Total Pageviews

Wednesday 27 September 2017

भारतीय लष्कराचा म्यानमार सीमेवर 'स्ट्राइक'

भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे पावणेपाचला म्यानमार सीमेवर कारवाई केली. बंडखोरांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडचे (एनएससीएन-के) अनेक बंडखोर मारले गेले. अनेक तळ उद््ध्वस्त झाले. लष्करी सूत्रांनुसार, कारवाईत २५ ते ३० बंडखोर मारले गेले.
प्रारंभी हे सर्जिकल स्ट्राइक मानले जात होते. मात्र, सीमा न ओलांडता कारवाई केल्याचे लष्कराने म्हटले आहे. यात भारतीय लष्कराचे काहीही नुकसान झालेले नाही. गेल्या वर्षी २८-२९ सप्टेंबरला व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला एक महिना पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची ठरते.
कारवाई सुरू होताच काही पळाले, काही मारले गेले
पहाटे गस्त घालणाऱ्या भारतीय तुकडीवर अज्ञात बंडखोराने गोळीबार केला. यानंतर जवानांनी कारवाई सुरू केली. यामुळे बंडखोरांचा आपसातील संपर्क तुटला आणि ते पळून गेले. मारल्या गेलेल्या बंडखोरांची संख्याही मोठी आहे.
- लष्कराच्या पूर्व आघाडीचे वक्तव्य
... यामुळे लष्कर या कारवाईला सर्जिकल स्ट्राइक म्हणणे टाळतेय
म्यानमारशी भारताचे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. बंडखोरांच्या घुसखोरीचा विषय सोडला तर दोन्ही देशांत दुसरा कोणताही तणावाचा मुद्दा नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राइक आहे म्हटले तर म्यानमार कायमचा दुखावला जाऊ शकतो. कारवाईनंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही कारवाईवर भाष्य न करता म्यानमारशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे नमूद केले.
जून-२०१५ : शंभराहून अधिक बंडखोरांचा केला होता खात्मा
भारतीय लष्कराने ९ जून २०१५ रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यात १०० हून अधिक बंडखोर मारले गेले होते. ४ जून २०१५ रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.
भारतीय लष्कराने ९ जून २०१५ रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद््ध्वस्त केल्या होत्या. यात १०० हून अधिक बंडखोर मारले गेले होते. ४ जून २०१५ रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.
45 वर्षात भारतीय सैन्याने सीमापार केले 6 ऑपरेशन
- 1971: आपले सैन्या बांगलादेशात घुसले होते.
- 1987: 50
हजार जवान श्रीलंकेच्या जाफना मध्ये तैनात.
- 1988: 1400
कमांडो मालदीव मध्ये पाठवले.
- 1995:
बंडखोरांविरोधात म्यानमारमध्ये ऑपरेशन.
- 2015:
म्यानमार सीमापार करुन दुसऱ्यांदा कारवाई.
- 2016: PoK
मध्ये सर्जिकल स्ट्राइक

म्यानमारच्या सीमेवर दहशतवाद्यांचा खातमा
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर 
भारतीय जवानांनी आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास म्यानमार सीमेवर नागा संघटना नॅशनल सोशलिस्ट कॉन्सिल ऑफ  नागालॅण्ड (एनएससीएन- खापलांग) च्या मोठ्या संख्येतील दहशतवाद्यांचा खातमा केला. या धडक कारवाईत सर्व भारतीय जवान सुखरूप असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोमवारी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सीमेच्या पलिकडे दहशतवादी भारतीय सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असले तरी भारतीय जवानही त्यांना दोन फ ूट जमिनीत गाडण्यास तयार आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन दिवसांत भारतीय लष्कराने एनएससीएन-खापलांग दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी म्यानमार सीमेवर मोठी कारवाई केली. आसाम सीमेपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावरील लंगखू गावाजवळील नागा दहशतवाद्यांचे अनेक तळ चकमकीत उद्‌ध्वस्त केल्याची माहिती आहे. सुरुवातीला भारतीय जवानांनी  सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त होते. मात्र हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाई केली नाही, असेही सांगण्यात आले.
एनएससीएन (के) काय आहे?
नागा दहशतवाद्यांचा समावेश असलेली ही संघटना २००१ सालापर्यंत प्रतिबंधित होती. एस. एस. खापलांग हा तिचा म्होरक्या असून, म्यानमारमधील नागा नेता आहे. या संघटनेचे बहुतांशी तळ म्यानमारमध्येच आहेत. जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये भारतीय १८ जवानांवरील हल्ल्यामागे एनएससीएन (के)चा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर एनएससीएन (के) या संघटनेवर कारवाई केली होती. यात २० दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. जून २०१५ नंतर संघटनेवर पुन्हा ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.    (वृत्तसंस्था)

