Total Pageviews

Tuesday 7 May 2013

आफ्रिकन लोकांसाठी आता हैदराबादी ‘दुल्हन मंडी’

- मुजफ्फर हुसेनजग बदलत आहे, पण हैदराबादेतील गरीब मुस्लिमांच्या वसाहती मात्र बदलल्या नाहीत. जुनाट घरे तशीच, राहणीमान तसेच. दारिद्य्र तसेच! या वस्त्यांमधून फिरताना दलालांच्या नजरा कुणा गरीब मुसलमानाची मुलगी वयात येते आहे का, याचा शोध घेत असतात.
हैराबादचे नाव आले की, सर्वप्रथम आठवते चारमिनार आणि सालारजंग म्युझियम. त्यानंतर आठवतात दंगली. हैदराबादची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे अरबस्तान आणि आफ्रिकी देशातून आलेले कामपिसाट अरब-हबशी म्हातारे! हैदराबादेतील अल्पवयीन गरीब मुस्लिम मुलींशी विवाहाचे ढोंग करून ते आपली कामवासना भागवतात अन् तलाक देऊन निघून जातात. परंतु आता अरबी शेख गायब झाले आहेत. त्यांची जागा आता काळ्या आफ्रिकन हबशांनी घेतली आहे. निकाह, कामपिसाट छळ, भूक भागली की तीन वेळा तलाक, की संपले पतीपत्नीचे नाते! मग जातात ते आपल्या देशात!
जग बदलत आहे, पण हैदराबादेतील गरीब मुस्लिमांच्या वसाहती मात्र बदलल्या नाहीत. जुनाट घरे तशीच, राहणीमान तसेच. दारिद्य्र तसेच! या वस्त्यांमधून फिरताना दलालांच्या नजरा कुणा गरीब मुसलमानाची मुलगी वयात येते आहे का याचा शोध घेत असतात. सध्या दलालांचा धंदा तेजीत आहे. त्यांच्याकडे महिन्याकाठी १५ ते २० दुल्हनची मागणी आहे. पैशासाठी लालचावलेल्या बापासोबत मुलीचा सौदा होतो. ग्राहक म्हणून येणार्‍या अरब किंवा हबशांकडून भली मोठी रक्कम घ्यायची आणि त्यांना ‘माला’ची डिलिव्हरी करायची. चार-आठ दिवस, कधी कधी महिनाभर हे काळे हबशी अल्पवयीन मुलींचे लचके तोडतात. मन भरले, खूप शोषण झाल्याने पोरी गळाल्या की तलाक देऊन सरळ विमान गाठून निघून जायचे. यातील शोषित बाळबोध मुलींच्या उर्वरित आयुष्यालाच शाप लागतो. ज्या वयात गुलाबी स्वप्ने पाहायची त्याच वयात आयुष्यभरासाठी त्यांचे जीवन शापित झालेले असते.
एक किस्सा ऐका! सुदान देशातून एक ४४ वर्षीय विवाहित अभियंता इब्राहिम हिंदुस्थानात आला. तो सरळ हैदराबादला गेला. तिथे संबंधित दलाल जहिराशी त्याने संपर्क केला. दलालाने त्याला हैदराबादेतील मुगलपुर्‍यातील तलबकट्टा येथे अतिशय गरिबीत दिवस काढणार्‍या युसूफ अलीची मुलगी दाखवली. शानू तिचे (काल्पनिक) नाव. वय १७ वर्षे. तिने दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले. तिला आठ भाऊ-बहीण, शिवाय दोन काका-काकू आणि त्यांची भरपूर मुले, असा भलामोठा परिवार त्या छोट्याशा खुराड्यात राहतो. एके दिवशी वडिलांनी तिला सांगितले की, एक अतिशय श्रीमंत स्थळ आहे. इंजिनीअर आहे. त्याच्याशी तुझा निकाह लावून देतो. तिचा निकाह लावताना अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. निकाह झाला तेव्हा तिला कळले की, तिचा पती तिच्यापेक्षा जवळपास तिप्पट वयाचा. म्हातारा, काळाक्भिन्न, सुदान देशाचा आहे. आपण फसलो, आईवडिलांनीच फसवले, विकले गेलो याची तिला जाणीव झाली. तिचा कॉण्ट्रॅॅक्ट पध्दतीने विवाह झाला होता. असा विवाह केला म्हणजे धर्म आणि कायदा या दोन्हीच्या कचाट्यातून गुन्हेगार सुटतो.
