MUMBAI VIOLENCE TARUN BHARAT EDITORIAL
इस्रायलसोबत मैत्रीचा करार केला तेव्हा याच संघटनेने तीव्र विरोध केला होता .
मोर्चे काढले होते .
मुंबईत ताज हॉटेलसोबतच ज्यू लोकांचे केंद्र असलेल्या छाबाद हाऊसवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्यानंतर ,
याच अकादमीच्या काही लोकांनी सध्या पकडला गेलेला अबु जुंदाल याला मुंबईची माहिती पुरविली होती ,
असा संशय त्यावेळी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला होता .
अशा संघटनेला मोर्चासाठी परवानगी देताना शासनाने जुना इतिहास नजरेखालून का घातला नाही ?
मुंबईमध्ये वर्षानुवर्षांपासून जावई बनून असलेले हजारो बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्या राष्ट्रद्रोही समर्थकांनी शनिवारी मुंबईतील आझाद मैदान आणि नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आत -
बाहेर जी जाळपोळ आणि हिंसाचार माजविला तो पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने मुंबई पेटविण्याचेच मनसुबे आखण्यात आले होते ,
हे आता स्पष्ट झाले आहे .
हिंसाचार माजविणार्यांपैकी ज्या २३ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे ,
त्यांनीच काही लोक मुंबईबाहेरून मागविण्यात आले होते ,
अशी कबुली दिली आहे .
आज या २३ जणांना न्यायालयात उपस्थित करताना ,
पोलिसांनी जी कागदपत्रे सादर केली ,
त्यात या मुद्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे .
ही बाब पोलिसांनीच उघड केल्यामुळे शनिवारच्या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे .
आता मुंबईला पेटविण्याच्या या कटात कोणकोण सहभागी होते ,
याचा शोध प्रामाणिकपणे पोलिसांनी केला पाहिजे आणि सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे .
या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग पूर्णपणे अपयशी ठरला ,
हेही लपून राहिलेले नाही .
पोलिसांनी न्यायालयात जे सांगितले आहे ,
ते भयंकर आहे .
आरोपींनी पोलिसांच्या दोन सेल्फ लोडिंग रायफल्स (
एसएलआर )
आणि एक पिस्तूल हिसकावून नेले .
जाळपोळ करण्यासाठी सोबत ज्वालाग्राही पदार्थ आणले होते .
या जाळपोळीसाठी आरोपींनी पेट्रोल बॉम्बचा वापर केला .
काही जणांनी आपल्यासोबत पिशव्यांमधून दगड आणले होते .
अनेकांजवळ लाठ्याकाठ्या होत्या .
या सर्व माहितीचे अवलोकन केल्यास हे राष्ट्रद्रोही लोक किती तयारीने आले होते ,
याचा अदमास यावा .
पण ,
या तयारीची माहिती स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना होणार्या मुंबई पोलिसांना का कळली नाही ,
हे एक गूढच आहे .
तपासात असेही आढळून आले आहे की ,
या मोर्चाला परवानगी द्यावी ,
आझाद मैदानावर जमण्याची अनुमती द्यावी ,
अशी शिफारस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी केली होती .
हे नेते कोण ,
याचाही शोध घेऊन त्यांची नावे आणि त्यांच्या गेल्या १५ दिवसांच्या कारवाया याचीही माहिती पोलिसांनी जनतेला दिली पाहिजे .
कारण ,
या मोर्चाच्या तयारीसाठी ज्या बैठका झाल्या ,
त्या बैठकांना हे नेते उपस्थित होते .
यात समाजवादी पक्षाचेही काही नेते होते .
एसएमएस संपूर्ण मुंंबईभर वाजत होते .
पोलिसांना या सर्व बाबी आता एवढी मोठी घटना झाल्यानंतर कळली ,
असेही नाही .
या सर्व बाबींची कल्पना पोलिसांना होती अशी कबुली मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांनी स्वत :
दिली आहे .
मग ,
ही सर्व माहिती कुणाच्या आदेशाने दडवून ठेवण्यात आली होती ?
आपले गुणवान गृहमंत्री आर .
आर .
पाटील याबाबत बोलायला तयार नाहीत .
त्यांनी फक्त शांतता राखा ,
एवढे एका ओळीचे आवाहन तेवढे केले आहे .
बाकी सारी माहिती देण्याची जबाबदारी त्यांनी पोलिसांवर ढकलून दिली आहे .
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे .
स्वातंत्र्यदिन अवघ्या चार दिवसांवर आहे .
अतिरेकी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात ,
असे संकेत दिल्लीहून गुप्तवार्ता विभागांनी दिले होते .
असे असताना ,
या मोर्चाला परवानगी दिलीच कशी गेली ,
हा प्रश्न आता येथे उपस्थित झाला आहे .
अण्णा हजारेंनी आझाद मैदान काही दिवसांसाठी उपोषणासाठी मागितले असता ,
त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली परवानगी नाकारण्यात आली होती .
मग या कुणा रझा अकादमीला आझाद मैदान आणि मोर्चा काढण्याची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आली ?