 म्यानमारच्या सीमेवर लपून बसलेल्या नागा बंडखोरांच्या छावण्या भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे. 
आज (बुधवार) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या संख्येने नागा बंडखोर मारले गेल्याचे भारतीय लष्कराच्या पूर्व मुख्यालयाने म्हटले आहे. भारतीय लष्कराने म्यानमारची सीमा न ओलांडता ही कारवाई केल्याचे मुख्यालयाने स्पष्ट केले आहे. 
इंडियन पॅरा कमांडोंच्या नेतृत्वाखालील टीमने एनएससीएन-के गटाच्या नागा बंडखोरांच्या छावण्यांवर हल्ला चढवला. भारत-म्यानमार सीमेवर लांगखू खेड्याजवळ ही कारवाई झाली आणि यामध्ये एकही भारतीय जवान जखमी अथवा मरण पावलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. 
2015 मध्ये एनएससीएन-के गटाच्या बंडखोरांव हल्ला चढविला होता. या गटाने त्यापूर्वी केलेल्या हल्ल्यात अठरा भारतीय जवान शहीद झाले होते. 

उरीमध्ये 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत असतानाच लष्कराने म्यानमारच्या सीमेवर नवा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 
गरज पडल्यास भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, असा इशारा भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी नुकताच दिला होता. 'सर्जिकल स्ट्राईकमुळे ज्यांना जो संदेश जायचा होता, त्यांना तो गेला आहे. आम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे त्यांना (पाकिस्तानला) समजले आहे. गरज पडली, तर ही पद्धत आम्ही आणखी वापरू शकतो,' असे रावत म्हणाले होते.
नागालँडमधील द नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (एनएससीएन-के) गटाने भारत सरकारशी 2001 मध्ये शस्त्रसंधी केली होती. हा करार या बंडखोर गटाने 27 मार्च 2015 रोजी तोडला. त्यानंतर या गटाने भारतीय लष्करावर सातत्याने हल्ले चढविले आहेत. चार जून 2015 रोजी खापलांग गटाच्या बंडखोरांनी 6 डोग्रा रेजिमेंटवर मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात हल्ला केला होता. त्यामध्ये 18 जवान शहीद झाले होते. खापलांग या म्होरक्याचा नऊ जून रोजी मृत्यू झाला आहे. 
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
शत्रू देशाच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया नष्ट करणे म्हणजेसर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईकचा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते. अमेरिकेने 2003 मध्ये सर्जिकल स्ट्राईकचा वापर करून इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये बॉम्बद्वारे हल्ले केले होते. शिवाय, सिरीयाने सद्दाम हुसैन यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक केले होते. 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असा केला होता सर्जिकल स्ट्राईक
भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गेल्यावर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची योजना सात दिवसांपासून सुरू होती. भारताने केलेल्या या कारवाईत 38 दहशतवादी तर 9 पाकिस्तानचे सैनिक ठार झाले होते. असा झाला होता गेल्यावर्षीचा सर्जिकल स्ट्राईक : 
  • भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर 12.30 वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आंतर आतमध्ये जाऊन कारवाई.
  • भारतीय कमांडो दहशतवादी तळापर्यंत पायी गेले.
  • दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करून नष्ट केले.
  • भिंबर, लीपा, केल, हॉटस्ट्रिंगमधील दहशतवादी नष्ट.
  • पहाटे 4.30 वाजेपर्यंत कारवाई चालली.
  • सर्जिकल स्ट्राईकपूर्ण करून जवान परत.

