Total Pageviews

Friday 14 September 2012

'लव्ह जिहाद'चा चक्रव्यूह-दिलीप धारूरकर

http://www.evivek.com/current/lekh001.htmlमुलींचे जीवन बरबाद करणारा हा एक भयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहाद' असे याला या गुंडांनी नाव दिलेले आहे. हा जिहाद करणे हे त्यांचे धर्मकार्यच ते मानतात. आता हळूहळू हे आक्रमण वाढले आहे. या लव्ह जिहादचे कधीतरी ऐकू येणारे उदाहरण आता रोजचेच झाले आहे. हळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढते आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढा. त्यांना इस्लाम बनवा. असा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठी काढण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना वाट्टेल ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या मुलींना या भयानक चक्रव्यूहाची नीट कल्पना देऊन, सतत सतर्क आणि जागरूक राहून हा प्रेमाचा जिहादी चक्रव्यूह भेदावा लागेल. त्यासाठी आता जागे होऊन सक्रीय होण्याची वेळ आली आहे.  
गेल्याच आठवडयातली घटना आहे. स्थळ समर्थनगर, कन्नड, जि. संभाजीनगर, मराठवाडा ! जयश्री प्रकाश त्रिभुवन ! इयत्ता दहावीत श्ािकणारी मुलगी. ती शाळेत जात असताना दोन महिन्यांपूर्वी काही मुस्लिम गुंडांनी तिची छेड काढली. बाबा मन्सुरी, अन्सार मन्सुरी निसार मन्सुरी हे तिच्या शेजारीच राहणारे गुंड. तेच तिची छेड काढत होते. पोलिसांमध्ये त्याविषयी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. जयश्रीचे शाळेत जाणे त्या घटनेपासून बंद झाले. त्या दिवशी ती दुधाची पिशवी आणण्यासाठी घराबाहेर पडली. गुंडांनी तिला हेरले. दुधाची पिशवी घेत असताना तिला गाठले. आमच्याशी लग्न कर, अशी थेट मागणी निर्लज्जपणे केली. तिने झिडकारताच तिला एक चापटही मारली. जयश्री घाबरली. रडत ओरडत घराकडे पळाली. थेट घरात श्ािरली. हे निर्ढावलेले तीनही गुंड तिच्या पाठीमागे पळत तिच्या घरात श्ारले. या तिघांची तक्रार ती ज्या आई, वडिलांकडे करत होती त्यांनाच या तीन गुंडांनी मारहाण करायला सुरुवात केली. तू ज्यांच्याकडे आमची तक्रार करतेस त्यांना आम्ही मारहाण करू शकतो. आता तुला आमच्या तावडीत येण्याव्यतिरिक्त दुसरा र्माग नाही, हे तिला कळावं यासाठीच हा मारहाणीचा र्माग त्यांनी निवडला असावा. जयश्री आतल्या खोलीत पळत गेली. गुंड आईवडिलांना धमकी देत निघून गेले. ही घटना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब त्रिभुवन यांचे घर गाठले. भेदरलेल्या, मार खाऊन रडत, ओरडत असलेल्या त्या त्रिभुवन दांपत्याला थोडा धीर आला. सर्वजणांनी मिळून पोलीस ठाणे गाठले. कायदा हातात घेऊन मुलीची छेड काढणाऱ्या  
आणि आईवडिलांना मारहाण करणाऱ्या या तीन खतरनाक गुंडांना अटक करून कारवाई करावी अशी तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी मात्र नेहमीप्रमाणे केवळ त्यांचा अर्ज ठेवून घेतला. कारवाई काहीच केली नाही. फक्त जुजबी आश्वासन देत तोंडाला पाने पुसली. तक्रारही दाखल झाली नाही. प्रकाश त्रिभुवन पत्नीसह घरी परत गेले. तर घरात त्यांच्यासाठी वेगळेच वाढून ठेवलेले होते. असाहाय्य जयश्री घरात अस्ताव्यस्त पडलेली. तोंडातून फेस आलेला. जयश्रीने मुस्लिम गुंडांच्या त्रासातून सुटण्यासाठी र्माग निवडला तो आत्महत्येचा. तिने घरातील विषारी औषध प्याले. तातडीने तिला दवाखान्यात तेथून संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  
या घटनेने हिंदू समाज संतप्त झाला. कन्नडच्या पोलीस ठाण्यामध्ये मोठया संख्येने जमाव जमा झाला. जयश्रीला छेडत गुंडग्ािरी करणाऱ्या त्या तीन गुडांना अटक केल्याश्ािवाय जयश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी जमावाने भूमिका घेतली. मात्र मागणी करणाऱ्या या जमावावरच पोलिसांनी लाठीमार केला. अखेर श्ािवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी यात हस्तक्षेप केल्यावर पोलिसांना जाग आली. त्यांनी आरोपींना अटक केल्यानंतर जयश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले.
