Total Pageviews

Wednesday 15 May 2013

FAST TRACK COURTS FOR SUSPECTED MUSLIM TERRORISTS

मुस्लिम
अतिरेक्यांच्या सुटकेसाठी गृहमंत्री व्याकुळ!-लदगती न्यायालये स्थापण्याचा सुशीलमियॉंचा फतवा-लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचेहिरवे कार्ड’
सुशीलकुमार शिंदे यांचीजबान’ यापूर्वीही अनेकदा घसरली आहे आणि त्यांनी वाद ओढवून घेतले आहेत. काय बोलले होते शिंदे...नवी दिल्ली, दि. १५ (पीटीआय) - केंद्रातील कॉंग्रेस-आघाडीच्या सरकारने मुस्लिमांच्या लांगूलचालनाची आज हद्दच ओलांडली. देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्‍या ज्या मुस्लिम अतिरेक्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी तुरुंगात डांबले त्या देशद्रोह्यांच्या झटपट सुटकेसाठी गृहमंत्री सुशीलमियॉं शिंदे व्याकूळ झाले आहेत. तुरुंगात खितपत पडलेल्या मुस्लिम अतिरेक्यांवरील खटले फटाफट निकाली काढण्यासाठीफास्ट ट्रॅक कोर्ट’ (जलदगती न्यायालये) स्थापन करण्याचा फतवाच गृहमंत्री शिंदे यांनी काढला आहे. कोणता मुस्लिम अतिरेकी किती दिवसांपासून तुरुंगामध्ये सडत पडला आहे याची माहितीही जनाब सुशीलमियॉंनी मागवली आहे. गृहमंत्र्यांना तुरुंगातील अतिरेक्यांचा अचानक आलेला पुळका म्हणजे लोकसभा निवडणुकीची चाहूल असून मुस्लिमांची व्होट बँक काबीज करण्यासाठीच कॉंग्रेसने हेहिरवे कार्ड’ फेकल्याचे मानले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज खास पत्रकार परिषद घेऊन या भयंकर निर्णयाची माहिती दिली. गृहमंत्री म्हणाले, अतिरेकी कारवाया करणारे किती मुस्लिम कारागृहात खितपत पडले आहेत त्यांची माहिती गोळा करण्याची सूचना सर्व राज्यांना देण्यात आली आहे. सत्य जाणून घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून त्यासाठी वेळ लागेल. त्याचबरोबर हे खटले लवकर निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्यात यावी असेही राज्यांना सांगण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. ३९ विशेष न्यायालये
केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनीही दोन आठवड्यांपूर्वी एनआयए कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने देशभरात अतिरेक्यांच्या विरोधात खटले चालवण्यासाठी ३९ विशेष न्यायालये स्थापन केल्याची माहिती संसदेला दिली आहे. तुरुंगातील मुस्लिम अतिरेक्यांना झटपट बाहेर काढून लोकसभा निवडणुकीत हा मुद्दाकॅश’ करण्याचा कॉंग्रेसचा यामागे डाव असल्याचे सांगितले जाते.शिंदे स्पेशल
संघ आणि भाजपकडून चालविण्यात येणार्‍या कॅम्पमध्ये भगव्या दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते.मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईदचाश्रीयुत हफीज’ असा उल्लेख शिंदे यांनी केला होता.आसाम हिंसाचारावर संसदेत चर्चेदरम्यान जया बच्चन बोलत असताना मध्येच शिंदे म्हणाले, ‘हा गंभीर प्रश्‍न आहे. हा काही चित्रपट नव्हे!’कोळसा घोटाळ्याबाबत शिंदे म्हणाले होते, ‘असे घोटाळे होतात आणि नंतर त्याची चर्चा थांबते. बोफोर्सचेही तसेच झाले. पेट्रोल पंप घोटाळा आता कुणाला आठवतो?’- हाच न्याय मालेगाव स्फोटाला का नाही?अतिरेकी कारवायांत गुंतलेल्या मुस्लिमांचा कॉंग्रेसला पुळका आला आहे. मुस्लिमांना न्याय आणि हिंदूंवर अन्याय असे उफराटे धोरण का? मालेगाव स्फोट प्रकरणातही निरपराध हिंदूंना गोवण्यात आले आहे. अनेक अतिरेकी कारवायांमधील मुस्लिमांना जामीन मिळाला. मालेगाव स्फोटातील आरोपींना तर जामीनही मिळालेला नाही. मुस्लिमांसाठी गळा काढणार्‍या सुशीलमियॉंना हिंदूंवर होणारा अन्याय दिसत नाही का, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे. रहमानीकिडा’ केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रहमान खान यांनी तीन महिन्यांपूर्वी गृहखात्याकडे अतिरेकी कारवायांच्या नावाखाली निरपराध मुस्लिमांना अटक करण्यात येत असल्याची तक्रार केली होती. विविध मुस्लिम संघटनांनीही दहशतवादविरोधी कायद्याचा मुस्लिमांच्या विरोधात वापर करण्यात येत असल्याचा कांगावा केला होता. रहमान खान यांनी निरपराध मुस्लिमांच्या सुटकेसाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची सूचना केली होती. या रहमानीकिड्या’मुळेच गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अल्पसंख्याक मंत्रालयाला खास पत्र लिहून मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येतील, असा शब्द दिला आहे. 
शफीकुर रेहमानची बेईमानी -vasudeo kulkarni
 