विवाहानंतर तो सुदानी इंजिनीअर तिच्या घरी येऊ लागला तेव्हा काही ना काही कारण दाखवून ती त्याच्याजवळ कधी बसली नाही, पण हा उंदरामांजराचा खेळ किती दिवस चालायचा! शेवटी तिने पोलीस ठाणे गाठले. घरातून गुपचूप पळून ठाणे गाठता यावे म्हणून तिच्या मैत्रिणीने तिला मदत केली. जहिरा नावाच्या मध्यस्थ महिलेने हे लग्न जमवले होते. पोलिसांनी तिच्या घरावर छापा मारताच ती पळून गेली, पण तिला पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांनी तिला ओळखले. ती तर मुगलपुरा, चारमिनार भागातील अतिशय कुख्यात दलाल आहे! जहिराने तिची काकू ताहेराला गाठून हा सौदा केला होता. शानूच्या सौद्यापोटी दलालांकडून शानूच्या काकूला एक लाख तर वडिलांना दोन लाख रुपये मिळाले. अशी प्रकरणे पोलिसांच्या दृष्टीने कौटुंबिक स्वरूपाची असतात म्हणून पोलीस सारे गैरप्रकार माहिती असूनही तक्रारसुध्दा घेत नाहीत, पण शानूचे नशीब चांगले. तिच्या पाठीशी एक कुटुंबवत्सल पोलीस अधिकारी विजयकुमार उभा राहिला. पोलिसांनी सुदानी इब्राहिम, तिचे वडील युसूफ अली, काकू ताहेरा, निकाह लावणारा काझी मोहम्मद नसरूद्दीन आणि दलाल जाहेरा बेगम यांना अटक केली. शानू आता महिला सुधारगृहात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काझीची तर सरकारतर्फे नियुक्ती झालेली होती. अशा काझीने असा निकाह लावावा याचे विजयकुमार यांना आश्‍चर्य वाटले. तेव्हा काझीने अशी भूमिका घेतली की, हा निकाह कॉण्ट्रॅॅक्ट मॅरेज आहे याची आपल्याला माहिती नव्हती.
आपली वासना शमवण्यासाठी हिंदुस्थानात आलेला इब्राहिम हा काही पहिला नाही. अशा लोकांच्या वासनेला बळी पडलेली शानू ही पहिलीच मुलगी नाही. नायजेरिया आणि सुदान या देशात खनिज तेलाचे मोठे साठे आहेत. त्यामुळे त्यांच्या हाती पैसा खुळखुळतो आहे. अरब हिंदुस्थानात येतात हे लक्षात आल्यानंतर आफ्रिकन हबशीही इकडेच येऊ लागले. आजकाल हैदराबादेतील दलालांना महिनाभरात पाच-सहा ग्राहक सहज मिळू लागले आहेत. इथे जेव्हा आफ्रिकन तरुण शिकायला येतात तेव्हाच ते हैदराबादी मुलींशी निकाह करून घेतात. म्हणजे राहण्याचा प्रश्‍न सुटतो. जाताना ते फक्त तीनदा तलाक म्हणतात आणि सुटका करून घेतात. जे तलाक घेत नाहीत ते आपल्या देशात नेऊन मुलींना विकून टाकतात.
महिलांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणार्‍या शिराज अमिना म्हणतात, हैदराबादेत एवढी गरिबी आहे की, ज्याच्या घरात सात-आठ मुली असतात त्यांच्यावर तर मोठेच संकट असते. अशावेळी विदेशी लोकांसाठी काम करणारे दलाल पुढे येतात. वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे की, काझी कॉण्ट्रॅॅक्ट मॅरेजसाठी निकाह पढणार नाहीत, पण आज याच धंद्यात त्यांना सर्वात जास्त पैसा मिळतो. जोपर्यंत अशा काझींविरुध्द कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत हा प्रकार बंद होणार नाही.

No comments:

Post a Comment