही याबाबत पोलीस तपास करणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी या हिंसाचारादरम्यान पोलिसांची हतबलता दिसून येत होती.जमाव प्रक्षुब्ध होऊन नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिस हतबल झाल्याचे दिसून येत होते. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतरही जमावातील काहीजण घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसत होते. यापैकी अनेकजण मोबाईलवर प्रसारमाध्यमांचे चित्रिकरण करीत होते. तणावपूर्ण परिस्थिती असतानाही संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक गट मेट्रो जंक्शनच्या दिशेने घोषणाबाजी करीत आला. पोलिसांनी लाठीमार करुन या जमावाला पांगवले तर पुन्हा प्रसारमाध्यमाच्या कं पूत शिरुन तावातावाने बोलणा-या एका युवकाला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनानंतर सीएसटीहून हार्बर मार्गे जाणा-या सर्व रेल्वेगाडय़ा आंदोलकांनी खचाखच भरल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मौलवींना मोटरमनच्या केबिन मध्ये बसविण्यात आले होते. रुळावर असलेल्या जमावाला तसेच स्थानकावरील आंदोलकांना हे मौलवी शांततेचे आवाहन करीत होते. हार्बर आणि मध्य रेल्वेने सीएसटीच्या सर्व गाडय़ा वडाळापासून मध्ये अडकून पडल्या होत्या. ४४ पोलीस जखमी
दंगलखोरांनी बांबू-काठी, दगडांचा वापर करून पोलिसांवर आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल ४४ पोलिस जखमी झाले आहेत. अनेक पोलिसांची डोकी फुटली तर काहींना फ्रॅक्चर झाले. अनेक पोलीस रक्तबंबाळही झाले. सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारांसाठी जखमी झालेल्या २० पोलिसांना दाखल करण्यात आले. अन्य पाच जखमींवर जेजे रुग्णालयात तर २५ जणांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चार छायाचित्रकारही जखमी
या हिंसाचारात चार छायाचित्रकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंगलखोरांच्या हिंसाचारातसकाळ टाईम्स’चे प्रशांत सावंत, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे श्रीराम वेर्णेकर, ‘ हिंदू’चे विवेक बेंद्रे, आणिमिड-डे’चे अतुल कांबळे हे चार छायाचित्रकार जखमी झाले. दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या कॅमेऱ्यांची नासधूस केली. छायाचित्रकारांवरील या हल्ल्याचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. अशा प्रकारची निदर्शने आहेत हे माहिती असतानाही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. अशा संवेदनशील प्रसंगी चोख खबरदारी घ्यायला हवी होती, पण पोलिसांनी उदासीनता दाखवल्यानेच हिंसाचाराला वाव मिळाला, अशी टीकामुंबई प्रेस क्लब’ने केली आहे आसाममधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदानावररझा अकादमी’कडून करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गाडय़ा फोडल्या गेल्या, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला आणि प्रसारमाध्यमांच्या गाडय़ा जाळण्यात आल्या. या साऱ्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असून, मुंबईची शांतता बिघडविणाऱ्या दंगलखोरांची पाळेमुळे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील खणून काढणार की त्यांच्यासमोर शेपूट घालणार, तेच मला पाहायचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रियामनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात काल झालेल्या धुमश्चक्रीदरम्यान हिंसक जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. काही पोलिसांची शस्त्रंही या दंगलीत गहाळ झाली आहेत.
आसाम आणि म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीनं शनिवारी दुपारी आझाद मैदानावर सभा बोलावली होती. पण, या सभेतील जमाव अचानक हिंसक झाल्यानं सीएसटी परिसरात अक्षरशः धुमश्चक्री झडली होती. पोलिसांच्या गाड्या, खासगी वाहनं, वृत्त्वाहिन्यांच्या ओबी व्हॅन पेटवण्यापर्यंत या जमावाची मजल गेली. मुंबई महापालिका, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगवर, तसंच बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली. अनेक पोलीस या हिंसाचारात जखमी झाले. लाठीचार्ज आणि अश्रूधुरालाही जमाव जुमानत नसल्यानं पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता.
या धुमश्चक्रीत २३ दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. दंगल घडवणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान, पोलिसांवर हल्ला आदी गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आलेत. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी आहेत. त्यापैकी ४० हून अधिक पोलीस कर्मचारी असल्याचं समजतं. हा जमाव इतका बेभान, बेधुंद झाला होता, की त्यांनी महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केलं. या प्रकाराची गंभीर दखल पोलीस खात्यानं घेतलेय. पोलिसांच्या दोन एसएलआर रायफल आणि एक पिस्तुल गायब असल्यानं त्याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या हिंसाचारप्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ही धुमश्चक्री घडवून आणल्याचा त्यांचा संशय आहे आणि पडद्यामागच्या सूत्रधारांना अटक व्हावी, अशी मागणी ते करत आहेत. पुणे स्फोटांपाठोपाठ झालेल्या या हिंसाचारामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर विरोधकांच्या रडारवर आहेत.

No comments:

Post a Comment