ल्या वर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. पहाटे पाचच्या सुमारास लांग्खू गावात दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिली आहे. विशेष म्हणजे सीमापार न करताच लष्कराने हे सर्जिकल स्ट्राइक केलं आहे.

भारतीय लष्कराने आज पहाटे पावणे पाच वाजता म्यानमारमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. यामध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड खापलांगच्या दहशतवाद्यांचे तळ नेस्तानाबूत करण्यात आले. भारतीय लष्कारानेही या सर्जिकल स्ट्राइकची पृष्टी केली आहे. २७ सप्टेंबर रोजी पहाटे भारत-म्यानमार सीमेवर लष्कराच्या एका तुकडीवर काही दशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे भारतीय लष्कराने त्यांना जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्यात भारताचं काहीच नुकसान झालं नाही. भारताने सीमेच उल्लंघनही केलं नाही, असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

भारताने या आधी जुनमध्ये २०१५ मध्ये एनएससीएन-के च्या १५ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यावळी मणिपूरमध्ये या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वर्षपूर्तीच्या दोन दिवस आधी हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे.
भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर पुन्हा कारवाई केल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईत एनएससीएन (के) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराचे या कारवाईत कोणतेही नुकसान झालेले नाही असे स्पष्टीकरण लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.
भारत- म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. बुधवारी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी ही चकमक झाली. सैन्याच्या कारवाईत अनेक नागा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असे समजते. मात्र किती दहशतवादी मारले गेले, हे समजू शकलेले नाही.
सुरुवातीला भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त होते. मात्र हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता असे सैन्याने स्पष्ट केले.  भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाई केली नाही, असे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
एनएससीएन (के) दहशतवादी संघटना म्हणजे काय?
एनएससीएन (के) ही २००१ सालापर्यंत प्रतिबंधित संघटना होती. एस.एस. खापलांग हा या संघटनेचा म्होरक्या असून खापलांग हा म्यानमारमधील नागा नेता आहे. या संघटनेचे बहुतांशी तळ हे म्यानमारमध्येच आहेत. जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये भारतीय सैन्याचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामागे एनएससीएन (के) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर एनएससीएन (के) या संघटनेवर कारवाई केली होती. यात २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. जून २०१५ नंतर संघटनेवर पुन्हा ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती


गेल्या वर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. पहाटे पाचच्या सुमारास लांग्खू गावात दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिली आहे. विशेष म्हणजे सीमापार न करताच लष्कराने हे सर्जिकल स्ट्राइक केलं आहे.

भारतीय लष्कराने आज पहाटे पावणे पाच वाजता म्यानमारमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. यामध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड खापलांगच्या दहशतवाद्यांचे तळ नेस्तानाबूत करण्यात आले. भारतीय लष्कारानेही या सर्जिकल स्ट्राइकची पृष्टी केली आहे. २७ सप्टेंबर रोजी पहाटे भारत-म्यानमार सीमेवर लष्कराच्या एका तुकडीवर काही दशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे भारतीय लष्कराने त्यांना जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्यात भारताचं काहीच नुकसान झालं नाही. भारताने सीमेच उल्लंघनही केलं नाही, असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

भारताने या आधी जुनमध्ये २०१५ मध्ये एनएससीएन-के च्या १५ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यावळी मणिपूरमध्ये या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वर्षपूर्तीच्या दोन दिवस आधी हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment