Total Pageviews

Saturday 18 April 2020

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांत महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातल्या बी. भाकरे (वय ३८) हे शहीद

काश्मिरात दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

सुरक्षेवर असलेले पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. अहद बाब चौकाजवळ असलेल्या नूरबाग परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तातडीने जवळच्या एसडीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जवानाने नंतर प्राण सोडले, अशी प्राथमिक माहिती आहे.


काश्मिरात दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये हा हल्ला करण्यात आलाय. यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

सुरक्षेवर असलेले पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. अहद बाब चौकाजवळ असलेल्या नूरबाग परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तातडीने जवळच्या एसडीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जवानाने नंतर प्राण सोडले, अशी प्राथमिक माहिती आहे.

या हल्ल्यात तीन निमलष्करी दलाचे जवानही जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. परिसराला घेरण्यात आलं आहे, अशी माहिती सोपोरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

हल्ल्यात महाराष्ट्राचा जवानही शहीद
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची माहिती सीआरपीएफकडून देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातल्या जवानाचाही समावेश आहेत. सी. बी. भाकरे (वय ३८) हे हल्ल्यात शहीद झालेत. त्यांच्यासह बिहारमधील वैशाली जिल्ह्यातले राजीव शर्मा (वय ४२) आणि गुजरातमधील साबरकांठा येथील परमार सत्यपाल सिंह (२८) हे दोन जवानही शहीद झाले आहेत.
एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत असताना, सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाहीयेत. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात शनिवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF च्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. प्रत्युत्तरदाखल सुरक्षा पथकाने केलेल्या गोळीबारात जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे.
येथील नूरबाग परिसरात जम्मू-कश्मीर पोलीस व सीआरपीएफचे संयुक्त पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. दहशतावदी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक झाली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे तसेच कॉन्स्टेबल सत्पाल परमार शहीद झाले. दोघे जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोपोरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेल्यातील कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे सुपुत्र आहेत. राजीव शर्मा हे बिहारमधील वैशालीचे तर परमार हे गुजरातेतील साबरकांठा येथील आहेत.
“संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना आमच्या पथकावर अतिरेक्यांनी अचानक गोळीबार केला, आम्ही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र या घटनेत आमचे ३ जवान शहीद झाले आहेत.” CRPF च्या जम्मू-काश्मीर विभागाचे विशेष संचालक झुल्फीकार हसन यांनी इंडियन एक्स्प्रेस शी बोलताना माहिती दिली. या घटनेत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात CRPF चा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी, चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते, त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे.

No comments:

Post a Comment