INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 52
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
महावितरणचा अजब कारभार
तीन हजार कोटींसाठी 'महावितरण'चे तेवढ्याच व्याजावर पाणीदहा हजार कोटी रुपयांच्या थकबाकीचे ओझे असलेल्या 'महावितरण'ने राज्यातील सुमारे २७ लाख शेतकऱ्यांच्या फायदाच्या कृषी संजिवनी योजनेची रुपरेखा स्पष्ट केली असून तीन हजार कोटींचे व्याज आणि दंड माफ करण्याच्या बदल्यात 'महावितरण'ला तीन हजार कोटींची वसुली शक्य होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे बजेट सादर करताना कृषी संजिवनी योजना-२०११ची घोषणा केली होती. २००४मध्ये प्रथम राबवण्यात आलेल्या या योजनेत शेतकऱ्यांनी ४०० कोटी रुपयांची थकबाकी जमा केली होती. त्याबदल्यात त्यांचे व्याज व मुद्दल माफ करण्यात आले होते. प. महाराष्ट्रातील काही शेतकरी वगळता उर्वरीत महाराष्ट्रात सुमारे २७ लाख शेतकऱ्यांकडे कृषिपंपाच्या बिलांची सुमारे ५९०० कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी, मूळ बिलांची रक्कम २९०० कोटी असून त्यावर व्याज आणि दंडाचे तीन हजार कोटी जमले आहेत. 'महावितरण'च्या थकबाकीत कृषिपंपांच्या सहा हजार कोटींसह नळ पाणीपुरवठा योजना, यंत्रमागधारक आदींकडे सुमारे चार हजार कोटींची थकबाकी आहे.
डिसेंबर-२०१० अखेर शेतकऱ्यांकडे देय असलेल्या बिलांच्या रकमेतील मुद्दल त्यांनी ३० जून २०११ किंवा त्यापूवीर् जमा केल्यास त्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज व दंड माफ होईल. मुदतीत पैसे भरू न शकणाऱ्यांसाठी आणखी पर्याय देण्यात आलेत असे 'महावितरण'चे एमडी अजोय मेहता म्हणाले.
आपापल्या क्षेत्रातील सर्व कृषी ग्राहकांना त्यांची थकबाकी किती आहे याचा तपशील देणारी वीज देयके ताबडतोब द्यावीत. कृषी ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी कृती पथक तयार करावे, माहिती पोहोचवण्याच्या सर्व तंत्रांचा अवलंब ही योजना पोहोचवण्यासाठी करावा, अशा सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मेहता म्हणाले.
चालू बिल भराच!
चालू बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम 'महावितरण'ने गेल्या सहा महिन्यात घेतल्यापासून सुमारे पाच लाख कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे वीज बिलांच्या वसुलीत काही प्रमाणात वाढ दिसते आहे
No comments:
Post a Comment