‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या सिद्धांताच्या आधारे पाकिस्तानला पश्चिम सीमेवर
अफगाणिस्तानचे आव्हान भेडसावत आहे. तालिबान पाकिस्तान
संबंधांमध्ये घनिष्ट संबंध संपून कटुता, वितुष्ट आणि थेट शत्रुत्व
निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमधील अंतर्गत
सुरक्षा संबंधित हिंसाचारामध्ये पाकिस्तानी सैन्य मोठ्या संख्येने मारले गेले
आहेत. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण १८,१६०
हिंसाचाराच्या घटनांमध्ये १०,१२८ पाकिस्तानी
सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
२०२५ मध्ये हा हिंसाचार आणखी
वाढला आहे. फक्त १२ ऑक्टोबरपर्यंतच ८४८ हिंसक घटनांमध्ये ९४८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले
आहेत. ही आकडेवारी ऑपरेशन सिंदूर
मध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांपेक्षा
पेक्षा पाचपटीने जास्त आहे.म्हणजेच
तालिबान भारताचे काम सोपे करत आहे.
ताज्या
संघर्षास कारणीभूत आहे पाकिस्तान. अफगाणिस्तानात अलीकडेच
पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 50हून अधिक निष्पाप महिला व
बालकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर चिडलेल्या तालिबानने पाकिस्तानला
कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांना विभागणार्या ड्युरंड लाईनवर पाकिस्तानी
लष्कराच्या चौक्यांवर तालिबानने केलेल्या हल्ल्यामध्ये 60 हून अधिक पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. यामध्ये बॉम्बहल्ले, आर्टिलरींचा वापर केला जात आहे.
पाकिस्तान अमेरिकेचा
अत्यंत महत्त्वाचा मित्र
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि
पंतप्रधान शाहबाज शरीफ ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत
अनेक वेळा भेट घेतल्या. आपण अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा मित्र बनलो आहे असे ते दाखवत आहे .परंतु पाकिस्तानचे उलटी
अंतर्गत सुरक्षेची आव्हाने अजून जास्त वाढत आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान युध्दा करता अमेरिकेने दोष
पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तान अंतर्गत असंतोषाच्या ज्वालामुखीवर उभा आहे. बलुचिस्तानमध्ये विभक्त होण्यासाठीची नागरी चळवळ निर्णायक
स्तरावर पोहोचली आहे. बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर मोठे
हल्ले करत आहेत. गिलगिट- बाल्टिस्तानमधील नागरीक
पाकिस्तान सरकार व लष्कराच्या दंडेलशाहीला आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला विरोध
करत आहेत.
खैबर
पख्तुनवा पेटला आहे. खैबर पख्तुनवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या
सीमेवरील प्रांत आहे. या भागात प्रामुख्याने पख्तुन लोकांचे वर्चस्व आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 1893 मध्ये ड्युरंड लाईन ब्रिटिशांनी आखलेली होती. अफगाणिस्तानला ही ड्युरंड लाईन मान्य नाही.अफगाणिस्तानात अनेक टोळ्या आहेत. या टोळ्यांचे अस्तित्व खैबर पख्तुनवा भागात आहे. ते सातत्याने दावा करत आहेत की, हा संपूर्ण प्रदेश आमचा आहे.
तालीबानचा उदय पाकिस्तान मुळे
तालीबानचा उदय पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या
मदतीमुळे झाला . तालिबानच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा/ योद्ध्यांचा वापर भारताला
रक्तबंबाळ करण्यासाठी करावा, असा पाकिस्तानचा डाव होता. अफगाणिस्तानातून अमेरिकन
फौजा मागे फिरल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीनेच तेथे तालिबानचे शासन प्रस्थापित झाले; पण आज याच तालिबानने पाकिस्तानविरुद्ध शस्र उगारले आहे. दोन सुन्नीपंथीय देशांमध्ये संघर्ष पेटला आहे.
अफगाणिस्तानचे
परराष्ट्रमंत्री आमीर खान यांची भारत भेट
अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान
यांनी भारताला भेट दिली. भारतीय
परराष्ट्रमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा-वार्तालाप सुरू असतानाच,
पाकिस्तानने एअर स्ट्राईक घडवून आणला.
तालिबानने पहिल्यांदा जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा
मिळवला होता, तेव्हा भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी
हिंसाचार हिंसाचार वाढला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा दहशतवादी
संघटनांना तालिबानचा पाठिंबा होता. त्यामुळे भारताने
अफगाणिस्तानसोबतचे संबंध तोडून टाकले होते.
2021 नंतर अफगाणिस्तानात दुसर्यांदा तालिबानचे शासन
प्रस्थापित झाले त्यावेळी परिस्थिती बदललेली दिसून आली. भारताने अफगाणिस्तानात विकास प्रकल्पांमध्ये अब्जावधी
डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हे विकासात्मक प्रकल्प पुढे
सुरू राहावेत, तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानकडून
भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये ही यामागची प्रमुख भूमिका होती.
