Total Pageviews

Friday 22 July 2011

TERROR GOOD BLOG shashikant gokhale

राज्यकर्त्यांनॊ, कशाला घेताय दहशतवाद्यांचा शोध? **
जिहादींना पकडण्याच्या फंदात तुम्ही पडू नका! पकडून तरी काय उपयोग? खायला काळ आणि भुईला भारच की ! आपण २० वर्षे दहशतवाद झेलतो आहोत आणि निष्क्रीय धोरणांमुळे पोसतो पण आहोत. शेजारील धर्मांध राष्ट्र धर्मांध दहशतवादी तयार करण्याच्या छावण्या निर्भयपणे चालवते. त्यांचा ठावठिकाणा माहित असल्याचे सरकार सांगते. तरीही हे कारखाने चालूच राहातात याचा अर्थ काय? कांही धर्मवेडाने भारावलेले प्रशिक्षित लोक (जिहादी) देशातील मोक्याची ठिकाणे शोधून मनुष्य आणि वित्तहानी करतात. ते सहसा हाती सापडत नाहीत. आपला देश सरतेशेवटी या घटनेचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे जाहीर करून वाटाघाटींचे गुऱ्हाळ चालवीत बसते. चुकुन एखादा सापडलाच आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तरी ती अमलात आणण्यास सरकार कचरते. कसाब अफजल गुरु ला राज्यकर्ते फासावर लटकवत नाहीत त्याची खालील कारणे आहेत काय ?पहिले कारण :-त्यांना फ़ासावर लटकविले तर सत्तारूढ पक्षाला खात्रीच्या व्होट बॅंक्सची मते मिळणार नाहीत ही भीति. पण अशी भीति वाटणे म्हणजे सारी व्हॊट बॅंक पाकिस्तानची समर्थक आहे आणी दहशतवाद्यांच्या पाठीशी आहे असे मानण्यासारखे होईल. राज्यकर्ते असे मानतात काय? दुसरे कारण :- यांना फाशी द्यायची कि नाही हा निर्णय घेणारे गृहमंत्री , पक्षाध्यक्ष , पंतप्रधान आणि राष्ट्रपती हेच दहशतवाद्यांचा रोष स्वतःवर ओढवून घेण्यास तयार नाहीत. ते स्वतःच आपल्या जिवावर बेतेल म्हणून भेदरलेले भेकड आहेत काय? असे असण्याचीच शक्यता अधिक आहे. तसे असेल तर इंदिराजी आणि राजीव यांची उदाहरणे देऊन त्यांच्या नावावर मते मागू नयेत. एकंदरीत आपणहि सर्व याच लायकीचे आहोत असे का म्हणू नये? जसे आपण तसेच आपले राज्यकर्ते!मुंबईतील ताजवरील हल्ल्यानंतर का नाही घरी बसवले यांना आपण मागच्याच निवडणुकीत?आधीच्या दहशतवाद्यांना पोसण्यातच आपण आपला पैसा वाया घालवतो आहोत. आता नवे पकडले तरी ते खायला काळ आणि भुईला भारच कि! तात्पर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खाली दिलेले विचार आत्मसात केल्याशिवाय सर्व उपाय वांझोटे आहेत. स्वातंत्र्यप्राप्तिनंतर केलेला हा आग्रह वाचाजशास तसे याच राजनीतीने परकीयांशी यापुढे तरी आपण वागू तरच टिकू, जिंकू. अवतीभोवतीचे आक्रमक जग हातात अणुध्वम घेऊन टवकारून पहात आहे. म्हणून तुम्ही पण हाती आलेली स्वातंत्र्याची ही सुवर्णसंधी साधून, बलाढ्य सैन्य उभारून, एका हाती आत्मज्ञान घेऊन का होईना, पण उजव्या हाती अणुध्वम घेऊन, आपल्या राष्ट्राच्या संरक्षणार्थ उभे ठाकले पाहिजे, वेळी चालून गेले पाहिजे- " (१९५०) - स्वातंत्र्यवीर सावरकर
" पण आपल्या राज्यकर्त्यांनी केले काय ? तर दुर्लक्ष! पंचशीलच्या घोषणा ! चिनी पंतप्रधानाबरोबर शांततेची कबुतरे ऊडविणॆ आणि सावरकरांनाच टिकेचे लक्ष्य!. सावरकर म्हणाले," चिमण्यांनी तटस्थता जाहीर केली म्हणून त्यांच्यावर झडपा घालणे ससाणे सोडणार आहेत काय?" आणि तसेच झाले. डिसेंबर १९६२ मध्ये चीनने नमुना म्हणून भारतावर एकच झडप घातली आणि भारताची पुरती नाचक्की झाली. सावरकर म्हणतमी आज जे सांगतो ते लोकांना दहा वर्षांनी पटते. आता या चिनी आक्रमणानंतरचा , त्यांनी पुन्हा एकदा धरलेला हा अतिमहत्वाचा आग्रह पहा :- संरक्षणापुरते शस्त्रबळ जे राष्ट्र बाळगते पण आक्रमणक्षम होईल इतके ते वाढवीत नाही, तसे करणे अधर्म समजते, त्या राष्ट्राची ती निष्ठा एक तर भ्रामक तरी असते वा आतून भेकड. ज्या राष्ट्राचे सैन्यबळ उघड उघडपणे आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रण सज्जतेत उभे असते त्या राष्ट्रास संरक्षणक्षमता असतेच असते." (१९६३) –. स्वातंत्र्यवीर सावरकर
"
shashikant gokhale

No comments:

Post a Comment