या घटनेत जयश्रीला जीव गमवावा लागला तेव्हा समाज थोडा जागा होऊन पोलिसांना जाब विचारायला पुढे झाला. मात्र अशा अनेक घटनांमधल्या जयश्री आत्महत्या करत नाहीत तर या गुंडांच्या जाळयात अलगद अडकतात. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याशी लग्न करतात. धर्मांतर करून मुस्लिम नाव धारण करतात. बुरखे घालतात. इतके करूनही त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीत. हिंदू मुलींचे जीवन बरबाद करणारा हा एक भयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहाद' असे याला या गुंडांनी नाव दिलेले आहे. हा जिहाद करणे हे त्यांचे धर्मकार्यच ते मानतात. आता हळूहळू हे आक्रमण वाढले आहे. या लव्ह जिहादचे कधीतरी ऐकू येणारे उदाहरण आता रोजचेच झाले आहे. हळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढते आहे. 'हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढा. त्यांना इस्लाम बनवा,' असा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठी काढण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना वाट्टेल ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रोज 200 रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा, असा सौदा आहे. हे काम करणाऱ्या या मुस्लिम तरुणांना केवळ पैसेच मिळतात असे नाही तर हिंदू मुलींना बाटवण्यासाठी जे लागेल ते दिले जाते. नवी कोरी करिज्मा मोटारसायकल त्यांना वापरायला दिली जाते. ब्रँडेड कपडे मिळतात. त्यांचे काम एकच, हिंदू मुलींना बाटवायचे ! हिंदू मुलींना बाटविण्याचे हे कारस्थान लपून छपून नाही तर अगदी उघडपणे चालले आहे. हिंदू मुलींना बाटवा आणि रोज दोनशे रुपये घ्या, असे आवाहन करणारी पत्रके छापून वाटली जात आहेत. या विषयावरचा लेख वाचून लातूर येथील एका तरुणाने फोन केला की एका मश्ािदीसमोरून जात असताना हे पत्रक त्याच्या हातात पडले.
गोविंदराव (नाव बदलले आहे. मूळ प्रकरण सर्व कागदपत्रांसह उपलब्ध) हे पापभीरू मध्यर्मवगीय गृहस्थ. त्यांना दोन मुली. त्यापैकी मोठी मुलगी श्ािक्षणात प्रथम श्रेणीर्त उत्तीण झाल्याने ते खुश होते. लहान मुलगीही ताईच्या पाठोपाठ महाविद्यालयात नाव काढेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना अनुभव वेगळाच येतो. दुसरी मुलगी कविता महाविद्यालयात, क्लासला जात असलेली. गोविंदराव यांचा एक मित्र त्यांच्याकडे या कविताची चौकशी करू लागतो. तुमची मुलगी एका मुलाबरोबर मोटारसायकलवर नेहमी दिसते, असे सांगू लागतो. ते जरा नजर ठेवू लागतात. चौकशी करतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. कविता रोज उशीरा घरी येते. क्लासचे सर जास्त वेळ श्ािकवतात म्हणून उशीर होतो असे सांगते. क्लासमध्ये चौकशी केली असता ते म्हणतात, आम्ही कधीच मुलींना असे उशीरापर्यंत बसवून घेत नसतो. आणखी चौकशी करता असे लक्षात येते की कविता एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्याच्याबरोबर फिरते, त्यासाठी क्लास बुडवते, महाविद्यालयातील तास बुडवते. गोविंदरावांना धक्का बसतो. ते मुलीला घरात दरडावून विचारतात, दोन थपडा मारतात. मुलगी सर्व गोष्टी कबूल करते. पश्चात्ताप झाल्यासारखे दाखविते. पुन्हा करणार नाही अशी शपथ घेते. तिला बाहेर पडण्याची परवानगी मिळते. काही दिवसानंतर ती पुन्हा त्या मुलाबरोबर फिरू लागते.