आमीर खान भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी स्पष्टपणाने
सांगितले की, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी
संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर पाय ठेवू दिलेला नाही.
बगरामचा एअरबेस भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्या
बगरामचा एअरबेस आम्हाला परत द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा
अशी उघड धमकी अलीकडेच दिली आहे. बगराम विमानतळाची उभारणी
सोव्हिएत महासंघाने केलेली होती. या
विमानतळाला मध्य आशिया आणि पश्चिम
आशिया आशियावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचे विमानतळ समजले जाते. कारण विमानतळ भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी
वसला आहे. एकाच वेळी कझाकिस्तान, उजबेकिस्तान, कैरेगिस्तान म्हणजेच मध्य आशियावर नजर ठेवता येते. त्याचप्रमाणे पश्चिम आशियातील सर्व अरब देशांवर नियंत्रण
ठेवता येते. इतकेच नव्हे तर चीनचा शिनशियांग प्रांत आणि रशिया
यांच्यावरही नजर ठेवता येते. यामुळे ट्रम्प बगराम विमानतळ
ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत.
बगराम एअरबेस हा संरक्षण कार्यासाठी वापरल्या
जाणार्या जगातील सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. अफगाणिस्तानात असतांना अमेरिकेने 20 वर्षांत बगराम एअरपोर्टचे रुपांतर एका शहरात केलेले आहे. परंतु ज्यो बायडेन यांनी बगराम एअरबेस रिकामा करण्याचा
निर्णय घेतला आणि तो तालिबानच्या कब्जामध्ये आला. आता डोनाल्ड ट्रम्प यांना यावर पुन्हा एकदा नियंत्रण हवे आहे.
तालिबानची मनधरणी करण्याची
जबाबदारी जनरल मुनीर यांना
मागील दशकात अमेरिकेने पाकिस्तानपासून पूर्णपणे फारकत
घेतली होती. पण आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, पंतप्रधान व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना
भेटत आहेत. मागील महिन्यात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी तीन
वेळा अमेरिकेला भेटी दिल्या. बगरामबाबत तालिबानची मनधरणी
करण्याची जबाबदारी जनरल आसिम मुनीर यांना देण्यात आली. पण तालिबानने यास पूर्णपणे नकार दिला. आम्ही एक इंचही जमीन अमेरिकेला देणार नाही, असे स्पष्ट केले. भारताने सुध्दा अमेरिकेच्या
विरोधात जाऊन तालिबानच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
भारत आणि
अफगाणिस्तान यांच्यामध्ये 2018 मध्ये एक
सामरिक भागीदारीचा करार करण्यात आला होता. त्या करारानुसार
अफगाणिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैनिक अफगाणिस्तानात जाऊ
शकतात . मात्र 2021 मध्ये
तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर भारताने हा करार रद्द केला होता. आता भारताचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. काबूलमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरू होणार आहे. 2018 चा करारही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या माध्यमातून अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय
सैन्य, भारतीय वायूदल पुन्हा अफगाणिस्तानात जाऊ शकतात. तसेच बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल.याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलाना आमिर खान
मुत्तकी यांच्या भारत दौऱ्याची चर्चा झाली. हा दौरा एकाएकी घडलेली घटना
नसून, यामागे अफगाणिस्तानशी सर्व पातळीवर संबंध
सुधारण्याच्या भारताच्या मोठ्या पद्धतशीर प्रयत्नांचाही वाटा आहे.
तालिबान सरकारने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा
निषेध केला होता. तसेच, पाकिस्तानने कांगावा करून
भारताविरुद्ध अफगाणिस्तानमध्येही हल्ले केल्याचा आरोप केला होता, तेव्हा तालिबान सरकारने असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले
होते.
या भेटीमध्ये भारताने काबूलमधील आपला राजदूतावास
उघडण्याचा निर्णय घेतला, तर अफगाणिस्तानच्या
दिल्लीमधील दूतावासात अफगाणिस्तानचा जुना झेंडा जाऊन तालिबानचा झेंडा फडकू लागला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक
अखंडतेचा आदर राखण्यावर भर दिला. अफगाण परराष्ट्रमंत्र्यांनी
आश्वासन दिले की, अफगाण सरकार भारताविरुद्ध कोणत्याही गटाला किंवा
व्यक्तीला अफगाणिस्तानची भूमी वापरू देणार नाही.
मुत्तकी यांनी अफगाणिस्तान सोडून पळून आलेल्या हिंदू
तसेच, शीख धमयांना सुरक्षिततेची हमी दिली
आहे.
स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्यावर बंधने
टाकणाऱ्या तालिबान राजवटीशी चीन आणि पाकिस्तानचे अफगाणिस्तानशी
अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. चीन मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानमधील दुर्मिळ खनिजे, दुर्मिळ
मृदा घटक (Rare Earths) आणि नैसर्गिक संसाधने उत्खनन करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेलाही
लवकरात लवकर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा आहे. पाकिस्तान नेहमीच
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी करत असतो.
No comments:
Post a Comment