Total Pageviews

Monday 9 April 2012

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात :अँटनी आपली स्वच्छ प्रतिमा अधिक स्वच्छ कशी राहील, हे पाहण्यात मग्न
 
भारतीय लष्करापाशी रणगाडे आहेत, परंतु पुरेसा दारूगोळा नाही, हवाई प्रतिकारक्षमता कालबाह्य ठरते आहे. पायदळापाशी आवश्यक त्या प्रमाणात शस्त्रास्त्रेच नाहीत आणि या सर्व प्रकारामुळे राष्ट्रीय सुरक्षाच धोक्यात आलेली आहे, असे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांना कळवल्याचे उघड झाले आहे.हे पत्र त्यांनी १२ मार्च रोजी लिहिले आहे.लष्करप्रमुखांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
लष्करापाशी असलेली उपकरणे दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली आहेत. लष्कराची हवाई संरक्षण यंत्रणा जुनाट झाली आहे. काही उपकरणे तर तीस वर्षांपूर्वीची आहेत. या यंत्रणेचा कणा मानली जाणार्‍या एल ७० एअर गन ४४ वर्षे वापरल्या गेल्या आहेत. स्वयंचलित चिल्का ही ३४ वर्षे सेवेत आहे. ‘ट्वीन ही दुहेरी तोफ ३१ वर्षे वापरली जाते आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांवर सर्व बाजूंनी तातडीने कार्यवाही करण्याची गरज कोणालाही भासत नाही असे दिसते आहे. लष्कराची बुलेटप्रुफ जॅकेटस्‌ही निकृष्ट दर्जाची असून लष्कराच्या हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांपैकी २८ टक्के सैनिक छातीत गोळी शिरून मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे, ११ टक्क्यांच्या मस्तकात गोळी गेली आहे, तर १४ टक्के मान चेहरा उघडा पडल्याने शत्रूच्या गोळीला बळी पडले आहेत. जी जॅकेट जड असून पंधरा वर्षे जुनी आहेत, प्रत्येक जॅकेटचे वजन १० किलो आहे .घोटाळ्याची संरक्षण व्यवस्थेबाबतच गांभीर्याने विचार करावा लागेललष्करप्रमुखांनी केलेला गौप्यस्फोट आणि देशाच्या सुरक्षेतील त्रुटीविषयी मांडलेले मत लक्षात घेता, एकंदर संरक्षण व्यवस्थेबाबतच गांभीर्याने विचार करावा लागेल. जनरल सिंह यांची ही दोन्ही कृत्ये लष्कराच्या शिस्तीत बसणारी नसतीलही; पण त्यामुळे आपल्या देशाच्या एका मोठ्या आणि गौरवशाली यंत्रणेत सध्या काय सुरू आहे, यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांची (ब्रिक्स) एक परिषद आजपासून नवी दिल्ली येथे होत आहे. पाकिस्तानच्या मदतीने भारताच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या कुरापती सातत्याने चीन करीत आहे. हा भारतीय लष्कराच्या चिंतेचा विषय असताना भारतीय लष्कराच्या कमजोरींची यादीच भारतातील माध्यमांनी प्रकाशित करावी, यापेक्षा दुसरे ते दुर्दैव कोणते? चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ नवी दिल्लीतील या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी भारतात येतात, त्याचदिवशी ही यादी आयतीच त्यांच्या हाती पडावी, याचे माध्यमांनी जराही भान आपण ठेवत नाही, हा राष्ट्रीय लज्जेचा विषय आहे. आपल्याच लष्कराचा अहवाल जो कदाचित पाकिस्तान आणि चीनला हवाच आहे, तो आपणच सबसे तेजच्या न्यायाने प्रकाशित करतो, याची आपल्यालाही लाज वाटली पाहिजे.हे वृत्त बाहेर आल्याने लष्करातील ज्या त्रुटी जगाच्या लक्षात आल्या, त्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावी आणि त्या दूर केल्याचे जगाला सांगावे. यासाठी मग निधी, संसाधने, परिस्थिती यापैकी कोणताही अडसर असता कामा नये. सरकारला आपल्या अन्य कोणत्या खर्चांना कात्री लावायची असेल, तर तेथे ती तातडीने लावावी. पण, लष्करातील त्रुटी आधी दूर व्हायला हव्यात. लष्करातील ज्या कमजोरी पुढे आल्या, त्या दूर केल्याचे सरकार जोवर सांगत नाही, तोवर या घडामोडींनी झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. ‘ऑल इज वेल म्हणून चालणार नाही. पराभवाचे विश्लेषण करण्याची पाळी येऊ द्यायची नसेल, तर नियोजनावर भर द्यावा लागणार आहे. नियोजन तेव्हाच शक्य होते, जेव्हा नियोजन करणार्‍यांमध्ये सामंजस्य असते. हे सामंजस्य येण्यासाठी लष्करातील त्रुटी तत्काळ दूर सारण्याची गरज आहे