परवानगी दिली नाही तर आपल्याला विशिष्ट समुदाय (
बांगलादेशी घुसखोरांसह )
मते देणार नाही ,
या भीतिपोटी ती देण्यात आली होती काय ,
असा प्रश्न येथे उपस्थित होतो .
म्हणूनच या संपूर्ण हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे .
तेव्हाच या प्रकरणातील सारी तथ्ये बाहेर येतील .
ज्या रझा अकादमीला मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली ,
ती संघटना १९७८ साली स्थापन झाली आहे .
सुन्नी पंथीयांचे हे संघटन आहे .
सुफी साहित्याचा प्रचार -
प्रसार करण्याच्या नावाखाली एक सांस्कृतिक संघटना म्हणून तिचे स्वरूप असल्याचे सांगितले गेले .
पण ,
या घटनेनंतर मात्र या संघटनेच्या आडून काही देशद्रोही लोक आपल्या नापाक कारवाया करीत असल्याची शंका पोलिसांनीच उपस्थित केली आहे .
एका बाबीचा उल्लेख येथे करावा लागेल .
भारताने इस्रायलसोबत मैत्रीचा करार केला तेव्हा याच संघटनेने तीव्र विरोध केला होता .
मोर्चे काढले होते .
मुंबईत ताज हॉटेलसोबतच ज्यू लोकांचे केंद्र असलेल्या छाबाद हाऊसवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्यानंतर हीच याच अकादमीच्या काही लोकांनी सध्या पकडला गेलेला अबु जुंदाल याला मुंबईची माहिती पुरविली होती ,
असा संशय त्यावेळी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला होता .
अशा संघटनेला मोर्चासाठी परवानगी देताना शासनाने जुना इतिहास नजरेखालून का घातला नाही ?
असे एक ना अनेक प्रश्न या हिंसाचाराच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत .
आता रझा अकादमी म्हणते ,
हल्लेखोरांमध्ये आमचे लोक नव्हते .
हे तर ते कालही सांगू शकले असते .
पण ,
आज पोलिसांनी जेव्हा सांगितले की ,
हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई आयोजक संघटनेकडून करण्यात येईल ,
तेव्हा अकादमीचे तोंड उघडेल .
पण ,
शासनाने या अकादमीला कोणतीही दयामाया न दाखविता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले पाहिजे .
मुंबईत बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे .
पण ,
या लोकांना शोधून काढण्यासाठी सरकारने कोणताही प्रयत्न केलेला नाही .
केवळ या राष्ट्रद्रोही लोकांंच्या गठ्ठा मतांसाठी ही लाचारी सुरू आहे .
त्यात भरडले जात आहेत ते मुंबईकर .
या हल्लेखोरांना दुपारपासून रात्रीपर्यंत दक्षिण मुंबईला अक्षरश :
वेठीस धरले होते .
लोकल गाड्यांवर दगडफेक केल्यामुळे सुमारे १०० फेर्या रद्द कराव्या लागल्या .
बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली .
४० बसेसचे नुकसान झाले .
पोलिसांवर दगडफेक करण्यात आली .
त्यात ४५ पोलिस जखमी झाले .
एवढेच नव्हे ,
तर पोलिस उपायुक्त (
वायरलेस )
यांच्या कारच्याही काचा फोडण्यात आल्या .
वृत्तवाहिन्यांच्या वाहनांना आगी लावण्यात आल्या .
पत्रकार ,
छायाचित्रकारांना आपला जीव वाचवून पळून जावे लागले .
पोलिसांची वाहने आडवी पाडून ती पेटवण्यात आली .
एवढे सर्व होऊनही पोलिसांनी गोळीबार मात्र केला नाही .
सर्वात संतापजनक बाब म्हणजे ,
ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांना ४० -
५० जणांच्या घोळक्याने वेढा घालून त्यांचा विनयभंग केला .
कुठे आहेत स्त्रीवादी खा .
सुप्रियाताई सुळे ?
कुठे आहेत ते बोलघेवडे गृहमंत्री ?
तुमच्या खात्यातील महिलांच्या इज्जतीवर देशद्रोही लोक घाला घालत असताना ,
हे मंत्री ,
खासदार चूप बसतातच कसे ?
की राज्यात सर्वत्र नाटक सुरू आहे ?
आता पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी एक काम केले पाहिजे .
पटनायक नागपुरात पो .
उपायुक्त असताना केवळ एका आरोपीला पकडण्यासाठी पटनायक यांनी २०० -
३०० पोलिसांकरवी नागपुरातील संपूर्ण नई बस्तीवर रात्री हल्ला केला होता .
आता या हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना पकडण्यासाठी त्यांनी प्रत्येक संशयित मोहोल्ला हुडकून काढावा आणि आपल्या मर्दुमकीची चुणूक दाखवून द्यावी .
गृहमंत्री यांना थोडी जरी लाजलज्जा असेल ,
तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन पापक्षालन केले पाहिजे
No comments:
Post a Comment