कशी फसली कविता ?
या प्रकरणात दिलेल्या निवेदनात गोविंदराव लिहितात, हे प्रकरण कसे सुरू झाले याची माहिती मुलीकडून काढली तेव्हा भयानक प्रकार समोर आला. त्यांच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक मुलांचा कंपू उभा असे. कुठल्यातरी निमित्ताने मुलींची ओळख करून घ्यायची, मोबाईल नंबर घ्यायचा आणि ओळख वाढवून प्रथम फिरणे, त्यानंतर सिनेमा असे हे तंत्र आहे. यात ते जेव्हा हॉटेलिंग करतात तेव्हा मुलीच्या चहात किंवा खाद्यपदार्थात ही मुले काहीतरी टाकतात. आणि त्यानंतर या मुलीर् पूणपणे त्यांच्या कह्यात जातात.
कवितावर वारंवार नजर ठेवून, दरडावून, मारहाण करून वडिलांनी समजावले मात्र ती काही काळ संभावितपणाचा आव आणत असे आणि पुन्हा तिचे त्या मुलाला भेटणे चालू होत असे. घरातील सोन्याच्या वस्तू, पैसे गायब करून कविता त्या मुलाला देऊ लागली असेही पुढे लक्षात आले. वास्तविक दोघांच्या सामाजिक स्थितीत प्रचंड अंतर होते. तो मुलगा फक्त आठवी श्ािकलेला आणि एका वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून काम करणारा. कविता अतिशय हुशार, महाविद्यालयात श्ािक्षण घेणारी. मात्र प्रेम आंधळं असतं वगैरे वाक्ये असल्या फसवणुकीच्या धंद्यात वापरली जातात. असे लव्ह जिहादसारखे प्रकार होता कामा नयेत असे विचार मांडणारे गोविंदराव नकळत या प्रकरणात फसले होते. त्यांची लाडकी मुलगी त्यात वाहत गेली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने कवितावर काही उपचार केले जातात. वशीकरणाच्या प्रभावातून तिला बाहेर काढले जाते आण्ाि मग तिला वास्तवाची जाणीव होते. त्यातून ती बाहेर येते.
गोविंदराव या निवेदनात सांगतात की मुली काय करतात, कोठे जातात, कोणाला फोन करतात यावर लक्ष असले पाहिजे. आपण घेऊन दिलेल्या वस्तू मुलींकडे आढळल्यास चौकशी करा आणि कोणी दिलेल्या वस्तू असतील तर त्या जाळून टाका असे गोविंदराव सांगतात. गोविंदराव स्वानुभवावरून म्हणतात की लव्ह जिहादचे एक प्रकरण झाले की एक हिंदू पालक मानसिकदृष्टया खच्ची होतो. समाजाचे नुकसान आणि एका हिंदू कुटुंबाचे खच्चीकरण होते. हिंदू मुलगी पळवून नेली की तिची अपत्ये हिंदू समाजाच्या मुळावर उठणारीच असतात. श्ािवाय या मुलींना पुढे कामवाल्या महिलांपेक्षाही हीन वागणूक मिळते. गोविंदरावांनी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने वेळीच कविताला या चक्रव्यूहातून प्रयत्नपूर्वक सोडविले आहे. ते लिहितात की या प्रकरणापासून सर्वांनी सावध राहावे. हा धोका केव्हाही तुमच्या दाराशी येऊ शकतो. वेळीच सावध असले तर हा धोका टळू शकतो. एका हिंदी वाक्प्रचाराचा आधार घेऊन ते सांगतात की, 'औलाद ना हो तो एक दुख, औलाद हो कर मर जाए तो सौ दुख, औलाद हो कर जिंदा रहे और नालायक निकले तो हजार दुख', हे दु: आपल्या वाटयाला आले ते कोणाच्याही येवो असे ते लिहितात.  