कल्पना तीन वर्षांपूर्वीच दुय्यम दर्जाच्या लष्करी साधनसामुग्रीच्या खरेदीस हरकत घेऊ नये, यासाठी आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती आणि ते आपण तेव्हा संरक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते, असे सिंह यांनी एका मुलाखतीत (२६/०३/२०१२ ला ) सांगितले. या गौप्यस्फोटामुळे सरकार अडचणीत आले. काही वर्तमान पत्रात आणी टीव्हीन्यूज चॅनेल्स वर लष्करप्रमुख विरुध्ह संरक्षणमंत्री ही लढाइ जोरात सुरु आहे.सनसनाटी बातम्या देण्य़ावर भर आहे.या लढाइत कधीच पराभूत न होणार्‍या एका गटाविषयी सांगायला हवे. तो गट आहे२४ तास न्यूज चॅनेल्सचा! टीव्हीवरील अँकर आपण सर्वज्ञानी असल्याचा आव आणत असतात. ते सांगत असतात तेच त्यांच्या दृष्टीने सत्य असते, वास्तव असते. संरक्षण खरेदीत घोटाळा होत असल्याची माहिती संरक्षणमंत्री . के. ऍण्टोनी यांना तीन वर्षांआधीपासूनच होती, असा गौप्यस्फोट कॉंगे्रसचे कॉंगे्रसचे कर्नाटकातील वरिष्ठ नेते डॉ. डी. हनुमंथप्पा यांनी ३०/०३/२०१२ला केला. आपण स्वत: या घोटाळ्याची माहिती देणारे पत्र कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संरक्षण मंत्री ऍण्टोनी आणि राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांना दिली होती. चौकशी सुरू आहे, असे उत्तर देऊन संरक्षणमंत्र्यांनी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले, असेही हनुमंथप्पा यांनी स्पष्ट केले. यामुळे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संसदेची दिशाभूल करणारे संरक्षणमंत्री आपल्याच खेळात अडकले आहेत. संसदेचीसंरक्षण दिशाभूल करत आहे दलांकरिता ट्रक्स आणि अन्य वाहनांची खरेदी करण्याकरिता संरक्षण खात्याचे नियम आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. पण, या तत्वांचे उल्लंघन करण्यात आले. २००९ मध्ये टेट्रा ट्रक्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा व्यवहार संरक्षण खात्याने नियमांतर्गत करायला हवा होता. पण, नियम धाब्यावर बसवून बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. आर. एस. नटराजन यांनी या ट्रक्सच्या खरेदीच्या सहा हजार कोटींचा नोंदणी आदेश ब्रिटनमधील एका दलालामार्फत दिला.लष्करप्रमुखांच्या आरोपांनंतर सीबीआयचे छापे लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर केंद सरकारने सीबीआयला याप्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने शुक्रवारी याप्रकरणी संरक्षण मंत्रालय, लष्कर, बीईएमएल कंपनी आणि व्हेट्रा कंपनीतफेर् गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टाट्रामध्ये सर्वाधिक शेअर्स असल्यामुळे ऋषी यांचे नावही एफआयआरमध्ये आहे. एका संरक्षण एक्स्पोच्या निमित्ताने ते सध्या दिल्लीत आले आहेत.त्यानंतर लगेचच या प्रकरणी दिल्ली नोएडा आणि बेंगळुरूत तपासासाठी छापे टाकण्यात आले. तसेच व्हेट्रा ग्रुपचे अध्यक्ष रवी ऋषी यांचीही चौकशी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने याप्रकरणी तपास करण्याची परवानगी २१ फेब्रुुवारीलाच दिली होती. त्यामुळेच सिंह यांनी लाचप्रकरण मीडियासमोर मांडण्यापूवीर्च सरकारने याप्रकरणाच्या तपासाला परवानगी दिली होती. हेच प्रकरण लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी उपस्थित केले असता, आपण लष्करप्रमुखांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. पण, त्यांनी कारवाई केली नाही, असा खुलासा करीत, आपल्यालाही या घोटाळ्याची माहिती अलीकडेच मिळाली, असे खोटे उत्तर संरक्षण मंत्र्यांनी संसदेत दिले..३१/०३/२०१२ ला त्यानी कबुल केले की या घोटाळ्याची चौकशी २१/०३/२०१२ ला सिबिआयनी सुरु केली आहे.(लष्करप्रमुखाच्या आरोपाच्या आधीच)यावरून त्यांनी संसदेची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे

-
देशावर हल्ला झाल्यास शत्रूचा मुकाबला करण्यासारखी लष्कराची सध्याची स्थिती नाही.
-
शत्रूवर मारा करण्यासाठीच्या रणगाड्यांमधील दारूगोळा संपत चालला आहे.
-
तोफखान्यात फ्यूज नाहीत.
-
अल्ट्रालाइट हॉवित्झर खरेदीप्रक्रिया कायदेशीर प्रकरणात अडकली.
-
हवाई सुरक्षेसाठीची ९७ टक्के उपकरणे नादुरुस्त आहेत. एखाद्या वेळेस हवाईहल्ला झाल्यास वाचण्याची शक्यता कमी.
-
भूदलाकडे शस्त्रांचा अभाव; रात्री लढण्याची क्षमता नाही.
-
युद्धात आवश्यक असलेली पॅराशूटस् नाहीत.
-
विशेष सुरक्षा दलाकडेही शस्त्रास्त्रे नाहीत.
-
लष्कराच्या टेहळणीमध्ये कमतरता. यूएव्ही आणि टेहळणी रडार नाही.
-
ऍण्टी टँक मिसाइल्सची उत्पादनक्षमता आणि उपलब्धता कमी.
-
लांबपल्ल्याचा मारा करणार्‍या तोफांची कमतरता

No comments:

Post a Comment