Total Pageviews

Friday 3 June 2011

INTERESTING VIEW POINT

http://santoshgore.blogspot.com/


Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.

Friday, April 29, 2011

बांग्लादेशात हिंदूंवर बलात्कार, पाकिस्तानात हिंदूंना जाळले, पण प्लीज थंड बसा !

धर्म ही अफूची गोळी आहे. आणि हे वरील चित्र ते दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. मात्र या अफूच्या गोळीचं ज्यांना व्यसन लागलं आहे, त्यांचं हे व्यसन दूर कसं करायचं ? यावर काही गोळी आहे का ? कारण या आपल्या निधर्मी देशात सिंगल कॉलम छापून आलेल्या दोन बातम्यांचा परामर्श या लिखाणात घेतला आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर रोजच अत्याचार होतात. राजरोसपणे हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला जातो. हिंदूंना रोजच मुस्लीमांचा मार खावा लागतो. खाली दिलेलं हे बांग्लादेशमधल्या मुस्लिमांच्या अत्याचाराचं चित्र या साठी पुरेसं आहे. http://hindubd.blogspot.com/ वर हिंदूंची बांग्लादेशमध्ये काय स्थिती आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

२००१ च्या निवडणुकीनंतर शेकडो हिंदू स्त्रियांवर बांग्लादेशमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा सरकारी आकडा आहे. आपल्याकडे ही सिंगल कॉलम बातमी आता छापून आली आहे. मात्र ती बातमी वाचून प्लीज कोणीही पेटून उठू नका. कारण अत्याचाराचा हा पाढा काही अजून संपलेला नाही. हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांना मुस्लिम होण्यासाठी भाग पाडलं जात आहे. दिवसाढवळ्या हिंदूंची मंदिरं लूटली जात आहेत. वर दिलेल्या ब्लॉगमधील कॉमेन्टस वाचा, हिंदूंनी कसा तिथं टाहो फोडला आहे, ते हिंदूस्थानकडून मदतीची अपेक्षा करत आहेत हे दिसून येतं. हिंदू आणि बौद्धांच्या श्रद्धास्थानांना तिथं मातीत मिळवलं जात आहे. बांग्लादेशमधला वरती लिंक दिलेला ब्लॉग १० जानेवारी २०११ रोजी अपडेट झाला आहे. त्यानंतर म्हणजे आजपर्यंत साडेतीन महिन्यात तो अपडेट झालेला नाही. कुणास ठाऊक तो ब्लॉग लिहणारा मुस्लिमांच्या हातून तर मारला गेला नसेल ना ? अशी भीती वाटतेय.


वरती जळणारी ही बस पहा. ही जळणारी बस नव्हे तर हिंदूंची पाकिस्तानातली चिता आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातले हिंदू काय मुस्लिमांच्या हातून मरायलाच जन्माला आले आहेत का ? पाकिस्तानातल्या बलुचिस्तानातल्या क्वेटामध्ये प्रवास करणा-या हिंदूंची बस चार सशस्त्र मुस्लिमांनी अडवून ती पेट्रोलनं पेटवून दिलं. त्यात सात चिमुकल्यांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. थांबा, शांत व्हा, रक्त उसळू देऊ नका. कारण अत्याचाराची मालिका अजूनही संपलेली नाही. बलुचिस्तानमध्येही हिंदूंची हत्या, मुलींना पळवून नेऊन त्यांना मुस्लिम करणे, बलात्कार करणे या घटना सुरू आहेत. अतिरेकी आणि धर्मांध मुस्लिम कधी हल्ला करतील याचा नेम नाही. तिथल्या सरकारी आकड्यानुसार 2010 या वर्षात 291 हिंदूंचं अपहरण करण्यात आलं. शेवटी हा सरकारी आकडा. त्यातले कित्येक परत आलेच नाहीत. अनेकांना मोठी रक्कम देऊन सोडवून आणावं लागलं.

बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंना किती दिवस आपण मरू देणार आहोत ? त्यांनाही जगायचं आहे. मात्र तिथले मुस्लिम त्यांना जगू देणार नाहीत. हिंदू माता - भगिनींची दिवसाढवळ्या विटंबना तिथं सुरूच राहिल. 'आम्हाला हिंदूस्थानात येऊ द्या' असा टाहो बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंनी फोडला आहे. अरे निधर्मी सरकारच्या षंढांनो तुमच्या कानावर हा टाहो पडत नाही का ? आपल्या हिंदू बांधवांवरील हा अत्याचार थांबवावा असं तुम्हाला वाटत नाही का ?

सरकार म्हणून तुम्हाला जरी काही वाटत नसलं तरी ते आमचे रक्ताचे हिंदू बांधव आहेत. नाही तरी देशात रोज बांग्लादेशी मुस्लिमांची घुसखोरी, पाकिस्तानातून अतिरेक्यांची घुसखोरी सुरूच आहे. कोट्यावधी बांग्लादेशी मुस्लिम हिंदूस्थानात सुखाने जगत आहेत. मग आपल्या रक्ताच्या हिंदूंना आपल्यात सामावून घेणं काहीच अवघड नाही. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या हिंदूंना त्यांच्या स्वत:च्या हिंदूस्थानात आसरा द्या. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या नागरिकांना अल्पसंख्यक हिंदू नको आहेत. चालेल आम्ही आमचे हिंदू आमच्या देशात सामावून घेतो. तुम्ही तुमचे मुसलमान तुमच्या देशात सामावून घ्या. आता आहे का काही उत्तर लांड्यांनो...बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या.

http://www.thereligionofpeace.com/ या वेब साईटवर मुस्लिम अत्याचाराच्या जगभरातल्या अधिक छळ कथा वाचा.

No comments:

Post a Comment