लोकसभेत "वंदे मातरम्‌' या राष्ट्रगीताचा घोर अवमान करणारे बहुजन समाज पक्षाचे खासदार शफीकुर रेहमान बर्क, यांनी आपल्या धर्मग्रंथांचा दाखला देत, यापुढेही या राष्ट्रगीताचा असाच अवमान करेन, अशी विषारी गरळ ओकून आपल्या बेईमानीचे दर्शन देशवासीयांना घडवले आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही बुधवारी लोकसभेत प्रथेप्रमाणे "वंदे मातरम्‌' गीताची धून सुरू झाली. सभापती मीरा कुमार यांच्यासह सर्व सभागृह राष्ट्रगीताचा-राष्ट्राचा सन्मान करायसाठी शांतपणे उभे होते. पण, राष्ट्रगीत सुरू होताच बर्क हे आपल्या जागेवरून उठून सभागृहाबाहेर निघून गेले. मीरा कुमार यांनी त्यांना राष्ट्रगीताचा सन्मान राखायसाठी त्यांना उभे राहायचा आदेश दिला असतानाही तो धुडकावून ते निघून गेले. "वंदे मातरम्‌' पूर्ण होताच मीरा कुमार यांनी, एक खासदार राष्ट्रगीत सुरू असतानाच सभागृहाबाहेर गेल्याचे सांगून, संताप व्यक्त केला. राष्ट्रगीत संपल्यावर थोड्या वेळाने बर्क पुन्हा सभागृहात आले. पुन्हा सभागृहात आल्यावर मीरा कुमार यांनी त्यांची खरमरीत शब्दात हजेरी घेतली. तुम्ही केलेल्या भयंकर कृत्याची मी गंभीर दखल घेतली आहे. त्याचे स्पष्टीकरण द्यावे आणि यापुढे अशी घटना पुन्हा होणार नाही, याची दक्षता घ्यायचा आदेशही त्यांनी दिला. वास्तविक सभागृहाची आणि सभापतींची माफी मागून बर्क यांना, हा विषय संपवता आला असता. पण, सभापतींच्या आदेशानंतरही त्यांची मस्ती कायमच होती. त्यांचा माज अद्यापही उतरलेला नाही. वंदे मातरम्‌ हे गीत मुस्लिम धर्माच्या-पवित्र कुराणातल्या शिकवणुकीच्या विरोधात असल्याने, राष्ट्रगीताला विरोध करायसाठीच मी सभागृह सोडून गेलो. यापूर्वी भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमातही आपण वंदे मातरम्‌ सुरू होताच, निघून गेलो होतो, अशी फुशारकी मारली. असा प्रसंग पुन्हा आल्यास मी वंदे मातरम्‌ म्हणणार नाही, आणि हे गीत सुरू झाल्यावर तेथे थांबणारही नाही. मी जे केले, ते धर्मकृत्य असल्याने, त्याची मला कसलीही खंत वाटत नाही, अशी गरळही त्यांनी ओकली. आपण राष्ट्रगीताचा सन्मान करतो, पण वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत नसल्याने त्याची सक्ती कुणालाही करता येणार नाही. पवित्र कुराणात मातृभूमीला असे वंदन करू नये, असे सांगितले आहे. शरियतमध्येही अशा कृत्याला विरोध आहे. आपण धर्मनिष्ठ असल्याने वंदे मारतम्‌ म्हणणार नाही, त्यातले काही शब्द पूर्णपणे शरियतच्या विरोधात असल्यानेच, धर्माच्या विरोधात वंदे मातरम्‌ आपण म्हणणार नाही, आपण वारंवार अशीच कृती करू, असेही बर्क यांनी मग्रूरीने सांगितले आहे. वंदे मारतम्ला काही बेईमान आणि राष्ट्रद्रोही मुस्लिमांनी विरोध करायची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशाच घटना घडलेल्या आहेत. पण, केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांनी वंदे मातरम्‌चा पर्यायाने राष्ट्राचाही अपमान करणाऱ्या या हरामखोरांना कडक शिक्षा करायचे धाडस दाखवले नसल्यानेच, ही राष्ट्रद्रोह्यांची टोळी चेकाळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उठसूठ उदोउदो करणाऱ्या, त्यांनी लिहिलेल्या घटनेचे पावित्र्य राखायलाच हवे, असे सांगणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींच्याच पक्षाचा हा बेईमान खासदार आहे. बसपच्या खासदाराने अजाणतेपणी हे कृत्य केलेले नाही. त्याने जाणूनबुजून आणि ठरवून राष्ट्रगीताचा अवमान करीत लोकसभेच्या सभापतींनाही आणि कायद्यालाही आव्हान द्यायचा उद्दामपणा करणाऱ्या या धर्मांध खासदारावर मीरा कुमार यांनी कडक कारवाई करायला तर हवीच, पण मायावतींनीही या असल्या राष्ट्रद्रोह्याला पक्षातून हाकलून लावायला हवे. केवळ मताच्या राजकारणासाठी तडजोडी करीत धर्मांधांचे अतिलाड काही राजकीय पक्षांनीच केल्यानेच, या टोळ्या मुजोर झाल्या. याच भूमीत राहणाऱ्यांना जर मातृभूमीला वंदन करणे हे धर्मविरोधी कृत्य वाटत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे कडक धोरण सरकार आणि राजकीय पक्षांनी घ्यायला हवे. बर्क यांना लोकसभेतून बडतर्फ करायची कारवाई मीरा कुमार यांनी करायला हवी. अन्यथा हे विषारी हिरवे विष राष्ट्राचा घात करील

No comments:

Post a Comment