सध्या तावडीत सापडणाऱ्या कोणत्याही मुलींना फसविणे आणि नादी लावणे हेच एकमेव काम ही लव्ह जिहादवाली मंडळी करत आहेत. पांडुरंग सखाराम हा एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. श्ािवाय एका अपार्टमेंटचा वॉचमन असल्याने सगळे कुटुंब त्या इमारतीतच राहते. त्याची पत्नी इमारतीतील घराघरात धुणीभांडी करते. त्याची मुलगी सुनीता फक्त 14 वर्षांची आहे. तिला एका मस्लिम गुंडाने पळवून नेले. या अल्पवयीन मुलीला पांडुरंगने अनेकवेळा त्या गुंडाच्या तावडीतून परत आणले तरी ती पुन्हा पळून जाते. तिच्यावर बलात्कार झाल्याचा आण्ाि तिला वामर्मागाला लावले असल्याचा पांडुरंगचा दावा आहे. त्याने पोलिसांना याबाबत लेखी निवेदन दिले. या संदर्भात आरोपींवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आण्ाि अपहरणाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी त्याने केली. फेब्रुवारीत त्याने हा अर्ज केला.
केवळ महाविद्यालयीत मुलीच नव्हे तर विवाहित असाहाय्य किंवा संकटात सापडलेल्या स्त्रिया यासुध्दा या गुंडांच्या नजरेत आहेत. राधा विठोबा ही एक 29 वर्षांची विवाहित तरुणी. सासरी छळ होत असल्याने तिचे वडील तिला लग्नानंतर एकाच वर्षात परत माहेरी घेऊन आले. काही नातेवाईकांकडे राहताना, काम करत असताना एका मालकाशी अनैतिक संबंध आले. आधी त्यांनी मूल हवे अशी मागणी केली मात्र प्रत्यक्ष मूल होत असताना गर्भपात करण्याचा सल्ला दिला. घरच्या लोकांनीही तसाच आग्रह केला. मात्र राधाने मूल होऊ दिले. या मुलाला कोणाचे नाव द्यायचे, याचे भवितव्य काय, घरच्या लोकांशी वैर घेतले, प्रेम केले त्या व्यक्तीनेही नकार दिला अशा प्रश्नाने घेरले असता शेजारी दुकानात काम करणाऱ्या मुस्लिम मुलाने तिला सांग्ाितले की माझे नाव मुलाला देऊ. आधी गोड बोलून या मुस्लिम गुंडाने मी तुझ्याकरता माझा धर्म बदलेन, अशा बाता मारल्या. नंतर तीर् पूण ताब्यात येताच तिला तिच्या मुलाला मुस्लिम होण्यासाठी दबाव सुरू झाला. ती काही धर्म बदलायला तयार होईना. अखेर तिच्या पायाला फ्रॅक्चर होऊन ती पडून असताना तिला अंधारात ठेवून तिच्या लहान मुलाची सुंता करून त्याला बाटवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तिचे डोळे खाड्कन उघडले. ती संतप्त झाली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली आहे. बेकायदेशीररित्या जबरदस्तीने सुंता करणाऱ्या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्याची तिने मागणी केली आहे. मात्र वर्तमानपत्रात हे प्रकरण प्रसिध्द होऊनही पोलिसांनी यात विशेष काही केलेले नाही. मुस्लिम गुंडाने सर्वांदेखत पोलीस ठाण्यात या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याने सर्द होण्याची वेळ त्या महिलेवर आणि तिला मदत करणाऱ्यांवर आली. पोलीसही काही करू शकले नाहीत.
जयंती वाघमारे हिची कथा तर आणखी विदारक आहे. आता ती 23 वर्षांची आहे. बी. कॉम. द्वितीय वर्षाला श्ािकत असताना एका मस्लिम मुलाने तिच्याशी ओळख वाढविली. प्रेमाचे नाटक केले. तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. आधी स्वत: तिच्याकरिता धर्म बदलण्याची भाषा केली. शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिला मुस्लिम झाल्यास लग्न करेन असे सांग्ाितले. तिचे धर्मांतर केले. तिला धार्मिक अभ्यासाकरिता हैदराबादला पाठविण्यात आले. धार्मिक श्ािक्षण झाल्यावर लग्न करेन असे सांग्ाितले. वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिने त्याच्याशी संबंध तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र दरवेळी कधी धमकावून, मारहाण करून, गोड बोलून त्याने तिला सोडलेच नाही. काही काळ तिला कोंडून ठेवले. नंतर शेवटी तिला पुण्यात नेऊन वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केला. मग मात्र तिने कठोरपणे त्याच्या धमक्यांना भीक घालता त्याच्याशी संबंध तोडले आणि एक प्रतिज्ञापत्र नोटरी करून पोलिसांकडे त्याच्या या सर्व कृत्याबाबत तक्रार दिली आहे.
गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचे सेंटर पाहण्यासाठी निघालेल्या मुलीला तीन मुस्लिम गुंडांनी अपहरण करून सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण गाजले होते. फेरोजखान अहमदखान, मोहसीनखान आसिफखान, अझरोद्दीन शेख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.
गेल्या वर्षी उघड झालेली एक घटना. येथील एका महाविद्यालयात अकरावीत श्ािकत असलेल्या एका तरुणीला एका लव्ह जिहादवाल्या मुलाने प्रेमाच्या जाळयात ओढले. एका हॉटेलमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आपल्या एका मुस्लिम मित्रासोबतही जबरदस्तीने संबंध ठेवायला लावले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर तिचे लग्न झाले तरी या दोन गुंडांनी तिचा पिच्छा सोडला नाही. लग्नानंतर तिच्या घरात घुसून तिचे अपहरण केले आणि एका लॉजवर तिला कोंडून ठेवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पोलिसांनी मोबाईलवरून ठिकाण शोधून या मुलीची सुटका केली.
या सर्व प्रकरणातील मुलींची नावे बदललेली असली तरी त्या मुलींच्या खऱ्या नावाने केलेले पोलिसातील अर्ज, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, सह्यांनिशी नोटरी करून दिलेली प्रतिज्ञापत्रे उपलब्ध आहेत. लव्ह जिहादचे हे स्वरूप असे भयानक आहे. काहीही करून हिंदू मुली, महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढायचे, त्यासाठी वाट्टेल ते करायचे, थापा मारायच्या, खर्च करायचा असे हे लोक करतात. त्यासाठी त्यांना वाट्टेल ती कुमक पुरविली जाते. महिलांना मुलींना एकदा नादी लावले की काहीही करून त्यांना अडकवायचे आणि धमकावून धर्मांतर करायला भाग पाडायचे. एकदा धर्मांतर केले की मग यांचे धर्मकार्य झाले. मग त्या मुलींची अवस्था भांडी घासणाऱ्या बाईसारखी झाली तरी यांचे काही बिघडत नाही. हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्यूहात ओढणाऱ्या या मुस्लिम मुलांचे मुस्लिम मुलींशी आधी किंवा नंतर विवाह झालेलेच असतात. हिंदू मुलींना प्रेमाचे गोड स्वरूप दाखवून, खर्च करून, अडलेल्यांना मदत करत असल्याचे भासवत, खोटी आश्वासने देत हे सर्व मर्यादा ओलांडायला भाग पाडतात. अगदी मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांचे नको त्या अवस्थेत फोटो काढूनही वाट्टेल ते करायला मजबूर केले जाते. यातून होत नसेल तर कन्नडच्या प्रकरणासारखे दमदाटी, मारामारी करण्याचीही तयारी असते. मुलींच्या घरच्या जवळच्या नातेवाईकांचा खून पाडण्याची धमकी देत त्यांचे भावनिक शोषणही केले जाते.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस, प्रशासन यांची भूमिका ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा दबाव असल्याने या मुस्लिम गुंडांना पूरकच असते. राधाच्या मुलाचे तिला अंधारात ठेवून धर्मांतर करण्यात आले तेव्हा ती तक्रार घेऊन पोलिसात गेली तेव्हा पोलिसांनी सर्वांसमक्ष तिलाच धमकावणे सुरू केले. एका प्रकरणात तर, एका मवाल्याने रेल्वे प्रवासात एका महिला कॉन्स्टेबलचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. या महिला पोलिसाने धाडसाने या मवाल्याला पकडले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्या मवाल्याला सोडविण्यासाठी मोठा जमाव जमला. त्यांनी त्या महिला पोलिसाला आणि तिच्या पतीला मारहाण केली. दबाव पोलिसांवर टाकून त्या मवाल्याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसाने डगमगता तक्रार दाखल केली. मात्र मुस्लिम फौजदाराने गुन्हा नोंदवता मवाल्याला पसार होण्यास मदत केली.
नुकतेच संभाजीनगर येथे एका लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदू मुलीने पळून जाऊन मुस्लिम मुलाशी लग्न केले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावले. मात्र तेथे हिंदूंचा जमाव वाढत चालला तेव्हा रॅपिड ऍक्शन फोर्सने जमावावर निर्दयपणे लाठया चालविल्या. मुलीच्या आईवडिलांनाही मारले. भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री प्रवीण घुगे तेथे सामंजस्याने प्रश्न सोडविण्यासाठी गेले होते. त्यांना प्रचंड मारहाण पोलिसांनी केली. नंतर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली तेव्हा मुलीचे आईवडिल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले. हा प्रशासनाचा पक्षपात या लव्ह जिहादमध्ये सर्व प्रकरणात जाणवला आहे. कन्नड येथेही जयश्रीची तक्रार दोन महिन्यापूर्वीच नोंदवून त्या गुंडांना पोलिसांनी धमकावले असते तर जयश्रीला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
'दार उल हरब'ला 'दार उल इस्लाम' करण्याचा हा सगळा जिहाद आहे. अलीकडे या लव्ह जिहादमध्ये नियोजन, पैसा, ताकद, राजकीय दबाव अशा सर्व आयुधांचा वापर चालला आहे. हिंदूंना सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या मुलींना या सर्व प्रकरणांची नीट कल्पना घरातच दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारे मवाल्यांशी संपर्क येणार नाही आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचीही संधी मिळता कामा नये याची काळजी मुलींनी सतर्कतेने घेतली पाहिजे. ही आता फुटकळ कोठेतरी केव्हातरी होणारी प्रकरणे नाहीत तर हे नियोजनबध्द आक्रमण आहे आणि वारंवार या घटना घडत आहेत. त्यात वाढ होते आहे. प्रशासन, शासन, राजकारणी यात मताचा, ढोंगी जातनिरपेक्षतेचा विचार करत बोटचेपी भूमिका घेताना दिसतात.
नुकतेच संभाजीनगरमध्ये प्रचंड संख्येने लव्ह जिहादविरोधात मोर्चा निघाला होता. त्यानंतर बागेमध्ये हिंदू मुलींसोबत प्रेमाचे चाळे करणाऱ्या मुस्लिम गुंडांना पकडून पोलिसांच्या हवाली करणे, चोप देणे अशा घटना घडल्या आहेत. लव्ह जिहादच्या नियोजनबध्द आक्रमणाला आता नियोजनबध्द संघटित विरोध करण्याचीही गरज आहे. काही शहरात बेटी बचाओ, हिंदू समन्वय समिती, हिंदू जागरण मंच अशा नावाने धाडसाने काही तरुण एकत्र येऊन सक्रीय झाले आहेत. हे प्रयत्न अधिक शक्तिशाली आण्ाि अधिक गतिमान झाले पाहिजेत. प्रेमभावना असणे, त्यात उत्कटता असणे याचा या लव्ह जिहादमध्ये लवलेशही नाही. लव्ह जिहाद हा धोका, बदमाषी, नियोजनबध्द सापळा आहे. चित्रपटातील नायकांमध्ये खान मंडळींची मोठी मालिका, चंगळवाद, कमी वयात काहीही कामे करून पैसे खिशात खुळखुळणारी मुस्लिम मुले हे सगळे वातावरण या लव्ह जिहादला पूरक आहे. मुस्लिम मुले कोणतेही काम करायला तयार असतात, गोड बोलून, सभ्यतेचा आव आणून संमोहनास्त्र टाकण्यात ती पुढे असतात. 'बेटी बचाओ'मध्ये काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते संजीव जैन म्हणतात की, 'हिंदूंनी आपापल्या नोकऱ्या, कामे प्रामाण्ािकपणे आळस करता, नम्रता, सभ्यता हे मूळ गुण वापरून केल्या पाहिजेत.' प्रवीणभाई तोगडिया यांनी लव्ह जिहादमध्ये सक्रीय असणाऱ्या मुस्लिम मवाल्यांवर आर्थिक बहिष्कार टाका, असे आवाहन केले आहे. आपल्या मुलींना या भयानक चक्रव्यूहाची नीट कल्पना देऊन, संघटित प्रयत्नांची दिशा आणि वेग वाढवून, आपापली कामे चोख आणि प्रामाण्ािकपणे करत विकास करून, बहुसंख्याकांच्या जातपातविरहित गठ्ठा मतांचा धाक राजकारण्यांवर निर्माण करून, सतत सतर्क आणि जागरूक राहून हा प्रेमाचा जिहादी चक्रव्यूह भेदावा लागेल. त्यासाठी आता जागे होऊन सक्रीय होण्याची वेळ आली आहे

No comments:

Post a Comment